Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

मालेगावात रक्त मिश्रित पाण्याचा थैमान, आमदार विक्रांत पाटीलची आवाज उठवणारी मागणी!

YKYOGESH KHARE
Jul 17, 2025 04:01:59
Nashik, Maharashtra
nsk_malegaonblood feed by 2C vidoe 10 Anc:- नाशिकच्या मालेगावातील मोसम नदी आणि नाशिकमधील गोदावरी नदी पात्रात अनधिकृत कत्तलखान्यातील रक्तमिश्रित पाणी कुठलीही प्रक्रिया न करता सोडले जाते.यावर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी भाजपा आमदार विक्रांत पाटील यांची विधान परिषदेत लक्षवेधी. आवाज उठविला. *बाईट: लक्षवेधी विक्रांत पाटील* VO 1: मालेगावात असणारे अवैध कत्तलखाने यांच्यावर तातडीने कारवाई करा अशा सूचना मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेच्या लक्षवेधीच्या प्रश्नांसबंधी पोलिसांना दिल्या. त्याचप्रमाणे असे रक्त मिश्रीत पाणी नदीत जात नाही असे उत्तर कोणी देत असेल तर अशा अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली. *बाईट: लक्षवेधी मंत्री उदय सामंत* VO 2: या विषयी 14 वर्ष आंदोलन सामजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी करत प्रशासनाला धारेवर धरले मात्र आज खऱ्या अर्थाने 14 वर्षाच्या रक्त मिश्रित पाण्याच्या प्रदूषणातून मालेगाव मुक्त झाले. पण यासंबंधी खरी कारवाई झाली पाहिजे... कारवाई करत नसलेल्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही राज्यशासनाचे धन्यवाद मानू.. पेढे वाटू अशी प्रतिक्रिया आंदोलक कर्ते सामजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी दिली. *बाईट: सामजिक कार्यकर्ते रामदास बोरसे* VO 3: दरम्यान मोसम नदीत सोडल्या जाणाऱ्या रक्त मिश्रित पाण्यामुळे येथील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले. विधान परिषदेत या लक्षवेधीमुळे निश्चित मालेगावकरांचे आरोग्य धोक्यात येण्यापासून सावरले जाईल मात्र भविष्यात या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते हे बघणे महत्वाचे ठरेल...
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top