icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
422001
SGSagar Gaikwad28 Jul 2025, 08:06 am

कपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांची भव्य गर्दी, नंदी नसलेलं एकमेव मंदिर!

Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_kapleshwar_121 *नाशिकच्या गोदावरी तीरी असलेल्या कपालेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, जगातील एकमेव नंदी नसलेल कपालेश्वर महादेव मंदिर...* अँकर:      आज श्रावणी सोमवारचा पहिला दिवस असून नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी दर्शनासाठी पाहायला मिळत आहे. पंचवटी कारंजा ते कपलेश्वर महादेव मंदिर परिसरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागले आहेत. कपालेश्वर महादेव मंदिर हे जगातील एकमेव नंदी नसलेला महादेव मंदिर असून या मंदिराला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आणि याच कपालेश्वर मंदिरात आज भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून मंदिर प्रशासनाकडनं देखील भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चोख व्यवस्था केली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड... Use wkt with byte
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशीम में हल्दी के भाव एक हफ्ते में तेज़ बढ़े, रिकॉर्ड उछाल

Washim, Maharashtra:वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीच्या बाजारभावात एका आठवड्यात १ हजार ६२६ ते ३ हजार ५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे हळदीच्या बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात हळद कांडीला १४ हजार २०० ते १५ हजार ८७५ रुपये, तर हळद गटुला १२ हजार ८५० ते १३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. जिल्ह्यातील लिलावात हळद कांडीला १५ हजार ९०० ते १७ हजार ५०१ रुपये, तर हळद गटुला १५ हजार ते १६ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजारात दर्जेदार हळदीला चांगली मागणी असल्याने दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक के जायकवाडी बांध में पानी की आवक 546 क्यूसेक, जलस्तर 1506.40 फुट तक

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील पावसात घट झाल्याने जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली असली, तरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. सोमवारी मागील २४ तासांत ५४६ क्युसेक पाण्याची आवक झाली असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा ६८५.७८६ दलघमी म्हणजेच ३१.५९ टक्के इतका झाला आहे,  धरणाची पाणीपातळी १५०६.४० फूट (४५९.१५१ मीटर) इतकी नोंदविण्यात आली असून एकूण पाणीसाठा १४२३.८९२ दलघमी आहे. यंदाच्या मान्सून हंगामात १ जूनपासून धरणात आतापर्यंत ९६.१७३ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. रविवारी धरण परिसरात पावसाची नोंद झाली नसून आजचा पाऊस शून्य राहिला आहे。
0
0
Report

चिकलठाणा में प्लास्टिक गोदाम में भीषण आग, दमकल ने पाया काबू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा परिसरातील भालगाव शिवारात रात्री एका प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच चिकलठाणा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने बंबासह घटनास्थळी रवाना झाले. अग्निशामक दलातील जवानानी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, गोदामात प्लास्टिक साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते अखेर अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
0
0
Report

वायरल ऑडिओ क्लिप पर महाराष्ट्र मंत्री ने की जांच, साइबर व फॉरेन्सिक सत्यापन

Satara, Maharashtra:माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सध्या चर्चेत असलेल्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे."माझ्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात मी नेहमीच सर्व अधिकार्‍यांशी आणि लोकांशी आदराने आणि सौजन्याने संवाद साधला आहे, आणि हीच पद्धत पुढेही राहील. सध्या समोर आलेले प्रकार हे आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केलेले असू शकतात, असे सांगत त्यांनी या क्लिप्सच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती दिली आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाजाची सत्यता पडताळण्यासाठी आणि वास्तविक समोर आणण्यासाठी सायबर पोलिसांमार्फत तपास केला जाईल. गरज पडल्यास खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आवाजाचे नमुने देखील घेऊन फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. क्लिपमध्ये कोणतीही छेडछाड झाली आहे का, तसेच संबंधित कर्मचाऱ्याला कोणी आणि का कोंडून ठेवले, त्याला कोणी मारहान केली, या सर्व बाबींचा छडा पोलीस यंत्रणा लावेल. "या संपूर्ण प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, मग तो कितीही मोठा आणि वजनदार असला, तरी त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे."
0
0
Report
Advertisement

संभाजीनगर में बाबा फर्जन रोहिला गली के वाडे पर पुलिस दबिश, कुछ नहीं मिला

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह सर्वत्र चर्चेत असलेल्या कामगार नेता, ९० च्या दशकात दबदबा राहिलेल्या बाबा फर्जनच्या रोहिला गल्लीतील जुन्या वाड्याची पोलिसांनी झडती घेतली. वर्षभरापूर्वी फर्जनने सोडलेला हा अलिशान, जुन्या धाटणीत बांधलेला वाडा सध्या 'खंडहर' झाला असून तिथे घाणीने वेढा घातला आहे , फर्जनचा मुंबईत खासगी नोकरी करणारा मुलगा शहरात आल्यानंतर, त्याच्या उपस्थितीत सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव व इतर पोलिसांनी तीन तास वाडा पिंजून काढला मात्र केवल गंजलेले जुने साहित्य, कारखान्यातील यंत्राचे अवशेष याव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती काहीच लागलें नाही...
0
0
Report

कोल्हापुर के अंबाबाई मंदिर की छत से सीमेंट उखड़ना, संवर्धन कार्य पर मचे बवाल

Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती लागल्याचा व्हिडिओ संध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्या वेळी कोल्हापुरात सलग पाऊस कोसळत होता, त्यावेळीचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. मंदिर संवर्धनाचा भाग म्हणून अंबाबाई देवीच्या छतावरील सिमेंटचे भाग काढण्यात आले आहेत, दरम्यान शिखरांचेही संवर्धन प्रक्रिया राबवली जात आहे, पण ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप काही नागरिक आणि संघटनांचा आहे. मंदिराचे संवर्धन करत असताना ग्रायंडरचा वापर केला जात असल्याचे देखील दिसून येत आहे. पुरातत्त्वीय नियमानुसार ही संवर्धन प्रक्रिया राबवली जात नसल्याचे देखील अनेक भक्तांचे म्हणणे आहे.
0
0
Report

वाशीम में मॉनसूनी देरी से फसल संकट, किसान बारिश का इंतजार कर रहे हैं

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले. त्यानंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या.मात्र,गेल्या दहा दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने पेरणी केलेली पिके करपू लागल्याने धोक्यात आली आहेत. पिकांच्या वाढीसाठी या टप्प्यावर पावसाची अत्यंत गरज आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे,ते पिके वाचवण्यासाठी विहिरी,बोअरवेल आणि तुषार सिंचनाद्वारे सिंचन करत आहेत.मात्र,सिंचनाची कोणतीही सोय नसलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून,दमदार पावसाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.याच परिस्थितीचा शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी...
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजीनगर में खाद्य तेल पैकिंग इकाइयों पर रेड, 2 करोड़ 93 लाख 35 हजार 603 रुपए का स्टॉक जप्त

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात अन्न व औषध प्रशासनाने शहरातील दोन नामांकित खाद्यतेल रिपॅकिंग अस्थापनेांवर छापे टाकून तब्बल २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपयांचा साठा जप्त केला. पैठण रोडवरील गेवराई तांडा येथील एक कंपनी, आणि शहरातील लक्ष्मण चावडी परिसरातील त्याच कंपनीच्या गोडाउनवर ही कारवाई करण्यात आली. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कंपन्यांचे परवाने प्रशासनाने तातडीने निलंबित केल्याची माहिती सहायक आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या या अचानक तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. जप्त तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून, अहवालानंतर पुढील कडक कारवाई केली जाईल
0
0
Report

शंभूराजे देसाई ने पिता की याद में भावुक श्रद्धांजलि कार्यक्रम का आयोजन किया

Satara, Maharashtra:पाटण, सातारा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई हे आपल्या वडिलांच्या आठवणीने अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील मरळी येथील कारखाना कार्यस्थळावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना शंभूराजे देसाई यांनी वडिलांच्या आठवणीना उजाळा दिला. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, समाजसेवेचा आणि दिलेल्या संस्कारांचा उल्लेख करताना त्यांचा कंठ दाटून आला. काही क्षण ते बोलूही शकले नाहीत. सभागृहातही भावनिक वातावरण निर्माण झाले असून, उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळल्याचे चित्र पाहायला मिळाले.स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या कार्याला अभिवादन करताना शंभूरাজे देसाई यांनी त्यांच्या विचारांचा आणि समाजसेवेच्या वारशाचा मार्ग कायम जपण्याचा निर्धार व्यक्त केला. स्टेज बाईट
0
0
Report
Advertisement

मुंबई गोवा महामार्ग का माणगाव बायपास गणेशोत्सव से पहले खुला होगा

Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गाची रायगडात रखडपट्टी माणगाव बायपास साठी नवीन डेडलाईन गणेशोत्सवापूर्वी बायपास पूर्ण क्षमतेने सुरू होणार कोलेटी पूल देखील पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत अँकर मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामासाठी आता नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. वाहतूक कोंडीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला हा बायपास गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला होईल असं बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. आधी ठेकेदारांची दिरंगाई त्यानंतर कोकण रेल्वेने विद्युत खांब हलवण्यात केलेला उशीर यामुळे या बायपासचे काम गेली ५ वर्षे रखडलं आहे. या बायपास सह महामार्गाच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी。
0
0
Report

आगरी कोळी समाज भवन के भूमिपूजन से इलाके में एकजुटता की मांग

Kalyan, Maharashtra:आगरी कोळी समाज भवन साठी भूमीपुत्रांची एकजूट !! कल्याण जवळील मलंगगड रोड नांदिवलीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आगरी कोळी समाज बांधव एकवटले आगरी कोळी समाज भवनचे केलं भूमीपूजन शासन दरबारी तसेच लोकप्रतिनिधी कडे वारंवार पाठपुरावा करून देखील आगरी कोळी समाज भवनसाठी सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कल्याण मलंगड नांदिवली परिसरात स्थानिक भूमिपुत्र आज एकवटले सर्वपक्षीय आगरी कोळी समाज बांधवांनी एकत्र येऊन नांदिवली तलावाजवळ जागेत आगरी कोळी समाज भवनाचे भूमिपूजन सोहळा केला . यावेळी नांदवली मधील सर्वपक्षीय आगरी कोळी समाजाचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते प्रत्येक राजकीय पक्षाकडे कल्याण पूर्वेतील नांदवली परिसरात आगरी कोळी समाज भवन उभारण्याचे मागणी केली मात्र आजपर्यंत कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत आमच्या जागा विविध विकास कामांसाठी गेलेत इतर समाजासाठी जागा देता मग आमच्यावर अन्याय का असा सवाल यावेळी आगरी कोळी बांधवांनी उपस्थित केला . त्यामुळे आज आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला असून या ठिकाणी आगरी कोळी समाज भवनाचे भूमिपूजन केल्याचे सांगितले
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top