Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

जायकवाडी धरणात ७५.६६% साठा: पाण्याची समस्या मिटली!

VKVISHAL KAROLE
Jul 14, 2025 02:33:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn jayakwadi av Feed attached गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जायकवाडीत ७५.६६ टक्के साठा झाला आहे. सध्या धरणात ९,४८२ क्युसेकने आवक होत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांतील पावणेदोन लाख हेक्टर सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. सोबतच छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातील  शहरांची दोन वर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे, जायकवाडीच्या वरील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात, गेल्या १५ दिवसांपासून पाण्याची आवक वाढली आहे. १८ दिवसांतच धरणाचा साठा २९ वरून ७५ टक्क्यांवर गेला. म्हणजे साठा १८ दिवसांतच ४६ टक्क्यांनी वाढला. मागील वर्षी याच दिवशी धरणात केवळ ४ टक्के पाणीसाठा होता. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात पाण्याची परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र, नाशिक, नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीचा साठा झपाट्याने वाढला. ८ दिवस धरणात आवक सुरू राहिली तर जुलैमध्ये पाणी सोडावे लागेल...
8
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top