Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

कर्जमाफीसाठी बच्चू कडूची आक्रमक पदयात्रा, आंदोलनाची तयारी!

ANIRUDHA DAWALE
Jul 07, 2025 07:03:53
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_KADU_ON_CM दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे अमरावती 9503131919 जो पर्यंत शासन निर्णय निघत नाही आणि कर्जमाफीची तारीख जिथपर्यंत सांगत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार – बच्चू कडू अँकर :– प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहे. आजपासून बच्चू कडू 7/12 कोरा.. कोरा..कोरा.. यात्रा काढणार आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील जन्मभूमी पापळ पासुन ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या देशातील पहिली शेतकरी आत्महत्याग्रस्त गावा पर्यंत ही पदयात्रा निघाली आहे. अन्नत्याग आंदोलनानंतर आम्ही पुन्हा पदयात्रा सुरू करत आहे जे बोलले ते त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही. मंत्रालयात मीटिंग झाल्या, त्या मीटिंगमध्ये डझनभर मंत्री उपस्थित होते, मात्र जेव्हा पर्यंत शासन निर्णय निघत नाही आणि कर्जमाफीची तारीख जिथपर्यंत सांगत नाही तेव्हापर्यंत आमच आंदोलन सुरू राहणार आहे असे कडू यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की अधिवेशनामध्ये कर्जमाफी बाबत समिती स्थापन करू दिव्यांगांचे पगारवाढीबाबत निर्णय घेऊ मात्र ती अजून पर्यंत झाले नाही. त्यामुळे आमच्या आंदोलनाची धग कमी होऊ नये व लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी आम्ही ही पदयात्रा काढत आहे. दरम्यान वसंतराव नाईक यांच्या स्मारकाजवळ आम्ही या पदयात्रेचा समारोप करू व तिथून दुसऱ्या आंदोलनाची घोषणा करू असेही कडू म्हणाले. बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top