Back
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा भटक्या कुत्र्यांवरील गंभीर इशारा!
AKAMAR KANE
Aug 22, 2025 11:48:42
kolhapur, Maharashtra
नागपुरातील रवी भवन येथीलराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या कार्यालयाकडून भटक्या कुत्र्यांबाबत तक्रार करण्यात आली होती.... याबाबत अशी जयस्वाल यांची प्रतिक्रिया
( याबाबत आपण सकाळी बातमी दाखवली होती )
----
बाईट- आशिष जयस्वाल
नागपूर
बाईट- आशिष जयस्वाल,राज्यमंत्री
प्रत्येक राज्यात काही निर्बंध असतात वन्यप्रेमी जनता देखील ते सुद्धा राज्याची जनता आहे मोकाट कुत्रा एखाद्याला चावला त्यामुळे नागरिकांना त्रास होतो, रेबीज होऊ शकतो योग्य ते बंदोबस्त सर्वांच्या संबंधितांच्या भावना लक्षात घेऊन झाला पाहिजे. न्यायालयाने वेळोवेळी काय निर्णय दिले त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे प्रश्न उद्भवला असेल तर त्यावर उत्तर शोधले पाहिजे.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowAug 22, 2025 13:05:30Shirdi, Maharashtra:
Newasa News Flash
*अहिल्यानगर जिह्यात आणखी एका शेतकऱ्याने संपले जीवन...*
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल...
*नेवासा तालुक्यातील गोयगव्हाण येथील नानासाहेब केशव ठोबळ या 45 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या...*
विषारी औषध पिऊन केली आत्महत्या...
*कर्जाचा डोंगर आणि कपाशीसाठी खते, औषधे घ्यायला पैसे नसल्याने टोकाचे पाऊल...*
*अहिल्यानगर जिह्यात गेल्या आठ दिवसात दुसरी शेतकरी आत्महत्या...*
17 ऑगस्ट रोजी नेवासाच्या वडूले गावातील बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्याची आत्महत्या...
तर काल 21 ऑगस्ट रोजी नानासाहेब ठोबळ या शेतकऱ्याने संपवले जीवन...
ठोबळ यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि वृद्ध आई असा परिवार...
*ठोबळ यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने ग्रामस्थांनी केली वर्गणी...*
प्रहार संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग औताडे यांची माहिती...
*या आत्महत्या नाही तर सरकारी धोरणाने घेतलेले बळी...*
प्रहार संघटनेचा आरोप...
Byte - सुरेखा नानासाहेब ठोबल, पत्नी
Byte - दत्तात्रेय खाटीक, ग्रामस्थ
Byte - पांडुरंग औताडे, युवक जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 22, 2025 12:48:12Akola, Maharashtra:
Anchor : वर्षभर शेतकऱ्यासोबत राब-राब राबत रक्ताचे पाणी करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच पोळा... महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पोळा म्हणजे अनेक परंपरांनी समृद्ध झालेला..अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये मात्र चक्क गाढवांचा पोळा भरला होताय. सजून-धजून आलेली गाढवं अन लोकांनी केलेल्या गर्दीमूळं अकोटमधील हा पोळा हटके ठरलाय.चला पाहूयात अकोटमधील हा हटके पोळा....
Vo 1 : गाढव... नेहमीच सर्वांच्या तिरस्काराचा विषय... परंतू हीच गाढवं सुंदर असतात काय?, असं तूम्हाला कुणी विचारलं तर याचं उत्तर 'होय' असं आहेय. कारण, अकोटमधील ही द्रूष्य तूमचं असं मत बनविण्यासाठी पूरेसी आहेयेत. बरं पोळा म्हटलं की बैलच आपल्या डोळ्यासमोर येतील.. पण अकोटमध्ये आज चक्क गाढवांचा पोळा भरलाय. आज अकोटमधील रामटेकपूरा येथे गाढवांचा पोळा भरला होताय. पोळ्याच्या दिवशी आणि दुसर्या दिवशी सुद्धा हा पोळा भरतोय.या गावातील भोई समाजानं गेल्या ५० वर्षांपासून ही परंपरा जपलीये...अकोट शहरातील अनेक कुटूंबांचा उदरनिर्वाह गाढवांवर चालतोय. वर्षभर या गाढवांवर माती, दगड, वाळू आणि लाकडं वाहण्याचं काम हे लोक करतात.
Byte : श्रीराम कंडाळे, गाढव मालक..
Vo 2 : गाढवावर सुरू असलेल्या या समाजाचा व्यवसाय आता शेवटचे घटक मोजत आहेत आणि त्यामुळे भविष्यात हा गाढवाचा पोळा भरणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
Byte : दीपाली कंडाळे
Final Vo : आपल्या भारतीय संस्क्रूतीनं नेहमीच श्रमाला प्रतिष्ठा दिलीय. अकोटमधील गाढवांचा हा पोळा नेमका याच संस्कृतीला उजाळा देणारा आहेय, असं म्हणता येईल...
जयेश जगड,
झी मिडिया,
अकोला.
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 22, 2025 12:47:28kolhapur, Maharashtra:
Ngp Qr Map marbat
live u ने फीड पाठव
-------------
नागपूर
मारबत- बडग्या उत्सव परंपरेने नागपूरला जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करून दिलीय... देशा विदेशातून अनेक जण हा मारबतोत्सव आणि त्यासोबत निघणारे प्रतिकात्मक बडगे पाहण्याकरता नागपुरात पोहोचत असतात.... मात्र दाटी-वटीची वस्ती असलेला महाल, इतवारी, मस्कासाथ परीसर तिथल्या निमुळत्या गल्ल्या यामध्ये तिथे असलेले बडग्या, मारबत हे पाहण्यासाठी परिसराची जाण नसलेल्या बाहेरील लोकांना अनेकदा बराच त्रास होतो.... हेच लक्षात घेऊन
नागपूरातील मारबत व बडग्याची ठिकाणे आणि बदललेला मिरवणुकीचा मार्ग नागरिकांना सोप्या पद्धतीने समजावा यासाठी तरुण युवाकांकडून QR लोकेशन गाईड तयार करण्यात आलेय.
नागरिकांनी फक्त Google Lens ने QR कोड स्कॅन करावा आणि नकाशावर थेट मार्ग व ठिकाणे पाहता येतील. कोणत्याही बडग्या उत्सव मंडळ व मारबत उत्सवाच्या ठिकाणी गेल्यानंतर हे Qr मॅप लोकेशन त्यांना उपलब्ध होईल.तसेच,मारबत-बडग्या उत्सवाला अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये (Unesco Intangible Cultural Heritage) आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळावी यासाठी तरुण युवक यांच्या पुढाकारातून मोहीम सुरु आहे. या मोहिमेत प्रत्येक मारबत व बडग्या समितीकडून जनजागृती अभियान व ठराव (Resolution) पारित केला जात आहे. या पारंपारिक उत्सवाला तरुणाईने दिलेली टेक्नॉलॉजी ची साथ नक्कीच उल्लेखनीय आहे... याबाबत त्यांच्याकडून जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
-------
बाईट
श्रेयश सोमकुंवर
स्वराज अंबुलकर
आभा पांडे, काळी मारबत उत्सव समिती
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 22, 2025 12:46:44Chakan, Maharashtra:
Feed 2C
Slug: Chakan Accident
File:02
Rep: Hemant Chapude(Chakan)
ब्रेकिंग – चाकण, पुणे
Anc :- पुणे-नाशिक महामार्गावर चाकण चौकात प्रवासी रिक्षाचा अपघात झालाय
Vo :- पुणे नाशिक महामार्गालगत चाकण चौकात साचलेल्या पाण्याच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने रिक्षा थेट पाण्यात घसरली. या रिक्षामध्ये प्रवासी असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी प्रवाशांच्या जिवाशी सरळसरळ खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.
महामार्गावर साचलेले पाणी, खड्डे आणि वाहतूककोंडी यामुळे अपघातांची मालिका सुरू असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया चाकण पुणे...
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 22, 2025 12:35:55Parbhani, Maharashtra:
अँकर- श्रावण महिन्यात महादेवाची मोठ्या प्रमाणात भक्ती
केली जाते आणि महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावस्येला महादेवाचे वाहन असलेल्या नंदीची पूजा केली जाते. याच पिठोरी अमावस्येला शेतकरी ज्यांच्या जीवावर शेती कसतो त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा करतात.बैलांना धुवून,शिंगाला रंग लावून आकर्षक झुली,गोंडे रंगीबेरंगी सजावट करून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. परभणी जिल्ह्यात येथे मोठ्या बैल पोळा साजरा करण्यात आला. बैलपोळा साजरा करून शेतकरी बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत असतात.
4
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 22, 2025 12:35:26Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव:
DHARA_POLA
धाराशिव जिल्ह्यातील बैलपोळा सणावर मनोज जरांगे पाटलांची छाप
बैलाच्या पाठीवर मनोज जरांगे पाटलांच चित्र रेखाटले , बैलाच्या मिरवणुकीत मनोज जरांगे यांच्या समर्थनाची वाजली गाणी
एक मराठा लाख मराठा घोषणा बैलांच्या पाठीवर लिहिली
मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला येण्याची बैलपोळा सणातून शेतकऱ्याकडून साद
धाराशिव जिल्ह्यातील भाटशिरपुरा येथील शेतकऱ्याकडून अनोख्या पद्धतीने पोळा सण साजरा
यापूर्वीही आकाशकंदीलावर झळकले होते मनोज जरांगे पाटलांचे फोटो
1
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 22, 2025 12:30:32Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2208_BHA_NANA_POLA
FILE - 8 VIDEO
भंडाऱ्यात नाना पटोले यांची बैलपोळ्यात हजेरी....
ANCHOR :- भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सुकळी येथे काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी आपल्या मूळ गावी बैलपोळा साजरा केला. मुसळधार पावसातही त्यांनी गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करून सणाचा आनंद लुटला. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उत्सवाच्या निमित्ताने गावात आनंदाचे वातावरण होते. पोळ्याच्या दिवशी गावकऱ्यांसोबत राहण्याचा आनंद व्यक्त करत पटोले यांनी परंपरेचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीने गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
...
BYTE :- नाना पटोले
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 22, 2025 12:06:36Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरच्या फार्व्हर लाईन ते मध्यवर्ती रुग्णालयपर्यंत रस्त्याची दुरावस्था,
नागरिकांचा संताप ,ड्रोनच्या माध्यमातून टिपले दृश्य
Ulh potholes
Anchor रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते; अशी परिस्थिती सद्या उल्हासनगर शहरात निर्माण झालीय,सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहन चालक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,विशेष म्हणजे फार्व्हर लाईन ते मध्यवर्ती रुग्णालयपर्यंत रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झालीय,गणपती बाप्पा आगमनापूर्वी शहरातील खड्डे बुजवले जातील असा दावा महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी केलंय परंतु आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असून रस्त्यांची अवस्था जैशे थेच असल्याने नागरीक अक्षरशः जीवमुठीत घेऊन प्रवास करत आहे,
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
2
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 22, 2025 12:06:22Beed, Maharashtra:
बीड: सरकारी वकिल आत्महत्या प्रकरण: अखेर न्यायाधीशासह अन्य एकावर गुन्हा दाखल.. न्यायालयीन क्षेत्रात खळबळ..!
Anc: आरोपींना कटघेऱ्यात उभे राहण्याचे आदेश देऊन शिक्षा सुनावणाऱ्या एका न्यायाधीशावरच आरोपीच्या कटघेऱ्यात उभा टाकण्याची वेळ आली आहे. बीडच्या वडवणी न्यायालयातील सरकारी वकिलाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात न्यायाधीशासह अन्य एकावर अखेर गुन्हा दाखल झालाय. दोन दिवसांपूर्वी वडवणी न्यायालयातील विनायक चंदेल या सरकारी वकिलाने न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेत पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोट्सच्या आधारे आणि कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडवणी न्यायालयाचे न्यायाधीश रफिक शेख आणि अन्य एकावर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेलाय.
आज चंदेल कुटुंबाने वडवणी पोलिसांची भेट घेतली विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजीत चंदेल याच्या फिर्यादीवरून सदरील गुन्हा नोंदविला गेलाय. न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्याकडून विनायक यांना वारंवार त्रास दिला जात होता. आणि त्यामुळेच त्यांनी याला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी चंदेल कुटुंबाने केली आहे. एका न्यायाधीशावर गुन्हा दाखल होण्याची कदाचित ही पहिली वेळ असेल.. दरम्यान घटना घडल्यानंतर न्यायाधीशाने पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. पोलिस आता आरोपी न्यायाधीशाचा शोध घेत आहेत.
बाईट: लिंबाजी चंदेल - मयत सरकारी वकिलाचे वडील
1
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 22, 2025 12:05:00Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_JAIL_POLA दहा फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंद्यांनी साजरा केला बैलपोळा; कारागृहातही निनादू लागल्या झडत्या
अँकर :- अमरावती मध्यवर्ती कारागृहात दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा साजरा केल्याचा साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बंद्यांनी मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला असून सकाळपासूनच बंद्यांनी पोळ्याची लगबग सुरू केली होती सकाळपासून बंद्यांनी बैलांना शाम्पूने अंघोळ घातली व त्यानंतर बैलांना सजवून सायंकाळी अमरावतीच्या कारागृहात बैलांचा पोळा भरवत एकमेकांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बंद्यांनी कारागृहात झडत्या म्हणून एकमेकांचा मनोरंजन केल्याचा पाहायला मिळाला.
बाईट :– कारागृहातील, बंदी
1
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 22, 2025 11:48:29Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_R1_PATEL
निवडणूक मॅनेज करायची ताकत आमच्यात असती तर धाराशिवचे खासदारही निवडून येऊ दिले नसते
पडल्यानंतर कितने खट्टे हे अंगूर म्हणण्याची सवयच आहे
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापुरातील बोगस मतदार प्रकरणावरून आरोप केल्यानंतर भाजप नेते पाशा पटेल यांचा पलटवार
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 6000 बोगस मतदार नोंदवण्यात प्रकरणात ओमराजे निंबाळकर यांनी दिल्लीत घेतली होती पत्रकार परिषद
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा केला होता आरोप
बोगस मतदार प्रकरणात निवडणूक आयोगाने अर्ज बाद केलेत, याप्रकरणी पोलिसांकडून तपास न झाल्याचा ओमराजे निंबाळकर यांचा आहे आरोप
भाजप नेते पाशा पटेल यांनी दिले आरोपांना उत्तर
Byt: पाशा पटेल, भाजप नेते
3
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 22, 2025 11:48:20Bhandara, Maharashtra:
देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची वकिली करणे सोडा...आणि राहुल गांधी यांची मागे लागणे भाजपने सोडावे...लोकशाहीची हत्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप करते आहे.;- नाना पटोले
Anchor ;- देवेंद्र फडणवीस आपल्याला विनंती आहे की निवडणूक आयोगाची वकिली का करत आहात पृथ्वीराज चव्हाण यांच्या परिवारातील चार लोकांची नाव डबल टिबल आली असेल याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे म्हणून आम्ही वारंवार सांगतोय की निवडणूक आयोग या प्रकारची गडबड चालू आहे ही निवडणूक आयोगाने थांबवली पाहिजे अतिरिक्त मत येतात कसे राजीव गांधींनी डिजिटल व्यवस्था निर्माण करून दिली आहे त्याची आपण वापर करत आहोत पण निवडणूक आयोग असे चार चार नाव ठिकाणी येणे हे चुकीचे आहे म्हणून आमचे नेते राहुल गांधी निवडणूक आयोगाला म्हणतात की पारदर्शकतांना आणा तुम्ही येऊन जाऊन राहुल गांधी यांच्याच मागे लागतात असा सल्ला आपल्याला आहे की पृथ्वीराज चव्हाण यांच्या यांच्या घरातील मत जास्त आले असतील तर आमच्या काही समर्थन राहू शकत नाही म्हणून सर्व सिस्टीम दुरुस्त झाली पाहिजे आणि लोकशाहीची हत्या निवडणूक आयोगाने माध्यमातून भाजप करते आहे हे तुम्ही सांगा आणि त्यांची वकिली करणे सोडा..
BYTE :- नाना पटोले
ANCHOR :- महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार कसं महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला लुटत आहे यातूनही स्पष्ट होते......
सरकार एकीकडे अदानी अंबानींना पैसे देण्यासाठी लागली आहे आणि गोरगरिबांना लुटायचं काम करत आहे. मी विधानसभेत जेव्हा प्रश्न उपस्थित केला की पोलिसांना कारवाईची टार्गेट देऊन सरकारची तिजोरी भरली जाते. तेव्हा राज्याच्या सरकार विधानसभेत सांगतो की आम्ही कुठलं टार्गेट दिलं नाही. पण माझ्याजवळ पोलिसांचा व्हाट्सअप ग्रुप वरचा डिस्कर्शन आहे. यात वरिष्ठांनी त्यांना इतक्या कारवाईच्या सूचना केल्याचे ते सांगतात. आणि हा टार्गेट दिल्याचं इथून दिसत आहे. माझ्या सरकारला सवाल आहे की गोरगरिबाला लुटायचा आहे. लाडक्या बहिणींना लुटायचा आहे? ते सरकारने तात्काळ थांबवलं पाहिजे. नाहीतर विधानसभेत सरकारने खोटी माहिती दिल्याबद्दल सरकारवर अविश्वास आणावा लागेल. गोरगरिबांची लूट बरोबर नाही फडणवीसांनी स्वतः यावर लक्ष दिले पाहिजे अशी आमची त्यांना विनंती.....((भंडारा जिल्ह्यात वाहतूक पोलिसांना कारवाईचा टार्गेट दिल्याचे व्हाट्सअप स्क्रीन शॉट समोर आले त्यावर ते बोलत होते))
BYTE 01 :- नाना पटोले (1:31)
....
....
....
ANCHOR:- माझी फडणवीसन नाही इतकीच विनंती आहे की तुम्ही निवडणूक आयोगाची वकिली करू नका. सिरीयल एडवोकेट म्हणजे वकिली आपण जे करत आहात तो एक प्रकारे निवडणूक आयोग जे चुकीचे कार्य करत आहे. त्यांची वकिली फडणवीसांनी करू नये कारण एखाद्याची दोन-तीन नाव कशी आली आहे तपासणीचं काम निवडणूक आयोगाचा आहे आमची भूमिका तीच आहे. राहुल गांधी ही तेच म्हणत आहेत. पण मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यांनाही आमची विनंती आहे निवडणूक आयोगाच्या चुकीवर तुम्ही बोट ठेवा, आणि तुमची नेते मोदी त्यांनाही सांगा निवडणूक आयोगाचे पाप थांबवा... देवेंद्र फडणवीसजी आपण खोटी वकिली करू नका....
BYTE 02 :- नाना पटोले (1:21)
....
....
....
ANCHOR :- सहा महिन्यापूर्वी तुम्ही महाराष्ट्रात ज्या संजीव कुमार वर गुन्हे दाखल केले ते कोणी करवले.?? तर तुमच्या तलाठ्याने केले. मग त्याला सांगितलं तुला जेलमध्ये टाकतो त्या धाकाने त्याने माफी मागितली. माझा एक मुद्दा आहे त्याने आकडे बरोबर दिले नाही. खोटी माहिती दिली संस्थेच्या विरोधात जर गैरसमज केला. संस्थेने पुढे यावं. त्याचे जे मुख्य सीआय आहे ते काय सांगतात पाच वाजताच्या नंतरचे जे मतदान झाले त्या मतदानाला आम्ही दाखवलं तर महिलांचा अपमान होईल. त्यात त्यांचा अपमान काय होणार? जे पोरकट वक्तव्य निवडणूक आयोग देतयं म्हणजे तुम्ही काहीतरी लपवल्याचं लक्षात येतं. आणि लोकांचा संशय पुन्हा वाढवता. का नाही तुम्ही फोटेजेस दाखवत?? तुम्ही देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आले ते वोटचोरीने आले का?? निवडणूक आयोगाच्या वोटचोरी मध्ये तुम्ही सामील आहात का? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे तुम्ही निवडणूक आयोगाची वकिली करू नका आणि सिरीयल लायर बनू नका.
BYTE 03 :- नाना पटोले (1:41)
....
....
....
ANCHOR:- बिलकुल राहिलेच नाही. अटल बिहारी वाजपेयींचा विचार भाजपने संपवलाय. आता जी विचारसरणी आहे अमित शहा मोदींची ही विचारसरणी भारतासाठी घातक आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा विचार देशाप्रती होता म्हणून ते विरोधी पक्षात असताना सुद्धा जागतिक पातळीवर जेव्हा दोन देशांच्या समेट घडवायचे असेल तर त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांना काँग्रेस पाठवायची. ही या पद्धतीची भूमिका होती आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांची तुलना नरेंद्र मोदी आणि अमित शहा सोबत होऊ शकत नाही. हे देशासाठी विघागातक आहेत..... चायनाला समर्पित आहेत चायना जे सांगेल ते करण्याचं काम अमित शहा आणि मोदी या देशात करतात.....
BYTE 04 :- नाना पटोले (0:56)
....
....
....
ANCHOR:- मला कोणाबद्दल ची प्रतिक्रिया देण्याचा कारण नाही पण महाराष्ट्राचा सरकार आणि केंद्राच सरकार हे सातत्याने ओबीसी वर अन्याय करत आहे. हे स्पष्ट होत आहे. पोरांच्या स्कॉलरशिप सुद्धा मिळत नाही शिष्यवृत्ती दिल्या जात नाही होस्टेल त्यांना दिले असं सरकार विधानसभेत सांगत. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी हॉस्टेल सुद्धा तयार झाले नाही किरायाच्या घरामध्ये भरवले आहे अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी पोरांच्या शिक्षणाच्या व्यवस्था नाहीत. अशा या परिस्थितीमध्ये ओबीसी विरोधी धोरण जे भाजपचा आहे. त्या भाजपच्या विरोधात सर्व ओबीसींनी एकत्रित यावं असं माझं आवाहन करणार आहे. कारण जातीजातीमध्ये तुकडे करण्याचे जि भूमिका भाजपने व्यक्त केली होती तिला कोणीही चालना देऊ नये एवढेच आमचं सगळ्यांना विनंती आहे......(( ओबीसी समाजाचे नेतृत्व धनगर समाजाकडे गेल्याने माळी समाजाच्या नेत्यांच्या पोटात दुखतो असे वक्तव्य हाके यांनी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावर ते बोलत होते))
BYTE 05 :- नाना पटोले (3:18)
....
....
....
ANCHOR:- परवा लोकसभेत अमित शहा ने घटना दुरुस्तीचे प्रस्ताव आणला, 30 दिवस मुख्यमंत्री असो किंवा मंत्री, पंतप्रधानही असो कोणीही 30 दिवस जरी जेलमध्ये राहिला तर त्यांना त्या पदावरून मुक्त करण्याच अधिकार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राहील असा कायदा आणला. खरंतर या पद्धतीचा एक भीती निर्माण करून खोट्या केसेस मध्ये ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ईडीला फटकारलं, की तुमच्या आहे एकही केसेस अप्रू होत नाही. तुम्ही निर्दोष लोकांवर या पद्धतीची कारवाई करता... यावरून आपल्याला हे पाहायला मिळतं की खोट्या केसेस या मोठ्या प्रमाणात झाले आहेत आणि म्हणून केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करणे हा अमित शहा आणि मोदी दोन्ही प्रमाणीकपणे करत आहेत. असं पाहायला मिळतं म्हणून सामन्यामध्ये जी टीका पहायला मिळाली ती लोकशाहीमध्ये ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाबद्दल बोलतो तर फडणवीस वकिली करतात निवडणूक आयोगाची. आजही ते बोलत होते की पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडची दोन -दोन तीन लोकांची मत आहेत. तर निवडणूक आयोगात वर आमचा तोच प्रश्न आहे. निवडणूक आयोग काय झोपला होता का? आम्ही विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर न देता आता भाजप काँग्रेस वरच आरोप करत आहे. निवडणूक आयोगाने याची स्पष्ट करावी आणि लोकांच्या मताच्या संरक्षण करावं ही भूमिका आमची आहे. सध्या बिहारमध्ये त्यांची यात्रा सुरू आहे आणि लोकांचा मोठा प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणून फडणवीसांनी वकिली थांबवावी.
((सामनातून अमित शहा वर टीका करण्यात आली होती...... त्यावर नाना पटोले बोलत होते))
BYTE 06 :- नाना पटोले (3:18)
....
....
....
4
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 22, 2025 11:47:37Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_PASHA_PTEL
निवडणूक मॅनेज करायची ताकत आमच्यात असती तर धाराशिवचे खासदारही निवडून येऊ दिले नसते
पडल्यानंतर कितने खट्टे हे अंगूर म्हणण्याची सवयच आहे
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापुरातील बोगस मतदार प्रकरणावरून आरोप केल्यानंतर भाजप नेते पाशा पटेल यांचा पलटवार
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 6000 बोगस मतदार नोंदवण्यात प्रकरणात ओमराजे निंबाळकर यांनी दिल्लीत घेतली होती पत्रकार परिषद
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा केला होता आरोप
बोगस मतदार प्रकरणात निवडणूक आयोगाने अर्ज बाद केलेत, याप्रकरणी पोलिसांकडून तपास न झाल्याचा ओमराजे निंबाळकर यांचा आहे आरोप
भाजप नेते पाशा पटेल यांनी दिले आरोपांना उत्तर
Byt: पाशा पटेल, भाजप नेते
3
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 22, 2025 11:47:16Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात 32 लाखांची एमडी अंमली पदार्थ हस्तगत
उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई
Ulh drugs seized
Anchor उल्हासनगर गुन्हे शाखेने
32 लाखाची एमडी पावडर हस्तगत केली असून एका आरोपीला अटक केली आहे ,
Anchor अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव दर्गा परिसरात एक व्यक्ती एम डी पावडर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला मिळाली होती. ह्या माहितीच्या आधारे यांनी सापळा रचून पोलीस पथकाने छापा टाकून फरहान हबीब चौधरी याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 161 ग्रॅम एमडी, मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण 32 लाख 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उल्हासनगर गुन्हे शाखा करीत आहे.
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
2
Report