Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'सातबारा कोरा' पदयात्रा सुरू!

GMGANESH MOHALE
Jul 08, 2025 05:02:36
Washim, Maharashtra
वाशिम: File:0807ZT_WSM_KADU_YATRA रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर: स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव असलेल्या, जिल्ह्यातील पापळ गाव येथून ‘सातबारा कोरा’ पदयात्रेला काल, 7 जुलैपासून सुरुवात झाली.ही यात्रा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आली आहे.सात दिवसांची ही पदयात्रा काल 23 किलोमीटरचा प्रवास करत वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार येथे उशिरा रात्री पोहोचली,आणि तिथे मुक्काम करण्यात आला.आज सकाळी यात्रेचा पुढील टप्प्यासाठी मार्गक्रमण सुरू झाले आहे.सरकारला सत्तेवर येऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे, मात्र निवडणुकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही,‘सातबारा कोरा होईपर्यंत लढा सुरूच राहणार’, असा निर्धार बच्चू कडू व्यक्त केला आहे. तसेच, जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top