Back
सिंधुदुर्ग: कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, रुग्णांची होत आहे गैरसोय!
UPUmesh Parab
Aug 14, 2025 11:47:07
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग -- -- सिंधुदुर्ग जिह्यातील शासकीय वैध्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन.. नर्सिंग कॉलेज मधील विध्यार्थिनींला धक्का लागल्याच्या रागातून झाली होती बचाबाची... प्रकरण मिटलेले असताना देखील मुकादमाने केली त्या कर्मचाऱ्याला मारहान.. मारहाणीच्या निषेधार्थ प्रयोग शाळा तंत्रज्ञ विभागाच्या कंत्राटी कामगारांनी छेडले काम बंद आंदोलन... काम बंद आंदोलनामुळे रुग्णांची होतेय गैरसोय
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowAug 14, 2025 13:35:16Nashik, Maharashtra:
Nsk_chavhanblame
Feed by 2C
अँकर संपूर्ण राज्यामध्ये सध्या ईव्हीएम आणि मतदान यादी मधील घोळ चर्चेमध्ये आहे. जिल्हा जिल्ह्यामध्ये संशयास्पद नाव मतदार यादी मध्ये समाविष्ट झाल्याचा समोर येत आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील बागलाण विभागाचे माजी आमदार यांनी गुजरात मधील एका माणसाने आपल्याला ईव्हीएम मॅनेज करण्यासाठी संपर्क केल्याचं सांगत खळबळ उडून दिली आहे
Vo 1 नाशिक जिल्ह्यातील बागलाण मतदारसंघाचे हे आहेत माजी आमदार संजय चव्हाण... सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षांमध्ये ते कार्यरत आहेत..चव्हाण यांच्या पत्नी दीपिका बागलाण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी-सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होत्या. तथापि, त्यांचा भाजप उमेदवार दिलीप बोरसे यांच्याकडून 1.29 लाख मतांनी पराभव झाला...मात्र या मतदानापूर्वी विधानसभेमध्ये गुजरातमधील एका माणसाकडून 5-8 कोटी रुपयांना ईव्हीएममध्ये फेरफार करण्याची ऑफर देण्यात आली, असा दावा राष्ट्रवादी-सपाचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केला आहे.
Byte माजी आमदार संजय चव्हाण
Vo 2 राष्ट्रवादी-सपा प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्र विकास आघाडी (MVA) शी संपर्क साधून "EVM व्यवस्थापन" द्वारे 288 पैकी 160 जागा जिंकण्यास मदत करु शकतात असा दावा करणाऱ्या दोन व्यक्तींनी केला होता, असा आरोप केल्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादी-सपाचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी हा खळबळजनक दावा केलाय संजय राऊत यांनी सुद्धा असाच संपर्क उद्धव ठाकरे यांनाही करण्यात आला होता असे म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आरोप प्रत्यरोपांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबतचा निष्पक्ष अहवाल समोर ठेवण्याची गरज आहे
2
Report
PNPratap Naik1
FollowAug 14, 2025 13:35:09Kolhapur, Maharashtra:
Kop Sugar Rate PKG
Feed :- Live U
Anc :- आत्ता बातमी महागाईची. मागील हंगामात साखरेचे घटलेले उत्पादन, केंद्र सरकारने कमी केलेला साखरेचा कोटा त्यात देशांतर्गत बाजार पेठेत साखरेची वाढलेली मागणी यामुळे साखरेने घाऊक बाजार पेठेत उच्चाकी दर गाठला आहे.. ऐन सणासुदीमध्ये साखरेचे किलो पाठीमागे 3 ते 4 रुपयांनी दर वाढल्यामुळे सर्वसामान्याचे कंबरडे पून्हा एकदा मोडले आहे.
GFX In
घाऊक बाजार पेठेत साखरेने गाठले उच्चाकी दर.
किलो पाठीमागे 3 ते 4 रुपये वाढले साखरेचे दर.
39 रुपये किलोनी मिळणारी साखर पोहचली 42 ते 43 रुपये किलोपर्यत.
दिवाळी पर्यत आणखी साखरेचे भाव वाढणार का? याची ग्राहकांना भीती
GFX Out
VO 1:- मागणी आणि पुरवठा मध्ये मोठी तफावत निर्माण झाल्यानंतर महागाई वाढते हा बाजार सिद्धात आहे. साखरे बाबतही हेच झालंय. साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगामात गाळपाचे गणित बिघडल्यामळे साखरेचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजार पेठेत साखरेचे भाव वाढले आहेत.. त्यामुळे 3800 रुपये क्विंटल रुपयांनी मिळणारी साखर 4250 पर्यत पोहचली आहे. त्यामुळे घाऊक बाजारपेठेत साखरेची उचल कमी झाली आहे.
Byte :- मनोज नष्टे, व्यापरी
VO 2 :- आगामी काळात गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे सण सलग आहेत. या सणांपूर्वीच साखरेचे भाव वाढले आहेत. ऐन सणासुदीला हे दर अधिक वाढणार का याची भीती ग्राहकांमध्ये आहे. त्यामुळे सरकारने तातडीने यामध्ये हस्तक्षेप करावे अशी मागणी ग्राहक करत आहे.
Byte :- विजय मेटकर, ग्राहक
VO 3:- मागील हंगामात ब्राझीलमध्ये साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला प्रतिक्विंटल 3900 रुपये दर आहे. त्यापेक्षा देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला चांगले भाव मिVO असल्याने साखर कारखानदारांनी निर्यातीकडे कानाडोळा केला. साखर कारखानदार यांना साखरेचे प्रति क्विंटल 100 रुपये अधिक दर मिळाल्याने ते समाधानकारक आहेत.. पण हे दर अधिक वाढणार नाहीत याची काळजी सरकार घेईल असं साखर अभ्यासक यांना वाटतंय.
Byte :- अवताडे, साखर अभ्यासक
VO 4:- साखर अभ्यासकाना सरकार यापेक्षा अधिक दर वाढू देणार नाहीत याची काळजी घेतील असं वाटतंय. अभ्यासकानी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरो अन्यथा महागाईच्या झळामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडले जातील हे नक्की .
प्रताप नाईक जी 24 तास कोल्हापूर
3
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 14, 2025 13:35:04Nashik, Maharashtra:
nsk_tollpkg
feer by 2C
Anchor देशभरातील विविध राज्यांमधील राष्ट्रीय महामार्गावर 15 ऑगस्ट पासून तीन हजार रुपयात वर्षभर मनसोक्त प्रवास करता येणार आहे... मात्र या योजनेतील पाच मिळवायचा असेल तर जरा सांभाळूनच.... सध्या याबद्दलच्या विस्तृत सूचना नसल्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. बघूया हा पास कसा करायचा आहे
Vo 1 देशांतर्गत महामार्ग सुस्थितीत आणि वेगवान होत असल्याने अनेक नागरिक आपल्या वाहनांनी पर्यटनासाठी विविध राज्यांमध्ये जाताना दिसतात.. मात्र त्यांना लागणारा टोल हा त्यांच्या पेट्रोल खर्चाच्या बरोबरीने असतो... सर्वसामान्यांना एकूणच वाढत्या टोल मधून आणि प्रवास खर्चातून दिलासा देण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता तीन हजार रुपयांचा वार्षिक पास 15 ऑगस्ट पासून लागू केला आहे... हा पास काढण्यासाठी तुम्हाला NHI app किंवा राजमार्ग यात्रा या ॲपला डाऊनलोड करावे लागेल. या ॲपमध्ये फास्टट्रग रिचार्ज ची सोय देण्यात आली आहे... किंवा थेट एन एच आय च्या वेबसाईटवर जाऊन आपण आपला पास डेबिट कार्ड अथवा यूपीआय पेमेंट द्वारे करून घेऊ शकता.. सध्या ही सुविधा उपलब्ध झालेली दिसून येत नसली तरी आज उशिरा रात्रीपर्यंत ही सुविधा वेबसाईटवर आणि ॲप मध्ये उपलब्ध होऊ शकते.. सध्या वेगवेगळ्या लिंक आणि ॲप आपल्याला वेगवेगळ्या सूचना देत आहेत मात्र कुठेही पेमेंट करताना त्याची विश्वासार्हता तपासून बघा अन्यथा उद्यापर्यंत पास काढण्याची वाट बघा
Byte 1 नवनाथ केदार टोल मॅनेजर सिन्नर एन एच आय
Vo 2 या पासचा वापर केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या आत्यारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगति महामार्गांवर करता येणार आहे... मात्र यामध्ये अजून काही अडचणी आहेत
1) ज्यामध्ये स्थानिक लोकांना असलेली सवलत कशी मिळणार याबद्दलचा खुलासा नाही
2) मंथली पास घेणाऱ्या नोकरदारांना आता अटीनियम बदलणार की तेच राहणार याबद्दल स्पष्टता नाही
3) खाजगी वाहने आणि व्यावसायिक वाहने यांच्या ट्रॅफिक लेन एकच असल्यामुळे टोलवर कोळंबा हा कायम राहण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या असाव्या अशी मागणी आहे
Byte 2 प्रादेशिक अधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक ( हा बाईट पाच ते 6 वाजेपर्यंत मिळेल, आला की पाठवतो)
Vo 3सध्या यात काही अडचणी असल्या तरी मात्र या पासेसमुळे आंतर राज्यीय वाहतूकिल्ला चालना मिळून पर्यटन व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सर्व सामान्यांना वाढत्या टोलच्या आर्थिक भारामधून सुटका होण्यास मदत होईल. आता गरज आहे ही योजना आणि त्याचे नियम समजावून वाहनधारकांनी या योजनेला प्रतिसाद देण्याची
2
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 14, 2025 13:33:05Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1408ZT_CHP_BALLARPUR_LAND
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये 210 पात्र लाभार्थ्यांना घराचे पट्टे वाटप, आ. सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) 210 निवासी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाचे नियमन करून करण्यात आलेल्या या वाटपामुळे अनेक कुटुंबांच्या आनंदात भर पडली. हा केवळ पट्टे वाटपाचा कार्यक्रम नसून, भविष्यातील सुमारे 12 हजार पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरपट्टे देण्याच्या महाअभियानाची भक्कम नांदी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्यांच्या हस्ते बल्लारपूर, नाट्यगृह येथे पट्टेवाटप करण्यात आले. बल्लारपूर मतदारसंघात अत्याधुनिक सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, नगरपरिषदेची नवीन इमारत, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय अशी मोठी कामे साकारण्यात आल्याचे ते म्हणाले.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 14, 2025 13:32:45Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सव व धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती..आगामी गणेशोत्सव तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सर्वधर्मीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली..या बैठकीस महावितरण, पोलिस, महसूल, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते..बैठकीदरम्यान गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी सणाच्या काळात भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती दिली..यावर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तात्काळ तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश दिले..तसेच सण शांततेत, सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी परस्पर सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 14, 2025 13:32:23Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1408ZT_INDAPURMAHSUL
FILE 5
इंदापुरात महसूल कर्मचारी संघटनेने केलं एक दिवस लेखणी बंद आंदोलन
Anchor_ इंदापूर मधील महसूल कर्मचारी संघटनेने एक दिवस लेखणी बंद आंदोलन केलेय. इंदापूर शहरातून पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत मंडळ अधिकारी अशोक पोळ यांना दमदाटी शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या आणि मंडळ कार्यालय जाळून टाकत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्या दोन पक्षकार महिलांवर कारवाई करण्याच्या मागणीच निवेदन इंदापूर पोलिसांना देण्यात आलंय.
अशोक संपत पोळ यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५० अन्वये अधिनियमीत व कायदेशीर पद्धतीने पारीत केलेल्या अर्धन्यायिक आदेशाने संबंधित प्रकरणामधील पक्षकार यांनी व्यथीत होऊन मंडल अधिकारी कार्यालय इंदापूर मध्ये १३ ऑगस्ट रोजी अशोक पोळ अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत त्यांचेवर हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
0
Report
ABATISH BHOIR
FollowAug 14, 2025 13:17:27Kalyan, Maharashtra:
आयुक्त तोंड दाखवत नाहीत तर अतिरिक्त आयुक्त खोटं बोलतायत ... हिंदू खाटीक समाज आंदोलनावर ठाम उद्या 15 ऑगस्ट रोजी केडीएमसी मुख्यालयासमोर आंदोलन
Anc...कल्याण डोंबिवली महानगरपालिका 15 ऑगस्ट रोजी चिकन मटन विक्री बंदीच्या निर्णयावर ठाम आहे अनेकदा विनंती निवेदन देऊन देखील केडीएमसी ठाम असल्याने हिंदू खाटीक समाजाने आक्रमक पवित्रा घेतलाय .आयुक्त तोंड दाखवत नाहीत तर अतिरिक्त आयुक्त खोटं बोलतायत.. आमचं उद्याचे आंदोलन कसे असेल हे उद्याच दिसेल असा इशारा हिंदू खाटीक समाजाच्या वतीने देण्यात आले कल्याण डोंबिवली मध्ये 15 ऑगस्ट रोजी चिकन मटन विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिकेने घेतला त्यानंतर गेला आठवडाभरापासून कल्याण डोंबिवली महापालिके विरोधात राजकीय पक्ष हिंदू खाटीक समाज तसेच इतर संघटना या रोष व्यक्त करतात हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहेत . आज हिंदू खाटीक समाजाच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीत 15 ऑगस्ट रोजी चा चिकन मटन बंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली मात्र अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी 1988 च्या ठरावाचा दाखला देत यंदा हा निर्णय मागे घेणे शक्य नसल्याचे सांगितले तसेच .इतक्या वर्षात यंदा विरोध होतोय त्यामुळे यापुढे याबाबत चर्चा केली जाईल असं आश्वासन दिल .हिंदू खाटीक समाजाच्या प्रतिनिधींनी या बैठकीत केडीएमसीच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली .मटन चिकन विक्री हा हिंदू खाटीक समाजाचा व्यवसाय आहे.. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो आमच्यावर अन्याय करू नका.. तुम्ही 1988 च्या ठरावाचा दाखला देता मात्र हा ठराव महापालिकेने केलाय शासनाने नाही .. . आम्ही आयुक्तांच्या भेटीसाठी वेळ मागतोय मात्र आयुक्त वेळ देत नाहीत ,आम्ही काही गुन्हा केलाय का ? असा सवाल केला.आयुक्त तोंड दाखवत नाहीत तर अतिरिक्त आयुक्त खोटं बोलतायत असा हल्लाबोल केला . केडीएमसी आपल्या भूमिकेवर ठाम आहे त्यामुळे आमचं उद्याचे आंदोलन कसे असेल हे उद्याच दिसेल असा इशारा देखील हिंदू खाटीक समाजाच्या वतीने देण्यात आला
byte... संतोष घोणे हिंदू खाटीक समाज अध्यक्ष
2
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 14, 2025 13:15:54Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1408ZT_GAD_RANBHAJI_FEST
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोलीत आत्मा ने आयोजित केला रानभाजी महोत्सव, शासकीय कृषी महाविद्यालय परिसरात आयोजित महोत्सवाला मोठा प्रतिसाद, जिल्हाभरातून आदिवासी शेतकऱ्यांनी 80 स्टॉलची केली उभारणी
अँकर:--गडचिरोलीत रानभाज्यांचा महोत्सव सुरू झालाय. गडचिरोलीकरांचा या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद लाभलाय. ग्रामीण भागात वास्तव्याला असणा-या आदिवासींना या कोसळधार पावसात तब्येत कशी टिकवून ठेवायची याचे गुपित माहित होते. ते होते त्या त्या भागातील रानभाज्या. या रानभाज्यांचे विविध पदार्थ या मोसमात जेवणात असले की तब्येत ठणठणीत. विस्मरणात गेलेल्या अनेक रानभाज्या आजही दुर्गम आदिवासी भागात त्याच चवीने ग्रहण केल्या जातात. मात्र शहरी नागरिकांना याची माहितीच नसते. अशा भाज्यांची ओळख आणि त्यांचे आहारातील चलन वाढावे यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने रानभाजी महोत्सव आयोजित करत पुढाकार घेतला. आणि बघता बघता तब्बल 80 रानभाज्या महोत्सवात दाखल झाल्या. अळींबी, बांबू, काटवल, लालमाठ, वाघाटी, बोपली, शेवगा, राजगिरा, अंबाडी, कढीपत्ता, शरणी, अळू, चाकवत, बोरु, चवळी, आंबटचुका, करडई पाने, तांदुळजा, गुलवेल, कुयरी, वारकु, करडकोसला, करंजी, केना, पीठपापडा, विंचू, जिवती, फांदी, पोई, कुडा, टाकळा/तरोटा, पातुर, कपाळफोडी, आंबुशी, कुरडू, खापरखुटी, चिवळ, आघाडा, घोळभाजी, मटारु, भुईआवळा, सुरण, दिंडा आदींचा यात समावेश होता. रानभाज्या पावसाळ्यातील विविध आजारांना पळवून लावण्यासाठी गुणकारी आहेत. यातील भाज्या केवळ पावसाळ्यात उगवत असल्या तरी काही औषधी गुण असलेल्या भाज्या बारमाही उत्पादित करून गडचिरोलीतील निसर्गरम्य आणि प्रदूषणाचा लवलेश नसलेल्या जिल्ह्यात शेतक-याना पदरी २ पैसे अधिक पडण्याची शक्यता मिळवून देतात.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
4
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 14, 2025 12:48:19Parbhani, Maharashtra:
हिंगोली
Slug - हिंगोलीत महायुतीत धुसफूस
संतोष बांगर यांचे भाजप जिल्हाध्यक्ष वर गंभीर आरोप
भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी ब्लॅक मेलिंग साठी बैठक आयोजित केली होती
अँकर
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मध्ये काल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रशासनाची आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली असून खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केला आहे
मेघना बोर्डीकर यांची कालची बैठक संपल्यानंतर आज तत्काळ शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा कळमनुरी मध्ये प्रशासनाचे आढावा बैठक कालची बैठक भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी फक्त ब्लॅकमेलिंग साठी घेतली होती असा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे
संतोष बांगर TT मुद्दे
काल कळमनुरीची मध्ये बैठक घेतली होती त्याची जास्त माहिती मेघना बोर्डीकर यांना नव्हती
या बैठकीमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी अधिकाऱ्यांच्या लाजा काढल्या जिल्हाधिकारी एसडीएम तहसीलदार बीडिओ यांना कमरेच्या खालचं बोलणं तुम्हाला लाज आहेत का नाही अशी भाषा जिल्हाध्यक्षांनी केली आहे
अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं आणि आपली पोळी भाजून घेत किशे भरायचं हा धंदा त्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे
अधिकारी म्हणून ही आमदार हे अधिकारी मला सांगत आहेत अधिकारी भीत असतात यांना सांगता येत नाही
माझा मुख्यमंत्री आहे असं जिल्हाध्यक्ष सांगत आहेत मी तुम्हाला सस्पेंड कर असं सांगत आहेत
देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ काचासारखे आहेत त्यांच्या निदर्शनास आल्यास जिल्हाध्यक्षाची उचल बांगडी केल्याशिवाय राहणार नाहीत
मी बैठक घेतलेली नाही मी माझ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका घेऊन जाऊ नका कालचा बैठकीमध्ये त्या जिल्हाध्यक्षाचा ब्लॅकमेल करण्याचं काम होतं
मेघना बोर्डीकर यांचा काहीही संबंध नाही हा बैठकीचा खेळ म्हणजे फक्त ब्लॅकमेल साठी होता
8
Report
AKAMAR KANE
FollowAug 14, 2025 12:47:51Nagpur, Maharashtra:
Ngp Uday samant pc
live u ने फीड पाठवले
-------
नागपूर
बाईट - उदय सामंत, उद्योग मंत्री.
- शिवसेनेच्या पूर्व विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा नागपूर आतील हॉटेल सेंटर पॉईंट येथे पार पडला... यावेळी पूर्व विदर्भातील जिल्हा प्रमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते...
बाईट - उदय सामंत, उद्योग मंत्री.
- पूर्व विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावलं होतं.. पक्षांतर्गत निवडणुका सुरू आहे. तसेच शासकीय योजनेचे अंमलबजावणी आणि पक्ष वाढवण्यासाठी संघटनात्मक बांधणी बैठक घेण्यात आलीय...
On आमदारांचे प्रोटोकॉल पाळले जात नाही...
- आमदारांच्या काही तक्रारी आलेल्या आहे.. मंत्रालयात आणि गृह सचिवाकडून आमदारांचे प्रोटोकॉल पाळले जात नाही. अशी तक्रार माझाकडे आल्या आहेय.. यासाठी एकनाथ शिंदे यांचाशी बोलणार आहे.. गरज पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा स्वतः चर्चा करणार आहे... तक्रारी आल्यात हे खरे आहे..
On राज ठाकरे मनपा
- मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लांब आहे आता ठोक टाळे बांधायला नको, विधानसभेच्या निवडणुकीत अनेक मुख्यमंत्री पदाचे महाविकास आघाडीचे दावेदार आपण पाहिलेले आहे निवडणुकीच्या निकालाच्या आगच्या दिवशी जॅकेट शिवून जाकेट घालून ते झोपले होते सकाळी मुख्यमंत्री होण्यासाठी पण महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला 232 जागा दिल्या तीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल. मुंबई सह तालुका पंचायत समिती पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकणार आहे.
On पदाधिकारी नाराज
- काही अल्पसंतुष्ट विड नसल तशी पदाधिकारी असतात ते बोलत असतील सगळे महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख बोललेल्या आलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना देता येत नाही त्यामुळे 365 थांबावं लागलं असतं हा एकनाथ शिंदे यांच्या पक्ष सगळ्यांचा ऐकून चालतो, भविष्यात व्हिडिओ शूट करायला देऊन म्हणजे खात्री पटेल.
On विदर्भात बैठकी
- आमची भूमिका माहिती म्हणून लढायचा आहे.. कोणी कितीही मनसुबे रचले तरी महायुतीची सत्ता येईल.. एकमेकांचा सन्मान माहिती करतील अशी आमची खात्री आहे.
- दर पंधरा दिवसांनी महायुतीची समन्वय समितीची बैठक होते.. समन्वय समितीतच्या बैठकीत निर्णय घेत असतो..
On पवार जावई भुसे
दादा भुसे यांनी स्वतः मुलाखतीन सगळं स्पष्ट केला आहे एखादा कोणाचा तरी नातेवाईक आहे म्हणून दुसऱ्या नातेवाईकांना राजकारण करू नये आणि नातेवाईकाला टार्गेट करावं असं कोणी करू नये.
On उद्योग प्रकल्प
- नवीन येणारे उद्यागाना भेट देणार आहे...सकाळी गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांचा बैठक झाली... त्यांच्या अडचणी समजून घेतल्या... पीएम मित्रा टेक्सटाईल येथेही बैठक झाली. तर उदोजकांची मागणी होती 1200 वरून 550 वर करण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक कंपन्या अमरावतीत येण्यासाठी तयार आहे...
On terrif उद्योग परिणाम
- Tarrif संदर्भात परिणान जाणून घेण्यासाठी, उद्योग क्षेत्रात अभ्यास करणार आहोत.. एक समिती तयार करणार आहे.
7
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 14, 2025 12:46:20Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Narayangaon St Beating
File:01
Rep: Hemant Chapude(Narayangon)
*ब्रेक*
*नारायणगाव/पुणे*
- नारायणगाव पुणे एसटी बस मधे तुंबळ हाणामारी
- हाणामारीचे घटना कॅमेरात कैद
- एसटी बस मध्ये गर्दी असल्याने जागेच्या वादातून हाणामारी
- MH १४ BT ३१६६ या एसटी बस मधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया नारायणगाव पुणे...
10
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 14, 2025 12:45:39Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Bullock Mohite
File:04
Rep'''' Hemant Chapude(Khed)
*राजगुरुनगर/पुणे*
*बाईट दिलीप मोहिते*
- आम्ही जर आंदोलन केले ते राज्यातील सर्व बैलगाडा शौकिनाच्यासाठी आणि बैलगाडा मालकासाठी केले होते
- हे आंदोलन कोणतही राजकीय नव्हते आंदोलनामुळे सरकारचा काही तोटा झाला नव्हता फक्त वाहतून व्यवस्था बिघडली होती
- या आंदोलनात कोणतीही तोडफोड झाली नाही
- रस्ता रोको केला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले
- राज्य सरकाने खटले मागे घेण्याबाबत निर्णय घेतला आहे मात्र हा निर्णय अजून कोर्टापर्यंत आला नाही .
- म्हणून कोर्टाने आम्हाला आज वॉरंट काढले
* *ऑन बैलगाडा श्रेयवाद*
- राजकीय मंडळी या गोष्टीचा फायदा घेणारच
- आढळराव म्हणतात मी दिल्ली पर्यंत लढलो ,वळसे पाटील म्हटले मी लढलो ,खेड तालुका बैलगाडा संघटनेकडून मी ही तिथे लढलोय त्यात महेश लांडगे यांनी राजकीय ताकद लावली या सर्वांचे योगदान आहे
- मी श्रीवादाच्या लढाईत पडलो नाही त्याचा फायदा झाला की तोटा हे माहिती नाही
- आणि या लढाईमध्ये कोणाचा फायदा झाला असं मला वाटत नाही
- अनेक तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थी बैलगाडा शर्यत मध्ये सहभागी होत असल्याने शिक्षणावर परिणाम होत आहे
- अनेक मुले शाळा सोडून बैलगाडा घाटात जातात यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होत आहे
- प्रथा आणि परंपरा चुकीच्या दिशेने जात आहे
- त्यामुळे बैलगाडा शर्यतीवर अडचणी येऊ नये
* *ऑन बैलगाडा शर्यत इव्हेंट*
- सरकारच्या निदर्शनात ही बाबा आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी फक्त ग्रामदैवताच्या यात्रांना परवानगी देत आहे
- वाढदिवसाच्या करता परवानगी दिली नाही तरी लोक काहीतरी मार्ग काढतात हे चुकीचे आहे
- जेव्हढ्या ग्रामदेवतांच्या यात्रा आहेत त्यांनाच सरकारने बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी द्यावी
8
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 14, 2025 12:34:24Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Bullock Court
File:03
Rep: Hemant Chapude(Khed)
*ब्रेक*
*खेड/पुणे*
- बैलगाडा शर्यत बंदी विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये केसला न्यायालयात उपस्थित न राहिल्याने 32 जणांवर अटक वॉरंट
- *अटक वॉरंट मधे भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे ,खेडचे आमदार दिलीप मोहिते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी खासदार बाळा भेगडे यांचा समावेश*
- 2017 मध्ये पुण्याच्या चाकण येथील पुणे नाशिक महामार्ग वर कोणतीही परवानगी न घेता सर्व पक्षीय नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते
- अटक वॉरंट रद्द करण्यासाठी सर्व नेत्यांची खेड उपजिल्हा न्यायालयात धाव
- बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी केलेल्या आंदोलकांवरती असलेले गुन्हे मागे घेण्याची सरकारकडून फक्त घोषणाच
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
8
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 14, 2025 12:34:17Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1408ZT_JALNA_BJP_MORCHA(2 FILES)
जालना : पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात द्या,भाजपा किसान मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अँकर : दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा झालीय.मात्र अनेक शेतकरी अजूनही पिकविम्यापासून वंचित आहेत.या पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पिकविम्याची रक्कम जमा करा अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जालन्यातील जयपूर भागातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाला आहे मात्र बँकांनी थकीत कर्जापोटी पिकविम्याची रक्कम कर्ज खात्यात वळवली आहे.ही रक्कम कर्ज खात्यात न वळवता शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात वाटप करा अशीही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलीय.
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या पीकविमा कर्ज खात्यात वळवू नका
भाजपा किसान मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
7
Report
CFChandrakant Funde
FollowAug 14, 2025 12:18:51Pune, Maharashtra:
पुणे के मशहूर दुर्वांकुर होटल के मालिक शाम मानकर ने छह महीने पहले अपनी 43 साल की बेटी को खो दिया था... कबूतरों की बीट से उसे फेफड़ों की एक गंभीर बीमारी हो गई थी... शीतल मानकर-शिंदे ने 7 साल तक एक जानलेवा बीमारी से लड़ाई लड़ी... उन्होंने अपनी बेटी को बचाने के लिए बहुत संघर्ष किया, लेकिन फिर भी अपनी प्यारी बेटी को नहीं बचा पाए क्योंकि आज भी कबूतरों की बीट से होने वाली फेफड़ों की बीमारी का कोई इलाज उपलब्ध नहीं है... इसलिए जैन समाज को कहीं भी सड़क पर कबूतर नहीं फेंकने चाहिए... क्योंकि कबूतरों की बीट से फेफड़ों में फाइब्रोसिस होता है, जो इंसानों में एक लाइलाज बीमारी है, और मरीज़ ढाई से दो साल में ही मर जाता है, शाम मानकर ने जानकारी दी है... आज उनकी बेटी को गुज़रे छठा महीना हो गया है... इस मौके पर हमने शाम मानकर और उनकी पोती मौली शिंदे से खास बातचीत की...
प्ले चौपाल
मौली शिंदे, मृतक शीतल की बेटी
शाम मानकर, मृतक शीतल के पिता
12
Report