icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
413304
SKSACHIN KASABE11 Aug 2025, 04:47 am

पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी उगवलेले धान्य, कमाईचे नवे मार्ग!

Pandharpur, Maharashtra:पीक पाणी 11082025 Slug - PPR_CEREAL_CROP file 02 ------ Anchor - पंढरपूर तालुक्यात ऊसा सारखी नगदी पिके तसेच द्राक्ष डाळिंब केळी अशा फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. एक बागायती तालुका म्हणून जिल्ह्यात याची ओळख आहे. वर्षभर काळजी घेऊन उत्पादन घेण्यापेक्षा आता कमी कालावधीची पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. यामुळे पंढरपूर तालुक्यात यावर्षी प्रथमच साडेसहा हजार हेक्टर वर विविध कड धान्याची खरीप हंगामात लागवड झाली आहे. यात सर्वाधिक 2 हजार 400 एकरावर उडीद लागवड आहे. तीन महिन्यात येणारे पिक असून सध्या याला दर सुद्धा समाधानकारक आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे पीक आहे. सोबत तूर, मूग, सोयाबीन ,भुईमूग लागवड सुद्धा वाढली आहे. --- Wkt - सचिन कसबे पंढरपूर
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कर्जमाफी के फैसले के विरोध में किसान मोर्चा होली मनाता

Beed, Maharashtra:राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाची बीड तालुक्यातील खांडे पारगाव या गावी होळी करण्यात आली... शेतकरी हक्क मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाची होळी करत निषेध नोंदवला... सरकारने जीआर मध्ये स्पष्ट सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांची 2019 ला कर्जमाफी झाले असेल त्यांना केवळ पन्नास हजार रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाईल... नागपूर येथे झालेल्या आंदोलनात सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. मात्र तसे न करता ही शेतकऱ्यांची फसवणूक असून याचा आम्ही निषेध नोंदवत आहोत.. या कर्जमाफीने शेतकऱ्याच्या पदरात काही पडलं नाही.. तर सरकारमध्ये आमदार झालेल्या बच्चू कडू च्या पदरात पडलंय.. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचं आंदोलन मातीत घालून स्वतःच्या आमदारकीचे चोचले पुरवलेत त्यामुळे आमदार बच्चू कडू ची आमदारकी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीदेखील करण्यात आली...
0
0
Report

अकोला गांधी चौक पर नोवल्टी आइसक्रीम शॉप से चोर ने 80 हजार चुराए

Akola, Maharashtra:अकोला शहरातील गांधी चौक परिसरात चोरीची घटना समोर आली आहे. गांधी चौकातील नोव्हेल्टी आइसक्रीम या दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास नोव्हेल्टी आइसक्रीम दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील गल्ला फोडून त्यामधील सुमारे 80 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या मालकाला चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शहरात रात्री पोलिसांची गस्त सुरू असतानाही भरवस्तीत चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
0
0
Report

कराड के पास बने उड्डाणपुल का काम पूरा, 20 जून तक यातायात खुलने की उम्मीद

Satara, Maharashtra:अँकर -पुणे बेंगलोर महामार्गावरील कराड जवळील सहापदरी साडेतीन किलोमीटर लांब अंतराच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून 20 जून पर्यंत पुलाचं काम करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या पुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांनी पाहणी करून पुल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याबत संबंधित कंपनीला सूचना केल्या .कराड जवळ होणाऱ्या वाहतूक कोंडी वर उपाय म्हणून या पुलाचे काम हाती घेण्यात आलं होतं. पुल पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणची वाहतूक आणि प्रवास सुरळीत होईल अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली
0
0
Report
Advertisement

मुलुंड के मिठागर पर निर्माण प्रस्ताव के विरोध से मैदान में आक्रोश

Mumbai, Maharashtra:मिठागर बचावासाठी मुलुंडकरांचा एल्गार मुलुंड मध्ये भव्य जनआंदोलनातून सरकारला इशारा मुलुंडच्या मिठागरांवर गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध नागरिक रस्त्यावर धारावी पुनर्वसनानंतर आता मिठागरांचा मुद्दा तापला मुलुंडकर आक्रमक प्रस्तावित प्रकल्पाविरोधात जोरदार आंदोलन व्हिओ : मुलुंड,भांडुप आणि कांजूरमार्ग परिसरातील मिठागरांच्या हजारो एकर जमिनींवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याच्या हालचाली गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत.केंद्र सरकारच्या विविध गृहनिर्माण योजनांसाठी या जमिनींचा वापर करण्याचे प्रस्ताव वेळोवेळी पुढे आले आहेत.मात्र पर्यावरणवादी, स्थानिक रहिवासी आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रस्तावांना सातत्याने विरोध केला आहे.मिठागरे ही नैसर्गिक जलसाठा क्षेत्रे असून मुसळधार पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे या जागांवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाल्यास मुंबईतील पूरस्थितीचा धोका वाढू शकतो, अशी भीती पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.मुंबईच्या विकास आराखड्यात मिठागरांच्या संवर्धनाचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला आहे. पर्यावरणीय मंजुरी आणि जमीन हस्तांतरणाच्या मुद्द्यांवरून यापूर्वीही वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे मिठागरांच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.धारावीतील अपात्र प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून आधीच मुलुंडकरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यात आता मिठागरांवरील प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पामुळे स्थानिकांच्या चिंतेत भर पडली आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक,पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण पडेल,अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.यावेळी आंदोलनकर्त्यांनी मिठागर वाचवा,मुलुंड वाचवा अशा घोषणा देत सरकारने हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली.
0
0
Report
Advertisement

अंतरराज्यीय कृषि उपकरण चोर गैंग का पर्दाफाश, तीन गिरफ्तार

Washim, Maharashtra:वाशिम पुलिस ने खेत उपकरण चोरियों के लिए अंतरराज्यीय गैंग का पर्दाफाश कर तीन बदमाशों को गिरफ्तार किया है. उनके कब्जे से 3 लाख 45 हजार रुपये का माल जप्त किया गया. 2 जून को कलंबा महाली के किसान प्रल्हाद महाले के खेत से 60 हजार रुपये के दो सोलर प्लेट चोरी हुई थीं. जांच के दौरान पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर विठ्ठल मंगलदास भगत को हिरासत में लिया. पूछताछ में उसने अपने दो साथियों के साथ चोरी करना कबूल किया. आरोपी के पास से दो सोलर प्लेट, 100 कट्टे हल्दी बेण, दो मोटर साइकिलें और एक मोटर पंप आदि 3 लाख 45 हजार रुपय का माल जप्त किया गया. इस गिरफ्तारी से जिले में खेती-सामग्री चोरी घटनाओं के खुलासे की संभावनाएं बढ़ गईं.
0
0
Report

साइकिल चलाओ, शहर बचाओ: केडीएमसी की रैली में सैकड़ों साइकिलिस्ट शामिल

Kalyan, Maharashtra:सायकल चालवा, शहर वाचवा. केडीएमसी आयोजित सायकल रॅलीमध्ये शेकडो सायकलिस्ट सहभागी आंतरराष्ट्रीय सायकल दिन और जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पोलीस विभाग आणि बिर्ला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीचे आयोजन केले, “सायकल चालवा, शहर वाचवा” हा संदेश देणाऱ्या या रॅलीमध्ये कल्याण आणि डोंबिवली शहरातील शेकडो सायकलप्रियांनी सहभाग नोंदवला. वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि पर्यावरणीय समस्यांबाबत जनजागृतीसाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात अधिकाधिक सायकलचा वापर करावा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले आहे या रॅलीमध्ये कल्याण सायकलिस्ट ग्रुप, डोंबिवली सायकलिस्ट ग्रुप, बाईक पोर्ट सायकलिस्ट ग्रुप, एव्हरग्रीन सायकलिस्ट ग्रुप, पलावा सायकलिस्ट ग्रुप, हिरकणी महिला सायकल क्लब, पेडल रिपब्लिक सायकल क्लबसह इतर सायकलप्रेमी संघटनांनी सहभाग घेतला.
0
0
Report

शेती के विवाद में शिक्षक सहित तीन ने हमला किया; भाइयों की हालत गंभीर

Beed, Maharashtra:शेतीच्या वादातून शिक्षकाचा हैदोस; तिघांच्या अमानुष मारहाणीतील दोन भावांच्या बरगड्या तुटल्या, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल ANC - बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून खून, खुनाचा प्रयत्न और अमानुष मारहाणीच्या घटना नित्याच्या बनल्या आहेत. एका दलित महिलेला झालेल्या अमानुष मारहाणीची घटना ताजी असतानाच आता शेतीच्या वादातून दोन भावांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतीच्या वादातून एका शिक्षकासह तिघांनी दोन भावांवर हल्ला केला. या मारहाणीत बाळासाहेब तोगे आणि लक्ष्मण तोगे हे गंभीर जखमी झाले असून मारहाणीत अक्षरशः त्यांच्या बरगड्या तुटल्या आहेत. जखमींवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यामध्ये संबंधितांना निर्दयपणे मारहाणी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणी वडवणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

बारामती में विश्व पर्यावरण दिवस पर साइकिल रैली, नागरिकों का उत्साह बढ़ा

Rui, Maharashtra:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत सायकल रॅली जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती हेल्थ क्लब आणि बारामती सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि सायकल वापराला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी मोठ्या उत्साहात या रॅलीत सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
0
0
Report

घर गैस सिलेंडर की कीमत 29 रुपये बढ़ी, महिलाओं का रसोई बजट भारी

Nashik, Maharashtra:गॅसचे दर वाढल्याने महिलांच्या किचनचे बजेट कोलमडले अँकर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहे आज पासून घरगुती गॅस सिलंडरचा दर 29 रुपयाने वाढला आहे यामुळे महिलांचं किचनचं बजेट कोलमडलय... आधीच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने किराणामाल वाढलाय आणि आता गॅस सिलेंडर चे दर वाढल्याने संपूर्ण बजेट कोलमडून गेलाय महागाई झपाट्याने वाढत आहे मात्र प्रकारात कुठलाही प्रकारची वाढ होत नाही यामुळे घरातील आर्थिक बजेट कसा सांभाळावं असा प्रश्न महिलांना पडलाय... ऐनवेळी वाढत असलेल्या गॅसच्या दराने डोकेदुखी वाढली आहे... गॅसचे दर कमी व्हावे अशी प्रतिक्रिया महिलांनी दिलीये... बाईट-पूजा सदगीर बाईट-रंजना भूसणार बाईट- संगीता बाविस्कर बाईट- बाबुराव वाघ
0
0
Report

कोल्हापुर के 5 वर्षीय समरजित जितकर ने इनलाइन स्केटिंग में राष्ट्रीय रिकॉर्ड बना डाला

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील अवघ्या साडेपाच वर्षांच्या समरजित जितकर याने इनलाईन स्केटिंग करत लाठी-काठी फिरवत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. कोल्हापुरातील वी. एस. खांडेकर स्केटिंग ट्रॅक येथे झालेल्या या विक्रमादरम्यान त्याने एका तासात १५६ फेऱ्या पूर्ण करत १४ किलोमीटर अंतर पार केले. ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’कडून या विक्रमाची ऑनलाइन नोंद करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध मान्यवरांच्या हस्ते समरजितचा सत्कार करण्यात आला असून त्याच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापूर विधान परिषद चुनाव: मोहिते पाटील का गुट चार नेताओं के साथ टूट गया

Pandharpur, Maharashtra:Anchor - विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला स्वपक्षीय आमदारांचीच डोकेदुखी झालेली आहे. आमदार जानकर आमदार नारायण पाटील आमदार अभिजीत पाटील यांनी मोहिते पाटलांची साथ सोडून भाजपच्या सोयीची भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे भाजपने सुद्धा फक्त मोहिते पाटलांवरच टीका करण्याचे ठरवले आहे. विधान परिषदेच्या सोलापूरच्या जागेसाठी भाजपने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मोहिते पाटील यांनी मात्र आपले समर्थक वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज ठेवत भाजपच्या मनसुभ्यांना उधळून टाकले आहे याची सल भाजप सह पालकमंत्री जयकुमार गोरे यांना टोचत आहे. भाजपसोबत लढत असताना मोहिते पाटील यांची साथ त्यांच्याच पक्षाच्या चार आमदारांनी सोडून दिली आहे. खुद्द माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांनी केसाने गळा कापला म्हणत आपण वसंतराव देशमुख यांना मदत करणार नसल्याचे जाहीर वक्तव्य केलं आहे. माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी सुद्धा अशीच भूमिका घेत वसंतराव देशमुख यांना विरोध केला आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी काहीही न बोलता थेट भाजपच्या गोटात जाऊन सामील होण्याचा मार्ग निवडला आहे. तर मोहोळ चे आमदार राजू खरे हे पहिल्यापासूनच एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. आमदार उत्तम जानकर यांनी आपल्या मुलाची उमेदवारी डावल्यानंतर केसाने गळा कापला अशी टीका केली. यावर बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी हे आपलं घरातील भांडण आहे ते आपण मिटवू अशी सावध भूमिका घेत यावर अधिक भाष्य करण्याचे टाळला आहे.या सर्व घटना पाहता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उघड फूट पडल्याचे समोर आल आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या बेइमानीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देऊन या निवडणुकीत मोहिते पाटलांचा पानिपत करण्याच पण केला आहे.मी पोस्टमन आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचा तंतोतंत पालन करतो कोणाचा कार्यक्रम करण्याच्या सूचना असतील किंवा कुणाला कार्यक्रमाला लावण्याचा सूचना असतील याचे पालन करणे माझं काम आहे. असं म्हणत मोहिते पाटलांना तुमची उलटी गिनती सुरू झालेली आहे. असा इशारा दिलेला आहे भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सुद्धा सोलापूर जिल्हा बँकेत मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बँक वाचवण्यासाठी लढलो ज्यांना घेतलेली कर्ज भरायची नव्हती त्यांना माझ्या उमेदवारीचा शॉक बसलेला आहे मात्र विजयी झालेल्या नंतरच्या सभेत अकलूज मध्ये मोहिते पाटलांच्या सर्वच आरोपांना उत्तर देऊ असे म्हणत त्यांनीही मोहिते पाटलांना अंगावर घेतल आहे एकूणच सोलापूर मधील विधान परिषदेची निवडणूक ही आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी न राहता मोहिते पाटील विरुद्ध झाली आहे अशातच मोहिते पाटलांची साथ त्यांच्याच चार आमदारांनी सोडल्याने मोहिते पाटील एकाकी पडले आहेत
0
0
Report

नाशिक में सीएनजी आपूर्ति बाधित, पंपों पर लंबी कतारें और भारी असुविधा

Nashik, Maharashtra:नाशिक शहरात सीएनजीचा तुटवडा... सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी अँकर नाशिक शहरात सीएनजी चा पुरवठा होत नसल्याने शहरातील अनेक सीएनजी पंप हे बंद आहे... यामुळे सीएनजी धारकांना त्रास सहन करावा लागतोय... तर ज्या सीएनजी पंपावर सीएनजी उपलब्ध आहे त्या ठिकाणी तासनतास उभं राहावं लागत आहे... सीएनजी भरण्यासाठी सीएनजी पंपावर भली मोठी रांग पाहायला मिळत आहे.... दीड ते दोन तास वेटिंग वर राहावं लागत आहे... यामुळे पुन्हा एकदा नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये सीएनजीचा तुटवडा निर्माण झालं चित्र पाहायला मिळत आहे... या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
0
Report

रामलिंग मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्र के कालबाह्य दवाओं पर स्वास्थ्य विभाग की जांच शुरू

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज ZEE 24 TAAS च्या बातमी नंतर आरोग्य यंत्रणा सतर्क... संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागवला... कालबाह्य औषधांचा साठा कसा आढळला ? चौकशीचे आदेश... प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष.... निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रातील कालबाह्य औषधांच्या प्रकरणाची दखल अखेर आरोग्य विभागाने घेतली आहे. या संदर्भातील बातमी ZEE 24 TAAS ने दाखवल्या नंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल سादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कालबाह्य औषधांचा साठा नेमका कसा आढळला, त्याचा रुग्णांवर काही परिणाम झाला का आणि यासाठी जबाबदार कोण, याचा शोध आता प्रशासन घेणार आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top