400601
संभाजी ब्रिगेडवर हल्ला: दीपक काटेचा खळबळजनक खुलासा!
Thane, Maharashtra:Thane flash *दीपक काटे ( शिवधर्म फाउंडेशन अध्यक्ष ) byte pointer* संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला का झाला, तर त्यांच्याच संघटनेच्या नावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा होत असलेला एकेरी उल्लेख यासाठी त्यांच्यावर शाई फेकली त्यांच्यावर शाईफेक झाली ही प्रथा संभाजी ब्रिगेडनेच पाडलेली आहे, बोवोगे बबुला तो आम कैसे उगेंगे, यांचाच निषेध व्यक्त करण्याची ही पद्धत आहे त्यांनी हा विषय झाकण्यासाठी, महाराष्ट्रातील शिव प्रेमींना, सर्वसामान्य जनतेला जर ही गोष्ट समजली की संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख त्यांच्या नावामध्ये होतोय तरीही जनता पेटून उठेल आणि आपल्याला राहत्या घरात देखील राहून देणार नाही त्यामुळे या विषयाला त्यांनी पूर्णपणे डायव्हर्ट केलं आणि सांगितलं दीपक काटे हा भाजपचा माणूस आहे, दीपक काटे ने केलेला हल्ला हा जीव गेला होता, यामुळे समता,बंधुता, एकता धोक्यात येते खऱ्या अर्थाने जर बघितलं शिवधर्म फाउंडेशनच हे आंदोलन 2019 ते 20 पासून सुरू आहे महापुरुषांच्या विषयावर भाजपचा या विषयात काडीमात्र संबंध नाही गेली दीड वर्षापासून संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत माझं फोनवर बोलणं झालं आणि पत्रव्यवहार देखील झाला याच त्यांनी एकदाही उत्तर दिलेलं नाही ज्यावेळी आम्ही विधानभवना बाहेर आंदोलन केल त्यावेळी त्यांचा प्रवक्ता संतोष शिंदे याने मीडियाला जाऊन सांगितलं की आम्हाला कोणीही शहाणपणा शिकवू नये, आम्हाला कोणीही डीवटण्याचा प्रयत्न करु नये म्हणजे तुम्ही मनमानी कारभारासारखा महापुरुषांचा अपमान करत राहणार, देवी देवतांचा अपमान करत राहणार तर हे महाराष्ट्र सहन करणार नाही संभाजी ब्रिगेड जर स्वत:ला पुरोगामी म्हणतेय ना तर ते पुरोगामी नाही तर प्रतिगामी विचारांचे आहेत संभाजी ब्रिगेड ही खंणीखोर आणि अर्बन नक्षली संघटना आहे,हिला बॅन केल पाहिजे *ऑन संभाजी ब्रिगेड आंदोलन* क्रांतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आम्ही मेलो का? त्यांच्या डोळ्यात राख टाकून आम्ही आज पत्रकार परिषदेला हजर झालोय, चार हात करायची ताकद त्यांची आहे तर आमचीही आहे, पण आम्ही डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाला मानतो संभाजी ब्रिगेड ने संविधान कधी मानलय हे त्यांचा इतिहास उघडून बघा, ते सारखं सारखं सांगतात आमचा इतिहास बघा,तुमचा इतिहास तुम्हाला माहित आहे का संभाजी ब्रिगेड जहादिंची पाठराखण करणारी संघटना आहे, महाराष्ट्रावरती जे परकीय हल्ले झाले औरंग्या, अफझल्या असेल असल्याच्या विचारांना जोपसणारी आणि त्यांचं उदात्तीकरण करणारी ही संघटना आहे *ऑन पुढील भूमिका* आम्ही धर्मदाय आयुक्त आणि निवडणूक आयोगाला आधीच पत्र दिलेलं आहे, त्यांना 30 दिवसांची वेळ दिलेली आहे, 30 दिवसात संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्षावर कारवाई करावी,त्यांना समज द्यावी की त्यांनी त्यांच्या नावात एकेरी उल्लेख काढून आदरयुक्त करा अन्यथा धर्मदाय आयुक्त आणि निवडणूक आयोगा बाहेर आंदोलन करू मी आणि आमच्या संघटनेचे शेकडो कार्यकर्ते गमीनीकावा करून मंत्रालयासमोर आत्मदहन करू *ऑन छत्रपती शिवाजी महाराज अपमान* कोणीही राजकीय नेते, सेलिब्रिटि असतील, मी असेल किंवा माझा बाप असेल छत्रपतींचा किंवा कुठल्याही महापुरुषांचा अपमान तकरत असेल त्याला शासन झालंच पाहिजे अशा विचारांच्या लोकांना महाराष्ट्रात जगण्याचा अधिकार नाही, त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे संभाजी ब्रिगेडने जर करोडो शिवप्रेमींची मागणी मान्य केली, त्यांनी त्यांच्या संघटनेच्या नावात बदल केला तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या पुरंदरवर झालाय तिथे नेऊन त्यांचा दुग्धाभिषेक घालेल ज्या हाताने काळ फासलय त्या हाताने0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बारिश के बावजूद कोकण के किसान लावणी के सुरों से भात रोपण जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पाऊस रुसला तरी सूर रंगला! संकट विसरून कोकणात घुमतोय पारंपरिक लावणीच्या गाण्यांचा नाद! कोकणात ऐन लावणीच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने भात शेतीवर संकट ओढवले आहे. पावसाअभावी भाताची सुवर्ण रोपे पिवळी पडू लागल्याने बळीराजा चिंतेत आहे.. पण अशा कठीण परिस्थितीतही कोकणचा शेतकरी डगमगलेला नाही.. निसर्गाच्या अवकृपेवर मात करत जिद्दी शेतकऱ्यांनी थेट विहिरीतून पाणी आणून, शेतात चिखल करत भात लावणीची कामे सुरू ठेवली आहेत.. विशेष म्हणजे, डोक्यावरचे चिंतेचे ढग बाजूला सारून शेतामध्ये पारंपरिक गाणी गात अत्यंत उत्साहात आणि आनंदाने ही लावणी केली जात आहे.. संकंटाशी दोन हात करत कोकणच्या हिरव्यागार शेतात घुमणारा बळीराजाचा हाच सुरेल आवाज आणि उनकी जिद्द दाखवणारी ही एक थेट झलक झी २४ तास वर ...0
0
Report
शिक्षकों पर गैर-शैक्षणिक भार बढ़ा, बच्चों की पढ़ाई पर असर
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांवर वाढलेल्या अशैक्षणिक कामांच्या भाराचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे चित्र आहे. एसआयआर, बीएलओ, प्रशिक्षण आणि इतर शासकीय कामांमध्ये शिक्षक व्यस्त असल्याने वर्गात शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार पालकांच्या केली जात आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने उपलब्ध शिक्षकांनाच अनेक वर्ग सांभाळावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून दिलासा देऊन वर्गात अधिक वेळ देता यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.0
0
Report
रत्नागिरी में बारिश नहीं, किसान बेहाल—फसलें करपने लगीं
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पावसाची दडी.. पिके करपली.. लावणीच्या काळातच पावसाने पाठ फिरवल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर.. कोकणात चिंतेचे ढग गडद झाले आहेत,पण ते पावसाचे नव्हे तर दुष्काळाच्या सावटाचे! मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा वरुणराजाने दडी मारली आहे.. ऐन लावणीच्या (भात लागवडीच्या) महत्त्वाच्या काळातच पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी कमालीचा चिंतातूर झाला है.. कडक ऊन आणि पाण्याच्या अभावामुळे शेतातील कोवळी पिके आता करपून जाऊ लागली आहेत.. बियाणे,खते आणि मशागतीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया जाण्याच्या भीतीने जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे.. पावसाने दडी मारल्याने आपल्या सुकलेल्या शेतात शेतकरी विहिरीच्या पाण्यावर आपल्या शेतात चिखल करून लावणी करत आहे.. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
Advertisement
सांगली नदी में मगरी के हमले से 61 वर्षीय व्यक्ति घायल
Sangli, Maharashtra:कृष्णा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीने हल्ला केल्याची घटना सांगलीमधील घडली. जालिंदर शामराव साळुंखे (वय 61) हे मगरीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार झाले आहेत. साळुंखे नेहमीप्रमाणे शहरातील माई घाट येथे कृष्णा नदीत पोहत असताना मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीच्या हल्ल्यानंतर भेदरलेल्या साळुंखेंनी आराडा-ओरडा सुरू केल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी नदी धाव घेत मगरीच्या तावडीतून सुटका केली आहे. त्यामुळे साळुंखे हे बाल-बाल बचावले आहेत. घटनेनंतर जखमी झालेल्या साळुंखे यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय, मात्र या घटनेने शहरात भीतीच वातावरण निर्माण झाला असून नदीकाठी पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी खबर द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.0
0
Report
नागपुर: इथेनॉल और ई20 के आरोप पर चार सोशल मीडिया इन्फ्लुएंसर पर मामला
Nagpur, Maharashtra:नागपूर - ‘इथेनॉल’बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल्ल गैरसमज पसरवल्याप्रकरणी चार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरविरोधात गुन्हा - नागपूर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल,बिहारसह देशातील चार इन्फ्लुएन्सर गुन्हा नोंद - मनिश कश्यप (रा.बिहार), देसी बॉयसर, हर्षित राठी आणि अंकलेश इन्वाटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेय. - इथेनॉल आणि ई 20 विरोधात यूट्यूब-इन्स्टाग्रामवर दिशाभूल करणारे आणिबेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देणारे व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या इथेनॉल धोरणाचा चुकीचा संदर्भ वापरल्याचा आरोप - भाजप सोशल मीडिया सेलच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल - 'या प्रकरणात नितीन गडकरी यांचा थेट संबंध नाही; त्यांच्या नावाचा केवळ संदर्भ वापरण्यात आला - नागपूर सायबरकडून व्हिडिओंची तपासणी सुरू पुढील चौकशी सायबर पोलिसांकडून सुरू आहे0
0
Report
रायगढ़ जिले में 15-30 जुलाई के दौरान स्कूल से बाहर बच्चों की विशेष खोज अभियान
Chendhare, Maharashtra:शुल्काबाह्य मुलांच्या शोधासाठी विशेष मोहीम 15 ते 30 जुलाई दरम्यान रायगढ़ जिल्हाभर सर्वेक्षण. स्थलांतरित विद्यार्थ्यांना मिळणार विशेष कार्ड. रायगढ़ जिल्ह्यातील 6 से 14 वर्षे आयु वर्ग के एक भी बच्चा शिक्षण से वंचित न रहे, इसके लिए रायगढ़ जिला परिषद के शिक्षा विभाग نے पहल की है. 15 से 30 जुलाई के दौरान स्कूल से बाहर बच्चों की विशेष खोज मोहीम चलाई जाएगी. इस अभियान में स्कूल से बाहर बच्चों को उनकी आयु के अनुसार समकक्ष कक्षा में प्रवेश दिया जाएगा. साथ ही स्थानांतरित बच्चों को शिक्षा में बाधा न हो इसका ध्यान रखते हुए उन्हें विशेष कार्ड दिया जाएगा.0
0
Report
Advertisement
वाशीम के रिसोड ST बसस्टैंड पर पानी भरे गड्ढे, यात्रियों को हो रही परेशानी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील रिसोड एसटी बसस्थानकासमोरील रस्त्यावर पावसामुळे मोठे खड्डे पाण्याने भरल्याने प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या ठिकाणी चिखल, साचलेले पाणी आणि दुर्गंधीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तसेच अपघाताचा धोकाही वाढला आहे. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी,अशी मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
शिरुर में भारी बारिश से टमाटर फसल खराब, किसानों में रोष और नुकसान
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिले में भारी बारिश के कारण टोमॅटो पिक को बड़ा नुकसान हुआ है. सतत बारिश से टोमॅटो पिक पर वायरस रोग का प्रसार हुआ है और खड़ी फसलें पूरी तरह खराब हो गई हैं. बाजार में टोमॅटो को उचित भाव नहीं मिल रहा है और वायरस से फसलें नष्ट होने से किसान हवालदिल हो गए हैं. परिस्थिती इतनी गंभीर है कि किसानों ने अपनी खड़ी टोमॅटो की फसल में Sheep और goats के चरने के लिए छोड़ दिया है. इससे टोमॅटो उत्पादक किसानों को लाखों का नुकसान हुआ है. हमारे प्रतिनिधि Hemant Chapude ने इसका आकलन किया...0
0
Report
वाशीम में हल्दी के भाव एक हफ्ते में तेज़ बढ़े, रिकॉर्ड उछाल
Washim, Maharashtra:वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीच्या बाजारभावात एका आठवड्यात १ हजार ६२६ ते ३ हजार ५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे हळदीच्या बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात हळद कांडीला १४ हजार २०० ते १५ हजार ८७५ रुपये, तर हळद गटुला १२ हजार ८५० ते १३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. जिल्ह्यातील लिलावात हळद कांडीला १५ हजार ९०० ते १७ हजार ५०१ रुपये, तर हळद गटुला १५ हजार ते १६ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजारात दर्जेदार हळदीला चांगली मागणी असल्याने दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर के जिलाधिकारी ने फर्जी दस्तावेज पर कार्रवाई के लिए समिति गठित कर दी
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खोट्या सह्या, बनावट परवाने करून मोठ्या प्रमाणात गुंठेवारी जमिनीचे व्यवहार केलेल्या लोकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींचा आढावा घेऊन चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी खोट्या कागदपत्रातून व्यवहार करणाऱ्यांना दणका देणार आहेत.0
0
Report
सोलापूर में बारिश ने खरीप पेरणी रोकी, सिर्फ 20% पूरी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यात पावसाने मारली दंडी, गेल्या दीड महिन्यात केवळ 20% खरीप हंगामाचे पेरणी पूर्ण. सोलापूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मारली दांडी, खरीप हंगामाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशकडे. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून केवळ 20 टक्के खरीप हंगामाची पेरणी झाली पूर्ण. जिल्ह्यात 29 टक्के सोयाबीन पिकाची लागवड, मात्र पावसाअभावी पीक जळून जाण्याची शेतकऱ्यांना भीती.. खरीप हंगामातील 70 हजार हेक्टर वरील शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण..0
0
Report
नाशिक के जायकवाडी बांध में पानी की आवक 546 क्यूसेक, जलस्तर 1506.40 फुट तक
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील पावसात घट झाल्याने जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली असली, तरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. सोमवारी मागील २४ तासांत ५४६ क्युसेक पाण्याची आवक झाली असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा ६८५.७८६ दलघमी म्हणजेच ३१.५९ टक्के इतका झाला आहे, धरणाची पाणीपातळी १५०६.४० फूट (४५९.१५१ मीटर) इतकी नोंदविण्यात आली असून एकूण पाणीसाठा १४२३.८९२ दलघमी आहे. यंदाच्या मान्सून हंगामात १ जूनपासून धरणात आतापर्यंत ९६.१७३ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. रविवारी धरण परिसरात पावसाची नोंद झाली नसून आजचा पाऊस शून्य राहिला आहे。0
0
Report
Advertisement
चिकलठाणा में प्लास्टिक गोदाम में भीषण आग, दमकल ने पाया काबू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा परिसरातील भालगाव शिवारात रात्री एका प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच चिकलठाणा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने बंबासह घटनास्थळी रवाना झाले. अग्निशामक दलातील जवानानी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, गोदामात प्लास्टिक साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते अखेर अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.0
0
Report
वायरल ऑडिओ क्लिप पर महाराष्ट्र मंत्री ने की जांच, साइबर व फॉरेन्सिक सत्यापन
Satara, Maharashtra:माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सध्या चर्चेत असलेल्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे."माझ्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात मी नेहमीच सर्व अधिकार्यांशी आणि लोकांशी आदराने आणि सौजन्याने संवाद साधला आहे, आणि हीच पद्धत पुढेही राहील. सध्या समोर आलेले प्रकार हे आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केलेले असू शकतात, असे सांगत त्यांनी या क्लिप्सच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती दिली आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाजाची सत्यता पडताळण्यासाठी आणि वास्तविक समोर आणण्यासाठी सायबर पोलिसांमार्फत तपास केला जाईल. गरज पडल्यास खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आवाजाचे नमुने देखील घेऊन फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. क्लिपमध्ये कोणतीही छेडछाड झाली आहे का, तसेच संबंधित कर्मचाऱ्याला कोणी आणि का कोंडून ठेवले, त्याला कोणी मारहान केली, या सर्व बाबींचा छडा पोलीस यंत्रणा लावेल. "या संपूर्ण प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, मग तो कितीही मोठा आणि वजनदार असला, तरी त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे."0
0
Report
संभाजीनगर में बाबा फर्जन रोहिला गली के वाडे पर पुलिस दबिश, कुछ नहीं मिला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह सर्वत्र चर्चेत असलेल्या कामगार नेता, ९० च्या दशकात दबदबा राहिलेल्या बाबा फर्जनच्या रोहिला गल्लीतील जुन्या वाड्याची पोलिसांनी झडती घेतली. वर्षभरापूर्वी फर्जनने सोडलेला हा अलिशान, जुन्या धाटणीत बांधलेला वाडा सध्या 'खंडहर' झाला असून तिथे घाणीने वेढा घातला आहे , फर्जनचा मुंबईत खासगी नोकरी करणारा मुलगा शहरात आल्यानंतर, त्याच्या उपस्थितीत सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव व इतर पोलिसांनी तीन तास वाडा पिंजून काढला मात्र केवल गंजलेले जुने साहित्य, कारखान्यातील यंत्राचे अवशेष याव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती काहीच लागलें नाही...0
0
Report
Advertisement
