Back
मालेगाव मंदिरात चोरट्यांचा डल्ला! 2 किलो चांदीचा मुकुट चोरला!
Nashik, Maharashtra
nsk_rokdobatheft
feed by 2C
vidoe 5
*मालेगाव ब्रेकिंग.. विशाल मोरे*
- मालेगाव दाभाडी रोडवरील प्रसिद्ध, पुरातन रोकडोबा हनुमान मंदिरात चोरट्यांचा डल्ला..
- मागील दरवाजा तोडून शनि महाराजांच्या मूर्तीवरील चांदीचे साधारण 2 किलोचा मुकुट, बाहेरील तिजोरी, हनुमान मंदिरातील दान पेटीच चोरटे घेऊन गेले..
- मंदिराचे cctv फक्त नावालाच, cctv बंद..
- पोलिस घटनास्थळी दाखल..
- मालेगावात रोज होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..
- पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्नचिन्ह..
- पुरातन रोकडोबा हनुमान मंदिरात चोरट्यांनी तिजोरी, मुकुट चोरल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी..
- चिकट देखील बंद असल्याने मंदिर प्रशासन आणि ग्रामपंचायत दाभाडी यांच्यावर नाराजी..
- घटनास्थळी पोलिसांनी डॉग स्कॉड पाचारण केले..
- पोलिसांना चोरट्यांचे मोठे आव्हान..
- रोज मोटारसायल चोऱ्या, घरफोड्या, किडनॅपिंग, चैन स्नाचिंग घटना वाढल्या आहेत..
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn samaj kalyan av
Feed attached
ANCHOR : छत्रपती संभाजीनगर समाजकल्याण विभागाच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे या घरातील काम करण्यासाठी सक्ती करीत होत्या. एवढेच नाही तर स्वतःची आणि आईची मसाज करून घेत असल्याचे आरोप होत आहे. विशेष म्हणजे याबाबतचे व्हिडीओ देखील समोर आले आहे. याबाबत कंत्राटी महिला कामगारांनी चौकशी समितीकडे तक्रार केली होती. या तक्रारीसोबत त्यांनी पुरावे म्हणून काही व्हिडिओ आणि फोटोही दिले आहेत. ज्यात वसतिगृहासाठी कामगार म्हणून नियुक्ती असताना सोनकवडे यांच्या घरीच कामे करण्यासाठी सांगण्यात येत होते. झाडून काढणे, फरशी पुसणे, भांडे घासणे, फ्रीज साफ करणे, किचन साफ करणे अशी कामे करण्यास सांगितले जात होते. एवढेच नाही तर स्वतःची आणि आईची मसाजही करावयास लावली जात होती असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या तक्रारींची दखल घेऊन शासनाने त्यांची बदली जातपडताळणी समितीचे उपायुक्त म्हणून केली आहे.
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड : भाटुंबाच्या माळरानात माणूस बनला बैल... शेतकऱ्याची कहाणी अंगावर शहारे आणणारी!
Anc: शेतकऱ्याचं दुःख पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आणणारं ठरतंय... केज तालुक्यातील भाटुंबा गावातील अल्पभूधारक शेतकरी नामदेव मोरे यांनी बैलजोडी नसल्यामुळे आपल्या खांद्यावर जु घेत थेट शेतात उतरून कोळपणी केली. त्यांच्या या संघर्षात पत्नीही खांद्याला खांदा लावून मदत करताना दिसतेय. हालाखीची परिस्थिती, निसर्गाचा लहरीपणा आणि व्यवस्थेचा पाठिंबा नाही, तरीही शेतकरी आपल्या मातीतून पिकं उगवण्याची आस सोडत नाही... लातूरच्या घटनेनंतर आता केजचा व्हिडिओ समाजाला अंतर्मुख करणारा ठरतोय.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
anchor - यंदा सातपुड्यात पाऊसाने आरोग्य विभागाची लक्तर वेशीला तंगली आहेत. बांबूच्या जोळीतून एका गर्भवती महिलेची सात किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ आली. गावापर्यंत कुठल्याही वाहन किंवा रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने बांबू झोळीतून यां महिलेला रुग्णालयात पोचवलं गेलं. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरीनमाळपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपुर येथे नेण्यासाठी तब्बल 7 किलोमीटरचे अंतर झोळी करून आणि पायपीट करत पार करावे लागले. रस्ता नसल्यामुळे आणि कोणतीही वाहन व्यवस्था उपलब्ध नसल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली. पावसाळ्याच्या तोंडावर दुर्गम भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका तर दूरच, दुचाकीचीही ने-आण शक्य होत नाही. त्यामुळे आपत्कालीन वेळी ग्रामस्थ, महिलावर्ग आणि आशा कार्यकर्त्यांना मिळून रुग्ण झोळीत ठेवून पायवाटेने रुग्णालय गाठावे लागले. ही घटना या भागात नित्याची आहे. बुरीनमाळपाडा आणि आसपासच्या वाड्यांना आजही मूलभूत सुविधा नसल्याचे यावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ शहरात भूमिगत गटार योजनेच्या कमांमुळे रस्ते चिखलमय झाले असून या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले आहे, याकडे जीवन प्राधिकरण चे दुर्लक्ष असल्याने काँग्रेस च्या संतप्त कार्यकर्त्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालय धडक देऊन कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अनिल देशमुख यांनी भूमिगत गटार योजनेचे ठेकेदार आणि जीवन प्राधिकरण चे अधिकारी कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याने नागरिकांचा जीव खराब रस्त्यामुळे धोक्यात आला असल्याचा आरोप केला. यावेळी चार दिवसात रस्ते दुरुस्त करून देऊ असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिले.
बाईट : अनिल देशमुख : शहराध्यक्ष काँग्रेस
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड: खासगी सावकाराकडून कर्जदाराला पत्नीची मागणी; हतबल आणि त्रस्त झालेल्या कर्जदाराने आयुष्य संपवलं..!!
Anc : बीडच्या सावकारकीने एक बाप हिरावून नेला... एक पती गमावला... आणि एका कुटुंबावर काळाचं सावट ओढवलं...‘पैसे नाहीत? मग तुझी बायको माझ्या घरी सोड’ — हे विकृत वाक्य आज एका कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेलंय. सात जणांच्या सावकारी त्रासाला कंटाळून राम फटाले यांनी चौकटीला दोरी बांधली… आणि गळफास घेवून जीव दिला. पाहुयात बीडच्या सावकारकीचा समाजात दडलेला काळाकुट्ट चेहरा...!!!
Vo 1 -------
Opening byte दिलीप फटाले, वडील...
अश्रूंनी डोळे नाही, तर काळीज ओलं झालंय... धाय मोकलून रडणारे हे आहेत पीडित राम फटाले यांचे वडील दिलीप फटाले. त्यांचा हा थरथरता आवाज, आणि डोळ्यांमधून निघणारा हुंदका – कोणाचंही मन हेलावून टाकतो. कारण, त्यांचा मुलगा राम... आज या जगात नाही. फक्त एवढंच कारण तो सावकाराच्या व्याजाने गळ्यात दोरी घालून गेला... "पैसे नाही देत? मग तुझी बायको माझ्याकडे सोड!" अशी विकृत, अपमानास्पद धमकी दिली होती त्याला. आणि तीही कोणी साधासुधा नव्हे, तर भाजपचा पदाधिकारी डॉ.लक्ष्मण जाधव. हो याच सावकाराच्या विकृत बोलण्यातून एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. घरातील कर्ता पुरुष या कुटुंबांनी कायमचा गमावला..
सात वर्षांपूर्वी घेतलेलं कर्ज होतं फक्त 2 लाख 55 हजार... पण महिन्याला 25 हजार व्याज. सात वर्षांत साडेसात लाख रुपये फेडूनही मुद्दल तशीच... मागे फक्त अपमान, छळ आणि अपकीर्ती. एक दिवस, घरात बसलेली पत्नी ती धमकी कानावर घेताना ढासळली... आणि दुसऱ्या दिवशी, रामने घराच्या चौकटीला दोरी बांधून, अखेरचा श्वास घेतला. आज त्याच्या वडिलांच्या डोळ्यात फक्त अश्रू नाहीत... तर जीवन कसे जगायचे हा प्रश्न उरला आहे
बाईट : दिलीप फटाले, मयताचे वडील
Vo 2 :
एक नवरा होता... दोन लहान मुलं होती... आणि त्यांचं छोटंसं घर होतं..हसतं, खेळतं, स्वप्नांनी भरलेलं… पण एक सावकारकीचा जीवघेणा फास आल्यानं, ते घर आता काळ्या कपड्यांनी झाकलेलं आहे. रामा फटाले जो आपल्या कुटुंबासाठी लढत होता, तो आता या जगात उरला नाही. कारण, एका लक्ष्मण नावाच्या सावकारानं त्याला मनानं तोडलं… आत्म्यापर्यंत जखमी केलं. रोज धमक्या, अपमान, "बायकोला माझ्याकडे सोड" अशा अमानवी वाक्यांनी तो घुसमटला… आणि जेव्हा हातात काही उरलं नाही, तेव्हा गळ्यात दोरी घेतली. फक्त लक्ष्मण जाधव नव्हे, तर सहा सावकार सगळेच त्याचं रक्त चोखत होते. रामा ला इतकं छळण्यात आलं की, त्यांनी आत्महत्येच्या आधी चिठ्ठीत सगळ्यांची नावं लिहूनच गेले. आता या सगळ्या नराधमांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र याचा तपास पोलिसांकडे नकोय तर सीआयडीने करावा अशी मागणी रामाच्या वृद्ध आईने केली आहे..
बाईट : विमल फटाले, मयताची आई
Vo 3....
बीडमधील खंडणी, खून आणि दरोड्याच्या घटनांनंतर आता सावकारीचा सावट पुन्हा डोकं वर काढताना दिसतंय. शेकडा दहा ते तीस रुपये व्याजदराने बीडमधील नागरिकांची कंबरडे मोडली आहेत. अडचणीत सापडलेले व्यापारी कर्ज घेतात, पण परतफेडीच्या नाहक दबावामुळे अनेकांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागतो.
अशाच एका प्रकरणानंतर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला. तिघांना अटक केली आहे. अटकेतील प्रमुख आरोपी म्हणजे भाजपचा पदाधिकारी डॉ. लक्ष्मण जाधव, त्याची पत्नी वर्षा जाधव आणि आणखी एक साथीदार आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलं आहे.
बाईट : अशोक मोदीराज,पोलीस निरीक्षक बीड
------
Vo 4...
बीड जिल्ह्यातील सावकारीचा बळी हा पहिलाच नाही… याआधीही अनेकांनी खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून जीव दिलाय. बीड शहरात शेकडो अवैध सावकार बिनधास्तपणे व्यवहार करतायत. विशेषतः सर्वाधिक सावकार हे पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय आहेत. त्यामुळे या सावकारांवर फक्त गुन्हे नाही, तर थेट मोकासारख्या कायद्यांतर्गत कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
बाईट : तत्त्वशील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
End vo -----
घडलेल्या या सगळ्या प्रकरणानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत ते म्हणजे बीडच्या ‘दबंग’ पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे....
शब्दांनी नाही, तर कृतीतून आणि धाडसातून विश्वास निर्माण करणाऱ्या या पोलीस अधीक्षकांपुढे आज बीड जिल्ह्यात पसरलेल्या सावकारीच्या दलदलीला कायम उखडून टाकण्याचं आव्हान आहे.
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ दलित महासंघाचा महापालिकेवर ढकल गाडा मोर्चा.
अंक - सांगली महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात दलित महासंघाच्यावतीने महापालिकेवर ढकलगाडा मोर्चा काढण्यात आला.महापालिकेच्या आयुक्त सत्यम गांधींच्याकडून शहरातल्या हातगाडी- फेरीवाल्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे,मात्र याला दलित महासंघाने विरोध दर्शवला आहे,केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फेरीवाले धोरण अंतर्गत हातगाडी फेरीवाल्यांना संरक्षण देण्याची भूमिका असताना आयुक्त गांधींच्याकडून मात्र केंद्राच्या आणि न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली करण्यात येत असल्याचा आरोप करत महापालिका कार्यालयावर ढकलगाडा मोर्चा काढत कारवाईचा निषेध नोंदवला आहे,महापालिका कडून कारवाई सुरूच राहिल्यास आयुक्तांना कोंडून घालू,असा इशारा यावेळी दलित महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.
बाईट - उत्तम मोहिते - अध्यक्ष,दलित महासंघ .
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0707ZT_WSM_FARMERS_BANK_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिमच्या रिठद परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली अनुदान रक्कम बँक ऑफ महाराष्ट्रने होल्ड केल्याने शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बँकेसमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आलं. 'आधी कर्ज भरा, मगच पैसे काढा' या अटीला विरोध करत शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.पोलिस मध्यस्थीनंतर बँकेने होल्ड हटवून शेतकऱ्यांना रक्कम देण्यास सुरुवात केली.बँक मॅनेजरने यापुढे कोणत्याही खात्यावर होल्ड न लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं असल्याचे आंदोलकांनी सांगितले
बाईट:सतीश इडोळे,आंदोलन शेतकरी
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - आजच्या राज्यकर्त्यांना शाहू , फुले आंबेडकर यांच्याबाबत आस्था किती ? ...... शरद पवारांनी व्यक्त केली शंका ..... महाराष्ट्राचे चित्र बदलावे लागेल ...... डाव्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज .........
अँकर - महाराष्ट्राचे चित्र बदलावे लागेल महाराष्ट्र पुन्हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य आणावे लागेल आज ज्यांच्या हातात महाराष्ट्राची सुत्र आहेत त्यांना शाहू ,फुले ,आंबेडकर यांच्या विचारांची किती आस्था आहे याच्या बाबतची शंका वाटते अशी टिका शरद पवार यांनी राज्य सरकार वरती केली. डाव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत रिपब्लिकन पक्ष देखील एकत्र आल्यास राज्यात बदल होऊ शकतो असे सुतोवाच त्यांनी केले अलिबाग येथे शेकाप नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
साऊंड बाईट - शरद पवार
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आणि गुंतवणुकीवर भरघोस मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून "ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी"ने शिर्डीसह अनेक जिल्ह्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल 300 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.. याप्रकरणी मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला शहादा येथे अटक झाली असून त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि राहाता येथे देखील गुन्हे दाखल झाले आहेत.. शिर्डीत साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांसह इतरांची 1 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलं असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे..
V/O - पैसे दुप्पट होण्याच्या आमिषामुळे अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांची जवळपास 300 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलंय.. भूपेंद्र सावळे या ठगसेनाने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने हा सगळा महाघोटाळा केलाय.. शेकडो लोकांची फसवणूक करून फरार झालेल्या भूपेंद्र सावळे याला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी परराज्यातून ताब्यात घेतले आहे.. शिर्डीत देखील या महाठगाने अनेकांना वर्षभरात दुपट्ट पैसे आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक केली आहे.. शिर्डी आणि परिसरातील 21 गुंतवणूकदारांनी आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे, वडील राजाराम भटू साळवे या बापलेकासह पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.. 21 गुंतवणुकदारांची 1 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे..
Byte - शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी
V/O - या फसवणुकीत अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्याची पुंजी , काहींनी सेवानिवृत्तीची रक्कम, तर साई संस्थानच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कर्मचारी सोसायटीतून कर्ज काढून पैसे गुंतवले होते.. मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे याने अत्यंत चलाखीने गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. "गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळायला अडचण येईल" असे खोटे सांगून त्याने गुंतवणूकदारांना फेब्रुवारी ते जून या काळात तक्रार करण्यापासून रोखले आणि याच काळात मोठ्या रकमेची विल्हेवाट लावली.. मात्र आता त्याचे पितळ उघडे पडले आहे..भूपेंद्र सावळे याने आपला साखरपुडा करत त्या साखरपुड्यात लाखों रुपयांचा खर्च केल्याचं व्हिडिओ मध्ये समोर येत आहे.आपल्या कष्टाचे पैसे परत मिळतील या आशेवर गुंतवणूकदारांचे लक्ष पोलिस तपासाकडे लागले आहे.. भूपेंद्र सावळे आणि त्याच्या साथीदारांनी आणखी कुणाची फसवणूक केली असल्यास नागरिकांनी स्वतः पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार करावी आणि अशा आमिषांना बळी पडू नये असे आवाहन शिर्डी पोलिसांनी केले आहे..
Byte - शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी
प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0707ZT_JALNA_FARMER(10 FILES)
जालना |जालना-नांदेड समृद्धी बाधीत शेतकऱ्यांचं कोरड्या विहिरीत बसून आंदोलन
मुल्यांकनाच्या पाच पट मावेजा देण्याची मागणी
देवमूर्ती येथे मागच्या दोन महिन्यांपासून सुरु आहे धरणे आंदोलन
अँकर | जालन्यात नांदेड-जालना समृद्धी बाधीत शेतकऱ्यांनी कोरड्या विहिरीत बसून आंदोलन केलंय.. जालना ते नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला मुल्यांकनाच्या पाच पट मावेजा देण्यात यावा. या मागणीसाठी देवमूर्ती येथे मागच्या दोन महिन्यांपासून समृद्धी बाधीत शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप या आंदोलनाची कोणतीही दखल सरकारने घेतलेली नाही. त्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी आज कोरड्या विहिरीत बसून सरकारचा निषेध केलाय.जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत जमीन संपादित करू देणार नसून हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे.
बाईट- दिलीप राठी, आंदोलक शेतकरी
0
Share
Report