Back
लाखनीमध्ये १ लाख ६४ हजारांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त, व्यापाऱ्यावर गुन्हा!
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 22, 2025 02:02:10
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2207_BHA_GUTAKHA
FILE - 1 VIDEO 3 IMAGE
लाखनीमध्ये १ लाख ६४ हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त....गोदामात दडवला होता माल व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
Anchor ;- भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरातील सिंधी लाईन परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी ४९ वर्षीय व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई भंडारा गुन्हे शाखेच्या पथकाने केली.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे,उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिंधी लाईन येथील रामू गोविंदराव गुरुनानी (४९, लाखनी) याच्या दुकानाच्या गोदामावर छापा टाकला.यावेळी पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला.महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याच्या विक्रीवर बंदी असताना हा साठा बेकायदेशीरपणे साठवून ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी रामू गुरूनानी विरुद्ध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowJul 22, 2025 07:32:10Akola, Maharashtra:
10 फाईल्स आहेत...AVBB
Anchor : अकोला जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे, मात्र अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातिल पारस परिसरात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेय.. दरम्यान या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहेय.. सध्या या ठिकाणी नाल्याचा काम सुरू असून नाली बंद करण्यात आल्यामुळे पावसाचा पाणी नाल्यातून वाहून न जाता नागरिकांच्या घरात शिरलं असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहेय.. प्रत्यक्षदर्शियांनी हे ढगफुटी सदृश्य पाऊस असल्याचं म्हंटलंय आहेय.. या पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुचाकी गाड्यांचा नुकसान झालं असून घराचं देखील मोठ्या नुकसान झाला आहेय..
Byte : ग्रामस्थ..
12
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 22, 2025 07:32:00Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने विट्यात भाजपाच्यावतीने महारक्तदान शिबिर..
अँकर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सांगली जिल्हा भाजपाच्यावतीने विटा येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष व भाजपाचे नेते वैभव पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन पार पडलं या शिबिरामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह भाजपचे कार्यकर्ते आणि विटा शहरातील नागरिकांकडुन रक्तदान करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने 500 बॅग रक्त संकलन करण्याचा मानस करण्यात आला आहे. साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला होतं,या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत भाजपच्या वतीने या महा रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आलं होतं,ज्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
15
Report
ABATISH BHOIR
FollowJul 22, 2025 07:09:07Kalyan, Maharashtra:
डोंबिवली जवळील टाटा पावर नाका येथे एम आय डी सी च्या चेंबर मध्ये पडून साठ वर्षीय वृद्ध इसमाचा मृत्यू प्रकरणी धक्कादायक खुलासा
घटनास्थळाचे दोन सीसीटीव्ही समोर
वृद्ध इसम दारूच्या नशेत चेंबरच्या बाजूला पडला तर चेंबर मध्ये पडला नसल्याचा सीसीटीव्ही
पहाटे चारच्या सुमारास एका चोरट्याने चेंबर वरील झाकण चोरल्याचा देखील सीसीटीव्ही समोर आलाय
वृद्ध चेंबर मध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरताच राजकीय पक्षांनी उठवली होती एमआयडीसी प्रशासनावर झोड
15
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 22, 2025 07:06:00Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल स्कूल येथे टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला बेदम मारहाण केल्याने पालक जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संस्थेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि रत्नमाला चव्हाण या संस्थाचालक दाम्पत्यावर पूर्णा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता,मागील 13 दिवसांपासून हे दाम्पत्य पोलिसांना गुंगारा देऊन फरार होते,नातेवाईकांनी आरोपी अटक करावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यांनंतर पोलिसांनी 7 वरून 10 पोलिसांचे पथके आरोपिंच्या शोधासाठी तैनात केले होते,आज अखेर पोलिसांनी या फरार चव्हाण दाम्पत्याला अटक केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी दिलीय ,त्यांना पूर्णा येथील कोर्टात हजर करून तपासासाठी पोलीस कोडठीची मागणी केली जाणार आहे,
14
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 22, 2025 07:04:13Vasai-Virar, Maharashtra:
Date-22july2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI BEACH
Feed send by 2c
Type-Av
Slug- वसई कळब बीचवर कंटेनर आढळल्याने खळबळ
अँकर - आज सकाळच्या सुमारास वसईतील कळंब समुद्रकिनारी एक मोठा कंटेनर समुद्रातून वाहून आल्याचे आढळून आले. या घटनेमुळे किनाऱ्यावर स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
हा कंटेनर समुद्राच्या भरतीसोबत किनाऱ्यावर आला असून त्याच्या आत काय आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. स्थानिक मच्छीमारांनी ही बाब तातडीने स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
सुरक्षा दृष्टीकोनातून नागरिकांनी कंटेनरच्या आसपास न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आणि तटरक्षक दलाने घटनास्थळी बंदोबस्त वाढवला असून, कंटेनरच्या मूळ स्रोताची चौकशी सुरू आहे.
अधिकृत माहिती मिळेपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
12
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 22, 2025 07:03:39Akola, Maharashtra:
5 फाईल्स आहेत..PKG
Anchor : राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना सध्या अनपेक्षित संकटाचा सामना करावा लागत आहेय..सोयाबीन आणि हळद पिकावर ' हुमणी ' अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत..गेल्याकाही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात सोयाबीन पिकावर या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेय..अकोला जिल्ह्यात पावसाने अनेक दिवसांपासून पाठ फिरवल्याने या अळीचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहेय..ही अळी पिकांच्या मुळा खात असल्याने, झाडांची वाढ खुंटत असून, पाने पिवळी पडत असून पिके वाळत आहेत परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहेय..हा प्रादुर्भाव दिवसें दिवसवाढत असून, वेळीच उपाययोजना न केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहेय.. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेय..
Byte : किशोर काकडे, शेतकरी , डोंगरगाव,6 अकोला.
Vo 2 : या अळीचा पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहेय..शेती तज्ञांनी या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिलाय..शेतकऱ्यांनी कशाप्रकारे या अळीचा प्रादुर्भाव रोखावा याबद्दल कृषी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहेय..
मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या पिकांना वाचवू शकतील अशी अपेक्षा केली जात आहेय..
Byte : डॉ. धनराज उंदिरवाडे, किटकशास्त्र प्रमुख, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
10
Report
UPUmesh Parab
FollowJul 22, 2025 07:02:51Oros, Maharashtra:
अँकर ----वैद्यकीय उपचारांमध्ये आवश्यक असलेली सिटीस्कॅन व्यवस्था महागडी समजली जाते. अनेक वेळा गोरगरिबांना केवळ महाग असल्यामुळे या व्यवस्थेचा लाभ घेता येत नाही. कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात गेले अनेक वर्ष सिटीस्कॅन तपासणी केंद्राची मागणी होत होती .अखेर आज मोफत सिटीस्कॅन तपासणी केंद्र कणकवली येथे स्थापन करण्यात आले. या तपासणी केंद्राचे उद्घाटन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. ही सेवा पूर्णपणे मोफत असल्यामुळे आता सर्वसामान्य रुग्णांना देखील सिटीस्कॅन तपासणी केंद्राचा लाभ घेऊन त्यांच्या उपचारांमध्ये सुलभता येणार आहे.
12
Report
SNSWATI NAIK
FollowJul 22, 2025 07:00:28Navi Mumbai, Maharashtra:
story slug - विधीमंडळात हाणामारी करणारा टकले ची कलंबोलीत मिरवणूक
विधीमंडल मे मारपीत करणे वाले आरोपी का सत्कार
FTP slug - nm Rishikesh takle
shost-
reporter- swati naik
navi mumbai
anchor -
विधिमंडळ हाणामारी प्रकरणात जमिनावर बाहेर आलेल्या ऋषिकेश टकलेची कळंबोलीत भव्य मिरवणूक.
गोपीचंद पडळकर समर्थकांकडून काढण्यात आली मिरवणूक.
हार घालून स्वागत करत ढोलताश्यांच्या गजरात काढली मिरवणूक.
गुन्हेगारीला समर्थन करणारे कृत्य केल्याने नागरिकांकडून संताप.
gf-
6
Report
KPKAILAS PURI
FollowJul 22, 2025 06:37:59Pune, Maharashtra:
pimpri lodha
kailas puri Pune 22-7-25
feed by 2c
प्रफुल्ल लोढाच्या विरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल.....
१७ तारखेला गुन्हा दाखल होऊन पिंपरी चिंचवड पोलिसांकडून कमालीची गुप्तता....! पोलिसांच्या भूमिकेवर संशय....!
'हनी ट्रॅप'सह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बलात्कार प्रकरणी आणखी एक गुन्हा बावधन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
प्रफुल्ल लोढा (वय ६२, रा. जामनेर, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. प्रफुल्ल लोढावर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लील छायाचित्र काढून, मुलींना डांबून ठेवून त्यांना धमकविल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. ३ जुलै रोजी साकीनाका पोलिस ठाण्यात पोस्को, बलात्कार, खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तर, १४ जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात 'पोक्सो'सह बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकीनाका पोलिसांनी लोढा याला ५ जुलै रोजी अटक केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लोढा हा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप रविवारी केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली असतानाच आता प्रफुल्ल लोढा याच्यावर पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
संशयित लोढा याने फिर्यादी यांना तुमच्या पतीला नोकरी लावतो, असे सांगून त्यांना २७ मे २०२५ रोजी रात्री आठ वाजता बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये बोलवले. फिर्यादीस तुझ्या पतीला नोकरी लावायची असेल तर त्याबदल्यात मला तुझ्याशी शरीरसंबंध ठेवायला दे, असे म्हणाला. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला असता तुझीही नोकरी घालवेन, अशी धमकी दिली आणि जबरदस्तीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पीडित महिलेने १७ जुलै रोजी बावधन पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, लोढा याच्यावर बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. मुंबई पोलिसांकडून त्याचा ताबा घेतला जाणार आहे.
byte - अनिल विभुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन
3
Report
SNSWATI NAIK
FollowJul 22, 2025 06:35:31Navi Mumbai, Maharashtra:
story slug - तळोजा जेल मद्ये कैदी ने केला दुसऱ्या कैदी वर हल्ला
तळोजा जेल मे कैदी पर हमला
FTP slug - nm taloja jail prisoner
shots- taloja jail
reporter- swati naik
navi mumbai
anchor -
तळोजा कारागृहात बंदी असलेल्या 2 कैद्यांकडून 1 कैद्यावर जीवघेणा हल्ला.
कारागृहातील सर्कल क्रमांक 1 मधील बॅरक क्रमांक 1 जवळ झाला हल्ला.
रंगकामासाठी वापरण्यात येत असलेल्या धारदार पत्र्याने छातीवर वार करुन हल्ला करण्यात आलाय.
शमील नाचन आणि इरफान लांडगे असे हल्ला करणाऱ्या कैद्यांचे नाव असून दोघेही बॉम्बस्फ़ोट प्रकरणातील आरोपी आहेत.
गिरीश नायर नामक कैद्यावर हल्ला करण्यात आला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
gf
1
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 22, 2025 06:30:45Ambernath, Maharashtra:
गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीचे जल्लोषात स्वागत
समाजात गुन्हेगारीचे उदात्तीकरण
Ulh celibration
Anchor उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ मधील रमाबाई टेकडी येथे २७ एप्रिलच्या रात्री दारूच्या नशेत झालेल्या वादातून एकाला लोखंडी तलवार आणि रॉडने मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या दिवाकर सह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. मात्र दिवाकर यादव याचा जामीन झाल्यावर फटाके फोडत मिरवणूक काढल्याचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
Vo घटनेनुसार, 27 एप्रिलच्या रात्री हंशु झा हा पिंपळाच्या झाडाजवळ दारू पित असताना मिलन सहानी याच्याशी त्याचा वाद झाला. त्यानंतर दिवाकर यादव, सुनील यादव, प्यारेलाल यादव, ज्योती यादव यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हंशु झा याच्यावर लोखंडी तलवार आणि रॉडने हल्ला केला. तसेच रेखा झा, बिपीन झा आणि रोहित झा आदींना ही जीवघेणे वार करत गंभीर दुखापत केली होती. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणातील आरोपी दिवाकर यादव याला अलीकडेच जामीन मिळाल्यानंतर १६ जुलै रोजी फटाके फोडत, ढोल-ताशांच्या गजरात रमाबाई टेकडी परिसरात त्याची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यापूर्वीही १७ जुलै रोजी विनयभंग प्रकरणातून सुटलेल्या रोहित झा याच्या स्वागत यात्रेमुळे उल्हासनगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. अश्याच प्रकारचा गुन्हा दिवाकर यादव विरोधात ही दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Report
ABATISH BHOIR
FollowJul 22, 2025 06:07:06Kalyan, Maharashtra:
स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाची उधळण.
स्वच्छतेच्या नावाखाली केडीएमसी दरवर्षी करोडो रुपये खर्च करून सुद्धा स्वच्छ संरक्षणामध्ये मागेचं.
केडीएमसी चे स्वच्छतेच्या नामांकनात घसरण..
2024 -25 च्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात केडीएमसी 24 व्या स्थानी
मागील वर्षापेक्षा दोन अंकांनी घसरण.
Anchor :- केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्व्हेक्षण 2024-25 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेची पीछेहाट झाली आहे. मागील वर्षी अस्वच्छतेचा शिक्का पुसण्याच्या प्रयत्नात या शहराने 22 व्या स्थानी मजल मारली होती. मात्र यंदा हे नामांकन 2 अंकांनी घसरले असून यंदा पालिकेला 24 व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी, कचर्याचा डोंगर हटविण्यासाठी तसेच शास्त्रोक्त पद्धतीने कचर्याचे संकलन आणि विल्हेवाट यासारख्या प्रकल्पावर करोडोचा चुराडा केल्यानंतरही कचरा संकलन आणि कचऱ्याचे डोंगर झालेले डम्पिंग हटवण्यासाठी करोड रुपये खर्च करून सुद्धा या वर्षी नामांकन घसलेला आहे
कोटयवधी रुपयांचे "चेन्नई पॅटर्न" तरी कल्याण डोंबिवली शहरांना तारणार का ??
पालिका प्रशासनाने 86 कोटी रुपये खर्चून शहरातील कचरा शास्त्रोक्त पद्धतीने संकलित करून त्याची वाहतूक करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केला असून याखेरीज पालिकेच्या स्वच्छतेच्या कर्मचार्यासाठी स्वतंत्र खर्च केला जात आहे. तर डम्पिंग हटविण्यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेण्यात आला असून कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराला देखील करोडोचा मोबदला दिला जात आहे. त्यामुळे या चेन्नई पॅटर्नचा आदर्श कल्याण डोंबिवली शहराला कुठे नेणार हे वर्षभरात स्पष्ट होईल.
Byte :- प्रसाद बोरकर ( केडीएमसी उपायुक्त )
4
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 22, 2025 06:01:06Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2207ZT_CHP_MINE_ISSUE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरालगत दुर्गापुर खुल्या कोळसा खाणीला केंद्र सरकारने दिली परवानगी, वाघांचे भ्रमण मार्ग बाधित होण्याचा धोका
अँकर:-- चंद्रपूर शहरालगत ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या आणि वाघांच्या भ्रमण मार्गाचा प्रमुख टप्पा असलेल्या दुर्गापूर कोळसाखाण परिसरात आणखी एका विस्तारित कोळसा खाणीला मंजुरी देण्याची देण्यात आली आहे. सुमारे 80.77 हेक्टर वन जमीन यासाठी देण्यात आली आहे. ताडोबा ,कन्हाळगाव आणि टिपेश्वर या अभयारण्यांना जोडणारा वाघांचा हा भ्रमण मार्ग नव्या कोळसा खाणीने बाधित होणार आहे. गेली काही वर्षे केंद्र सरकार आणि पर्यावरणवादी या मुद्यावर समोरासमोर आले होते. 7 मे रोजी याबाबत अंतिम बैठक झाल्यानंतर काही अटींसह या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात प्रत्यक्ष जागा पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राज्याच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांना देण्यात आले असून जिल्ह्यात मानव- वन्यजीव संघर्ष वाढत असताना हा प्रकल्प मंजूर करण्यात आल्याने ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर नव्या वन्यजीव विषयक अडचणी निर्माण होणार आहेत.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 22, 2025 06:00:12Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या एमआयडीसीतील सर्वात मोठा उद्योग असलेल्या रेमंड कंपनीतील कामगारांनी अचानक संप पुकारल्याने कंपनी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कामगार करारास वारंवार विलंब होत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
रेमंडच्या कंपनीत १ हजार ७८५ कामगारांना रोजगार आहे. प्रत्येक चार वर्षांनंतर आर्थिक बार्बीसह इतर सवलतीच्या दृष्टीने मान्यताप्राप्त संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चेतून करार मान्य केला जातो. मार्च २०२४ मध्ये मागील चार वर्षांचा करार संपुष्टात आला. यानंतर कामगार संघटना आणि प्रशासनामध्ये वारंवार बैठका झाल्या. परंतु करारावर शिक्कामोर्तब होत नसल्याने कामगारांनी संप पुकारला. दरम्यान कंपनी परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
0
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 22, 2025 05:38:01Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कृष्णा व वारणा नदीकाठच्या गावांसाठी शक्तिपीठ ठरणार कर्दनकाळ - राजू शेट्टी.
अँकर - सांगली जिल्ह्यातुन जाणारा शक्तीपीठ महामार्ग कृष्णा व वारणा नदी काठाच्या गावांसाठी कर्दनकाळ ठरणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.कृष्णा आणि वारणा नदी काठावरील गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या भरावामुळे वारणा व कृष्णा नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका अधिकचा निर्माण होणार असल्याची भीती राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे.शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या कर्नाळा येथे
बाधित शेतकरी व ग्रामस्थांची बैठक
पार पडली.यावेळी राजू शेट्टींनी शेतकऱ्यांशी चर्चा करत गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या जागेची पाहणी देखील शेतकऱ्यांसोबत करण्यात आली.
0
Report