Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

निलेश लंके पर टीका: महाराष्ट्र की राजनीति में गर्मी बढ़ी

SMSarfaraj Musa
Sept 22, 2025 07:16:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - सुसंस्कृत पण राज्यात राहिला नाही - खासदार निलेश लंके. सांगली - खासदार निलेश लंके - सुसंस्कृत पण या राज्यात राहिला नाही. महाराष्ट्राचे राजकारण दूषित करण्याचं काम सुरू आहे,कुणाच्यावर व्यक्तिगत टीका करणे हे योग्य नाही. वाचाळवीरांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे. दुसऱ्याला खड्डा खोदताना आपण ही त्यात जाऊ शकतो. हे कुणाच्या ताक्तीवर बोलतात ते शोधावे लागणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टिकेवरून लंके यांचा निशाणा. जाती जातीत हिंदू आणि मुस्लिम यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला,हे थांबले पाहिजे. आम्ही तळा गाळात काम करतो. त्यामुळे त्यांना सर्वात धोका आमच्या पक्षाकडुन आहे,त्यामुळे त्याच्यावर टीका टिपणी होते. राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. धनंजय मुंडे त्याच्या पक्ष्याचा अंतर्गत विषय आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Sept 22, 2025 08:57:51
Raigad, Maharashtra:स्लग - ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महायुतीला फरक नाही ...... मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा ....... विकासकामांच्या जोरावर मुंबईत महायुती मजबूत ...... ठाकरे बंधू एकत्र आले तर काँग्रेस बाजूला होईल ...... चंद्रकांत पाटलांचे भाकीत ....... अँकर - ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महायुतीला काहीच फरक पडणार नाही कारण मुंबईत झालेल्या विकास कामांच्या जोरावर महायुती मजबूत असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ठाकरे बंधूंच्या युती आणि फॉर्म्युला वरून सुरू असलेल्या चर्चेवर ते बोलत होते. महायुतीने मुंबईत खूप विकास कामे केली आहेत त्यामुळे मुंबईकर आमच्या मागे उभे राहतील. आणि जर ठाकरे बंधू एकत्र आले तर काँग्रेस बाहेर पडेल असं भाकितही चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलं. बाईट - चंद्रकांत पाटील, मंत्री
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 22, 2025 08:56:03
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 22, 2025 08:55:31
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर मधील प्ले ग्रुप मधील चिमुकल्याला मारहाण प्रकरण  मनसेने कार्यकर्त्यांनी प्ले ग्रुप समोर आंदोलन , कार्यकर्त्यांनी फाडले प्ले ग्रुपचे  बॅनर पोलिसांनी घेतले मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात Ulh mns agitaion Anchor उल्हासनगर मधील प्ले ग्रुप मधील चिमुकल्याला मारहाण प्रकरणानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आज मनसे कार्यकर्त्यांनी प्ले ग्रुप समोर जाऊन आंदोलन केलं, यावेळी कार्यकर्त्यांनी प्ले ग्रुप समोरील बॅनर फाडले , यावेळी मनसे कार्यकर्त्यांन प्ले ग्रुप मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला मात्र  पोलिसांनी त्यांना रोखत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं ,जोपर्यंत फरार शिक्षकाला अटक केली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला  चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 22, 2025 08:33:44
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा हे गाव अकोला जिल्हातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहेय ते येथील जागृत देवस्थान असलेलेल्या चंडिका मातेच्या मंदिरामुळे. पंचमुखी असलेलेली काटेपुर्णाची देवी चंडिका या नावासोबातच ढगादेवी, काटेपुर्णादेवी या नावानेही ओळखली जातेय. या देवीच्या मंदिराचा कोणताच इतिहास लोकांना ज्ञात नाहीय परंतु हे प्राचीन मंदिर असल्याच्या अनेक खुणा येथे दिसून येतात... Vo 1 : चंडिका देवीच हे मंदिर अकोल्याकडून अमरावतीकडे जाताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील काटेपुर्णा गावापासून आतमध्ये तीन किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर मातेचे भव्य मंदिर आहेय.अतिशय मनमोहक रुपात असलेली चंडिका मातेची मूर्ती पंचमुखी आहेय..ही मूर्ती म्हणजे पाच देव्यांचे एकत्रित रूप असे मानले जाते..तसे ही चंडिका महिषासुरमर्दिनी समजली जातेय.. महिषासुर राक्षसाचा वध केल्यानंतर या ठिकाणी काही काळ मातेने विश्रांती केल्याचे बोलले जातेय..मात्र या ठिकाणची निश्चित अशी आख्यायिका लोकांना माहित नाहीय..हे मंदिर पहिल्यांदा दृष्टीस पडले ते १९३२ साली. विदर्भावर भोसलेंची सत्ता होती.त्याकाळी नागपूर येथील भोसले घराण्यातील व्यंकटराव भोसले यांच्या दृष्टीस हे मंदिर पडलेय आणि तेव्हापासून भाविकांची गर्दी या ठिकाणी वाढू लागली.या मंदिर परिसरात हुनुमान आणि सितला मातेचही मंदिर आहे.वर्षभर या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते तर नवरात्रीच्या नऊ दिवस विशेष गर्दी या मंदिरात पाहायला मिळते..
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 22, 2025 08:31:24
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_DHANGAR_MORCHA दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्या; सकल धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला अमरावतीतून दिला पाठिंबा अँकर :- धनगर समाजाला घटनात्मक एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी तसेच जालना येथील उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांचे आमरण उपोषण सोडवावे व त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत सकल धनगर समाजाणे अमरावती जिल्हाधिकारी मोर्चा काढला आहे. सन २०१४ मध्ये बारामती येथे धनगर समाजाला एस.टी. आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाचे आरक्षण लागू करू असे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत शेकडो बैठकांनंतर व आंदोलने करूनही तो शब्द पाळला गेला नाही असा आरोप यावेळी करण्यात आला आहे. जालना येथे दीपक बोऱ्हाडे हे दिनांक १७ सप्टेंबरपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक जालना येथे आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा ६ वा दिवस आहे. तरीही शासनाने याची दखल घेतली नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली. दोन दिवसांच्या आत धनगर समाजाचे आरक्षण लागू करून बोन्हाडे यांचे उपोषण सोडवावे अन्यथा धनगर बांधवांच्या सूचनेनुसार राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा धनगर समाजाने दिला आहे. तसेच बोऱ्हाडे यांच्या जीवाशी काही अनिष्ट घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असाही इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. बाईट :- दिलीप एडतकर, धनगर नेते
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 22, 2025 08:19:07
Raigad, Maharashtra:स्लग - जरांगे पाटील पूर्ण समाधानी होऊन मुंबईतून गेले मग आता कसला अल्टिमेटम ? ...... मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सवाल ....... सर्टिफिकेट मिळण्याची एक प्रक्रिया असते ....... अँकर - झी २४ तासाच्या टू द पॉईंट कार्यक्रमात बोलताना हैद्राबाद गॅझेट प्रमाणे प्रमाणपत्र वाटपासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दसऱ्या पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. जरांगे पाटील हे पूर्ण समाधानी होऊन मुंबईतून परत गेले मग आता कशाचा अल्टिमेटम असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केलाय. त्यांना जीआर दिला, हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर मान्य केलं. मराठवाड्यातच ४८ हजार सर्टिफिकेट मिळाली आणि ८ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यावरून लगेच सर्टिफिकेट मिळत नाही त्याची एक प्रकिया असते त्यानुसार सर्टिफिकेट मिळतील असं चंद्रकांत पाटील म्हणाले. बाईट - चंद्रकांत पाटील, मंत्री
5
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 22, 2025 08:03:09
Chandwad, Maharashtra: अँकर:- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त चांदवड येथील स्वयंभू श्री रेणुका मातेच्या यात्रेला आज मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला पहिली माळ असल्याने पहाटेपासून हजारो भाविक देवीच्या चरणी लीन होत दर्शन घेत आहेत. चांदवड येथील हे प्राचीन मंदिर तब्बल ४०० वर्षांहून जुने असून, याचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी १७३५ ते १७९५ या काळात केला आहे परंपरेनुसार आजही सकाळी रंगमहालातून देवीचा मुखवटा व सुवर्ण अलंकारांची पालखी काढण्यात आली तब्बल दोन किलोमीटर अंतराची ही मिरवणूक हलगीच्या गजरात मंदिरापर्यंत काढण्यात आली भाविकांच्या सोयीसाठी यंदा १५ हजार स्क्वेअर फुटांचा वॉटरप्रूफ मांडव उभारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था, डॉक्टरांचे पथक तैनात आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाचा संगम असलेला चांदवडचा हा नवरात्रोत्सव पुढील दहा दिवस भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे. बाईट :- सुभाष पवार ( सह मॅनेजर श्री रेणुका देवी मंदिर, चांदवड )
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 22, 2025 07:49:09
3
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 22, 2025 07:46:40
Sangli Miraj Kupwad, Maharashtra: सांगली - आमदार जितेंद्र आव्हाड - पॉइंटर जितेंद्र आव्हाड ऑन पडळकर - खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, एखाद्याच्या मातृत्व आणि पितृत्वावर जाऊन टीका करणे हे महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच घडले नाही. खालच्या स्तरावर जाऊन टीका केली, खालच्या स्तरावर होणारया टिकेमूळे महाराष्ट्ला पण दुःख झाले आहे.. मी आणि जयंत पाटील प्रचंड मातृभक्त आहे. महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चालली आहे. महाराष्ट्रची संस्कृती लयाला गेली आहे. इतकच नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची संस्कृतीने निचोतम पातळी गाठली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही आहो-जाव विसरली ही संस्कृती विसरली गेली आहे. राजकारणात एक दुसऱ्यांचा सन्मान करावा करावा,राजकारणात मतभेद असतात. आमच्याकडून अशी टीका झाली असती तर आमच्या मनात भीती असते,कारण शरद पवार आहेत,आणि साहेब आम्हाला फोन करतील याची भीती असते साहेब आमचे कान पकडतील याची भीती असते. राजारामबापू पाटील हे खूप मोठं व्यक्तिमत्व इंदिरा गांधी त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवणार होते असं व्यक्तिमत्व होतं. पण आज टीका करणारयांना त्यांच्या नेतृत्वची भीती वाटत नाही,हे स्पष्ट आहे. राजकारणात नेतृत्व आई-बापा प्रमाणे असतं, कुठल्याही नेतृत्वावर आई व बापा बद्दल टीका करणे योग्य नाही. आर्थिक निकषा बाबत सुप्रिया सुळे ह्या स्वतःबद्दल बोलतो होत्या. त्यांनी कोणत्याही जातीचा उल्लेख केला नाही, आर्थिक निकषावर आरक्षण ही पक्षाची भूमिका. गोपीचंद पडळकर यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही,पोलीस कारवाई करणार नाहीत, हे आम्हालाही माहित आहे जीएसटी बाबत राहुल गांधी यांनी दहा वर्षांपूर्वी जीएसटी लागू झाला त्यावेळी त्याचा स्लॅब चुकला असं सांगितलं होतं, मात्र आता हजारोंनी देशाला लुटले. टेरीफ प्रकरण अंगाशी आले आहे, रशियाची मैत्री अंगाशी आली आहे रशियाचा तेल अंगाशी आला आहे आणि वोट चोरी तर आहेचं ऑन धनंजय मुंडे - धनंजय मुंडे यांना संधी द्यावी,की नाही ,हा निर्णय घ्यावा हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे,फक्त त्या संतोष देशमुखांची हत्या झाली,त्यांच्या आत्म्याचाही थोडा विचार करावा. सूड,द्वेष ,पोलीस बळाचा वापर मुक्त हस्ताने केला जात आह, राजकारणामध्ये नेत्यांच्या मध्ये मुक्त संवाद,राजकारणात मतभेद आहेत म्हणून आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत. बंदुक दाखवतो,हे काय आहे.. पाकिस्तान खेळले जाते,लोकांना कोण विचारतो,पशिवी बहूमत दिल्याने, पाशवी बलात्कार होत आहेत. बाईट कोल्हापूर लाईव्ह युनिट वरून Sng_avhad_byte सांगली - आमदार जितेंद्र आव्हाड - पॉइंटर जितेंद्र आव्हाड ऑन पडळकर - खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, एखाद्याच्या मातृत्व आणि पितृत्वावर जाऊन टीका करणे हे महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच घडले नाही. खालच्या स्तरावर जाऊन टीका केली, खालच्या स्तरावर होणारया टिकेमूळे महाराष्ट्ला पण दुःख झाले आहे.. मी आणि जयंत पाटील प्रचंड मातृभक्त आहे. महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चालली आहे. महाराष्ट्रची संस्कृती लयाला गेली आहे. इतकच नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची संस्कृतीने निचोतम पातळी गाठली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही आहो-जाव विसरली ही संस्कृती विसरली गेली आहे. राजकारणात एक दुसऱ्यांचा सन्मान करावा करावा,राजकारणात मतभेद असतात. आमच्याकडून अशी टीका झाली असती तर आमच्या मनात भीती असते,कारण शरद पवार आहेत,आणि साहेब आम्हाला फोन करतील याची भीती असते साहेब आमचे कान पकडतील याची भीती असते. राजारामबापू पाटील हे खूप मोठं व्यक्तिमत्व इंदिरा गांधी त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवणार होते असं व्यक्तिमत्व होतं. पण आज टीका करणारयांना त्यांच्या नेतृत्वची भीती वाटत नाही,हे स्पष्ट आहे. राजकारणात नेतृत्व आई-बापा प्रमाणे असतं, कुठल्याही नेतृत्वावर आई व बापा बद्दल टीका करणे योग्य नाही. आर्थिक निकषा बाबत सुप्रिया सुळे ह्या स्वतःबद्दल बोलतो होत्या. त्यांनी कोणत्याही जातीचा उल्लेख केला नाही, आर्थिक निकषावर आरक्षण ही पक्षाची भूमिका. गोपीचंद पडळकर यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही,पोलीस कारवाई करणार नाहीत, हे आम्हालाही माहित आहे जीएसटी बाबत राहुल गांधी यांनी दहा वर्षांपूर्वी जीएसटी लागू झाला त्यावेळी त्याचा स्लॅब चुकला असं सांगितलं होतं, मात्र आता हजारोंनी देशाला लुटले. टेरीफ प्रकरण अंगाशी आले आहे, रशियाची मैत्री अंगाशी आली आहे रशियाचा तेल अंगाशी आला आहे आणि वोट चोरी तर आहेचं ऑन धनंजय मुंडे - धनंजय मुंडे यांना संधी द्यावी,की नाही ,हा निर्णय घ्यावा हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे,फक्त त्या संतोष देशमुखांची हत्या झाली,त्यांच्या आत्म्याचाही थोडा विचार करावा. सूड,द्वेष ,पोलीस बळाचा वापर मुक्त हस्ताने केला जात आह, राजकारणामध्ये नेत्यांच्या मध्ये मुक्त संवाद,राजकारणात मतभेद आहेत म्हणून आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत. बंदुक दाखवतो,हे काय आहे.. पाकिस्तान खेळले जाते,लोकांना कोण विचारतो,पशिवी बहूमत दिल्याने, पाशवी बलात्कार होत आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 22, 2025 07:34:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn pachod farmer loss avb feed attached पिके पडली पिवळी : शेतकऱ्यांची चिंता वाढली... पांढर सोन्या फुटले जागेवर कोंब, "सततच्या पावसाने पिकांचे नुकसान, कापूस भिजू लागला : बोंडे सडू लागली,सोयाबीनला कोंब फुटले" Anc छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुका हा दर वर्षी पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता पाऊस नको रे बाबा असं म्हणायला लागला आहे. कारण गेल्या चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. खरीप हंगामाची पीक पाण्याखाली गेली आहे. तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातिल शेतकऱ्यांचे हातात आलेले कापसाचे पीक पावसामुळे पार उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा कापसाची बोंडंही आता अति पावसामुळे जमिनीवर सडायला लागली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडला चालला आहे. गेल्या चार दिवसात सतत पाऊस सुरु असल्यामुळे शेतातील उभे असलेले कापूस, मुग,बाजरी,भईमुग,ही पीके पिवळी पडू लागली आहे. सरकारने मदत जाहीर करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा असे शेतकरी मागणी करत आहेत... bytes 2 शेतकरी बाईट्स आहेत
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 22, 2025 07:30:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn kannad updated feed attached ANC: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, नागद, गौताळा अभयारण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गडदगड नदीला मोठा पूर आला आहे. नागद बसस्थानक वरून नागद गावात जाणाऱ्या रस्त्यावर गुडघे बरोबर पाणी आहे. तर गौताळा अभयारण्यात तुन उगम पावणाऱ्या गडदगड नदी दुधडी भरून वाहत आहे. नागद वडगाव हरसवाडी तसेच सायगव्हाण येथील शेतीमध्ये पाणी घुसले आहे. पिके पाण्यात आहेत. नागद सह परिसरात वरील भिलधरी, सायगव्हाण येथील छोटे मोठे पाझर तलाव फुटले अश्या अफवा पसरत आहे त्यामुळे नदी काठावरील शेतकरी आपली जनावरे तसेच नदी काठावरील दुकान दार आपली दुकाने खाली करावी का या चिंतेत आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top