Back
दावडीतील पाणीटंचाई: भाजपने एमआयडीसी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला!
ABATISH BHOIR
Aug 18, 2025 09:47:14
Kalyan, Maharashtra
तर एमआयडीसी कार्यालयाला ठोकू टाळे
भाजप पदाधिकाऱ्यांचा इशारा
दावडीतील पाणीटंचाई बाबत स्थानिक नागरिक आक्रमक
Anchor- दावडी परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे आज भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा काढला गेल्या अनेक दिवसांपासून दावडीमध्ये अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने दावडीतील नागरिक त्रस्त झाले आहेत याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एसपी आव्हाड यांची भेट घेत त्यांना जाब विचारला त्यावर उत्तर देताना कार्यकारी अभियंता आव्हाड यांनी 22 तारखेनंतर सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचं आश्वासन दिलं.
दरम्यान जर 22 तारखेपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही तर एमआयडीसी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
Byte- नंदू परब जिल्हाध्यक्ष भाजप
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowAug 18, 2025 11:33:57Yavatmal, Maharashtra:
AVB
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ४६ व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे राज्यातील प्रयोगशील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठान च्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. पुसदच्या माळ पठारावरील दुष्काळग्रस्त चाळीस गावांना पाण्याची उपलब्धता निर्माण करून तेथील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करू असे वचन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले.
बाईट : संजय राठोड : पालकमंत्री
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 18, 2025 11:33:33Ambernath, Maharashtra:
बदलापूर पालिकेची प्रभाग रचना जाहीर
24 पॅनेलच्या द्विसदस्यीय पद्धतीने होणार निवडणूक
File name - bdl ward
Anchor : बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज जाहीर झाला आहे. यामध्ये एकूण 24 पॅनेलच्या द्विसदस्यीय पद्धतीने आगामी 49 प्रभागांसाठी ही निवडणुका होणार आहेत.
Vo : बदलापूर नगरपालिकेची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली असून कोरोनामुळे निवडणुका होऊ न शकल्यानं गेल्या 5 वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. यात बदलापूरमध्ये 49 प्रभाग तयार करण्यात आले असून 24 पॅनेलच्या माध्यमातून द्विसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 23 पॅनल हे 2 सदस्यांचे, तर एक पॅनल हा तीन सदस्यांचा असेल. या प्रारूप प्रभाग रचनेवर येत्या 31 ऑगस्ट पर्यत पालिकेत हरकती आणि सूचना नोंदवता येणार असून त्यावर सुनावणी होऊन त्यानंतर अंतिम आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे.
चंद्रशेखर भूयार ( बदलापूर)
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 11:22:17Jalna, Maharashtra:
FEED NAME :1808ZT_JALNA_CROP_LOSS(5 FILES)
जालना : बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार परीसरात शेतीचं मोठं नुकसान
पावसामुळे पिकं वाहून जाऊन नुकसान
पंचनामे करण्याची मागणी
अँकर : जालन्यातील बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार परीसरात देखील ढगफुटी सदृष्य पावसानं हजेरी लावलीय.या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.ओढ्याला आणि नदीला आलेल्या पुरामुळे कपाशी,सोयाबीन पिकं वाहून गेली असून जमीन देखील खरडली आहे.तर पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं पिकं देखील सडण्याची शक्यता आहे.या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 18, 2025 11:19:13Nagpur, Maharashtra:
Ngp Bawankule Byte
live u ने फीड पाठवले
-------------
नागपूर
चंद्रशेखर बावनकुळे
On पाऊस नुकसान भरपाई
मुख्यमंत्री आणि मी सुद्धा प्रत्येक नुकसानाचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले.. पुढचे तीन दिवस काही भागात रेड अलर्ट असल्याने सर्व विभाग सतर्क रहावे आणि आवश्यकता असेल तिथे शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले.. जी काही नुकसान भरपाई असेल ती जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन खात्यातून देण्याच्या सूचना दिल्यात.. शेतकऱ्याचे पंचनामे जसे जसे येतील त्यानुसार भरपाई देणार..
मुंबईत पालिका आणि आमचं सरकार अलर्ट आहे, जनतेला देखील अलर्ट राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे...
On राहुल गांधी मतचोरी आरोप
मतदार यादीत पुनर सर्वेक्षण नेहमी सुरू असतं.. त्यामुळे रोज रोज मतदान समाविष्ट होत असते ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.. मतदार यादीत कुणाचाही नाव समाविष्ट झाल त्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. मात्र त्याबद्दल निवडणूक आयोग प्रत्येक पक्षाला आक्षेप घेण्यासाठी नोटीस देतात.. या पूर्ण निवडणुकीत एक लाख बुथवर आक्षेप घ्यायचा तर पूर्वी घेतली गेली नाही... निवडणूक हरल्यावर मुर्खासारखे आठ महिन्यांनी हे आरोप करतात... जेव्हा नेतृत्व क्षमता संपते तेव्हा दुसऱ्यावर आरोप करून आपली चमडी वाचविण्याच हे प्रयत्न करत आहे..
काँग्रेस पक्षाला अजून संधी आहे, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आक्षेप घ्यावं नाहीतर ही निवडणूक हरल्यावर देखील हे असेच म्हणणार..
Evm कोणाच्या काळात आलं, मनमोहन सिंग सरकारच्या काळापासून evm प्रणाली सुरू झाली.. पक्ष वाढविण्यासाठी किंवा नेतेगिरी टिकवण्यासाठी देशातील जनतेची नस ओळखावी लागते...
On शालार्थ आयडी घोटाळा शिक्षक भेट..
शालार्थ आयडी प्रकरणात ज्या संस्था चालकांनी बदमाश पण केलं.. नियुक्त करण्यासाठी प्रलोभन देऊन खोट्या शालार्थ आयडी तयार करून नियुक्ती केली... शाळेत शिक्षक म्हणून लागायचं असेल तर काय स्थिती आहे हे सर्वांना माहीत आहे.. काहीजण पंचवीस ते तीस लाखाचे लोन काढले आहेत... ज्या संस्था चालकांनी बदमाशी केली त्यांच्या सर्वांच्या संपत्ती सरकारने जप्त करायला हवी.. मी शिक्षण मंत्र्यांना देखील बोलणार आणि याची सर्वाची संपती जप्त करावी.. यामध्ये या शिक्षकांचा काही दोष नाही.. यांना आधार कसा देता येईल ते बघू... बारा वर्षापासून काम करत आहे. आणि पगार चालू असताना अशा स्थितीत आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही...
On विविध लोकार्पण
1200 कोटी रुपये यावेळी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात आले. त्यांचं नियोजन करण्यासाठी आज बैठक घेत आहोत... विकसित देश, विकसित महाराष्ट्र त्याप्रमाणे 2047 पर्यंत विकसित नागपुर कसा राहणार याची प्लॅनिंग आम्ही करणार...
पाटणसावंगी येथे 30 खाटाच ग्रामीण रुग्णालयाच आज उद्घाटन झालं..36 प्रकाराच्या सेवा या रुग्णालयातून मिळणार...
1
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 18, 2025 11:04:39Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका दहिवद गावाजवळ अल्पवईन मुलीवर बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि फाशी देण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चा संपल्या नंतर काही समाज कंटकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे यां मोर्च्यानंतर हिंसक वळण लागल्याने शहरात काही काल तणाव निर्माण झाला होता. शिरपूर शहरात संमाजकांटक आणि पोलिसांची झटापट झाली. पोलीस आणि काही कथित आंदोलन मध्ये बाचाबाची झाल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या झटपटीच्या घटनेमध्ये पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर चाकूने हल्ला केला करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये ते जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका 8 वर्षीय मुलीवर लैंगिक आत्याचार प्रकरणी मुक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज एकवटला होता. मोर्च्या दरम्यान महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तरुणांही मोठ्या सख्येत सहभागी होते. आंदोलनानंतर अचानक पोलिसांची काही कथित आंदोलकांची झटापट झाली. त्यानंतर पळापळ सुरु झाली. मात्र काही वेळातच पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आता शहरात तणाव निवळला असून, मोठा फौज फाटा शहरात तैनात करण्यात आला आहे.
byte - जयपाल हिरे, जखमी पोलीस निरीक्षक
प्रशांत परदेशी, धुळे.
6
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 18, 2025 11:04:16Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1808ZT_GAD_AMBEZARI_ST
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने प्रथमच धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम आंबेझरीसह एकूण १५ गावांसाठी बससेवेला सुरुवात, जिल्हाभरामध्ये एकूण ५०७ मोचाईल टॉवर्सची उभारणी, एकूण ४२० कि.मी. लांचीच्या रस्त्याचे आणि ६० पुलांचे बांधकाम पूर्ण
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाच्या प्रयत्नाने धानोरा तालुक्यातील छत्तीसगड राज्य सीमेवरच्या आंबेझरी या गावापर्यंत प्रथमच एसटी बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांनी पारंपारिक वाद्य वाजवून आदिवासी नृत्य करत हा आनंद साजरा केला. शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा उंचावून हा क्षण साजरा केला. आंबेझरी गावासह या एसटी बसचा लाभ या भागातील 15 गावांना होणार आहे. जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने आतापर्यंत 507 मोबाईल टॉवरची उभारणी पूर्ण झाली असून 420 किलोमीटरचे रस्ते आणि 60 पुलांचे बांधकाम देखील पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास करावा लागतो. अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याच उपक्रमाअंतर्गत आज स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतर प्रथमच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, गडचिरोली यांच्या सहकार्याने आंबेझरी पर्यंत बससेवा सुरु करण्यात आली. गडचिरोली-चातगाव-धानोरा-येरकड-मुरुमगाव-खेडेगाव-आंबेझरी-मंगेवाडा-जयसिंगटोला-मालेवाडा असा या बसचा प्रवास राहणार आहे. या वर्षभरातच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने गट्टा (जा.)--- गर्दैवाडा वांगेतुरी, कटेझरी ते गडचिरोली आणि मरकनार ते अहेरी रस्त्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बससेवेचा शुभारंभ करण्यात आलाय. बससेवा सुरु झाल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होऊन यामुळे गावातील नागरिकांचीही नेहमीची पायपीट वाचणार आहे. सदर मार्गावरील एस.टी बसच्या सुविधेमुळे गावकऱ्यांना वर्षभर सहज प्रवास करता येणे शक्य होईल.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
5
Report
JMJAVED MULANI
FollowAug 18, 2025 11:02:42Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1808ZT_INDAPURSTBUSPOLICE
FILE 2
इंदापूर बसस्थानक परिसरात पोलिसांची कारवाई – पोलीस नेमप्लेट असलेल्या कारवरही दंड..
ANCHOR — पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या बेसिस्त वाहनचालकांवर इंदापूर पोलिसांनी कारवाई केलीय. बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर पोलीस नेमप्लेट असलेली कार चुकीच्या पद्धतीने उभी असल्याने बसला वळण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. त्याचवेळी घटनास्थळी दाखल झालेल्या इंदापूर वाहतूक पोलिसांनी बेफिकीर पार्किंग करणाऱ्या कारवर तात्काळ दंड आकारला. आणखी 12 गाड्यांवरही नियमभंगाबद्दल तब्बल 20 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
4
Report
JMJAVED MULANI
FollowAug 18, 2025 11:02:26Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1808ZT_DAUNDCCTV
FILE 1
दौंड तालुक्यातील दहिटणे गावात बिबट्याचा वावर....मुक्त संचार झाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Anchor _ दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याची दहशत असल्याचे चित्र आहे.अशातच आता पुन्हा एकदा दौंड तालुक्यातील दहिटणे गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेच वातावरण असून वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जातेय.
7
Report
JMJAVED MULANI
FollowAug 18, 2025 10:47:38Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1808ZT_INDAPURCRIME
FILE 2
सोलापूर-पुणे एसटी बसमध्ये महिला प्रवाशाची पर्सची चोरी… ३.३० लाखांचा ऐवज लंपास...
ANCHOR — सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये महिला प्रवाशाची पर्स चोरून तब्बल तीन लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावाजवळ ही घटना घडली. राजेश्री हुल्ले यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गंठन, लॉकेट, अंगठ्या, ब्रेसलेट आणि रोख अशी मौल्यवान वस्तू चोरीस गेली आहे. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सचिन बोराडे पुढील तपास करत आहेत.
7
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 18, 2025 10:47:31Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
5 FILES
SLUG NAME -SAT_DANDAVAT
सातारा –माणच्या भूमिपुत्रांचा संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे! साताऱ्यातील माण तालुक्यातील पळसावडे येथील टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीविरोधात आंदोलन अधिक भडकले आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली आज कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत घालत मोर्चा काढला आणि आपले गाऱ्हाणे निवेदनाद्वारे अधिकाऱ्यांसमोर ठेवले.
गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलक आमरण उपोषणाला बसले आहेत… पण प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. अन्याय सहन न करणाऱ्या या भूमिपुत्रांनी अखेर दंडवत आंदोलन करून रोष प्रकट केला.
न्याय, कायमस्वरूपी रोजगार, पगारवाढ आणि आरोग्यसुविधा – या प्रमुख मागण्यांना प्रतिसाद मिळाला नाही, तर संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा करचे यांनी दिला आहे.
टाटा पॉवरविरोधातील हा लढा आता निर्णायक वळणावर… आणि भूमिपुत्रांचा आवाज प्रशासनाने दुर्लक्षित केल्यास पुढील दिवसांत संघर्षाचे रणांगण आणखी पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.
बाईट - महेश करचे, आंदोलक
6
Report
JMJAVED MULANI
FollowAug 18, 2025 10:47:16Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1808ZT_DAUNDSKEYING
FILE 3
दौंड तालुक्याच्या विद्यार्थ्यांनी ७९ मिनिटांचा स्केटिंग विश्वविक्रम रचला...
दौंड तालुका ठरला स्केटिंगच्या जागतिक विक्रमाचा साक्षीदार....
दौंड तालुक्यातील ४५ विद्यार्थ्यांचा जागतिक स्केटिंग विक्रम...
ANCHOR — दौंडच्या केडगाव चौफुला येथे ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या ४५ विद्यार्थ्यांनी ७९ मिनिटे न थांबता स्केटिंग करून जागतिक विश्वविक्रम रचला. स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देण्यासाठी केलेल्या या उपक्रमाची नोंद युएस बुक ऑफ रेकॉर्ड, यूएन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि जीनियस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली. ३ वर्षांपासून ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी या विक्रमात सहभाग नोंदवला होता...
6
Report
ABATISH BHOIR
FollowAug 18, 2025 10:47:07Kalyan, Maharashtra:
कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस
कल्याण पूर्वेतील चेतना पाईपलाईन रोड गुडघाभर पाण्याखाली, तर कोपर रोडवरील सोसायट्यांतही पाणी शिरले"
कल्याण पूर्व चेतना पाईपलाईन रोडला मुसळधार पावसाचा मोठा फटका..गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ
तर डोंबिवली कोपर रोडवरील अंबा भवानी मंदिर परिसरात सोसायट्यांच्या आवारात पाणी शिरले
मुलं व ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण
7
Report
MKManoj Kulkarni
FollowAug 18, 2025 10:19:45Mumbai, Maharashtra:
अँकर -- मोबाईलला कुर्ला नेहरूनगर येथे शांताराम वालावलकर शाळेसमोर रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे तर या शाळेत सुद्धा पाणी साचला आहे अनेक लहान मुलं या पावसाचा आनंद घेत आहेत तर यातून जाणारे वाहन बंद पडत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे पुन्हा एकदा मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी
मनोज कुळकर्णी यांनी
Wkt
Feed send TVU १६
Slug -- Negarunagar Water loddging wkt
10
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 18, 2025 10:19:38Raigad, Maharashtra:
रायगड ब्रेकिंग
स्लग - रायगडच्या निजामपूर भागाला पावसाचा जोरदार फटका
रायगडच्या निजामपूर भागाला पावसाचा जोरदार फटका
निजामपूर बाजापेठेतील दुकानांमध्ये शिरलं पावसाचे पाणी
दुकानात पाणी शिरून चीजवस्तूंचे नुकसान
माणगाव - पुणे रस्त्यावर पाणीच पाणी
पावसाच्या तडाख्याने नागरिक हैराण
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 18, 2025 10:18:56Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या सोनपेठ गंगाखेड मार्गावरील नरवाडी गावच्या ओढ्याला गेल्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने पूर आलाय. ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सोनपेठ गंगाखेड नरवाडी मार्गावरील गावांचा संपर्क सकाळ पासून तुटलाय. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्ण पुणे ठप्प झालीय.तर दुसरीकडे पालम तालुक्यातील शिरपुर ते सायाळा मार्गावरील गळाटी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा ही मार्ग वाहतुकीसाठी बंद पडलाय. पुयणीचा पूल वाहून गेल्याने त्यापलीकडील आडगाव खडी, वनभुजवाडी नहावा,नवळगावाचा संपर्क पालम शहराशी तुटलाय...
9
Report