Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210
Mulund के बोगस कॉल 센टर केस में 5 गिरफ्तार, विदेशी नागरिक धोखा
MKManoj Kulkarni
Nov 13, 2025 02:37:04
Navi Mumbai, Maharashtra
अँकर -- मुलुंड येथे वैधारित्य सुरु असलेल्या  आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर मुलुंड पोलिसांनी उध्वस्त केलं.. बँकेचे अधिकारी असल्याची बतावणी करुन कर्जाच्या आमिषाने ही टोळी Америка आणि कॅनडा देशातील नागरिकांची फसवणुक करत होती. याच गुन्ह्यांत एका मुख्य आरोपीसह इतर चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर राजेश गुप्टा, अभिषेक सूर्यप्रकाश सिग, तन्मयकुमार रजनीश दादसिंग, शैलेश मनोहर शेट्टी आणि रोहन मोहम्मद अन्सारी अशी या पाचजणांची नावे आहेत. या टोळीने कर्जाच्या आमिषाने आतापर्यंत अनेक विदेशी नागरिकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. अटकेनंतर पाचही आरोपींना मुलुंड. यायलयाने   पोलीस कोठडी सुनावली आहे.मुलुंडच्या मुलुंड कॉलनीत काहीजण बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची कर्जाच्या आमिषाने फसवणुक करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांना मिळाली होती. ही माहिती काढताना या पथकाने मंगळवारी मुलुंड कॉलनीतील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये छापा टाकलाद होता. यावेळी तिथे सागर गुप्ता हा त्याच्या इतर चार सहकाऱ्यांसोबत उपस्थित होता. या फ्लॅटमध्ये त्याने एक बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरु केल्याचे दिसून आले. लेंडीग पाईट या संस्थेचे पदाधिकारी असल्याचे भासवून, त्यांच्याकडील आंतरराष्ट्रीय ई-सिमकार्डचा वापर करुन सागर गुप्तासह इतर चौघेजण अमेरिका आणि कॅनडा देशातील नागरिकांना कॉल करत होते. तयांना पे डे तत्त्वावर तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखविले जात होते. त्यासाठी त्यांना प्रोसेसिंग फी म्हणून नव्वद, शंभर आणि दिडशे डॉलर रक्कम जमा करण्यास सांगण्यात येत होते. मात्र ही रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर होताच त्यांना कुठलेही कर्ज न देता त्यांची फसवणुक केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी दोन लॅपटॉप, अकरा मोबाईल, दोन राऊटर, 76 हजाराची कॅश असा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांना कर्ज मंजुरीचे काही कागदपत्रे सापडले असून या कागदपत्रांवरुन त्यांनी अनेक विदेशी नागरिकांना कर्जाच्या आमिषाने गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या कर्ज प्रकरणात एकच अॅप्लिकेशन क्रमांक सापडला आहे. या टोळीचा सागर गुप्ता असून त्याच्याकडे इतर चौघेही कामाला होते. सागरने कॉल सेंटर चालविणयासाठी आवश्यक असलेले कोणतेही अधिकृत परवानगी घेतली नव्ती. तो त्याच्या अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवून कर्जाच्या आमिषाने विदेशी नागरिकांची फसवणुक करत होता. त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी घेऊन या पैशांचा अपहरण करत होता. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांना कर्ज मंजुरीचे पत्र पाठविले जात होते.
107
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Nov 13, 2025 04:16:55
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत अल्पसंख्यांक उमेदवाराला धमकावले जात असल्याचा माजी आमदार रमेश कदम यांचा गंभीर आरोप - मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाच्या उमेदवारांना धमकावलं जात आहे - अशी गुंडगिरी आम्ही चालू देणार नाही. आरेला कारे ने उत्तर देणार - माजी आमदार रमेश कदम यांचा मोहोळच्या स्थानिक पुढाऱ्यांवर आरोप - ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार आहे. - त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरही अल्पसंख्यांक समाजासोबत राहणार - अल्पसंख्यांक समाजातील लोकांनी इतर कोणाचीही उमेदवारी घ्यायची नाही असे धमकावले जात आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 13, 2025 04:16:28
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत प्रतिहेक्टर ८,५०० इतकी मदत मंजूर केली होती. शेतकऱ्यांना दिलासा देत शासनाने रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदीसाठी आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत २ लाख ९६ हजार ६१८ शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १०,००० या प्रमाणात मदत मंजूर करण्यात आली असून, एकूण २७५ कोटी ३० लाख ४३ हजार २०० रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे. या मदतीपैकी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला असून,त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 13, 2025 04:06:36
Amravati, Maharashtra:केवळ 10 महिन्यात तब्बل 888 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ऐन दिवाळीच्या ऑक्टोबर महिन्यात 87 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच आकडेवारीत उघड झालं आहे. नैसर्गिक आपत्ती आणि पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणा शेतकरी आत्महत्येचे कारण ठरले आहे. बँका आणि खाजगी सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याने शेतकरी त्रस्त आहे. दरम्यान अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यांतील धक्कादायक आणि चिंताजनक आकडेवारी समोर आली असून सर्वाधिक 316 आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्याची माहिती आहे. अनेक शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत तर शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याने विदर्भात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येची आकडेवारी वाढल्याचे दिसून येत आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 13, 2025 04:06:06
Satara, Maharashtra:सातारा: लोणंद येथील श्री म्हस्कोबानाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गुलालाची उधळण करीत, झांज आणि ढोल ताशाच्या गजरात श्री नाथाचा छबीन्हा काढण्यात आला. या छबीन्यात गुलाला नाहून निघालेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. खेमावती नदीच्या तीरावर असलेले श्री म्हस्कोबानाथ आणि माता जोगेश्वरी देवीचे मंदिर आकर्षक फुलांच्या माळांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं होतं. यात्रेनिमित्त भाविकांनी नाथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलीलेली पाहायला मिळाली. या यात्रेदरम्यान भाकनुक करून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. लोणंदची ही पारंपरिक यात्रा असून श्री म्हस्कोबानथ यात्रेसाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 13, 2025 04:05:48
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... घरकुल निधीत 75 लाख 15 हजार रुपयांची हेराफेरी... पाच जनांवरील कारवाईत दोन निलंबीत तर तिन कार्यमुक्त.... लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि जळकोट पंचायत समित्यांमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला आहे... घरकुल योजनेतील तब्बल पंचाहत्तर लाख पंधरा हजार रुपयांची अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे! राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत काही अधिकाऱ्यांनी संगनमतानं लाभार्थ्यांच्या ऐवजी आपल्या जवळच्या व्यक्तींच्या खात्यावर पैसे वळवले... या प्रकरणात दोन शाखा सहाय्यकांना निलंबीत करण्यात आलं आहे... तर दोन कंत्राटी गृहनिर्माण अभियंते आणि एका डाटा ऑपरेटरला कार्यमुक्त करण्यात आलं आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 13, 2025 03:55:26
Hingoli, Maharashtra: अँकर- नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने हिंगोली मध्ये महायुतीत असलेल्या भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याची बघायला मिळतेय. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्याकडून एकमेकांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. संतोष बांगर यांनी हिंगोली नगर पालिकेत स्वबळाची भाषा केल्या नंतर भाजपने ही आता स्वबळाचा नारा दिलाय. आमदार बांगर त्यांचे बंधू श्रीराम बांगर यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत,त्यामुळे त्यांनी सदर निवडणूक प्रतिष्ठेची बनवलीय. मागच्यावेळी भाजपचे बाबाराव बांगर हिंगोलीत नगराध्यक्ष होते, त्यामुळे या निवडणुकीत महायुतीत असलेले आमदार बांगर आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आमने सामने आले आहेत. बांगर यांनी आमदार पत्ते खेळतात,मुटकुळेच्या पोराला आमदार व्हायचय,पोराच्या भीतीने मुटकुळे कडी लावून झोपायलेत, त्यांना कुठं कुठं पकडलय मला तर कुठं पकडला नाहीये ना असा आरोप केलाय. त्यानंतर आमदार मुटकुळे यांनी त्यांच्या आरोपाला जोरदार उत्तर देत आमदार बांगर यांचे मटका गुटखा वाळूचे धंदे असल्याचं म्हणत, बनावट नोटा प्रकरणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची पोलिसांनी चौकशी सुरू केली सांगितले. आमदार बांगर यांचे गुंड निलेश घायवळ सोबत संबंध असून घायवळ हिंगोलीत येऊन गेल्याचा धक्कादायक आरोप आमदार मुटकुळे यांनी केलाय. या बाबत आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचे ही ते म्हणाले.. बाईट- संतोष बांगर- आमदार- शिंदे गट बाईट- तानाजी मुटकुळे - आमदार,भाजप
88
comment0
Report
Advertisement
Back to top