Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102

उजनी प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण: प्रशासनाची उदासीनता सोडवण्याची गरज!

JMJAVED MULANI
Jul 11, 2025 13:06:02
Baramati, Maharashtra
JAVED MULANI SLUG 1107ZT_INDAPURPALSDEV FILE 1 BYTE 1 उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण… पळसदेव ग्रामसचिवालयासमोर सुरू आंदोलन… ANCHOR — उजनी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी पळसदेव ग्रामसचिवालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. मेघराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरूy करण्यात आलं असून, शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात संतप्त प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरले आहेत.प्रकल्पग्रस्तांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण अधिकृत करावं, प्रत्येक कुटुंबातील सदस्याला ४ गुंठे रहिवासी प्लॉट मिळावा, आणि गुन्हेगारी प्रकारांना आळा बसावा अशा प्रमुख मागण्या आहेत. पळसदेव गावात दहशत माजवत असलेल्या सराईत गुन्हेगार आप्पा शिंदेविरोधात CID चौकशी व मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. यासोबतच पुनर्वसित गावठाणांच्या सीमा निश्चित करून त्या ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित कराव्यात, अशीही भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली आहे.हे उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत थांबवणार नसल्याचा इशाराही मेघराज पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top