Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018

पिंपरीत 20 दिवसांत 50 पिस्तूल जप्त, गुन्हेगारांची संख्या वाढली!

KPKAILAS PURI
Sept 04, 2025 08:05:21
Pimpri-Chinchwad, Maharashtra
शस्त्र विरोधी मोहिमेत 20 दिवसात 50 पिस्तूल जप्त, रेकॉर्डवरील 25 गुन्हेगार जेरबंद...! pimpri pistol kailas puri Pune 4-9-25 feed by 2c Anchor - पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध शस्त्रांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत 50 पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा यांच्यामध्ये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गुन्हे शाखा युनिट चारने 9 पिस्तूल जप्त करत पहिला क्रमांक मिळविला आहे.तर गुंडाविरोधी पथकाने 7 पिस्तूल जप्त करत दुसरा तर युनिट दोनने तिसरा क्रमांक मिळवला आहे. ही मोहीम 13 ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली.मोहिमेत चाळीस गुन्हे दाखल करून 45 आरोपींना अटक करण्यात आले त्यांच्याकडून 50 पिस्तूल 79 काढतो से जप्त केली आहेत तसेच धारदार घातक शस्त्र बाळगणाऱ्यांवर 94 गुन्हे दाखल करून 66 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 91 कोयता, 12 तलवार, चार पालघन, सहा चाकू आशिष शास्त्री जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या 50 शस्त्रांमध्ये 1 गावठी कट्टा तर 49 पिस्तूल आहेत. बाईट - विनय कुमार चौबे,पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRANAV POLEKAR
Sept 04, 2025 09:47:31
Ratnagiri, Maharashtra:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुशल नेतृत्व यासाठीच भाजपमध्ये पक्षप्रवेश काही परिहार्य कारणामुळे पक्षप्रवेश लांबणीवर, मात्र काही दिवसातच पक्षप्रवेश होणार - वैभव खेडेकर पुन्हा मनसे पक्षात सक्रिय होण्यासाठी अनेकांचे फोन - वैभव खेडेकर
1
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 04, 2025 09:20:06
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Shirur Police Ganpati File:01 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc :शिरूर पोलीस स्टेशनच्या लाडक्या बाप्पाला 9 व्या दिवशी निरोप दिलाय यावेळी ढोल-ताशांच्या गजरात पोलिसांनी ठेका धरत भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला... Vo :शिरूर पोलीस स्टेशनच्या लाडक्या गणरायाचं आज नऊव्या दिवशी पारंपरिक थाटात विसर्जन मिरवणूक निघाली यावेळी महिला पुरुष पोलीसांनी एकसंघ भगवा परिधान करत ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत गुलाल उधळत बाप्पाला आज निरोप दिलाय. सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याने आज शिरुर पोलीस दलाने आपल्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिलाय. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
3
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 04, 2025 08:46:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - दशमीला प्रतिष्ठापना होणारा सांगलीतील अनोखा'सांभारे गणपती..126 वर्षांपासून जोपासली जात आहे परंपरा... अँकर - गणेश चतुर्थीनंतर नवव्या दिवशी गणेशाचे प्रतिष्ठापना करण्याची अनोखी परंपरा चांगली मध्ये जोपासली जाते.तब्बल 126 वर्षांपासून दशमी दिवशी सांभारे गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची ही अनोखी परंपरा आहे.सांगली शहरातल्या गावभाग येथील कै. राजवैद्य आबासाहेब सांभारे यांच्या चौथ्या पिढीकडुन ही परंपरा जोपासली जात आहे.या सांभारे गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण मूर्ती पांगीरीच्या लाकडा पासून बनवली असून बारा फुट उंच आणि नऊ फुट रुंदीचा हा गणपती आहे.तर या मूर्तीचे वजन दीड टन इतके असून अतिशय सुरेख आणि डौलदार अशी मूर्ती आहे.१८९९ साली सांभारे कुटुंबाकडून गणेश मूर्ती बनवताना ती दुखावली गेली आणि त्यानंतर लाकडी गणेश मूर्ती बनवायला सुरुवात केली आणि ती गणेश चतुर्थी नंतर दशमी दिवशी तयार झाली, त्यामुळे दशमीच्या दिवशी सांभारे गणपतीची प्रतिष्ठापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत सांभारे कुटुंबाकडून दशमीच्या दिवशी गणेश प्रतिष्ठापना करण्याची परंपरा सुरू झाली.लोकमान्य टिळक यांच्या सारख्या अनेक दिग्गज मान्यवरांनी या ठिकाणी येवून सांबारे गणपतीचे दर्शन घेतले असून अत्यंत देखणी अशी ही गणेश मूर्ती पुण्याला घेवून जाण्याची इच्छाही लोकमान्य टिळक यांनी व्यक्त केली होती. बाईट - केदार सांभारे - वंशज -आबासाहेब सांभारे - सांगली बाईट - अमिता कुलकर्णी - भाविक - सांगली.
9
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 04, 2025 08:46:15
Nashik, Maharashtra:
nsk_nilgay फीड by 2C - Anc:- वन विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकच्या मालेगावातील बेलबाग परिसरात धडक कारवाई करीत. बेकायदेशीरपणे नील गाईचे मांस विक्री करणाऱ्या मसूद अहमद अब्दुल मजीद यास शिताफीने अटक केली. त्याच्याकडून नील गाईचे दोन मुंडके, चार पाय तसेच 35 किलो 500 ग्रॅम मांस व चाकू, दोन सुरे, टोचा, लोखंडी वजनकाटा जप्त केला.तर मुदस्सीर अहमद व परवेज अहमद हे दोघे जण फरार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. *Byte :- डी. डी. बागुल, वन परिमंडळ अधिकारी. मालेगाव*
14
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 04, 2025 08:46:09
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_RAJE_SATKAR सातारा - पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सार्वजनिक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली .या निमित्ताने आज साताऱ्यातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता.मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.यानंतर मराठा समाजाने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना खांद्यावर घेऊन जल्लोष देखील केला.सातारा गॅझेट लागू करण्यासाठी आरक्षण उपसमितीची बैठक येत्या मंगळवारी घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू करेल असं शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केलं आहे.महिन्याचा आत सातारा गॅझेट लागू करू असा आम्ही मनोज जरांगे पाटील यांना शब्द दिला आहे.सातारा गॅझेट मध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख आहे त्यामुळे कायदेशीर बाबी पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे सगळं घेऊन जाऊ असं देखील शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केलं आहे. Byte - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
13
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 04, 2025 08:31:37
Thane, Maharashtra:
भिवंडीत ओबीसीं समाजाच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन... शेकडो ओबीसी बांधव आंदोलनात सहभागी... शासनाला दिले निवेदन... ॲंकर... राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यात उपोषण, धरणे व मोर्चे इत्यादी मार्गाने सरकारचे लक्ष ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे वेधण्यासाठी महाराष्ट्रात आज ओबीसी बांधव ऐकवटले असून राज्यातील विविध शासकीय कार्यालयात निवेदन सादर करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर भिवंडी व शहापूर तालुक्यातील ओबीसी बांधवांनी भिवंडी प्रांत व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन सादर केले. या वेळी ओबीसी समाज बांधवांनी विविध प्रकारच्या घोषणा देत आपला आवाज सरकार पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्ण भिवंडी नगरी दणाणून सोडली आहे‌ राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सभेत खालील ठराव पारित करण्यात आले असून या ठरावातील खालील मागण्या राज्य सरकारनी त्वरित पूर्ण कराव्यात याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे नागपूर येथील संविधान चौकात ३० ऑगस्ट २०२५ पासून साखळी उपोषण सुरु आहे. निवेदनात खालील मागण्यांवर शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या पूर्ण कराव्यात अशी आर्तसाद ओबीसी समाजाने राज्य सरकारला घातली आहे. सदरचे निवेदन राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे. ৭) मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. २) अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी. ३) ओबीसी मुलांना व्यावसायीक अभ्यासक्रमास १०० टक्के शिष्यवृत्ती लागु करण्यात यावी. ४) गुणवंत मुलांमुलीना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती ७५ विद्याथ्यांची संख्या वाढवुन २०० विद्यार्थी करण्यात यावी. ५) महाज्योती या संस्थेकरीता एक हजार कोटी रूपयांची तरतुद करण्यात यावी, शासन निर्णय दिनांक २८ आक्टो. २०२१ च्या नुसार ज्या प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या शासन निर्णयानुसार समाजातील संस्थाना कामात प्राधान्य देण्यात येते, त्याप्रमाणे महाज्योतीची कामे ओबीसी, जिजा, भज व विशेष मागास प्रवर्गातील संस्थेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्राधाण्य देण्यात यावे. ६) म्हाडा व सिडको तर्फे बांधुन देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी संवर्गाकरीता आरक्षण लागु करण्यात यावे. ७) नागपुर येथे तयार असलेले उच्च व तंत्र विभागाचे स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमीत बांधलेले २०० मुलींचे तयार वसतीगृह तसेच नागपुर येथे स्व. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमीत्त तयार असलेले २०० मुलांचे वसतीगृह ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरीत करून शासन निर्णयान्वये इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत मुलांचे व मुर्तीचे वसतीगृह सुरू करण्यात यावे. ८) ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आर्थिक विकास महामंडळा मफित असलेली थेट कर्ज योजनेची मर्यादा १ लाख व १५ लाख रुपये कर्ज मर्यादेच्या योजनेसाठी, तसेच गहाण खतामध्ये फक्त शेतीची अट असून ती शिथिल करण्यात यावी घर., प्लॉट, दुकान इत्यादी बार्षीचा समावेश व्हावा जामीनदार घेतांना केवळ सरकारी. नौकरच असावा ही अट शिथिल करण्यात यावी, ५०० सीवील स्कोरची अट शिथिल करुन लाभ धारकांना अटच नसावी. ९) शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या धर्तीवर इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला अँड जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळ असे नाव द्यावे. १०) प्रत्येक शहर व तालुका स्तरावर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्याथ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरु करण्यात यावे. ११) डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार आणि आदिवासी सेवक पुरस्कार याप्रमाणे डॉ पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा. १२) अनुसूचित जातीजमाती प्रमाणे ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्ग शेतकरूयांना १०० टक्के सवलतीवर राज्यात योजना शुरु करण्यात याव्यात. १३) ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी व महामंडळाच्या सर्व मंजूर योजना स्वरीत सुरु करण्यात याव्यात. १४) ओबीसी, वीजा, भज व विमाप्र समुदायातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची तीन वर्षांपासून प्रलंबित असणारी फेलोशिप त्वरित अदा करण्यात यावी. बाईट- आंदोलक
12
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 04, 2025 08:18:46
Mumbai, Maharashtra:
अँकर -- गणेश विसर्जना अवघ्या दोन दिवसावर आले आहे आणि मुंबईत गणेश विसर्जनाच्या दरम्यान गणपती बाप्पाची मूर्ती कुठे विसर्जित करायची यावर संभ्रम निर्माण झाला होता या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती आणि त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांनी घेतला सहा फुट पेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याचा निर्णय होता तो कायम ठेवला. तसेच मुंबईतल्या प्रसिद्ध  बाणगंगा येथे मूर्ती विसर्जन करण्यासाठी कोर्टाने नकार दिला. संजय शिर्के यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. गेली अनेक वर्षे बाणगंगा येथे मूर्ती विसर्जित करत आहोत असे याचिकेत केले होते नमूद  त्यानुसार बाणगंगा हे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणारे ठिकाण आहे आणि हे टुरिस्ट प्लेस म्हणून जाहीर करण्यात आले आहे . त्यामुळे अशा पद्धतीचे विसर्जन करता येणार नसल्याचा प्रतिवाद सरकारी वकीलातर्फे करण्यात आला. त्याच धर्तीवर बाणगंगा येथे विसर्जन करण्यासाठी न्यायालयाचा नकार Byte -- भावेश ठाकूर वकील मनोज कुळकर्णी  Feed send TVU 82 Slug -- Advocate byte 
14
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 04, 2025 08:05:41
Washim, Maharashtra:
वाशीम: File:0409ZT_WSM_OBC_MORCHA रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर:राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलिस स्टेशन समोरून तहसील कार्यालया पर्यंत मोर्चा काढण्यात आला.मोर्च्यादरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.मराठा समाजासाठी सरकारने काढलेला शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा,अशी ठाम मागणी ओबीसी समाजाकडून तहसीलदारांनमार्फत राज्य सरकारकडे करण्यात आली.या मोर्चात ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाईट:श्याम गाभणे,ओबीसी,आंदोलक
13
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 04, 2025 07:33:46
Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यातील श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याची अकोलेकरांना दरवर्षी उत्सुकता असते. मंडळाच्या देखाव्यात नेहमीच सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक संदेश दडलेला असतो. यंदाही या मंडळाने आकर्षक व भव्य देखावा साकारला आहे. या देखाव्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी..
14
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 04, 2025 07:30:18
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0409ZT_CHP_DIVERSION ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहरात 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादच्या रॅलीसाठी आणि 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मुख्य रस्त्यांवर नवी वाहतूक व्यवस्था, नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन      अँकर:---- चंद्रपूर शहरात 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादच्या रॅलीसाठी आणि 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहतूक विभागाने यासाठी तात्पूरते निर्बंध व पार्किंगचे मार्ग जाहीर केले आहेत. 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जुन्या चंद्रपूर शहरातील कोहिनूर मैदान ते प्रियदर्शनी चौकपर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद व नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आलाय. नागपूरकडून येणाऱ्या वाहनांना वरोरा नाका, रामनगर, सेंट मायकल स्कूल मार्गे शहरात प्रवेश घेता येईल. बल्लारशा, मुलकडून येणाऱ्या वाहनांसाठी बसस्टँड-एलआयसी ऑफिस- बगड खिडकी किंवा जुनोना चौक मार्ग खुले राहतील। याशिवाय दुसऱ्या दिवशी 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. सकाळी 6 ते 7 सप्टेंबर सकाळी 6 पर्यंत प्रियदर्शनी चौक ते ईरई नदी (रामसेतू पुल) मार्ग सर्व वाहनांसाठी बंद असतील. 6 सप्टेंबर रोजी मिलन चौक, गांधी चौक, कस्तुरबा चौक, जटपुरा गेट, रामनगर रोड, ईरई नदी, इ. मुख्य रस्ते पूर्णतः नो-पार्किंग/नो-हॉकर्स झोन जाहीर करण्यात आले आहेत. पार्किंगसाठी चांदा क्लब ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका सेंट मायकल हायस्कूल, नगीनाबाग आदींचा वापर करता येणार आहे. बाईट १) प्रविण पाटील, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
14
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 04, 2025 07:20:07
Wardha, Maharashtra:
वर्धा स्टोरी SLUG - 0409_WARDHA_PROTEST - वर्ध्यात काँग्रेसची मतदान चोरीविरोधात बाईक रॅली अँकर - देशात सुरु असलेल्या मतदान चोरीच्या मुद्द्यावर वर्धा शहरात काँग्रेस कडून मतदान चोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. शहरात काँग्रेसतर्फे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली आर्वी नाका, शिवाजी चौक, बजाज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलीय..या रॅलीत काँग्रेसचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर ज्येष्ठ नेते शेखर शेंडे, शैलेश अग्रवाल तसेच मनीषा मेघे यांची या रॅलीत विशेष उपस्थिती होती.रॅलीदरम्यान वोट चोर गद्दी छोड अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. बाईट- शैलेश अग्रवाल, काँग्रेस नेते, वर्धा
14
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 04, 2025 07:16:31
Nala Sopara, Maharashtra:
Date-4sep2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NSP BUILDING Feed send by 2c Type-AvB Slug- नालासोपाऱ्यात धोकादायक इमारत पाडली रहिवासांचे हाल, एन पावसाळ्यात बेघर व्हायची वेळ अँकर - नालासोपाऱ्यात सभा नावाची कल्याण धोकादायक इमारत अखेर पालिकेने जमीनदोस्त केली आहे.. दोन दिवसांपूर्वी या इमारतीच्या तळमजल्यावरील पिलर दुरुस्ती करताना खचला होता त्यामुळे महापालिकेने उपाययोजना म्हणून ही इमारत रिकामी केली होती.. मात्र इमारत धोकादायक अवस्थेत असल्याने ती तोडक कारवाई करून अखेर पाडली आहे.. पालिकेच्या या कारवाईमुळे अनेक जणांवर एन पावसाळ्यात बेगर व्हायची वेळ आली आहे... बाईट - स्थानिक नागरिक
14
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 04, 2025 07:16:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
जरांगे त्यांची उपसमिती केली का नाही केली आम्ही संकुचित वृत्तीचे नाही... पण यावर आम्ही नाराज नाही दलित मुस्लिम, शेतकरी, आदिवासी सगळ्यांसाठी उपसमिती करा... भुजबळ पक्षाचे अस्तित्व संपवणारे आहे, बावनकुळे त्यांना चांगले वाटत असेल सातारा गॅजेट लागू झाले नाही तर याना फिरू देणार नाही... On संजय राऊत --- शिंदे साहेबांनी काय केले नाही, राऊत साहेब चांगले नाही असे म्हणत नाही, काही राजकीय असेल त्यांचे , मुंबईत आम्हाला काय म्हटले पाय ठेवू देणार नाही, मग आम्ही धुतले असते ना फडणवीस यांना.. मी फक्त मराठ्यांचा नोकर आहे राजकीय पक्षांना मी मोजत नाही...आणि मी समाजाला निकाल देतो...मुंबईत जाणार आणि गेलो... संजय राऊत कुठल्या उद्दिष्ट्ने बोलले माहीत नाही, माझ्या खांद्यावर कुनी बंदूक ठेवू शकत नाही आणि वाटाघाटी, म्हणता जी आर मिळाला ना... मी कुणाला वाटते आणि कुणाचे म्हणणे म्हणून आंदोलन करत नाही, मी आरक्षण साठी आंदोलन करत मराठवाडा गॅजेट नोंदी नुसार आरक्षणात गेला की आमचे शब्द फडणवीस साहेबां बद्दल बघा व्हॅलीडीटी मिळत नाही मी तक्रार दिलीय, अडचणी दूर होतील असे संजय शिरसाठ म्हणाले आहे.... माझं डोकं लावून मी 3 कोटी मराठे आरक्षणात घातले, हैद्राबाद गॅजेट 100 वर्ष जुने सरकारला द्यायला लावले, सातारा गॅजेट उघड आणले.. मात्र या अभ्यासकांना मान दिला नाही तर उड्या मारतात.. त्यात काही खासदारकी ला रुसलेले आहे, काही पक्षाचे आहेत सोडून द्या, अभ्यासक आहेत राहू द्या **अभ्यासक आता नकोच , अस झालाय..आज आले तर भेटतो पुन्हा नको...* *अभ्यासक सगळं झाले की वर तंगडी करतात* माझं म्हणणं आहे उगाच विरोध करून समाजातील प्रतिष्ठा खराब करू नका, आणि काही चुकले तर मी आहे ना, दुरुस्त करून घेईल.. या आधी ही मीच सोडवल्या आहे ना मिलिंद देवरा चूप राहा आमचे लै शांततेत आंदोलन झालं आहे, जात विखारी आहे मात्र असे होणे नाही, एक हाकेवर येतात आणि जातात.. फडणवीस यांनी जर आता मराठ्यांचा विश्वास घात झाला तर त्यांचा या विभागातील विषयच संपतो मात्र ते आता विश्वासघात करणार नाही मी भुजबळ यांची जीरवली म्हणून तो माझ्यावर बोलत नाही, शॉकिंग आहे म्हणतात फक्त *आंदोलन नुकसान भरपाई कोण देणार -- आता काय नुकसान झालं, आम्हाला खायला नव्हते आमचे नुकसान झालं आमचे 4 लोक मेले...*
14
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 04, 2025 07:03:38
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0409ZT_JALNA_OBC(4 FILES) जालना | अंतरवाली सराटीतल्या ओबीसी उपोषणाचा आजचा चौथा दिवस उपोषणाची दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार ओबीसी उपसमितीने भेट देऊन आश्वस्त करावं,उपोषणकर्त्यांची मागणी अँकर |अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेल्या ओबीसी आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.. मनोज जरांगे यांच्या मागण्या मंजूर करून शासनाने काढलेल्या जीआर विरोधात ओबीसीचे बाबासाहेब बटुळे , विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ हे आमरण उपोषणाला बसले आहेत.अजून शासनाने उपोषणकर्त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये.. ओबीसी उपसमितीने उपोषणस्थळी भेट देऊन आम्हाला आश्वस्त करावं. सरकारने मराठा समाजाविषयी काढलेला जीआर रद्द करावा आणि जरांगे यांच्या एसआयटी मार्फत सुरु असलेल्या चौकशीचं काय झालं याचा अहवाल शासनाने सादर करावा. अशा मागण्या ओबीसी उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला असून आत्मदहनाचाही सरकारला इशारा दिला आहे. बाईट- बाबासाहेब बटुळे बाबा, ओबीसी आंदोलक(अँपल रंगाचा शर्ट असलेले) बाईट- विठ्ठल तळेकर, ओबीसी आंदोलक(निळा शर्ट असलेले)
14
comment0
Report
Advertisement
Back to top