Back
लिंगा नदीच्या पूरात कार वाहून गेली, एकाचा दुर्दैवी मृत्यू!
MMMahendrakumar Mudholkar
Aug 18, 2025 12:16:18
Beed, Maharashtra
बीड: परळी तालुक्यातील लिंगा नदीला पूर – कार वाहून गेली; तिघांचा जीव वाचला, एकाचा मृत्यू
Anc- परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरातील हुडा कोडगाव येथे मध्यरात्री ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे लिंगा नदीला अचानक मोठा पूर आला. या पुराचा अंदाज न आल्याने एक चारचाकी वाहन नदीत वाहून गेले. या दुर्दैवी अपघातात चार जणांपैकी तिघांचा जीव वाचला, तर एकाचा मृत्यू झाला आहे.
ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कारमध्ये चार जण प्रवास करत होते. पूराच्या प्रचंड प्रवाहात वाहन अडकल्याचे लक्षात येताच सिरसाळा पोलिसांनी तातडीने धाडस दाखवत पाण्यात उतरून तिघांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, या अपघातात विशाल बल्लाळ या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शोधमोहीम राबवल्यानंतर दुपारी सापडला.
दरम्यान, लिंगा नदीला आलेल्या पुरामुळे आसपासच्या पाच गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले असून NDRF चे पथक पाचारण करण्यात आले आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 14:16:29Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_NANDED_BODY_FOUND(5 Photos)
नांदेड : ब्रेकिंग
हसनाळ येथून वाहून गेलेल्या 5 पैकी 3 महिलांचे मृतदेह सापडले
अँकर : नांदेड जिल्ह्यातील हसनाळ येथून वाहून गेलेल्या 5 पैकी 3 महिलांचे मृतदेह सापडले आहेत.तर 2 जण अजूनही बेपत्ता आहे.त्यामुळे आणखी 2 दोघांचा शोध सुरू आहे.
आतापर्यंत ललिता भोसले,गंगाबाई मादळे, भीमाबाई मादळे या तीन महिलांचे मृतदेह सापडले आहेत.काल रात्री पुराच्या पाण्यात या तीन महिला वाहून गेल्या होत्या.त्यांचा शोध सकाळपासून सुरू होता.दरम्यान वाहून गेलेल्या आणखी दोघांचा शोध सुरू आहे.
0
Report
MAMILIND ANDE
FollowAug 18, 2025 14:00:19Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 1808_WARDHA_CONG_PC
वर्ध्यात हजारोंची नावे मतदार यादीत दोनदा
ग्रामीण भागात नाव असणारे अनेक शहरी मतदार
राज्यघटना म्हणते एक व्यक्ती एकच मत
मग निवडणूक आयोगाची घोडचूक नाही का?
काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचा संतप्त सवाल
अँकर : वर्धा जिल्ह्यात विविध मतदार संघात मतदारांची नावे दोन ते तीन ठिकाणी असल्याची बाब काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत समोर आणली आहे. वर्धा जिल्ह्यातील केवळ वीस टक्के मतदार याद्याची छाननी केली असता साडेचार हजार मतदार हे मतदार यादीत दोनदा नावं असलेले आढळून आले आहे. सुमारे 16 हजार मतदार हे मायग्रेट झाले असतांनाही मतदार यादीत दोनदा नावं असलेले आढळून आले आहे. केवळ वीस टक्के छाननी केल्यावर हा घोड आढळून आला असल्याचे शैलेश अग्रवाल यांनी सांगितले आहे.
वर्धा जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, हिंगणघाट विधानसभा मतदार संघात हा घोड सर्वाधिक आहे. म्यॅन्युअल पीडीएफ डेटा मधून हा घोड समोर आला आहे. एकाच माणसाचं एकाच बूथवरती वेगवेगळ्या ठिकाणी नाव आहे. एकाच व्यक्तीचं एकाच मतदारसंघात दोन तीन वेगवेगळ्या बुथवर नाव आहे, एकाच व्यक्तीचं ग्रामीण क्षेत्रात सुद्धा मतदार यादीत नाव आहे आणि शहरीक्षेत्रात नगरपालिका क्षेत्रात सुद्धा त्याचं नाव आहे. वेगवेगळ्या इपीक नंबर सोबत सारखे नाव आहे. एकाच नावाचे दोन तीन वेगवेगळे इपीक नंबर आहेत. काही ठिकाणी तर मृत व्यक्तीचे नाव देखील मतदार यादीत असल्याची बाब काँग्रेसने पत्रकार परिषद घेत समोर आणली आहेय.
बाईट - शैलेश अग्रवाल, राष्ट्रीय समन्वयक, किसान सेल, काँग्रेस
4
Report
KJKunal Jamdade
FollowAug 18, 2025 13:52:26Shirdi, Maharashtra:
Anc - शनिवारी रात्री संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावात सुरू असलेल्या कीर्तनावेळी काहीजणांनी आक्षेप घेत गोंधळ घातला.. यानंतर हभप संग्राम बापू महाराज भंडारे यांना मारहाण झाल्याचा गुन्हा संगमनेर शहर पोलिसात दाखल झाला.. याप्रकरणी निषेध करण्यासाठी आज झालेल्या आंदोलनात शिवसेना ( शिंदे गट ) आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले देखील सहभागी झाले.. यावेळी मारहाण करणारे कार्यकर्ते बाळासाहेब थोरात यांचे असल्याचा आरोप करण्यात आला असून तुषार भोसले यांनी देखील थोरात यांच्यावर टीका केलीय.. तर थोरात यांनी खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय..आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजी माजी आमदार समोरा समोर येणार असल्याने भविष्यात हा वाद वाढण्याची शक्यता आहे..
V/o - संगमनेर शहराजवळ असणाऱ्या घुलेवाडी गावातील हनुमान मंदिरात हरिनाम सप्ताहाच आयोजन करण्यात आले आहे.. शनिवारी राजगुरुनगर येथील हभप संग्राम बापू महाराज भंडारे यांचे कीर्तन होते.. मात्र कीर्तन सुरू असताना महाराजांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर महाराजांनी भाष्य केल्याने काही जणांनी विरोध केला..यावरून बराच वेळ गोंधळ झाल्याने महाराज देखील कीर्तन अर्धवट सोडून निघून गेले.. यानंतर या प्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला..याच मारहाणीचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिक पुणे महामार्गावर दीड तास रास्ता रोखून धरत घटनेचा निषेध केलाय..यावेळी सेना आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले देखील सहभागी झाले होते.. यावेळी खताळ आणि भोसले यांनी थेट बाळासाहेब थोरात यांना टीकेचे लक्ष्य केले असून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून मारहाण केल्याचा आरोप केलाय..
अमोल खताळ बाईट ऑन बाळासाहेब थोरात
चाळीस वर्षांपासून बिघडलेल्या संस्कृतीची आठ महिन्यात घडी बसायला सुरवात झालीय..
कीर्तन सुरू होण्याआधी यांनीच कर्मचाऱ्यांना तिथे जायला लावले..
पराभव झाल्याने संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.. त्यातून स्वतःच राजकीय पुनर्वसन करण्यासाठी धडपड सुरू आहे..
अफजल खान व औरंगजेब यांच्यावर बोलताना तुमचे बगलबच्चे महाराजांवर धावून जात असतील तर हे कायद्याचं राज्य आहे..
तुमच्या काळात पोलिसांवर हल्ले झाले होते..
मात्र आमच्या काळात समाजकंटकांवर कारवाई होणारच.. तुम्ही असा प्रयत्न करून पहा तुमच्यावर देखील कायदेशीर कारवाईसाठी आग्रह करू..
भाजप अध्यात्मिक सेल अध्यक्ष तुषार भोसले बाईट
राज्यातील साधू महंत आणि कीर्तनकारांनी हिंदुत्वावर जागरूकता आणल्याने महायुतीला यश मिळाले हा रिपोर्ट राहुल गांधीपर्यंत गेलाय..
त्यामुळे राहुल गांधीनी हा प्रचार प्रसार बंद झाला पाहिजे असा आदेश पक्षाच्या नेत्यांना दिलाय..
आणि त्यामुळेच थोरातानी बगलबच्यांच्या मदतीने हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला..
मात्र संगमनेरच्या हिंदुत्ववाद्यांनी हा प्रकार हाणून पाडला..
राज्यात हा प्रयत्न पुन्हा केल्यास गाठ तुषार भोसलेंशी आहे..
राहुल गांधी जे संविधान घेऊन फिरतात त्या संविधानाने सर्वांना बोलण्याचा अधिकार..
कोणाच्या बापात हिंमत नाही की कीर्तन बंद पाडू शकतात..
बाळासाहेब थोरात बाईट ऑन महाराज धक्काबुक्की प्रकरण...
संगमनेर तालुका शांतता व बंधुभाव असणारा तालुका.. हरिनाम सप्ताह हा वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचे व्यासपीठ.. या ठिकाणी सर्व राजकीय पक्षाचे लोक येतात त्यामुळे राजकीय वक्तव्य नको... या व्यासपीठावरून राजकीय वक्तव्य केल्यानं काहींनी शांततेच्या मार्गाने विरोध केला.. मात्र त्यानंतर खोटे गुन्हे दाखल केले गेले.. माणसांमध्ये भेद निर्माण करून तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न.. संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहे.. विधानसभे आधी देखील असाच एक मोर्चा निघाला होता.. आता पुन्हा निवडणुका जवळ आल्याने आज मोर्चा काढण्यात येतोय.. नेमकं काय झालं हे समजून घेण्याची कोणाला गरज वाटत नाही.. आपल्या गावातील सुसंस्कृत संस्कृती व बंधुभाव टिकवण्याची जबाबदारी आता जनतेची...
2
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 18, 2025 13:51:31Nashik, Maharashtra:
nsk_proetst
fed by 2C
Anchor
सटाणा शहरातील साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या बंद पडलेल्या कामामुळे व रस्त्याच्या दूरावस्थेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेला आहे जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरवात होत नाही तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
2
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 18, 2025 13:51:16Raigad, Maharashtra:
स्लग - सावित्रीने ओलांडली धोक्याची पातळी ...... महाडच्या सुकट गल्लीत पाणी शिरले .......
अँकर - मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहरातील सुकट गल्ली भागात पावसाचे पाणी शिरले आहे. पोलादपूरच्या रानबाजिरे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने सावित्री नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने आवरायला सुरुवात केली आहे. दस्तुरी नाका इथं देखील पाणी साचले असून महाड नगर पालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिलाय. सावित्री नदीवरील दादली पुलावरून वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती.
3
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 18, 2025 13:50:31Nashik, Maharashtra:
anchorn बागलाण तालुक्यातील नवे निरपुर गावातील सरपंच मुन्ना सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. रस्त्याच्या कामासाठी लोकसहभागातून मुरूम टाकले जात होते. मुरूम वाहताना आम्हाला विचारले नाही, या किरकोळ कारणावरून गावातीलच एका व्यक्तीने वाद घालत सरपंच सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात सूर्यवंशी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सटाणा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे."
1
Report
JMJAVED MULANI
FollowAug 18, 2025 13:32:19Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1808ZT_INDAPURKETTEMPL
FILE E
निमगाव केतकीच्या ग्रामदैवत श्री केतकेश्वर मंदिरात बारा ज्योतिर्लिंग प्रतिकृतीचीआरास व विद्युत रोषणाई..
Anchor:
इंदापूर तालुक्यातील
निमगाव केतकीचे ग्रामदैवत श्री केतकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी आकर्षक रंगीबेरंगी फुलांची आरास करत बारा ज्योतिर्लिंगांची रांगोळी मधून सोमनाथ ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती साकारण्यात आली असून सर्वांचे लक्ष वेधणारी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलीय..
ग्रामदैवत मारुती महादेव
केतकेश्वर मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील समस्त गावकरी मंडळींच्या वतीने शंभू महादेवाच्या गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुले व रांगोळीचा वापर करीत बारा ज्योतिर्लिंगांची व सोमनाथ प्रतिकृती साकारण्यात आली असून
यांसह तसेच मंदिर परिसरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती . मागील तीन सोमवारी वेगवेगळ्या आरास केल्यानंतर चौथ्या सोमवारी केलेली ही बारा ज्योतिर्लिंगांची सुंदर सजावट करण्यात आल्याने ती सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरली.
सोमवारी पहाटेपासूनच मंदिरामध्ये विविध अभिषेक घालण्यात येत होते. गावात सह परिसरातील अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी व ही आरास पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लावत गर्दी केली होती..
4
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 13:19:30Jalna, Maharashtra:
FEED NAME :1808ZT_NANDED_RESQUE(1 FILE)
नांदेड :रावणगाव येथे पुरात अडकलेल्या 225 जणांची सुटका,पूरग्रस्तांना राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था
अँकर - नांदेड जिल्हयातील मुखेड रावणगाव येथे तब्बल 225 गावकरी रात्रभर अडकून पडले होते .. सर्वांना एससीआरएफने रेस्कु करुन सुखरूप बाहेर काढले ... गावाजवळ त्यांना राहण्यासाठी तात्पुरते पत्री शेड उभारण्यात आले . ईथे प्रथमोउपचार आणि तात्पुरते शौचालय उभरण्यात आले.. प्रशासनाकडून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली ..
8
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 13:19:04Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_NANDED_VISHNUPURI(1 FILE)
नांदेड :विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले..१ लाख ४ हजार क्यूसेस वेगाने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग.. नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
अँकर - नांदेड जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसा पासून सातत्याने पाऊस सुरु आहे. विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरल्याने प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. विष्णुपुरी प्रकल्पातुन जवळपास १ लाख ४ हजार क्यूसेस इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून गोवर्धन घाट येथील स्मशानभूमी च्या काठापर्यंत पाणी पोहचले आहे. सद्या विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक सुरु आहे, त्यामुळे प्रकल्पाचे आणखी काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दरवाजे उघडण्याची पहिली वेळ आहे. दरम्यान गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे....
7
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 13:17:28Jalna, Maharashtra:
FEED NAME :;1808ZT_NANDED_PEOPLECARRY(3 FILES)
नांदेड : हसनाळमधून 5 जण गेले वाहून,SDRF पथकाकडून शोध सुरु
अँकर : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ येथुन 5 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याची माहिती समोर आली आहे.बेपत्ता झालेल्यांचा शोध सकाळपासून सुरू आहे.SDRF च्या पथकाकडून आज सकाळी गावात बचावकार्य केलं गेलं मात्र वाहून गेलेल्या नागरीकांचा शोध अजूनही लागलेला नाही.त्यामुळे वाहून गेलेल्या नागरीकांच्या कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झालेत. दरम्यान वाहून गेलेल्या नागरीकांचा शोध अजूनही सुरूच आहे.
बाईट :गुणाबाई,ग्रामस्थ,हसनाळ (गुलाबी लुगडे असलेल्या महिला, रडतानाचा व्हिडीओ आहे माझा बाप वाहून गेला म्हणून)
7
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 18, 2025 13:15:45Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढत विशेष परभणी पदभरती व रिक्त पदे भरण्यासाठी धडक दिली. आदिवासींची १२५२० विशेष पदभरती व ८५,००० रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली. यावेळी "नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची”, “आदिवासी एकता जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. संतप्त विद्यार्थ्यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.
5
Report
ABATISH BHOIR
FollowAug 18, 2025 13:03:16Kalyan, Maharashtra:
कल्याण न्यूज फ्लॅश..
कल्याण पूर्व नेतीटली टेकडी परिसरातील जय भवानी नगर या ठिकाणी टेकडीवरील तीन घरांवरती दगड आणि मातीचे ढीग खाली आल्याने तीन घरांचे नुकसान..
मुसळधार पावसामुले टेकडी वरील पाण्यासॊबत दरड आणि मातीचे ढीग घरांवर..
सकाळ पासून कल्याण डोंबिवली परिसरत मुसळधार
मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली सखल भागात पाणी साचले
तिघांच्या घरामध्ये कोणी नसल्याने जीवित आणि नाही..
महानगरपालिकेच्या अग्निशामक दल घटनास्थळी.
byte.. नागरिक
byte.. सुधीर दुष्णन
अग्निशमन अधिकारी
8
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 18, 2025 13:03:08Raigad, Maharashtra:
स्लग - माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणी ....... रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी ...... महामार्गालगतच्या घरांमध्ये पाणी शिरले ...... महामार्ग विभागाच्या हलगर्जी पणाचा फटका .....
अँकर - रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. माणगाव इथं जुने माणगाव परिसरात मुंबई गोवा महामार्गावरून गुडघाभर पाणी वाहत आहे . त्यातूनच वाट काढत वाहने पुढे सरकत आहेत. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांचे हाल होत आहेत. 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत अशी पूरस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर प्रथमच असं पाणी बघितल्याचं तिथले रहिवासी सांगतात. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हलगर्जी पणामुळे ही स्थिती ओढवल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.
बाईट 1 - स्थानिक रहिवासी
बाईट 2 - स्थानिक रहिवासी
5
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 18, 2025 12:45:34Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1808ZT_CHP_ROAD_CLOSE_1
( single file sent on 2C)
टायटल:-- वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील इरई आणि झरपट नदीच्या पाणीपातळीतही वाढ, हडस्ती-चोरगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद
अँकर:--वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने चंद्रपूर शहराजवळील इरई आणि झरपट नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. यामुळे चंद्रपूर कडून हडस्ती आणि चोरगाव कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा आणि वर्धा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ईसापुर आणि सातनाला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या नदीच्या उपनद्या असलेल्या इरई आणि झरपट या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळेच चंद्रपूर कडून हडस्ती आणि चोरगावकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. मात्र या सर्व परिस्थितीमध्ये दिलासादायक बाब ही आहे की इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या बंद आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 18, 2025 12:35:51Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_URMODI
सातारा - साताऱ्यातील उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे चार दरवाजे उचलून 1131 क्युसेक विसर्ग उरमोडी नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे. धरणातून जलविद्युत प्रकल्पासाठी 450 क्युसेक विसर्ग सुरू आहे.असा उरमोडी नदीमध्ये एकूण 1581 क्युसेक विसर्ग उरमोडी नदीमध्ये सुरू आहे. धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उरमोडी नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या परिसरात सध्या पावसाची संततधार सुरूच आहे.
14
Report