Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

कर्नाटकमध्ये साईभक्ताने अर्पण केले 56 ग्रॅमचे सोन्याचे कडे!

KJKunal Jamdade
Aug 22, 2025 09:31:51
Shirdi, Maharashtra
Anc_ शिर्डीचे साईबाबांना कर्नाटक येथील साईभक्त व्‍यंकप्‍पा घोडके यांनी 56 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे अर्पण केले आहे.. अतीशय सुंदर कलाकुसर असलेल्या या सुवर्ण कड्याची किंमत जवळपास पाच लाख रूपये आहे.. व्यकंप्पा घोडके यांनी साईसमाधीचे दर्शन घेत हे सोन्याचे कडे अर्पण केले . साईबाबा संस्थानकडून देणगीदार साईभक्‍तांचा सत्‍कार करण्यात आला..
6
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Aug 22, 2025 11:48:42
kolhapur, Maharashtra:
नागपुरातील रवी भवन येथीलराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या कार्यालयाकडून भटक्या कुत्र्यांबाबत तक्रार करण्यात आली होती.... याबाबत अशी जयस्वाल यांची प्रतिक्रिया ( याबाबत आपण सकाळी बातमी दाखवली होती ) ---- बाईट- आशिष जयस्वाल नागपूर बाईट- आशिष जयस्वाल,राज्यमंत्री प्रत्येक राज्यात काही निर्बंध असतात वन्यप्रेमी जनता देखील ते सुद्धा राज्याची जनता आहे मोकाट कुत्रा एखाद्याला चावला त्यामुळे नागरिकांना त्रास होतो, रेबीज होऊ शकतो योग्य ते बंदोबस्त सर्वांच्या संबंधितांच्या भावना लक्षात घेऊन झाला पाहिजे. न्यायालयाने वेळोवेळी काय निर्णय दिले त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे प्रश्न उद्भवला असेल तर त्यावर उत्तर शोधले पाहिजे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 22, 2025 11:48:29
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग DHARA_R1_PATEL निवडणूक मॅनेज करायची ताकत आमच्यात असती तर धाराशिवचे खासदारही निवडून येऊ दिले नसते पडल्यानंतर कितने खट्टे हे अंगूर म्हणण्याची सवयच आहे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापुरातील बोगस मतदार प्रकरणावरून आरोप केल्यानंतर भाजप नेते पाशा पटेल यांचा पलटवार तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 6000 बोगस मतदार नोंदवण्यात प्रकरणात ओमराजे निंबाळकर यांनी दिल्लीत घेतली होती पत्रकार परिषद भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा केला होता आरोप बोगस मतदार प्रकरणात निवडणूक आयोगाने अर्ज बाद केलेत, याप्रकरणी पोलिसांकडून तपास न झाल्याचा ओमराजे निंबाळकर यांचा आहे आरोप भाजप नेते पाशा पटेल यांनी दिले आरोपांना उत्तर Byt: पाशा पटेल, भाजप नेते
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 22, 2025 11:48:20
Bhandara, Maharashtra:
देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची वकिली करणे सोडा...आणि राहुल गांधी यांची मागे लागणे भाजपने सोडावे...लोकशाहीची हत्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप करते आहे.;- नाना पटोले Anchor ;- देवेंद्र फडणवीस आपल्याला विनंती आहे की निवडणूक आयोगाची वकिली का करत आहात पृथ्वीराज चव्हाण यांच्या परिवारातील चार लोकांची नाव डबल टिबल आली असेल याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे म्हणून आम्ही वारंवार सांगतोय की निवडणूक आयोग या प्रकारची गडबड चालू आहे ही निवडणूक आयोगाने थांबवली पाहिजे अतिरिक्त मत येतात कसे राजीव गांधींनी डिजिटल व्यवस्था निर्माण करून दिली आहे त्याची आपण वापर करत आहोत पण निवडणूक आयोग असे चार चार नाव ठिकाणी येणे हे चुकीचे आहे म्हणून आमचे नेते राहुल गांधी निवडणूक आयोगाला म्हणतात की पारदर्शकतांना आणा तुम्ही येऊन जाऊन राहुल गांधी यांच्याच मागे लागतात असा सल्ला आपल्याला आहे की पृथ्वीराज चव्हाण यांच्या यांच्या घरातील मत जास्त आले असतील तर आमच्या काही समर्थन राहू शकत नाही म्हणून सर्व सिस्टीम दुरुस्त झाली पाहिजे आणि लोकशाहीची हत्या निवडणूक आयोगाने माध्यमातून भाजप करते आहे हे तुम्ही सांगा आणि त्यांची वकिली करणे सोडा.. BYTE :- नाना पटोले ANCHOR :- महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार कसं महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला लुटत आहे यातूनही स्पष्ट होते...... सरकार एकीकडे अदानी अंबानींना पैसे देण्यासाठी लागली आहे आणि गोरगरिबांना लुटायचं काम करत आहे. मी विधानसभेत जेव्हा प्रश्न उपस्थित केला की पोलिसांना कारवाईची टार्गेट देऊन सरकारची तिजोरी भरली जाते. तेव्हा राज्याच्या सरकार विधानसभेत सांगतो की आम्ही कुठलं टार्गेट दिलं नाही. पण माझ्याजवळ पोलिसांचा व्हाट्सअप ग्रुप वरचा डिस्कर्शन आहे. यात वरिष्ठांनी त्यांना इतक्या कारवाईच्या सूचना केल्याचे ते सांगतात. आणि हा टार्गेट दिल्याचं इथून दिसत आहे. माझ्या सरकारला सवाल आहे की गोरगरिबाला लुटायचा आहे. लाडक्या बहिणींना लुटायचा आहे? ते सरकारने तात्काळ थांबवलं पाहिजे. नाहीतर विधानसभेत सरकारने खोटी माहिती दिल्याबद्दल सरकारवर अविश्वास आणावा लागेल. गोरगरिबांची लूट बरोबर नाही फडणवीसांनी स्वतः यावर लक्ष दिले पाहिजे अशी आमची त्यांना विनंती.....((भंडारा जिल्ह्यात वाहतूक पोलिसांना कारवाईचा टार्गेट दिल्याचे व्हाट्सअप स्क्रीन शॉट समोर आले त्यावर ते बोलत होते)) BYTE 01 :- नाना पटोले (1:31) .... .... .... ANCHOR:- माझी फडणवीसन नाही इतकीच विनंती आहे की तुम्ही निवडणूक आयोगाची वकिली करू नका. सिरीयल एडवोकेट म्हणजे वकिली आपण जे करत आहात तो एक प्रकारे निवडणूक आयोग जे चुकीचे कार्य करत आहे. त्यांची वकिली फडणवीसांनी करू नये कारण एखाद्याची दोन-तीन नाव कशी आली आहे तपासणीचं काम निवडणूक आयोगाचा आहे आमची भूमिका तीच आहे. राहुल गांधी ही तेच म्हणत आहेत. पण मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यांनाही आमची विनंती आहे निवडणूक आयोगाच्या चुकीवर तुम्ही बोट ठेवा, आणि तुमची नेते मोदी त्यांनाही सांगा निवडणूक आयोगाचे पाप थांबवा... देवेंद्र फडणवीसजी आपण खोटी वकिली करू नका.... BYTE 02 :- नाना पटोले (1:21) .... .... .... ANCHOR :- सहा महिन्यापूर्वी तुम्ही महाराष्ट्रात ज्या संजीव कुमार वर गुन्हे दाखल केले ते कोणी करवले.?? तर तुमच्या तलाठ्याने केले. मग त्याला सांगितलं तुला जेलमध्ये टाकतो त्या धाकाने त्याने माफी मागितली. माझा एक मुद्दा आहे त्याने आकडे बरोबर दिले नाही. खोटी माहिती दिली संस्थेच्या विरोधात जर गैरसमज केला. संस्थेने पुढे यावं. त्याचे जे मुख्य सीआय आहे ते काय सांगतात पाच वाजताच्या नंतरचे जे मतदान झाले त्या मतदानाला आम्ही दाखवलं तर महिलांचा अपमान होईल. त्यात त्यांचा अपमान काय होणार? जे पोरकट वक्तव्य निवडणूक आयोग देतयं म्हणजे तुम्ही काहीतरी लपवल्याचं लक्षात येतं. आणि लोकांचा संशय पुन्हा वाढवता. का नाही तुम्ही फोटेजेस दाखवत?? तुम्ही देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आले ते वोटचोरीने आले का?? निवडणूक आयोगाच्या वोटचोरी मध्ये तुम्ही सामील आहात का? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे तुम्ही निवडणूक आयोगाची वकिली करू नका आणि सिरीयल लायर बनू नका. BYTE 03 :- नाना पटोले (1:41) .... .... .... ANCHOR:- बिलकुल राहिलेच नाही. अटल बिहारी वाजपेयींचा विचार भाजपने संपवलाय. आता जी विचारसरणी आहे अमित शहा मोदींची ही विचारसरणी भारतासाठी घातक आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा विचार देशाप्रती होता म्हणून ते विरोधी पक्षात असताना सुद्धा जागतिक पातळीवर जेव्हा दोन देशांच्या समेट घडवायचे असेल तर त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांना काँग्रेस पाठवायची. ही या पद्धतीची भूमिका होती आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांची तुलना नरेंद्र मोदी आणि अमित शहा सोबत होऊ शकत नाही. हे देशासाठी विघागातक आहेत..... चायनाला समर्पित आहेत चायना जे सांगेल ते करण्याचं काम अमित शहा आणि मोदी या देशात करतात..... BYTE 04 :- नाना पटोले (0:56) .... .... .... ANCHOR:- मला कोणाबद्दल ची प्रतिक्रिया देण्याचा कारण नाही पण महाराष्ट्राचा सरकार आणि केंद्राच सरकार हे सातत्याने ओबीसी वर अन्याय करत आहे. हे स्पष्ट होत आहे. पोरांच्या स्कॉलरशिप सुद्धा मिळत नाही शिष्यवृत्ती दिल्या जात नाही होस्टेल त्यांना दिले असं सरकार विधानसभेत सांगत. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी हॉस्टेल सुद्धा तयार झाले नाही किरायाच्या घरामध्ये भरवले आहे अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी पोरांच्या शिक्षणाच्या व्यवस्था नाहीत. अशा या परिस्थितीमध्ये ओबीसी विरोधी धोरण जे भाजपचा आहे. त्या भाजपच्या विरोधात सर्व ओबीसींनी एकत्रित यावं असं माझं आवाहन करणार आहे. कारण जातीजातीमध्ये तुकडे करण्याचे जि भूमिका भाजपने व्यक्त केली होती तिला कोणीही चालना देऊ नये एवढेच आमचं सगळ्यांना विनंती आहे......(( ओबीसी समाजाचे नेतृत्व धनगर समाजाकडे गेल्याने माळी समाजाच्या नेत्यांच्या पोटात दुखतो असे वक्तव्य हाके यांनी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावर ते बोलत होते)) BYTE 05 :- नाना पटोले (3:18) .... .... .... ANCHOR:- परवा लोकसभेत अमित शहा ने घटना दुरुस्तीचे प्रस्ताव आणला, 30 दिवस मुख्यमंत्री असो किंवा मंत्री, पंतप्रधानही असो कोणीही 30 दिवस जरी जेलमध्ये राहिला तर त्यांना त्या पदावरून मुक्त करण्याच अधिकार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राहील असा कायदा आणला. खरंतर या पद्धतीचा एक भीती निर्माण करून खोट्या केसेस मध्ये ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ईडीला फटकारलं, की तुमच्या आहे एकही केसेस अप्रू होत नाही. तुम्ही निर्दोष लोकांवर या पद्धतीची कारवाई करता... यावरून आपल्याला हे पाहायला मिळतं की खोट्या केसेस या मोठ्या प्रमाणात झाले आहेत आणि म्हणून केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करणे हा अमित शहा आणि मोदी दोन्ही प्रमाणीकपणे करत आहेत. असं पाहायला मिळतं म्हणून सामन्यामध्ये जी टीका पहायला मिळाली ती लोकशाहीमध्ये ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाबद्दल बोलतो तर फडणवीस वकिली करतात निवडणूक आयोगाची. आजही ते बोलत होते की पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडची दोन -दोन तीन लोकांची मत आहेत. तर निवडणूक आयोगात वर आमचा तोच प्रश्न आहे. निवडणूक आयोग काय झोपला होता का? आम्ही विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर न देता आता भाजप काँग्रेस वरच आरोप करत आहे. निवडणूक आयोगाने याची स्पष्ट करावी आणि लोकांच्या मताच्या संरक्षण करावं ही भूमिका आमची आहे. सध्या बिहारमध्ये त्यांची यात्रा सुरू आहे आणि लोकांचा मोठा प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणून फडणवीसांनी वकिली थांबवावी. ((सामनातून अमित शहा वर टीका करण्यात आली होती...... त्यावर नाना पटोले बोलत होते)) BYTE 06 :- नाना पटोले (3:18) .... .... ....
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 22, 2025 11:47:37
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग DHARA_PASHA_PTEL निवडणूक मॅनेज करायची ताकत आमच्यात असती तर धाराशिवचे खासदारही निवडून येऊ दिले नसते पडल्यानंतर कितने खट्टे हे अंगूर म्हणण्याची सवयच आहे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापुरातील बोगस मतदार प्रकरणावरून आरोप केल्यानंतर भाजप नेते पाशा पटेल यांचा पलटवार तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 6000 बोगस मतदार नोंदवण्यात प्रकरणात ओमराजे निंबाळकर यांनी दिल्लीत घेतली होती पत्रकार परिषद भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा केला होता आरोप बोगस मतदार प्रकरणात निवडणूक आयोगाने अर्ज बाद केलेत, याप्रकरणी पोलिसांकडून तपास न झाल्याचा ओमराजे निंबाळकर यांचा आहे आरोप भाजप नेते पाशा पटेल यांनी दिले आरोपांना उत्तर Byt: पाशा पटेल, भाजप नेते
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 22, 2025 11:47:16
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात 32 लाखांची एमडी अंमली पदार्थ हस्तगत उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई Ulh drugs seized Anchor उल्हासनगर गुन्हे शाखेने   32 लाखाची एमडी पावडर हस्तगत केली असून एका आरोपीला अटक केली आहे , Anchor अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव दर्गा परिसरात एक व्यक्ती एम डी पावडर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला  मिळाली होती. ह्या माहितीच्या आधारे  यांनी सापळा रचून पोलीस पथकाने छापा टाकून फरहान हबीब चौधरी याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 161 ग्रॅम एमडी, मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण 32 लाख 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उल्हासनगर गुन्हे शाखा करीत आहे.  चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 22, 2025 11:46:24
Beed, Maharashtra:
बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; लाभ घेतलेल्या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार..! anc- शासकीय सेवेत असणाऱ्या राज्यातील ११८३ महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये बीड जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या १४५ शासकीय महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आढळून आला आहे. आणि याच महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. राज्यातील गरजू आणि गरीब महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अमलात आणली. राज्यातील लाखो महिलांना याचा मोठा फायदा झाल्याच देखील समोर आले.. आर्थिक निकषावर आणि अटीवर महिलेला या योजनेचा लाभ घेता येतो.. परंतु शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी देखील प्रशासनाची दिशाभूल करत या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल आहे. याबाबतचे पत्र बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले असून त्यानुसार संबंधित महिला कर्मचाऱ्याला नोटीस बजावून कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सिओंनी दिली आहे.. बाईट: जितिन रहमान - बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 22, 2025 11:45:45
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - आ. सदाभाऊ खोत यांना लाथ घालून त्यांची हकालपट्टी करा, सोलापुरात गोरक्षक आक्रमक ( 1 to 1 ) ((( सदरच्या 1 to 1 मध्ये गोरक्षकांनी अपशब्दाचा वापर केला आहे त्या ठिकाणी बीप टाकावे विनंती ))) - रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत यांच्या विरोधात सोलापुरातील गोरक्षक आक्रमक.. - आ. सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांबाबत सांगोल्यात केलेल्या विधानाचा व्यक्त केला तीव्र निषेध.. - आमदार सदाभाऊ खोत यांना सोलापुरात आल्यानंतर काळे फासण्याचा इशारा - आ. सदाभाऊ खोत यांच्या गा××× लाथ मारून हकालपट्टी करण्याची मागणी - गोरक्षक जर पैसा घेत असते तर सदाभाऊ सारखे श्रीमंत झाले असते, आमदार झाले असते याविषयी गोरक्षकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( 1 to 1 )
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 22, 2025 11:33:14
Beed, Maharashtra:
बीड: वडवणीतील सरकारी वकील आत्महत्या प्रकरण, न्यायाधीशावर गुन्हा दाखल करण्यासाठी वकील संघ आक्रमक, पोलिस अधीक्षकांची घेतली भेट Anc: बीडच्या वडवणी येथील न्यायालयात एका सरकारी वकिलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेने राज्यभरात मोठी खळबळ उडाली. आत्महत्या करण्यापूर्वी मयत वकिलाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये न्यायाधीश आणि कारकून यांचे नाव असल्याचे समजते. मात्र चिठ्ठी अद्याप समोर आलेली नाही. याच अनुषंगाने बीड जिल्हा वकील संघ कारवाईसाठी आक्रमक झाले आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे जो कोणी आरोपी असेल त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र घटना घडवून तीन दिवस उरले असले तरी अद्याप याप्रकरणी कसलाही गुन्हा दाखल झाला नाही. संबंधित आरोपींवर चौकशी करून गुन्हा दाखल करावी या मागणीसाठी बीडच्या वकील संघाने आज पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली. कारवाई तात्काळ करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा वकील संघाने दिला आहे. बाईट: भीमराव चव्हाण - वरिष्ठ ॲड
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Aug 22, 2025 11:33:05
Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pimpri mask man kailas puri Pune 22-8-25 feed by 2c Anchor : पिंपरी चिंचवड शहरातील निगडी मध्ये हातात चाकू घेऊन फिरणाऱ्या मास्क मॅन चा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.... त्याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. हातात धारदार चाकू घेऊन फिरणारा मास्क मॅन हा मनोरुग्ण भंगार वेचक असल्याच पुढ आलंय...! मच्छिंद्र नारायण नवघिरे वय 68 वर्ष अस मास्क मॅन व्यक्तीच नाव आहे. मच्छिंद्र नारायण नवघिरे हा कचरा आणि भांगर वेचक असून तो निगडी मध्ये कचरा आणि भांगर वेचकाच काम करून उदरनिर्वाह करतो...! मच्छिंद्र नारायण नवघिरे याच वागणं हे दहशत निर्माण करणार असल्याने निगडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याला समज पत्र दिल आहे. byte - भोजराज मिसाळ , पोलीस निरीक्षक निगडी पोलीस स्टेशन
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 22, 2025 11:23:33
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2208ZT_WSM_MAHILA_POLA रिपोर्टर : गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यातील ढोरखेडा गावात मागील ८ वर्षांपासून महिलांना बैलपोळा साजरा करण्याचा मान दिला जात आहे.पारंपरिकरीत्या शेतकरी पुरुषांचा सण मानला जाणारा पोळा येथे महिलांनी उत्साहात साजरा केला. सकाळपासूनच महिलांनी बैल सजवून, पूजा करून व कासरे हाती घेऊन मोठ्या थाटामाटात सण साजरा केला.पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना स्थान मिळावे यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 22, 2025 11:20:48
Beed, Maharashtra:
बीड:जिवलग मैत्रिणीच्या प्रियकरावर जडलं प्रेम; सख्या मैत्रिणीनेच मैत्रिणीला संपवले.. बीड मधल्या त्रिकोणी प्रेमाचा करून अंत..!! Anc:रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नातं सर्वश्रेष्ठ असते.. हे अनेक काव्यपंक्तीतून समोर आले. मात्र मैत्रीचं नातं बीडमध्ये कलंकित झाले आहे. प्रियकरावर डोळा ठेवल्याने मैत्रिणीने मैत्रीणचा गळा दाबून खून केलाय. एखाद्या चित्रपटातील कथानकालाही मागे टाकेल अशा क्रूर घटनेने बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. पाहूयात बीड मधील त्रिकोणी प्रेमाची क्रूर कहानी... बीड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपी महिलेकडे जरा नीट पहा... तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिने केलेल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप दिसून येणार नाही... माझ्या प्रियकरावर का प्रेम केलंस? म्हणून सख्ख्या मैत्रिणीचा तिने गळा दाबून खून केलाय.. सिनेमातल्या कथानकाला देखील मागे पाडेल अशी क्रूर घटना या आरोपी महिलेने केलीय.. बीडच्या अंबिका चौक परिसरात वृंदावनी फरताळे या आरोपी महिलेचे घर आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस दलात होमगार्ड पदावर असलेल्या आयोध्या व्हरकडे आणि वृंदावनी फरताळे या दोघींची मैत्री जमली. दोघेही तीन वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंधात होत्या. याच काळात वृंदावनी हिचा प्रियकर घरी येत होता. त्याच दरम्यान त्याची ओळख होमगार्ड अयोध्या यांच्याशी झाली.. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि थेट मैत्रिणीलाच आव्हान देण्यात आले.... मात्र मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करण्याने आपल्याला जीव गमावा लागेल याची पुसटशी कल्पना आयोध्याला नव्हती... आणि मग होत्याचे नव्हते झाले.. एका दिवशी आयोध्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली आणि माझ्या प्रियकराचा नाद सोड आम्ही विवाह करणार आहोत.. असं म्हणत दोघींनी एकमेकांशी बाचाबाची केली. याच दरम्यान आयोध्या यांनी विषारी औषध प्राशन केले आणि इथेच डाव फसला.. अयोध्या तडफडत असताना वृंदावनी हिने आधी तोंड दाबले नंतर तिची गळा दाबून निर्घुण हत्या केली. बाईट:गजानन क्षीरसागर - सहाय्यक पोलीस निरीक्षक आयोध्या यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वीच अपघाती निधन झाले होते. त्यानंतर आयोध्या पोलीस दलातील होमगार्ड सेवेत रुजू झाल्या. त्यांना पोलीस दलात जायचं होते. त्यासाठी बीडमध्ये त्या सराव करत होत्या. मात्र तीन दिवसापासून त्यांचा फोन बंद आला. आणि नातेवाईकांनी शोधा शोध सुरू केली. कुठेही आयोध्याचा संपर्क झाला नसल्याने नातेवाईकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयोध्या मिसिंग असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अवघ्या 24 तासात याचा छडा लावत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. काल सायंकाळी आयोध्या यांच्या मृतदेचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र अद्याप त्याचा अहवाल आला नाही. त्यामुळेच पोलिसांनी तात्काळ अहवाल मिळवून घटनेची शहानिशा करून यात किती आरोपी आहेत? याचा उलघडा करावा अशी मागणी मयत होमगार्ड महिलेच्या नातेवाईकांनी केलीय. बाईट: आयोध्या यांचे नातेवाईक मैत्रीचं गाणं गाताना, शब्द माझे अडखळले. तुझ्यासोबत असताना, मन माझं मोहरले. तुझा हात हातात होता, अन् विश्वास डोळ्यांत. कधीच वाटलं नव्हतं, फसवशील एका क्षणात. आज ती गाथा विसरली, ज्याला 'मैत्री' म्हटलं. अश्रूंनी डोळे भरले, जेव्हा तुझं रूप कळलं. या काव्यपंक्तीतले हे शब्द ऐकून तुमच्या अंगावर शहारा आला असेल.. मृत्यूनंतर मात्र आयोध्या यांच्या आत्म्याने कदाचित हेच बोल पुटपुटले असतील... त्यामुळे मित्रत्व करत असताना चाहू बाजूने विचार केला पाहिजे... मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करणं एवढं महागात पडेल अस आयोध्याला कधीच वाटलं नव्हतं. प्रेमाच्या या गणिती काटकोन त्रिकोणातील प्रेमाचा अंत एवढा भयान आणि भीषण होईल.. याचा स्वप्नात विचार देखील केला नाही. आणि याच घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे... MY END PTC MAHENDRAKUMAR MUDHOLKAR BEED
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Aug 22, 2025 11:19:53
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_DanveByte Feed on - 2C ------------------------- Anchor - ढगफुटी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. कोल्हापुरमध्ये सरकारने पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी ज्या प्रमाणे विशेष पॅकेज दिले होते त्याप्रमाणे सरकारणे नांदेडसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. दानवे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. ढगफुटी आणि पुरामुळे मुखेड तालुक्यात 9 जणांचा मृत्यू झालाय. तर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेकडो जाणवरांचाही मृत्यू झालाय. त्यामुळे सरकारने विशेष पॅकेज देऊन मदत करावी अशी मागणी दानवे यांनी केली. Byte - अंबादास दानवे - विरोधी पक्षनेता ------------------------------------
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 22, 2025 11:01:19
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ च्या पोस्टल ग्राउंड वर नगर परिषदेने भरविलेल्या बैल पोळ्यात आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी बैलांची पूजा करून पोळा फोडला. शेतकऱ्यांच्या सर्जा-राजाचा सण असलेल्या 'पोळा' निमित्त यावेळी शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. पोळ्याला बैलांचा थाट असतो. त्यांचाकडून कोणत्याच प्रकारची कामं करून घेतली जात नाहीत. त्यानुसार गावागावात पारंपारिक पद्धतीने पोळा भरला. यवतमाळ मध्ये 'एक नमन गौरा पार्वती, हर बोला, हर हर महादेव' चा गजर करीत शेतकऱ्यांनी झडत्या म्हटल्या, शेतकऱ्यांनी रमी खेळणारे मंत्री व लाडकी बहीण अशा मुद्द्यांवर झडत्या म्हणून सरकारवर ताशेरे ओढले, त्यानंतर उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिस वितरित करण्यात आले. झडत्या : नितीन कोल्हे : शेतकरी
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 22, 2025 10:47:40
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2208ZT_JALNA_FARMER_DMND(10 FILES) जालना | बैलांच्या पाठीवर कर्जमाफीची घोषवाक्ये बैलपोळ्यानिमित्त सरकारला दिली कर्जमाफीची आठवण सातबारा कोरा करण्याची शेतकऱ्याची अनोख्या पद्धतीने मागणी अँकर|  जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील सोयंजना गावात एका शेतकऱ्याने बैलांच्या पाठीवर कर्जमाफीचे घोषवाक्ये लिहून सरकारला कर्जमाफीची आठवण करून दिलीये.. सोयंजना गावातील वैजनाथ ढवळे यांची ही बैलजोड असून ते प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत.. सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतही सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळं सातबारा कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे अशी घोषवाक्ये बैलांच्या पाठीवर लिहून सरकारला कर्जमाफीची आठवण करून देत अनोख्या पद्धतीने कर्जमाफीची मागणी केली आहे. बाईट- श्रावणी वैजनाथ ढवळे, शेतकरी कन्या
5
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 22, 2025 10:36:34
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 2208ZT_DAUNDUPRASHTPTI BYTE 1 दौंड तालुक्यातील तरुणाने भरला थेट उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज अँकर:- भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातील सहजपुर गावच्या उमेश म्हेत्रे या तरुणाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नवी दिल्ली मधील राज्यसभेतील दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी.मोदी व गिरीमा जैन याच्याकडे उमेदवारी अर्ज आणि 15000 रुपयांचे डिपॉझिट जमा करून अर्ज दाखल केला. त्यांच्या या कृतीने सर्वजण आश्चर्यचकित झाले असून थेट भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मी अनेकांचे सेवा करीत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले आहे. बाईट : उमेश म्हेत्रे, उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला तरुण...
1
comment0
Report
Advertisement
Back to top