415001
साताऱ्यातील मानसिंह चव्हाणने माउंट युनाम शिखर सर केल्याने उंचावला मराठा अभिमान!
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_Mountaineer सातारा - साताऱ्यातील कोणेगाव येथील गिर्यारोहक मानसिंह चव्हाण यांनी हिमाचल प्रदेशातील 6111 मीटर उंच माउंट युनाम शिखर यशस्वीपणे सर केले. देशभरातून ३० गिर्यारोहक सहभागी झालेल्या मोहिमेत केवळ ७ जण शिखरावर पोहोचू शकले. त्यात मानसिंह चव्हाण यांच्यासह पुण्याच्या कृष्णा मरगळे आणि अनंता कोकरे यांचा समावेश होता.कडाक्याच्या थंडीमध्ये, ऑक्सिजनच्या कमतरतेसह अनेक नैसर्गिक आव्हानांना तोंड देत त्यांनी ही कामगिरी पार पाडली. मोहिमेपूर्वी टप्प्याटप्प्याने उंची वाढवत शरीर सवयीचं (Acclimatization) करण्यावर भर देण्यात आला. रात्री २ वाजता सुरू झालेल्या चढाईनंतर सकाळी १० वाजता शिखर सर झाले.या मोहिमेत देशभरातील विविध राज्यांतील गिर्यारोहक सहभागी झाले होते. उंचीवर होणाऱ्या त्रासामुळे काहींना माघार घ्यावी लागली. मात्र मानसिंह चव्हाण यांच्यासह इतर गिर्यारोहकांनी चिकाटी आणि जिद्दीने हिमशिखर सर करत मराठमोळा अभिमान उंचावला. byte0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोल्हापुर के जिलाधिकारी ने फर्जी दस्तावेज पर कार्रवाई के लिए समिति गठित कर दी
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खोट्या सह्या, बनावट परवाने करून मोठ्या प्रमाणात गुंठेवारी जमिनीचे व्यवहार केलेल्या लोकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींचा आढावा घेऊन चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी खोट्या कागदपत्रातून व्यवहार करणाऱ्यांना दणका देणार आहेत.0
0
Report
सोलापूर में बारिश ने खरीप पेरणी रोकी, सिर्फ 20% पूरी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यात पावसाने मारली दंडी, गेल्या दीड महिन्यात केवळ 20% खरीप हंगामाचे पेरणी पूर्ण. सोलापूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मारली दांडी, खरीप हंगामाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशकडे. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून केवळ 20 टक्के खरीप हंगामाची पेरणी झाली पूर्ण. जिल्ह्यात 29 टक्के सोयाबीन पिकाची लागवड, मात्र पावसाअभावी पीक जळून जाण्याची शेतकऱ्यांना भीती.. खरीप हंगामातील 70 हजार हेक्टर वरील शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण..0
0
Report
नाशिक के जायकवाडी बांध में पानी की आवक 546 क्यूसेक, जलस्तर 1506.40 फुट तक
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील पावसात घट झाल्याने जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली असली, तरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. सोमवारी मागील २४ तासांत ५४६ क्युसेक पाण्याची आवक झाली असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा ६८५.७८६ दलघमी म्हणजेच ३१.५९ टक्के इतका झाला आहे, धरणाची पाणीपातळी १५०६.४० फूट (४५९.१५१ मीटर) इतकी नोंदविण्यात आली असून एकूण पाणीसाठा १४२३.८९२ दलघमी आहे. यंदाच्या मान्सून हंगामात १ जूनपासून धरणात आतापर्यंत ९६.१७३ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. रविवारी धरण परिसरात पावसाची नोंद झाली नसून आजचा पाऊस शून्य राहिला आहे。0
0
Report
Advertisement
चिकलठाणा में प्लास्टिक गोदाम में भीषण आग, दमकल ने पाया काबू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा परिसरातील भालगाव शिवारात रात्री एका प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच चिकलठाणा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने बंबासह घटनास्थळी रवाना झाले. अग्निशामक दलातील जवानानी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, गोदामात प्लास्टिक साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते अखेर अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.0
0
Report
वायरल ऑडिओ क्लिप पर महाराष्ट्र मंत्री ने की जांच, साइबर व फॉरेन्सिक सत्यापन
Satara, Maharashtra:माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सध्या चर्चेत असलेल्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे."माझ्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात मी नेहमीच सर्व अधिकार्यांशी आणि लोकांशी आदराने आणि सौजन्याने संवाद साधला आहे, आणि हीच पद्धत पुढेही राहील. सध्या समोर आलेले प्रकार हे आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केलेले असू शकतात, असे सांगत त्यांनी या क्लिप्सच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती दिली आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाजाची सत्यता पडताळण्यासाठी आणि वास्तविक समोर आणण्यासाठी सायबर पोलिसांमार्फत तपास केला जाईल. गरज पडल्यास खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आवाजाचे नमुने देखील घेऊन फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. क्लिपमध्ये कोणतीही छेडछाड झाली आहे का, तसेच संबंधित कर्मचाऱ्याला कोणी आणि का कोंडून ठेवले, त्याला कोणी मारहान केली, या सर्व बाबींचा छडा पोलीस यंत्रणा लावेल. "या संपूर्ण प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, मग तो कितीही मोठा आणि वजनदार असला, तरी त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे."0
0
Report
संभाजीनगर में बाबा फर्जन रोहिला गली के वाडे पर पुलिस दबिश, कुछ नहीं मिला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह सर्वत्र चर्चेत असलेल्या कामगार नेता, ९० च्या दशकात दबदबा राहिलेल्या बाबा फर्जनच्या रोहिला गल्लीतील जुन्या वाड्याची पोलिसांनी झडती घेतली. वर्षभरापूर्वी फर्जनने सोडलेला हा अलिशान, जुन्या धाटणीत बांधलेला वाडा सध्या 'खंडहर' झाला असून तिथे घाणीने वेढा घातला आहे , फर्जनचा मुंबईत खासगी नोकरी करणारा मुलगा शहरात आल्यानंतर, त्याच्या उपस्थितीत सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव व इतर पोलिसांनी तीन तास वाडा पिंजून काढला मात्र केवल गंजलेले जुने साहित्य, कारखान्यातील यंत्राचे अवशेष याव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती काहीच लागलें नाही...0
0
Report
Advertisement
कोल्हापुर के अंबाबाई मंदिर की छत से सीमेंट उखड़ना, संवर्धन कार्य पर मचे बवाल
Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती लागल्याचा व्हिडिओ संध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्या वेळी कोल्हापुरात सलग पाऊस कोसळत होता, त्यावेळीचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. मंदिर संवर्धनाचा भाग म्हणून अंबाबाई देवीच्या छतावरील सिमेंटचे भाग काढण्यात आले आहेत, दरम्यान शिखरांचेही संवर्धन प्रक्रिया राबवली जात आहे, पण ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप काही नागरिक आणि संघटनांचा आहे. मंदिराचे संवर्धन करत असताना ग्रायंडरचा वापर केला जात असल्याचे देखील दिसून येत आहे. पुरातत्त्वीय नियमानुसार ही संवर्धन प्रक्रिया राबवली जात नसल्याचे देखील अनेक भक्तांचे म्हणणे आहे.0
0
Report
वाशीम में मॉनसूनी देरी से फसल संकट, किसान बारिश का इंतजार कर रहे हैं
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले. त्यानंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या.मात्र,गेल्या दहा दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने पेरणी केलेली पिके करपू लागल्याने धोक्यात आली आहेत. पिकांच्या वाढीसाठी या टप्प्यावर पावसाची अत्यंत गरज आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे,ते पिके वाचवण्यासाठी विहिरी,बोअरवेल आणि तुषार सिंचनाद्वारे सिंचन करत आहेत.मात्र,सिंचनाची कोणतीही सोय नसलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून,दमदार पावसाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.याच परिस्थितीचा शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी...0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में खाद्य तेल पैकिंग इकाइयों पर रेड, 2 करोड़ 93 लाख 35 हजार 603 रुपए का स्टॉक जप्त
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात अन्न व औषध प्रशासनाने शहरातील दोन नामांकित खाद्यतेल रिपॅकिंग अस्थापनेांवर छापे टाकून तब्बल २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपयांचा साठा जप्त केला. पैठण रोडवरील गेवराई तांडा येथील एक कंपनी, आणि शहरातील लक्ष्मण चावडी परिसरातील त्याच कंपनीच्या गोडाउनवर ही कारवाई करण्यात आली. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कंपन्यांचे परवाने प्रशासनाने तातडीने निलंबित केल्याची माहिती सहायक आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या या अचानक तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. जप्त तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून, अहवालानंतर पुढील कडक कारवाई केली जाईल0
0
Report
Advertisement
रायगड में 8,914 पात्र किसानों को कर्जमुक्ति योजना का लाभ—जाँच पूरी
Chendhare, Maharashtra:जवळपास ८ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ .पात्र कर्ज खात्यांची पडताळणी पूर्ण .पात्र कर्ज खात्यांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यांची माहिती शासनाच्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.कर्जमाफीसोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शासनाचा निर्णय हा आर्थिक शिस्तीला प्रोत्साहन देणारा ठरणार असून, जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेतून मोठा आधार मिळणार आहे.0
0
Report
शंभूराजे देसाई ने पिता की याद में भावुक श्रद्धांजलि कार्यक्रम का आयोजन किया
Satara, Maharashtra:पाटण, सातारा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई हे आपल्या वडिलांच्या आठवणीने अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील मरळी येथील कारखाना कार्यस्थळावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना शंभूराजे देसाई यांनी वडिलांच्या आठवणीना उजाळा दिला. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, समाजसेवेचा आणि दिलेल्या संस्कारांचा उल्लेख करताना त्यांचा कंठ दाटून आला. काही क्षण ते बोलूही शकले नाहीत. सभागृहातही भावनिक वातावरण निर्माण झाले असून, उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळल्याचे चित्र पाहायला मिळाले.स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या कार्याला अभिवादन करताना शंभूरাজे देसाई यांनी त्यांच्या विचारांचा आणि समाजसेवेच्या वारशाचा मार्ग कायम जपण्याचा निर्धार व्यक्त केला. स्टेज बाईट0
0
Report
यवला-नांदगांव मार्ग पर लग्जरी बस पलटी: एक की मौत, कई घायल; मार्ग बंद
Yeola, Maharashtra:येवला - नांदगाव रस्त्यावर लक्झरी बस पलटली... - एक जण जागीच ठार ; इतर प्रवासी किरकोळ जखमी.. - जखमींवर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू - मध्य प्रदेशातील होती लक्झरी बस.. - अपघातावेळी बसमध्ये होते २० ते २५ प्रवासी असल्याची माहिती...आज पहाटेची घटना.. - लक्झरी बसवरील चालकाचे नियंत्रन सुटल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती... - बस रस्त्यावरच आडवी झाल्याने येवला - नांदगाव रस्ता वाहतूक बंद... - येवला तालुका पोलीस घटनास्थळी दाखल क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू0
0
Report
Advertisement
मुंबई गोवा महामार्ग का माणगाव बायपास गणेशोत्सव से पहले खुला होगा
Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गाची रायगडात रखडपट्टी माणगाव बायपास साठी नवीन डेडलाईन गणेशोत्सवापूर्वी बायपास पूर्ण क्षमतेने सुरू होणार कोलेटी पूल देखील पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत अँकर मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामासाठी आता नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. वाहतूक कोंडीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला हा बायपास गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला होईल असं बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. आधी ठेकेदारांची दिरंगाई त्यानंतर कोकण रेल्वेने विद्युत खांब हलवण्यात केलेला उशीर यामुळे या बायपासचे काम गेली ५ वर्षे रखडलं आहे. या बायपास सह महामार्गाच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी。0
0
Report
आगरी कोळी समाज भवन के भूमिपूजन से इलाके में एकजुटता की मांग
Kalyan, Maharashtra:आगरी कोळी समाज भवन साठी भूमीपुत्रांची एकजूट !! कल्याण जवळील मलंगगड रोड नांदिवलीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आगरी कोळी समाज बांधव एकवटले आगरी कोळी समाज भवनचे केलं भूमीपूजन शासन दरबारी तसेच लोकप्रतिनिधी कडे वारंवार पाठपुरावा करून देखील आगरी कोळी समाज भवनसाठी सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कल्याण मलंगड नांदिवली परिसरात स्थानिक भूमिपुत्र आज एकवटले सर्वपक्षीय आगरी कोळी समाज बांधवांनी एकत्र येऊन नांदिवली तलावाजवळ जागेत आगरी कोळी समाज भवनाचे भूमिपूजन सोहळा केला . यावेळी नांदवली मधील सर्वपक्षीय आगरी कोळी समाजाचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते प्रत्येक राजकीय पक्षाकडे कल्याण पूर्वेतील नांदवली परिसरात आगरी कोळी समाज भवन उभारण्याचे मागणी केली मात्र आजपर्यंत कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत आमच्या जागा विविध विकास कामांसाठी गेलेत इतर समाजासाठी जागा देता मग आमच्यावर अन्याय का असा सवाल यावेळी आगरी कोळी बांधवांनी उपस्थित केला . त्यामुळे आज आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला असून या ठिकाणी आगरी कोळी समाज भवनाचे भूमिपूजन केल्याचे सांगितले0
0
Report
Vinayak Raut Accusations: Rane Says Won't Back Down – A War of Words in Sindhudurg
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, आमदार निलेश राणे ऑन विनायक राऊत --- असे प्रकार विनायक राऊत सातत्याने करत असतात हे आम्ही ऐकून होतो. आता ते प्रकार त्यांच्या घरच्यानीच बाहेर काढलेत. आता ते दुसऱ्यांवर बोट दाखवू शकत नाही. माणूस असा असूच शकत नाही अशी कृत्य विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाने केलीत. लाज वाटते ते आमच्या जिल्ह्यातले आहेत. आमच्या जिल्ह्याच नाव त्यांनी खराब केलंय. हे कोणी केलेलं षडयंत्र नाही तुम्ही केलेलं פाप आहे. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. आता त्यांनी आपलं तोंड उघडू नये. एवढ्या खालच्या थराला राजकारणात कोणी गेलेलं नाही. विनायक राऊत हे ह्यापेक्षा खाली जाऊ शकत नाहीत त्याचं तोंड काळ झालेलं आहे. ऑन विनायक राऊत राणे टीका --- खरंच आहे. त्यांना नियतीने धडा शिकवलाय. काम करण्यापेक्षा त्यांनी आमच्यावर टीका केली. आता त्यांना तोंड लपवायला जागा नाही. कायम त्यांनी राणेंना संपवण्याच टार्गेट त्यांनी केलेलं पण राणे संपले नाहीत. आम्ही असल्या धंद्यात नाही. अजून खूप काही आहे. अनेक लोक त्यांच्यावर उलटणार ज्यांनी तक्रार केली त्यांच्या कडे अजून बराच साठा आहे. आता विनायक राऊत यांनी आपली थोबड बंद करावीत. ऑन मनी लाँड्रिंग --- विनायक राऊत काळाबाजारी माणूस आहे. व्हाईट इन्कम आणि विनायक राऊत यांचा संबंध काय? राणेंवर टीका केली तर मातोश्री खुश होणार ह्या धंद्यात ते 10 वर्ष राहिलेत. मणी लाँड्रिंग चे 17 लाख मोजू नका 17 करोड पण होऊ शकतील. विनायक राऊत माझ्यासाठी झिरो आहे. माझ्या आयुष्यात किंमत नसलेला माणूस आहे जे तपासात बाहेर येईल ते ठप्प करणारे असेल0
0
Report
Advertisement
