Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
जैसलमेरच्या राज परिवाराने NCERT च्या नकाशावर केला तीव्र विरोध!
PNPratap Naik1
Aug 06, 2025 04:32:45
Kolhapur, Maharashtra
Kop Maratha Samrajya Waad आत्ताची सर्वात मोठी बातमी. Anc :- जसलमेरच्या राज परिवाराने NCERT च्या इयत्ता 8वी पुस्तकात असणाऱ्या मराठा साम्राज्याच्या नकाशाला विरोध केला आहे. आठवीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा चुकीचा असल्याचा सांगून तो काढून टाकावा अशी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी केलीय. चैतन्यराज सिंग यांनी X वर ट्विट करत ही मागणी केली आहे.. NCRT ने प्रकाशित केलेल्या 8 वीच्या सामान्य ज्ञान पुस्तकाच्या युनिट 3 मधील पान नंबर 71 मध्ये दाखविलेल्या नकाशामध्ये जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवण्यात आला आहे. तो ऐतिहासिक दृष्टीने पूर्णतः चुकीचा असल्याचे म्हटलय. पूर्णतः अनऐतिहासिक तथ्यांवर आधारित असणार हे पुस्तक म्हणजे NCERT च्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. अशा प्रकारचा इतिहास म्हणजे आमच्या स्वाभिमानाला ठेच पोचवणारी आहे.. इतकच नाही तर आमच्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाचा अपमान आहे असं देखील चैतन्यराज सिंग यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.. जैसलमेरच्या कोणत्याही ऐतिहासिक साधनांमध्ये मराठा समाजाचे आधीपत्य, आक्रमणाचा कोणताही उल्लेख नसल्याचे म्हटले आहे...चैतन्यराज सिंग यांनी अशा प्रकारचे ट्विट करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Aug 06, 2025 08:19:21
kolhapur, Maharashtra:
व्हिडिओ आणि बाईट असाइन्मेंट ला व्हाट्सअप केले आहे ----- नागपूर --- पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता --- ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही एकच कविता दोन्ही वर्गात असल्याने पालकांना संभ्रम --- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात घोळ ? --- पहिल्या वर्गात पान क्रमांक 28तर दुसरीच्या पान नंबर 16 वर तिच कवीता --यंदा प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना सीबीएससीच्या धर्तीवर पहिलीचे पुस्तके देण्यात आली... त्यामुळे पहिलीच्या इंग्रजीच्या पुस्तकात बर्ड्स कॅन फ्लाय ही कविता जशीच्या तशी आली.. जी अगोदरच दुसरीच्या पुस्तकात होती --- केवळ चित्र बदलण्यात आले, पण दोन्ही वर्गात एकंच कविता.... --- त्यामुळे कॉपी पेस्ट करण्याचं प्रकार आहे की चूक आहे की यामागे बालभारतीची काही भूमिका आहे कळायला मार्ग नाही.... --मात्र त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होताय
7
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 06, 2025 08:04:03
Ambegaon, Maharashtra:
Feed 2C Slug: Ambegaon 19 Missing File:01 Rep: Hemant Chapude(Ambegaon) *आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्दमधील ९० बॅचमधील १९ जण उत्तराखंडमध्ये बेपत्ता?* Anc :- आंबेगाव तालुक्य्तील अवसरी खुर्द येथील १९९० सालच्या १० वी च्या बॅचमधील ८ पुरुष आणि ११ महिलांचा एक समूह पर्यटनासाठी १ ऑगस्ट रोजी उत्तराखंडला रवाना झाला होता. या सर्वांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. Vo :- काल सकाळी या समूहातील काही जणांनी गंगोत्रीमधील फोटो आणि स्टेटस शेअर केले होते. मात्र दुपारी त्या परिसरात काही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा सर्व समूह त्या भागातच असल्याचे सांगितले जात आहे.काल या समूहातील एका महिलेने तिच्या मुलाला कॉल करून "आम्ही सर्वजण सुखरूप आहोत," असे सांगितले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही सदस्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.स्थानिक प्रशासन, उत्तराखंड पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा या प्रकरणाचा तपास घेत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
7
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 06, 2025 07:47:20
Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग: भरधाव कारची पादचाऱ्याला धडक..... पादचाऱ्याचा जागीच मृत्यू. पादचाऱ्याला धडक देऊन वाहन चालकाचे पलायन. कार चालक अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जयंत यांचा मुलगा असल्याची पोलिसांची माहिती. आरोपी अभिजीत खताते याच्यावर चिपळूण पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल...मात्र अद्याप अटक नाही.
11
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 06, 2025 07:46:49
Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पोलीस कर्मचाऱ्यांने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या गोळीबारात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उमेश सूर्यवंशी असे जखमी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. कृषी बाजार समितीच्या परिसरात निवडणूक यंत्रांच्या निग्राणीसाठी सूर्यवंशी हे नियुक्त होते. कर्तव्ययावर असतांना त्यांनी स्वतःवाई गोळीबार करून घेतला. उमेश सूर्यवंशी यांनी स्वतःवर गोळीबार का केला हे अध्याय स्पष्ट झालेलं नाही पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत. आझाद नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, यां गोळीबाराच्या घाय्यानेमुळे संपूर्ण पोलीस दल हादरून गेले आहे. प्रशांत परदेशी, धुळे.
13
Report
KJKunal Jamdade
Aug 06, 2025 07:46:21
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैजापूर तालुक्यातील शनीदेवगावकडे रवाना... शिर्डीच्या विमानतळावरून हेलीकॉप्टरने रवाना.. राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजनही सोबत.. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनी देवगाव येथे गंगागीरी महाराज सप्ताहाची होणार सांगता..
8
Report
YKYOGESH KHARE
Aug 06, 2025 07:46:10
Nashik, Maharashtra:
नाशिक * नाशिकची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी घेतली जाणार मुंबई पोलिसांची मदत * मुंबई पोलिस देणार ट्रॅफिक बाबत नाशिक पोलिसांना ट्रेनिंग.. * मंत्री छगन भुजबळ लिहिणार मुंबई पोलिसांना पत्र.. * नाशिकमध्ये येऊन नाशिक पोलिसांना ट्रेनिंग देण्याची करणार मागणी.. * शहरात वाहतुकीचा फज्जा.. * अनेक भागात दररोज होतेय तासंतास वाहतूक कोंडी.. * नाशिकची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घेतली जाणार आता मुंबई पोलिसांची मदत
11
Report
YKYOGESH KHARE
Aug 06, 2025 07:34:35
Nashik, Maharashtra:
nsk_stationmaramari व्हिडिओ 1 images 2 Anc: नाशिकच्या अभोण्यातील संताजी चौक परिसरात जुन्या वादातून दोन गटांमध्ये रस्त्यावर व पोलीस ठाण्यात थेट हाणामारी झाली. या प्रकरणात वाहनांची तोडफोड करण्यात आली असून पोलिसांसमोरच दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अभोणा पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत फिर्यादी स्वप्नील उर्फ गणेश मुसळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल दुसाने, हर्षल जाधव, महेश जाधव, गोपाल शेखावत, जयपाल शेखावत, विशाल शिरोरे व नयन आहेर (सर्व रा. अभोणा) यांनी मुसळे यांच्या गाडीला अडवून शिवीगाळ करत हातातील काठ्यांनी व फायटरने मारहाण केली. तसेच त्यांची स्विफ्ट गाडी (क्र. MH15 DM 1017) दगड व काठ्यांनी फोडून नुकसान केल्याचे नमूद आहे. यावेळी जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूने अमोल दुसाने याने दिलेल्या तक्रारीनुसार, स्वप्नील उर्फ गणेश मुसळे यांनी आई-बहिणीवरून शिवीगाळ करत मुलांना गाडीने उडवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील तीन-चार तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमोल दुसाने व हर्षल जाधव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता, त्यांच्या मागोमाग स्वप्नील मुसळे व त्यांची पत्नी तेजस्विनी मुसळे तिथे दाखल झाले. यावेळी पोलीस ठाण्यातच दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले आणि शिवीगाळ व मारहाण सुरू झाली. हा सर्व प्रकार पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, गांगुर्डे व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घडला असून, सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. या प्रकारामुळे "पोलिसांपुढेच जर असा बेधडक मारहाणीचा प्रकार घडतो, तर नागरिकांमध्ये कायदा व पोलिसांचा धाक उरला आहे का?" असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. अभोणा पोलीस ठाण्याने यानंतर अधिक कडक भूमिका घेतली असून, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
12
Report
YKYOGESH KHARE
Aug 06, 2025 07:30:10
Nashik, Maharashtra:
Nsk_Farande feed by live u 51 ANchor- आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक शहरातील पी अन टि कॉलनीतील खड्ड्यांचे पाहणी केलीय. परिसरातील नागरिकांनी सुद्धा यावेळी आ. फरांदे यांच्याकडे समस्यांचे पाढे वाचले. पावसाळ्यांत परिसरात खड्डे पडत असून धूळ होत आहे. यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचे प्रमाण वाढले असल्याच नागरिकांनी सांगितलय. खड्डे बुजविण्याच्या कामाची चौकशी करावी तसेच खड्डे बुजविण्याससाठी वापरण्यात येणाऱ्या गिट्टीची सुद्धा तपासणी महानगर पालिकेने करावी अशी मागणी यावेळी आ. फरांदे यांनी केलीय. Byte आ. देवयानी फरांदे - शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं आणि धुळीचं साम्राज्य पसरलंय - खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी केली जाते - ठेकेदाराकडून गुणवत्तापूर्ण रस्ते तयार करून घेतले पाहिजेत - खड्डे भरतांना क्वालिटी कंट्रोल तपासणं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं काम आहे - दरवर्षी रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो, मात्र तरीदेखील रस्ते खड्ड्यात जातात - चांगले रस्ते तयार करून घेण्याची जबाबदारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे - खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती झाली पाहिजे, रस्त्यांवरील धूळ देखील स्वच्छ केली पाहिजे
14
Report
DPdnyaneshwar patange
Aug 06, 2025 07:17:54
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
*धाराशिव : ब्रेकिंग* DHARA_CRIME विकृतीचा कळस, बसस्थानकात मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पहात अश्लील हावभाव धाराशिवच्या नळदुर्ग येथील बसस्थानकावर मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या मौलवीवर गुन्हा दाखल बसस्थानकात भर गर्दीच्या ठिकाणी महीला व शाळकरी मुलीसमोर पॉर्न लावुन अश्लील हावभाव केल्याचा संतापजनक प्रकार समोर मौलवीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फिर्यादी सुनिल माणिकराव गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मौलवीवर कारवाई कासीम अब्दुल रहीम इनामदार असं आरोपी मौलवीच नावं आरोपी विरोधात भारतीय न्याय संहीता 2023 च्या कलम 294(1), 294(2) व 296 अन्वये गुन्हा करण्यात आला दाखल पोलीस मात्र यावर काहीही बोलायला तयार नाहीत. NOTE व्हिडिओ फोटो ब्लर करून वापरावेत
13
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 06, 2025 07:17:10
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेलेले सोलापुरातील चार तरुण अडकले उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेलेले सोलापुरातील चार तरुण अडकले काल सकाळी 11 वाजता या तरुणांनी कुटुंबियांशी संपर्क करत गंगोत्री येथे असून सुखरूप असल्याचे सांगितले होते मात्र कालपासून चौघाचेही फोन लागत नसल्याची कुटुंबियांची माहिती विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे असे सोलापुरातील चौघे उत्तराखंड गेलेले तरुण सोलापूर जिल्हा प्रशासनाने या चौघाची माहिती मिळवण्यासाठी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय NDRF ने सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार जीवितहानी झालेल्या मध्ये सोलापूरच्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश नसल्याचे सांगितल्याने घाबरण्याचे कारण नाही चौघा तरुणांच्या शोधासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु
14
Report
PNPratap Naik1
Aug 06, 2025 07:17:04
Kolhapur, Maharashtra:
Anc:- कोल्हापूरच्या कागल- निढोरी राज्य मार्गावर व्हनाळी जवळील वाघजाई घाट या ठिकाणी चालत्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. चालत्या ट्रक मधील इंजिन मधून अचानक दूर येऊ लागल्याने चालकाने प्रसंग अवधान राखत ट्रक बाजूला घेतला तोपर्यंत आग केबिनमध्ये पसरत चालली होती. ड्रायव्हरने बाहेर पडत आपला जीव वाचवला मात्र ट्रकच आधीच्या भक्षस्थानी पडल्याने मोठा नुकसान झालं आहे.
14
Report
YKYOGESH KHARE
Aug 06, 2025 07:16:28
Nashik, Maharashtra:
नाशिक - - हृदयविकाराने विद्यार्थिनीचा शाळेत मृत्यू - नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव - शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना आली चक्कर - शिक्षकांच्या हि बाब लक्षात येताच तिला खाजगी रुग्णालयात केले होते दाखल - मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित - या मुलीला हृदयाशी संबंधित आजार असल्याने तिला हृदयविकाराचा झटका आला असल्याची शक्यता
13
Report
JJJAYESH JAGAD
Aug 06, 2025 07:15:18
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील करतवाडी रेल्वे येथिल संतोष पंजाबराव चेचरे या 47 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय..आत्महत्या केलेला इसम शेतकरी असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहेय..मात्र आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही..पोलिसांच्या तपासात कारण पुढे समोर येणार असून पुढील तपास दहीहंडा पोलिस करित आहेय...
13
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 06, 2025 07:04:03
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_DOLBY_VIRODH सातारा = येत्या काही दिवसांवर गणेश उत्सव येऊन ठेपला आहे.या गणेशोत्सवात मिरवणुकांमध्ये डॉल्बी, डीजे आणि लेझर लाईट चा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होऊन ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्या भेडसवु लागल्या आहेत.या मुळे ज्येष्ठ नागरिक, हृदयविकारग्रस्त रुग्ण, लहान मुले, गर्भवती महिला यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे सातारातील ज्येष्ठ नागरिकांनी डॉल्बी, डीजे, लेझर लाईट बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या सह पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. बाईट्स - ज्येष्ठ नागरिक
13
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 06, 2025 07:02:12
Junnar, Maharashtra:
Feed 2C Slug: Junnar Snake Bite File:09 Rep: Hemant Chapude(Junnar) Anc: सर्पदंशाने वाढवली जगाची चिंता.... जगात दरवर्षी होतात 50 लाखांपेक्षा अधिक लोकांना सर्पदंश... जगातील सर्वांधीक सर्पदंश हे भारतात... भारतात दरवर्षी 25 ते 30 लाख लोकांना होतो सर्पदंश...सर्पदंशाच्या मृत्यूचे प्रमाणही भारतात सर्वाधिक.... दरवर्षी 60 हजार नागरिकांना गमवावा लागतो सर्पदंशाने आपला जीव... Vo... गेली काही वर्षांत सर्पदंशाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून जगासह भारताची चिंता वाढली आहे, जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 50 लाखांपेक्षा अधिक लोकांना सर्पदंश होतात मात्र ही आकडेवारी केवळ 10 टक्केच असून सर्पदंश झालेल्या लोकांची अनेकदा नोंद होत नाही त्यामुळे ही आकडेवारी मोठ्या प्रमाणात आहे, तर सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना या भारतात होतात आणि मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक भारतात आहे, भारतातील दमट हवामान असल्याने सापांच्या वास्तव्यासाठी पोषक असल्याने भारतात सापांची संख्या सर्वाधिक आहे, ग्राफिक्स... भारतात 270 प्रकारच्या सापांच्या प्रजाती... त्यापैकी 62 प्रजाती या कमी विषारी निमविषारी म्हणून ओळखल्या जातात.... भारतात 4 सापांच्या प्रजाती या सर्वाधिक विषारी.... नाग मन्यार घोणस फुरसे या सर्वांधिक विषारी सापाच्या प्रजाती.... या चार सापांच्या विषारी प्रजातीला बिग फोर्स म्हणून ओळखलं जातं नाग आणि मन्यार हे अति विषारी साप असून त्यांचा दंश झाल्या नंतर थेट मज्जा संस्थेवर दुष्परीणाम होतो, तर घोणस आणि फुरसे सापांच्या दंशामुळे रक्ताभिसरण वरती दुष्परिणाम होऊन रक्त गोठलं जाऊन मनुष्याचा प्राण्यांचा यात मृत्यू होतो... Byte: डॉ सदानंद राऊत ( सर्पदंश तज्ञ समिती जागतिक आरोग्य संघटना) Vo... भारतात मागील काही वर्षात बागायती क्षेत्रात प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढला असून गाव खेड्यातील शेत शिवारात पाणी पोहोचल्याने सर्वत्र बागायतीचे क्षेत्र वाढल्याने या परिसरात सर्वत्र शेती पिकांमध्ये हिरवळ असल्याने सापांच लपण्याचं वास्तव्य करण्याचे मुख्य ठिकाणे शेत शिवार झाल्याने सर्वाधिक सर्पंदंश शेतकऱ्यांना होतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्ते हे दुरावस्थेत असल्याने सर्पदंश झाल्यानंतर शेतकऱ्यांना रुग्णालयात जाण्यासाठी उशीर होत असल्याने अनेकदा रुग्णालयात पोहोचण्या आधीच शेतकऱ्याचा मृत्यू होतो तर मण्यार हा साप अतिविषारी असून तो झोपेत सर्पदंश करतो आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकरी हे सपाटीला भुईवरती झोपत त्यामुळे झोपेतच अनेकदा सर्पदंश होऊन शेतकऱ्यांचे मृत्यू हे मोठ्या प्रमाणात होतात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे कमी करण्यासाठी गाव खेड्यातील रुग्णालयांमध्ये सर्पदंशानंतर वेळेवरती आणि तातडीने उपचार करण्यासाठी आरोग्य व्यवस्था बळकट करणे गरजेचे आहे. सर्पदंश झाल्यानंतर अंधश्रद्धेला बळी न पडता तातडीने रुग्णालयात उपचार घेणे तितकच गरजेचं आहे Byte: दादाभाऊ पानमंद (शेतकरी) Byte: अशोक गाडीलकर Vo...साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे साप शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील उंदीर घूस यांना भक्ष म्हणून वापर करत असल्यामुळे शेतकय्रांच्या शेताचे हि चांगल्या प्रकारे संरक्षण होते ,त्यामुळे शेतकय्रांनी शेतात काम करताना विशेष काळजी घेऊन काम करावे, जरी सर्पदंश झाला तरी तातडीने रुग्णालयात उपचार घ्यावे त्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारली जावी आणि शेतकऱ्यांचा ही जीव वाचला जावा आणि सापांचे हि संरक्षण व्हावे असे सर्पमित्र सांगतात.. Byte: शेरखान शेख (संर्पमित्र) End Vo... साप शेतकऱ्याचा मित्र असून सापांचे संरक्षण होणे तितकेच गरजेचं आहे त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर नागरिकांनी तातडीने रुग्णालयात उपचार घेणे गरजेचे आहे त्यासाठी ग्रामीण भागातील गाव खेड्यातील सर्व ठिकाणी सर्प वरील लस उपलब्ध केली जावी आणि आरोग्यवस्था बळकट करावी हेच या निमित्ताने सांगावे लागेल प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
14
Report
Advertisement
Back to top