423401
नाशिक दौरे पर छगन भुजबळ ने शरद पवार से क्या कहा?
Yeola, Maharashtra:*मंत्री छगन भुजबळ ऑन शरद पवार नाशिक दौरा* पवार साहेब आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी नवीन जुन्या कार्यकर्त्यांना भेटत असतात... त्यामुळे सर्व लोकांशी चर्चा करायची संधी त्यांना मिळते... आपल्याकडे कार्यकर्ते कसे राहतील याची ते काळजी घेतात.... त्यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याचा काही भाग नाही.... *छगन भुजबळ ऑन मराठा आंदोलन वरील गुन्हे मागे* माझा अजिबात विरोध नाही नियमाप्रमाणे आंदोलकांना त्यातून मोकळ करण्यात येत असेल तर माझा विरोध नाही हा नियम शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, ज्या ठिकाणी अन्याय झाला आहे त्या ठिकाणी मोर्चे काढले असतील, रस्ता रोको केला असेल त्यांना सुद्धा हाच नियम लागू करून त्यांनाही मुक्त करण्यात आलं पाहिजे *छगन भुजबळ ऑन एसबीसी आरक्षण* विपी सिंग साहेबांनी जेव्हापासून मंडळ आयोग स्थापन केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढतो आहे आमची केस सुप्रीम कोर्टाच्या नऊ बेंच समोर गेली तिथून त्याला व्यवस्थित चाळणी लावून ओके करून घेतलं... कोर्टाच्या पायऱ्या या चढावाच लागतात या लढाया सुरूच असतात या दहा टक्के आरक्षणांमध्ये फक्त एकच समाज आहे मोदी साहेबांनी जे आरक्षण दिलं त्यात देखील 80 / 90% एकच समाज आहे आम्ही ओबीसी , दलित आदिवासी यात बांधल्या गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाता येत नव्हतं... तुम्हाला ते नकोय तुम्हाला EWS दिले त्यात 80 टक्के तुम्ही आहात तरी सुधा तुम्हाला ओबीसी पाहिजे कशा साठी मराठा समाजाला खर म्हणजे राजकारण मध्ये आरक्षण मिळालेच आहे इथे काय एखादा व्यक्ती सरपंच होतो ते सुद्धा मराठा समाज नेते ठरवता आमदार तुमचेच आहे, मंत्री तुमचेच आहे हे मी काय सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे तुम्हाला राजकीय आरक्षण हवंय की शिक्षण नोकरीमध्ये हवंय मराठा आरक्षण ईडब्ल्यूएस मध्ये येते मेडिकल मध्ये व इतर क्षेत्रात ओबीसींचा कट ऑफ पॉईंट वरती आहे यांचा कटऑफ खाली आहे फायदा आहे की नुकसान आहे म्हणून म्हणतो ज्यांना समजत अशा नेत्यांनी त्यांनी बोललं त्यांनी प्रकाश टाकला आमचाही अभ्यास होईल आणि समाजाचा अभ्यास होईल नाही तरी एकतर्फी सर्व चालेल आहे यात नुकसान देखील होईल इथे आल्यानंतर ते सोडावंच लागेल काही लोकांनी ईडब्ल्यूएस चे सर्टिफिकेट घेऊन ठेवले मराठा आरक्षण देखील चे घेऊन ठेवले तुम्ही इडब्ल्यूएस घ्या मराठा आरक्षण घ्या कुणबी म्हणून घ्या मग बाकीच्यांनी जायचं कुठे.... मराठा समाज सुप्रीम कोर्टाने देखील सांगितला आहे पुढारलेला समाज आहे त्यामुळे या गोष्टीचा सर्व अभ्यासू लोकांनी विचार करायला हवा *छगन भुजबळ ऑन पंतप्रधान नरेंद्र मोदी मनिपुर दौरा* ते गेले तरी बोलणार नाही गेले तरी बोलणार ज्यावेळेस मोठा दंगा उसळतो त्यावेळेस मुख्यमंत्री मंत्री जाऊन काय करणार त्यांनी प्रधानमंत्र्यांची सिक्युरिटी सांभाळायची की दंगा शांत करायचा शांत झाल्यानंतरच जातात... *छगन भुजबळ ओबीसी मराठा संघर्ष* माझं म्हणणं सुद्धा हेच आहे की सर्व शांत झाला पाहिजे परंतु आज काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा समाजाचे नेते देखील बोलायला तयार नाहीत मराठा समाजात अभ्यासू लोक आहेत शिक्षण संस्था आहेत या क्षेत्रात आहेत लेखक आहेत परंतु ते बोलू शकत नाही त्यांना सुद्धा त्यांच्या मनामध्ये भय असावं.. *छगन भुजबळ ऑन शरद पवार नाशिक दौरा राजकीय फायदा* ते आपण येणाऱ्या निवडणुकांमध्ये बघू.....0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
आकाश में गणेश का रूप: सोलापूर के मंद्रूप में अनोखा दृश्य
Solapur, Maharashtra:मंद्रूपच्या आकाशात ढगांच्या माध्यमातून झाले गणरायाचे दर्शन. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपमध्ये आकाशात ढगांच्या अनोख्या रचनेत गणपतीचे रूप दिसून आल्याने हा क्षण अनेकांचे लक्ष वेधून घेणारा ठरलाय. मंद्रूपचे रहिवासी अभिजीत जवळकोटे घराच्या छतावर गेले असता आकाशात विजांचा लखलखाट सुरू होता. त्याचवेळी ढगांच्या रचनेत गणपतीचे रूप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा अनोखा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडिओच्या माध्यमातून टिपलाय. सध्याच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकाशात गणपतीचे रूप दिसल्याने हा निसर्गाचा सुंदर योगायोग असल्याची चर्चा दक्षिण सोलापूर परिसरात होत आहेत.0
0
Report
नवी मुंबई में मुकुंद कंपनी के पास सोफा हाउस में आग, फायर ब्रिगेड जुटी
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील दिघा येथील मुकुंद कंपनी जवळील सोफा हाऊस ला भीषण आग. संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष स्थानी. आगीत कारखान्यातील संपूर्ण फर्निचर जालूम खाक. आगी मुळे परिसरात धुराचे लोट. आगीच कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरू. आगीत जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती.0
0
Report
ठाणे के ठाकूर कॉम्पाउंड के गोडाऊन में भीषण आग, दमकल मौके पर
Thane, Maharashtra:ठाणे जुनाबेलपूर रोड येथील मुकुंद कंपनी समोरील ठाकूर कंपाऊंड येथे एक गोडाऊनला भीषण आग. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल. आगीचे कारण आस्पष्ट.0
0
Report
Advertisement
इंदापुर के पिंपळे गाँव में पुनरीक्षण के बाद 90 द्वारनामे, भाजपा नेता बोले घातक
Rui, Maharashtra:मतदार यादी पुनरीक्षण केल्यानंतरही इंदापूरच्या पिंपळे गावात यादीत बोगस नावे असल्याचा भाजप नेते प्रदीप गारटकर यांचा आरोप. एस आय आर ही मोहीम राबवली जात आहे. परंतु असल्या स्थितीत इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावातील एका बुथवर मतदार यादी पुनरीक्षण केल्यानंतरही तब्बल 90 व्यक्तींची दुबार नावे आली आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत पुणे जिल्हा भाजप नेते प्रदीप गारटकर यांनी हे लोकशाहीसाठी घातक असल्याचं म्हटलं आहे.0
0
Report
चाकण में 1.13 करोड़ रुपए के गुटखे जप्त, ट्रक पकड़ा गया
Chakan, Maharashtra:चाकणमध्ये १ कोटी १३ लाखांचा गुटखा जप्त चाकणमध्ये अन्न और औषध प्रशासनाची मोठी कारवाई! गोपनीय माहितीच्या आधारे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा तब्बल सहा तास पाठलाग करून चाकण-तळेगाव चौकात ट्रक अडवण्यात आला. ट्रकमधून विविध कंपन्यांचा पानमसाला आणि सुगंधित तंबाखू असा १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चालकासह पाच जणांविरोधात BNS आणि अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
मातोश्री पर चर्चा तेज: वरुण सरदेसाई ने आदित्य ठाकरे को पुरावा दिखाने चुनौती दी
Kalyan, Maharashtra:मातोश्री नाव इतकं मोठं की मातोश्रीवर गेल्याने प्रसिद्धी मिळते सगळ्यांना खुलं चॅलेंज आदित्य ठाकररेंबद्दल एक तरी पुरावा द्या वरुण सरदेसाई यांची दिशा सलीयन प्रकरणी प्रतिक्रिया यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार वरूण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय. मातोश्री हे मोठं नाव आहे, मातोश्रीवर गेल्याने प्रसिद्धी मिळते. मी सगळ्यांना खुलं चॅलेंज करतो की आदित्य ठाकरें बद्दल बोलताना एक तरी पुरावा द्या, त्यामुळे अशांवर आम्ही कायदेशीर मार्गाने कारवाई करूनच पण यापुढे शांत बसणार नाही असा इशारा सरदेसाई यांनी दिलाय. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी सरदेसाई हे सध्या कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आहेत.0
0
Report
Advertisement
पार्थ पवार का फोटो सोमेश्वर कारखाने के रिपोर्ट से गायब, सतीश काकडे की तीखी आलोचना
Rui, Maharashtra:सोमेश्वर कारखान्याच्या अहवालातून पार्थ पवारांचा फोटो वगळल्याची चर्चा.... सतीश काकडेंची टीका बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या अहवालातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांचा फोटो वगळल्याचे समोर आले आहे. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी टीका केली आहे. “कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांना पार्थ पवारांचा फोटो अहवालात घेण्याची लाज वाटत असेल किंवा पार्थ पवारांना ते आपल्या लेव्हलचे समजत नसतील,” असा टोला सतीश काकडे यांनी लगावला आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. याआधी काढलेल्या अहवालावरून वाद निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादीची सत्ता असलेले पॅनल सध्या कारखान्यावरती संचालक म्हणून असून सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लागली असताना पार्थ पवारांचाच फोटो अहवालातून गायब करण्यात आलेला आहे.त्यामुळे शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे यांनी कारखान्याच्या चेअरमन वरती टीकास्त्र डागले आहे.0
0
Report
कृष्णा नदी में पानी उपास रोक, जिलों की खेती संकट में
Sangli, Maharashtra:स्लग - संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कृष्णानदीसह तलावातून शेतीच्या पाणी उपासावर बंदी.. अँकर - सांगली जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट गडद होऊ लागला आहे,कृष्णा नदी आणि जिल्ह्यातल्या पाण्याचा साठा लक्षात घेऊन संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीतून पाणी उपसा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.शेतीसाठी पाणी उपसावर बंदी घालण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त इतर पाणी उपसा हो नाही यासाठी खाजगी उपसा सिंचन योजनांच्या वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जलसंपदा विभागाकडून वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहेत. कृष्णा नदीसह जत,मिरज,वाळवा आणि शिराळा तालुक्यातल्या मध्यम प्रकल्पांतील पाणी उपसावर ही बंदी घालण्यात आली आहे,त्यामुळे कृष्णाकाठसह जिल्ह्यातील शेती पिके धोक्यात येणार आहेत.तर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असल्याचं सांगत कोयना धरणातून कृष्णा नदीत अडीच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचेही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे.0
0
Report
सोलापुर में बारिश नहीं, मुख्यमंत्री का कड़ा पानी-बचत निर्देश जारी
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्याप पाऊस झाला नाही मात्र ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्या पर्यंत आशा आहे सोलापूर जिल्ह्यातल्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांचे बारकाईने लक्ष आहे मात्र सध्या तरी कृत्रिम पावसाचा कोणताही विचार नाही अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे उजनी धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करूनच त्याचा शेतीसाठी वापर करण्याची वेळ आली आहे. उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करावे लागेल पाण्याची बचत करावी लागेल. एक वर्ष समोर आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पाण्याचा प्रश्न गंभीर असणार आहे。 दिशा सालियन प्रकरणावर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले एखाद्या भगिनीवर अन्याय झाला आहे ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच सीबीआयने पुन्हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय तपासात जे जे समोर येईल त्याच्यावर कारवाई होईल त्यामुळे कोणी चिंतित होण्याची गरज नाही. जे सहभागी होतील ते चिंतित होतील असा टोला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे。 पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक चिन्हावर लढाईची का नाही याचा निर्णय मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष घेतील. महायुती म्हणून निवडणूक लढू मात्र वेळ आली तर भाजप म्हणून सुद्धा सक्षमपणे निवडण्याची आमची तयारी आहे असे म्हणत एक प्रकारे मित्र पक्षांना गोरे यांनी इशारा दिलेला आहे。 सोलापूर जिल्हा बँकेच्या संभाव्य निवडणुकीच्या निमित्ताने मोहिते पाटील जुन्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतात यावर टोला लगावत पावसाळा आला की छत्र्या उगवत असतात मात्र सोलापूर जिल्हा बँक निवडणूक कशी लढवायची याच निर्णय सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते घेतील ते त्यासाठी सक्षम आहेत. भारतीय जनता पक्ष निवडणूक लढण्यासाठी सक्षम आहे मात्र समविचारी लोक सोबत आले तर त्यांनाही सोबत घेतलं जाईल. पंढरपूर शहराचा विकास होऊन आणि त्या पायाभूत सुविधा मजबूत होणं हे काम भविष्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. पंढरपूर नगरपालिकेमध्ये कॉरिडॉर संदर्भात कोणताही ठराव झाला तरी कॉरिडॉर काम थांबणार नाही असा थेट इशारा नगरपालिकेच्या सभेत कॉरिडॉर विषय तर खूप करणाऱ्या नगरसेवकांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे。0
0
Report
Advertisement
चंद्रकांत पाटल ने शरद पवार को कहा संवेदनशील मुख्यमंत्री, सूखा पर तंज
Sangli, Maharashtra:पत्र देऊन जागे होणारे असंवेदनशील नव्हे तर संवेदनशील मुख्यमंत्री आहेत - मंत्री चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना खोचकटोला अँकर - पत्र देऊन जागे होणारे,असंवेदनशील मुख्यमंत्री नाहीत,संवेदनशील मुख्यमंत्री आहेत,असा खोचक टोला भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना लगावला आहे.दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रावरून लगावला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.0
0
Report
रायगढ़ ब्रेकिंग: मुंबई-गोवा राजमार्ग पर यातायात जाम, भीड़भाड़ बढ़ी
Chendhare, Maharashtra:रायगड ब्रेकिंग मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी कायम मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा माणगाव ते इंदापूर दरम्यान वाहतूक अतिशय संथगतीने सुरू गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न पावसाच्या हजेरीमुळे वाहनकोंडीत भर0
0
Report
अंबरनाथ में बालाजीनगर प्रवेशद्वार गिरा, निर्माण गुणवत्ता पर सवाल
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ पश्चिम की खुंटवली बालाजीनगर मंदिर के पास प्रवेशद्वार अचानक गिर गया. खराब निर्माण के आरोप; सौभाग्य से किसी के जीवन की हानि नहीं हुई. नगरपालिका प्रशासन की तरफ से जांच का आश्वासन. घटना के समय प्रवेशद्वार के दो टुकड़े हो गए और उनका एक भाग सड़क पर गिरा. भीड़ जुटी और ट्रैफिक जाम थोड़ा हुआ. लगभग छह साल पहले यह प्रवेशद्वार लोकार्पण हुआ था. नगर परिषद द्वारा स्थापित यह प्रवेशद्वार जल्द ही गिरने से निर्माण गुणवत्ता पर प्रश्न उठे हैं. प्रवेशद्वार में उपयोग किए गए सामग्री, निर्माण गुणवत्ता और उसकी देखभाल को लेकर नागरिकों के सवाल हैं. घटनाक्रम जानकारी मिलते ही अम्बरनाथ पुलिस, नगरपालिका अधिकारी-कर्मचारी और भाजपा नगरसेवकों ने घटना स्थल का दौरा किया. भाजप के गुट नेता अभिजीत करंजुले पाटील ने मौके पर निरीक्षण किया. पूरे मामले की जांच कर दोषियों पर कार्रवाई का आश्वासन दिया गया।0
0
Report
Advertisement
गोवळकोट में गणेश विसर्जन की सदियों पुरानी परंपरा, नाव से जल विसर्जन भी आकर्षण
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी : गोवळकोटमध्ये अनोखी परंपरा; नदीत रिंगण घालून आणि बोटीतून बाप्पाला निरोप!.. रत्नागिरीच्या चिपळूणमधील गोवळकोट येथे गणेश विसर्जनाची शेकडो वर्षांची अनोखी परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जातेय.. येथे गावातील सर्व गणेशमूर्ती डोक्यावरून नदीपात्रात आणून त्यांचे भव्य रिंगण केले जाते आणि पारंपरिक पद्धतीने नाचवत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो.. तर दुसरीकडे, स्थानिक भोई समाजाकडून गणरायाला बोटीतून नदीच्या खोल पाण्यात नेऊन वाजतगाजत विसर्जन करण्याची आगळीवेगळी पद्धत पाहायला मिळते.. गोवळकोटमधील या दोन्ही विसर्जन परंपरा सध्या भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत..0
0
Report
बंजारा आरक्षण के लिए सात युवकों का उपोषण समाप्त; सरकार से बैठक की मांग
Washim, Maharashtra:वाशिम: सात युवक गेल्या आठ दिनांत वाशिमाच्या पोहरादेवी इथं संत रामराव महाराजांच्या समाधी समोर उपोषण सुरु केलं होतं. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याने बंजारा धर्मगुरू तथा विधान परिषदेचे आमदार बाबूसिंग महाराज यांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुढील १५ दिवसात बैठक लावण्याचं आश्वासन देत उपोषण सोडवलं. यावेळी उपोषणकर्त्यांनी एसटी आरक्षणासंदर्भात सरकारनं नेमलेल्या समितीनं आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती जाहीर करावी अशी भूमिका घेतली असून. मुख्यमंत्रींशी सकारात्मक चर्चा न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.0
0
Report
गंगापुर रोड वृक्षतोड पर बड़ी कार्रवाई; 6 गिरफ्तार, चार दिन की पुलिस कस्टडी
Nashik, Maharashtra:नाशिक गंगापूर रोड वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई; सहा जणांना अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी जाहिराती दिसाव्यात म्हणून झाडांची कत्तल? CCTV नंतर पोलिसांचा दणका; सहा जणांवर कारवाई गंगापूर रोडवरील ५० हून अधिक झाडे तोडल्याप्रकरणी ६ जणांना अटक नम्रता अॅडव्हर्टायझिंगचे संचालक मच्छिंद्र देशमुख यांच्यासह कारवाई सर्व आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी गंगापूर पोलिसांची कारवाई; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप गंगापूर रोडवरील दुभाजकावरील झाडे तोडल्याच्या तक्रारीनंतर गंगापूर पोलिसांनी तपास सुरू केला होता जाहिराती दिसाव्यात या उद्देशाने रात्रीच्या वेळी झाडे तोडल्याच पोलिस तपासात समोर आले आहे, दुभाजकावरील ५० हून अधिक झाडे तोडल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या प्रकरणी अभिमन खैरनार, दिलीप बेंडकुळे, दीपक दाते, रोहिदास खुरखुटे, अर्जुन चारोस्कर आणि नम्रता अॅडव्हर्टायझिंगचे संचालक मच्छिंद्र देशमुख अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने सहाही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात असून, वृक्षतोडीच्या या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलिसांकडून सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणातील पोलीस कारवाई आणि तपासाबाबत नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली आहे. या प्रकरणाला नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे यांनी वाचा फोडत आशा लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे... त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेचे कुठले अधिकारी यामध्ये जर शामिल असेल त्याची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी उपमहापूर विलास शिंदे यांनी केलीये. नाशिकमध्ये तब्बल ५० झाडे तोडल्याच्या प्रकारावरून मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांशी आपले बोलणे झाले असून, संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आता जनतेनेही पुढे आले पाहिजे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र झाडे तोडण्याचे आदेश किंवा सांगणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. महापालिकेतील काही अधिकारी संबंधित लोकांना सांभाळत असल्यामुळेच त्यांच्या दादागिरी वाढत असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला. झाडे तोडण्याच्या प्रकरणात संबंधित व्यक्तींसोबतच जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. गंगापूर रोडवरील झाडतोड प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, झाडतोडीच्या या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील संबंधित जाहिरातदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. मात्र, केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही. शहरातील झाडांची अशाप्रकारे बेकायदेशीर तोड करणाऱ्या मुजोरांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर आणि प्रभावी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपासासोबतच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासन नेमकी कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता लक्ष लागले आहे...0
0
Report
Advertisement
