Back
जालना: पावसाने केले शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची मागणी पंचनाम्याची!
NMNITESH MAHAJAN
Aug 18, 2025 11:22:17
Jalna, Maharashtra
FEED NAME :1808ZT_JALNA_CROP_LOSS(5 FILES)
जालना : बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार परीसरात शेतीचं मोठं नुकसान
पावसामुळे पिकं वाहून जाऊन नुकसान
पंचनामे करण्याची मागणी
अँकर : जालन्यातील बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार परीसरात देखील ढगफुटी सदृष्य पावसानं हजेरी लावलीय.या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.ओढ्याला आणि नदीला आलेल्या पुरामुळे कपाशी,सोयाबीन पिकं वाहून गेली असून जमीन देखील खरडली आहे.तर पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं पिकं देखील सडण्याची शक्यता आहे.या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 13:19:30Jalna, Maharashtra:
FEED NAME :1808ZT_NANDED_RESQUE(1 FILE)
नांदेड :रावणगाव येथे पुरात अडकलेल्या 225 जणांची सुटका,पूरग्रस्तांना राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था
अँकर - नांदेड जिल्हयातील मुखेड रावणगाव येथे तब्बल 225 गावकरी रात्रभर अडकून पडले होते .. सर्वांना एससीआरएफने रेस्कु करुन सुखरूप बाहेर काढले ... गावाजवळ त्यांना राहण्यासाठी तात्पुरते पत्री शेड उभारण्यात आले . ईथे प्रथमोउपचार आणि तात्पुरते शौचालय उभरण्यात आले.. प्रशासनाकडून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली ..
3
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 13:19:04Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_NANDED_VISHNUPURI(1 FILE)
नांदेड :विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले..१ लाख ४ हजार क्यूसेस वेगाने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग.. नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
अँकर - नांदेड जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसा पासून सातत्याने पाऊस सुरु आहे. विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरल्याने प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. विष्णुपुरी प्रकल्पातुन जवळपास १ लाख ४ हजार क्यूसेस इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून गोवर्धन घाट येथील स्मशानभूमी च्या काठापर्यंत पाणी पोहचले आहे. सद्या विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक सुरु आहे, त्यामुळे प्रकल्पाचे आणखी काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दरवाजे उघडण्याची पहिली वेळ आहे. दरम्यान गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे....
1
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 13:17:28Jalna, Maharashtra:
FEED NAME :;1808ZT_NANDED_PEOPLECARRY(3 FILES)
नांदेड : हसनाळमधून 5 जण गेले वाहून,SDRF पथकाकडून शोध सुरु
अँकर : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ येथुन 5 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याची माहिती समोर आली आहे.बेपत्ता झालेल्यांचा शोध सकाळपासून सुरू आहे.SDRF च्या पथकाकडून आज सकाळी गावात बचावकार्य केलं गेलं मात्र वाहून गेलेल्या नागरीकांचा शोध अजूनही लागलेला नाही.त्यामुळे वाहून गेलेल्या नागरीकांच्या कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झालेत. दरम्यान वाहून गेलेल्या नागरीकांचा शोध अजूनही सुरूच आहे.
बाईट :गुणाबाई,ग्रामस्थ,हसनाळ (गुलाबी लुगडे असलेल्या महिला, रडतानाचा व्हिडीओ आहे माझा बाप वाहून गेला म्हणून)
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 18, 2025 13:15:45Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढत विशेष परभणी पदभरती व रिक्त पदे भरण्यासाठी धडक दिली. आदिवासींची १२५२० विशेष पदभरती व ८५,००० रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली. यावेळी "नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची”, “आदिवासी एकता जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. संतप्त विद्यार्थ्यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.
0
Report
ABATISH BHOIR
FollowAug 18, 2025 13:03:16Kalyan, Maharashtra:
कल्याण न्यूज फ्लॅश..
कल्याण पूर्व नेतीटली टेकडी परिसरातील जय भवानी नगर या ठिकाणी टेकडीवरील तीन घरांवरती दगड आणि मातीचे ढीग खाली आल्याने तीन घरांचे नुकसान..
मुसळधार पावसामुले टेकडी वरील पाण्यासॊबत दरड आणि मातीचे ढीग घरांवर..
सकाळ पासून कल्याण डोंबिवली परिसरत मुसळधार
मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली सखल भागात पाणी साचले
तिघांच्या घरामध्ये कोणी नसल्याने जीवित आणि नाही..
महानगरपालिकेच्या अग्निशामक दल घटनास्थळी.
byte.. नागरिक
byte.. सुधीर दुष्णन
अग्निशमन अधिकारी
1
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 18, 2025 13:03:08Raigad, Maharashtra:
स्लग - माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणी ....... रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी ...... महामार्गालगतच्या घरांमध्ये पाणी शिरले ...... महामार्ग विभागाच्या हलगर्जी पणाचा फटका .....
अँकर - रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. माणगाव इथं जुने माणगाव परिसरात मुंबई गोवा महामार्गावरून गुडघाभर पाणी वाहत आहे . त्यातूनच वाट काढत वाहने पुढे सरकत आहेत. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांचे हाल होत आहेत. 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत अशी पूरस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर प्रथमच असं पाणी बघितल्याचं तिथले रहिवासी सांगतात. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हलगर्जी पणामुळे ही स्थिती ओढवल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.
बाईट 1 - स्थानिक रहिवासी
बाईट 2 - स्थानिक रहिवासी
1
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 18, 2025 12:45:34Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1808ZT_CHP_ROAD_CLOSE_1
( single file sent on 2C)
टायटल:-- वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील इरई आणि झरपट नदीच्या पाणीपातळीतही वाढ, हडस्ती-चोरगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद
अँकर:--वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने चंद्रपूर शहराजवळील इरई आणि झरपट नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. यामुळे चंद्रपूर कडून हडस्ती आणि चोरगाव कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा आणि वर्धा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ईसापुर आणि सातनाला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या नदीच्या उपनद्या असलेल्या इरई आणि झरपट या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळेच चंद्रपूर कडून हडस्ती आणि चोरगावकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. मात्र या सर्व परिस्थितीमध्ये दिलासादायक बाब ही आहे की इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या बंद आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
9
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 18, 2025 12:35:51Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_URMODI
सातारा - साताऱ्यातील उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे चार दरवाजे उचलून 1131 क्युसेक विसर्ग उरमोडी नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे. धरणातून जलविद्युत प्रकल्पासाठी 450 क्युसेक विसर्ग सुरू आहे.असा उरमोडी नदीमध्ये एकूण 1581 क्युसेक विसर्ग उरमोडी नदीमध्ये सुरू आहे. धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उरमोडी नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या परिसरात सध्या पावसाची संततधार सुरूच आहे.
9
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 18, 2025 12:34:03Ratnagiri, Maharashtra:
कशेडी घाटात ट्रक उलटला; चालक जखमी
पोलादपूर : मुंबई–गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या कशेडी घाटात पोलादपूरजवळ अपघाताची घटना घडली आहे. चिपळूणवरून गुजरातकडे पेपरचा माल घेऊन जाणारा ट्रक घाटाच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या अपघातात ट्रकचालकाला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनास्थळी पोलादपूर पोलीस दाखल झाले असून अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळासाठी अडथळा निर्माण झाला. दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यात येत असल्याने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पाऊस व निसरड्या रस्त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
8
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 18, 2025 12:33:34Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_bibtya
स्लग - घरात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद..
अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील माळेवाडी-कोकरूड मध्ये एका घरामध्ये बिबट्या शिरल्याचा प्रकार घडला होता. बिबट्या घरात शिरलेला पाहताच घराला बाहेरून कडी घालत बिबट्याला घरात कोंडण्यात आले.घरात शिरलेल्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे.गोसावी वस्तीतील अरुण गोसावी यांच्या घरात हा बिबट्या रात्रीच्या सुमारस शिरला आणि घरातल्याच कॉटच्या खाली जाऊन लपून बसला होता.गोसावी कुटुंबातील अश्विनी गोसावी यांना गुरगुरण्याचा आवाज आला,त्यानंतर त्यांनी कुत्रा असल्याचा समजून हुसकवण्याचा प्रयत्न केला,तसा आवाज आणखी वाढला, काही क्षणात त्यांना हा बिबट्या असल्याची बाब लक्षात आली,मग त्यांनी धावत घराच्या बाहेर जाऊन घराला कडी लावली. कुठे गेले याची माहिती आजूबाजूचीची नागरिकांना दिली.यानंतर काही वेळात वन विभाग व पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत,घरात शिरलेल्या बिबट्याला जरबंद केले,या बिबट्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. घरात बिबट्या शिरल्याच्या घटनेमुळे गावात एकच खळबळ
उडाली होती.
4
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 18, 2025 12:19:03Raigad, Maharashtra:
स्लग – यंदाही चाकरमान्यांच्या प्रवासात खड्डयांचे विघ्न ......... 14 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची यंदाही दुरवस्था ........ गणेशोत्सवाच्या तोंडावर महामार्गावर खडडयांचे साम्राज्य .......... कोकणवासियांचया दुर्दैवाचे दशावतार केव्हां संपणार ..........
अँकर – गणेशोत्सव तोंडावर आला आहे. चाकरमान्यांना कोकणात आपल्या गावी जायचे वेध लागले आहेत. परंतु मुंबई गोवा महामार्गाची झालेली रखडपटटी आणि रस्त्यावरील खडडे यामुळे यंदाही चाकरमान्यांची कोकणची वाट बिकट असल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे.
व्हिओ 1 – कोकणातील सर्वांत मोठा उत्सव असलेला गणेशोत्सव अवघ्या 8 दिवसांवर येवून ठेपला आहे. मात्र यंदाही कोकणात गणेशोत्सवासाठी येणारया चाकरमान्यांना खडडयातूनच प्रवास करावा लागणार आहे. गणेशभक्तांच्या मार्गात यंदाही खडडयाचे विघ्न कायम आहे. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील खडडे बुजवून चाकरमान्यांनाचा प्रवास सुखकर करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी सध्या कोसळणारया मुसळधार पावसात हे खडडे कसे बुजवणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बाईट 1 – प्रवासी
बाईट 2 – वाहनचालक (रिक्षा)
व्हिओ 2 – मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम 2011 साली हाती घेण्यात आले. परंतु आज 14 वर्षे झाली तरी याचे काम पूर्ण झालेले नाही. या अर्धवट अवस्थेतीत रसत्याने हजारो जीव घेतलेत. अनेक ठिकाणी रस्ता सुस्थितीत असला तरी कोलाड, नागोठणे आणि लोणेरे येथील उडडाणपूलांची कामं अर्धवट अवस्थेत आहेत. जिथं रस्त्याचे काम झालेले नाही तिथं मोठमोठे खडडे आहेत. या खडडयांचा प्रवाशांना तर त्रास होतोच पण वाहनंही नादुरूस्त होत असतात. आता सर्व्हीस रोडवर पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरती मलमपटटी केली जात आहे. दरवर्षी गणेशोत्सव आला की मंत्री महामार्गाचा दौरा करतात. यंदाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी महामार्गाचा पाहणी दौरा केला आणि गणेशोत्सवापूर्वी रस्ता खडडेमुक्त करण्याचे आश्वासन दिलंय.
बाईट 3 – शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
व्हिओ 3 – मुंबई गोवा महामार्गावरची आणखी एक मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. रस्त्यावरी खडडे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरताहेत. यामुळे प्रवाशांची तासनतास रखडपटटी होतेय. माणगाव आणि इंदापूर इथंली कोंडी कोकणवासियांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. दोन्ही ठिकाणी बायपासची कामे अर्धवट आहेत. तीनवेळा टेंडर काढूनही उरलेलं काम अजूनही सुरू झालेलं नाही. सरकारने या महामार्गाच्या पूर्ततेसाठी अनेक वायदे केले. प्रत्येकवेळी तारीख पे तारीखच्या आश्वासनांना कोकणवासीयदेखील वैतागले आहेत.
बाईट 4 – शिवेंद्र राजे भोसले , सार्वजनिक बांधकाम मंत्री
बाईट 5 – वाहनचालक (रूग्णवाहिका)
बाईट 6 - एसटी चालक
फायनल व्हिओ – मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होवू दे आणि या जीवघेण्याप्रवासातून मुक्ती मिळू दे असं साकडं कोकणवासी दरवर्षी गणरायाला घालतात. आता कोकणवासीयांच्या दुर्दैवाचे दशावतार केव्हा संपणार हे विघ्नहर्ताच जाणो.
प्रफुल्ल पवार, झी 24 तास रायगड
10
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 18, 2025 12:18:42Yavatmal, Maharashtra:
AVB
विदर्भ मराठवाडा सीमेवर असलेल्या यवतमाळच्या ईसापुर धरणाचे तेरा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, अनेक शेतांमध्ये पाणी शिरले आहे. ईसापुर धरणाचे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत असून पुरामुळे पैनगंगा नदीने रौद्ररूप घेतले आहे. पुरामुळे विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. पुसद-हिंगोली राज्य मार्ग बंद असून, नदीच्या पुलावर पाच ते सहा फूट पाणी आहे. धरण पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सांडव्याची तेरा वक्रद्वारे उघडून ७१ हजार ३०६ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती जलमय झाली असून, तूर, हळद, सोयाबीन, कापूस, उडीद, ऊस या पिकांचे नुकसान झाले आहे.
बाईट : प्रकाश बुटले : शेतकरी
14
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 18, 2025 12:16:18Beed, Maharashtra:
बीड: परळी तालुक्यातील लिंगा नदीला पूर – कार वाहून गेली; तिघांचा जीव वाचला, एकाचा मृत्यू
Anc- परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरातील हुडा कोडगाव येथे मध्यरात्री ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे लिंगा नदीला अचानक मोठा पूर आला. या पुराचा अंदाज न आल्याने एक चारचाकी वाहन नदीत वाहून गेले. या दुर्दैवी अपघातात चार जणांपैकी तिघांचा जीव वाचला, तर एकाचा मृत्यू झाला आहे.
ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कारमध्ये चार जण प्रवास करत होते. पूराच्या प्रचंड प्रवाहात वाहन अडकल्याचे लक्षात येताच सिरसाळा पोलिसांनी तातडीने धाडस दाखवत पाण्यात उतरून तिघांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, या अपघातात विशाल बल्लाळ या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शोधमोहीम राबवल्यानंतर दुपारी सापडला.
दरम्यान, लिंगा नदीला आलेल्या पुरामुळे आसपासच्या पाच गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले असून NDRF चे पथक पाचारण करण्यात आले आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
8
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 18, 2025 12:01:44Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1808ZT_WSM_AGRI_MINISTER
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून गेल्या चाळीस वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून यामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. या पावसात अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. असल्याची माहिती कृषी मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तर पंचनामे करून तत्काळ मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घाबरून जाण्याचं कारण नाही शासन प्रशासन नागरिकांच्या सोबत असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेही लक्ष वाशिम जिल्ह्याकडे असल्याचेही मंत्री भरणे यांनी सांगितले.
बाईट: दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री तथा पालकमंत्री वाशिम जिल्हा
12
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 18, 2025 11:50:59Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- आमदार जगताप ऑन संग्राम भंडारे कीर्तनात हल्ला
फीड 2C
Anc:-
हिंदुत्ववादी कीर्तनकार हभप संग्रामबापू भंडारे यांच्यावर संगमनेर येथे झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी निषेध केलाय...ही घटना संगमनेर येथे घडल्याने यामध्ये राजकीय वास येत असल्याचा आरोप जगताप यांनी केलाय...घटनेच्या एक दिवस सोशल मीडियावर काही पोस्ट फिरत होत्या ज्यात असा हल्ला करणार असल्याचा उल्लेख असल्याची चर्चा सुरू होती असं जगताप यांनी म्हंटलंय...सोबतच या प्रकरणाचा पोलीस प्रशासनाने सखोल तपास करायला हवा, संग्राम बापू यांच्याबाबत घडलेला प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हंटलंय.
बाईट:- संग्राम जगताप, आमदार राष्ट्रवादी (AP)
14
Report