Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

मनमाडमध्ये ७ कोटींची फसवणूक: कापूस गाठींचा धक्कादायक उघड!

YKYOGESH KHARE
Jul 11, 2025 05:06:32
Nashik, Maharashtra
nsk_vakharissue.feed by 2C vidoe 5 Breaking... विशाल मोरे, मनमाड ( नाशिक )* - ... Anc: नाशिकच्या मनमाड वखार महामंडळाच्या येथील गुदामात साठ्यात असलेल्या व कर्जापोटी श्रीरामपूर येथील अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडे तारण ठेवलेल्या कापूस गाठींची परस्पर विक्री करीत तब्बल सात कोटी ४४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या साठा अधीक्षकासह सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा मनमाड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.. वखार महामंडळाच्या गोदामातून तारण ठेवलेल्या तब्बल 2650 कापसाच्या गाठी गायब झाल्या असून "या घटनेची चौकशी सुरू असतानाच पानेवाडी आणि धोटाणे शिवारात मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठी सापडल्या. गाठी अलीकडेच त्या भागात टाकण्यात आल्या की त्या पूर्वीपासून तिथेच होत्या, याचा तपास सुरु आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब का आली नाही, हाही तपासाचा भाग ठरतोय. "या गाठी कुठून आणल्या गेल्या, त्यांची मूळ मालकी कोणाची होती, यासह फसवणुकीसाठी वापरण्यात आलेली बनावट कागदपत्रं तपासली जात आहेत. दरम्यान अण्णासाहेब कचरू री जाधव (वय ५६, रा. श्रीरामपूर) हे अंबिका महिला पतसंस्थेचे व्यवस्थापक यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. "७ कोटी ४४ लाख रुपयांची ही फसवणूक, त्यामागील साखळी आणि शासकीय यंत्रणेतील सहभागाचा संशय यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. पोलिसांची पुढील कारवाई आणि तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे."
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top