Back
शिरूरमध्ये प्रेमविवाहाच्या रागातून थरारक हल्ला, कोयत्याने तरुणावर जीवघेणा हल्ला!
Shirur, Maharashtra
Feed 2C
Slug: Shirur Attack
File:01
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc:प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे घडलीय, कुडांई मेन्स पार्लरमध्ये हे थरार नाट्य घडले असून, दुकानाची तोडफोड करून दुकान मालकाच्या हातावर व पाठीवर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले आहेत. तर हल्ला करून पळून जाणाऱ्या दोघांना स्थानिक नागरिकांनी पकडले, यामध्ये आरोपींकडून कोयता सारखे धारदार शस्त्र जमा करण्यात आले आहे.या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी शिवारात शक्तीपीठ महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी अधिकारी आले असता शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवित आपल्या जमिनी शक्तीपीठ महामार्गाला देण्यास विरोध दर्शवित अधिकाऱ्यांना परतावून लावले,शासनाचया वतिने देण्यात येत असलेल्या।नोटिसा ही घेण्यास विरोध दर्शवला. अगोदरच जमीनीचे आमच्या जमिनी कमी झाल्या असून आहेत त्या जमिनी जर गेल्या तर आम्ही भूमिहीन होऊत, तुम्ही आमच्या 20 गुंठ्यासाठी पन्नास लाख रुपये जरी दिलेत तर आम्ही आमच्या कपाळाच्या कुंकवा एवढी सुद्धा जमीन देणार नाही, बळजबरीने आमच्याकडून जमिनी घेतल्यास आम्ही आत्महत्या करू असा गर्भित ईशारा एका शेतकरी महिलेने सरकारला दिलाय. त्यामुळे शेतकरी महामार्ग रद्द झालाच पाहिजेत अश्या घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या...
बाईट- शेतकरी महिला,आहेरवाडी
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Road
Feed on - 2C
------------------------------
Anchor - महिनाभरापूर्वी झालेला डांबर रस्ता हाताने उखडून दाखवत निकृष्ट रस्त्याची पोलखोल एका ग्रामस्थाने केली. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हा रस्ता आहे. दुगाव ते डोंगरगाव दरम्यान महिनाभरापूर्वी डांबर रस्ता करण्यात आलाय. पण महिनाभरातच रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याला तडे गेले आहेत. रस्त्याच्या कामात डांबराचा अत्यंत कमी वापर करण्यात आलाय. डांबराच्या खाली बेडपण करण्यात आला नसून साधी माती वापरण्यात आली आहे. रस्त्यात डांबर कमी वापरल्याने चक्क हाताने रस्ता उखडला जातोय. पंधरा दिवसांपूर्वीच लोहा तालुक्यातील एक डांबर रस्ता अश्याच प्रकारे ग्रामस्थाने हाताने उखडून दाखवला होता. आता ह्या रस्त्याचा निकृष्ट दर्जा समोर आलाय. त्यामुळे बोगस कामे करणाऱ्या गुत्तेदारावर कारवाई होणे गरजेचे आहे.
---------
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर...
स्किप्ट ::- प्राणीप्रेमी दत्तात्रय पवार यांच्या अंत्ययात्रेत शेळीची भावनिक साथ...शेवटच्या यात्रेत शेळीची साथ... प्रेम इतकं की शेवटपर्यंत मुक्या जीवाची साथ... दत्तात्रय पवार यांच्या अंत्यविधीत हृदयस्पर्शी दृश्य... शेवटच्या प्रवासातही जिवंत राहिलं प्राणीप्रेम.... प्राणीप्रेमाची विलक्षण साक्ष... शेळीचं अंत्ययात्रेत सहभाग...
AC ::- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावात एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. अल्पशा आजाराने दत्तात्रय पवार यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या अंत्ययात्रेला गावातील साळवे चौकातून सुरुवात झाली. मात्र या अंत्यविधीत एक विलक्षण दृश्य पाहायला मिळालं... गावातील एक शेळीचं पिल्लू तब्बल दोन किलोमीटरपर्यंत दत्तात्रय पवार यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालं. अग्नीसंस्कार पूर्ण होईपर्यंत ती शेळी ग्रामस्थांसोबत होती आणि नंतरही ती त्यांच्यासोबत परत आली. दत्तात्रय पवार हे प्राणीप्रेमी होते. त्यांच्या शेळी, कुत्र्यांवर असलेल्या प्रेमाचा प्रत्यय आज संपूर्ण गावाने अनुभवला. दत्तात्रय पवार यांचं प्राण्यांवर असलेलं निस्वार्थ प्रेम, त्यांच्या शेवटच्या प्रवासातही जिवंत झालं... एक मुक्या जीवाने दाखवलेली ही नाती गावकऱ्यांना भावूक करून गेली.
0
Share
Report
Pune, Maharashtra:
हिंजवडी आयटी पार्कमध्ये 3 ते 4 दिवस वीज पुरवठा विस्कळीत, मोठ्या कंपन्यांना फटका.
pimpri light
kailas puri Pune 7-7-25
feed by 2c
for web also...!
.....हिंजवडीत रविवारी सायंकाळपासून वीज पुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळं मोठ्या आयटी कंपन्यांना फटका बसलाय. कारण हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा अवधी लागणार आहे. असं महावितरण विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत रविवारी दुपारी २.१० च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे महापारेषणकडून महावितरणच्या एमआयडीसी आणि आयटी पार्क भागातील ९१ उच्चदाब व सुमारे १२ हजार लघुदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळित झाला आहे. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा पूर्ववत केला जातोय, पण कंपन्यांना लागणारी वीज पुरेशी होत नाही.
महापारेषण कंपनीने नियोजित देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ असा वीजपुरवठा बंद केला होता. तशी सूचना वृत्तपत्रांमध्येही प्रसिद्ध केली होती. मात्र देखभाल दुरुस्तीचे काम आटोपून वीजपुरवठा सुरु करताना दुपारी २.१० वाजेच्या सुमारास २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत मोठा बिघाड झाला. परिणामी महावितरणच्या ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या २२ केव्हीच्या २५ वाहिन्या, अतिउच्चदाबचे इन्फोसिस व नेक्सट्रा हे दोन ग्राहक अशा ९१ उच्चदाब आणि सुमारे १२ हजार लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळित झाला आहे.
पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. तब्बल ६३ मेगावॅटहून अधिक भार इतरत्र मार्गाने वळविण्याचे काम सुरु असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. हिंजवडी भागातील एमआयडीसी, आयटी पार्क, रायसोनी पार्कचा भाग, डॉहलर कंपनी तसेच विप्रो सर्कलच्या परिसराला याचा फटका बसला आहे. दरम्यान ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पुढचे 3 ते 4 दिवस वीजपुरवठा असाच विस्कळीत राहणार आहे.
0
Share
Report
Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG - 0707_WARDHA_MP_121
- वर्ध्यात आत्महत्याग्रस्त पीडित कुटुंबाचे खासदारांकडून सात्वन
- आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघितल्या मात्र विध्यार्थ्यांच्या आत्महत्या म्हणजे हे शोकांतिका - खासदार
- शिक्षण विभाग, प्रोजेक्ट अधिकारी,कोणत्याच अधिकाऱ्यांनी कुटुंबाची भेट घेतली नाही
- निर्लज्य आणि कुंभकर्णी झोपेतलं सरकार आहे; खासदार अमर काळे यांचा सरकारवर घणाघात
- वर्ध्याच्या घटनेची आदिवासी मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि पीडित कुटुंबाला मदत करा- काळे
- अशी दुसरी सोनिया घडू नये अशीच अपेक्षा- काळे
अँकर - वर्ध्यामध्ये 12 वि मध्ये शिकणाऱ्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहेय..खासदार अमर काळे यांनी आत्महत्याग्रस्त उईके कुटूंबाला भेट देऊन सात्वन केले..आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघितल्या मात्र विध्यार्थ्यांच्या आत्महत्या म्हणजे हे शोकांतिका आहेय..जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडेच शिक्षण खातं आहे..शिक्षण विभाग, प्रोजेक्ट अधिकारी,कोणत्याच अधिकाऱ्यांनी कुटुंबाची भेट घेतली नाही.. त्याची खंत देखील बोलून दाखविली आहेय..निर्लज्य सरकार आहे याची ही प्रचिती आहेय..झोपलेलं सरकार आहे या घटनेच्या माध्यमातून तरी कुंभकर्णी झोपेतून उठतील त्यानिमित्ताने मी करतो...या घटनेची आदिवासी मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि पीडित कुटुंबाला मदत करावी.. अशी दुसरी सोनिया घडू नये अशीच अपेक्षा मी करतोय अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहेय.. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी...
बाईट- 121,अमर काळे, खासदार, वर्धा
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ..
अँकर - सांगलीच्या कृष्णा नदी आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे धरणाच्या आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे.कृष्णा नदीची पाणी पातळी सांगलीच्या आयर्विन पूल येथे साडेअठरा फुटांवर पोहचली आहे,तर चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन धरण ८२ टक्के भरले आहे,त्यामुळे धरणातून साडेचार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, परिणामी वारणा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढत झाली आहे त्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीने वाढल्या वाढवताना पाहायला मिळत आहे, याचाच आढावा घेतला आहे आमची सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी..
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
वाठोडा पोलीस स्टेशनचे संग्रहित shots पाठवले आहे
----
नागपूर
*पत्नीने प्रियकराच्या सहाय्याने पतीला संपविल असल्याची घटना वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे ...
पती अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं खून केल्याच समोर आले....
*पत्नीने पतीच्या हत्येला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला... मात्र पोस्टमॉर्टम अहवालातून ती हत्या असल्याचं आलं समोर.*
38 वर्षीय चंद्रसेन रामटेके असे मृताचे नाव आहे.
30 वर्षीय दिशा रामटेके ही पत्नी असून चंद्रसेन यांच्याशी तिचे तेरा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांगवायू गेल्यानं तेव्हा पासून तो घरीच राहत होता...
दिशा रामटेके खर्च भागविण्यासाठी पाण्याची कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती....
काही महिन्यांपूर्वी तिची आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला या दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चरचे काम करणाऱ्या व्यक्तीशी असलेली ओळख प्रेम संबंधात पडली...
*दिशांचे पती चंद्रसेन 4 जुलै रोजी घरी निपचित पडलेले दिसले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोस्टमॉर्टम अहवालात गळा, नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने तपासाची दिशा बदलली.*
पोलिसांनी शासकीय रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम कक्षाजवळ दिशाला बोलवून तीची चौकशी केल्यावर तिने हत्येची कबुली दिली.
*अनैतिक संबंधांची चंद्रसेन याला माहिती मिळाली होती... आणि त्यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे त्याला संपविण्याचा प्लॅन आखण्यात आल्याच तपासात समोर आल...*
*दोघांनी चंद्रसेन याचा गळा आवळला आणि नाका तोंडावर दाबून धरली. श्वास गुदमरून तडफडून चंद्रसेन याचा मृत्यू झाल्याच तपासात समोर आलं..*
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
anchor : मुंबई मनपाच्या घाटकोपर येथील टिळक मार्ग शाळेच्या नव्या इमारती मध्ये पालक आणि विद्यार्थी स्वतः बेंच घेऊन घुसले आहेत. मुंबई मनपाने गेले तीन वर्ष या शाळेच्या नव्या इमारतीचे काम सुरू ठेवले आहे. यामुळे जुन्या जागेत अतिशय धोकादायक ठिकाणी साडे तीनशे विद्यार्थी शिकत आहेत. मात्र अचानक पालिका प्रशासनांने सदर जागा धोकादायक आहे सर्व विद्यार्थ्यांना दीड ते दोन किमी लांब शाळेत स्थलांतरित करणार असल्याचे पालकांना सांगितले. मात्र बाजूचीच नवी इमारत जवळजवळ तयार आहे तर यात का शाळा सुरू होत नाही असा सवाल करीत या नव्या इमारतीत घुसले आहेत. स्वतः पालक आणि विद्यार्थ्यांनी बाजूच्या जुन्या शाळेतील बेंच आणि वस्तू या नव्या इमारती मध्ये आणल्या आहेत. आणि इथेच पालक आणि विद्यार्थी ठाण मारून बसले आहेत.याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी
Wkt with teachers and parents
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
07072025
slug - PPR_SUICIDE
feed on 2c
file 01
---
Anchor - पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या, घरगुती वादातून महिलेने उचलले टोकाचे पाऊल, पतीला कळताच पतीनेही घेतला गळफास
कासेगाव येथील आसबे कुटुंबातील मोनाली आसबे यांनी लहान मुले ऐश्वर्या आणि कार्तिक यांना सोबत घेऊन घरगुती वादातून विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. ही बाब पती ममाजी याला कळताच त्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी आसबे कुटुंबाचा असा शेवट झाल्याने कासेगावात हळहळ व्यक्त होत आहे.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0707ZT_JALNA_UBT_ANDOLAN(10 FILES)
जालना | महापालिकेत नागरी समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं 'आंखे तो खोलो स्वामी आंदोलन'
महापालिका आयुक्तांना स्क्रिनवर दाखवल्या 'झी-२४ तास' ने शहरातील समस्यांबाबत दाखवलेल्या बातम्यांचे व्हिडीओ
अँकर | 'झी-२४ तास' नं जालना शहरातील नागरी समस्यांबाबत दाखवलेल्या बातम्या महानगरपालिका आयुक्तांना त्यांच्या दालनातील स्क्रिनवर दाखवून उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जालना महापालिका आयुक्तांच्या दालनात 'आँखे तो खोलो स्वामी"आंदोलन केलंय.
शहरातील मोकाट जनावरांना आवर घालावा,रस्त्यांची दयनीय अवस्था दूर करावी,सावरकर जलतरण तलावाची दुरावस्था झाली असून तो दुरुस्त करावा,शहरातील बंद पडले ले पथदिवे सुरु करावेत या मागण्यांसाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जालना महानगरपालिकेत आँखे तो खोलो स्वामी आंदोलन करण्यात आलं.या आंदोलनादरम्यान आयुक्तांच्या दालनात जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना त्यांच्या समोर असलेल्या स्क्रिनवर शहरातील समस्यांची 'झी-२४ तास' नं वारंवार दाखवलेल्या बातम्यांच्या चित्रफीत दाखवल्या.या चित्रफीतीतून शहरातील समस्या मांडत उबाठा पक्षानं आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महापालिका आयुक्तांनी डोळे उघडे ठेवून नागरी समस्या सोडवण्याची मागणी केली.जर समस्या सोडवल्या नाही तर आणखी कठोर आंदोलन करण्याचा ईशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे.
बाईट : भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जालना
0
Share
Report