Back
पालघरमध्ये हुतात्मा दिन: स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्याचा उत्सव!
HPHARSHAD PATIL
Aug 14, 2025 09:49:21
Palghar, Maharashtra
Anch - पालघर मध्ये आज मोठ्या उत्साहात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला . 14 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरोधात चाले जाव आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारांवर पालघर येथे गोळीबार करण्यात आला होता . या गोळीबारात पालघर मधील गोविंद गणेश ठाकूर , काशिनाथ पागधरे, रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, रामचंद्र महादेव चुरी, आणि सुकुर गोविंंद मोरे या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य आलं होत . त्या दिवसापासून 14 ऑगस्ट हा पालघर मध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो . या दिवशी पालघर मधील बाजारपेठा कडकडीत बंद ठेऊन सदर घटना स्थळी उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभ येथे पालघरकरांकडून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते . यावेळी पालघर मधील नागरिकांसह , विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलं जात .
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowAug 14, 2025 11:47:07Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग -- -- सिंधुदुर्ग जिह्यातील शासकीय वैध्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन.. नर्सिंग कॉलेज मधील विध्यार्थिनींला धक्का लागल्याच्या रागातून झाली होती बचाबाची... प्रकरण मिटलेले असताना देखील मुकादमाने केली त्या कर्मचाऱ्याला मारहान.. मारहाणीच्या निषेधार्थ प्रयोग शाळा तंत्रज्ञ विभागाच्या कंत्राटी कामगारांनी छेडले काम बंद आंदोलन... काम बंद आंदोलनामुळे रुग्णांची होतेय गैरसोय
0
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 14, 2025 11:45:49Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_bhondu_baba_pkg
*साधूंच्या वेशातील भामट्यांनी महिलेला घातला गंडा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल*
अँकर -
मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे प्रवास करणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक गुन्हे घडत असतांना सिडकोत एक नवा प्रकार घडलाय. साधूच्या वेशात आलेल्या तिघांनी मांत्रिक बनून महिलेची लूट केलीये. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं खळबळ उडालीये.
Vio/01
स्क्रीनवर दिसणारे हे व्हिडीओ पाहा... नाशिकच्या सिडको परिसरातील हे व्हायरल व्हिडिओ... १० ऑगस्टला साधूंच्या वेशात आलेल्या तीन भामट्यांनी महिलेला भुरळ घातली...तिच्याकडून तब्बल २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला... साधू वेशातील तिघे भिक्षा मागण्याच्या बहाण्याने महिलेपर्यंत पोहोचले होते. त्यांच्या ‘दीक्षा’ घेण्याच्या आग्रहाला बळी पडून महिला घरातून पैसे देऊ लागली. सुरुवातीला ५०० रुपये घेतल्यानंतर, त्यांनी “एक किलो तूप आणा” व “चहा पाजा” अशी मागणी केली. या दरम्यान महिलेच्या हातावर ‘रक्षा’ बांधून तिला भुरळ घालण्यात आली आणि एकूण २० हजार रुपयांचा ऐवज घेऊन तिघे फरार झाले. घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पतीने तातडीने एमआयडीसी चुंचाळे पोलिस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. तक्रारदाराने तक्रार दिली नसली तरी पोलिसांनी सुमोटो कारवाई करण्याची तयारी सुरू केलीये. व्हिडिओतील साधूंच्या वेशात असलेल्या तिघा भामट्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय.
बाईट - किशोर काळे - पोलीस उपायुक्त, नाशिक शहर
Vio/02
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही उडी घेतलीये. अशा कुठल्याही भोंदू बाबांच्या अमिषाला बळी पडू नये, तात्काळ पोलिसांशी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा आवाहन केलंय.
बाईट - डॉ. टी आर गोराने, राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
Vio/03
खरं म्हणजे भोंदूंच्या आमिषाला बळी पडू नये असं अनेकदा पोलिसांसहित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगितलं गेलंय. यासाठी महाराष्ट्रात जादूटोणा कायदाही बारा वर्षांपूर्वी लागू करण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे...
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 14, 2025 11:45:44Parbhani, Maharashtra:
assign by ganesh more sir
अँकर- परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कार्यकारी परिषद आणि महाराष्ट्र राज्य कृषी परिषद यांच्या मान्यतेला बगल देत तब्बल कोट्यवधी रुपयांची कामे चक्क विद्यापीठ निधीमधून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तक्रारी नंतर राज्य शासन आणि कृषी परिषदेने हा प्रकार गंभीरतेने घेत या कामाची चौकशी करून अहवाल शासनाला पाठवला आता विद्यापीठाचे कुलगुरू अभियंता आणि नियंत्रक यांना नोटीस बजावत सात दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष बाब म्हणजे या कामाची पाहणी करण्यासाठी कंत्राटदाराने अभियंत्याला लाखोंची आलिशान गाडी दिल्याचे ही अभियंत्याने मान्य केलंय...
व्हीओ- कृषी क्षेत्रात संशोधन वाढून प्रगती व्हावी,कृषी शिक्षण मिळाव यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने परभणी शहरात कृषी विद्यापीठ उभारण्यात आल. या विद्यापीठाचा शेती आणि शेतकऱ्यांना किती फायदा झाला हा वादाचा आहे. पण हे विद्यापीठ कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता परभणीच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे अधिकार क्षेत्राच्या बाहेर नियमबाह्य पद्धतीने 29 कोटींची विकास कामे केल्याने चर्चेत आलय. विद्यापीठात कुठलं ही विकास काम किंवा दुरुस्ती करायची असल्यास विद्यापीठाला कृषी परिषदेची प्रशासकीय मान्यता घेणं बंधनकारक असते, पण परभणी कृषी विद्यापीठाने विद्यापीठ कार्यकारी परिषद किंवा महाराष्ट्र्र कृषी परिषदेची परवानगी न घेता विद्यापीठाच्या सारसंग्रह अर्थात कंपोडीयमचा आधार घेत 29 कोटी रुपयांची कामे केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याची तक्रार महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी राज्याच्या प्रधान सचिवाकडे केली होती. त्यांनी महाराष्ट्र कृषी परिषद महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने कृषी विद्यापीठात येऊन पाहणी केली,कागदपत्रे तपासली असता,अनेक काम हे कृषी परिषदेची मान्यता न घेता नियमबाह्य पद्धतीने केल्याचे त्यांच्या लक्षात आले,त्यावरून कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी,विद्यापीठाचे अभियंता दीपक कशाळकर आणि विद्यापीठ नियंत्रकांना सात दिवसाच्या आत खुलासा करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
बाईट- प्रवीण देशमुख - महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, सदस्य
नियम कसे डावलले-
कृषी विद्यापीठाच्या तीन लाखांच्या वर कोणतं ही काम करायचं असल्यास त्यासाठी कृषी कार्यकारी परिषद, त्यानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि त्यानंतर शासनाची मान्यता घ्यावी लागते,पण कृषी विद्यापीठाने इंद्रधन्युष्य नावाच्या वस्तीगृहाची 3 कोटी 50 लाख रुपयांची निविदा काढून ते टेंडर कंत्राटदाराला दिले. त्याचा कार्यारंभ आदेश दिला,काम सुरू असतांना विद्यापीठातील वरिष्ठ तिकडे गेले आणि त्यात दुरुस्ती सुचवली,या कामाची वेगळी निविदा काढली गेली नाही.त्याच कंत्राटदाराला ते काम दिले गेले,साडे तीन कोटींचे काम 12 कोटी 51 लाखाच झालं,वरच्या खर्चासाठी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यापीठाच्या सारसंग्रहाचा अर्थात कंपोडीयमचा आधार घेतला. कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या परळी,गोळेगाव,लातूर अश्या अनेक ठिकाणी 108 कामे केली गेल्याची माहिती आहे, विशेष बाब म्हणजे ही काम विद्यापीठ निधी मधून केलाय, विद्यापीठ महसुलातून हा विद्यार्थ्यांच्या शिक्षण,संशोधनासाठी वापरायचा असतो. वाढीव कामे बेकायदेशीर दिल्याचा ठपका विद्यापीठ प्रशासनावर या अहवालात ठेवलाय, विद्यापीठ प्रशासनाला सात दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेशीत केले गेले आहे,एवढेच कमी की काय म्हणून विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर यांनी परळी येथे सुरू असलेल्या कामात लाखोंची हरिअर ही आरामदायी कंत्राटदाराकडून घेतली आहे,त्याची ते कबुली सुद्धा देतायत...
बाईट- दीपक कशाळकर- विद्यापीठ अभियंता,कृशी विद्यापीठ,परभणी
व्हीओ- 2023 आणि 24 मध्ये विद्यापीठात विद्यापीठ महसूल आणि शासनाच्या निधीतून 43 कोटी रुपयांची कामे केली आहेत,बिलो टेंडरने ही कामे दिल्याचे अभियंता सांगतायेत,पण दुरुस्तीचे साडे तीन कोटींचे काम साडे बारा कोटींवर जात असतील तर मग विद्यापीठात असलेले अभियंता कामाचे ईस्टीमेट तयार करतांनाच त्या कामाचे बजेट साडे बारा कोटी का दाखवत नव्हते,त्यांना बजेट काढता येत नव्हतं का,साडे तीन कोटींचे बिलो टेंडर लावून साडे बारा कोटींचे वाढीव काम त्याच कंत्राटदाराला का दिले जात होते अश्या अनेक प्रश्नाचे खुलासे विद्यापीठ प्रशासनाला सादर करावे लागणार आहेत. यामध्ये प्रशासनातील नेमकं कोण अडकणार हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे...
गजानन देशमुख झी मीडिया,परभणी
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 14, 2025 11:19:37Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी
मंत्री नितेश राणे byte --
*नितेश राणे on प्रशांत यादव*
प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यादव यांच्या संपर्कात होते
मी संपर्क मंत्री असल्याने मला पाठपुरावा करायला सांगितलं
अजून असंख्य नेते संपर्कात आहेत
*On आदित्य ठाकरे*
राजशिष्टाचारानुसार आमदाराला भाषण करायला द्यायला पाहिजे असं काही नाही
त्यांचे स्वतःचे वडील आता मुख्यमंत्री नाहीत, त्यामुळे त्यांनी त्यांनी स्वप्नातून बाहेर यावं
यांनी असंच शेंबड्यासारखं रडत राहावं
*On राज ठाकरे*
राज ठाकरे साहेब यांचा अभ्यास आमच्यापेक्षा दांडगा आहे
त्यावर जास्त मी बोलू इच्छित नाही
*On गोविंदगिरी महाराज*
ते वक्तव्य मी ऐकलेलं नाही, तुमच्या वाचनावर मी उत्तर देणार नाही
*On नवाब मलिक*
त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही त्यावर कसं बोलू शकतो
*On मोदी एक्सप्रेस*
मोदी एक्सप्रेस ट्रेनला रत्नागिरीतही थांबा देण्यात आलेला आहे
रत्नागिरीनेही आम्हाला साथ दिली
*On अमेरिका टेरिफ*
अमेरिकेने दरवाजे बंद केले असले तरी uk ने दरवाजे उघडले आहेत, अन्य देश तसं करत आहेत
डोमेस्टिक बाजारपेठेवरही लक्ष द्यावं
*On शिंदे शिवसेना नाराजी*
हे भाजप कार्यालय आहे, हा प्रश्न तिकडे विचारा
आमच्याकडे सर्व सुखी समाधानी हसत दिसत आहेत
दुसऱ्या बारशांत जाऊन पेढे खायची सवय नाही मला
*On जिल्हा नियोजन निधी - उदय सामंत*
मी वस्तुस्थिती मांडली
आमचे भाजपचे खासदार आहेत
राजापूर, रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघाला प्रत्येकी 20 कोटी, आणि खासदार राणे साहेब म्हणून त्यांना फक्त 5 कोटी निधी दिलेला आहे
असा अन्याय होता कामा नये यासाठी महायुतीची समन्वय समिती आहे
त्याबाबतची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांना दिली आहे
उदय सामंत यांनाही शुभेच्छा
याचे पडसाद सिंधुदुर्गतही पाहायला मिळतील
मीही सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे
महायुती म्हणून आपण काम करतोय
आमचीही 40 टक्के मतं आहेत
समान निधी देणं हा अधिकार आमचा
*On चिकन मटण बंदी*
हा काँग्रेसच्या काळातला जीआर आहे
कोणी काय खावं याबाबत सरकार हस्तक्षेप करणार नाही, हे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे
3
Report
MAMILIND ANDE
FollowAug 14, 2025 11:19:08Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग*
SLUG-1408_WARDHA_MLA_ACTION
- वर्ध्यात आमदार राजेश बकाने यांची FCI गोदामात धाड
- आमदार राजेश बकाने यांनी केला धान्य चोरीचा पर्दापाश
- वर्ध्याच्या पुलंगाव येथील कार्यकर्त्यांसह मारली धाड
- पुलगावच्या सरकारी राशन गोदामात अनाज कमी येत असल्याचा तक्रारीवरून थेट पोहचले आमदार
- एका पन्नास किलोच्या पोत्यात 500ग्रॅम अनाज कमी येत असल्याची होती तक्रार
- गोदामात असलेल्या वजनात 500 ग्रॅम वजनाचा काळ्या कपड्यात होते वजन
- थेट सरकारी गोदामात आमदार पोहचल्याने पुलगावात खळबळ
- पुरवठा निरीक्षकावर कारवाई करा आमदार बकानेच्या सूचना
आज पुलगाव येथे मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. स्थानिक आमदार राजेश बकाने यांनी थेट FCI च्या सरकारी राशन गोदामावर अचानक धाड मारली. त्यांच्या सोबत पुलगाव येथील काही कार्यकर्तेही उपस्थित होते.ही कारवाई सरकारी धान्याच्या वजनात सातत्याने होणाऱ्या कपातीच्या तक्रारींवरून करण्यात आली.प्रत्येक ५० किलोच्या पोत्यात तब्बल ५०० ग्रॅम अनाज कमी दिलं जातं.आमदार बकाने यांनी गोदामात जाऊन प्रत्यक्ष वजन करून पाहणी केली. यावेळी एका पोत्यात ५०० ग्रॅम वजनाचा काळ्या रंगाचा कपड्यात लपवलेला वजनदंड सापडला, ज्याच्या मदतीने वजनात कपात केली जात असल्याचं उघड झालं.या थेट कारवाईमुळे पुलगावात खळबळ माजली असून, सरकारी अन्न वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे. आमदार बकाने यांनी पुरवठा निरीक्षकावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
6
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 14, 2025 11:17:04Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Byte प्रकाश आंबेडकर
सोमीनाथ सूर्यवंशी प्रकरणात आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली
प्रकाश आंबेडकर हे स्वतः सुनावणीला उपस्थित होते
पुढील एक आठवड्याच्या आत डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस याना एसआयटी स्थापन करण्याचे न्यायालयाने आदेश दिले
सरकारने नेमलेल्या कमिटीला मान्यता देण्यात आली नाही
सरकारने नेमलेल्या कमिटीकडे असलेले सर्व कागदपत्र एसआयटी स्थापन केल्यावर त्यांच्याकडे देण्यात यावे
चौकशी संदर्भात याचिकाकर्त्यांना कोणतीही गडबड वाटल्यास त्यांना न्यायालयात अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे
सरकारच्या कामावर न्यायालयाने नाराजी दाखवली आहे
तसेच पुढील तीन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे कोर्टाने सांगितले आहे
byte प्रकाश आंबेडकर, पीडिताचे वकील
4
Report
KJKunal Jamdade
FollowAug 14, 2025 11:03:12Shirdi, Maharashtra:
संगमनेर / अहिल्यानगर
*संजय राऊत भाषण मुद्दे -*
*मी गेली चार पाच वर्षे सातत्याने इथे येतो...*
मला जेव्हा निमंत्रणाचा फोन आला तेव्हा मी दिल्लीत राहुल गांधींसोबत पोलिसांच्या ताब्यात होतो...
इथली माणसं गोड, आग्रह मोडता येत नाही...
या देवस्थानावर माझी श्रद्धा बसली आहे...
*दर्शन घेताना पुणेकर बाबांचा आवाज आला पक्ष आणि चिन्ह परत मागा...*
बाळासाहेब थोरातांनी शाळा दिली, पाणी दिलं, मात्र तुम्ही त्यांना विधानसभेत पाठवलं नाही...
आम्हाला याची खंत...
खोटेपणाचा विजय का झाला?...
*बाळासाहेब थोरात विधानसभेत गेले नाही याचे शल्य आजही...*
आमच्या सरकारने जनतेसाठी काय करायचे बाकी होते?...
कोरोना काळात ठाकरे सरकारने जनतेला वाचवण्याचे काम केले..
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली...
*मात्र आमचं सरकार गद्दारी करून पडण्यात आलं...*
*उपमुख्यमंत्री काश्मीरला गेले, सैनिकांना रक्त द्यायला...*
*मी ताबडतोब सैन्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिले...*
*महाराष्ट्रातील गद्दाराचं रक्त सैनिकांच्या शरीरात जाता कामा नये अशी मागणी केली...*
*या देशाचं नेतृत्व राहुल गांधीच करू शकतात...*
*गांधारी आणि धृतराष्ट्राला 100 पोरं कशी झाली? हा प्रश्न मला पडायचा...*
*मात्र आज मतदार याद्या पहिल्यावर कळलं...*
एकाएका घरात शंभर मतदार...
बोगस मतदानावर राऊत्यांचा टोला...
*बाळासाहेब पुन्हा आपलं सरकार येणार...*
बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे...
*मी जे बोलतो ते खरच होतं...*
10
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 14, 2025 11:03:06Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ च्या कळंब आणि राळेगाव येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेत सहभागी नागरिकांनी हाती तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा दिल्या तर महिलांनी फेटे परिधान करून यात्रेत सहभाग नोंदविला. यावेळी वातावरण देशभक्तीमय झाले होते. याप्रसंगी नागरिकांनी शहीद स्मारकाला नमन केले. "तिरंगा" आपला अभिमान आहे, जो भारतीयांना एका मजबूत बंधनात बांधतो. देशाच्या संरक्षणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव च्या माध्यमातून भारतावर वक्रदृष्टी ठेवणाऱ्यांना कणखर उत्तर दिल्याचे यावेळी मंत्री अशोक उईके यांनी सांगितले.
11
Report
KJKunal Jamdade
FollowAug 14, 2025 11:00:43Shirdi, Maharashtra:
Sangmner News Flash
संजय राऊत बाईट पॉईंटर्स -
ऑन फडणविस -
मोदी-फडणवीसांची सत्ता जाणारच! राहुल गांधींचे आंदोलन जयप्रकाश नारायणपेक्षा मोठे होणार – संजय राऊत
“फसवणुकीच्या माध्यमातून दिल्लीत नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता मिळवली आहे. आता त्यांना ती सत्ता सोडावी लागणार आहे. राहुल गांधींनी सुरू केलेले आंदोलन हे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा निश्चितच मोठे होणार आहे,” अशी आक्रमक टिप्पणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संगमनेर येथे केली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
ऑन मतदार घोळ -
राऊत म्हणाले, “देशभर मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झालेला आहे. महाराष्ट्रात तब्बल 58 मतदारसंघांमध्ये गोंधळ आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघ यात अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी उभे केलेले आंदोलन जनतेच्या हक्कासाठी निर्णायक ठरेल.”
ऑन राज ठाकरे -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राऊत म्हणाले, “दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत मुंबई देशाची राजधानी गुजरातला ‘शिफ्ट’ होता कामा नये यावर काँग्रेससह सर्व पक्ष एकमत झाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचे स्वागत सर्वत्र होत आहे.”
ऑन 15 ऑगस्ट उपवास -
15 ऑगस्ट उपवास आदेशावर टिका करताना राऊत म्हणाले, “मनपा सरकारचे नसते का? 27 महानगरपालिकांत सत्ता फडणविसांच्या हातात आहे. तेच प्रशासक नेमत आहेत, तेच आयुक्त नेमत आहेत. हा निर्णय सरकारचा नाही, असे म्हणणे म्हणजे प्रशासनाची अज्ञानता. 15 ऑगस्ट हा विजय उत्सवाचा दिवस आहे, त्याला धार्मिक उपवासाची जोड देणे योग्य नाही. असे कर्मकांड चालले असते, तर देशालाही स्वातंत्र्य मिळाले नसते.”
ऑन नवनाथ बन वारकरी अपमान -
भाजपावर हल्लाबोल करताना राऊत म्हणाले, “भाजपाला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग यांचे साहित्य वाचावे लागेल. देशाला आदेश काढून स्वातंत्र्य मिळाले नाही, तर लढ्याने मिळाले आहे. आमच्या राज्यात वारकरी संप्रदायासह अनेक धार्मिक परंपरा आहेत, त्यांचा सन्मान केला जातो. मात्र, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या लढायांमध्ये मांसाहार दिला जायचा, असा ऐतिहासिक संदर्भ मी दिला होता.”
ऑन फडणवीस वक्तव्य -
फडणवीसांना थेट टोला देत राऊत म्हणाले, “राज्याचे दोन-तीन वेळा मुख्यमंत्री राहूनही फुटकळ विधाने करू नयेत. मुंबई, कल्याण किंवा कोणतीही महानगरपालिका असो – तुम्ही घेतलेला निर्णय जनतेला पटवून द्यावा.”
4
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 14, 2025 10:32:30Nashik, Maharashtra:
Feed send by mozo
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_voice_devendr_pc
*नाशिक ब्रेकिंग*
- व्हॉइस ऑफ देवेंद्र राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजकांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद
- रोहित पवारांनी केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही
- ही स्पर्धा चालूच राहणार पत्रकार परिषदेत आयोजकांकडून खुलासा
- ही स्पर्धा पुणे विद्यापीठाकडून आयोजित करण्यात आलेली नाही , तर नाशिक प्रतिष्ठान स्वारंभ फाउंडेशन संस्था अशा तीन संस्था मिळून ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची दिली माहिती
- शरद पवारांच्या संस्थेने देखील रंगी दिली आहे आम्हाला स्पर्धेची परवानगी दिल्याची माहिती
- ही कुठेही राजकीय हेतूने सुरू केलेली स्पर्धा नाही
- शरद पवारांच्या ही नावाने अनेक स्पर्धांचे करण्यात आले आयोजन पुरावे देत पत्रकार परिषदेत करण्यात आला खुलासा
*नाशिक - सागर शेलार - आयोजक, व्हॉइस ऑफ देवेंद्र राज्यस्तरीय स्पर्धा*
- विकसित महाराष्ट्र ही संकल्पना लोक चळवळ झाली पाहिजे
- व्हॉइस ऑफ युथ, पीपल, नेशन असे विषय आहे
- म्हणून व्हॉइस ऑफ देवेंद्र ही स्पर्धा आयोजित केली
- १७ वर्षात त्यांचे पितृ छत्र हरपले तरी कमी वयात अनेक पदांवर गेले
- देवेंद्र फडणवीस यांची कामे आणि वक्तृत्व सर्वांना माहिती आहे
- कोणत्याही व्यक्तीचे महिमा मांडण्यात येणार नाही
- तर विकसित महाराष्ट्रात काय हवे यासाठी विद्यार्थ्यांची मते जाणून घेतोय
- *आमदार असलेला माणूस पांचट विषय का करतोय ?*
- *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ही स्पर्धा आयोजित केलेली नाही*
- आम्ही अनेक संस्थांची परवानगी घेतली आहे
- *शरद पवारांच्या रयत संस्थेने सुद्धा परवानगी दिली आहे*
- बारामतीत सुद्धा परवानगी मिळाली आहे
- सर्व सामान्य मुलं ही स्पर्धा आयोजित करत आहे
- *रोहित पवारांनी बालिशपणा केला*
- विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कसा हवा यासाठी ही स्पर्धा
- त्याचे नाव दिले व्हॉइस ऑफ देवेंद्र
- *स्पर्धा होणार आहे, तीन टप्प्यात ही स्पर्धा होणार*
- विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे
प्रथमेश नाईक - आयोजक
- शरद पवार, राहुल गांधी यांच्या नावाने स्पर्धा राबविल्या गेल्या तेव्हा राजकारण होत नाही
- त्यांचा हेतू राजकारण करण्याचा आहे
- पण विद्यार्थी हाणून पाडतील
- विद्यापीठाने परिपत्रक मागे घेतले तरी आम्हाला फरक पडत नाही
- यापूर्वी स्पर्धा झाल्या आहेत
- तेव्हा शैक्षणिक संकुलात राजकारण होत नाही
- रयत शिक्षण संस्थेत शरद पवारांच्या नावाने स्पर्धा होते
- तेव्हा शिक्षणाच्या पंढरीचे राजकारण होत नाही का ?
- डीपी भोसले कोरेगाव येथे शरद पवारांच्या नावाने स्पर्धा झाली
- रोहित पवार यांचे कर्तृत्व नसतांना स्पर्धा झाल्या आहेत
- स्पर्धा रद्द झालेली नाही, भव्य दिव्य होणार
- स्पर्धेच्या अर्जाची तारीख वाढवली
- 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतील
- विद्यार्थी विद्यापीठ आणि शाळेतच सापडतील ना
- विद्यार्थी थोडीच डान्सबार मध्ये सापडतात का
- म्हणून आम्ही सर्वच विद्यापीठांना पत्रव्यवहार केला होता
- त्या विद्यापीठाने पत्रक काढले होते
- जबरदस्ती केलेली नव्हती
- त्याचे परिपत्रक केवळ सहभागाचे होते
- *शरद पवारांच्या संस्थांनीच आम्हाला स्पर्धेसाठी परवानगी दिली*
- *नाशिक प्रतिष्ठान, स्वारंभ फाउंडेशन, आयफेलो संस्था असे आम्ही तिन्ही मिळून आयोजक आहोत*
9
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 14, 2025 10:20:28Pandharpur, Maharashtra:
14082025
Slug - PPR_KORTI_AGITATION
file 01
------
Anchor - करमाळा तालुक्यातील कोर्टी येथील गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी ग्रामस्थ ह.भ.प. रावसाहेब शेरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत हा सौर ऊर्जा प्रकल्प बंद होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय शेरे यांनी घेतला आहे
कोर्टी ग्रामपंचायत ग्रामसभेत ठराव होऊन सुद्धा हा प्रकल्प अद्याप बंद न झाल्यामुळे त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे
10
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 14, 2025 10:19:14Pandharpur, Maharashtra:
14082025
Slug - PPR_BIKE_RALLY
file 01
------
Anchor - पंढरपूर मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
महसूल ,पोलिस , नगर परिषद, सह पंढरपूर तालुक्यातील सर्व कार्यालयांचे विभागप्रमुख व कार्यालयीन कर्मचारी या तिरंगा बाईक रॅलीत सहभागी झाले होते.
ही तिरंगा बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा नाथ चौक तांबडा मारुती महाद्वार चौक, कालिका देवी चौक ,काळा मारुती, चौफाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात आली.
13
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 14, 2025 10:18:36Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_PoliceRaid
Feed on - 2C
----------------------------
Anchor - स्पा सेंटर च्या नावाखाली वैश्या व्यवसाय सुरु असनाऱ्या ठिकाणावर नांदेड पोलीसांनी छापा मारून अवैध्य धंद्याचा भांडाफोड केला. नांदेड शहरातील सर्वात मोठी आणि वर्दळीची बाजारपेठ असनाऱ्या वजीराबादमधील तरोडेकर मार्केटमध्ये हा प्रकार उघडकीस आला. काही महिन्यांपासून या ठिकाणी फ्युजन स्पा सेंटर सुरु होते. स्पा सेंटरच्या नावाखाली या ठिकाणी वैश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या स्पा सेंटर मध्ये पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. ग्राहकाने खात्री पटल्यावर पोलिसांना संपर्क केला आणि पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी दोन युवती आणि दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. या स्पा सेंटर मधून 3 युवती, 1 महिला, 4 पुरुष आणि स्पा सेंटर चालक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. रात्री उशिरा या प्रकरणी वाजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Byte - परमेश्वर कदम - पोलीस निरीक्षक
---------------
12
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 14, 2025 10:17:00Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, मालेगाव..*
-
Anc: धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपला मालेगाव शहरातून मिळालेल्या हार नंतर आता भाजपा येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाली नवतरुणांची मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली तसेच भाजप मालेगाव जिल्हा जम्बो कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी केली. युवा नेते कमलेश निकम यांची पुन्हा जिल्हा महामंत्रीपदी निवड झाली असून, अनेक वरिष्ठ व नव्या कार्यकर्त्यांना विविध पदांवर संधी देण्यात आली आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर भाजप नाशिक जिल्हा सक्रीय झाला असून त्या पार्श्वभूमीवर बैठका सत्र सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाल किती यश मिळते हे बघणं महत्वाचे ठरेल.
*बाईट: निलेश कचवे, भाजप जिल्हाध्यक्ष नाशिक*
13
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 14, 2025 10:02:16Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )*
Anc: बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील नागरिक नेहमीप्रमाणे पहाटे मार्निंग वॉकसाठी मुंजवाड येथून खमताणे रस्त्यावर जात असत. आज गुरूवार दि.१४ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास खमताणे रस्त्यावर खमताणेकडून येत असलेल्या चारचाकी वाहनाने रस्त्याच्या बाजूला बसलेले वसंत जाधव यांना धडक देत पुढे पायी चालत असलेल्या सरला जाधव (48) यांना जोरदार पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनंदा जाधव (52), संगिता जाधव (48), अंजना जाधव (45) आणि वसंत जाधव (58) जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांना अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. सटाणा पोलीसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
*बाईट: जखमी वसंत जाधव*
13
Report