icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कांद्य के भाव गिरने से किसानों को हुए नुकसान, केंद्र-राज्य मिलकर सुधार पर जोर

Shirur, Maharashtra:दिलीप वळसे पाटील कांद्याचे भाव पडले आहेत हे खरे आहे यामुळे शेतकऱ्याच्या मोठे नुकसान होत आहे केंद्रात कांद्याच्या बाबत बैठक झाली यात महाराष्ट्रातील अनेक मंत्री होते देशात अनेक राज्यांत कांद्याचे उत्पादन घेतले जाते यावर्षी 307 लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे 46.15 टक्के उत्पादन महाराष्ट्रात झाले आहे 5157400 क्विंटल कांद्याची आवक आलेली आहे 904 इतका दर मिळाला आहे यात 900 ते 1500 प्रतिक्विंटक बाजारभाव मिळत आहे कांदा भिजल्याने त्याची गुणवत्ता घटली असून बाजारभावमध्ये घसरण झाली आहे निर्यात धोरणात सुसूत्रता पाहिजे ती होत नाही कांदा खरेदी केली जातोय त्या केंद्रातून शेतकऱ्याला थेट खात्यात पैसे जावे निर्यात शुल्क लावू नये अशी आमची केंद्र सरकार कडे मागणी केली आहे जो पर्यंत कांद्याला 45 रुपये बाजारभाव मिळत नाही तेपर्यंत श्रीलंकेच्या कांदा मिळतीच्या दुपट दराने निर्यात शुल्क आहे 68 टक्के कांदा हा महाराष्ट्रातून निर्यात झालाय केंद्र सरकारने निर्यात बाबत अनुदान 4 टाक्यापर्यंत वाढवावे अशी मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांचा कांदा थेट खरेदी करण्यात यावा कांदा खरेदीचा दर ठरविण्यासाठी जे सूत्र आहे त्यासाठी काढण्यात यावे मी माझे काम करत आहे मी स्वतःला शेतकरी पुत्र न म्हणता काम करतोय दुष्काळी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजन करणे गरजेचे आहे युद्धाचा परिणाम हा जगण्याच्या आर्थिक टंचाईवर होऊ शकतो यांची उपाययोजना राज्याने आणि केंद्राने करायला पाहिजे सरकार कडून पावले टाकण्यात येत आहेत यात काही सुधारणा करायची असेल तर माझ्यासोबत बैठक करून त्यातून मार्ग काढता येईल त्याताही मी आंदोलनाच्या ठिकाणी सुद्धा यायला तयार आहे कोणताही राजकीय स्वार्थ नाही या प्रश्नात पंतप्रधान आणि गृहमंत्री कृष्णीनंत्र अर्थमंत्री यांनी लक्ष घातले आहे ami सातत्याने याचा पाठपुरावा करत आहे मी पवार साहेबांना भेटून कल्पना देईन मार्गदर्शन घेईल सरकारी यंत्रांच्या माध्यमातून कांदा खरेदी केला गेलाय आणि त्याची व्यापाऱ्यांनी साठवणूक केली असेल यासाठी शेताऱ्यांना याचा लाभ मिळवा यासाठी आमचे प्रयत्न आहेत
0
0
Report

रायगड विधानसभा चुनाव में घमासान, थोरवे की भूमिका पर शिवसेना में बिगाड़े हालात

Chendhare, Maharashtra:रायगड ब्रेकिंग कोकण विधान परिषद निवडणुकीतील घडामोडींचे रायगडात पडसाद आमदार महेंद्र थोरवे यांच्या भूमिकेवर शिवसैनिक नाराज थोरवे यांनी अनिकेत तटकरे यांचं समर्थन केल्यानं शिवसैनिकांमध्ये रोष अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरताना आमदार थोरवे यांची उपस्थिती सुनील तटकरे यांचे कट्टर विरोधक अशी आमदार थोरवे यांची ओळख शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संदेश पाटील यांची नाराजी थोरवे यांची भूमिका निष्ठावंत कार्यकर्त्यांना न पटणारी नैतिकतेला धरून राजीनामा देत असल्याचा सोशल मीडियावर उल्लेख संदेश पाटील यांची सोशल मिडियावरील पोस्ट चर्चेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षिसे हमखास मिळतात एक म्हणजे विरोध आणि दुसरे म्हणजे टीका
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी पुलिस ने पांच महीनों में अवैध नशे के आरोपियों में 27 गिरफ्तार

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. अमली पदार्थ विरोधात कारवाईत 5 महिन्यात 27 जणांना अटक.. रत्नागिरी पोलिसांचे मिशन फिनिक्स..6 लाख 64 हजारांचा मुद्देमाल हस्तगत.. रत्नागिरी पोलिसांकडून 2026 मध्ये आतापर्यंत अमली पदार्थ विरोधातील कारवाईत एकूण 27 संशयितांना अटक केली आहे.अमली पदार्थ विरोधात जिल्हाभरात 17 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत..त्यामध्ये 8 अमली पदार्थ सेवनाची तर 9 अमली पदार्थ बेकायदेशीर ताब्यात बाळगल्याची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत..त्यामध्ये पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये 6 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे..
0
0
Report

बरसात से पहले अमरावती आयुक्त ने अस्पतालों और स्कूलों की व्यवस्थाओं की समीक्षा की

Amravati, Maharashtra:पावसाळ्याच्या तोंडावर अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा ऑन फील्ड; वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन केली पाहणी पावसाच्या आधी सगळी कामे करण्याचे दिले निर्देश अमरावती शहरातील विविध दवाखाने व शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाज, सुविधा, स्वच्छता व्यवस्था तसेच नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात आयसोलेशन दवाखाना, महानगरपालिका शाळा जेवड, महानगरपालिका शाळा बडनेरा तसेच मोदी हॉस्पिटलचा समावेश होता. रुग्णांसाठी उपलब्ध वैद्यकीय सुविधा, उपचार व्यवस्था, औषधसाठा, मनुष्यबळाची उपलब्धता, स्वच्छता व्यवस्था तसेच रुग्णसेवेची गुणवत्ता यांची सखोल तपासणी केली. दवाखान्यातील विविध विभागांना भेट देऊन त्यांनी डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आवश्यक सूचना दिल्या. महानगरपालिका शाळेचीही त्यांनी पाहणी केली. शाळेच्या इमारतीची दुरुсти्ती आवश्यक असल्यास त्या तातडीने दुरुस्तीवर अशा सूचना देखील त्यांनी दिल्या.
0
0
Report
Advertisement
0
0
Report
Advertisement

आकोला जिले के तेल्हारा में तेज़ आंधी से मकान की टिन चादें उड़ीं, नुकसान

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात काल सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले. शहरातील उंबरकार नगर परिसरात एका घरावरील टिनपत्रे वादळी वाऱ्याच्या तडाख्याने उडून गेल्याची घटना घडली. या घटनेचा थरारक व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.व्हिडिओमध्ये वाऱ्याचा वेग किती प्रचंड होता याचा स्पष्ट अंदाज येत असून घरावरील तीन टिनपत्रे अक्षरशः कागदाप्रमाणे हवेत उडताना दिसत आहेत. काही क्षणांतच ही पत्रे जमिनीवर कोसळली. या घटनेमुळे घरमालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने घटना घडली त्यावेळी रस्त्यावर नागरिकांची किंवा वाहनांची वर्दळ नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. दरम्यान, कालच्या वादळी वाऱ्यामुळे तेल्हारा शहरासह परिसरातील अनेक भागांमध्ये नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
0
0
Report

हदगांव में सड़क विवाद से दो किसानों के परिवारों के बीच हिंसक भिड़ंत, वीडियो वायरल

Nanded-Waghala, Maharashtra:शेतीला जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून दोन शेतकरी कुटुंबात हाणामारी झाली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मरडगा येथील ही घटना आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भांडणात लाठ्या काठ्यांचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे महसूलचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच दोन्ही शेतकरी कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही कुटुंबीयांचा वाद असलेला रस्ता मोजणीसाठी महसूलचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी आले होते. यावेळी मोजणीवरून वाद होऊन हाणामारी झाली. पोलीसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण मारहाण सुरूच होती. हाणामारीच्या घटनेत चार जण जखमी झाले असून एक जण गंभीर आहे. दोन्ही कुटुंबीयांवर हदगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
0
0
Report
Advertisement

भंडारा के मोहाडी में बस-स्कूटर भीषण ДТП, युवक की मौके पर मृत्यु

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या मोहाडी येथे हिरकणी बस-दुचाकीची भीषण धडक युवकाचा बसखाली येऊन जागीच मृत्यू. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे शासकीय रुग्णालय परिसरासमोरील राष्ट्रीय महामार्गावर हिरकणी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की दुचाकीस्वार युवक बसखाली चिरडला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
0
0
Report

करमाला में तूफान से दीवार गिरने पर वृद्ध दंपति की मौत

Pandharpur, Maharashtra:करमाळा तालुक्यात काल रात्री झालेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. वादळाच्या तडाख्यामुळे घराची भिंत अंगावर कोसळून एका वृद्ध दांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोमलवडी गावावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. पोमलवडी येथील रहिवासी जगन्नाथ मारुती नवले (वय ८० वर्षे) आणि त्यांच्या पत्नी शालन जगन्नाथ नवले (वय ७५ वर्षे) हे रात्री आपल्या घरात होते. दरम्यान, परिसरात अचानक वादळी वारे सुरू झाले वादळाचा वेग इतका तीव्र होता की, त्यांच्या घराची एक भिंत अचानक पत्त्यासारखी कोसळली. भिंत कोसळली तेव्हा हे वृद्ध दांपत्य घराच्या आतच होते. भिंतीचा मोठा ढिगारा अंगावर पडल्यामुळे दोघांनाही सावरण्याची संधी मिळालेली नाही आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top