Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापुर अक्कलकोट में पावस ने जीवन बिगाड़ा; पानी में लोग फंसे

AAABHISHEK ADEPPA
Sept 27, 2025 05:02:06
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं, ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून प्रवास अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं; तालुक्यात दोन दिवसांपासून पडत आहे पाऊस वाहत्या पाण्यातून ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास सतत पडत असलेल्या पावसाने तालुक्यातील नद्या नाले वाहतायत तुडुंब खैराट गावाजवळील ओढा झाला ओव्हरफ्लो; ग्रामीण भागातील रस्ते गेले पाण्याखाली खैराट गावातील ओढा ओव्हर-फ्लो झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्यातून काढावी लागत आहे वाट तालुका प्रशासनाने दिला आहे सतर्कतेचा इशारा
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Sept 27, 2025 06:21:09
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sng_paus_update स्लग - परतीच्या संततधार पावसाने सांगलीची उडाली दैना,अनके घरात शिरले पाऊसाचे पाणी,तर शाळांना सुट्टी.. अँकर - सांगली शहरामध्ये परतीच्या पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.काल रात्रीपासून संततधार पाऊस पडत आहे.या पावसामुळे शहरातल्या सखल भागाची दैना उडाली असून अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचून राहिलेला आहे,तर अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरलेले आहे.शहरातल्या शिवाजी मंडई पाणी खाली गेली आहे,याठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहिलेलं आहे.आज दिवसभर संततधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घ्यावी,असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलाय तर संततधार पडणाऱ्या पावसामुळे महापालिका क्षेत्रातल्या सर्व शाळांना पालिका प्रशासनाकडून सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 27, 2025 06:21:00
Parbhani, Maharashtra:अँकर- पूर्ण वाचणे.... wkt शेती नुकसानिवर आहे, अँकरमध्ये जिल्ह्यातील अपडेटस आहेत... अँकर- हवामान विभागाने दिलेल्या अलर्ट लरमाणे परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय,यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, दुधना,पूर्णा,गळाटी, नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, गोदावरीत सोडलेल्या पाण्याचा पूर नुकताच ओसरत असतांना आज पुन्हा जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटलाय, गंगाखेड सोनपेठ तालुक्यातील अनेक ओढ्या नाल्यांना पूर येऊन काही गावांचा संपर्क तुटलाय. गंगाखेड तालुक्यातील जवळा रूमना मंदिरावर वीज कोसळल्याने मंदिरावरील सहा मूर्ती खाली कोसळल्या आहेत.पालम तालुक्यातील धानोडा,सुनेगाव पुलावरून पाणी वाहत आहे,गळाटी लेंढि नदीला पूर आला असल्याने येथील मार्ग बंद पडलाय,लोहा ते पालम मार्ग बंद पडलाय,बनवस गावात पाणी शिरलय,गंगाखेड तालुक्यातील इसाद परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. मैराळ सावंगी - गौंडगाव येथे पूरपरिस्थिती निर्माण झालीय, पुरामुळे राणी सावरगाव रस्ता बंद पडलाय,येथे अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे या भागातील मार्ग बंद पडले आहेत. यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे,काही तासात शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे,शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी... wkt गजानन देशमुख
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 27, 2025 06:16:56
Mumbai, Maharashtra:अँकर -- विजयीदशमी म्हणजेच दसरा दोन ऑक्टोबर गुरुवारी आहे दसऱ्या निमित्त  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा होणार आहे यानिमित्त शिवसेनेच्या वतीने दुसरा टिझर लॉन्च करण्यात आला आहे. यात परंपरा महाराष्ट्राची मैदान शिवतीर्थाच आवाज शिवसेनेचा नेतृत्व ठाकरेंचं  हुंकार शिवसैनिकांचा या आशयाखाली दसरा मेळाव्याचा दुसरा टिजर प्रकाशित करण्यात आला आहे.यावर्षी ह्या दसरा मेळाव्यात पावसाच सावट आहे.शिवतीर्थ येथे वाढलेलं गावात कापण्याच काम पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. शिवसेनेकडून भव्य शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे.याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी  Wkt मनोज कुळकर्णी  Feed send TVU ८१ Slug -- Shivaji park wkt 
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 27, 2025 06:16:38
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 27, 2025 06:16:05
Navi Mumbai, Maharashtra:story slug - अनैतिक संबंधाच्या संशयावरुन सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून navi mumbai crime story brother murder ftp slug - panvel murder crime story, shots- reporter- swati naik navi mumbai anchor: अनैतिक संबंधाच्या संशयावरून सख्ख्या भावानेच भावाचा निर्दयीपणे दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या बिट मार्शल पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून या घटनेतील आरोपीला अवघ्या एका तासात जेरबंद केले आहे. पोलिसांच्या तातडीच्या व कार्यक्षम कारवाईचे कौतुक होत आहे.   या घटनेतील आरोपीचे नाव नागेश वाल्या कोळी (32) असे असून त्याने हत्या केलेल्या त्याच्या सख्या भावाचे नाव दत्तु वाल्या काळे (47) असे आहे. हे दोघेही करंजाडे येथे राहण्यास होते. गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास करंजाडे सेक्टर-7 मधील रस्त्यावर एका 45 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची माहिती डायल 112 वरुन पोलिसांना माहिती मिळाली. कॉल मिळताच पनवेल शहर पोलिस ठाण्यातील बिट मार्शल पोलिस हवालदार विलास कारंडे आणि राजेंद्र केणी हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना घटनास्थळी दत्तु वाल्या काळे या व्यक्तीची दगडाने ठेचुन हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले.   यावेळी पोलिसांनी उपस्थित नागरिकांकडून माहिती घेतली असता, हत्या करणारा आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे त्याना समजले. त्यामुळे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत आरोपी नागेश वाल्या काळे याचे घर गाठून त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. बाईट- प्रशांत मोहिते- झोन तीन
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 27, 2025 06:04:30
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 27, 2025 06:03:37
Beed, Maharashtra:बीड : माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले धरणातून नदीपात्रा पाण्याचा विसर्ग, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Anc : धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाण्याची आवक पाहता माजलगाव आणि मांजरा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गेल्या दोन दिवसापासून हा विसर्ग बंद करण्यात आला होता.मात्र आता पुन्हा एकदा आता माजलगाव धरणातून सिंदफणा नदी पात्रात धरणाचे 11 दरवाजे उघडत 42000 क्यूसेक ने विसर्ग केला जात आहे. तर केज मधील धनेगाव येथील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडत नदीपात्रात 27166 क्युसेक ने विसर्ग केला जात आहे. यामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 06:03:23
Washim, Maharashtra:वाशिम: File:2709ZT_WSM_RAIN_27SUPTEBER रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढलं आहे.अगोदरच अति पावसामुळे शेतीचं नुकसान झाल्याने विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.जे थोडं बहुत पीक राहिलं होतं ते या पावसामुळे ती पीक सुद्धा संपूर्ण नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी कशी करावी आणि वर्षभर घरगुती खर्च कसा चालवावा असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहला आहे.भारतीय हवामान विभागाने वाशिम जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.या भागांमध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याचे सांगितले गेले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 27, 2025 05:48:52
1
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 27, 2025 05:48:45
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री पासून जोरदार पाऊस सुरू आहे, कळमनुरी वसमत तालुक्यातील अनेक मंडळात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, वसमत तालुक्यातील मधुमती नदीला पूर आला असून नदीच्या पुराचे पाणी कुरुंदा गावातील अनेक भागात शिरले आहे,तर दांडेगाव,पांघरा शिंदे,कळमनुरी तालुक्यातील तुप्पा भागातील ओढ्यांना पूर आल्याने येथील संपर्क तुटला,हिंगोली ते समगा मार्गावरील लहान पुलावरून पाणी वाहात असल्याने समगा रस्ता बंद झाला आहे. तर हिंगोली ते पुसद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे गावात पाणी शिरले आहे. कयाधु नदी दुथडी भरून वाहत असल्याने कोंढुर गावाचा संपर्क तुटलाय, याव्यतिरिक्त चौंढी बहिरोबा, बिबथर या गावांचा संपर्क तुटलाय, ईसापूर धरणातून पैनगंगेत केला जाणार विसर्ग वाढवण्यात आला असून धरणाच्या 13 गेट मधून 22 हजार 62 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पैनगंगा नदीवरील सिउरच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने माळेगाव शेंबाळपिंपरी पुसद मार्ग वाहतुकीसाठी बंद पडून विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटलाय, जिल्ह्यात होत असलेल्या पावसाच्या धर्तीवर शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्हातील शाळांना सुट्टी जाहीर केलीय. शासकीय रेखाकला परिक्षा सुरू असून आजचा रेखाकलेचा पेपर रद्द करण्यात आलाय. बाईट- प्रशांत दिग्रसकर- शिक्षणाधिकारी,हिंगोली
1
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 27, 2025 05:47:30
Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन मुख्यमंत्री भाजप च्या अंगलट एखादी गोष्ट आली कीं ते विषय बदलतात कोरोना काळात इतर राज्यात आराजकता माजली होती प्रेत गंगेत व्हायली, हे फोटो फडणवीस तुम्ही पाहा ३-४ वर्षांपूवीचा काढू नका, ते मुख्यमंत्री असतील महाराष्ट्रतून हजारो कोटी रुपये हे पी एम केअर फंड कडे आहेत ज्याची मदत शेतकऱ्यांना पाहिजे १९४०-५० चा काय काढताय तुम्ही काय करताय? आधी राज्य करायला शिका... रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान मध्ये ट्रेनिंग नीट घ्या नाहीतर आम्ही माणसे पाठवतो तुम्ही शेण खाताय पंजाब कडे बघा तिथे मदत केली जातीये कोरोना मध्ये काय झालं हे सांगू नका... तुम्ही काय करताय ते सांगा पंतप्रधान यांनी पैसे द्यावे मराठवड्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी... विरोधी पक्ष नेते असताना जी कॅसेट फडणवीस यांनी लावली होती ती परत लावा मुंबईत मोदी येतात त्यांनी मराठवड्ड्यात जावं बघावं.. उद्धव ठाकरे १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत... उद्या नरेंद्र मोदी येताय अमित शाह येताय मराठवड्यात कोण जाणार त्यांच्या प्रतिनिधी शी कोण बोलणार? त्यांच्या अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे मुंबईत त्यांना गिळायची आहे... एकनाथ शिंदे हे शिवसेना संपव्याची हत्यार आहे जसे अजित पवार हत्यार आहेत एकनाथ शिंदे यांना १०० जागा सुद्धा निवफणुकीला मिळणार नाही अमित शाह ची बेनामी कंपनी ही एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे आम्ही मूळ शिवसेना जागा द्यायचो... किती लढायच्या ऑन दसरा मेळावा पावसाचा प्रश्न आहे... काही पर्यायी जगाचा विचार झाला... पण सगळ्यांचा म्हणणं आहे कीं शिवतीर्थ वरची परंपरा मोडायची नाही मराठवाड्याचा शेतकरी चिखलात आहेत त्यामुळे २-३ तासाचा कार्यक्रम दसरा मेळाव्याचा असणार आहे त्यामुळे पाऊस किती पडला तरी दसरा मेळावा शिवतीर्थवारचं होणार ऑन देवेंद्र फडणवीस २०३० पर्यत जर ते महाराष्ट्र मध्ये थांबणार असतील तर २०२९ मध्ये केंद्रात राहुल गांधी यांचा सरकार येताय त्यांना महाराष्ट्र मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून राहतील आत्ताच त्यांना केंद्रात बहुमत नाही आत्ताच सरकार राहुल गांधी यांचा आले असते.. पण मत चोरीचे प्रकरण समोर येत आहेत
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 05:45:51
Washim, Maharashtra:वाशिम: File:2709ZT_WSM_ADAN_DAM_GATE_OPEN रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात मागिल कालपासून पडतं असलेल्या मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणलोट पातळीत मोठी वाढ झाली.त्यामुळे अडाण प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 382.50 मीटर असून, प्रत्यक्ष पातळी 382.46 मीटरवर पोहोचली आहे.सध्या प्रकल्पात 99.39 टक्के जलसाठा झाला आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाची पाचही गेट प्रत्येकी 30 सेंटीमीटरने उघडण्यात आली आहेत.या गेटमधून प्रति सेकंद180.70 घन मीटर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top