Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

गणेशपुरमध्ये एसटी बस सेवा सुरू, ग्रामस्थांचा आनंद उत्सव!

SKSudarshan Khillare
Aug 19, 2025 01:16:07
Yeola, Maharashtra
अँकर:-येवला तालुक्यातील येवला तालुक्यातील 600 लोकसंख्या असलेले गणेशपुर हे गाव असून या गावांमध्ये अनेक दिवसांपासून एसटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी होती याकरता येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्यामार्फत निवेदन देऊन पाठपुरावा केला दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार महामंडळाच्या वतीने या गावासाठी बस सेवा सुरू करून देण्यात आली. याप्रसंगी पेढे वाटून विद्यार्थ्यांनी आनंद उत्सव साजरा केला व मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले
12
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Aug 19, 2025 02:45:29
Parbhani, Maharashtra:
drone shots.... अँकर - मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण अशी ओळख असलेल्या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पामधून आता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. येलदरी धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात येत असल्याने येलदरी धरणाने पाण्याचा विसर्ग वाढवून 10 गेट मधून आता 63 हजार 600 क्यूसेक्सने पूर्णा नदी पात्रात विसर्ग सुरू केलाय. यामुळे जिंतूर एलदरी सेनगाव राज्य महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी 24 तासापासून बंद पडलाय. ड्रोन मधून येलदरी धरणाचा विसर्गाचे खास दृश्य झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी....
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 19, 2025 02:32:45
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1908ZT_NANDED_HASNAL(2 FILES) नांदेड : हसनाळ येथून वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरु, अँकर: नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ या ठिकाणाहून 5 जण वाहून गेले होते. यापैकी तीन महिलांचे मृतदेह काल संध्याकाळी पाण्याबाहेर काढण्यात यश आलं आहे.दरम्यान हसनाळ येथून वाहून गेलेल्या आणखी दोघांचा शोध SDRF च्या पथकासह नागरीकांकडून घेण्यात येत आहे
1
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 19, 2025 02:32:38
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी जिल्हाला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये पावसानं दमदार हजेत लावलेली पाहायला मिळते सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली राजापूरच्या अर्जुन आणि कोदिवली नदीने देखील दुथडी भरून वाहत आहेत किनारपट्टी भागामध्ये मासेमारीसाठी कोणीही जाऊ नये अस पद्धतीच आव्हान जिल्हा प्रशासन केलाय तर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलाय रत्नागिरीतील जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीय रत्नागिरीतला पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी
4
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 19, 2025 02:32:07
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - अतिवृष्टी कायम,चांदोली धरण 94 टक्के भरल्याने विसर्ग आणखी वाढवला, वारणा नदी काठी सतर्कतेचा इशारा.. अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे.गेल्या 24 तासात 92 मिलीमीटर इतक्या पाऊसाची नोंद झाली आहे,त्यामुळे चांदोली धरण जवळपास 95 टक्के इतकं भरले आहे. यामुळे चांदोली धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आला असून 18 हजार 630 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे.34.40 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात 32 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे,त्यामुळे धरण जवळपास भरत आले आहे.तर सकाळपासून धरणातून वारणा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग वाढवुन 18 हजार क्यूसेक करण्यात आलाय,यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून वारणा नदीकाठच्या गावाने सतर्क राहावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
4
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 19, 2025 02:31:16
Parbhani, Maharashtra:
अँकर - मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण अशी ओळख असलेल्या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पामधून आता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. येलदरी धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात येत असल्याने येलदरी धरणाने पाण्याचा विसर्ग वाढवून 10 गेट मधून आता 63 हजार 600 क्यूसेक्सने पूर्णा नदी पात्रात विसर्ग सुरू केलाय. यामुळे जिंतूर एलदरी सेनगाव राज्य महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी 24 तासापासून बंद पडलाय. पाण्याचा येवा बघून कमी अधिक विसर्ग करण्यात येणार असल्याचे एलदरी धरण पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने सांगण्यात येत आहे. नदी काठच्या गावांनी सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आलाय...
2
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 19, 2025 02:30:34
Palghar, Maharashtra:
पालघर _हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. कित्येक दिवस पडणाऱ्या पावसाची रात्रीपासून रीपरिप कायम आहे.आज दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज वर्तवला असल्याने जिल्ह्यातील शाळा ,अंगणवाडी आणि महाविद्यालयाला जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या सूर्य नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे . त्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.
3
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 19, 2025 02:15:24
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अंबोडा येथे संततधार पाऊस पडल्याने एका घराच्या भिंतीत पाणी मुरले आणि त्यामुळे घरची भिंत कोसळून शरवी शिरसाट या ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला..पावसाने मुरलेल्या पाण्याने घराची मुख्य भिंत कोसळल्याने शरवी तिच्या खाली दबली, तिला तात्काळ अकोट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले..या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे...
4
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 19, 2025 02:01:10
Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्हा परिषद मध्ये असलेल्या भंगार वाहनाच्या विल सहित चाकाणची चोरी..... Anchor :- भंडारा जिल्हा परिषद येथील अनेक वाहने भंगारात आहेत. ही वाहने जिल्हा परिषदेच्या आवारात ठेवली आहे. मात्र याच वाहनाच्या विल सहित चाके चोरी गेल्याचे प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात येऊन अज्ञात चोरट्याने विल सहित चाके खोलून नेली मात्र जिल्हा परिषद प्रशासनाला याची साधी भनक सुद्धा नाही. शासनाच्या मालाची चोरी होत असताना जिल्हा परिषद गप्प का असा प्रश्न आता उपस्थित केला जातो.
3
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 19, 2025 02:01:03
Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यात श्रावण महिन्याचा शेवटच्या सोमवारी असलेली प्रसिद्ध कावड आणि पालखी यात्रा शांततेत पार पडली..या यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही..रविवार पासून सुरू असलेली ही कावड यात्रा रात्री संपन्न झाली..या यात्रेत सुमारे 200 पालख्या आणि 150 कावड सहभागी होत्या..या यात्रेत अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री राज राजेश्वर देवाला जल अर्पण करण्यासाठी हजारो भाविक १७ किलोमीटर अंतरावरील पूर्णा नदीकडे पायी जातात..यात्रेच मुख्य आकर्षण होत अकोला शहरातील सर्वात मोठी डाबकी रोडची महाकाय कावड..तब्बल १०५ फूट लांबीची २१०० भरण्यांची ही कावड आणि यात सुमारे ३००० युवकांचा उत्साही सहभाग पाहायला मिळाला...
5
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 19, 2025 01:15:59
Yeola, Maharashtra:
अँकर:- येवला तालुक्यातील धुळगाव येथे झालेल्या पावसामुळे गावातील मुख्य रस्त्यालगत असलेले एक जुने भेंडीचे प्रचंड झाड कोसळले. झाड कोसळताना हॉटेल व शेजारील मोटार सायकल दुरुस्ती दुकानावर ते आदळण्याच्या बेतात होते.घटनेवेळी हॉटेलमध्ये ग्राहक बसले होते. झाड अचानक कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने नागरिक घाबरून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. झाड हॉटेलवर मोटरसायकल गॅरेजवर पडल्याने दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.
14
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 19, 2025 01:15:42
Lasalgaon, Maharashtra:
अँकर :- गेल्या आठवड्यात गुरुवारी बांगलादेश सरकारने अध्यादेश काढत कांद्यावरील आयात बंदी हटवल्याने लासलगाव सह देशभरातून 400 ते 500 ट्रक मधून बारा ते पंधरा हजार मेट्रिक टन कांदा बांगलादेशात निर्यातीसाठी व्यापाऱ्यांनी ट्रक द्वारे पाठवला मात्र मोजक्याच व्यापाऱ्यांना कांदा आयातीसाठी परवाने दिल्यामुळे अल्प प्रमाणात कांदा बांगलादेशात बॉर्डर वरून सोडला जात असल्याने उर्वरित ट्रकमध्ये असलेला कांदा सडण्याच्या खराब होण्याच्या स्थितीत असल्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत कांद्याने भरलेले सर्व ट्रक हे बांगलादेशात कसे जातील यासाठी प्रयत्न करावे अन्यथा याचा परिणाम हा भारतीय बाजारपेठ शेतकऱ्यांच्या कांद्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही बाईट... प्रवीण कदम, कांदा निर्यातदार व्यापारी लासलगाव
12
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 19, 2025 01:15:36
Yeola, Maharashtra:
अँकर:नाशिकच्या येवला तालुक्यातील मानोरी येथे दिनकर यशवंत शेळके यांच्या शेतातील वीस गुंठे उभ्या असलेल्या टोमॅटो पिकाचे अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्या सुमारास टोमॅटो तोडून बागेचेही नुकसान केले. यात या शेतकऱ्याचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून या समाजकंटकाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे
13
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 19, 2025 01:15:26
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE SLUG NAME -SAT_KOYNA_UPDATE सातारा - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणातून केला जाणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे.धरणाचे सर्व दरवाजे 6 फुटांपर्यंत उघडून 39400 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे .कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये असा एकूण 41500 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सध्या धरणात 98 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
14
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 19, 2025 01:01:11
Yeola, Maharashtra:
अँकर :- निफाड तालुक्यातील अंतरवेली गावात एक आगळावेगळा आणि हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला. गावातील ग्रामसेवक संदीप प्रल्हाद पाटील यांची बदली झाल्यानंतर, संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येत, त्यांचा घोड्यावर बसवून वाजत-गाजत मिरवणूक काढून निरोप दिला. सामान्यपणे सरकारी कर्मचाऱ्यांची बदली ही औपचारिक पद्धतीने पार पडते. मात्र अंतरवेली ग्रामस्थांनी पाटील यांच्या सेवेला आणि त्यांच्या कार्यपद्धतीला दाद देत, त्यांचा निरोप उत्सवात परिवर्तित केला. गावातून मिरवणूक निघाली, ढोल-ताशांचे गजर, फुलांची उधळण आणि 'पाटील सरांना मानाचा मुजरा' असे फलक झळकत होते. पाटील यांना खास घोड्यावर बसवून गावात फिरवण्यात आलं. अनेक ग्रामस्थ भावनाविवश झाले होते, डोळ्यांतून अश्रूही अनावर झाले. संदीप पाटील यांनी आपल्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. वेळेवर शासकीय योजना राबवणं, ग्रामपंचायतीचे पारदर्शक कारभार आणि लोकांच्या अडचणींना प्राधान्य देणं यासाठी ते प्रसिद्ध होते.
13
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top