Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

धरणातून 45,548 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, तरुणाचा जीव वाचला!

GDGAJANAN DESHMUKH
Aug 18, 2025 10:02:03
Parbhani, Maharashtra
अँकर_ सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेने भरल असून धरणाच्या 12 दरवाजातून 45 हजार 548 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे,ज्या पूर्णा नदीपात्रात पाण्याचा इतका मोठा विसर्ग सुरू आहे, धरणातून पाणी कसे सोडले हे बघण्यासाठी आलेला तरुण दुपारच्या सुमारास तोल जाऊन धरण परिसरातील पूर्णा नदी पात्रात कोसळल्याची घटना घडलीय. पोहन येत असल्याने सदर तरुण पोहून पाण्याबाहेर पडला आहे. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Aug 18, 2025 12:01:44
Washim, Maharashtra:
वाशिम: File:1808ZT_WSM_AGRI_MINISTER रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून गेल्या चाळीस वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून यामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. या पावसात अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. असल्याची माहिती कृषी मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तर पंचनामे करून तत्काळ मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घाबरून जाण्याचं कारण नाही शासन प्रशासन नागरिकांच्या सोबत असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेही लक्ष वाशिम जिल्ह्याकडे असल्याचेही मंत्री भरणे यांनी सांगितले. बाईट: दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री तथा पालकमंत्री वाशिम जिल्हा
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 18, 2025 11:50:59
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- आमदार जगताप ऑन संग्राम भंडारे कीर्तनात हल्ला फीड 2C Anc:- हिंदुत्ववादी कीर्तनकार हभप संग्रामबापू भंडारे यांच्यावर संगमनेर येथे झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी निषेध केलाय...ही घटना संगमनेर येथे घडल्याने यामध्ये राजकीय वास येत असल्याचा आरोप जगताप यांनी केलाय...घटनेच्या एक दिवस सोशल मीडियावर काही पोस्ट फिरत होत्या ज्यात असा हल्ला करणार असल्याचा उल्लेख असल्याची चर्चा सुरू होती असं जगताप यांनी म्हंटलंय...सोबतच या प्रकरणाचा पोलीस प्रशासनाने सखोल तपास करायला हवा, संग्राम बापू यांच्याबाबत घडलेला प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हंटलंय. बाईट:- संग्राम जगताप, आमदार राष्ट्रवादी (AP)
4
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 18, 2025 11:47:58
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- आमदार जगताप ऑन मुस्लिम मोर्चा फीड 2C Anc:- अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे गोवंश हत्या बंदी कायदा सुधारणा व्हावी आणि संघटनांकडून होणाऱ्या त्रासाविरुद्ध मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता, यावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी निशाणा साधला आहे. तुम्हाला भारतात राहायचं असेल तर भारताचा कायदा पाळावा लागेल असं संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. जर कोणी गोवंश हत्या विरोधात कायदा पाळत नसेल तर तुम्ही स्वतः फिर्याद द्यावी अस देखील त्यांनी म्हटलंय. तसेच आमचा कुठलाही गोरक्षक गैर कृत्य करत नाही पोलिसांना मदत करतात. मात्र वारंवार गो हत्या करत असेल तर त्याच्यावर मोकोका सारखे कलम लावून कारवाई करावी, आम्ही तर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करणार असल्याच संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. बाईट:- संग्राम जगताप, राष्ट्रवादी AP
8
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 18, 2025 11:35:10
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- मुस्लिम मोर्चा फीड 2C Anc:- अहिल्यानगर शहरात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता.. खाटीक समाजाचे प्रश्न तसेच जळगाव येथील सुलेमान पठाण हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.. खाटीक समाजावर काही विशिष्ट संघटनांकडून होणाऱ्या अन्यायाला आळा घालावा, गोवंश हत्या बंदी कायद्यात तातडीने सुधारणा करावी या प्रमुख मागणी सह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज मोर्चात सहभागी झाला होता. शहरातील आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरवात झाली होती. तसेच गोवंश हत्या कायद्यानुसार देशी गायी वगळता इतर जनावरांच्या कत्तलीला सूट द्यावी तसेच जनावरांच्या वाहतुकीदरम्यान पोलिस संरक्षण उपलब्ध करून द्यावे. एवढेच नव्हे तर महापालिकेने पारित केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करून शहरात मान्यता प्राप्त कत्तलखाने सुरू करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, तर मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे समाजाच्या वतीने सांगण्यात आले. बाईट:- मुजाहिद कुरेशी, व्यापारी
8
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 18, 2025 11:34:49
Akola, Maharashtra:
Anchor : आज सारं अकोला शहर 'हर-हर महादेव', ,बम-बम भोले'च्याच्या गजराने दुमदुमून गेलं होतंय.निमित्त होतंय स्वातंत्रपूर्व काळाची पार्श्वभूमी असलेल्या देशातील अकोल्याच्या प्रसिद्ध कावड यात्रेचे... 81 वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी असतेय. अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राज राजेश्वराला 17 कि.मी. अंतरावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीच्या पाण्याचा जलाभिषेक केला जातोय....अकोलेकरांचा सर्वात मोठा सोहळा असणाऱ्या या महोत्सवाला सर्व-धर्म समभावाची किनार लाभली आहेय. Vo 1 : आज संपूर्ण अकोला शहर एका वेगळ्या आनंद आणि उत्साहात न्हाऊन निघालं होतंय....संपूर्ण भारतात आपल्या वेगळ्या वैशिष्टांनी प्रसिद्ध असलेली अकोल्याची कावड यात्रा आज संपन्न झालीय. स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात असतांना शहरात या नवीन परंपरेचा जन्म झालाय...श्रावण महिन्याचा शेवटच्या सोमवारी या कावड यात्रेचा उत्सव आणि प्रसिद्ध कावड यात्रेचा असतोय..या कावडयात्रेची सुरुवात होण्याची गोष्टही तेवढीच रोचक आहेय.1944 च्या सुमारास स्वतंत्र चळवळ भरात असतांना अकोला शहराला भीषण पाणी टंचाईला समोर जाव लागलं होतं. यावेळी काही युवकांनी पुढाकार घेवून अकोल्याचे ग्रामदैवत राजेश्वराला जलाभिषेकाचा संकल्प केला होताय..यासाठी 17 कि.मी.अंतरावरील गांधीग्रामहून पुर्णा नदीचे जल आणून राजेश्वराला अभिषेक करण्यात आला आणि अकोल्यात पाऊस पडला, अशी आख्यायिका आहेय..तेंव्हापासून या कावडयात्रेची परंपरा सुरु झालीय.राजेश्वरभक्त जलाभिषेक करून त्याच्याकडे उत्कर्षासाठी साकडं घालतात... यात्रेत विविध देखावे ही सदर केल्या जातात... या कावड यात्रेत सर्वधर्मीय लोक उत्साहाने सहभागी होतात.ही यात्रा पाहण्या साठी इतर जिल्ह्यासह राज्यातील शिव भक्त ही यात्रा पाहण्या साठी इथे येतात...त्यामुळे या यात्रेत अनेक मनोरंजनासाठी खेळ लावण्यात येतात ..तर भाविक दुरून हि यात्रा पाहण्यासाठी येथे येतात..या वर्षी या यात्रेत मोठे - लहान कावड सुमारे 200 वर आहेत तर लहान मोठे 150 वर पालखीनचा समावेश आहे... Byte : अक्षय देशमुख, भाविक
4
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 18, 2025 11:34:40
Jalna, Maharashtra:
FEED NAME :1808ZT_JALNA_EMPLOYEE(15 FILES) जालना :महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात कर्मचारी आक्रमक,हकालपट्टी करण्याची मागणी, मानसिक त्रासाबरोबरच कार्यालयीन कामकाज वेळेत करत नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप,कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन सुरु अँकर : जालन्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता ए.एम.चव्हाण यांच्या विरोधात जीवन प्राधिकरणाचे कार्यालयातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कार्यकारी अभियंता मानसिक त्रास देतात तसेच कार्यालयीन कामकाज वेळेत करत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.त्यामुळे जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.तसेच कार्यकारी अभियंत्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलनाचा ईशारा दिला आहे. बाईट :कर्मचारी
2
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 18, 2025 11:33:57
Yavatmal, Maharashtra:
AVB हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ४६ व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे राज्यातील प्रयोगशील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठान च्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. पुसदच्या माळ पठारावरील दुष्काळग्रस्त चाळीस गावांना पाण्याची उपलब्धता निर्माण करून तेथील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करू असे वचन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले. बाईट : संजय राठोड : पालकमंत्री
5
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 18, 2025 11:33:33
Ambernath, Maharashtra:
बदलापूर पालिकेची प्रभाग रचना जाहीर 24 पॅनेलच्या द्विसदस्यीय पद्धतीने होणार निवडणूक File name - bdl ward Anchor : बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज जाहीर झाला आहे. यामध्ये एकूण 24 पॅनेलच्या द्विसदस्यीय पद्धतीने आगामी 49 प्रभागांसाठी ही निवडणुका होणार आहेत.  Vo : बदलापूर नगरपालिकेची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली असून कोरोनामुळे निवडणुका होऊ न शकल्यानं गेल्या 5 वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. यात बदलापूरमध्ये 49 प्रभाग तयार करण्यात आले असून 24 पॅनेलच्या माध्यमातून द्विसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 23 पॅनल हे 2 सदस्यांचे, तर एक पॅनल हा तीन सदस्यांचा असेल. या प्रारूप प्रभाग रचनेवर येत्या 31 ऑगस्ट पर्यत पालिकेत हरकती आणि सूचना नोंदवता येणार असून त्यावर सुनावणी होऊन त्यानंतर अंतिम आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे.  चंद्रशेखर भूयार ( बदलापूर)
3
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 18, 2025 11:22:17
Jalna, Maharashtra:
FEED NAME :1808ZT_JALNA_CROP_LOSS(5 FILES) जालना : बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार परीसरात शेतीचं मोठं नुकसान पावसामुळे पिकं वाहून जाऊन नुकसान पंचनामे करण्याची मागणी अँकर : जालन्यातील बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार परीसरात देखील ढगफुटी सदृष्य पावसानं हजेरी लावलीय.या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.ओढ्याला आणि नदीला आलेल्या पुरामुळे कपाशी,सोयाबीन पिकं वाहून गेली असून जमीन देखील खरडली आहे.तर पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं पिकं देखील सडण्याची शक्यता आहे.या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
12
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 18, 2025 11:19:13
Nagpur, Maharashtra:
Ngp Bawankule Byte live u ने फीड पाठवले ------------- नागपूर चंद्रशेखर बावनकुळे On पाऊस नुकसान भरपाई मुख्यमंत्री आणि मी सुद्धा प्रत्येक नुकसानाचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले.. पुढचे तीन दिवस काही भागात रेड अलर्ट असल्याने सर्व विभाग सतर्क रहावे आणि आवश्यकता असेल तिथे शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले.. जी काही नुकसान भरपाई असेल ती जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन खात्यातून देण्याच्या सूचना दिल्यात.. शेतकऱ्याचे पंचनामे जसे जसे येतील त्यानुसार भरपाई देणार.. मुंबईत पालिका आणि आमचं सरकार अलर्ट आहे, जनतेला देखील अलर्ट राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे... On राहुल गांधी मतचोरी आरोप मतदार यादीत पुनर सर्वेक्षण नेहमी सुरू असतं.. त्यामुळे रोज रोज मतदान समाविष्ट होत असते ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.. मतदार यादीत कुणाचाही नाव समाविष्ट झाल त्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. मात्र त्याबद्दल निवडणूक आयोग प्रत्येक पक्षाला आक्षेप घेण्यासाठी नोटीस देतात.. या पूर्ण निवडणुकीत एक लाख बुथवर आक्षेप घ्यायचा तर पूर्वी घेतली गेली नाही... निवडणूक हरल्यावर मुर्खासारखे आठ महिन्यांनी हे आरोप करतात... जेव्हा नेतृत्व क्षमता संपते तेव्हा दुसऱ्यावर आरोप करून आपली चमडी वाचविण्याच हे प्रयत्न करत आहे.. काँग्रेस पक्षाला अजून संधी आहे, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आक्षेप घ्यावं नाहीतर ही निवडणूक हरल्यावर देखील हे असेच म्हणणार.. Evm कोणाच्या काळात आलं, मनमोहन सिंग सरकारच्या काळापासून evm प्रणाली सुरू झाली.. पक्ष वाढविण्यासाठी किंवा नेतेगिरी टिकवण्यासाठी देशातील जनतेची नस ओळखावी लागते... On शालार्थ आयडी घोटाळा शिक्षक भेट.. शालार्थ आयडी प्रकरणात ज्या संस्था चालकांनी बदमाश पण केलं.. नियुक्त करण्यासाठी प्रलोभन देऊन खोट्या शालार्थ आयडी तयार करून नियुक्ती केली... शाळेत शिक्षक म्हणून लागायचं असेल तर काय स्थिती आहे हे सर्वांना माहीत आहे.. काहीजण पंचवीस ते तीस लाखाचे लोन काढले आहेत... ज्या संस्था चालकांनी बदमाशी केली त्यांच्या सर्वांच्या संपत्ती सरकारने जप्त करायला हवी.. मी शिक्षण मंत्र्यांना देखील बोलणार आणि याची सर्वाची संपती जप्त करावी.. यामध्ये या शिक्षकांचा काही दोष नाही.. यांना आधार कसा देता येईल ते बघू... बारा वर्षापासून काम करत आहे. आणि पगार चालू असताना अशा स्थितीत आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही... On विविध लोकार्पण 1200 कोटी रुपये यावेळी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात आले. त्यांचं नियोजन करण्यासाठी आज बैठक घेत आहोत... विकसित देश, विकसित महाराष्ट्र त्याप्रमाणे 2047 पर्यंत विकसित नागपुर कसा राहणार याची प्लॅनिंग आम्ही करणार... पाटणसावंगी येथे 30 खाटाच ग्रामीण रुग्णालयाच आज उद्घाटन झालं..36 प्रकाराच्या सेवा या रुग्णालयातून मिळणार...
4
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 18, 2025 11:04:39
Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका दहिवद गावाजवळ अल्पवईन मुलीवर बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि फाशी देण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चा संपल्या नंतर काही समाज कंटकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे यां मोर्च्यानंतर हिंसक वळण लागल्याने शहरात काही काल तणाव निर्माण झाला होता. शिरपूर शहरात संमाजकांटक आणि पोलिसांची झटापट झाली. पोलीस आणि काही कथित आंदोलन मध्ये बाचाबाची झाल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या झटपटीच्या घटनेमध्ये पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर चाकूने हल्ला केला करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये ते जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका 8 वर्षीय मुलीवर लैंगिक आत्याचार प्रकरणी मुक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज एकवटला होता. मोर्च्या दरम्यान महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तरुणांही मोठ्या सख्येत सहभागी होते. आंदोलनानंतर अचानक पोलिसांची काही कथित आंदोलकांची झटापट झाली. त्यानंतर पळापळ सुरु झाली. मात्र काही वेळातच पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आता शहरात तणाव निवळला असून, मोठा फौज फाटा शहरात तैनात करण्यात आला आहे. byte - जयपाल हिरे, जखमी पोलीस निरीक्षक प्रशांत परदेशी, धुळे.
12
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 18, 2025 11:04:16
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1808ZT_GAD_AMBEZARI_ST ( single file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने  प्रथमच धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम आंबेझरीसह एकूण १५ गावांसाठी बससेवेला सुरुवात,  जिल्हाभरामध्ये एकूण ५०७ मोचाईल टॉवर्सची उभारणी, एकूण ४२० कि.मी. लांचीच्या रस्त्याचे आणि ६० पुलांचे बांधकाम पूर्ण अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाच्या प्रयत्नाने धानोरा तालुक्यातील छत्तीसगड राज्य सीमेवरच्या आंबेझरी या गावापर्यंत प्रथमच एसटी बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांनी पारंपारिक वाद्य वाजवून आदिवासी नृत्य करत हा आनंद साजरा केला. शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा उंचावून हा क्षण साजरा केला. आंबेझरी गावासह या एसटी बसचा लाभ या भागातील 15 गावांना होणार आहे. जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने आतापर्यंत 507 मोबाईल टॉवरची उभारणी पूर्ण झाली असून 420 किलोमीटरचे रस्ते आणि 60 पुलांचे बांधकाम देखील पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास करावा लागतो. अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याच उपक्रमाअंतर्गत आज स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतर प्रथमच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, गडचिरोली यांच्या सहकार्याने  आंबेझरी पर्यंत बससेवा सुरु करण्यात आली. गडचिरोली-चातगाव-धानोरा-येरकड-मुरुमगाव-खेडेगाव-आंबेझरी-मंगेवाडा-जयसिंगटोला-मालेवाडा असा या बसचा प्रवास राहणार आहे. या वर्षभरातच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने गट्टा (जा.)---  गर्दैवाडा वांगेतुरी, कटेझरी ते गडचिरोली आणि मरकनार ते अहेरी रस्त्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बससेवेचा शुभारंभ करण्यात आलाय. बससेवा सुरु झाल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होऊन यामुळे गावातील नागरिकांचीही नेहमीची पायपीट वाचणार आहे. सदर मार्गावरील एस.टी बसच्या सुविधेमुळे गावकऱ्यांना वर्षभर सहज प्रवास करता येणे शक्य होईल. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
10
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 18, 2025 11:02:42
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1808ZT_INDAPURSTBUSPOLICE FILE 2 इंदापूर बसस्थानक परिसरात पोलिसांची कारवाई – पोलीस नेमप्लेट असलेल्या कारवरही दंड.. ANCHOR — पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या बेसिस्त वाहनचालकांवर इंदापूर पोलिसांनी कारवाई केलीय. बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर पोलीस नेमप्लेट असलेली कार चुकीच्या पद्धतीने उभी असल्याने बसला वळण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. त्याचवेळी घटनास्थळी दाखल झालेल्या इंदापूर वाहतूक पोलिसांनी बेफिकीर पार्किंग करणाऱ्या कारवर तात्काळ दंड आकारला. आणखी 12 गाड्यांवरही नियमभंगाबद्दल तब्बल 20 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
10
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 18, 2025 11:02:26
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI SLUG 1808ZT_DAUNDCCTV FILE 1 दौंड तालुक्यातील दहिटणे गावात बिबट्याचा वावर....मुक्त संचार झाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद Anchor _ दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याची दहशत असल्याचे चित्र आहे.अशातच आता पुन्हा एकदा दौंड तालुक्यातील दहिटणे गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेच वातावरण असून वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जातेय.
11
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 18, 2025 10:47:38
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1808ZT_INDAPURCRIME FILE 2 सोलापूर-पुणे एसटी बसमध्ये महिला प्रवाशाची पर्सची चोरी… ३.३० लाखांचा ऐवज लंपास... ANCHOR — सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये महिला प्रवाशाची पर्स चोरून तब्बल तीन लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावाजवळ ही घटना घडली. राजेश्री हुल्ले यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गंठन, लॉकेट, अंगठ्या, ब्रेसलेट आणि रोख अशी मौल्यवान वस्तू चोरीस गेली आहे. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सचिन बोराडे पुढील तपास करत आहेत.
10
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top