Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाल में सर्दी-खांसी की दवा से बच्चों की मौत, FDA ने दवा बिक्री रोक दी

SRSHRIKANT RAUT
Oct 13, 2025 09:47:23
Yavatmal, Maharashtra
मध्य प्रदेश मध्ये कफ सिरप मुळे लहान मुलांच्या मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ मध्येही एका लहान मुलाचा मृत्यू सर्दी-खोकल्याच्या औषध सुरु असताना झाल्याने खळबळ उडाली आहे. एफडीए ने रुग्णालयाच्या मेडिकल मधून औषधीचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून खबरदारीचा उपाय म्हणून या औषधांची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. या औषधी मुळे शिवम ला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. बाळाचा व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला, तर इतर अवयव हिट्रॉपॅथालॉजीकडे तपासणीला दिले आहे. आरोग्य विभागाचे पथकही शिवमच्या घरी पोहोचले. सर्दी-खॅंख्याची औषधी घेत असतानाच अचानक शिवम चा मृत्यू झाल्याने धक्का बसला असून तपासणीत काय खरे आहे ते समोर यावे अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Dec 07, 2025 03:50:20
Junnar, Pune, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे 1 बिबट्या आणि 3 कुत्र्यांचा एक इंटरेस्टिंग व्हिडीओ समोर आलाय. पहाटेचा हा व्हिडीओ CCTV मध्ये कैद झालाय. रात्री दीड वाजता एक बिबट्या शिकारीच्या उद्देशाने येथील शेतकरी अशोक दरेकर यांच्या बंगल्याच्या गेटवरून आत प्रवेश करत होता.. मात्र आत मध्ये असलेल्या 3 कुत्र्यांनी त्याच्यावर जोरजोराने भुंकून त्याला तिथूनच पळवून लावलं.. खरं तर एकट्या दुकट्या कुत्र्यावर झडप मारून त्याचा फडशा पाडण्याचा बिबट्याचा नेहमी प्रयत्न असतो मात्र आता या व्हिडीओत 3 कुत्र्यांच्या एकीमुळे या बिबट्याला माघारी जावे लागले..प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे....
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 07, 2025 03:31:27
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:यापुढे निवडणूक नको,जाहीर लिलाव काढून महापौर,अध्यक्ष,नगरसेवक पदी नियुक्ती करा - शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकारयाची मागणी. अँकर - राज्यात यापुढे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका घेण्याऐवजी महापौर,जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरसेवक पदांचा जाहीर लिलाव काढावा, अशी अजब मागणी सांगलीतील शिवसेना शिंदे गटाच्यावतीने करण्यात आली आहे. आष्टा नगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि वाळवा तालुका संघटक असणारे माजी नगरसेवक वीर कुदळे यांनी ही मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.तसेच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचा विधेयक मंजूर करून यापदांसाठी वंचित असणाऱ्या गुंड,गुन्हेगारांना संधी द्यावी, अशी उपहासात्मक मागणी देखील वीर कुदळे यांनी केली असून निवडणूक आयो बरोबर राष्ट्रपतींच्याकडे देखील ही मागणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केला आहे. वीर कुदळे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून आष्टा नगरपरिषदेची निवडणूक लढवली आहे,निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांकडून मतदारांना करण्यात आलेल्या पैसे वाटपावरून ही अनोखी मागणी करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. बाईट - वीर कुदळे - संघटक ,शिवसेना शिंदे पक्ष,वाळवा.
106
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 07, 2025 03:22:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर रोडवर एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव बसने रस्ता ओलंडणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि यात एका ५६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना वैजापूर तालुक्यातील क्रांती क्लबजवळ घडली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून भगवान माणिकराव सुलताने असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. धडकेनंतर सुलताने गंभीर जखमी झाले होते. उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सुलताने हे सावखेड गंगा येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. या घटनेची नोंद वैजापूर पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
60
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 07, 2025 03:19:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:टीईटीची सक्ती नको, यासह विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमधील 6272 शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन करत मोर्चा काढला होता. या आंदोलनातील शिक्षकांसह किती शाळा बंद होत्या, किती सुरु होत्या, किती शिक्षकांनी रजा घेतली होती, याचा अहवाल शिक्षण संचालकांना शिक्षण विभागाने शनिवारी सादर केला आहे. संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदच्या 1171 तर खासगीच्या 3876 शाळा बंद राहिल्याचे समोर आले आहे. तर राज्यातील 2539 शाळा बंद राहिल्या. जिल्हा परिषदसह खासगी, अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संचमान्यता विद्यार्थी डोक्यानुसार हवी. टीईटीची सक्ती नको, म्हणून संभाजीनगरमध्ये 8943 पैकी 6272 शिक्षक रजा घेत संपात सहभागी झाले होते. या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार प्रशासन कापणार आहे...
229
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 07, 2025 02:15:42
Bhandara, Maharashtra:पीएम किसान सन्मान' योजनेचे २० हजारांवर लाभार्थी 'फिल्टर'.... २० हजार लाभार्थी झाले कमी ई-केवायसी करणे आहे बंधनकारक अनंकर : पीएम किसान सन्मान योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झाला. मात्र, २० वा हप्ता दिल्यानंतर केंद्र सरकारने योजनेत अनेक निकष (फिल्टर्स) लावल्याने तसेच आधार व ई-केवायसी रखडल्याने जिल्ह्यातील २० हजार लाभार्थी या योजनेतून वगळले आहेत. बँकिंगच्या व्यवहारासाठी केवायसी आवश्यक असताना केवायसीच्या कारणामुळे पुढचा हप्ता बंद होतो. नंतर केवायसी केले तरी सुरू होत नाही. पीएम किसान सन्मानचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. प्रत्येक हप्ता जमा करताना शेतकरी संख्या कमी होत आहे. यावेळी २० हजार शेतकरी जिल्ह्यात कमी झाले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पात्र व यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. दोन हजारांनी तीन टप्प्यांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. योजनेच्या सुरुवातीला ज्याच्या नावावर सातबारा त्याच्या बँक खात्यावर पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे जमा होत होते. मात्र, नवनवे निकष लावल्याने लाभार्थी संख्या प्रत्येक हप्त्याला कमी होत आहे. यामुळेच जिल्ह्यात आता सुमारे २० हजार शेतकरी कमी करण्यात आल्याचे दिसते.
183
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 07, 2025 02:01:37
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर नगरपालिका निवडणूक निकालावरून भगीरथ भालके यांचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना आव्हान, पंढरपूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ज्याचा पराभव होईल त्याने मंगळवेढ्यात तोंड दाखवयाचे नाही. पंढरपूर नगरपालिकाची निवडणूक संपली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारांघात येणाऱ्या मंगळवेढा नगरपालिका साठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजपसाठी प्रचार सभा घेतली त्यात त्यांनी पंढरपूर मध्ये भाजपचा नगराध्यक्ष होणार ही काळया दगडावरची रेघ आहे. असे वक्तव्य केले. माध्यमांनी या निवडणुकीला हवा दिली. पण वस्तुस्थिती तशी नव्हती असे म्हणत विजयाचा दावा केला. यानंतर भगीरथ भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचार माजी आमदार परिचारक यांना थेट आव्हान दिलें आहे. 3 डिसेंबर रोजी जरी मतमोजणी झाली असती तरी पंढरपूर मध्ये डॉ प्रणिता भालके विजयी झाल्या असत्या. आता सरकार तुमचे आहे. मी सूचक म्हणून सही करतो. तीन दिवसांत मत मोजणी घ्या. पंढरपूर मध्ये भालकेच विजयी होणार. जर ते झाले नाही तर मी मंगळवेढ्यात तोंड दाखवणार नाही. तुम्ही पराभूत झाला तर तुम्ही सुद्धा तोंड दाखवायचे नाही. त्यामुळे आता परिचारक की भालके या पैकी कोणाला तोंड लपवावे लागणार हे 21 डिसेंबर रोजी कळेल. सध्या तर मतदारांची उत्सुकता आणि उमेदवारांची धाकधूक वाढली आहे साउंड बाईट भगीरथ भालके, नेते तीर्थक्षेत्र विकास आघाडी प्रशांत परिचारक माजी आमदार भाजप
107
comment0
Report
WJWalmik Joshi
Dec 06, 2025 14:48:19
Jalgaon, Maharashtra:ईव्हीएम सुरक्षा के लिए कार्यकर्ताओं का पहरा धरणगाव तहसील कार्यालय के बाहर मंडप टाककर महाविकास आघाडी के कार्यकर्ता बैठा ठाण मांडून नगरपरिषद व नगरपंचायत चुनाव का पहला टप्पा पार हो जाने के बाद ईव्हीएम मशीन सुरक्षित रखने की जिम्मेदारी पुलिस, CRPF केंद्र बल पुलिस और प्रशासन पर है. पर ईव्हीएम में गड़बड़ हो सकती है, इस डर से अनेक उम्मीदवार और विरोधी पक्ष के कार्यकर्ता धरणगाव में स्वयं पहारा दे रहे हैं. धरणगाव तहसील कार्यालय में रखी ईव्हीएम के पास कार्यकर्ताओं ने मंडप टाककर रात-दिन मुकाम किया. इस मंडप में दिन-रात्रि भोजन व शौरव आदि का पता चलते देखा गया. अत्यंत ठंड में आग जला कर टोपी शाल आदि पहने जागरण कर रहे हैं. स्थानिक प्रशासन पर विश्वास है पर निर्वाचन आयोग और सत्ता पक्ष पर विश्वास नहीं रहने के आरोप महाविकास आघाडी के कार्यकर्ताओं ने किया. यह सिर्फ चुनाव नहीं बल्कि जनता का प्रश्न है; रॉकेट नियंत्रित हो सकता है तो ईव्हीएम हैक भी हो सकता है, ऐसा दावा कार्यकर्ताओं ने कर लोकतांत्रिक व्यवस्था को बचाने के लिए सतत पहरा दे रहे हैं. हमारे प्रतिनिधि वाल्मीक जोशी ने विश्लेषण किया. बायिट_ निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष धरणगाव.
115
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 06, 2025 14:15:55
Akola, Maharashtra:राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं असलं तरी काही नगरपालिकांमध्ये मतदान प्रलंबित आहे. त्यामुळे सर्व मतदारसंघांची मतमोजणी आता थेट २१ डिसेंबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीपर्यंत ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सुमारे वीस दिवस सील अवस्थेत ठेवण्यात येणार आहे. या याच मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाकडे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.ईव्हीएम मशीनच्या चार्जिंग संदर्भात कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नाहीत, असा आरोप करत वंचितने आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. वंचितचे प्रमुख प्रश्न असे आहेत.. * मतदानाच्या दिवशी ईव्हीएममध्ये किती टक्के चार्जिंग होते? * मतदान संपल्यानंतर मशीनमधील चार्जिंग किती असते? * स्ट्रॉंग रूममध्ये २० दिवस मशीन ठेवताना त्यांचे चार्जिंग कसे व केव्हा करणार? * चार्जिंगचा रेकॉर्ड कोणत्या पद्धतीने जतन केला जाणार? या सर्व बाबींवर निवडणूक आयोगाने तत्काळ आणि स्पष्ट स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
217
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 06, 2025 14:02:07
Kalyan, Maharashtra:डोंबिवली मध्ये पुन्हा सेना-भाजपमध्ये बॅनर वॉर... डोंबिवली मध्ये बॅनर वरून पुन्हा एकदा भाजप शिवसेनेमध्ये जुंपली भाजपप्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमाच्या बॅनर वर शिवसेनेचा टीका करणारा बॅनर नक्की काढला कोणी फोडाफोडीच्या राजकारणानंतर डोंबिवली मध्ये सावळाराम क्रीडा संकुलाच्या नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच स्टेजवर येणार आहेत या करता डोंबिवलीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक घरडा सर्कल येथे कार्यक्रमांचे मुख्य प्रवेशद्वारावरच शिवसैनिक कडून लावण्यात आलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते त्या बॅनरवर लिहिला होता त्या मजकुरावरून चांगली चर्चा रंगली होती त्या बॅनरवर मजकूर होता "मतांसाठी खेळ दाखवणारे खूप पण कामाने मन जिंकणारा एकच" या मजकुरामुळे कार्यक्रमाला येणाऱ्या सर्वच शिवसेना�च्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली कारण या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एका स्टेजवर येणार होते या निमित्ताने संपूर्ण समारंभ क्डा संकुल परिसरात भाजप आणि शिवसेना यांचे झेंडे देखील लावण्यात आले आहेत... पण या बॅनरमुळे पुन्हा एकदा भाजप शिवसेना यांच्यात टीकेचे राजकारण रंगल्यांची चर्चा जोर धरू लागली तोच काही वेळात हा बॅनर काढून काढण्यात आला आणि खाली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर चषक हा बॅनर पुन्हा वर घेण्यात आला आता शिवसेनेचा हा बॅनर कोणी काढला ? ...भाजपच्या सांगण्यावरून तो काढण्यात आला का शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून हा बॅनर काढण्यात आला अशी चर्चा आता डोंबिवली मध्ये जोर धरू लागली कारण डोंबिवली मध्ये भाजपाने शिवसेनेच्या उमेदवारांना पळवले तर शिवसेनेने भाजपाचे उमेदवार फोडले यावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार राजकारण तापले होते त्यातच या बॅनर वरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत काहीच आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे
145
comment0
Report
Advertisement
Back to top