Back
दक्षिण सोलापूर: पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, पंचनाम्याची मागणी!
AAABHISHEK ADEPPA
Aug 15, 2025 03:30:11
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - दक्षिण सोलापूर तालुक्यात कालपासून पावसाचा जोर ओसरला मात्र शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी
- दक्षिण सोलापूर तालुक्यात कालपासून पावसाचा जोर वसरला, शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी.
- दक्षिण सोलापूर तालुक्यात जोरदार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीच्या बांधावर येऊन अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे शेतकऱ्यांची अपेक्षा
- दक्षिण सोलापूर तालुक्यात चार-पाच दिवसात झालेल्या पावसामुळे अनेक नदी - नाले ओसंडून भरून वहायला सुरवात
- त्यामुळे अनेक गावातील खरीप हंगामाच्या पिकांना बसला होता फटका.
- तूर मूग उडीद सोयाबीन कांदा पिकांचे जोरदार पावसामुळे झालं होतं नुकसान.
- तालुका प्रशासनाकडून पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
Byte : ग्रामस्थ
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 15, 2025 05:21:59Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_FLAG_HOSTING दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावतीत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडला शासकीय ध्वजारोहन सोहळा; उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान
अँकर :-79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात शालेय मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले. यावेळी खासदार अनिल बोंडे, यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि सगळ्या विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन मंत्री दादा भुसे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी दादा भुसे यांनी केंद्र आणि राज्यातील योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचन्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा अस आवाहन केलं.
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 15, 2025 05:21:49Beed, Maharashtra:
बीड : दमदार पावसाने सौताडा धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी
Anc- बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे पाटोदा तालुक्यातील सुप्रसिद्ध सौताडा धबधबा आज पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे परिसरातील तलाव आणि जलस्रोत तुडुंब भरले असून, 68 मीटर उंचीवरून कोसळणारा हा धबधबा नेत्रदीपक रूप धारण करत आहे.
पावसाच्या या मनोहारी सरींमध्ये धबधब्याचे दृश्य अधिकच रमणीय झाले असून, सुट्टीच्या पार्श्वभूमीवर येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. निसर्गरम्य वातावरण, पाण्याचा गडगडाट आणि हिरवाईने नटलेला परिसर पाहण्यासाठी स्थानिकांसह जिल्ह्याबाहेरूनही पर्यटक मोठ्या संख्येने धाव घेत आहेत.
प्रवाहित झालेल्या सौताडा धबधब्यामुळे पावसाळी पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, हा देखावा पाहणाऱ्यांच्या मनावर निसर्गसौंदर्याची अविस्मरणीय छाप उमटवत आहे.
0
Report
UPUmesh Parab
FollowAug 15, 2025 05:18:04Oros, Maharashtra:
अँकर ---- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण सोहळा सिंधुदुर्ग नगरी येथील पोलिस मैदानावर संपन्न झाला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. वंचित घटकाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी विशेष जनता दरबाराचे आयोजन केले. याबरोबरच विविध घटकांसाठी समस्यामुक्त करण्याचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला हे सर्वांसाठी गौरवास्पद आहे. अशा शब्दात स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी विशेष उल्लेखनीय कार्यासाठी विविध व्यक्तींना सन्मानित करण्यात आले .
0
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 15, 2025 05:07:24Chandrapur, Maharashtra:
Feed slug:--- 1508ZT_CHP_FLAG_HOISTING_1_2
टायटल:-- भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपुरात पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाले ध्वजारोहण, पालकमंत्र्यांनी जिल्हावासीयांना उत्तरोत्तर प्रगतीच्या दिल्या शुभेच्छा
अँकर:-- भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूरात जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन सोहळा पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. जिल्ह्यातील सशस्त्र पोलीस दलाने याप्रसंगी मानवंदना दिली. जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. सोबतच व्यसनमुक्ती विरोधात सर्वांना शपथही देण्यात आली. याप्रसंगी मादक द्रव्य विरोधातील मिशन संदर्भातल्या फलकांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्र्यांनी जिल्हावासीयांना उत्तरोत्तर प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या.
बाईट १) डॉ. अशोक उईके, पालकमंत्री
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 15, 2025 05:03:32Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1508ZT_JALNA_DHVAJAROHAN(6 FILES)
जालना : पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
अँकर :जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा कार्यक्रम पार पडला.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांची यावेळी पालकमंत्री मुंडे यांनी माहिती दिली.
0
Report
PNPratap Naik1
FollowAug 15, 2025 05:02:51Kolhapur, Maharashtra:
Kop Independence Day
Feed :- Live U
Anc :- स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हापूर जिल्ह्यात देखील उत्साहात साजरा होत आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्य शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर याच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार शाहू महाराज याच्यासाह विविध विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक सहभागी झाले होते. यावेळी जनतेला शुभेच्छा देत असताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी इतर कोणत्याही गोष्टीची चर्चा करत बसण्यापेक्षा आजचा दिवस जनतेने आनंदात साजरे करावे असं आवाहन केले.
Play Byte :- प्रकाश आबिटकर, पालकमंत्री
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 15, 2025 05:02:47Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1508ZT_INDAPURYUVTI
FILE 2
इंदापुरात स्वातंत्र्यदिनी युवतीचा आत्मदानाचा प्रयत्न....इंदापूर पोलिसांनी युवतीला घेतलं ताब्यात....प्रशासकीय भावनाच्या आवारातच आत्मदहनाचा प्रयत्न....जमिनीच्या वादावरून युवतीचा आत्मदानाचा प्रयत्न....
Anchor_इंदापुरात जमिनीच्या वादावरून स्वातंत्र्यदिनी युतीने आत्मदानाचा प्रयत्न केलाय. इंदापूर मधील प्रशासकीय भावनाच्या आवारातच ध्वजावंदन सुरू असताना पूजा शिंदे नावाच्या युवतीने अंगावरती पेट्रोल सदृश्य पदार्थ ओतून घेत आत्मदानाचा प्रयत्न केला.यादरम्यान इंदापूर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय.....
गेल्या दोन दिवसापासून जमिनीच्या वादाच्या प्रकरणावरून पूजा शिंदे या युवतीने आपल्या कुटुंबावर अन्याय होत असून धनदांडगे ही जमीन लुटत आहेत असा आरोप केला होता आणि स्वातंत्र्यदिनी आपण आत्मदहन करू असा इशारा प्रशासनाला दिला होता.त्यानंतर आज इंदापूर मधील प्रशासकीय भावनांच्या परिसरात तिने ध्वजारोहणावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 15, 2025 04:51:50Akola, Maharashtra:
Anchor : स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला..यावेळी उपस्थित नागरिकांसह देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी 2047 पर्यंत महाराष्ट्र राज्य आत्मनिर्भर, समृद्ध, तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम, सामाजिक समतेचे आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले.
Sound Byte : आकाश फुंडकर , राज्य कामगार मंत्री.
4
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 15, 2025 04:34:51Beed, Maharashtra:
बीड:पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न...
Anc: बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिमझिम पावसाच्या सरींमध्येही देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रीय गीताचे सूर गुंजले. कार्यक्रमात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जनप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
7
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 15, 2025 04:34:39Nashik, Maharashtra:
nsk_muttonchoupal
feed by live u 51
Anchor नाशिक शहरात आज 800 पेक्षाही अधिक कत्तलखाने आणि मटन विक्री दुकाने सर्रास सुरू आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्यास 78 वर्ष पूर्ण झाल्याने आज नाशिक महापालिकेने आज शहरातील सर्व खतरखाने बंद ठेवावेत असे लेखी आदेश दिले होते. असताना सरकारचा आदेश जुगारत दुकानात खुलेआम सुरू ठेवण्यात आले आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी
3
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 15, 2025 04:34:34Nashik, Maharashtra:
nsk_flaghoisting
feed by live u 51
अँकर - नाशिकला अद्याप पालकमंत्री लाभलेले नसतांना मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज स्वातंत्र्यदिन निमित्ताने शासकीय ध्वजारोहन सोहळा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी संपन्न होणार आहे. 26 जानेवारी, 1 मे नंतर तिसऱ्यांदा पालकमंत्री नसताना गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाचा मान नाशिकला देण्यात आला. महायुतीतील तीनही पक्षांना हा मान दिला जाईल अशी अपेक्षा असताना भुजबळांना गोंदिया पाठविण्यात येत होते...मात्र भुजबळांनी मी कायम नाशिकमध्ये ध्वजारोहण केले आहे असे सांगत नकार दिल्याने स्वातंत्र्यदिनी नाराजीनात्य रंगले आहे. आज त्यावर भुजबळ काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे
4
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 15, 2025 04:34:21Nashik, Maharashtra:
nsk_muttonchoupal
feed by live u 51
Anchor नाशिक शहरात आज 800 पेक्षाही अधिक कत्तलखाने आणि मटन विक्री दुकाने सर्रास सुरू आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्यास 75 पूर्ण झाल्याने आज नाशिक महापालिकेने आज शहरातील सर्व खतरखाने बंद ठेवावेत असे लेखी आदेश दिले होते. असताना सरकारचा आदेश जुगारत दुकानात खुलेआम सुरू ठेवण्यात आले आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी
2
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 15, 2025 04:33:35Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur School Independence Day
File:01
Rep: Hemant Chapude(Shirur)
शिरूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Anc:शिरूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि सुंदर पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी शाळांमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायत सादर केली, देशभक्तीपर भाषणे केली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमधून देशप्रेम व्यक्त केले.
विशेष म्हणजे अनेक शाळांनी सफाई कामगारांचा सन्मान करून सामाजिक कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमांमुळे स्वातंत्र्य दिनाचा संदेश अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
1
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 15, 2025 04:33:24Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
*धाराशिव:*
DHARA_HEVY_RAIN
धाराशिव जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी,अनेक ठिकाणी नदीला आला पुर .
परंडा तालुक्यातील सिरसाव गावामध्ये चांदणी नदीला आलेल्या पुराचे पाणी घुसले गावात ग्रामपंचायत,शाळा व दुकानांमध्ये शिरले पाणी
Anchor: धाराशिव जिल्ह्यात गेली दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.काल सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदुर दमदार पाऊस झाला आहे.परंडा तालुक्यातील सिरसाव येथील चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे गावात पाणी शिरले त्यामुळे गावातील ग्रामपंचायत शाळा व दुकानांमध्ये पाणी शिरले त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या पंधरा वर्षात असा महापूर कधीही आला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले तर या पावसामुळे मांजरा नदीची उपनदी असलेल्या वाशी तालुक्यातील वाशीरा नदीला मोठा पुर आला असुन उंच पुलावरून पाणी वाहु लागल्याने मांजरा नदी पाञ दुथडी भरुण मोठ्या प्रवाहाने वाहु लागले आहे.कळंब इटकुर पारा रस्ता बंद झाला असुन अनेकांचे शेतातील गोठे,घरात पाणी शिरले तर भुम तालुक्यातील आरसोली प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर पाणी आल्याने नागरीकांची दानादान उडाली आहे.कळंब धाराशिव, तुळजापूर,उमरगा,लोहारा या भागात देखील दमदार पाऊस झाला आहे.
1
Report
MAMILIND ANDE
FollowAug 15, 2025 04:31:06Wardha, Maharashtra:
*वर्धा ब्रेकिंग*
EXCLUSIVE आहे
SLUG- 1508_WARDHA_AATMDAHAN
- वर्ध्यात कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटदाराचे आत्मदहन
- वर्ध्यात स्वतंत्र दिनाच्या दिवशी कंत्राटदार बाबा जाकीर यांचे आत्मदहन
- वर्ध्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेट वरील धक्कादायक प्रकार
- पोलिसांच्या सातर्कतेने बचावला कंत्राटदार
- कंत्राटदार बाबा जाकीर यांनी घेतले अंगावर डिझेल
- बांधकाम विभागात त्यांचे दीड कोटीचे देयके प्रलंबित असल्याने आत्मदहनाचा प्रयत्न
- 20 दिवसा पूर्वी कंत्राटदार बाबा जाकीर यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न
- बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे हे देयके देत नसल्याने आत्मदहन करणार असा इशारा
अँकर - वर्ध्यात आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी धक्कादायक प्रकार संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटवर कंत्राटदार बाबा जाकीर यांनी कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला. बाबा जाकीर यांच्या दीड कोटी रुपयांच्या देयकांची फाइल महिन्यापासून प्रलंबित असून, अंभोरे यांच्याकडून सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. आज सकाळी त्यांनी गेटसमोर अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचला आणि तातडीने त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. विशेष म्हणजे, 20 दिवसांपूर्वीही बाबा जाकीर यांनी अशाच प्रकारचा प्रयत्न करत बांधकाम विभागासमोर तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली होती. कंत्राटदारांचा असा आरोप आहे की, बांधकाम विभागातील भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार यामुळे प्रलंबित देयकांची विलंब होत आहे. या प्रकारानंतर विभागातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
0
Report