Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापुर में आज ग्रामीण क्षेत्रों के स्कूलों की अचानक छुट्टी घोषित!

AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 01:01:27
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना आज सुट्टी जाहीर - सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना आज सुट्टी जाहीर - सोलापूर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शाळांना देण्यात आली सुट्टी - जिल्ह्यातील उत्तर सोलापूर ग्रामीण, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद शाळांना देण्यात आली सुट्टी. - जिल्ह्यातील शाळांना एक दिवसाची देण्यात आली होती सुट्टी - सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे घेण्यात आला निर्णय.. - जिल्हा प्रशासनाकडून परिपत्रक काढत करण्यात जाहीर..
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Sept 23, 2025 03:22:51
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 03:20:35
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 23, 2025 03:19:56
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_nmc_kadde खड्डे दुरुस्तीस निकृष्ट साहित्य, महापालिका ठेकेदारांचे डिस्टन्स प्रमाणपत्र तपासणार... अँकर 77 कोटी खर्च करून शहरांमधील महाराष्ट्र नॅचरल गॅसने खोदलेले रस्ते तसेच खड्डे भरण्यासाठी दिलेल्या कंत्राटात काही ठेकेदार चालबाजी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी आता बांधकाम विभागाकडून ३८ ठेकेदारांना डांबर आणि आरएमसी प्लांटसंदर्भात ३० किलोमीटर अंतराचे प्रमाणपत्र (डिस्टन्स सर्टिफिकेट) तपासण्याचे निर्देश दिले आहे.....त्याचबरोबर यापूर्वी बांधकाम विभागाकडून दिले जाणारे हे प्रमाणपत्र गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून दिले जाणार आहे....खड्डे दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये मोजून काढलेल्या कंत्राटात अपेक्षित काम होत नसल्यामुळे आता पालिका आयुक्त यांनी थेट मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला आहे. खड्डे बुजवण्यासाठी ३१ प्रभागनिहाय ठेकेदारांची नियुक्ती केली असून अनेक ठिकाणी डांबराऐवजी माती टाकून तात्पुरते खड्डे दुरुस्त केले जात आहे..... जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले तसेच त्यांनी स्वतःही पेठरोड येथे पाहणी केली..
3
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 23, 2025 03:19:43
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतीचे मोठे नुकसान Anchor: गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी शेतात शिरल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. विशेषतः चिखली, बुलढाणा, आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या भागांत सोयाबीन, कपाशी, आणि मका यांसारख्या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. शेतात पाणी साचल्याने उभी पिके पूर्णपणे सडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 23, 2025 03:17:28
Pandharpur, Maharashtra:23092025 Slug - PPR_NCP_SENA FILE 01 ANCHOR - , सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाचे आमदार एकनाथ शिंदेंच्या वळचणीला जाऊ लागलें आहेत. आमदार राजू खरे, आमदार उत्तम जानकर यांच्यानंतर आता करमाळा आमदार नारायण पाटील हे सुद्धा शिंदे यांच्याशी जवळीक साधत आहेतकरमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात हजेरी लावली. नुसती हजेरी लावली नाही तर पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी यापुढच्या निवडणूका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सोबत लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या घोषणेमुळे शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे. काल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये करमाळा येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा झाला. त्यामध्ये आमदार नारायण पाटील यांनी शिवसेने सोबत काम करणार असल्याचे म्हटले आहे. मोहोळ आमदार राजू खरे हे यापूर्वीच शिंदे यांच्यात गोटात दाखल झाले आहेत. त्यानंतर आता करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे देखील शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. भविष्यकाळात एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रच काम करणार आहोत कुठल्याही गटातटाचा पक्षाचा विचार न करता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी जाहीर केले आहे. आमदार पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. आमदार पाटील यांच्या या भूमिकेमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. .... बाईट- आमदार नारायण पाटील
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 03:17:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn togdiya avb feed attached आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांची नवरात्रोत्सवात शस्त्र पूजन करण्याची शपथ ANC : छत्रपती संभाजीनगर शहरात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांच्या हस्ते नवरात्र उत्सव महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी प्रवीण तोगडिया यांनी शस्त्रांचे पूजन करत उपस्थितांना गरबासोबत शस्त्र पूजन देखील करावी अशी शपथ घ्यायला लावली.'दुर्गा मातेने ज्याप्रमाणे नऊ दिवस महिषासुर या राक्षसासोबत युद्ध केले. तर दसऱ्याच्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुर राक्षसाचा वध केला. त्याच गोष्टीचे स्मरण राहावे याकरता नवरात्र उत्सव साजरी केली जाते आणि त्याचाच आनंद म्हणून गरबा हा खेळला जातो. मात्र दुर्गा मातेच्या 16 हातात रंगरंगोटीची साहित्य नाही लिपस्टिक नाही, मेक अप साहित्य नसून हत्यारं आहेत, त्यामुळे या नवरात्रोत्सवात गरबा तर खेळच मात्र त्यासोबत शस्त्र पूजन देखील करा'अशी शपथ त्यांनी उपस्थितांना घ्यायला लावली. तसेच भारतात करोडो घरांमध्ये मी शस्त्र पूजन करून घेत आहे. असे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी म्हटले आहे. byte डॉ प्रवीण तोगडिया, (व्हिज्युअल Byte)
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 03:03:17
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2309ZT_JALNA_GOLEGAON(7 FILES) जालना : ब्रेकिंग जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातल्या गोळेगाव गावाला पाण्याचा वेढा गोदावरी नदीच्या पात्रात वाढ झाल्याने गोळेगाव गावाला पाण्याचा वेढा या पाण्यामुळे गोळेगावातील पाचशे नागरिक गावातच अडकले.. गोळेगाव येथून रात्री जवळपास दोन हजार नागरिक स्थलांतरित, लोणीगावात नागरिकांचं स्थलांतर अँकर : जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातल्या गोळेगाव येथे गावाच्या चारही बाजूंनी पुराचे पाणी जमा झालं आहे.त्यामुळे या गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे.गोदावरी नदीच्या पात्रात वाढ झाल्याने गोळेगावच्या गावाला चारही बाजूने पाणी जमा झालं.या पाण्यामुळे गोळेगावमधील पाचशे नागरिक गावातच अडकले आहेत.गोळेगाव येथून रात्री जवळपास दोन हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. या लोकांना लोणी या गावात सध्या स्थलांतर करण्यात आले आहे.तर गावातील ईतर नागरीकांना देखील स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 23, 2025 03:02:05
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_dam ( नांदूर मधमेश्वर धरणाचे स्टॉक व्हिज्युअल्स वापरा) नांदूर मधमेश्वर धरणातून 6310 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग सुरू अँकर नाशिक शहर परिसरात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक धरण हे तुडुंब भरले असून यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे नांदूर मधमेश्वर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.. काल नांदूर मधमेश्वर मधून 3155 क्युसेस साबणाचा विसर्ग सुरू होता मात्र मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढत असल्याने पुन्हा सकाळी सहा वाजेच्या सुमारास 3155 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग वाढवून हा आता 6310 क्युसेस चा पाण्याचा विसर्ग नांदूर मधमेश्वर धरणातून करण्यात येत आहे यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असा आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर पाण्याचा विसर्ग यापेक्षाही जास्त वाढवला जाईल असे देखील सांगण्यात आला आहे.....
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 23, 2025 02:48:39
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_R4_FLOOD धाराशिव जिल्ह्यात आभाळ कोसळलं – दुसऱ्या दिवशीही पावसाचा हाहाकार! खबरदारी म्हणून आज शाळांना सुट्टी धाराशिव जिल्ह्यात आभाळ कोसळलं असून, दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टीचा हाहाकार कायम आहे. आठही तालुक्यांत रात्रभर तुफान पाऊस झाला. विशेषत: कळंब तालुक्यात पावसाचा कहर झाला. मांजरा नदीला महापूर आला तर तेरणा नदीनं पात्र सोडून गावात पाणी शिरलं. कळंब तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला. तब्बल ९२ गावांवर संकट कोसळलंय. ६० हजार शेतकरी बाधित झाले आहेत. हजारो जनावरे वाहून गेली आहेत. प्रशासनाला मात्र मोठं यश आलं – पुरात अडकलेल्या १५० नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. पिकं नाहीत, जनावरे नाहीत… आता नागरिक जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. न भूतो न भविष्यते अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून, पाऊस पुन्हा आल्यास परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. आज सकाळी १० वाजता राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पूरग्रस्त भागाला भेट देणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील पुरस्थिती गंभीर – प्रशासन आणि बचाव पथकांची मोठी कसोटी सुरूच.
3
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 23, 2025 02:46:33
Beed, Maharashtra:बीड: जिल्ह्यात मध्यरात्री दमदार पाऊस अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली मुसळधार पावसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील महाविद्यालय शाळांना सुट्टी Anc: काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने बीड शहरातील बिंदुसरा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान नदीच्या वाढलेली पाणी पातळी पाहता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिला आहे. तर अनेक भागात पुरात अडकलेल्या नागरिकांना NDRF च्या मदतीने बाहेर काढण्यास यश आले आहे. तर पूर परिस्थिती पाहता प्रशासनाने शाळा महाविद्यालय सुट्टी जाहीर केली आहे..
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 23, 2025 02:46:19
0
comment0
Report
Advertisement
Back to top