Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

रेल्वे दुहेरीकरणामुळे मनमाड स्थानक गाठण्याचा वेळ कमी होणार!

VKVISHAL KAROLE
Jul 15, 2025 03:07:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn railway issue av Feed attached गेल्या काही वर्षांपासून रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम छत्रपती संभाजीनगर आणि अंकाई  दरम्यान सुरू आहे. कामाची तीन टप्प्यांची निविदा रेल्वेच्या वतीने काढण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने दुहेरीकरणासाठी मार्किंग करून काम सुरू केले आहे. संबंधित मार्गावर ताशी १३० किमी प्रतितास वेगाने रेल्वे चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर ते मनमाडदरम्यान १२७ किमी इतके अंतर असून सद्यःस्थितीत एक्स्प्रेस २.१५ ते १.३० तास इतका वेळ घेतात. दरम्यान, आता रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंनी तारेचे कुंपण आणि बांधकाम करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अठरा महिन्यांचा कालावधी कुंपण बांधण्यासाठी निश्चित केला आहे. कुंपण आणि दुहेरीकरण झाल्यानंतर एक तासापेक्षाही कमी वेळेत मनमाड स्थानक गाठता येईल. पुढे उत्तर भारताकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस पकडणे प्रवाशांना सोयीचे होणार आहे.
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top