Back
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा नोंदणी 28 जुलैपासून सुरू!
SKSACHIN KASABE
Jul 25, 2025 03:17:38
Pandharpur, Maharashtra
Anchor - श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दि. 01 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2025 मधील पुजांची ऑनलाईन नोंदणी 28 जुलै पासून समितीच्या संकेतस्थळावर सुरू होणार
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, महानैवेद्य सहभाग योजना इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 01 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात दि.28 जुलै रोजी स.11.00 पासून होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.
.
आता दि. 01 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा व पाद्यपूजा तसेच दि. 01 ते 31 ऑगस्ट, 2025 कालावधीतील तुळशी अर्चन पुजा व महानैवेद्य सहभाग योजना ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा. याशिवाय पूजेचे बुकिंग मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी सांगितले.
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे रु.25,000/-, रू.11,000/- तसेच पाद्यपूजेसाठी रू.5,000/- व तुळशी अर्चन पूजेसाठी रू.2100/- तसेच महानैवेद्य सहभाग योजनेसाठी रू.7,000/- इतके देणगी मुल्य आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowJul 26, 2025 02:16:34Pimpalgaon Baswant, Maharashtra:
अँकर : सरकारी शाळा म्हटलं की पालक वर्ग पाठ फिरवतात मात्र जिल्हा परिषदेच्या काही शाळा याला अपवाद ठरल्या आहे.
येवला तालुक्यातल्या अंदरसुल येथील जिल्हा परिषद शाळा पाठोपाठ पिंपळगाव बसवंत येथील कारसूळ जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल ठरली आहे.
येथील विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह स्क्रीन यंत्रणेद्वारे शिक्षणाचे धडे दिले जात असून यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
सुमारे 40 लाख रुपयांचा निधी खर्च करून 25 फ्युचरस्टिक क्लासरूम उभारण्यात आले आहेत.
कारसुळ येथील या शाळेला युनेस्को चे सदसत्व व आयएसओ मानांकन देखील मिळाले आहे.
या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे वह्यांची जागा स्क्रीन ने घेतली असून अभ्यासक्रम व्हिज्युअल डिजिटल आणि इंटरॅक्टिव्ह स्वरूपात विद्यार्थ्यांपुढे सादर केला जात आहे.
बाईट: मुख्याध्यापक,
बाईट :- शिक्षक,
बाईट: विद्यार्थिनी,
1
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 26, 2025 02:00:50Palghar, Maharashtra:
पालघर _ हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू असून पुढील तासांत काही ठिकाणी अत्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तानसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. तसेच धामणी धरणाचे तीन दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले गेले आहेत. त्यामुळे सूर्या नदीत दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सूर्या आणि वैतरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
4
Report
KPKAILAS PURI
FollowJul 26, 2025 01:45:27Pune, Maharashtra:
pimpri ajit pawar
kailas puri pune 26 -7-25
feed by 2c
Anchor -...दोन आठवड्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुन्हा एकदा हिंजवडीत पाहणी दौरा करत आहेत...दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा पालन करत त्यांनी सूचनांची अंमलबजावणी सुरुवात केली की नाही याची ते पाहणी करत आहेत...हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी रस्ते आणि इतर नागरी समस्या बाबत अजित पवार आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय....त्यांनी सुचवलेल्या कामांपैकी मागील दोन आठवड्यात हिंजवडीतील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे सुमारे 166 बांधकामे जमीन दोस्त करत प्रशासन देखील कामाला लागल्याचे बघायला मिळत आहे... त्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas wkt+ vis
9
Report
KPKAILAS PURI
FollowJul 26, 2025 01:30:42Pune, Maharashtra:
pimpri ajit pawar
kailas puri pune 26 -7-25
feed by 2c
Anchor -...दोन आठवड्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुन्हा एकदा हिंजवडीत पाहणी दौरा करत आहेत...दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा पालन करत त्यांनी सूचनांची अंमलबजावणी सुरुवात केली की नाही याची ते पाहणी करत आहेत...हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी रस्ते आणि इतर नागरी समस्या बाबत अजित पवार आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय....त्यांनी सुचवलेल्या कामांपैकी मागील दोन आठवड्यात हिंजवडीतील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे सुमारे 166 बांधकामे जमीन दोस्त करत प्रशासन देखील कामाला लागल्याचे बघायला मिळते...
8
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 26, 2025 01:30:27Yeola, Maharashtra:
अँकर:-नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबत येवला तालुक्यातील आंबेगाव येथून ऋषिकेश मोतीराम माळी व निफाड तालुक्यातील मरळगोई येथून सोपान निवृत्ती जगताप या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यात एक गावठी कट्टा व तीन जिवंत काढतूस मिळून आली आहे पोलिसांनी आर्म एक अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला असून या कारवाईसाठी लासलगाव पोलिसांची देखील मदत घेण्यात आली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत.
बाईट - संदीप मंडलिक, पोलीस निरीक्षक येवला तालुका
5
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 26, 2025 01:16:37Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - नांगोळ्यामध्ये रंगणार ऐतिहासिक "देवाभाऊ केसरी" बैलगाडी शर्यत,555 बैलगाडी चालक होणार सहभागी..
अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे 28 जुलै रोजी
देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व भाजपा किसन सभेचे प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे यांनी या शर्यतीच्या आयोजनाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात सर्वात जुना शर्यतीचे मैदान म्हणून रांगोळ्याच्या बैलगाडी शर्यतीची ओळख असून नागपंचमी निमित्ताने या स्पर्धा पार पडणार असून यंदा 555 बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी होतील.या शर्यती पाहण्यासाठी दोन लाखाहून अधिक शैक्षणिक उपस्थित राहतील,असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला आहे. उद्घाटन भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार असल्याचेही आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.
बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा
14
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 26, 2025 01:16:25Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याला "लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड".
अँकर - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या
राजारामबापु साखर कारखान्याला
'लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५'मिळाला आहे.साखर उद्योगातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल"द शुगर टॅक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया"कडुन पुरस्कार हा पुरस्कार देण्यात आला आहे.दिल्ली येथे शानदार सोहळ्यात आमदार जयंत पाटलांनी साखर उद्योगातला हा मानाचा पुरस्कार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्वीकारला आहे. या नामांकित पुरस्कारामुळे राजारामबापू साखर कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
12
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 26, 2025 01:16:03Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी हर्षल पाटील पाटील कुटुंबियांची भेट घेत केले सांत्वन.
अँकर - काँग्रेसचे माजी मंत्री व कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी सांगलीतील कंत्राट हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.या ठिकाणी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेची थकीत दीड कोटी ची बिल मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी तांदुळवाडी मध्ये हर्षल पाटील कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले आहे.त्याच बरोबर हर्षल पाटील याची आत्महत्या ही सरकारचे अपयश असून राज्य सरकारने तातडीने राज्यातल्या कंत्राटदारांचे थकीत बिल प्राधान्याने दिली पाहिजेत,अशी मागणी देखील केली.
12
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 26, 2025 01:15:54Ambernath, Maharashtra:
बारवी धरण 84 टक्के भरले
बारवी नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा!
एमआयडीसीचं कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाडच्या तहसीलदारांना पत्र
Bdl baravi
Anchor : बदलापूरचं बारवी धरण कधीही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव एमआयडीसीनं बारवी नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाडच्या तहसीलदारांना तातडीची सूचना जारी केली आहे.
Vo : बारवी धरणाची ओव्हरफ्लो होण्याची पातळी ७२.६० मीटर असून शुक्रवारी दुपारी पाणी ७०.६० मीटर इतकी होती. पाणीपातळी ७२.६० मीटरपर्यंत जाताच धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाण्याच्या दाबाने आपोआप उघडले जातात आणि पाण्याचा विसर्ग सुरू होतो. सध्या धरणक्षेत्रात जोरदार
पाऊस सुरू आहे . पावसाचा जोर असाच राहिला तर लवकरच बारवी धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे , याच पार्श्वभूमीवर एमआयडीसीने एक तातडीची सूचना जारी केलीये, यात बारवी नदीलगत असलेल्या असलेली चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागाव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, चोण मोऱ्याचा पाडा, रहाटोली या गावांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर बारवी आणि उल्हास नदी लगतच्या इतर गावं आणि शहरांनाही सतर्कतेच्या सूचना एमआयडीसीकडून देण्यात आल्या आहेत.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 26, 2025 01:15:27Ambernath, Maharashtra:
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
वाहतूक विभागाकडून दीडशे जणांवर कारवाई
तब्बल दहा लाखांचा केला दंड केला वसूल
Amb traffic
Anchor अंबरनाथ वाहतूक विभागाने जून आणि जुलै अशा दोन महिन्यात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या दीडशे जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल दहा लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे .तसेच परमिट संपलेल्या 117 वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून एक लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आले असल्याचं वाहतूक विभागा कडून सांगण्यात आलं , जून महिन्यापासूनच मान्सून विशेष ड्राइव हा वाहतूक विभागाने सुरू केला असून नागरिकांनी मद्यपान करून वाहन चालू नका अन्यथा आपल्यावर कठोर आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
byte वाहतूक पोलीस निरीक्षक
चंद्रशेखर भुयार अंबरनाथ
13
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 25, 2025 16:30:06Jalna, Maharashtra:
FEED NAME|2507ZT_JALNA_GORANTYAL (FEED SEND ON WHATSAPP PERSONNEL)
जालना :काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर? PKG
भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती
जालन्यात काँग्रेसला बसणार मोठा झटका
ANCHOR- काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगू लागलीये.. पक्षप्रवेशासाठी गोरंट्याल भाजपच्या बड्या नेत्याच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.. विधानसभा निवडणुकीत पदाधिकार्यांनी विरोधात काम केेले, पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने गोरंट्याल यांनी वेळोवेळी उघड नाराजीही व्यक्त केलीये.. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे. त्यात महानगर पालिकेची निवडणूक होणार असून अशा स्थितीत गोरंट्याल भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.. त्यासाठी ते भाजपमधील बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळं सुरेशकुमार जेथलियानंतर गोरंट्याल यांचा भाजप प्रवेशामुळं काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे...दरम्यान भाजपमधील प्रवेशावर गोरंटयाल यांनी थेट बोलणं टाळत या शेरमधूनच अर्थ काढण्याचं आवाहन केलं आहे.
बाईट : कैलास गोरंटयाल (2 बाईट आहेत)
गोरंटयाल यांनी काय शेर म्हटला आहे हे बघूया
"है ना बनने का हजाना मरना है मुझे
कब का टुट चुका हु बस सब्र करणा है मुझे
ये बताये मुझे साद ए दिल और कितने इम्तिहान देना है मुझे" हा शेर म्हणत गोरंटयाल यांनी त्यांच्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
14
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 25, 2025 15:45:30Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Mla Sonavne
File:01
Rep: Hemant Chapude(Junnar)
ब्रेकींग न्युज
जुन्नर पुणे...
Anc: सत्ताधारी आमदार शरद सोनवणेंनी थेट मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरलेत. आता मी मुख्यमंत्र्यांसमोर त्यांना उभं करणार आहे. सोबतच घोडेगाव प्रकल्प विकासाचे अधिकारी प्रदीप देसाईंची ही झाडाझडती करणार आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना, ही भाषा सत्ताधारी आमदार शरद सोनवणेंनी वापरली आहे. याचा व्हिडीओ Zee 24 तास च्या हाती लागलाय. यामुळं जुन्नरमधून अपक्ष निवडून आलेले मात्र शिंदे गटात सहभागी झालेले सोनवणे मोठे अडचणीत आलेत.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे,..
14
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 25, 2025 15:31:07Pandharpur, Maharashtra:
25072025
Slug- PPR_MLA_JANKAR
feed.on 2c
file 01
----
Anchor - शरद पवारांचा आणखी एक आमदार उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढवत आहे. त्यांनी थेट शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे हा दुसरा आमदारही सोलापूर जिल्ह्यातील असून तोही अनुसूचित जाती साठी राखीव मतदारांघातून विजयी झाला आहे. मोहोळच्या आमदार राजाभाऊ खरे यांच्या नंतर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या कडून शिंदे यांचे कौतुक
एकनाथ शिंदे हे जमिनीवर असलेले आणि निरपेक्षपणे काम करणारे नेते असून त्यांच्या काळात अनेक चांगली कामे झाली आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतही एकनाथ शिंदे हेच निर्णय घेऊ शकतील म्हणून आपण शिंदे यांची भेट घेतल्याचा खुलासा माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.
यापूर्वीही एकनाथ शिंदे यांची आळंदी येथे आणि आता पंढरपूर मध्ये म्हणजे दोन्हीही पवित्र ठिकाणी भेट झाली आहे. शिंदे हे नेहमीच त्यांनी घेतलेले निर्णय पूर्ण करतात आणि यामुळेच शेतकरी कर्जमाफीचा न्याय शिंदेच देऊ शकतील असा दावा जानकर यांनी केला.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेव्हा येत असतात तेव्हा मतदार संघातील आरोग्याची किंवा इतर अडचणीची कामे करून घेण्यासाठी त्यांची भेट घ्यावी लागते आणि म्हणूनच मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे जानकर यांनी सांगितले.
जानकर यांच्या जात प्रमाणपत्रामुळे त्यांची आमदारकी अडचणीत आल्यानेच त्यांनी शिंदेंची भेट घेतल्याची चर्चेबाबत त्यांना छेडले असता जरी माझे जात प्रमाणपत्र रद्द झाले तरी ती अडचण मला 2019 च्या निवडणुकीत येईल. एकदा विधानसभेला कागदपत्राची छाननी झाल्यानंतर माजी आमदारकी पाच वर्षे कोणी रद्द करू शकत नाही असा टोला जानकर यांनी विरोधकांना लगावला. जरी माझे जात प्रमाणपत्र रद्द झाले तरी हीच लोकी पुन्हा मला माझे जात प्रमाणपत्र आणून देतील आणि निवडणुकीत उभे करतील असा टोला सत्ताधाऱ्यांना आमदार जानकर यांनी लगावला.
Byte -- आमदार उत्तमराव जानकर, शरद पवार गट, माळशिरस राखीव मतदार संघ
14
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 25, 2025 15:30:54Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Mulshi
File name : 2507ZT_MAVAL_MULSHI_SNAKE
Total files : 01
Headline -मुळशीतल्या निर्भीड आज्जीने पकडला लीलया साप!
Anchor:
मुळशी तालुक्यातील कासार आंबोली गावात एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. ७० वर्षांच्या शकुंतला सुतार यांनी आपल्या घरापाशी आलेल्या धामण सापाला कोणतीही भीती न बाळगता लीलया पकडून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. धामण हा साप बिनविषारी असल्याने आईने धाडसाने तो हातात घेतल्याचं मुलगा गणेश सुतार यांनी सांगितलं. मात्र वयाच्या ७०व्या वर्षी असा साप पकडण्याचं धाडस दाखवणं हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यांची ही निर्भयता पाहून गावकऱ्यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं आहे. तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्पमित्र किंवा वनविभागाला बोलावणं हे नेहमीच योग्य ठरतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
14
Report
AKAMAR KANE
FollowJul 25, 2025 15:02:45kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे
------
नागपूर
जयंती पाटील, राष्ट्रवादी नेते.(sp)
On कोकाटे
- *मुख्यमंत्री यांनी ठरवायच आहे. आम्ही विरोधात आहे आम्ही विचार करून काही होणार नाही...विरोधक म्हणून आम्ही मागणी करण्याची गरज नाही. आपल सरकार कसा चालवायचं हे मुख्यमंत्री यांनी ठरवायचं आहे.*
On दिल्ली दौरा
- शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया असोसिएशनचा उद्घाटन होतं...या कार्यक्रमासाठी मी गेलो होतो...
On खांदेपालट
- *त्या मंत्र्याना काढायचं नाही... त्यामुळे मुख्यमंत्री काय चॉईस करतात, त्याची वाट पाहत आहे. खांदेपालट करणे म्हणजे बोलले ते वक्तव्य मान्यता आहे असा त्याचा अर्थ होईल. खांदेपालट केला तरी स्वभाव बदलत नाही.*
On अमित शाह - cm भेट.
- भारतीय जनता पार्टीला वादग्रस्त वक्तव्य हे सगळं मान्य आहे... नाराज होण्याचा प्रश्न नाही। भाजपचे प्रमुख नेते कोणीच नाराज नाही या सगळ्या विधानांना त्यांची एक प्रकारे मान्यता आहे
- खांदेपालट करायचं मंत्रिमंडळात बदल करायचे, ते काय करतात. याची वाट आम्ही पाहत आहे. मुख्यमंत्री किती गांभीर्याने हा प्रश्न सोडवतात. का हे पाहावे लागतील...
- *मुख्यमंत्र्यांची सहनशीलता किती आहे... आणि या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात त्याकडे आम्ही वाट पाहतो.*
On कंत्राटदार आत्महत्या
- कॉन्ट्रॅक्टर काम करत होते, काम करूनही त्यांना पैसे मिळाले नाही. 60 ते 65 लाख रुपये लोकांकडून कर्ज घेतलं, दुर्दैवाने त्याचं काही झालं नाही. त्यामुळे बळी पडून आत्महत्या केली... अत्यंत दुर्दैवी घटना झाली. सरकारने 89 हजार कोटी पेक्षा जास्त देणे आहे. कोणत्याही खात असं नाही योग्य आणि पूर्ण मागणीप्रमाणे पैसे दिले. *हा सगळा प्रकार महाराष्ट्राच्या फसवणुकीचा होता.*
- *विधानसभेच्या आधी खिशात पैसे नसताना हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे निर्णय घोषित करण्यात आले. दिवसाला शंभर शंभर निर्णय घेतले जात होते. सरकार गतिमान आहे, असं वाटत होतं. आता त्याची गती काय आहे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं असेल.*
- महाराष्ट्रात पाच लाख कंत्राटदाराची बिल देण बाकी आहे...त्यामुळे राज्य सरकारने अवांतर घोषणा होणारा बडेजावंपणा न करता काटकसर करावी... सरकारची परिस्थिती गंभीर आहे....जास्त झाल कर्ज प्रचंड झाले. सगळं आलबेल आहे हे चित्र आता राहिलेलं नाही.
- शेतकरी आत्महत्या करत आहे.. कंत्राटदार आत्महत्या करत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या मधल्या काळात यांची काम घेऊ नका, नाहीतर आत्महत्या पर्यंत प्रकरण जाईल...लोकांना सांगत होतो. आज तंत्रज्ञाने स्वतःच्या खर्चातून काम केले आहे. कर्ज काढलेले आहे. आणि सरकार पैसे देत नाही. सरकारी कामांवर आता कंत्राटदार यांना इंटरेस्ट मिळाला पाहिजे...
On भाजप नेते भेटल्याची चर्चा
- *भाजप नेत्यांना भेटले, यावर प्रश्न विचारला असता जयंत पाटील... यांनी जेवण केलं.... बसलो आणि विमानतळावरून परत आलो असा सगळा दिनक्रम त्यांनी माध्यमांशी बोलताना उत्तरात सांगितल. भाजप नेत्यांना भेटल्याचा प्रश्ननाच उत्तर दिले...*
- इस्लामपूर नावबादल यात संदर्भात तिकडे बोलणार...
On लाडकी बहिण
- सरकारला लाडकी बहीण देणे शक्य असावं असाच त्याचा अर्थ होतो....महाराष्ट्रात सगळ्यात घटकांना पैसे मिळत नाही. संजय गांधी निराधार योजना आशा वर्कर असो, अंगणवाडी का असो, काही दिवसांनी सरकारी कामगार आणि नोकऱ्यांचे पगार उशिरा होतील. आर्थिक परिस्थिती बिकट व्हायला लागली असं दिसत आहे.
- *साडेनऊ लाख कोटीचा कर्ज आहे 15, 16 लाख कोटी पर्यंत आम्ही कर्ज काढू शकतो... पण हे शहाणपणाचे लक्षण नाही, यात सरकारने वेळीच भानावर येऊन सुधारणा करणे गरजेचे आहे.*
On जयंत पाटील पुरस्कार
- मी अनेक वर्षांपासून शुगर असोसिएशनचे काम करतो. त्यामुळे त्यात पुढारी नसल्यामुळे त्यांनी मला तो पुरस्कार दिला. त्यांचा आभारी आहे.
- तुम्ही फक्त अजित पवार यांच्याच मंत्रांबद्दल प्रश्न विचाराचा इतका बायसपण बरा नाही म्हणत असं उलट पत्रकारांनाचाच्या प्रश्नावर गुगली टाकली..
14
Report