Back
नांदेडमध्ये युवकाचा आमरण उपोषण, तब्येत बिघडली!
SMSATISH MOHITE
Sept 01, 2025 12:49:50
Nanded, Maharashtra
Satish Mohite
Slug - Ned_HungerStrike
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये एका युवकाने आमरण उपोषण सुरु केले आहे. या युवकाच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. हदगाव तालुक्यातील कोथळा येथील युवक समाधान वानखेडे याने हे उपोषण सुरु केले आहे. या युवकाची आज तब्यत खालावली होती. डॉक्टरांनी तपासणी करून उपोषण सोडण्यास सांगितले. मात्र जरांगे पाटील यांचा संदेश येईपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार युवकाने बोलून दाखवला.
Byte - समाधान वानखेडे. उपोषणकर्ता
----------------------
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 04, 2025 08:05:41Washim, Maharashtra:
वाशीम:
File:0409ZT_WSM_OBC_MORCHA
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर:राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलिस स्टेशन समोरून तहसील कार्यालया पर्यंत मोर्चा काढण्यात आला.मोर्च्यादरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.मराठा समाजासाठी सरकारने काढलेला शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा,अशी ठाम मागणी ओबीसी समाजाकडून तहसीलदारांनमार्फत राज्य सरकारकडे करण्यात आली.या मोर्चात ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बाईट:श्याम गाभणे,ओबीसी,आंदोलक
4
Report
KPKAILAS PURI
FollowSept 04, 2025 08:05:21Pimpri-Chinchwad, Maharashtra:
शस्त्र विरोधी मोहिमेत 20 दिवसात 50 पिस्तूल जप्त, रेकॉर्डवरील 25 गुन्हेगार जेरबंद...!
pimpri pistol
kailas puri Pune 4-9-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध शस्त्रांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत 50 पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा यांच्यामध्ये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गुन्हे शाखा युनिट चारने 9 पिस्तूल जप्त करत पहिला क्रमांक मिळविला आहे.तर गुंडाविरोधी पथकाने 7 पिस्तूल जप्त करत दुसरा तर युनिट दोनने तिसरा क्रमांक मिळवला आहे. ही मोहीम 13 ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली.मोहिमेत चाळीस गुन्हे दाखल करून 45 आरोपींना अटक करण्यात आले त्यांच्याकडून 50 पिस्तूल 79 काढतो से जप्त केली आहेत तसेच धारदार घातक शस्त्र बाळगणाऱ्यांवर 94 गुन्हे दाखल करून 66 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 91 कोयता, 12 तलवार, चार पालघन, सहा चाकू आशिष शास्त्री जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या 50 शस्त्रांमध्ये 1 गावठी कट्टा तर 49 पिस्तूल आहेत.
बाईट - विनय कुमार चौबे,पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
2
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 04, 2025 07:33:46Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यातील श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याची अकोलेकरांना दरवर्षी उत्सुकता असते. मंडळाच्या देखाव्यात नेहमीच सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक संदेश दडलेला असतो.
यंदाही या मंडळाने आकर्षक व भव्य देखावा साकारला आहे. या देखाव्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी..
10
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 04, 2025 07:30:18Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0409ZT_CHP_DIVERSION
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरात 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादच्या रॅलीसाठी आणि 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मुख्य रस्त्यांवर नवी वाहतूक व्यवस्था, नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन
अँकर:---- चंद्रपूर शहरात 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादच्या रॅलीसाठी आणि 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहतूक विभागाने यासाठी तात्पूरते निर्बंध व पार्किंगचे मार्ग जाहीर केले आहेत.
5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी
सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जुन्या चंद्रपूर शहरातील कोहिनूर मैदान ते प्रियदर्शनी चौकपर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद व नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आलाय. नागपूरकडून येणाऱ्या वाहनांना वरोरा नाका, रामनगर, सेंट मायकल स्कूल मार्गे शहरात प्रवेश घेता येईल. बल्लारशा, मुलकडून येणाऱ्या वाहनांसाठी बसस्टँड-एलआयसी ऑफिस- बगड खिडकी किंवा जुनोना चौक मार्ग खुले राहतील।
याशिवाय दुसऱ्या दिवशी 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. सकाळी 6 ते 7 सप्टेंबर सकाळी 6 पर्यंत प्रियदर्शनी चौक ते ईरई नदी (रामसेतू पुल) मार्ग सर्व वाहनांसाठी बंद असतील. 6 सप्टेंबर रोजी मिलन चौक, गांधी चौक, कस्तुरबा चौक, जटपुरा गेट, रामनगर रोड, ईरई नदी, इ. मुख्य रस्ते पूर्णतः नो-पार्किंग/नो-हॉकर्स झोन जाहीर करण्यात आले आहेत. पार्किंगसाठी चांदा क्लब ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका
सेंट मायकल हायस्कूल, नगीनाबाग आदींचा वापर करता येणार आहे.
बाईट १) प्रविण पाटील, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
8
Report
MAMILIND ANDE
FollowSept 04, 2025 07:20:07Wardha, Maharashtra:
वर्धा स्टोरी
SLUG - 0409_WARDHA_PROTEST
- वर्ध्यात काँग्रेसची मतदान चोरीविरोधात बाईक रॅली
अँकर - देशात सुरु असलेल्या मतदान चोरीच्या मुद्द्यावर वर्धा शहरात काँग्रेस कडून मतदान चोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. शहरात काँग्रेसतर्फे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली आर्वी नाका, शिवाजी चौक, बजाज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलीय..या रॅलीत काँग्रेसचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर ज्येष्ठ नेते शेखर शेंडे, शैलेश अग्रवाल तसेच मनीषा मेघे यांची या रॅलीत विशेष उपस्थिती होती.रॅलीदरम्यान वोट चोर गद्दी छोड अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
बाईट- शैलेश अग्रवाल, काँग्रेस नेते, वर्धा
7
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 04, 2025 07:16:31Nala Sopara, Maharashtra:
Date-4sep2025
Rep-prathamesh tawade
Loc-nalasopara
Slug-NSP BUILDING
Feed send by 2c
Type-AvB
Slug- नालासोपाऱ्यात धोकादायक इमारत पाडली
रहिवासांचे हाल, एन पावसाळ्यात बेघर व्हायची वेळ
अँकर - नालासोपाऱ्यात सभा नावाची कल्याण धोकादायक इमारत अखेर पालिकेने जमीनदोस्त केली आहे.. दोन दिवसांपूर्वी या इमारतीच्या तळमजल्यावरील पिलर दुरुस्ती करताना खचला होता त्यामुळे महापालिकेने उपाययोजना म्हणून ही इमारत रिकामी केली होती.. मात्र इमारत धोकादायक अवस्थेत असल्याने ती तोडक कारवाई करून अखेर पाडली आहे.. पालिकेच्या या कारवाईमुळे अनेक जणांवर एन पावसाळ्यात बेगर व्हायची वेळ आली आहे...
बाईट - स्थानिक नागरिक
14
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 04, 2025 07:16:15Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
जरांगे
त्यांची उपसमिती केली का नाही केली आम्ही संकुचित वृत्तीचे नाही... पण यावर आम्ही नाराज नाही
दलित मुस्लिम, शेतकरी, आदिवासी सगळ्यांसाठी उपसमिती करा...
भुजबळ पक्षाचे अस्तित्व संपवणारे आहे, बावनकुळे त्यांना चांगले वाटत असेल
सातारा गॅजेट लागू झाले नाही तर याना फिरू देणार नाही...
On संजय राऊत ---
शिंदे साहेबांनी काय केले नाही, राऊत साहेब चांगले नाही असे म्हणत नाही, काही राजकीय असेल त्यांचे , मुंबईत आम्हाला काय म्हटले पाय ठेवू देणार नाही, मग आम्ही धुतले असते ना फडणवीस यांना.. मी फक्त मराठ्यांचा नोकर आहे राजकीय पक्षांना मी मोजत नाही...आणि मी समाजाला निकाल देतो...मुंबईत जाणार आणि गेलो...
संजय राऊत कुठल्या उद्दिष्ट्ने बोलले माहीत नाही, माझ्या खांद्यावर कुनी बंदूक ठेवू शकत नाही आणि वाटाघाटी, म्हणता जी आर मिळाला ना...
मी कुणाला वाटते आणि कुणाचे म्हणणे म्हणून आंदोलन करत नाही, मी आरक्षण साठी आंदोलन करत
मराठवाडा गॅजेट नोंदी नुसार आरक्षणात गेला की आमचे शब्द फडणवीस साहेबां बद्दल बघा
व्हॅलीडीटी मिळत नाही मी तक्रार दिलीय, अडचणी दूर होतील असे संजय शिरसाठ म्हणाले आहे....
माझं डोकं लावून मी 3 कोटी मराठे आरक्षणात घातले, हैद्राबाद गॅजेट 100 वर्ष जुने सरकारला द्यायला लावले, सातारा गॅजेट उघड आणले.. मात्र या अभ्यासकांना मान दिला नाही तर उड्या मारतात.. त्यात काही खासदारकी ला रुसलेले आहे, काही पक्षाचे आहेत सोडून द्या, अभ्यासक आहेत राहू द्या
**अभ्यासक आता नकोच , अस झालाय..आज आले तर भेटतो पुन्हा नको...*
*अभ्यासक सगळं झाले की वर तंगडी करतात*
माझं म्हणणं आहे उगाच विरोध करून समाजातील प्रतिष्ठा खराब करू नका, आणि काही चुकले तर मी आहे ना, दुरुस्त करून घेईल.. या आधी ही मीच सोडवल्या आहे ना
मिलिंद देवरा चूप राहा आमचे लै शांततेत आंदोलन झालं आहे, जात विखारी आहे मात्र असे होणे नाही, एक हाकेवर येतात आणि जातात..
फडणवीस यांनी जर आता मराठ्यांचा विश्वास घात झाला तर त्यांचा या विभागातील विषयच संपतो मात्र ते आता विश्वासघात करणार नाही
मी भुजबळ यांची जीरवली म्हणून तो माझ्यावर बोलत नाही, शॉकिंग आहे म्हणतात फक्त
*आंदोलन नुकसान भरपाई कोण देणार -- आता काय नुकसान झालं, आम्हाला खायला नव्हते आमचे नुकसान झालं आमचे 4 लोक मेले...*
12
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 04, 2025 07:03:38Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0409ZT_JALNA_OBC(4 FILES)
जालना | अंतरवाली सराटीतल्या ओबीसी उपोषणाचा आजचा चौथा दिवस
उपोषणाची दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा
मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार
ओबीसी उपसमितीने भेट देऊन आश्वस्त करावं,उपोषणकर्त्यांची मागणी
अँकर |अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेल्या ओबीसी आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.. मनोज जरांगे यांच्या मागण्या मंजूर करून शासनाने काढलेल्या जीआर विरोधात ओबीसीचे बाबासाहेब बटुळे , विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ हे आमरण उपोषणाला बसले आहेत.अजून शासनाने उपोषणकर्त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये.. ओबीसी उपसमितीने उपोषणस्थळी भेट देऊन आम्हाला आश्वस्त करावं. सरकारने मराठा समाजाविषयी काढलेला जीआर रद्द करावा आणि जरांगे यांच्या एसआयटी मार्फत सुरु असलेल्या चौकशीचं काय झालं याचा अहवाल शासनाने सादर करावा. अशा मागण्या ओबीसी उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला असून आत्मदहनाचाही सरकारला इशारा दिला आहे.
बाईट- बाबासाहेब बटुळे बाबा, ओबीसी आंदोलक(अँपल रंगाचा शर्ट असलेले)
बाईट- विठ्ठल तळेकर, ओबीसी आंदोलक(निळा शर्ट असलेले)
14
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 04, 2025 07:03:24Vasai-Virar, Maharashtra:
Date-4sep2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI DEKHAVA
Feed send by 2c
Type-Av
Slug: वसईत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ प्रकटदिन देखावा
म्हात्रे कुटुंबीयांचा गणपती
अँकर : वसईतील नाळे गावात राहणाऱ्या मनिष म्हात्रे व प्रशांत म्हात्रे यांच्या घरी यंदा अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाचा सुंदर असा चलचित्र देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भावीकांची गर्दी होत आहे.
एका लाकुडतोड्याची कुर्हाड निसटली व ती वारूळावर पडली होती. आणी त्यानंतर स्वामी महाराज प्रकट झाले होते. असा हा संपूर्ण देखावा म्हात्रे कुटुंबातील अथर्व म्हात्रे, ध्रुव म्हात्रे,इशानी व आर्यन या चार भावंडांनी अवघ्या आठवड्या भरात चलचित्र व द्रुकश्राव्य माध्यमातून साकारला आहे..अनंत चतुर्दशी पर्यंत हा देखावा लोकांना पहाता येणार आहे.
.कागद , पुठ्ठा, लाकुड, वडाच्या पारंब्या व नैसर्गीक रंग याचा वापर या देखाव्यासाठी करण्यात आला आहे..
या अगोदर म्हात्रे कुटुंबीयांनी विरारची जिवदानी मातेची महती, सत्पाळाची मामावंती देवी, भुमीगत पद्मावती देवी,संत गोरा कुंभार, कुष्ण जन्म , ब्रम्हांड, अष्टविनायक,गिरनार ,राजापुरची गंगा, केदारनाथ, ग्रामीण संस्कृती,संत एकनाथ गर्वहरण, अमरनाथ गुफा,अशा पौराणिक व धार्मिक देखाव्यांसह सद्याच्या ज्वलंत घडामोडींवर आधारित चलचित्र देखावे सादर केले आहेत.
12
Report
AKAMAR KANE
FollowSept 04, 2025 07:00:40kolhapur, Maharashtra:
Ngp OBC Wkt
live u ने फीड पाठवले
-==-
नागपूरात ओबीसी महासंघाचे आंदोलन मागील सहा दिवसांपासून सुरू आहे. आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला आज एक भावनिक वळण मिळाले. आंदोलनस्थळी अवघ्या सहा महिन्यांची चिमुकली रमाई आपल्या आई व कुटुंबियांसह उपस्थित राहिली.
ही उपस्थिती पाहून कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला. लहानगी रमाईला हातात घेऊन तिच्या कुटुंबियांनी सांगितले की, “आमच्या पुढच्या पिढ्यांसाठीच हा लढा सुरू आहे. या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.” असे या लहानग्या रमाई ची आई रुतिका मासमारे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याशी आणि आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
11
Report
Nagpur, Yavatmal, Maharashtra:
अखिल भारतीय भिक्खू संघ व फुले-आंबेडकरी साहित्य संसद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचा थाटात शुभारंभ रमाई बुद्ध विहार, वाघापूर येथे झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पूज्य भदंत विनयरक्खीता महाथेरो (बेंगलोर) यांनी भूषवले तर उद्घाटन पूज्य भदंत डॉ. एस.आर. इंदवंश महाथेरो (कुशीनगर) यांच्या हस्ते झाले.
देश-विदेशातील अनेक भदंत व भिक्खुनींच्या उपस्थितीत विविध धम्मदेसना पार पडल्या. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे जिल्हाध्यक्ष किशोर भगत यांनी सांगितले.
१४ सप्टेंबर रोजी गिरीजानगर येथे तर समारोप २८ सप्टेंबर रोजी लुंबिनी बुद्ध विहार, यवतमाळ येथे होणार आहे. उपासक-उपासिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
13
Report
Yavatmal, Maharashtra:
वणी (जि. यवतमाळ) येथे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय कापूस-सोयाबीन उत्पादकांची विराट परिषद होणार आहे. या परिषदेला किसान आंदोलनाचे नेते का. राजन क्षीरसागर, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भाई तुकाराम भस्मे, किसान सभेचे राज्य अध्यक्ष ऍड. हिरालाल परदेशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
परिषदेत शेतमालाचा कायदेशीर हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, विदेशी आयात बंदी, पिक विमा सुधारणा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पायाभूत सुविधा व शासकीय खरेदी केंद्र वर्षभर सुरू ठेवण्यासह विविध मागण्यांवर चर्चा होईल.
ही परिषद यशस्वी करण्यासाठी वणी, मारेगाव, झरी आणि राळेगाव तालुक्यातील ४०० हून अधिक गावांत प्रचारासाठी किसान सभे
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 04, 2025 01:17:05Ambernath, Maharashtra:
बदलापुर पालिकेकडून पीओपी गणेश मूर्तींच विघटण
पालिकेचा अभिनव पर्यावरण पूरक उपक्रम
Anchor बदलापूर पालिके कडून पीओपी गणेश मूर्तींचं सेंद्रिय पद्धतीने विघटन करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे . शहरातील दोन ठिकाणी हा पर्यावरण पूरक प्रयोग करण्यात आला आहे . या पद्धतीने सत्तर ते ऐंशी तासांमध्ये पीओपी मूर्तींचे विघटन करण्यात येत . शहरातील दोन ठिकाणी अमोनियम बायकार्बोनेटचे ड्रम ठेवण्यात आले आसुन त्यात गणेश मूर्तींच विघटन करण्यात येत, पीओपी मूर्तींपासून होणाऱ जलप्रदूषण रोखण्यासाठी कुळगाव बदलापूर पालिकेने हा अभिनव प्रयोग राबविला असल्याचं पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलं.
Byte मारुती गायकवाड, मुख्याधीकारी नगरपालिका
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
14
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 04, 2025 01:16:48Lasalgaon, Maharashtra:
अँकर,:- केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ या दोन नोडल एजन्सींमार्फत तब्बल तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी पूर्ण करण्यात आली आहे मात्र दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांचे तब्बल 200 कोटी रुपये थकीत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत याप्रकारणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून तातडीने हे पैसे व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत या मागणीसाठी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव देवेश चतुर्वेदी यांची भेट घेतली आहे
14
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 04, 2025 01:16:37Lasalgaon, Maharashtra:
अँकर :- नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव येथून पिंपळगाव बसवंत येथे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर कोटमगाव येथे रेल्वे पाण्यामुळे पुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप बाजार आवार खानगाव येथे भाजीपाल्याचा मोठा बाजार भरतो चार ते पाच तालुक्यातून शेतकरी भाजीपाला आपल्या वाहनांमध्ये घेऊन येतात आणि या खड्ड्यांमध्ये गाडीचे चाके अडकल्यामुळे ट्रॅक्टर वाहने पलटी होऊन शेतीमालाचेही मोठे नुकसान होते रेल्वेने 200 मीटर अंतरावर अंडरपास केलेला आहे मात्र त्या ठिकाणी दिवाने जाऊ नये म्हणून गडर लावल्यामुळे शेतकऱ्यांना आपले शेतीमाल याच मार्गावरून घेऊन जावे लागत असल्याने आज एका ट्रॅक्टर मधून येवला तालुक्यातील सोमठाणा येथील शेतकरी मिरची घेऊन जात असताना टारली पलटी झाल्याची घटना घडली यात या शेतकऱ्याचे मिरचीचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे या पुलाखालील खड्डे बुजवण्याची मागणी जोर धरू लागली आहे
14
Report