Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

कोल्हापुरात बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद!

PNPratap Naik1
Aug 14, 2025 08:07:11
Kolhapur, Maharashtra
Kolhapur कोल्हापुरात बनावट नोटा तयार करणारे टोळीस जेरबंद भारतीय चलनातील 2,24,200/- रूपये किंमतीच्या हुबेहुब बनावट नोटा, 70, 700 /- रुपयांचे बनावट नोटा जप्त बनावट नोटा आणि नोटा तयार करणेस वापरलेले साहित्य असा एकुण 2,94,900/- रुपयांचा मुददेमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. इचलकरंजी परीसरातील नारायण टॉकीज परीसरात बनावट नोटा विक्री करीता आल्यानंतर कारवाई. बनावट नोटा करणाऱ्या एकूण तीन आरोपींना अटक.
13
comment
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 10:02:16
Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )* Anc: बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील नागरिक नेहमीप्रमाणे पहाटे मार्निंग वॉकसाठी मुंजवाड येथून खमताणे रस्त्यावर जात असत. आज गुरूवार दि.१४ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास खमताणे रस्त्यावर खमताणेकडून येत असलेल्या चारचाकी वाहनाने रस्त्याच्या बाजूला बसलेले वसंत जाधव यांना धडक देत पुढे पायी चालत असलेल्या सरला जाधव (48) यांना जोरदार पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनंदा जाधव (52), संगिता जाधव (48), अंजना जाधव (45) आणि वसंत जाधव (58) जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांना अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. सटाणा पोलीसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. *बाईट: जखमी वसंत जाधव*
0
comment
Report
PNPratap Naik1
Aug 14, 2025 10:02:01
Kolhapur, Maharashtra:
Kop Shaktipith Andolan Feed :- File Anc :- प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त शुक्रवारी तिरंगा झळकाऊ शेतात..शक्तीपीठ नको आमच्या वावरात.. या टॅग लाईन खाली शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात शेतात तिरंगा फडवण्याचा अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे विधान परिषद मधील गटनेते आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची सुरुवात भुदरगड तालुक्यातील आकुर्डे इथल्या दौलत शिंदे यांच्या शेतातून होणार आहे. त्यानंतर कागल तालुक्यातील ऐकुंडी या गावात शिवाजी मगदूम यांच्या शेतात तिरंगा फडकावून शक्तीपीठला विरोध केला जाणार आहे तर सकाळी 11 वाजता करवीर तालुक्यातील कोगील बुद्रुक इथल्या गोपाळ पाटील यांच्या शेतात हे अभिनव आंदोलन केलं जाणार आहे.
0
comment
Report
VKVISHAL KAROLE
Aug 14, 2025 09:50:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn cctv accident av Feed by tvu छत्रपती संभाजी नगरमध्ये बुधवारी  सकाळी एका गाडीने रस्त्यावर चालणा-या एका महिलेला उडवले  होते यात ही महिला गंभीर जखमी झाली होती, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आलेले आहे यात ही गाडी या महिलेला पहिले धडक देते आणि त्यानंतर फरफटत नेताना दिसत आहे.. धक्कादायक म्हणजे  या महिलेला रस्त्याच्या बाजूला घेऊन गाडी चालक पसार झाला होता हा सगळा प्रकार खासदार संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर घडलेला होता सदरील महिलेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे...
3
comment
Report
HPHARSHAD PATIL
Aug 14, 2025 09:49:21
Palghar, Maharashtra:
Anch - पालघर मध्ये आज मोठ्या उत्साहात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला . 14 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरोधात चाले जाव आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारांवर पालघर येथे गोळीबार करण्यात आला होता . या गोळीबारात पालघर मधील गोविंद गणेश ठाकूर , काशिनाथ पागधरे, रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, रामचंद्र महादेव चुरी, आणि सुकुर गोविंंद मोरे या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य आलं होत . त्या दिवसापासून 14 ऑगस्ट हा पालघर मध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो . या दिवशी पालघर मधील बाजारपेठा कडकडीत बंद ठेऊन सदर घटना स्थळी उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभ येथे पालघरकरांकडून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते . यावेळी पालघर मधील नागरिकांसह , विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलं जात .
5
comment
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 14, 2025 09:48:59
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1408ZT_JALNA_RAPE_CRIME(4 FILES) जालना : 7 वर्षाच्या चिमुकलीवर 14 वर्षाच्या सख्या चुलत भावाचा अत्याचार नवीन जालना भागात घडलेल्या घटनेनं परिसरात खळबळ सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अँकर : जालन्यात भाऊ - बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. जालन्यात एका 7 वर्षाच्या चिमुकलीवर 14 वर्षाच्या सख्या चुलत भावानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालना शहरातील नवीन जालना भागात ही घटना घडलीय. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन जालना भागात राहत असलेल्या एका 7 वर्षाच्या बालिकेवर तिच्याच 14 वर्षाच्या सख्ख्या चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना काल रात्री घडली. अत्याचाराची घटना घडल्यानंतर पीडितेला तिचा आईने तातडीने  खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं. मात्र,डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवलं. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी ही घटना पोलिसांना कळवून त्या मुलीवर तातडीने उपचार सुरू केले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात धाव घेत पीडित मुलगी आणि तिच्या आईचा जवाब घेत तक्रार नोंदवून घेतली आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या चुलत भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, नवीन जालना भागात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाईट : संदीप भारती, पोलीस निरीक्षक, सदर बाजार पोलीस ठाणे,जालना
7
comment
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 14, 2025 09:34:47
Yavatmal, Maharashtra:
AVB Anchor : यवतमाळ च्या वणी येथील नागरिक चिखलगाव रेल्वे गेट आणि रेल्वे सायडिंग जवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या संथ कामामुळे त्रस्त झाल्याने मनसे नेते राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात महारेल प्रशासनाविरोधात अभिनव आंदोलन करण्यात आले. मनसैनिक उडानपुलाच्या पिलर वर चढले शिवाय येथील रस्ता देखील रोखून धरला. दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या उडानपुलाच्या कामामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी, चिखल, धुळीचे साम्राज्य आणि सततचे अपघात घडत आहे. कंत्राटदाराने सर्व्हिस रोडचे काम देखील पूर्ण न केल्याने नागरिकांच्या जिवाशी खेळ होत आहे. वारंवार निवेदन देऊनही हा बेजबाबदारपणा सुरु असल्याने वणीकरांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणाऱ्यांना मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल, असा इशारा राजु उंबरकर यांनी दिला. दरम्यान आंदोलनामुळे वाहतूक ठप्प पडल्याने पोलिसांनी मध्यस्ती करीत कंत्राटदार कंपनी आणि मनसे नेत्यांची बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिले. बाईट : राजू उंबरकर : मनसे नेते
6
comment
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 14, 2025 09:31:52
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1408ZT_JALNA_OFFER_PKG(30 FILES) जालना :जालन्यात ठाकरे गट सर्वांना हवाहवासा (पॅकेज) अँकर : जालन्यात नगरपरिषदेचं रूपांतर महानगरपालिकेत आधीच झालंय. त्यामुळे महापालिकेचा पहिला महापौर आपल्याच पक्षाचा व्हावा यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जातायत.मात्र माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी कॉंग्रेस सोडुन भाजपात प्रवेश करताना जालना महानगरपालिका भाजपनं स्वबळावर लढवण्याची ईच्छा व्यक्त केली.त्यामुळे जालना महापालिका ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गटाला सोबत घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबरच भाजपने देखील ऑफर दिलीय.त्यामुळे जालन्यात ठाकरे गट सर्वानाच हवा हवासा झालाय का?.बघूया हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ :1: राज्य पातळीवर भलेही उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात असलेला 36 चा आकडा सर्वांनाच ठाऊक आहे.उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातही विस्तव जात नाही हे वास्तव आहे.पण येत्या काही महिन्यात पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीमुळे जालन्यातल्या राजकारणात मात्र भलतंच चित्र पाहायला मिळतंय.जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचंड महत्व आलंय.जालन्यातील शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाला सोबत येण्याची ऑफर नुकताच भाजप प्रवेश केलेल्या माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी तिरंगा यात्रेच्या निमित्ताने दिलीय.काँग्रेस मधून भाजपात प्रवेश करताना गोरंटयाल यांनी भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याची ईच्छा व्यक्त केली होती.अर्थात अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंटयाल यांच्यात असलेलं राजकीय वैर सर्वांना माहितीय.त्यामुळे खोतकर यांना डिवचण्यासाठी गोरंटयाल यांनी महापालिका निवडणुक स्वबळावर लढवण्याची ईच्छा व्यक्त केल्याचं सांगण्यात येतंय.दरम्यान काल स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजप कडून शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली.शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर आंबेकर यांच्या शांतिनिकेतन शाळेतून या रॅलीला सुरुवात करण्याआधी माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी थेट ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर देऊन टाकल्यानं चांगलीच खळबळ उडालीय. साऊंड बाईट : कैलास गोरंटयाल,माजी आमदार, (एक 21 सेकंदांचा बाईट आहे.दुसरा 02:17 मिनिटांचा बाईट आहे.यापैकी कोणताही घ्यावा) व्हिओ:०२: गोरंटयाल यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आंबेकर यांना ही खुली ऑफर देण्याआधी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनीही आंबेकर यांना महापालिका निवडणुकीसाठी सोबत येण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीत सोबत घेण्याचा खोतकर यांचा मनसुबा उधळण्यासाठी गोरंटयाल यांनी आंबेकर यांना सोबत येण्याची खुली ऑफर दिल्याच सांगितलं जातंय. दरम्यान आजघडीला आमचा युतीच्याच बाजूने कौल असून परिस्थिती वेगळी उदभवलीच तर वेगळा निर्णय अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली घेऊ असं सांगत ठाकरे गटाला निवडणूकीत सोबत घेण्याचे संकेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिलेत. बाईट : भाऊसाहेब घुगे,जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट(भगवा शर्ट असलेले) व्हिओ :०३: दरम्यान भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या या ऑफरवर शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी भाष्य केलंय.ठाकरे गट या शहरातील निर्णायक गट आहे.त्यामुळे गोरंटयाल आणि खोतकर या दोघांनाही आम्ही सोबत राहावं असं वाटत असेल मात्र आम्ही कुणाच्या बाजूला न जाता स्वतः महापालिका ताब्यात घेऊ असं सांगत उध्दव ठाकरे सांगतील त्याप्रमाणे निवडणूक लढवू असं आंबेकर यांनी म्हटलंय. बाईट :;भास्कर आंबेकर, जिल्हाप्रमुख शिवसेना उध्दव ठाकरे पक्ष(पांढरा हाफ शर्ट, टक्कल असलेले,बाजूला निळ्या रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती आहे) व्हिओ : ०४:याआधी नगरपरिषद असलेल्या जालना नगरपरिषदेचं रूपांतर आता महानगरपालिकेत झालंय.त्यामुळे महापालिकेचा पहिला महापौर आपल्याच पक्षाचा करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने डावपेच खेळायला सुरुवात केलीय.आता वरीष्ठ पातळीवर होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असलं तरी सध्या मात्र महापालिका ताब्यात घेण्यासाठी शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला मोठं महत्व प्राप्त झालंय हे नक्की.
7
comment
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 14, 2025 09:18:11
Beed, Maharashtra:
बीड : दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पत्नी ज्योती मेटे समाधी स्थळी नतमस्तक... जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर दोन समाजात सामाजिक दुभंग पडलाय : ज्योती मेटे यांची भावनिक प्रतिक्रिया Anc : बीड जिल्ह्यात आज मराठा समाजाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पत्नी ज्योती मेटे यांनी समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले. मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळे राज्यात निर्माण झालेला सामाजिक दुभंग गंभीर असून, साहेबांच्या अनुपस्थितीची प्रकर्षाने जाणीव होते, असे त्या म्हणाल्या. मेटे साहेब हे असे नेते होते की, एका समाजासाठी लढताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेत. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले तरी कामाला गती मिळालेली नाही. हे अधुरं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी शिवसंग्रामसोबतच शासनकर्त्यांचीही आहे. हे काम पूर्णत्वास नेऊनच साहेबांना खरी श्रद्धांजली वाहावी, अशी मागणी त्यांनी केली. बाईट : ज्योती मेटे, विनायक मेटे यांच्या पत्नी
7
comment
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 14, 2025 09:17:59
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- MPSC प्रतिभा सेतू फीड 2C Anc:- केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारने देखील MPSC च्या स्पर्धकांसाठी प्रतिभा सेतू पोर्टल सुरू करावं यासाठी भाजप आमदार विक्रम पाचपुते प्रयत्न करत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत काही गुणांनी निवड न झालेल्या स्पर्धकांठी प्रतिभा सेतू पोर्टल उपलब्ध करण्यात आलं आहे या पोर्टलच्या माध्यमातून खाजगी कंपन्या थोडक्यात निवड हुकलेल्या टॉपर स्पर्धकांना आपल्या कंपन्यांमध्ये चांगली नौकरी देत आहेत. UPSC प्रमाणेच MPSC च्या विद्यार्थ्यांना देखील प्रतिभा सेतू चा पर्याय उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी मुख्यमंत्र्यांनी केली असून या बाबत मुख्यमंत्री देझील सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर MPSC च्या स्पर्धकांना प्रतिभा सेतू सारखा पर्याय मिळाला तर खाजगी क्षेत्राला गुणवत्ता असलेले तरुण मिळतील आणि थोड्या गुणांनी निवड न झालेल्या स्पर्धकांना देखील नौकरी मिळेल अस स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी म्हटलं आहे बाईट:- विक्रम पाचपुते, आमदार भाजप बाईट:- बाळू पवार, MPSC स्पर्धक
7
comment
Report
GMGANESH MOHALE
Aug 14, 2025 09:16:02
Washim, Maharashtra:
वाशिम: File:1408ZT_WSM_BHARANE_PC3 रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर :राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यात शेतकऱ्यांना दिलासा देणारे संकेत दिले आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या भूमिकेतून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय प्राधान्याने घेण्यात येतील,असं कृषी मंत्री भरणे यांनी स्पष्ट केलं की, कृषी मंत्री म्हणून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे ही जबाबदारी आहे. त्यात काही अडचणी आणि आव्हाने असली तरी, त्या अडचणींमधून मार्ग काढण्याचा आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल असे भरणे यांनी सांगितले. On भास्कर जाधव. वाद होईल असं कुणीही स्टेटमेंट करू नये. भास्कर जाधव सिनियर लीडर आहेत पण ते काय टेट्स आहे मी बघितलं नाही. On राहुल गांधी याबद्दल मला माहिती नाही. On सूरज चव्हाण अजितदादा,सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा निर्णय आहे. याबद्दल मला विचारण्या पेक्षा हे तिघे योग्य उत्तर देतील. बाईट: दत्तात्रय भरणे,कृषिमंत्री
6
comment
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 14, 2025 09:03:45
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 8 FILE SLUG NAME -SAT_HSRP_ISSUE सातारा- HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या नंबर प्लेट ची सक्ती देशभरात करण्यात आली आहे.ही नंबर प्लेट 15 ऑगस्ट पर्यंत बसवण्याचे आदेश देण्यात आले आहे.वाहन चोरी आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने या प्लेट्स अनिवार्य केल्या आहेत. त्यावर विशिष्ट लेझर-कोरलेला कोड, क्रोमियम-आधारित होलोग्राम आणि स्नॅप-लॉक यंत्रणा असते, ज्यामुळे त्यांची बनावट किंवा छेडछाड करणे जवळजवळ अशक्य होते. यामुळे वाहनांची सुरक्षा वाढते आणि चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणे अधिक सोपे होते.एकीकडे वाहनांचा सुरक्षितते साठी या नंबर प्लेट सक्ती केली जात असताना साताऱ्यात मात्र या HSRP नंबर प्लेटचीच चोरी होण्याचे प्रकार होत असल्याचे समोर आले आहे.नंबर प्लेट चोरीला गेल्यावर त्याचा गैरवापर होऊ शकतो .त्याच बरोबर जर नव्याने पुन्हा डुप्लिकेट नंबर प्लेट काढायची कशी याबाबत अनेकांना काहीच माहिती नाही त्यामुळे अशा लोकांचा मनात अनेक प्रश्न उपस्थितीत होत आहेत. Byte - सागर घोलप (तक्रारदार) विओ 2- एखादी नंबर प्लेट गहाळ किंवा चोरीला गेली तर नवीन दुसरी नंबर प्लेट मिळू शकते पण त्यासाठीची प्रक्रिया खूप मोठी आहे. Byte - सचिन देवकर - नंबर प्लेट डिस्ट्रीब्यूटर विओ 3- जर वाहनांची HSRP नंबर प्लेट चोरीला गेली तर नागरिकांनी तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी जेणे करून त्याचा गैरवापर केला जाणार नाही असं आवाहन सातारा पोलिस प्रमुखांनी केलं आहे. Byte - तुषार दोशी पोलिस जिल्हा प्रमुख व्हिओ 4- HSRP नंबर प्लेटमुळे वाहनांची सुरक्षा वाढते, पण ती चोरीला गेल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी प्लेट सुरक्षित ठेवावी, चोरी झाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे आणि नियमांनुसार डुप्लिकेट प्लेटची प्रक्रिया पूर्ण करून वाहन पुन्हा सुरक्षित करण्याची गरज आहे. तुषार तपासे झी 24 तास सातारा
12
comment
Report
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 08:51:53
Nashik, Maharashtra:
nsk_varunpc Nashik breaking वरून सरदेसाई Byte points - नाराजीचा विषय नाही आदित्य ठाकरे यांनी यासाठी खूप प्रयत्न केले होते - नवीन सरकार निवडून आले तेव्हा मुख्यमंत्री स्वतः बोलले होते विरोधकांचा मान राखणार - तरी देखील असे होते नाही - गेल्या अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला होता - *आदित्य ठाकरे यांनी याचा पाठवपूरवा करून काम करून घेतला* - *चांगल्या कंत्राटदार ला सांगून काम करूम घेतले* - आज प्रकल्प पूर्ण होऊन चावी वाटप करण्यात येत आहे - स्थानिक लोकप्रतिनिधी असतात त्यांना अजून काही सांगायचे असेल - ते देखील एक सिस्टीम चे भाग असतात पण त्यांना आज भाषणाची संधी दिली नाही - *माझ्या देखील मतदारसंघात दोन पुलाचे उद्घाटन होणार आहे* - *पत्रिकेत माझं साधं नाव देखील छापण्यात आले नाही* - मी गेल्या तीन महिन्यापासून याकामासाठी पाठपुरावा करत आहे - सभागृहात या कामासाठी मी मुद्दा मांडला होता - पूल तयार होऊन देखील मंत्र्यांचे वेळ मिळत नाही म्हणून उद्घाटन थांबवला - *आगामी महापालिका निवडणुका आहेत त्यामुळे आम्हीच काम केले आणि क्रेडिट घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे* - *आम्ही विरोधक आहे म्हणून आम्हाला डावलण्यात येत आहे* - मी असतो तर अजून काही मुद्दे मांडले असते - वाहूतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे यावर देखील उपाययोजना केले पाहिजे On सुरज चव्हाण बढती - तू मारल्या सारखं कर मी राडल्या सारखं करतो अशी परिस्थिती आहे - लोकशाही मार्गाने तटकरे यांचया विरोधात आंदोलन झाला - पत्ते फेकणे अयोग्य की योग्य हा भाग वेगळा आहे - पण त्यात शिवीगाळ झाला नाही - आमच्या प्रदेशाध्यक्ष विरोधात बोलला तर आम्ही तुम्हाला मारू असा संदेश देण्यातच प्रयत्न आहे On ed कारवाई - ज्याचे नातेवाईक आहेत त्यांची प्रतिक्रिया घेतले पाहिजे - शिंदे गटातील नेत्यांचे विडिओ कसे बाहेर येतायत - बेडरूममध्ये मंत्र्यांचे असलेले पैशाचे बॅग,घरी अघोरी पूजा करताना विडिओ कसे येतात - त्यांच्याच मंत्र्यांच्या नातेवाइकांवर ed चे कारवाई कसे होतात त्यांना विचार On नितेश राणे निधी - अजून किती सत्ता पाहिजे तो त्यांचा अंतर्गत विषय आहे - त्यांचे भूक भरणार आहे का नाही On राज ठाकरे - त्यांच भूमिकेशी मी सहमत आहे कोर्टाचे निर्णयाचे पालन केले पाहिजे - धर्माचा विषय यात आणू नये - जैन मुनी यांनी शास्त्राची भाषा केली हे त्यांच्या लोकांना पण आवडले नाहीये - ज्यावेळी धार्मिक स्थळाचे भोंगे काढले तेव्हा कोर्टाच्या निर्णयामुळे काढले अस सरकारने सांगितले - मुस्लीम समाजाने तेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलन केले का - किव्हा त्यावेळी मुस्लीम संघटना किव्हा एक मौलाना ने आम्ही शस्त्र हातात घेऊन असे म्हणाले असते तेव्हा भाजप मोठा गदारोळ केला असता - जैन समाज त्यानं मतदान करतात म्हणून त्यांच्यावर कारवाई नाही - मुस्लिम समाज मतदान करत नाही म्हणून त्यांच्यावर जबरदस्ती On बोगस मतदार - मला वाटत विरोधीपक्ष आणि जनतेचे डोळे उघडले असतील - आपणच या बाबत आता जवाबदारी घेतली पाहिजे - राहुल गांधी यांनी देखील निवडणूक आयोगाने मृत घोषित लोकांना भेटले आहेत
14
comment
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 14, 2025 08:50:14
Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे शहरातून 1 हजार 111 फूट भव्य तिरंगा ध्वज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने यां तिरंगा यात्रेच आयोजन करण्यात आले. ग्रँड मास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज यांच्या उपस्थितीत ही तिरंगा यात्रा संपन्न झाली. या तिरंगा यात्रेत हजारो देशभक्त सहभागी झाले होते. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर यां तिरंगा यात्रेमुळे देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यां यात्रेत 1 हजार 111 फुटाची तिरंगा झेंडडा शाळकरी मुलांनी धरला होता. यात माध्यमिक विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी याचबरोबर जेष्ठ नागरिक महिलांचा मोठा सहभाग होता. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, आमदार, माजी खासदार यांचा यात्रेत सहभाग होता. प्रशांत परदेशी, धुळे.
12
comment
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 14, 2025 08:32:02
Bhandara, Maharashtra:
गोसीखुर्द धरणाला केली तिरंग्याच्या रंगानी विद्युत रोषणाई Anchor :- देश उद्या 79 वा स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. तर भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाला तिरंग्याच्या रंगानी विद्युत रोषणाई करण्यात आली. रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमुळे गोसीखुर्द धरणाचं दृश्य पाहण्यासारख आहे...
12
comment
Report
JJJAYESH JAGAD
Aug 14, 2025 08:21:25
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरातील गीता नगर भागात आज पहाटे झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे..अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक या परिसरातील पूल दुरुस्तीसाठी मागणी करत आहेत, मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी सोयाबीन आणि तूर बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना, जीर्ण पुलावरून जाताना पिकअप व्हॅन पाण्यात कोसळली..या अपघातात गाडीत असलेले तिघे जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, पूल दुरुस्तीची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.
14
comment
Report
Independence Day
Advertisement
Back to top