400614
शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत भव्य मोर्चा!
Navi Mumbai, Maharashtra:story slug - राष्ट्रवादी प्रदेशादयक्ष शशिकांत शिंदे यांचा नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा राष्ट्रवादी प्रदेशाद्यक्ष का पालिका पर मोर्चा ftp slug - nm ncp morcha byet- shashikant shinde shots- reporter - swati naik navi mumbai Anchor -: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आलाय. प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी आपल्या होम ग्राउंड वर आक्रमक होत येथील विविध समस्या विरोधात पहिला मोर्चा काढलाय. गरजेपोटी घरे आणि एलआयजी मधील घरे नियमित करावीत तसेच सिडकोने बांधलेल्या घरांच्या अवस्थावं किंमती कमी करुन सर्वसामान्यांना परवडतील या दरात घरे उपलब्ध करावीत या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. Byte -: शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मराठवाड़ा में जलसंचय संकट: 11 में से 6 डैम में पानी 30% से कम
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी मराठवाड्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणांमधील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. विभागातील ११ मोठ्या धरणांपैकी सहा धरणांत ३० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्येही गतवर्षीच्या तुलनेत निम्माच जलसाठा उपलब्ध आहे.. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, मध्यम प्रकल्पांत सुमारे २५ टक्के, तर लघु प्रकल्पांत १७.७३ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडीत ९४ टक्क्यांहून अधिक साठा आहे. यापाठोपाठ नांदेडच्या विष्णुपुरीमध्ये ९९ तर मानार प्रकल्पात ५९ टक्के पाणीसाठा आहे. परभणीतील येलदरीत ६२, पेनगंगा प्रकल्पात ६७ टक्के पाणी आहे. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणात ३१ टक्के, माजलगाव धरणात २३ टक्के, निम्न तेरणा व निम्न दुधनामध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. लातूरच्या मांजरा प्रकल्पात १४ टक्के जलसाठा आहे0
0
Report
नाशिक में H1N1 स्वाइन फ्लू और डेंगू की रुग्णता तेज, अगस्त में नए मामले बढ़े
Nashik, Maharashtra:नाशिक शहरात एच१एन१ स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ऑगस्टमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. एच१एन१ म्हणजे स्वाईन फ्लूचे यंदा ८५ रुग्ण असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूची रुग्णसंख्याही ८५ वर पोहोचली आहे. अळ्या आढळल्याने २०८ आस्थापनांना नोटिसा दिल्या आहेत. उपाययोजना सुरू असल्या तरी त्यांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूने एकाच वेळी डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणेपुढे दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. वर्षाच्या सुरुवातीला नियंत्रणात असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येने ऑगस्टमध्ये अचानक वेग घेतला. १ ते २० ऑगस्ट दरम्यान शहरात ५७ नवे रुग्ण आढळले असून, त्यापैकी तब्बल ४२ रुग्ण शेवटच्या दहा दिवसांत आढळले आहेत. जानेवारीपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ८५ तर पोहोचली असून, यंदा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तीन मृत्यू जुलैमध्ये, तर दोन ऑगस्टमध्ये झाले आहेत. मृतांपैकी तिघे ग्रामीण भागातील असून त्यांच्यावर नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू होते. स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत असतानाच डेंग्यूनेही पावसाळ्यात वेग पकडला आहे. जानेवारी ते जूनदरम्यान शहरात डेंग्यूचे २३ रुग्ण होते. जुलैमध्ये ३३, तर ऑगस्टच्या पहिल्या १४ दिवसांत २९ रुग्ण आढळले. त्यामुळे १९ ऑगस्ट पर्यंत डेंग्यूची यंदाची रुग्णसंख्या ८५ झाली आहे. डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने महापालिकेने २०८ आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.0
0
Report
त्र्यंबकेश्वर में कुंभ मेळा तैयारी की समीक्षा करेंगे गिरीश महाजन
Nashik, Maharashtra:Nashik breaking कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर गोदावरी नदीच्या उगमस्थान अर्थात ब्रह्मगिरी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार dौऱ्यात विविध कार्यक्रमांचेही आयोजन आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध कामांचा गिरीश महाजन घेणार आढावा कुंभमेळ्याच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांकडून घेणार माहिती त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवरही नियोजनाचा देखील घेणार आढावा मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्थांची घेणार माहिती कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमरवर त्र्यंबकेश्वरच्या नियोजनाला गती देण्यासाठी महाजन यांचा दौरा महत्त्वाचा0
0
Report
Advertisement
ऐरोली में शॉर्टसर्किट से आग, तीन लोग गंभीर रूप से घायल
Navi Mumbai, Maharashtra:ऐरोली सेक्टर 20 इथल्या एका घरात शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत घरातले दोन आणि शेजारच्या घरातील एक असे तिघे गंभीररित्या भाजले आहेत. त्यांच्यावर ऐरोली सेक्टर 14 इथल्या बर्न हॉस्पीटल इथं उपचार सुरू आहेत. साईनाथ वाडी पाटील निवास इथल्या 202 क्रमांकाच्या घरात आज दुपारी 12.40 च्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. आगीची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलाची अग्निशमन गाडी आणि वॉटर ब्राउझर घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मात्र या दुर्घटनेत घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या आगीत सुनिता देविदास सोनवणे वय ५० वर्षे, त्यांचा मुलगा रोहन देविदास सोनवणे वय 30 वर्षे हे दोघे गंभीररित्या भाजले. त्यांना बर्न हॉस्पीटल इथं उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या बाजूच्या घरातली २०१ क्रमांकाच्या घरातील सारीका कांबळे या देखील भाजल्यामुळे त्यांना ऐरोली सेक्टर 3 इथल्या नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.0
0
Report
दहिसर पुलिस ने अवैध पिस्तौल के साथ आरोपी संदीप रमाशंकर उपाध्याय को गिरफ्तार किया
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या दहिसर पोलिसांनी बेकायदेशीर आणि विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संदीप रमाशंकर उपाध्याय असून त्याचे वय ३४ वर्षे आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास करण्यात आली. दहिसर चेक नाका परिसरात एक इसम देशी बनावटीचे अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाईची पावले उचलली. सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रजित पाटील आणि त्यांच्या पथकाने दहिसर पूर्व येथील महानगर गॅस पंपासमोर सापळा रचला. संशयित आरोपी संदीप उपाध्याय तिथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी जप्त केलेल्या या शस्त्राची किंमत ४२ हजार रुपये, तर सहा काडतुसांची किंमत तीन हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याचा पुढील तपास आता दहिसर पोलीस करत आहेत.0
0
Report
शिंदे ने चाकण MIDC मार्ग की खस्ताहाल सड़क का निरीक्षण किया, तकनीक से सुधार का निर्णय
Chakan, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाईट पॉईंटर... चाकण MIDC रस्त्यांची थेट पाहणी: चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येची दखल घेत उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांकडून प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी व कामाचा आढावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी पारंपरिक डांबराऐवजी 'जिओ पॉलिमर टेक्नो पॅच', 'M-60 काँक्रीट विथ हार्डनर' आणि 'प्रिकास्ट पॅनेल' या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर; अवघ्या ३० ते ४५ मिनिटांत रस्ते वाहतुकीसाठी खुले. जिल्हाधिकाऱ्यांची 'नोडल ऑफिसर' म्हणून नियुक्ती: MIDC, PMRDA, PWD आणि MSSIDC या सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, याबाबतचा GR जारी. एकात्मिक आराखडा (Integrated Plan): केवळ खड्डे न भरता चाकण परिसरातील ३०० ते ४०० किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी 'स्टॉर्म वॉटर ड्रेनेज', पदपथ आणि पथदिवे यांची कायमस्वरूपी सोय करणार. उद्योग स्थलांतर रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध: उद्योगांना मूलभूत पायाभूत सुविधा पुरवून उद्योग बाहेर जाऊ नयेत आणि स्थानिक तरुणांचा रोजगार टिकावा यासाठी सरकारचा तात्काळ पुढाकार.0
0
Report
Advertisement
चाकण में उद्योग मंत्री के दौरे के बावजूद सड़क सुधार के लिए नई तकनीक से तेज़ काम, विरोधी राजनीतिक रोटियां नहीं पका पाएँगे
Chakan, Maharashtra:उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बाईचे पॉइंटर चाकण दौऱ्याचा उद्देश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार रस्त्यांची कामे आणि खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची (Precast/RMC) प्रत्यक्ष अंमलबजावणी पाहण्यासाठी हा दौरा आहे. विभागांचा समन्वय: MIDC, PMRDA, PWD आणि स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन समन्वयासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तळेगाव-शिक्रापूर रस्त्याचे काम: ० ते ५४ किमीच्या रस्त्यावरील समस्या सोडवण्यासाठी तात्पुरती डागडुजी युद्धपातळीवर (३१ तारखेच्या आत) पूर्ण केली जाईल, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. रस्त्यांचे दीर्घकालीन नियोजन: MIDC च्या उर्वरित २४% रस्त्यांची कामे मार्च महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे; तसेच शिक्रापूर रस्त्याला समांतर असणाऱ्या रस्त्यासाठीचे ५०० मीटर भूसंपादन मार्गी लागले आहे. नागरी सुविधा व पाणी प्रश्न: चाकण परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील पुढील आठवड्यात पाहणी करून जलजीवन मिशन अंतर्गत निर्देश देतील. कचरा डेपोसाठी जागा: PMRDA ने मागणी केलेल्या कचरा डेपोसाठी MIDC ची जागा २४ तासांच्या आत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे पत्र देण्यात आले आहे. उद्योजक स्थलांतराचा दावा फेटाळला: उद्योजकांनी कोणतीही डेडलाईन दिलेली नाही किंवा स्थलांतराचा इशारा दिलेला नाही; उद्योजक संघटनांशी सकारात्मक चर्चा सुरू असून विरोधक या विषयावर केवळ राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप त्यांनी केला. ब्लॅकलिस्ट कारवाईची प्रक्रिया: नियमानुसार काम न करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यपद्धती (Procedure) पूर्ण करूनच ब्लॅकलिस्टची कारवाई केली जाईल.0
0
Report
खेड आळंदी बैठक में बाबाजी काळे की महायुती मंत्रियों से नजदीकी बढ़ी
Chakan, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांसोबतच्या बैठकीला खेड आळंदी विधानसभेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे उपस्थित राहिलेत, त्यामुळे आमदार काळे यांच्या उपस्थितीने चर्चेला उधाण आले असून आमदार बाबाजी काळे यांची महायुतीतील मंत्र्यांसोबत जवळीक वाढल्याचे गेली काही दिवसापासून पाहायला मिळत आहे0
0
Report
मुंबई में द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त शिक्षक पर नाबालिग से यौन उत्पीड़न के आरोप
Mumbai, Maharashtra:मुंबई में एक चौंकाने वाली घटना: जिम्नेसिक शाळ में एक शिक्षक ने नाबालिग लड़की का यौन उत्पीड़न प्रयास किया। यह शिक्षक गणेश देवरुखकर (४८ वर्ष) थे, जिन्हें 2023 में द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रपति के हाथों प्रदान किया गया था। व्यायामशाला में एक नाबालिग लड़की को अकेले बुलाकर अत्याचार करने का प्रयास किया गया। पीड़िता Vila Parle पुलिस थाने में गई; मामला पॉक्सो अधिनियम के तहत दर्ज किया गया।0
0
Report
Advertisement
नागपुर में रिकॉर्ड प्रतिभागिता: 1.5 लाख युवाओं ने किया भागीदारी
Nagpur, Maharashtra:नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाइट (तुमचा आणि राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात फरक काय होता?) -- हा सहभागाचा कार्यक्रम होता... आणलेल्या लोकांचा नव्हता -- ऑरगॅनिकली गेल्या काही दिवस विविध इव्हेंट च्या माध्यमातून जे नागपुरात कार्यक्रम चाललेत.. त्याचं पारितोषिक येथे दिले -- जवळपास दीड लाख तरुणांनी या इथे पार्टिसिपेशन केले -- आजही 20 ते 25 हजार लोक होते संपूर्ण रेशीम बाग ग्राउंड भरलं होतं -- आज महाराष्ट्राची खरी जेन झी आपण बघितली --4100 मुलं आणि मुली ढोल ताशा घेऊन त्यांनी नवीन विश्वविक्रम इथे केला --585 ध्वजाधारकांनी पथकासह सहभाग घेतला आणि विश्वविक्रम केला -- वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या मुलांची जी स्वप्न आहे ती कशी पूर्ण करता येईल... त्याकरता हा कार्यक्रम होता -- यातील सहभागात अतिशय आनंददायी आहे -- आमच्या जेन झीची दिशा काय आहे हे दाखवणारा हा कार्यक्रम आहे (on राहुल गांधी महिला) पहिल्यांदा राहुल गांधी यांनी चित्राताईंनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्याव -- आपल्या संविधानाच्या प्रक्रियेत सगळ्यात मोठी व्यवस्था संसद आहे.... त्या संसदेत 33% महिला खासदार पोहोचल्या पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करत आहे... त्याला राहुल गांधी विरोध करत आहे... पुण्यातून महिलांबद्दल बोलायचे... आणि जिथे खरी महिलांना अधिकारीता मिळणार आहे त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा.. ही राहुल गांधी यांची भूमिका आहे : (on सरकार, मनुस्मृती ) -- सव्वा लाख लोकांनी कार्यक्रमास सहभाग घेतला... महाराष्ट्रातील परंपरा ढोल ताशा पथक यांनी नवाब विश्वविक्रम नोंदवला... राहुल गांधी यांनी स्टेजवरील महिला अधिकाराची गोष्ट केली मात्र महिलांना अधिकार देणारे सगळ्यात क्रांतिकारी कदम महिला आरक्षण बिलाला विरोध केला ( राष्ट्रवादी शरद पवार आणि मोदी भेट काँग्रेस अपसेट ) -- काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे.... अलीकडच्या काळात त्या पक्षामध्ये बोलघेवडे लोक.. बोलघेवड्यांचा पक्ष झालाय --- बोल बच्चन पणा रोज करायचा आणि टीव्हीच्या माध्यमातून रिलेव्हट राहायचं.. एवढंच त्यांचं काम राहिला आहे... जमिनीशी त्यांचा टच सुटलेला आहे -- स्टेटमेंट देणे एवढ्या करता मर्यादित राहिला ahe (0n राहुल गांधी आदिवासी महिला ) -- आदिवासी विद्यार्थ्यांकरता जेवढे निर्णय महाराष्ट्रात झाले इतर कुठेही झाले नाही.. .-- आदिवासी स्वयं योजना एकमेव महाराष्ट्र राज्य आहे... हॉस्टेलमधील जागा संपल्यानंतर वीस हजार मुलांना 7000 प्रत्येकी रूम घेऊन.. राहायला जेवायला, अभ्यासाला देणार आहे -- विद्यार्थी विद्यार्थीच. असतात... आलेले काही विद्यार्थी नेते होते... यांचं बॅकग्राउंड तपासलं कोणत्या पक्षाचे काम करतात हेही लक्षात येतं (on Sra ) -- अजून प्रक्रिया संपली नाही.... पहिली प्रक्रिया आता संपली... यानंतर जे डाउटफुल आहे.. त्याबाबत पुन्हा अनुसंधान होईल... आणि मग फायनल लिस्ट येईल... यामधील बरेच लोक पात्र होतील.. मुळात या एसआर प्रक्रियेचा फायदा काय होतो हे मी तुम्हाला सांगतो... एकट्या माझ्या मतदारसंघात 23 हजार मृत नाव होती... याचा अर्थ याद्या किती गडबड होत्या... डुप्लिकेट नाव 20हजार -- याद्या चांगल्या होत आहे आम्ही प्रयत्न करू... प्रत्येक पक्षाला बीएलए दिला आहे... आणि Blo चं कामच ते आहे वैध मतदार बाहेर राहू नये... भाजपाच्या Bla ने तो प्रयत्न केला इतर पक्षांनी पण तो प्रयत्न करावा ( अभिजीत दिपक्यांबाबत गुन्हा दाखल झालाय का त्याबाबत माहिती घेऊन बोलीन ) राज्यात असे प्रयत्न सुरूच आहे तरुणाईला योग्य दिशा दाखवल्या तर ते विकसित महाराष्ट्र आणि देश घडवेल0
0
Report
बारामती में नाबालिग सहायक की बेटी की मौत: आत्महत्या या हत्या, जांच की मांग
Rui, Maharashtra:बारामतीत कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेय. मुलीने आत्महत्या केली की मुलीचा घातपात आहे याविषयी अद्याप संभ्रम निर्माण असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. बारामतीत शनिवारी रात्री एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती मात्र सकाळी त्या मुलीचा मृतदेह पोलिसांना मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही मुलगी घरातून निघून गेल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या मुलीच्या मृत्यूबाबत करून निष्पक्ष चौकशी करून योग्य तो अहवाल सादर करावा असे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मागणी केली आहे तर दुसरीकडे मुलीचे शवविच्छेदन करताना मुलीच्या अंगावर जखमा आणि हात पाय मोडण्याचे निदर्शनात आले आहे त्यामुळे शेवटचे दोन अहवाल आल्यानंतरच नेमके हा अपघात आहे का मृत्यू आहे हे समजेल असे बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सांगितले असून पोलीस परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासत आहेत. लवकरच सत्य काय आहे ते बाहेर येईल...0
0
Report
अक्कलकोट में शिवाजी महाराज के अश्वारूढ़ पुतले की स्थापना नगर परिषद ने मंजूरी दी
Solapur, Maharashtra:अक्कलकोट मधील नवीन एसटी स्टँड समोर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ़ पुतळा अक्कलकोट मधील नवीन एसटी स्टँड समोर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ़ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ़ पुतळा बसवण्यासंदर्भात नगर परिषदेमध्ये एकमताने ठराव मंजूर नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सभागृहाची एकमताने मंजुरी अक्कलकोट नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ़ पुतळा उभारण्याची नगरवासीयांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण0
0
Report
Advertisement
नागपुर में 2026-27 के महाराष्ट्र केसरी कुश्ती स्पर्धा शुरू, बड़े मुकाबले दावा करेंगे पहलवान
Nagpur, Maharashtra:नागपूर - ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा नागपुरात रंगणार - वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि ‘महाराष्ट्र केसरी’ किताब लढत २०२६-२७ मध्ये नागपूरात होणार आहे. - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त आयोजनाला मंजुरी. - सहसंयोजक व मनपा सत्ता पक्षनेते नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांच्या मागणीनुसार स्पर्धेच्या आयोजनास परवानगी देण्यात आली. - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस आणि सरचिटणीस योगेश दोडके यांनी आयोजनास परवानगी जाहीर केली. - स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’, महिला महाराष्ट्र केसरी तसेच १५, १७ आणि २० वर्षांखालील कुस्तीपटूंची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे.0
0
Report
नाशिक: प्रेमिका व मित्र पर आत्महत्या के लिए उकसाने का मामला, वरुण की मौत
Nashik, Maharashtra:नाशिक - - युवकाच्या आत्महत्येप्रकरणी मैत्रिणीसह दोघांवर गुन्हा - प्रेयसी व मित्रांच्याजाचास कंटाळून २६ वर्षीय तरुणाने केली होती आत्महत्या - पोलिसांच्या हाती लागलेल्या सुसाइड नोटमुळे हा प्रकार उघडकीस - या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तरुणीसह दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - वरुण भामरे या २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन संपवले होते जीवन - आत्महत्येपूर्वी वरुण याने लिहिलेल्या चिठ्ठीत गंभीर आरोप केले - तरुणीने प्रेमात फसवून हवे तेवढे पैसे काढून घेतले आणि 'मला धमकावून तू मर नाही तर...,' असे म्हणत रस्त्यावर मारहाण केली0
0
Report
नागपुर में मुख्यमंत्री का युवा संवाद: 200 फुट रैम्प पर तैयार मंच
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरात आज मुख्यमंत्र्यांचा तरुणांसोबत संवाद... रेशीमबाग मैदानावर जय्यत तयारी... जेंझी मध्ये फिरून मुख्यमंत्र्यांना संवाद साधता यावं यासाठी दोनशे फुटांचा भला मोठा रॅम ही तयार... नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजारो तरुणांशी, जेन झी सोबत संवाद साधणार आहे.. मंथन फॉर युवा या एनजीओ ने नागपुरात आठ ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान किशोरवयीन शाळकरी विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत विविध विषयांवर स्पर्धांचे आयोजन केले होते... त्यामध्ये अगदी चित्रकला, गायन, नृत्य, काव्य वाचन, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, कॅम्पस लीडर समिट अशा विषयांवरील स्पर्धांच्या माध्यमातून विकसित नागपूर या विषयावर हेकेथॉन च्या माध्यमातून विविध समस्यांवरील तरुणांच्या मनातील उपाययोजना, स्टार्टअप उभारणारे तरुण आणि संशोधनांवर पेटंट मिळवणारे तरुण यांच्याशी संवाद असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. आज मुख्यमंत्र्यांचे हस्ते गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या या अभियानाचा समारोप होणार आहे... यासाठी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मोठे स्टेज आणि पेंडॉल उभारण्यात आले असून मुख्यमंत्री कार्यक्रमात आलेल्या हजारो जेन झी मध्ये फिरून संवाद साधतील, यासाठी एक दोनशे फुटांपेक्षा जास्त लांबीचा रॅम्प ही तयार करण्यात आला आहे... यावेळी सुमारे 25हजार विद्यार्थ्यांची उपस्थितीत राहण्यायाची शक्यता आहे. ढोल ताशांचे महावादन होणार आहे. याशिवाय युथ आयकॉन क्रिकेटपटू त Tilak वर्मा, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा अनेक युवा या कार्यक्रमाला उपस्थित असतील.0
0
Report
Advertisement
