Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

गडब वाड़ी में बॉक्साइड उत्खनन के विरोध में ग्रामस्थ उग्र, पुलिस-आंदोलन तनाव

PPPRAFULLA PAWAR
Dec 08, 2025 11:46:36
Chendhare, Alibag, Maharashtra
गाव वाचवण्यासाठी बॉक्साईड उत्खनन बंद करण्याची मागणी. पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष काही काळ तणावाचे वातावरण. शिवसेना शिंदे गटाचा गडब वाडी ग्रामस्थांना पाठींबा. आज श्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी ग्रामस्थ बॉक्साईड उत्खननाविरोधात आक्रमक झाले. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिस आणि आंदोलक ग्रामस्थांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले. गावालगत बॉक्साईडचे बेसुमार उत्खनन सुरु आहे. यामुळे गावातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत, धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच बरोबर सुरूंगाच्या हादऱ्याने घरांना देखील धोका निर्माण झाला आहे. अशा अनेक समस्या मांडत आज गडब वाडी ग्रामस्थांनी उत्खननाच्या ठिकाणी आंदोलन केले. येथील बॉक्साईड उत्खনन अनधिकृत असल्याचं सांगत उत्खनन तातडीने बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. ग्रामस्थांच्या या आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा दिला होता.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 08, 2025 12:51:28
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरातील स्मशानभूमीतील धुराने नागरिक हैराण. धूर शुध्दीकरण आणि वाहून नेणारी यंत्रणाच नाही. उल्हासनगर şehirातील स्मशानभूमी नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरू लागल्या आहेत. यातील बहुतेष स्मशानभूमिंना चिमण्या नसल्याने मृतदेहाचे दहन करताना निघणारा धूर परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या धूराने प्रदूषण होत आहे. स्मशानातील धूर हा हवेबरोबर इतरत्र पसरून आसपासच्या इमारतीत राहणार्‍या नागरिकांच्या घरात जातोय. येणार्‍या धुरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या धुराचे लोट इमारतीत सातत्याने येत असल्याने अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतेक स्मशानभूमीत चिमण्या बसवेलल्या नाहीत. त्यामुळे धुराची समस्या अधिक तीव्र झाली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या एकूण ४ स्मशानभूमी आहेत. त्यात पारंपरिक पद्धतीने मृतदेहांचे दहन केले जाते. पारंपरिक पद्धतीने स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याने पर्यावरणाचा ر्हास होतो. शिवाय प्रदूषण होत असते. एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी साधारण साडेचारशे ते पाचशे किलो लाकडे लागतात.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 08, 2025 12:04:38
Nagpur, Maharashtra:नागपूर पारडी परिसरातील नाका नंबर पाच जवळील पॉवर हाउसच्या शेजारी बिबट असल्याची जोरदार चर्चा... वन विभागाचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.. सकाळपासून सोशल माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि अनेकांनी बिबट बघितल्याचा दावा केलाय.. काही दिवसापूर्वी या परिसर लगतच भांडेवाडी कचरा डेपोजवळच्या परिसरात एका घरात बिबट घुसला होता त्यानंतर त्याला रेस्क्यू करण्यात आले होते... त्यानंतर आज पारडी परिसरात बीबट घुसल्याची वार्ता आल्यानंतर एकच खळबळ उडाली... नाका क्रमांक पाच लगतच्या परिसरात बीबट असल्याच्या चर्चा समोर आल्यानंतर वन विभागाने हा संपूर्ण परिसर पिंजून काढायला आहे... मात्र अजून पर्यंत त्यांना बिबट आढळून आलेला नाही... दरम्यान वन विभागाची शोध मोहीम मात्र सुरूच आहे... दुसरीकडे परिसरातील नागरिक मात्र दहशतीत आहेत... तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
85
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 08, 2025 11:51:26
115
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 08, 2025 11:41:14
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कीनखेड येथील 40 वर्षीय बाळू पुंडलीक पवार यांचा धरणात बुडून मृत्यू झाला. धरणाच्या काठावर त्यांची चप्पल, मोबाईल आणि चष्मा आढळून आल्याने बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. स्थानिकांनी रात्री शोधमोहीम राबवली,मात्र मुतदेह सापडला नाही.यानंतर पिंजर येथील संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले.पथकाने सकाळी शोधमोहीम सुरू करून धरणाच्या 25 फूट खोल पाण्यातून एका तासात पवार यांचा मृतदेह बाहेर काढला.घटनास्थळी पोलिस अधिकारी, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पवार यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
188
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 08, 2025 11:39:21
132
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 08, 2025 11:05:14
Nagpur, Maharashtra:नागपूर - कृष्णा खोपडे, आमदार, भाजपा (बाईट +121) (तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजप आमदार आक्रमक.... तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी... लक्षवेधी ही लावली.... भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांचा 121 ) - तुकाराम मुंढे कोविडच्या काळात नागपूर महानगरपालिकेत रुजू झाले, त्यामध्ये त्यांच्या सात महिन्याच्या कार्यकाळात गौरप्रकार केले - एखाद्या साइटवर ते गेले तर मीडियाला माहीत होता मात्र संबंधित अधिकारी घरी झोपून राहत होता - तुकाराम मुंढे यांना स्मार्ट सिटीचे अधिकार दिले नव्हते - त्यांनी बिल्डर आणि विस कोटी रुपयांच्या चेकवर स्वतः सही केली आणि बिल्डरच्या घशात टाकले त्यावेळी महापौर असलेले संदीप जोशी आणि भाजप गट नेते संदीप जाधव यांनी बँकेच्या पुराव्या सहित सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता आणि एफ आय आर दाखल झाला - स्मार्ट सिटीत महिला अधिकारी होते त्यांनी सही करण्यास मनाई केली, त्यावेळी मुंडे यांच्या त्यांनी त्या महिला अधिकाऱ्यांना टॉर्चर केलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं की एखाद्या आईएएस अधिकाऱ्याविरुद्ध दोन महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती - परंतु त्यावेळी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि देशमुख गृहमंत्री होते त्यामुळे त्यांच्या दबावाखाली काही होऊ शकले नाही - माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती मागितली - त्यांना अधिकार नसतानाही पाच वर्षे त्या पदावर दाखवण्यात आलं, परंतु तसं असतानाही ते आदेश रद्द करण्याचे मागणी आम्ही केली - आम्ही या विरोधात लक्षवेधी दाखल केलेली आहे मुंडे यांनी करोना काळात कोविडच्या काळात नागपूरचा कसा सत्यानाश केला - आता आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून तुकाराम मुंढे यांना ताबडतोब डिसमिस करावा आणि त्यांची चौकशी मुख्य सचिवाच्या माध्यमातून व्हावी अशी मागणी केली आहे
135
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 08, 2025 10:52:49
97
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 08, 2025 10:10:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sanghli पत्तील के सांगली के वसंतदादा पाटील शासकीय अस्पतालातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू झाले आहे. निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नोकरी मिळावी तसेच त्यांच्या इतर प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार वारसा हक्क भरती निर्णय असूनदेखील रुग्णालयाच्या प्रशासनाकडून तो डावलण्यात येत असल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू झाले असून प्रसंगी आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, अशा इशाराही महेंद्र चंडाळे यांनी दिला.
158
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 08, 2025 10:02:13
Yavatmal, Maharashtra:२०१७ मध्ये राज्य सरकारने 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने' अंतर्गत शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेतले जात आहे. मी आयकरदाता नाही, तपासणीत आढळल्यास कर्जमाफी मिळालेली रक्कम परत केली जाईल, असे या हमीपत्राचे स्वरूप आहे. कर्जमाफी न मिळाल्याने ५० शेतकरी सरकारविरोधात उच्च न्यायालयात गेले होते. या प्रकरणात २ मे २०२४ रोजी निकाल लागला. त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनासह सहकार विभागाला दिल्या होत्या. अर्ज छाननीत यवतमाळ जिल्ह्यातील आठ शेतकरी पात्र ठरले. यात उमाकांत दरणे व त्यांच्या कुटुंबातील सहा शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीच्या याच योजनेत हजारो शेतकरी अद्यापही वंचित असल्याने त्यांच्या कर्जाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतकरी हा कर्जातच जगत आहे आणि कर्जातच मरत आहे अशी तीव्र प्रतिक्रिया शेतकरी उमाकांत धरणे यांनी दिली.
174
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 08, 2025 10:01:37
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती सोबत लढणार - 30 जागांची केली मागणी. सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने रणशिंग फुंकले आहे. महापालिका निवडणुक्यात महायुतीत सोबत लढण्याची भूमिका जाहीर करत राष्ट्रवादी अजित पवार गटाने 30 जागांची मागणी केली आहे. सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जागांची मागणी करण्यात आली असून इच्छुक उमेदवारी मागणी अर्ज आज पासून देण्यात येणार असल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळेंनी स्पष्ट केला आहे. तसेच तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून उमेदवाराची चाचपणी करून उमेदवारी देण्याची भूमिका घेण्यात येईल,त्याच बरोबर निवडणुकीत जागांच्या बाबतीतला अंतिम निर्णय अजित पवार घेतली, असे स्पष्ट करत देखील महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा,विश्वास देखील व्यक्त झाला आहे.
190
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 08, 2025 09:47:37
149
comment0
Report
Advertisement
Back to top