Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

BAMU ने 25 महाविद्यालयों पर 10 हजार रुपए का जुर्माना लागू किया

VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 03:20:35
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn university av Feed attached डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यंदा जिल्हास्तरीय युवा महोत्सव घेण्यात आला. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालया सहभागी होण्यास सांगितले होते मात्र अनेक महाविद्यालयाने यात दांडी  मारल्याने विद्यापीठ आता  दंडात्मक कारवाई करणार आहे.. कलागुणांना वाव देण्यासाठी युवा महोत्सवात सर्वांनी नोंदणी करा, विद्यार्थ्यांना सहभागी होऊ द्या, अशा सूचना करूनही केवळ नाव नोंदणी करून युवा महोत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. अशा २५ महाविद्यालयांना विद्यापीठाच्या नियमानुसार आता १० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 05:05:22
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 05:05:11
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ ( WHATS'UP LIVE ) (((( व्हाट्सअप लाईव्ह दिलेले आहे )))) - सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ - सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू - सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गांवरील लांबोटी जवळील पूल पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झालीय - सीना -कोळेगाव, खासापुरी आणि चांदनी प्रकल्पातून सीना नदीमध्ये सुमारे 2 लाख क्यूसेक पाणी सोडले - सीना नदी पात्रातील माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पाणी शिरले. - सीना नदीच्या प्रवण क्षेत्रामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ - धाराशिव, बार्शी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ - सीना नदीवरील बापले, अनगर, मालिकपेठ, आष्टे हे सर्व बंधारे पाण्याखाली - मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 05:01:21
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सीना नदीत सुरु असलेल्या 2 लाख क्यूसेक विसर्गमुळे तिऱ्हे गावातील दगडी पूल पाण्याखाली ( Choupal ) सीना नदीत सुरु असलेल्या 2 लाख क्यूसेक विसर्गमुळे तिऱ्हे गावातील दगडी पूल पाण्याखाली काही वेळापूर्वी दगडी पुलावर पाणी नव्हतं, मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने पूल पाण्याखाली खबरदारी म्हणून प्रशासनाने सकाळपासूनचं या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केलीय सीना नदीच्या काठावरील शेकडो एकर शेती ही पाण्याखाली गेलीय तर उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी, पाकणी, तिऱ्हे, पाथरी, तेलगाव, नंदुर, डोणगाव आणि मोहोळ तालुक्यातील विरवडे, पिरटाकळी, अकोले, शिंगोली-तरटगाव या गावांना पुराचा मोठा फटका 2020 नंतर पुन्हा एकदा सीना नदीला पूर आल्याने शेतकरी चिंतेत चौपाल : ग्रामस्थ आणि शेतकरी....
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 23, 2025 05:01:05
Dhule, Maharashtra:ANCHOR - नवापूर शहरातून वाहणारी रंगवली नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. रंगवली नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने रंगवली धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून, ओसंडून वाहत आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने 16 हजार क्यूसेकने पाण्याच्या विसर्ग केला जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने नदीकाठाच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आलेला आहे. नवापूर तालुक्यासह शेजारील असलेल्या गुजरात राज्यात होत असलेल्या पावसाच्या परिणाम रंगवली नदीच्या पाणी पातळी वाढला आहे. नवापूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे अनेक शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 23, 2025 05:00:40
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 23, 2025 04:31:01
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव – DHARA_FLOOD_R5 धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. शिवारात चिखल साचला असून अनेक गावांमध्ये घराघरांत पाणी शिरलं आहे. त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, कपडे वाहून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गोठ्यात बांधून ठेवलेली जनावरे जागेवर मृत्युमुखी पडली असून शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील पोराचं हे विदारक चित्र पाहून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नदी-नाल्यांना महापूर आला आहे. रस्ते वाहून गेले, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावात तर वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिक अंधारात रात्री काढत आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. मात्र अजूनही अनेक कुटुंबे अडकलेली असल्याने भीतीचे वातावरण आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 23, 2025 04:17:46
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला... नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..... AC ::- लातूर जिल्ह्यात अजूनही अनेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे नदी नाली ओसंडून वाहत आहेत. त्यात आता धरण क्षेत्रात ही पावसाचा जोर कायम असल्यामुळे मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाची सहा गेट प्रत्येकी तीन मीटरने उघडण्यात आली असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याच्या विसर्गामुळे लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठावरील गावकऱ्यांनी तसेच पूर प्रवण भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या पुरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 23, 2025 04:17:06
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 23, 2025 04:05:26
Navi Mumbai, Maharashtra:story slug - गणेश नाईक ऑन विमानतळ नामकरण ganesh naik on airport name ftp slug - nm ganesh naik on airport shots- airport reporter- swati naik navi mumbai anchor -नवी मुंबईविमानतळाला अद्याप दि बा पाटील यांचं नाव देण्याची घोषणा न झाल्याने प्रकल्पग्रस्थानमध्ये संतापाची लाट असून, विमानतळ उदघाटनाला प्रकल्पग्रास्थांचा होणारा विरोध पाहता उदघाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे । वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील 30 सप्टेंबर रोजी विमानतळाचे उदघाटन होणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली असून,उदघाटन होण्यापूर्वीच विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव लागेल अशी आमची मागणी असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले। बाईट -: गणेश नाईक वनमंत्री
4
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 23, 2025 04:04:58
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 2309_BHA_DOG_BITE FILE - 2 IMAGE पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा.... परसोडीतील तिघेजण गंभीर Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील परसोडी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक लोकांवर हल्ला चढवून तिघांचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दोघे युवक व एका लहान मुलगी गंभीर झाली. त्यांच्यावर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन ढोके (३६), देवेंद्र मेश्राम (३५) व प्रीती भेंडारकर (६) अशी जखमींची नावे आहेत. प्रीती ही शाळकरी मुलगी असून पिसाळलेल्या कुत्र्याने तिघांनाही हातापायांसह शरीराच्या विविध भागांवर चावा घेतल्याने खोलवर जखमा झाल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने गावकऱ्यांनी तातडीने त्यांना सामान्य रुग्णालय, भंडारा येथे दाखल केले. याप्रकरणी आरोग्य विभागाने जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून, पाळीव व मोकाट कुत्र्यांना वेळोवेळी रेबीजचे लसीकरण करून घरातच बांधून ठेवावे, अन्यथा अमूल्य जीव धोक्यात जाण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top