Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

HSRP नंबर प्लेट चोरी: वाहन सुरक्षिततेसाठी मोठा धोका!

TTTUSHAR TAPASE
Aug 14, 2025 09:03:45
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 8 FILE SLUG NAME -SAT_HSRP_ISSUE सातारा- HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या नंबर प्लेट ची सक्ती देशभरात करण्यात आली आहे.ही नंबर प्लेट 15 ऑगस्ट पर्यंत बसवण्याचे आदेश देण्यात आले आहे.वाहन चोरी आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने या प्लेट्स अनिवार्य केल्या आहेत. त्यावर विशिष्ट लेझर-कोरलेला कोड, क्रोमियम-आधारित होलोग्राम आणि स्नॅप-लॉक यंत्रणा असते, ज्यामुळे त्यांची बनावट किंवा छेडछाड करणे जवळजवळ अशक्य होते. यामुळे वाहनांची सुरक्षा वाढते आणि चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणे अधिक सोपे होते.एकीकडे वाहनांचा सुरक्षितते साठी या नंबर प्लेट सक्ती केली जात असताना साताऱ्यात मात्र या HSRP नंबर प्लेटचीच चोरी होण्याचे प्रकार होत असल्याचे समोर आले आहे.नंबर प्लेट चोरीला गेल्यावर त्याचा गैरवापर होऊ शकतो .त्याच बरोबर जर नव्याने पुन्हा डुप्लिकेट नंबर प्लेट काढायची कशी याबाबत अनेकांना काहीच माहिती नाही त्यामुळे अशा लोकांचा मनात अनेक प्रश्न उपस्थितीत होत आहेत. Byte - सागर घोलप (तक्रारदार) विओ 2- एखादी नंबर प्लेट गहाळ किंवा चोरीला गेली तर नवीन दुसरी नंबर प्लेट मिळू शकते पण त्यासाठीची प्रक्रिया खूप मोठी आहे. Byte - सचिन देवकर - नंबर प्लेट डिस्ट्रीब्यूटर विओ 3- जर वाहनांची HSRP नंबर प्लेट चोरीला गेली तर नागरिकांनी तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी जेणे करून त्याचा गैरवापर केला जाणार नाही असं आवाहन सातारा पोलिस प्रमुखांनी केलं आहे. Byte - तुषार दोशी पोलिस जिल्हा प्रमुख व्हिओ 4- HSRP नंबर प्लेटमुळे वाहनांची सुरक्षा वाढते, पण ती चोरीला गेल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी प्लेट सुरक्षित ठेवावी, चोरी झाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे आणि नियमांनुसार डुप्लिकेट प्लेटची प्रक्रिया पूर्ण करून वाहन पुन्हा सुरक्षित करण्याची गरज आहे. तुषार तपासे झी 24 तास सातारा
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRANAV POLEKAR
Aug 14, 2025 11:19:37
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी मंत्री नितेश राणे byte -- *नितेश राणे on प्रशांत यादव* प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यादव यांच्या संपर्कात होते मी संपर्क मंत्री असल्याने मला पाठपुरावा करायला सांगितलं अजून असंख्य नेते संपर्कात आहेत *On आदित्य ठाकरे* राजशिष्टाचारानुसार आमदाराला भाषण करायला द्यायला पाहिजे असं काही नाही त्यांचे स्वतःचे वडील आता मुख्यमंत्री नाहीत, त्यामुळे त्यांनी त्यांनी स्वप्नातून बाहेर यावं यांनी असंच शेंबड्यासारखं रडत राहावं *On राज ठाकरे* राज ठाकरे साहेब यांचा अभ्यास आमच्यापेक्षा दांडगा आहे त्यावर जास्त मी बोलू इच्छित नाही *On गोविंदगिरी महाराज* ते वक्तव्य मी ऐकलेलं नाही, तुमच्या वाचनावर मी उत्तर देणार नाही *On नवाब मलिक* त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही त्यावर कसं बोलू शकतो *On मोदी एक्सप्रेस* मोदी एक्सप्रेस ट्रेनला रत्नागिरीतही थांबा देण्यात आलेला आहे रत्नागिरीनेही आम्हाला साथ दिली *On अमेरिका टेरिफ* अमेरिकेने दरवाजे बंद केले असले तरी uk ने दरवाजे उघडले आहेत, अन्य देश तसं करत आहेत डोमेस्टिक बाजारपेठेवरही लक्ष द्यावं *On शिंदे शिवसेना नाराजी* हे भाजप कार्यालय आहे, हा प्रश्न तिकडे विचारा आमच्याकडे सर्व सुखी समाधानी हसत दिसत आहेत दुसऱ्या बारशांत जाऊन पेढे खायची सवय नाही मला *On जिल्हा नियोजन निधी - उदय सामंत* मी वस्तुस्थिती मांडली आमचे भाजपचे खासदार आहेत राजापूर, रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघाला प्रत्येकी 20 कोटी, आणि खासदार राणे साहेब म्हणून त्यांना फक्त 5 कोटी निधी दिलेला आहे असा अन्याय होता कामा नये यासाठी महायुतीची समन्वय समिती आहे त्याबाबतची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांना दिली आहे उदय सामंत यांनाही शुभेच्छा याचे पडसाद सिंधुदुर्गतही पाहायला मिळतील मीही सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे महायुती म्हणून आपण काम करतोय आमचीही 40 टक्के मतं आहेत समान निधी देणं हा अधिकार आमचा *On चिकन मटण बंदी* हा काँग्रेसच्या काळातला जीआर आहे कोणी काय खावं याबाबत सरकार हस्तक्षेप करणार नाही, हे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे
1
comment0
Report
MAMILIND ANDE
Aug 14, 2025 11:19:08
Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग* SLUG-1408_WARDHA_MLA_ACTION - वर्ध्यात आमदार राजेश बकाने यांची FCI गोदामात धाड - आमदार राजेश बकाने यांनी केला धान्य चोरीचा पर्दापाश - वर्ध्याच्या पुलंगाव येथील कार्यकर्त्यांसह मारली धाड - पुलगावच्या सरकारी राशन गोदामात अनाज कमी येत असल्याचा तक्रारीवरून थेट पोहचले आमदार - एका पन्नास किलोच्या पोत्यात 500ग्रॅम अनाज कमी येत असल्याची होती तक्रार - गोदामात असलेल्या वजनात 500 ग्रॅम वजनाचा काळ्या कपड्यात होते वजन - थेट सरकारी गोदामात आमदार पोहचल्याने पुलगावात खळबळ - पुरवठा निरीक्षकावर कारवाई करा आमदार बकानेच्या सूचना आज पुलगाव येथे मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. स्थानिक आमदार राजेश बकाने यांनी थेट FCI च्या सरकारी राशन गोदामावर अचानक धाड मारली. त्यांच्या सोबत पुलगाव येथील काही कार्यकर्तेही उपस्थित होते.ही कारवाई सरकारी धान्याच्या वजनात सातत्याने होणाऱ्या कपातीच्या तक्रारींवरून करण्यात आली.प्रत्येक ५० किलोच्या पोत्यात तब्बल ५०० ग्रॅम अनाज कमी दिलं जातं.आमदार बकाने यांनी गोदामात जाऊन प्रत्यक्ष वजन करून पाहणी केली. यावेळी एका पोत्यात ५०० ग्रॅम वजनाचा काळ्या रंगाचा कपड्यात लपवलेला वजनदंड सापडला, ज्याच्या मदतीने वजनात कपात केली जात असल्याचं उघड झालं.या थेट कारवाईमुळे पुलगावात खळबळ माजली असून, सरकारी अन्न वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे. आमदार बकाने यांनी पुरवठा निरीक्षकावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
2
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 14, 2025 11:17:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Byte प्रकाश आंबेडकर सोमीनाथ सूर्यवंशी प्रकरणात आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली प्रकाश आंबेडकर हे स्वतः सुनावणीला उपस्थित होते पुढील एक आठवड्याच्या आत डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस याना एसआयटी स्थापन करण्याचे न्यायालयाने आदेश दिले सरकारने नेमलेल्या कमिटीला मान्यता देण्यात आली नाही सरकारने नेमलेल्या कमिटीकडे असलेले सर्व कागदपत्र एसआयटी स्थापन केल्यावर त्यांच्याकडे देण्यात यावे चौकशी संदर्भात याचिकाकर्त्यांना कोणतीही गडबड वाटल्यास त्यांना न्यायालयात अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे सरकारच्या कामावर न्यायालयाने नाराजी दाखवली आहे तसेच पुढील तीन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे कोर्टाने सांगितले आहे byte प्रकाश आंबेडकर, पीडिताचे वकील
2
comment0
Report
KJKunal Jamdade
Aug 14, 2025 11:03:12
Shirdi, Maharashtra:
संगमनेर / अहिल्यानगर *संजय राऊत भाषण मुद्दे -* *मी गेली चार पाच वर्षे सातत्याने इथे येतो...* मला जेव्हा निमंत्रणाचा फोन आला तेव्हा मी दिल्लीत राहुल गांधींसोबत पोलिसांच्या ताब्यात होतो... इथली माणसं गोड, आग्रह मोडता येत नाही... या देवस्थानावर माझी श्रद्धा बसली आहे... *दर्शन घेताना पुणेकर बाबांचा आवाज आला पक्ष आणि चिन्ह परत मागा...* बाळासाहेब थोरातांनी शाळा दिली, पाणी दिलं, मात्र तुम्ही त्यांना विधानसभेत पाठवलं नाही... आम्हाला याची खंत... खोटेपणाचा विजय का झाला?... *बाळासाहेब थोरात विधानसभेत गेले नाही याचे शल्य आजही...* आमच्या सरकारने जनतेसाठी काय करायचे बाकी होते?... कोरोना काळात ठाकरे सरकारने जनतेला वाचवण्याचे काम केले.. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली... *मात्र आमचं सरकार गद्दारी करून पडण्यात आलं...* *उपमुख्यमंत्री काश्मीरला गेले, सैनिकांना रक्त द्यायला...* *मी ताबडतोब सैन्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिले...* *महाराष्ट्रातील गद्दाराचं रक्त सैनिकांच्या शरीरात जाता कामा नये अशी मागणी केली...* *या देशाचं नेतृत्व राहुल गांधीच करू शकतात...* *गांधारी आणि धृतराष्ट्राला 100 पोरं कशी झाली? हा प्रश्न मला पडायचा...* *मात्र आज मतदार याद्या पहिल्यावर कळलं...* एकाएका घरात शंभर मतदार... बोगस मतदानावर राऊत्यांचा टोला... *बाळासाहेब पुन्हा आपलं सरकार येणार...* बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे... *मी जे बोलतो ते खरच होतं...*
2
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 14, 2025 11:03:06
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ च्या कळंब आणि राळेगाव येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेत सहभागी नागरिकांनी हाती तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा दिल्या तर महिलांनी फेटे परिधान करून यात्रेत सहभाग नोंदविला. यावेळी वातावरण देशभक्तीमय झाले होते. याप्रसंगी नागरिकांनी शहीद स्मारकाला नमन केले. "तिरंगा" आपला अभिमान आहे, जो भारतीयांना एका मजबूत बंधनात बांधतो. देशाच्या संरक्षणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव च्या माध्यमातून भारतावर वक्रदृष्टी ठेवणाऱ्यांना कणखर उत्तर दिल्याचे यावेळी मंत्री अशोक उईके यांनी सांगितले.
4
comment0
Report
KJKunal Jamdade
Aug 14, 2025 11:00:43
Shirdi, Maharashtra:
Sangmner News Flash संजय राऊत बाईट पॉईंटर्स - ऑन फडणविस - मोदी-फडणवीसांची सत्ता जाणारच! राहुल गांधींचे आंदोलन जयप्रकाश नारायणपेक्षा मोठे होणार – संजय राऊत “फसवणुकीच्या माध्यमातून दिल्लीत नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता मिळवली आहे. आता त्यांना ती सत्ता सोडावी लागणार आहे. राहुल गांधींनी सुरू केलेले आंदोलन हे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा निश्चितच मोठे होणार आहे,” अशी आक्रमक टिप्पणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संगमनेर येथे केली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. ऑन मतदार घोळ - राऊत म्हणाले, “देशभर मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झालेला आहे. महाराष्ट्रात तब्बल 58 मतदारसंघांमध्ये गोंधळ आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघ यात अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी उभे केलेले आंदोलन जनतेच्या हक्कासाठी निर्णायक ठरेल.” ऑन राज ठाकरे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राऊत म्हणाले, “दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत मुंबई देशाची राजधानी गुजरातला ‘शिफ्ट’ होता कामा नये यावर काँग्रेससह सर्व पक्ष एकमत झाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचे स्वागत सर्वत्र होत आहे.” ऑन 15 ऑगस्ट उपवास - 15 ऑगस्ट उपवास आदेशावर टिका करताना राऊत म्हणाले, “मनपा सरकारचे नसते का? 27 महानगरपालिकांत सत्ता फडणविसांच्या हातात आहे. तेच प्रशासक नेमत आहेत, तेच आयुक्त नेमत आहेत. हा निर्णय सरकारचा नाही, असे म्हणणे म्हणजे प्रशासनाची अज्ञानता. 15 ऑगस्ट हा विजय उत्सवाचा दिवस आहे, त्याला धार्मिक उपवासाची जोड देणे योग्य नाही. असे कर्मकांड चालले असते, तर देशालाही स्वातंत्र्य मिळाले नसते.” ऑन नवनाथ बन वारकरी अपमान - भाजपावर हल्लाबोल करताना राऊत म्हणाले, “भाजपाला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग यांचे साहित्य वाचावे लागेल. देशाला आदेश काढून स्वातंत्र्य मिळाले नाही, तर लढ्याने मिळाले आहे. आमच्या राज्यात वारकरी संप्रदायासह अनेक धार्मिक परंपरा आहेत, त्यांचा सन्मान केला जातो. मात्र, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या लढायांमध्ये मांसाहार दिला जायचा, असा ऐतिहासिक संदर्भ मी दिला होता.” ऑन फडणवीस वक्तव्य - फडणवीसांना थेट टोला देत राऊत म्हणाले, “राज्याचे दोन-तीन वेळा मुख्यमंत्री राहूनही फुटकळ विधाने करू नयेत. मुंबई, कल्याण किंवा कोणतीही महानगरपालिका असो – तुम्ही घेतलेला निर्णय जनतेला पटवून द्यावा.”
2
comment0
Report
SGSagar Gaikwad
Aug 14, 2025 10:32:30
Nashik, Maharashtra:
Feed send by mozo Reporter-sagar gaikwad Slug-nsk_voice_devendr_pc *नाशिक ब्रेकिंग* - व्हॉइस ऑफ देवेंद्र राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजकांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद - रोहित पवारांनी केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही - ही स्पर्धा चालूच राहणार पत्रकार परिषदेत आयोजकांकडून खुलासा - ही स्पर्धा पुणे विद्यापीठाकडून आयोजित करण्यात आलेली नाही , तर नाशिक प्रतिष्ठान स्वारंभ फाउंडेशन संस्था अशा तीन संस्था मिळून ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची दिली माहिती - शरद पवारांच्या संस्थेने देखील रंगी दिली आहे आम्हाला स्पर्धेची परवानगी दिल्याची माहिती - ही कुठेही राजकीय हेतूने सुरू केलेली स्पर्धा नाही - शरद पवारांच्या ही नावाने अनेक स्पर्धांचे करण्यात आले आयोजन पुरावे देत पत्रकार परिषदेत करण्यात आला खुलासा *नाशिक - सागर शेलार - आयोजक, व्हॉइस ऑफ देवेंद्र राज्यस्तरीय स्पर्धा* - विकसित महाराष्ट्र ही संकल्पना लोक चळवळ झाली पाहिजे - व्हॉइस ऑफ युथ, पीपल, नेशन असे विषय आहे - म्हणून व्हॉइस ऑफ देवेंद्र ही स्पर्धा आयोजित केली - १७ वर्षात त्यांचे पितृ छत्र हरपले तरी कमी वयात अनेक पदांवर गेले - देवेंद्र फडणवीस यांची कामे आणि वक्तृत्व सर्वांना माहिती आहे - कोणत्याही व्यक्तीचे महिमा मांडण्यात येणार नाही - तर विकसित महाराष्ट्रात काय हवे यासाठी विद्यार्थ्यांची मते जाणून घेतोय - *आमदार असलेला माणूस पांचट विषय का करतोय ?* - *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ही स्पर्धा आयोजित केलेली नाही* - आम्ही अनेक संस्थांची परवानगी घेतली आहे - *शरद पवारांच्या रयत संस्थेने सुद्धा परवानगी दिली आहे* - बारामतीत सुद्धा परवानगी मिळाली आहे - सर्व सामान्य मुलं ही स्पर्धा आयोजित करत आहे - *रोहित पवारांनी बालिशपणा केला* - विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कसा हवा यासाठी ही स्पर्धा - त्याचे नाव दिले व्हॉइस ऑफ देवेंद्र - *स्पर्धा होणार आहे, तीन टप्प्यात ही स्पर्धा होणार* - विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे प्रथमेश नाईक - आयोजक - शरद पवार, राहुल गांधी यांच्या नावाने स्पर्धा राबविल्या गेल्या तेव्हा राजकारण होत नाही - त्यांचा हेतू राजकारण करण्याचा आहे - पण विद्यार्थी हाणून पाडतील - विद्यापीठाने परिपत्रक मागे घेतले तरी आम्हाला फरक पडत नाही - यापूर्वी स्पर्धा झाल्या आहेत - तेव्हा शैक्षणिक संकुलात राजकारण होत नाही - रयत शिक्षण संस्थेत शरद पवारांच्या नावाने स्पर्धा होते - तेव्हा शिक्षणाच्या पंढरीचे राजकारण होत नाही का ? - डीपी भोसले कोरेगाव येथे शरद पवारांच्या नावाने स्पर्धा झाली - रोहित पवार यांचे कर्तृत्व नसतांना स्पर्धा झाल्या आहेत - स्पर्धा रद्द झालेली नाही, भव्य दिव्य होणार - स्पर्धेच्या अर्जाची तारीख वाढवली - 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतील - विद्यार्थी विद्यापीठ आणि शाळेतच सापडतील ना - विद्यार्थी थोडीच डान्सबार मध्ये सापडतात का - म्हणून आम्ही सर्वच विद्यापीठांना पत्रव्यवहार केला होता - त्या विद्यापीठाने पत्रक काढले होते - जबरदस्ती केलेली नव्हती - त्याचे परिपत्रक केवळ सहभागाचे होते - *शरद पवारांच्या संस्थांनीच आम्हाला स्पर्धेसाठी परवानगी दिली* - *नाशिक प्रतिष्ठान, स्वारंभ फाउंडेशन, आयफेलो संस्था असे आम्ही तिन्ही मिळून आयोजक आहोत*
5
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 14, 2025 10:20:28
Pandharpur, Maharashtra:
14082025 Slug - PPR_KORTI_AGITATION file 01 ------ Anchor - करमाळा तालुक्यातील कोर्टी येथील गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी ग्रामस्थ ह.भ.प. रावसाहेब शेरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत हा सौर ऊर्जा प्रकल्प बंद होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय शेरे यांनी घेतला आहे कोर्टी ग्रामपंचायत ग्रामसभेत ठराव होऊन सुद्धा हा प्रकल्प अद्याप बंद न झाल्यामुळे त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे
8
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 14, 2025 10:19:14
Pandharpur, Maharashtra:
14082025 Slug - PPR_BIKE_RALLY file 01 ------ Anchor - पंढरपूर मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते महसूल ,पोलिस , नगर परिषद, सह पंढरपूर तालुक्यातील सर्व कार्यालयांचे विभागप्रमुख व कार्यालयीन कर्मचारी या तिरंगा बाईक रॅलीत सहभागी झाले होते. ही तिरंगा बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा नाथ चौक तांबडा मारुती महाद्वार चौक, कालिका देवी चौक ,काळा मारुती, चौफाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात आली.
9
comment0
Report
SMSATISH MOHITE
Aug 14, 2025 10:18:36
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_PoliceRaid Feed on - 2C ---------------------------- Anchor - स्पा सेंटर च्या नावाखाली वैश्या व्यवसाय सुरु असनाऱ्या ठिकाणावर नांदेड पोलीसांनी छापा मारून अवैध्य धंद्याचा भांडाफोड केला. नांदेड शहरातील सर्वात मोठी आणि वर्दळीची बाजारपेठ असनाऱ्या वजीराबादमधील तरोडेकर मार्केटमध्ये हा प्रकार उघडकीस आला. काही महिन्यांपासून या ठिकाणी फ्युजन स्पा सेंटर सुरु होते. स्पा सेंटरच्या नावाखाली या ठिकाणी वैश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या स्पा सेंटर मध्ये पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. ग्राहकाने खात्री पटल्यावर पोलिसांना संपर्क केला आणि पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी दोन युवती आणि दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. या स्पा सेंटर मधून 3 युवती, 1 महिला, 4 पुरुष आणि स्पा सेंटर चालक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. रात्री उशिरा या प्रकरणी वाजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Byte - परमेश्वर कदम - पोलीस निरीक्षक ---------------
10
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 10:17:00
Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, मालेगाव..* - Anc: धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपला मालेगाव शहरातून मिळालेल्या हार नंतर आता भाजपा येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाली नवतरुणांची मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली तसेच भाजप मालेगाव जिल्हा जम्बो कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी केली. युवा नेते कमलेश निकम यांची पुन्हा जिल्हा महामंत्रीपदी निवड झाली असून, अनेक वरिष्ठ व नव्या कार्यकर्त्यांना विविध पदांवर संधी देण्यात आली आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर भाजप नाशिक जिल्हा सक्रीय झाला असून त्या पार्श्वभूमीवर बैठका सत्र सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाल किती यश मिळते हे बघणं महत्वाचे ठरेल. *बाईट: निलेश कचवे, भाजप जिल्हाध्यक्ष नाशिक*
9
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 10:02:16
Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )* Anc: बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील नागरिक नेहमीप्रमाणे पहाटे मार्निंग वॉकसाठी मुंजवाड येथून खमताणे रस्त्यावर जात असत. आज गुरूवार दि.१४ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास खमताणे रस्त्यावर खमताणेकडून येत असलेल्या चारचाकी वाहनाने रस्त्याच्या बाजूला बसलेले वसंत जाधव यांना धडक देत पुढे पायी चालत असलेल्या सरला जाधव (48) यांना जोरदार पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनंदा जाधव (52), संगिता जाधव (48), अंजना जाधव (45) आणि वसंत जाधव (58) जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांना अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. सटाणा पोलीसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. *बाईट: जखमी वसंत जाधव*
13
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 14, 2025 10:02:01
Kolhapur, Maharashtra:
Kop Shaktipith Andolan Feed :- File Anc :- प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त शुक्रवारी तिरंगा झळकाऊ शेतात..शक्तीपीठ नको आमच्या वावरात.. या टॅग लाईन खाली शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात शेतात तिरंगा फडवण्याचा अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे विधान परिषद मधील गटनेते आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची सुरुवात भुदरगड तालुक्यातील आकुर्डे इथल्या दौलत शिंदे यांच्या शेतातून होणार आहे. त्यानंतर कागल तालुक्यातील ऐकुंडी या गावात शिवाजी मगदूम यांच्या शेतात तिरंगा फडकावून शक्तीपीठला विरोध केला जाणार आहे तर सकाळी 11 वाजता करवीर तालुक्यातील कोगील बुद्रुक इथल्या गोपाळ पाटील यांच्या शेतात हे अभिनव आंदोलन केलं जाणार आहे.
12
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 14, 2025 09:50:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn cctv accident av Feed by tvu छत्रपती संभाजी नगरमध्ये बुधवारी  सकाळी एका गाडीने रस्त्यावर चालणा-या एका महिलेला उडवले  होते यात ही महिला गंभीर जखमी झाली होती, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आलेले आहे यात ही गाडी या महिलेला पहिले धडक देते आणि त्यानंतर फरफटत नेताना दिसत आहे.. धक्कादायक म्हणजे  या महिलेला रस्त्याच्या बाजूला घेऊन गाडी चालक पसार झाला होता हा सगळा प्रकार खासदार संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर घडलेला होता सदरील महिलेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे...
12
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 14, 2025 09:49:21
Palghar, Maharashtra:
Anch - पालघर मध्ये आज मोठ्या उत्साहात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला . 14 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरोधात चाले जाव आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारांवर पालघर येथे गोळीबार करण्यात आला होता . या गोळीबारात पालघर मधील गोविंद गणेश ठाकूर , काशिनाथ पागधरे, रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, रामचंद्र महादेव चुरी, आणि सुकुर गोविंंद मोरे या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य आलं होत . त्या दिवसापासून 14 ऑगस्ट हा पालघर मध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो . या दिवशी पालघर मधील बाजारपेठा कडकडीत बंद ठेऊन सदर घटना स्थळी उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभ येथे पालघरकरांकडून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते . यावेळी पालघर मधील नागरिकांसह , विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलं जात .
13
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top