Back
दिग्विजय सिंह का हिंदी सक्ती पर बड़ा बयान, मातृभाषा का समर्थन!
DPdnyaneshwar patange
FollowJul 06, 2025 02:31:08
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव
DHARA_UP_EX_MP
प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून च असावं
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ही केला हिंदी सक्तीला विरोध.
राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रभारी घेतील.--
दिग्विजय सिंह
Anchor
धाराशिव- महाराष्ट्र पाठोपाठ आता देशातील इतर राज्यातील नेत्यांनीही हिंदी सक्तीला विरोध करायला सुरुवात केली आहे. प्राथमिक शिक्षण हे मातृ भाषेतूनच असावं असं म्हणत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी महाराष्ट्रातील हिंदी सक्तीला विरोध केला आहे. केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणावर ही त्यांनी टीका केली. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी निर्णय घेतील असेही दिग्विजय आणि सांगितलं. दिग्विजय सिंह यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपला हिंदी सक्तीला विरोध असल्याचे स्पष्ट केल
Byte दिग्विजय सिंह माजी मुख्यमंत्री मध्य प्रदेश
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowJul 18, 2025 10:41:10Pandharpur, Maharashtra:
18072025
slug - PPR_MANDAP_HOUSE
feed on 2c
file 01
------
Anchor - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या दर्शन रांग टेंडर घोटाळ्याचा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. आर्थिक देवाणघेवाण ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाली तरीही मंदिर समिती कडून फक्त तक्रार आली नाही या कारणावरून कोणतीही कारवाई केली जात नाही असा मुद्दा उपस्थित केला
-----
sound clip - आमदार अभिजीत पाटील
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 18, 2025 10:40:58Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_KAAS
सातारा - सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.खा.उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेवक आणि महिला पदाधिकारी यांच्या हस्ते आज कास तलावाचे ओटी भरण करण्यात आले.या कास तलावाची उंची सातारा नगरपालिकेच्या वतीने वाढविण्यात आली आहे त्यामुळे याची पाणी पातळी देखील वाढली आहे.जून महिन्यातच हा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला त्यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 18, 2025 10:40:38Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1807_BHA_RAIN
FILE - 3
भंडाऱ्यात पुन्हा पावसाची हजेरी..... शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.....
ANCHOR :- भंडारा जिल्ह्यात आठवडाभरा आधी दमदार पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आता भंडारा जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली असून शेतकरी वर्ग सध्या मोठ्या प्रमाणात रोवणीच्या कामाला लागला असल्याने पावसाची आवश्यकता होती आणि अशा दमदार पाऊस आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरीवर्ग सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 18, 2025 10:40:30Ambernath, Maharashtra:
बदलापूरात जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घातला दुग्धाभिषेक
जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ घातला दुग्धाभिषेक
Bdl ncp agitation
Anchor काल विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली या घटनेमुळे विधिमंडळाचे नाव देशात बदनाम झालं आहे. वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाहक बदनामी केली जात असून त्यांच्यावर टीका टिप्पणी केली जाते यामुळे आज राष्ट्रवादीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालून त्यांना समर्थन दर्शविले , तसेच यावेळी गोपीचंद पडळकर यांचा फोटो वर मै हु गुंडा असे लिहून त्यांचा निषेध केला ,
Byte अविनाश देशमुख
चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 18, 2025 10:02:43Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1807ZT_WSM_EBIKE_FIRE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : वाशिम च्या काकडदाती परिसरातील साई लिला नगर मध्ये राहणाऱ्या गोविंद गाभणे यांची जॉय कंपनी ची इलेक्ट्रिक स्कुटी आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.गोविंद गाभणे यांचा मुलगा आदित्य गाभणे याने या इलेक्ट्रिक स्कुटी ला चावी लावताच तिला अचानक आग लागली.सुदैवाने आदित्य गाभणे हा वेळीच बाजूला गेल्याने अनर्थ टळला मात्र आग लागून काही मिनिटातच ही जॉय कंपनी ची स्कुटी जळून खाक झाली आहे.या आगीत परिसरातील एअर कंडिशनर आणि इतर साहित्य ही जळाले आहे.आगीत स्कुटी जळून नुकसान झाल्याने जॉय कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी गोविंद गाभणे यांनी केली आहे.
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 18, 2025 09:34:48Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडमधील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक ........ पशुसंवर्धन उपायुक्तांना घातला घेराव ......... खाद्यपुरवठादार कंपन्यांची मनमानी ....... कुक्कुट खाद्याच्या बँगांवर अन्नघटक नमूद नाहीत. ....... शासनाने निर्णय घेवून देखील अंमलबजावणी नाही .........
अँकर - पोल्ट्री कंपन्या व खाद्य पुरवठादारांच्या मनमानीविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात धडक देवून त्यांनी उपायक्तांना घेराव घातला आणि चांगलेच धारेवर धरले. पोल्ट्रीतील पक्षांना पुरवल्या जाणारया खाद्याच्या बँगांवर त्यातील अन्नघटक नमूद केले जात नाहीत. करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंगच्या नियमांचे पालन होत नाही. शासनाने याबाबतचा निर्णय घेवून देखील याबाबत अंमलबजावणी होत नसल्याने पोल्ट्रीधारक संतापले आहेत. वर्षभरापूर्वी याबाबतच्या सूचना देवून देखील कुठलीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिक शेतकरयांनी केलाय.
बाईट 1 – पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी
बाईट 2 – डॉ. सचिन देशपांडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन ....
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 18, 2025 09:32:03Akola, Maharashtra:
Anchor : राज्यभरातील शासकीय परिचारिकांनी आजपासून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहेय..या आंदोलनामुळे शस्त्रक्रिया प्रक्रियेत मोठा अडथळा आलेला आहेय..अकोल्यात शासकीय रुग्णालयात सुद्धा सामान्य शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत..सध्या फक्त अतिदक्षता आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया सुरू आहेत,तर अन्य सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत... हे आंदोलन रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम टाकू शकते, त्यामुळे प्रशासनाला या प्रश्नावर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहेय.. परिचारिकांच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलली पाहिजेत जेणे करून रुग्णांचे होणारे हाल थांबतील...
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 18, 2025 09:06:29Pandharpur, Maharashtra:
18072025
Slug - PPR_CLEAN_WORKER
feed.on 2c
file 02
-----
सफाई कामगार जल्लोष व्हिडिओ
सफाई कामगार काम करताना व्हिडिओ
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 18, 2025 09:06:16Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी
तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील घटना
महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हे दोन बळी गेल्याचा गावकऱ्यांचा आरोप
महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
______________
रत्नागिरी तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे साफसफाई करत असताना तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. काल सायंकाळी ही घटना घडली.. चंद्रकांत यशवंत तांबे आणि मृदुला वासुदेव वाडकर अशी विजेचा धक्का बसून मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. दरम्यान या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हे दोन बळी गेले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवळी ग्रामपंचायतीचे सदस्य संजय निवळकर यांनी केली आहे. या घटनेमुळे निवळी गावावर शोककळा पसरली असून महावितरणच्या हलगर्जीपणाबाबत संताप व्यक्त होत आहे..
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 18, 2025 09:06:03Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Leopard
File:01
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc :- जुन्नर तालुक्यातील ओझर येथे बिबट विहिरीत पडल्याची घटना घडली
Vo :- यावेळी विहिरीत पडलेल्या बिबट्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनविभागाच्या रेस्क्यू टिमने सुखरुप बाहेर काढले यावेळी बिबट्याला प्राथमिक उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आलेय बिबट्याच्या विहिरीत पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असुन शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 18, 2025 09:05:53Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Lampi Bullock Cart Stop
File:03
Rep: Hemant Chapude(Khed)
Anc:उत्तर पुणे जिल्ह्यात लंम्पी आजाराच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने ३१ जुलै २०२५ पर्यंत बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे.
Vo :- या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने सर्व गाडेमालकांना शर्यतीत सहभागी होऊ नये, असे आवाहन करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गाडेमालकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
असे असतानाही आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे नियम धाब्यावर बसवत बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून सलग दोन दिवस या शर्यती होणार आहेत. लंम्पी संसर्गाचा धोका लक्षात घेता या शर्यती आयोजनावर टीका होत असून, सहभागी होणाऱ्या गाडेमालकांना पुढील कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कोणत्याही बैलगाडा मालकाने या शर्यतीत भाग घेऊ नये, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
1
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 18, 2025 09:05:38Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1807ZT_CHP_RANBHAJI_1_2
( single file sent on 2C)
टायटल:-- आदिवासी विकास विभागातर्फे चंद्रपुरात रानभाजी महोत्सवाचे करण्यात आले आयोजन, 5 दिवस चालणार उपक्रम
अँकर:-- आदिवासी विकास विभाग, चंद्रपूरच्या वतीने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत १८ ते २२ जुलै या कालावधीत शहरातील आझाद गार्डन येथे गावरान रानभाजी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी भागातील रानभाजी, रानफळे, वनऔषधे, अन्नधान्य यासह 'शबरी नॅचरल्स' या प्रिमीयम ब्रँडच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे. शहरी नागरिकांना रानभाज्यांचे आयुर्वेदिक व पोषणमूल्य पटवून देणे. आदिवासी बचत गट, सामाजिक संस्था आणि व्यक्तींना स्वयंरोजगार व उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे हाही यामागचा उद्देश आहे. या महोत्सवात प्रकल्प कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत आदिवासी बचत गट, संस्था, व्यक्ती यांचा सहभाग असून, शहरातील नागरिकांनी भेट देऊन रानभाज्यांची ओळख, त्यांच्या रेसिपी आणि औषधी गुणधर्म यांची माहिती घ्यावी, तसेच खरीदी करून आदिवासी विक्रेत्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाईट १) विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी,आदिवासी विकास विभाग, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 18, 2025 09:05:22Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- निलेश लंके ऑन विधानभवन राडा
फीड 2C
Anc:- विधान भवन परिसरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या राड्यानंतर काल मध्यरात्री आमदार आव्हाड यांनी आंदोलन केले...यावेळी पोलिसांनी अक्षरशः आमदार आव्हाडांना पोलिसांनी फरपटत नेले, तर आमदार रोहित पवार यांच्यात आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्येही वाद झाला यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी सरकारवर जोरदार टीका केली, ज्या विधान भवनात कायदे बनवले जातात तिथे अशा पध्दतीने वागले जात असेल तर हे चुकीचे आहे...सरकारला वाटत असेल की हम करे सो कायदा तर हे खपवून घेतले जाणार नाही...पोलिसांवर सरकारचा दबाव आहे , मात्र जनतेचा उद्रेक झाल्यास चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांचे कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही असं निलेश लंके यांनी म्हंटले आहे.
बाईट:- निलेश लंके, खासदार राष्ट्रवादी SP
0
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 18, 2025 09:00:18Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1807ZT_BARAMATIDOG
BYTE 1
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत वासरांना कुत्र्यांनी फाडून खाल्ल्यानंतर हिंदू संघटनांची समितीवर कारवाईची मागणी...
Anchor -
बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोचीतील उप बाजारामध्ये कुत्र्यांनी वासरांना फाडून खाल्ल्यानंतर हिंदू संघटनांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती वरती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दर गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराचा जळोची येथे मोठा बाजार भरतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरांची विक्री होते मात्र त्या ठिकाणी गाई वेल्यानंतर त्याने जर खोंडाला जन्म दिला तर त्या ठिकाणी ते सोडून जातात आणि त्यानंतर कालांतराने कुत्रे हल्ला करून त्याचा जीव घेतात याला कृषी उत्पन्न जबाबदार असल्याचा दावा हिंदू संघटनाच्या वतीने करण्यात येतोय. जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार भरत असेल तर ती जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. भटकी कुत्री जनावरांवर हल्ला केल्यानंतर माणसांवरती हल्ला करू लागली तर याला जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समिती असेल असे देखील दावा अमोल सातकर यांनी केलेला आहे लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीवर गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी अशी मागणी सातकर करणार आहेत.
बाईट- अमोल सातकर
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 18, 2025 08:39:33Manchar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Manchar Bhimashankar Road Issue
File:02
Rep: Hemant Chapude(Manchar)
Anc :- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं पवित्र तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र भिमाशंकर मात्र तिथपर्यंत जाणारा मार्ग म्हणजे जीवावर उदार होऊन घ्यायचा प्रवास बनलाय
Vo :- पुणे-नाशिक महामार्गावरून मंचर-भिमाशंकर आणि राजगुरुनगर-भिमाशंकर हे दोन्ही रस्ते अक्षरशः खड्ड्यांनी पोखरले गेलेत. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता असा संभ्रम निर्माण व्हावा, इतकी भीषण अवस्था रस्त्याची झालीय या मार्गावरून दररोज शेकडो भाविक, पर्यटक आणि स्थानिक प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतायत. खड्डे, निसरडे वळणे वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच असून, आतापर्यंत अनेक निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागलाय
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया मंचर पुणे...
1
Share
Report