Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

धुळेच्या शेतकऱ्यांसाठी पावसाचा संकट: पेरणी खोळंबली!

PRASHANT PARDESHI
Jul 03, 2025 05:33:07
Dhule, Maharashtra
Anchor . धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. जुलै महिना उजाळला तरी जिल्ह्यात 33 टक्के पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. धुळे जिल्ह्यात खरिपाचे एकूण 3 लाख 78 हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी दोन लाख 19 हजार हेक्टर वर कापूस पिकाची लागवडीचा लक्षांक आहे. मात्र जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे आत्तापर्यंत फक्त 40 टक्के पेरण्या झाल्या आहेत. यंदा चांगला पाऊस पडेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापसासह मका व बाजरीची पेरणी केली आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आठ ते दहा दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आहे ती पिक जगवायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. पावसाचा खंड असाच राहिला तर दुबार पेरणीच संकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवेल. byte - सिराज जगताप, कृषी अधीक्षक प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement