Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

नंदुरबार: तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, गावांना सतर्कतेचा इशारा!

PRASHANT PARDESHI
Jul 01, 2025 04:32:46
Dhule, Maharashtra
anchor - नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळी वाढ झाली. तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सारंखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे तीन मीटरने उघडले आहेत. बॅरेजचे दरवाजे उघडल्याने पाणीच्या विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. नंदुरबार जिल्हा सोबतच जळगाव आणि धुळे जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठाच्या गावांना सतर्कतेच्या इशारा दिला आहे तर सोबतच नदीपात्रात कोणीही मच्छीमार करू नाही असं आवाहन देखील जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील हातनुर धरण आणि धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बेरीज चे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून जाणारी तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असल्याने, तापी नदीवरील सारंगखेडा आणि प्रकाशा बेरीजचे दरवाजे उघडण्यात आले असून, पाण्याच्या विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठी च्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement