Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
संभाजीनगर के सिंह जोड़ी मराठी-सीखेंगे, आयुक्त की मदद से
VKVISHAL KAROLE
Sept 30, 2025 10:32:42
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn lion pkg Feed csn lion by tvu 2 vdo clip assignment  no वर टाकल्या आहेत... Anchor : बातमी संभाजीनगर मध्ये आणलेल्या सिंहाच्या जोडीची, कर्नाटक मधल्या शिवमोघा तुन सिंहाची जोडी आणण्यात आली आहे, आठ वर्षाचे हे सिंह आहे आणि आतापर्यंत हे कानडी भाषाच ऐकत आले आहे त्यामुळे संभाजीनगर मध्ये मराठीत बोलताना त्यांची काळजी घेणाऱ्यांचा चांगलाच कस लागतो आहे, त्यांना खाऊ घालणे त्यांना शिस्त लावणे सगळंच अडचणीचे झाले आहे मात्र यात मदत झालीय ती महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांची,  आयुक्तांना कानडी येते आणि त्यामुळं त्यांची मदत प्राणि संग्रहालयातील लोकांना घ्यावी लागतेय... पाहुयात Vo 1... संभाजीनगरचा सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाचे हे नव आकर्षण म्हणजे अर्जुन आणि सुचित्रा ही सिंहाची जोडी.. कर्नाटकातल्या शिवमोघा प्राणी संग्रहालयातून हे सिंह तीन दिवसांपूर्वी संभाजीनगर मध्ये दाखल झाले.. इथं प्राण्यांची काळजी घेण्यासाठी खास केअरटेकरही आहेत मात्र त्यांना अडचण झाली या सिंहाशी संवाद साधण्याची , कारण सिंह जन्मले तेव्हापासून कानडी ऐकतात त्यामुळे मराठी भाषेशी त्यांचा काहीही संबंध नाही आणि नेमकी हीच अडचण झाली आहे त्यांना खायला घालताना त्यांना शिस्त लावताना त्यांच्याशी संवाद साधताना भाषेची एक मोठी अडचण इथल्या काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना होते , त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांचीच मदत घेतली आहे , आयुक्त कानडी बोलू शकतात त्यामुळे या सिंहांना आयुक्त कानडी भाषेतुन बोलण्याचा प्रयत्न करताय... ( आयुक्त बोलताय आवाज फार आला नाही सिंहाचा येतोय जास्त 2 व्हीडिओ assignment व्हाट्स अँप वर टाकले आहेत ...) आयुक्त ही भाषेची अडचण येते हे मान्य करतात त्यामुळे मी स्वतः बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि इथल्या कर्मचाऱ्यांनाही या भाषेचं काही प्रमाणात प्रशिक्षण देणार असल्याचं आयुक्त सांगतात आहे.. Byte जी श्रीकांत महापालिका आयुक्त Vo 2... या सिंहाला येऊन फक्त तीन ते चार दिवस झाले आहे मात्र अजूनही ते इथं रूळले नाही , नेहमीचे काळजी घेणारे नाही वरून भाषेची अडचण मात्र लवकरच सिंहांना मराठी भाषा सुद्धा कळेल त्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्यास महापालिका आयुक्तांनी सांगितले.. Byte जी श्रीकांत , महापालिका आयुक्त Vo 3.. असं म्हणतात की प्राण्यांना प्रेमाची भाषा पुरेसी आहे मात्र जे शब्द रोज कानावर येतात त्यांची त्यांना सवय झाली असते आणि त्यानंतर काय करायचं हे त्यांना माहिती असतं आतापर्यंत कानडी सूचना ऐकणारे हे सिंह थेट मराठी भाषा प्रदेशात आले त्यामुळे निश्चितपणे अडचण येते मात्र महाराष्ट्रात आल्यावर सिंहानाही लवकरच मराठी कळेल समजेल हीच अपेक्षा आपण करूया, आणि इथेही ते लवकरच रुळतील हीच अपेक्षा... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Sept 30, 2025 12:51:30
Khed, Maharashtra:पुण्याच्या खेड तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी बसचा प्रवासच आता प्रवाशांसह विद्यार्थींना धोक्याचा वाटु लागलाय.. कडुस कोहिंडे रोडवर दोन एसटी बसचा समोरासमोर धडकीचा अपघाताचा थरार प्रवाशांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अनुभवला यावेळी एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत एसटी बाजुला घेतल्याने मोठ्या अपघाताचा प्रसंग टळला यावेळी दोन एसटी बस ग्रामीण भागातील रस्त्यावर धावताना भरधाव वेगाने धावत होत्या यावेळी एकमेकांना कट मारण्याच्या नादात हा भिषण अपघात झाला यावेळी प्रवाशांनी अपघाताचा थरार डोळ्यासमोर अनुभवल्याने आता एसटी बसचा प्रवासही सुखरुप नसल्याची भावना व्यक्त केलीय
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 30, 2025 12:50:59
Kalyan, Maharashtra:पथदिवे दुरुस्त करताना हाय टेन्शन वायरचा संपर्क आल्याने केडीएमसी विदयुय विभागात खाजगी काम करणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू.. ​कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरात आज दुपारच्या सुमारास विजेच्या धक्क्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू. संदीप चौधरी असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव; तो कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) खाजगी ठेकेदाराचा कामगार होता. पथदिव्यांची दुरुस्ती करत असताना संदीप चौधरी याचा महावितरणच्या हाय टेन्शन वायरला संपर्कात आल्याने विजेचा जोरदार विजेचा झटका बसला. पथदिव्यांमध्ये विविध विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे कंत्राटी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 30, 2025 12:50:36
Oros, Maharashtra:शाळेत सरस्वती पूजन करून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांच्या दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात एक मुलगा जागीच ठार झाला. तर अन्य दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई गोवा महामार्गावर कुठाळ झाराप फाटा येथे घडली. राज पेडणेकर असे मृत मुलाचे नाव आहे. तर त्याच्यासमवेत सोहम परब व लवू रविंद्र पेडणेकर हे दोघे जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. जोपर्यंत कार चालकावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र पोलीसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 30, 2025 12:33:11
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 30, 2025 12:31:25
Yavatmal, Maharashtra:राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या मतदारसंघात पुसद येथे आदिवासी समाजाने विराट मोर्चा काढून बंजारा व धनगर याच्यासह कुठल्याच समाजाची आदिवासींमध्ये घुसखोरी खपवून घेणार नाही असा इशारा दिला. भाजपाचे आमदार राजू तोडसाम, आमदार भीमराव केराम व भाजप जिल्हाध्यक्ष आरती फुफाटे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. आरक्षणासाठी जीआर नाही तर डॉक्टर बी आर आंबेडकर नावाचा बाप लागतो असे लक्षवेधी फलक त्याचप्रमाणे आदिवासी क्रांतिकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा घेऊन मोर्चेकरी मोर्चात सहभागी झाले होते. बाईट - राजू तोडसाम, आमदार
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 30, 2025 12:30:42
Jalna, Maharashtra:जालना : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा दूर,ई -केवायसीची अट राज्य सरकारकडून शिथील, कृषीमंत्री भरणे यांची घोषणा, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया(सुधारीत) अँकर : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा राज्य सरकारच्या वतीने दूर करण्यात आला आहे.ई केवायसीची अट राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आली आहे.अतिवृष्टी बाधित अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसल्यानं त्यांच्या खात्यावर मदत मिळणार नसल्याच्या तक्रारी होत्या.त्यामुळे मदतीपासून कोणताही शेतकरी अथवा बाधित वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने ई-केवायसीची अट शिथिल करण्यात आली असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.दरम्यान कृषिमंत्री भरणे यांच्या या घोषणेवर जालन्यातील शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.सरकारच्या या निर्णयाचं स्वागत आहे.आता सरकारने खरीप पिकांसाठी हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरेपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर काही शेतकऱ्यांनी ई केवायसी अट शिथिल करून फायदा नाही ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 30, 2025 12:25:26
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash साईबाबा संस्थानकडून अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी 5 कोटी रुपयांची मदत... यापूर्वी 1 कोटी रुपयांची मदत केली होती जाहीर... पूर्वीचे 1 कोटी आणि आता पुन्हा 4 कोटी अशा 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी उच्च न्यायालयाकडे पाठवला... 50 लाख रुपयांवरील खर्चासाठी साई संस्थानला उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक... मुख्यमंत्री सहाय्यात निधीसाठी साई संस्थान देणार 5 कोटी रुपये... राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत शिर्डीचे साई संस्थान मदतीसाठी सरसावले... यापूर्वीही देशातील आपत्कालीन परिस्थितीत साई संस्थाकडून दिली गेली भरघोस मदत... आता राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत साई संस्थानने पुन्हा जपली सामाजिक बांधिलकी...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 30, 2025 12:25:17
Jalna, Maharashtra:जालना : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा दूर,ई -केवायसीची अट राज्य सरकारकडून शिथील, कृषीमंत्री भरणे यांची घोषणा, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा राज्य सरकारच्या वतीने दूर करण्यात आला आहे.ई केवायसीची अट राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आली आहे.अतिवृष्टी बाधित अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसल्यानं त्यांच्या खात्यावर मदत मिळणार नसल्याच्या तक्रारी होत्या.त्यामुळे मदतीपासून कोणताही शेतकरी अथवा बाधित वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने ई-केवायसीची अट शिथिल करण्यात आली असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्र्ी दत्तात्रय भरणे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.दरम्यान कृषिमंत्री भरणे यांच्या या घोषणेवर जालन्यातील शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.सरकारच्या या निर्णयाचं स्वागत आहे.आता सरकारने खरीप पिकांसाठी हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर काही शेतकऱ्यांनी ई केवायसी अट शिथिल करून फायदा नाही ई-केवायसीची अट रद्द करण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 30, 2025 12:18:12
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 30, 2025 12:02:10
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरापासून दक्षिणेला गोधनी मार्गावरून पुढे गेल्यास निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात डोंगरपायथ्याशी आई वाघाई चे मंदिर आहे. उजाड झालेल्या निळोणा गावातील वाघाई अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी असून. भक्तांची वाघाई वर अतूट श्रद्धा आहे. त्यामुळंच नवरात्री उत्सवात वाघामायचा जागर होत असून. इथं नेहमीच भाविकांची ओढ असते. वाघामाय यवतमाळ वासीय भक्तांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे ४०० वर्षापूर्वीपासून वाघाईचे हे मंदिर आहे, इथे देवीची सुंदर मूर्ती स्वयंभू आहे. पूर्वी हे मंदिर टेकडीवर कपार्यांमध्ये होते मात्र भक्ताच्या तपश्चर्ये नंतर आई पायथ्याशी आली अशी मान्यता है.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 30, 2025 11:45:53
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top