Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

मनोज जरांगेच्या आंदोलनासाठी जालना गावात जोरदार तयारी, शेतकऱ्यांचा उत्साह!

NMNITESH MAHAJAN
Aug 13, 2025 09:36:10
Jalna, Maharashtra
FEED NAME : 1308ZT_JALNA_PREPARE(20 FILES) जालना : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाची गाव-खेड्यात जोरदार तयारी सुरू,ठिकठिकाणी बैठका, शेतीकामांना मराठा समाजाकडून वेग अँकर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे 29 ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलन सुरु करणार आहे.मुंबईतील आंदोलनासाठी 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मराठा आंदोलक रवाना होणार आहेत.मुंबईतील मोर्चात सहभागी होता यावं यासाठी गावा-गावात मराठा आंदोलक बैठका घेत आहेत.या बैठकीच्या माध्यमातून 'एक घर,एक गाडी' या प्रमाणे मराठा समाजबांधवांनी मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन मराठा समन्वयकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन होणार असल्यानं जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांनी त्यांच्या शेतीकामांना वेग दिला असून शेती कामं उरकण्याचा सपाटा लावलाय.त्यामुळे जरांगे यांच्या मोर्चात मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे बाईट : सुरेश तळेकर,मराठा आंदोलक(टक्कल असलेले,चष्मा लावलेले) बाईट : विकास जाधव,मराठा आंदोलक(दाढी असलेले,काळया रंगाचा शर्ट असलेले ,गळ्यात रुमाल आहे) बाईट : आप्पासाहेब जाधव,मराठा आंदोलक(हिरवा शर्ट) आणि ईतर 2 तरुण शेतकऱ्यांचे बाईट आहेत
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Aug 13, 2025 17:16:18
Nagpur, Maharashtra:
Ngp Ramtek city Ngp Ramtek Mandir live u ने फीड मुंबई आणि दिल्लीला पाठवले आहे --------
14
comment0
Report
UPUmesh Parab
Aug 13, 2025 17:16:09
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग- दिपक केसरकर बाईट मुद्दे- ऑन भास्कर जाधव ब्राह्मण वाद- कोकणाचा इतिहास सामाजिक ऐक्याचा इतिहास आहे त्यांनी पूर्णविचार करावा. ऑन उबाठा आंदोलन- ते अडीज वर्ष सत्तेत होते. On स्थानिक स्वराज्य निवडणुका ( नवाब मलिक प्रमुख -- त्यांनी काय कराव हा त्यांचा प्रश्न त्यावर मी बोलण योग्य नाही on वडेट्टीवर -- लाडकी बहीण योजना बंद पडणार असं म्हणतं होते ती योजना सूरु आहे ना. आनंदाचा शिधा कधी द्यावा तो निर्णय शासन घेत. On विनायक राऊत --- विनाकारण चिडवण्यासाठी असे वक्तव्य केले जाते. On उद्धव ठाकरे --- न्याय व्यवस्थेचा मान सर्वांनी ठेवला पाहिजे. त्यांची सत्ता गेली म्हणून ते असं बोलत आहेत लोकशाईला ते मानतात कि मानत नाही. ते निवडणुकीच्या काळत झोपून राहिले. त्यावेळी ते भ्रमात होते. On बावनकुळे दौरा -- 15 औगस्ट रोजी गेळे येथील लोकांचे सात बारा वाटले जातील. ज्या ठिकाणी चुकीने वनसंज्ञा लागली आहे तिकडे बदल केले जातील. On एकनाथ शिंदे मुख्यमंत्री --- प्रत्येकाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा तो निर्णय वरिष्ठ घेतात. On चिकन मटण बंद ( अजित पवार )- हा निर्णय काही महापालिकांनी घेतलेला निर्णय आहे जन्माष्ठमी त्याच दिवशी आलीय त्यामुळे आनंद व्यक्त केला पाहिजे on ढोल बजाओ आंदोलन- कारवाई पावसामुळे थांबली आहे. ऑन पालकमंत्री इश्यू- पालकमंत्री कोण असावा याचा अधिकार मुख्यमंत्र्यकडे आहे. पहिल नाशीकचे पालकमंत्री पद आमच्या कडे होत. कुंभमेळ्याची जबाबदारी महाजन यांना दिली आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात त्यांचा निर्णय सर्वांनी मानला पाहिजे. आम्ही सुद्धा निर्णय मानले आहेत महाराष्ट्राच्या परंपरेचा मान सर्वांनी ठेवावा. On जरांगे- जरांगेनी संयम राखण आवश्यक आहे. फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं होत त्याचा मराठा समाजाला लाभ मिळावा असं आम्हाला देखील वाटत. feed on desk
14
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 13, 2025 16:31:01
Parbhani, Maharashtra:
परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्यावरील मानकेश्वर शिवारातील मारुती काकडे यांच्या शेतकर्याच्या शेतातील विहिरीत मायलेकरांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आलाय. या हृदयद्रावक घटनेमुळे एकच खळबळ माजली असून मृत्यूचे कारण आत्महत्या आहे की इतर काही अशी चर्चा दबक्या आवाजात घटनास्थळी रंगली होती, पोलीस तपासात ही माहिती पुढे येणारच आहे. जिंतूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. मृत आईचे शारदा भारत पवार तर मुलाचे आदर्श भारत पवार असे नाव आहे. मृत मायलेक हे जिंतूर तालुक्यातील बामणी येथील रहिवाशी असून शारदा यांचे लग्न सिंदखेड तालुक्यातील जांबुरी येथे झाले असल्याची माहिती आहे. घटनेमागचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेधनासाठी मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला असून जिंतूर पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत...
14
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 13, 2025 16:00:38
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग... लातूर :परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लातूर जिल्हा दौऱ्यावर उद्या मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधवांची होणार आहे बैठक मनोज जरांगे पाटील यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घेणार उद्या लातूरमध्ये भेट 29 तारखेला मुंबई मध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील उद्या लातूरमध्ये परिवहन मंत्री उद्या मनोज जरांगे पाटील यांची लातूरमध्ये भेट घेणार असल्याने भेटीमध्ये काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष
14
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 13, 2025 15:45:45
Kalyan, Maharashtra:
कल्याण मधील घटना.. कल्याण पश्चिम येथील लोक उद्यान संकुलातील कल्पतरू इमारतीमधील घटना केडीएमसी अग्निशमन दलाने वाचवले इमारतीच्या चौथ्या माळ्यावर अडकलेल्या तरुणाचे प्राण तरुण मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती तरुणाचे नाव शुभम सोनकांबे हा तरुण उसमानाबाद चा राहणारा असून हा इसम या इमारती मध्ये कसा आला याचा तपास महात्मा फुले पोलीस करत आहे.
14
comment0
Report
UPUmesh Parab
Aug 13, 2025 15:16:29
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग ---- चंद्रशेखर बावनकुळे byte On अजित पवार ( शिंदेवर बाजी मारली ) -- अजित पवार यांनी आपली लाईन ( मर्यादा ) कधी सोडली नाही. जेवढं ठरलंय तेवढं काम ते करतात. शिंदे सुद्धा आपली लाईन सोडत नाहीत भाजपा मोठा पक्ष असल्यामुळे दोघांना सांभाळून घ्यावं लागत. बहुमताचा अनादर आम्ही करणार नाही. आम्ही वेगळे नाही. On वडेट्टीवार --- वडेट्टीवारला पुढील 15 वर्ष काही सत्ता दिसत नाही. त्यामुळे ते असे बोलत राहतात. On ठाकरे बंधू संभाव्य निवडणूका --- त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. देशाची संस्कृती आहे कि परिवाराने एकत्र यावे. प्रत्येक बाबींनी एकत्र येतात कि निवडणुका पुरतं एकत्र येणार.. निवडणुकात काही फरक पडणार नाही. मुंबई निवडणुकीत आतापर्यंत कधी मिळालं नाही एवढं बहुमत महायुतीला मिळेल. मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देतो. जातं पात / हिंदी मराठी भाषा असे कितीही वाद लावले तरी लोक मत देताना विकासाचा विचार करतील. मुंबई मध्ये प्रचंड बहुमताने महायुती विजयी होईल. on राहुल गांधी मत चोरी --- माझं काँग्रेसला खुलं आव्हान आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकापूर्वी मतदार यादी तपासून घ्या. हा सगळा खोटारडेपणा आहे. निवडणुका हरण्यापूर्वीच मतदार यादी बदलली असं सांगितलं जातं. विधानसभे सारखी आतां निवडणूक येतेय. मतदार यादी चेक करुन घ्या आम्ही 51 टक्के मते घेऊन निवडून येणार.. On राहुल गांधी जीवाला धोका --- राहुल गांधी खोटारडे आहेत. फेक नरेंटिव्ह पसरवत आहेत. खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांची परिस्थिती आहे. राहुल गांधीला याशिवाय दुसरं नरेटिव्ह नाही. विकासाच कुठचही व्हिजन नाही. त्यांना आपली पार्टी वाचवायची आहे. Byte --- बावनकुळे feed on desk
14
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 13, 2025 15:16:22
Pandharpur, Maharashtra:
13082025 Slug - PPR_SWABHIMANI_RADA file 04 ---- Anchor - माळशिरस पंचायत समिती मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राडा , विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या बद्दल अनेक तक्रारींचा वाचला पाढा माळशिरस तालुक्यातील काही ग्रामसेवक ग्रामस्थांना नीट वागणूक देत नाहीत. ग्रामस्थांची कामे करण्यास टाळाटाळ करतात. घरच्या नोंदी बद्दल दिरंगाई आहे. याबद्दल वारंवार तक्रारी करूनही काही सुधारणा होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज माळशिरस पंचायत समिती मध्ये जाऊन विस्तार अधिकाऱ्याच्या कक्षात जोरदार राडा केला
14
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 13, 2025 15:15:38
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1308ZT_BARAMATISULE BYTE 1 खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती मध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीला हजेरी लावली यावेळी त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे आज काल इतिहास बदलला जातोय हा भारत गोडसे यांच्या विचारांचा नाही महात्मा गांधींच्या विचाराचा हा इतिहास देशाच्या हितासाठी हानिकारक आज महाराष्ट्र ची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे अहिल्याबाई होळकर यांनी आर्थिक नियोजन चांगले केलं होतं अशी पहिलीच योजना असेल जी लाडकी बहिणी सोबत पुरुषांना देखील पैसे मिळाले 4800 कोटींचा गफळा या सरकारने या योजनेत केला दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय असं मकरंद पाटीलच म्हणालेत शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही लाडक्या बहिणीला पैसे नाही मग रस्त्याला 84 हजार कुठून येतात कशासाठी पैसे लागतात हा भ्रष्टाचार नाही तर काय आहे मी जर संसदेत जाऊन पत्ते खेळलं तर चालेल का इथले कृषी मंत्री इतके चांगले पत्ते खेळतात की त्यांना स्पोर्ट्स मिनिस्टर केलं इथं तीन तासाला एक शेतकरी मरतोय आणि हे विधिमंडळात जाऊन पत्ते खेळतात लाज वाटली पाहिजे यांनी राजीनामा दिला पाहिजे आता महाराष्ट्राचा कौतुक दिल्लीत होत नाही आता महाराष्ट्राची चेष्टा दिल्लीत होते याला फक्त हे सरकार जबाबदार आहे एका घरात इतकी मतं दाखवली गेलेली आहेत मृत लोकांचे मतदान झाल आहे हे वास्तव आहे या राज्याचं आमदारांनी वेटरला मारण्यापेक्षा त्याच्या मालकाला मारायला पाहिजे होतं वेटर ला काय मारायचं. आमदारांने वेटरला मारले लाडक्या बहिणीचे पैसे कसे कमी केली. उमा भारती च् महात्मा गांधी यांच्या विषयी बोलल्या त्याचा मी जाहीर निषेध करते
14
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 13, 2025 14:52:57
Pandharpur, Maharashtra:
13082025 Slug - PPR_SAMITI_BYTE file 01 --- Anchor - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बैठकीत विधी आणि न्याय विभागाकडे प्रस्ताव, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना पदमुक्त करावे. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन रांग आणि मंडप ठेकेदार कडून सदर ठेका देण्यासाठी पुरुषोत्तम सग्गम याच्या कडून मनोज श्रोत्री यांनी काही रक्कम घेतल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर समितीने याची चौकशी सुरू केली असता. मंडप ठेकेदार सग्गम याने लेखी अथवा तोंडी म्हणणे मांडले नाही. यामुळे समितीची मंदिराची बदनामी झाली आहे. त्यामुळे सध्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना पदमुक्त करून नवीन व्यवस्थापक द्यावा असा प्रस्ताव समितीने विधी व न्याय विभागाकडे पाठवला आहे. ही मोठी कारवाई समितीने केली आहे. तसेच समितीच्या गोशाळा मधील गोवंश मृत्यू बद्दल यापूर्वीच दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. आज गोशाळा वैद्यकीय अधिकारी प्रशांत सर्वगोड यांच्या कडे पशु वैद्यकीय पदवी नसल्याने त्यांच्यावर बड तर्फीची कारवाई करण्यात आली. --- Byte - गहिनीनाथ महाराज औसेकर
14
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 13, 2025 14:52:44
Raigad, Maharashtra:
स्लग - भरत गोगावले यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर ...... मंत्रिपद सोडलं तिथं पालकमंत्री पद काय चीज आहे ? ....... स्वतः मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मुलाला मंत्री केले ....... गोगावले यांनी सुनावले खडे बोल ....... अँकर - अडीच वर्षासाठीचे मंत्रीपद सोडणारा मी मावळा आहे जिथे मंत्रीपद सोडले तिथे पालकमंत्री पद काय चीज आहे असे प्रत्युत्तर मंत्री भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांना दिले सेनेचे मंत्री स्वतःला पालकमंत्रीपद मिळावे या स्वार्थापोटी भांडत असल्याची टिका आदित्य ठाकरे यांनी केली होती या टिकेला गोगावलेंनी उत्तर दिलंय . उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वतःच्या मुलाला मंत्री केले एकनाथ शिंदेनी तसे केले नाही असे खडे बोल देखील सुनावले. बाईट - भरत गोगावले
14
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 13, 2025 14:46:13
Kalyan, Maharashtra:
अभिनव गोयल बाईट कल्याण डोंबिवली पालघर पालिका आयुक्तांची महत्त्वाची पत्रकार चिकन मटन बंदीविरोधात महानगरपालिका आपल्या निर्णयावर ठाम.... राज्य सरकारने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे दिले अधिकार.... आमचा निर्णय नव्याने नाही तर जुनाच... केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल डोंबिवली महानगरपालिकेकडून पालिकेकडून परिपत्रक काढण्यात आले 15 ऑगस्ट ला अधिकृत लायसन्स होल्डर मास विक्री करणाऱ्या वर बंदी करण्याचे आदेश करण्यात आले होते राज्य शासनाच्या माध्यमातून पालिका अधिनियम यांच्या अंतर्गत अशा प्रकारचे निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेला योग्य वाटत असेल तर घेता येऊ शकतो त्याचप्रमाणे 1988 मधील जो ठराव पास केला होता तेव्हापासून या प्रकारची बंदी आपण घालत आलो आहोत नव्याने कुठलाच निर्णय घेतला नाही ... वर्षानुवर्ष हा निर्णय सुरू आहे .. त्याप्रमाणेच या वर्षी देखील हा निर्णय घेण्यात आला आहे ही बंदी फक्त कत्तलखाने आणि अधिकृत विक्रेता आहेत त्यांच्या करीत आहे ... खाण्यासाठी कुठलीही बंदी नाही स्थानिक पातळीवर जो निर्णय घेता येतो त्याचप्रमाणे हा निर्णय आपण घेत आलेलो आहोत आपल्याकडे स्थानिक पातळीवर काही निवेदन आले तर त्याच्यावर विचार करून निर्णय घेता येऊ शकेल राज्य शासनाचे नियम आहेत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा आणि तसेच स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे निवेदन पत्र आलेले आहेत त्याच्यावरती विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल... पालिका आयुक्त संभ्रमात नियम तोडणार परवाना विभाग आहे त्याप्रमाणे त्यांच्या नियमाने ते कारवाई करणार... मालमत्ता जप्त करायचा असेल तर त्याचीही एक पद्धत असते .. कायदा सुव्यवस्था च प्रश्न 15 तारखेला निर्माण झाला तर त्याविषयी पोलिसांबरोबर चर्चा करून योग्य ते निर्णय घेऊ हे आदेश काही महापालिकेकडूनह काढण्यात आले आहेत नागपूर मालेगाव सह इतर महापालिकेने हे आदेश काढले आहेत आमच्याकडे 2010 पासून सगळे ऑर्डर आहेत... निवेदन प्राप्त झालेल्या त्याच्यावर चर्चा करून जर का विपरीत निर्णय होता सध्या त्या माध्यमातून पण आपल्याला कळवा
14
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 13, 2025 14:46:05
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI SLUG 1308ZT_INDAPURRESS FILE 1 शर्यतीत धावणाऱ्या बैलाचा अपघाती मृत्यू... इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी रोडवरील व्यहाळी फाटा येथील घटना.... व्हिडिओ झाला सोशल मीडियात व्हायरल Anchor_इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी रोडवरील व्यहाळी फाटा या ठिकाणी पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत धावणाऱ्या एका बैलाचा अपघाती मृत्यू झालाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. श्री. सद्गुरु संत बाळूमामा भंडारा उत्सवानिमित्त केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती.कांतिलाल आंबा शेंडगे आणि पोपट भाऊ मदने यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते. दरम्यान या बैलगाडा शर्यतीला शासनाची परवानगी होती की नाही याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.मात्र यावर आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार ? हे देखील पहावे लागणार आहे
14
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 13, 2025 13:47:48
Raigad, Maharashtra:
स्लग - तर सुनील तटकरे यांचा जय महाराष्ट्र झाला असता ..... मंत्री भरत गोगावले यांचा हल्लाबोल ....... आता सुनील तटकरे यांची उलटी गीनती सुरू ........ अँकर - आमच्या मेहनतीमुळेचं सुनील तटकरे हे एकमेव राष्ट्रवादीचे खासदार झाले ते विसरले असतील. परंतु आता त्यांची उलटी गीनती सुरू झाली आहे. अशा शब्दात राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. माणगाव इथं आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना भाजपच्या 4 आमदारांनी जर मदत केली नसती, आम्ही थोडी जरी मान वाकडी केली असती तरी त्यांचा जय महाराष्ट्र झाला असता असंही भरत गोगावले म्हणाले. बाईट - भरत गोगावले, मंत्री
14
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 13, 2025 13:31:07
Raigad, Maharashtra:
स्लग - कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचा सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल ....... तटकरे यांच्यासाठी पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिदा ..... सुनील तटकरेंनी रायगडला लुबाडले, ओरबाडले ....... सरकारी जमिनी लाटल्याचा गंभीर आरोप ...... अँकर - माणगाव इथं आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. सुनील तटकरे यांच्यासाठी पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिदा आहे. सुनील तटकरे यांनी रायगडला लुटले, ओरबाडून खाल्लं. सरकारी जमिनी सुद्धा लुटल्या असा आरोप थोरवे यांनी केला. तुमच्या सुद्धा जमिनीचा सातबारा एकदा चेक करून बघा नाहीतर तो देखील ट्रान्फर झालेला असेल असा सल्ला त्यांनी उपस्थिताना दिला. आमच्यासाठी पालकमंत्री पद म्हणजे सेवा असून सेवा करण्यासाठीच आम्हाला पालकमंत्री पद हवं असल्याचं थोरवे म्हणाले. बाईट - महेंद्र थोरवे, आमदार
14
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 13, 2025 13:30:51
Nashik, Maharashtra:
nsk_varunpc feed by live u 51 *नाशिक - वरुण सरदेसाई - आमदार, ठाकरेंची शिवसेना* *ऑन नाशिक बैठक* - युवासेनेचे राज्यव्यापी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहोत - आज उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतो आहे - संघटनेचे काम कसे सुरू आहे? काही अडचणी ? आगामी निवडणुकांमध्ये काय भूमिका बजवायची याबाबत चर्चा सुरू - काही नियुक्त्या आम्हाला करायच्या आहेत - विधानसभेचे निकाल फक्त महाविकास आघाडीसाठी नाहीतर महायुतीला धक्कादायक होते - संशयास्पद मुद्दा आहेत, राहुल गांधींनी भांडाफोड केला - दुसऱ्या बाजूला मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर जनतेचा रोष - विरोधी पक्षाकडे जनता आशेने पाहत आहे - आमच्या पक्षाचे नगरसेवक निवडून येतील, महापौर आम्हीच ठरवू *ऑन कबुतर खाना* - हा प्रश्न कुणी विचारलं - लोढा यांनीच प्रश्न उपस्थित केले - जैन लोकं भाजपला मतदान करतात - त्यांनीच स्वतः प्रश्न निर्माण केला - हा एक नरेटिव्हचा पार्ट आहे - काही लोकं शस्त्र घेऊन ताडपत्री फाडली - तेव्हाच मुस्लिम लोकांनी काही शस्त्र घेतले असते तर ? - मुस्लिमांवर मग बोलणार नाही पण जैन लोकांवर बोलणार *ऑन बीडीडी चाळ* - आदित्य ठाकरे यांनी हा विषय घेतला आहे - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना ही सुरुवात - कामाचे क्रेडिट आदित्य ठाकरे यांना - सुनील शिंदे, सचिन अहिर यांना क्रेडिट जातं - प्रोटोकॉल म्हणून ते उद्घाटन करू शकतात पण लोकांना माहिती आहे *ऑन बनावट वोटर आयडी* - चांगला मुद्दा उपस्थित केला - धक्कादायक निकाल लागले आहेत - मी स्वतः संशोधन करतोय - मतदान यादीची छाननी करतोय - विरोधी पक्षाने छाननी केली पाहिजे - त्या पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो *ऑन नवीन कार्यकारिणी* - पदाधिकारी उत्तम काम करत आहे - मी स्वतः निवडणुकीला सामोरे गेलो - निवडणुकीला वेळ होता म्हणून थांबलो होतो - नवीन सहकाऱ्यांना संधी दिली पाहिजे - आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करू *ऑन पक्ष गळती* - शिवसेना एका नेत्यावर, आमदार गेला तर फरक पडत नाही - बाळासाहेब ठाकरे यांनी संस्थान निर्माण केलं - पास झाले तर दुसरे लोकं बघा - मी आज नाशिकला नवीन चेहरे बघितल - त्यांच्याशी चर्चा करणार - मतदारांना आमच्या पक्षाबद्दल आस्था आहे तोपर्यंत काही फरक पडत नाही *ऑन ठाकरे युती* - दोन्ही 20 वर्षांनी एकत्र आले - वाढदिवसाला राज साहेब मातोश्रीवर आले - दोन पक्षाचं प्रमुख जागावाटप वर बोलतील - दोन्ही क्षण आमच्यासाठी आनंदाचे क्षण *ऑन युवा ब्रिगेडला संधी* - निवडणुकीला मेरिट बघितले जातील - प्रभागात काम करत असतील तर स्थानिक नेते संधी देतील - तो विषय आमचा नाही - मुंबईला सुद्धा संधी मिळाली आहे *ऑन मुंडे घर* - मला माहिती नाही - प्रत्येक विषयावर भाष्य करावे वाटत नाही *ऑन स्वबळ काँग्रेस वडेट्टीवार* - असे अजिबात नाही - इंडिया आघाडीच्या बैठकीला सगळे एकत्र होते - महाविकास आघाडीच्या बैठकीला होते - त्यांच्या विधानावर मी बोलणार नाही *ऑन कत्तलखाना बंद* - यावर आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे - भाजपची विचार सरणी देशाची होऊ शकत नाही - कुणी काय करावं याचे स्वतंत्र हवे - सगळं काँग्रेसनेच केलं म्हणतात - काही झालं की काँग्रेसनेच केलं म्हणतात
14
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top