Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

तुलजापुर में नवरात्र: देवी के पालखी वाहन नौ दिन जश्न-रंग से महके

DPdnyaneshwar patange
Sept 12, 2025 08:00:25
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव: DHARA_TAYARI तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जोरदार तयारी नवरात्र उत्सवात देवीचा छबिना मिरवणूक निघणाऱ्या पालखी वाहनांची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात वाघ, सिंह, हत्ती, नंदी, गरुड, मोर, अशा विविध नऊ वाहनांवर नऊ दिवसात देवीचा निघतो पालखी छबिना तुळजापुरातील स्थानिक कलाकार करून पिढ्यानपिढ्या केलं जातं रंगरंगोटीचे काम Anc: तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. नवरात्र उत्सव कालावधीत देवीचा छबिना मिरवणूक वाघ ,सिंह, हत्ती घोडा, मोर, गरुड या वाहनांवर काढली जाते. त्याला रंगरंगोटी केली जात आहे. तुळजापुरातील पोतदार कुटुंबीय हे काम करत. दोन पिढ्यांपासून त्यांच्याकडून ही सेवा केली जात आहे. तुळजापुरातील या तयारीचा मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आढावा घेतला. Byte कीर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी धाराशिव
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Sept 12, 2025 11:04:55
Kalyan, Maharashtra:कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयात खाजगी रुग्णवाहिकांचा बंदोबस्त करा... अन्यथा उग्र आंदोलन करू.. Anc..कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर खाजगी रुग्णवाहिका रुग्णांकडून मनमानी दर आकारत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. वेळेवर रुग्णवाहिका न मिळणं आणि गरजू रुग्णांकडून दुप्पट-तिपटीने पैसे उकळणं यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांच्या नाराजगी आहे.याच प्रकरणावरून आज मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र रुग्णालयात दाखल झाले. आरोग्य अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांनी निवेदन दिलं. रुग्णांची लूट थांबवली नाही, तर मोठं आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला आहे. ठाकरे आणि मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर रुग्णालय प्रशासनाला पावलं उचलावी लागली. असा प्रशासनाने स्पष्ट केलं की, रुग्णालय परिसरात खाजगी ॲम्बुलन्स उभे राहणार नाहीत तसेच शासकीय दरपत्रकानुसारच रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे केडीएमसी प्रशासन कडुन सांगण्यात आले आहे. Byte:- सागर चाळसे ( मनसे पदाधिकारी) Byte:- पुरुषोत्तम टिके ( कल्याण रुक्मिणीबाई हॉस्पिटल आरोग्य अधिकारी)
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 12, 2025 11:01:42
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 12, 2025 10:49:46
5
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 12, 2025 10:49:16
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - कलाकारा शिवाय हे जग बेरंग - नागराज मंजुळे अँकर - कलाकारा शिवाय हे जग बेरंग आहे,त्यामुळे कलाकाराने न्यूनगंड न बाळगता,आपल्या हक्काचे मागितले पाहिजे, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले आहे, ते सांगलीमध्ये आयोजित शाहिरी लोककला संमेलन प्रसंगी बोलत होते.नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत सांगलीत शाहिरी लोककला संमेलन पार पडलं.शहरातल्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये पार पडलेले एकदिवसीय शाहिरी लोककला संमेलनामध्ये राज्यातल्या नामवंत शाहीर कलाकारांना नागराज मंजुळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यातील शाहिरी लोककला व कलाकार जोपासण्याच्या उद्देशाने या शाहिरी लोककला संमेलनेचे आयोजन करण्यात आले होते. साऊंड बाईट - नागराज मंजुळे - दिग्दर्शक.
4
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 12, 2025 10:34:27
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1209ZT_CHP_FLOODED_CROP ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कोरपना- गडचांदूर भागात सहाव्यांदा पूर आल्याने शेतकरी हवालदिल अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 97 टक्के एवढा पाऊस नोंदला गेला असून अजून पावसाचा एक महिना शिल्लक आहे. जिल्ह्यातील वर्धा- वैनगंगा व इतर नद्यांनी अनेकदा पात्र सोडल्याने या भागातील शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. एकट्या वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या गडचांदूर- कोरपना भागात सहाव्यांदा पूर आल्याने शेती खरबडून गेली आहे. एकीकडे बोंड अळी आणि येलो मोझॅक ने शेतकऱ्यांचे हाल केले असताना आता शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बाईट १) ,२) पीडित शेतकरी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
1
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 12, 2025 10:33:47
Raigad, Maharashtra:स्लग - रोहा नगर पालिका मुख्याधिकारी यांच्यावर हक्कभंग आणणार ..... रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांची माहिती ...... निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने गोगावले नाराज ........ आज रोहा नगर पालिकेच्या सी. डी. देशमुख शहर सभागृहाचे लोकार्पण ...... उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार ....... अँकर - रोहा शहरात उभारण्यात आलेल्या सी. डी. देशमुख शहर सभागृहाचे लोकार्पण वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं आहेत. या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत मंत्री भरत गोगावले यांचा नामोल्लेख टाळल्याने गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम पत्रिकेवर मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे यांचेही नाव आहे. मात्र या कार्यक्रम पत्रिकेत मंत्री भरत गोगावले यांचा नामोल्लेख टाळल्या प्रकरणी गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली असून आपण रोहा नगर पालिका मुख्याधिकारी यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे गोगावले यांनी सांगितलं. हा कार्यक्रम सरकारी असल्याचे सांगताना आम्ही कार्यक्रम करताना सर्वांची नाव टाकतो, या पुढे आम्ही देखील बघू असं गोगावले म्हणाले . बाईट - भरत गोगावले, मंत्री
1
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 12, 2025 10:32:51
Shirdi, Maharashtra:Anc - बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीरामपूर विशेष न्यायालयाने आरोपी भास्कर धाकू मोरे याला दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मपेठ आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.. V/O - मागील वर्षी श्रीरामपूर तालुक्यात बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती.. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.. न्यायालयात गुन्ह्याच्या सुनावणीच्या वेळी सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.. पीडितेची आई, परिचारिका आणि ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी या प्रकरणात महत्वपूर्ण ठरल्या.. विशेष न्यायाधीश एस.एन. साळवे यांनी आरोपी भास्कर धाकू मोरे याला दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मपेठ आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.. न्यायालयात सरकार पक्षातर्फे विशेष तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. पी. पी. गटणे आणि ॲड. एम.आर. नवले यांनी काम पाहिले.. Byte - एम.आर. नवले, सरकारी वकील
3
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 12, 2025 10:18:57
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Winemart Feed on - 2C -------------------------------- Anchor - नांदेड शहरातील कलामंदिर या वर्दळीच्या भागातील रस्त्यावर दारुडे मद्य प्राशन करत असल्याने महिला आणि परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हे दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी या भागातील महीला, पुरुष थेट उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयात धडकले. कलामंदिर भागात नागरी वसाहतीत दारू दुकान आहे. या दुकानातून दारु घेउन भर रस्त्यावर मद्यपी दारु पितात. त्यामूळे महिला , तरुणी आणि विद्यार्थ्यांनीना त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर दारु पिऊन याच ठिकाणीं दारूच्या बाटल्या फेकल्या जातात. कचरा टाकला जातो. मुख्य रस्त्यावर थांबून दारुडे लघुशंका करतात. त्यामूळे येजा करणाऱ्या महिलांची कुंचबना होते. अनेक वेळा हे दारुडे महीला आणि तरुणीची छेड काढतात. त्यामूळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. हे दारु दुकान बंद करा, किंवा नागरी वसाहतीतून हटवा अशी रहिवाशांची मागणी आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा महीलानी दिला. Byte - महिला Byte - महिला Byte - महिला ----------------------------
9
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 12, 2025 10:05:44
10
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 12, 2025 10:05:19
Washim, Maharashtra:वाशिम: File:1209ZT_WSM_CITY_ROADS रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर : वाशिम शहरातून जाणाऱ्या जुन्या अकोला–नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील पुसद नाका चौक परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत.यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून जाताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.रेल्वे स्टेशनकडे जाणारे प्रवासी, कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारी वाहने, हॉस्पिटलमधील रुग्ण तसेच शाळकरी विद्यार्थी दररोज या मार्गावरून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करत आहेत. खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन या मुख्य मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा,अशी मागणी होत आहे.
8
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 12, 2025 09:46:35
Akola, Maharashtra:Anchor : काही दिवसांपूर्वी अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. या घटनेने अकोल्यात संतापाची लाट उसळली होती.अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून आरोपीला अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत होती. पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर फरार आरोपीला मध्य प्रदेशातील इंदोर येथे काल रात्री अटक करण्यात यश मिळवले. अत्याचाराच्या या घटनेच्या विरोधात आज अकोल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.या निषेध मोर्चात भाजपा खासदार अनुप धोत्रे, युतीतील मित्रपक्ष तसेच मोठ्या संख्येने हिंदू संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.निषेध मोर्चामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण होते, मात्र पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. Byte : संग्राम भैय्या जगताप , आमदार, अहिल्यानगर
13
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 12, 2025 09:36:08
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणीच्या पाथरी तालुक्यातील वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील ताटे गुरुजींची बदली झाल्याने विद्यार्थी आणि पालकांचा मोठा हिरमोड झालाय,त्यामुळे गावकऱ्यांनी ताटे सरची बदली रद्द करा म्हणून मागील दोन पण दिवसांपासून शाळेला कुलूप ठोकून शाळा कडे कोट बंद केलीय. जोपर्यंत ताटे सरला शाळेत आणणार नाहीत,तोपर्यंत शाळा उघडणार नसल्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिलाय... व्हीओ- व्हीओ- परभणीच्या पाथरी तालुक्यातील मुदगल ग्रामपंचायती अंतर्गत असलेली वंजारवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील कांतराव ताटे या शिक्षकांची बदली झाली, मागील 10 वर्षांपासून असलेल्या ताटे सरांनी शाळेत देहबोली सारख उपक्रमशील शिक्षण दिल्याने शाळेची गुणवत्ता वाढून शाळेतील पटावरील संख्या वाढली,त्यांच्या कार्यालकाळात इंग्रजी शाळेतील विद्यार्थी या शाळेत आले. कांतराव ताटे सरांच्या कौशल्यपूर्ण शिक्षवणी आणि सामाजिक तळमळीमुळे लोक शाळा आणि शिक्षणाबद्दल जागरूक झाले,परिनामी गुणवत्ता आणि पटावरील संख्या वाढली,वंजारवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाच वर्ग असून दोन शिक्षक आहेत,त्यापैकी ताटे सरांची जिल्हाअंतर्गत लिंबा येथे बदली झाली,त्यामुळे येथील ग्रामस्थांनी शाळेला टाळ ठोकून काल पासून शाळा बंद केलीय. जोपर्यंत ताटे सरांची आमच्या शाळेत परत बदली होणार नाही,तोपर्यंत शाळा उघाडणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय, बाईट- योगेश ईखे- पालक बाईट-रमेश मुंडे- ग्रामस्थ व्हीओ- कांतराव ताटे यांच्या जागी संजय जाधव हे शिक्षक आले आहेत,तरी गावकर्यांनी शाळा कुलूप बंद ठेवलीय, दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होतय. पालक ताटे सरांना परत आना यावर ठाम आहेत,पण ताटे सरांची बद्दली ही त्यांच्या विनंतीवरून पोर्टलव्दारे झाली आहे,त्यांनी निवडलेल्या शाळेपैकीच एक शाळा त्यांना देण्यात आली असल्याचे शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांनी सांगितलय, बाईट- सुनील पोलास- प्राथमिक शिक्षणाधिकारी परभणी व्हीओ- दहा वर्ष झाल्याने ताटे सरांची नियमाने बदली होणार होतीच आणि ही कायदेशीर प्रक्रिया शिक्षण विभाग सांगतेय,त्यामुळे ताटे सरांना परत आणण शक्य नाहीये अस सांगतय, ताटे सरच शिक्षक हवेत असा अट्टहास धरल्याने नव्याने आलेले संजय जाधव सर कस शिकवतात. त्यांच्याकडे काही शिकवणीच्या कल्पक कल्पना आहेत का,ही संधी पालक त्यांच्याकडून हिरावून घेतायत का असा सवाल शाळा बंद मुळेउपस्थित होऊ लागलाय. आता शिक्षण विभाग पालकांची समजूत काढू शकेल की ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम राहतील हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे. गजानन देशमुख, झी मीडिया परभणी
13
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 12, 2025 08:50:50
12
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 12, 2025 08:38:09
kolhapur, Maharashtra:Ngp Mohan Bhagwat live u ने फीड पाठवलं ------ नागपूर (सरसंघचालक डॉ मोहन भागवत ) व्यक्तीसे लेके राष्ट्र के झगडे का कारण.. मुल कारण हमे चाहिये, मुझे चाहिये.. बाकी के दुनिया को क्या चाहिये इसका विचार मै नहीं करुंगा... भैया बहनो का रिश्ता है तू सुरक्षा के सवालं नही -.... सब अपने है.. सभी परमात्मा की संतान है इसलिये हम ये कथा सुनते है की.... एक रास्ते से जाने से लोक डरते थे ... क्यूकी वहा विषाली नाग वहा रहता था... जो जायेगा उसको काटता था..... इतना बडा था की लोग डर जाते ते मारना भी संभव नही था.. तथागत एक बार उस रस्ते से चले... लोगो ने समझा लेकिन उन्होने कहा की उन्हे उसी रास्ते से जाना है... परिस्थितीचे मुझे क्या लेना देना... -- परिस्थिती कैसे ही रहे मै कायम रहुंगा ये पता था -- जो झेलंना है बदलते रहता है कहानी संदेश तो पक्का है... अगर हमारे मे बैर नही है. तो कोई हमारा बैरी नही है -- विषले साप न तभी काटते जब आप कुछ करोगे.. -- उनको एक रेंज मे रखो.. वो कुछ नही करेगा -- अगर हमारे मन मे अपनापन है तो हमारा कोई बैरी नही है -- दुनिया मे लोगो को डर लगता है अगर ये बडा होगा तो हमारा क्या होगा... भारत बडा होगा तो हमारा स्थान कहा होगा... इसलिये लागू करो टेरिफ.. हमने तो कुछ किया नही... -- सात समुंदर पार आप है... हम यहा है.. कोई संबंध तो आता नही... लेकिन डर लगता है मे मेरा इसं चक्कर मै ये सारी बाते होती है... -- *अन्य व्यक्ति मोठी झाली तर मी लहान होईन, तशी भीती वाटते हा मानवी स्वभाव आहे. म्हणून मग भारतावर टॅरीफ लावण्यात येतात. हे कशाला होते? खरे तर तुम्ही इतक्या दूर साता समुद्राच्या पलीकडे राहता. मग भीतीचे काय कारण. तर, मी आणि माझ्या च्या चक्कर मुळे ही घडते, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केले आहे*
14
comment0
Report
Advertisement
Back to top