445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
हिंदी में: ईद के ठीक पीछे चंद्रमुखी बकरा ‘बादशाह’ ने बाजार में मचाई धूम
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात सध्या एका खास बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे... भारम येथील शेतकरी गजानन जेजुरकर यांच्या कडे असलेला “बादशाह” नावाचा काळा बोकड सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतोय... या बोकडाच्या कपाळावर नैसर्गिकरित्या उमटलेली पांढरी चंद्रकोर म्हणजेच “चांद” हे त्याचे वैशिष्ट्य ठरत आहे... मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद सण जवळ येत असल्याने बाजारात बोकडांना मोठी मागणी वाढली आहे... विशेषतः कपाळावर चंद्रकोर असलेल्या बोकडांना लाखोंची बोली लागत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत... अनेक ठिकाणी अशा बोकडांची 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत विक्री झाल्याच्या बातम्यांमुळे आता गजानन जेजुरकर यांनाही त्यांच्या “बादशाह” कडून मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत या संदर्भात बादशहाचे मालक गजानन जेजुरकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
सांगली में हमाल संघटन ने सरकार के आदेश के खिलाफ अनिश्चित उपवास शुरू किया
Sangli, Maharashtra:सांगली मध्ये हमाल पंचायत संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून 24 एप्रिल रोजी एक अध्यादेश काढण्यात आला आहे. ज्यामध्ये रेशनिंग धान्य पुरवठा मध्ये थेट वाहतूक प्रणाली स्वीकारण्यात आली आहे, सरकारच्या निर्णयामुळे शासकीय धान्य गोदामातील आम्हाला यांच्यावर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ येणार असल्याचा आरोप करत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारने जारी केलेला अध्यादेश रद्द करून त्यामध्ये दुरुस्त करावी, अशी मागणी करत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.0
0
Report
पानी की किल्लत से वाशीम जिले में हाहाकार: कई जलप्रणालियाँ सूखी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होत चालले आहे. जिल्ह्यातील धरणे आणि सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा झपाट्याने घटत असून वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी आणि सोनल मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. तर जिल्ह्यातील १६० लघु सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा १४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून तब्बल ७५ प्रकल्प पूर्णपणे کوरडे पडले आहेत. वाढते तापमान आणि अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता0
0
Report
Advertisement
नाशिक के राहुड में कर्ज और मौसम बदले से परेशान किसान ने की आत्महत्या
Nashik, Maharashtra:नाशिकच्या बागलाण तालुक्यात राहुड येथे गुलाब निकम यांची गळफास घेऊन आत्महत्या, गावात शोककळा. Anc: नाशिकच्या बागलाण तालुक्यातील राहूड येथे कर्जबाजारीपणा, बदलते हवामान आणि शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल दरांच्या विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गुलाब केशव निकम (वय ५९) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या निधनाने राहुडसह काटवन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुलाब निकम यांची स्वतःची सुमारे तीन एकर शेती कसून पत्नी व तीन मुलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीच्या उत्पन्नावरच संसाराचा गाडा हाकणाऱ्या निकम यांच्यावर घरासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. त्यातच बदलत्या हवामानामुळे शेतीचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. यंदाच्या हंगामात त्यांनी कांदा पिकाची लागवड केली होती. मात्र परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला. उरलेला कांदा बाजारात विकला असता त्याला मातीमोल भाव मिळाल्याने त्यांच्या आर्थिक कोंडी आणखी तीव्र झाली होती. नातेवाईकांकडून घेतलेले हातउसने पैसे कसे फेडायचे, घरखर्च कसा चालवायचा आणि तीन मुलांचे विवाह कसे उरकायचे, या चिंतेने ते सतत विवंचनेत राहत होते. वाढते कर्ज आणि अपुरे उत्पन्न यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, जनावरांना चारा टाकण्यासाठी ते काल गावाशेजारील खळ्यात गेले होते. रात्री ते शेतातच थांबले होते मात्र सकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने मुलगा चेतन निकम हा खळ्याकडे गेला असता वडिलांनी गळफास घेतल्याचे his निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच त्याने आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येऊन राहुड गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.0
0
Report
शंकर महादेवन ने साई दरबार में भजन से भक्तों को मंत्रमुग्ध किया
Shirdi, Maharashtra:प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी सहपरिवार साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले… साई दरबारात आल्यानंतर भजन गाण्याचा मोह त्यांना आवरला नाही… आपल्या सुरेल आवाजात त्यांनी साईभजन सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले…जगात शांती नांदावी अशी प्रार्थना त्यांनी साईचरणी केली तसेच शिर्डी साईमंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानने निमंत्रण दिल्यास आनंदाने भजनाचा कार्यक्रम सादर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले…दरम्यान, साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख गाडीलकर यांनी शंकर महादेवन यांचा सत्कार केला…0
0
Report
अकोला में पेट्रोल-डीजल महंगाई के विरोध में बैलगाड़ी मोर्चा, वंचित बहुजन आघाडी आह्वान
Akola, Maharashtra:Anchor : वाढती महागाई आणि सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनोखा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, सरकारने तातडीने दरवाढ नियंत्रणात आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून बैलगादी, सायकल आणि गाढवाच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत टीका केली. खाजगी कंपन्यांकडून बांगलादेश आणि नेपाळला पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होत असल्यामुळे देशात कृत्रिम टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोपही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.0
0
Report
Advertisement
चिपळूण में उबाठा आक्रामक, अधिकारी-कार्यकर्ता के बीच घमासान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणमध्ये उबाठा आक्रमक!.. मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामावरून राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात राडा!.. 'अधिकाऱ्यांना खेचून मारू, कपडे फाडू...' उबाठा पदाधिकाऱ्यांचा महामार्ग अभियंत्यांना थेट भर कार्यालयात सज्जड दम!.. नितीन गडकरींचा 'मे एंडिंग'चा शब्द हवेत विरला? कोकणवासीयांच्या संतापाचा कडेलोट! महामार्गाचे काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू न देण्याचा इशारा; चिपळूणमधील वातावरण तापले!.. चिपळूणमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय...0
0
Report
बीड में नीट पेपर फूटे के विरोध में जिला कार्यालय के बाहर प्रदर्शन
Beed, Maharashtra:बीड: नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सामाजिक कार्यकर्त्यांची निदर्शने. देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शन केली. या प्रकरणात शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पेपर फुटी प्रकरणात आरोपींची संपत्ती जप्त व्हावी या विरोधात घोषणाबाजी करत आरोपींच्या फोटो फलकावर फुल्या मारण्यात आल्या. नीट पेपर फुटीचे धागेदोरे बीड पर्यंत आढळून आले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे.0
0
Report
पेट्रोल संकट के बीच महाराष्ट्र में चुनावी बहस तेज, सरकार पर सवाल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑन पेट्रोल तुटवडा.... तीन महिन्यापासून प्रश्न आहे मात्र मधल्या काळात निवडणूक होत्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी सुख समाधानसारखं आल्यासारखं दाखवलं,राज्यात ग्रामीण भागात देखील रंग लागल्या आहे.मशागतीचे काम असल्याने इंधन गरजेचे आहे.सरकारचे हे अपयश आहे.अमृत काळाचा गोष्टी मारायच्या आणि दोन लिटर इंधन मिळत नाही. - ऑन इंधन काळाबाजार महाजन... ही बोलबच्चन कातडी बचाव भूमिका आहे.काळाबाजार होत असेल तर तुमची यंत्रणा झोपली का?काळाबाजार करणार हे सरकारच आहे.यामुळे फालतू भूमिका मांडणे सरकारने थांबवले पाहिजे होते. परवा माझी स्वतःची गाडी रात्री एक पर्यंत रांगेत होती.मी काँग्रेस वाला आहे का? शेतकऱ्यांना राजकारणी म्हणू नये - ऑन नितेश राणे..... दहशत वाड्यांचे अड्डे असेल मदरश्याला सरकार का मदत करते?सरकार झोपले आहे का? - ऑन पुणे महिला बेपत्ता.... ही पुण्याची परिस्थिती आहे संभाजीनगर मध्ये रोज तीन महिला बेपत्ता होतात.मुंबईत यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे.यावर मुख्यमंत्री काय उत्तर देतात?सरकार फक्त बोटचेपी भूमिका घेत आहे. - ऑन विधान परिषद शिंदे मागणी... विधान परिषद निवडणुकीत कोंडी वाढत जाणार आहे.सरकार मध्ये शिंदे यांच्या मंत्र्यांची मोठी कोंडी झाली आहे. - ऑन चित्रपट महामंडळ निवडणुक मेडिकल कॉन्सिल निवडणुकांमध्ये तसेच चित्रपट निवडणुकीत भाजप वा सत्ताधार्यांनी नेत्यांची जायची का गरज आहे.सगळीकडे नाक खुपसायची सवय आहे.या गोष्टी अराजकतेकडे जात आहे. - ऑन वडेट्टीवार मतदार संघ... निवडणूक दूर आहे,निवडणूक आयोग अस बोलत असतो.सत्ताधारी पक्षाचे असेल तर झाकून ठेवतील विरोधक असतील तर पकडतील. जय पवार पोस्टर... - प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करत आहे.अजित दादा असताना मुलांना संधी मिळाली नाही आता मिळते आहे. - ऑन पोलिस/ नितेश राणे.... पोलिसांनी काय खाव हे राणे नि ठरवायचं का? तू कोंबडा खातो ते चालते का? हुतात्मा स्मारक त्याची दुरवस्था आहे सत्य आहे मात्र त्याचीअवहेलना होऊन नये अशी अपेक्षा आहे... - ऑन मोटेगावकर..... नीट ची तयारी करणाऱ्यांना पाणी शिंपडण्याचे गोष्टी करत असेल तर कठीण आहे - ऑन शिंदे उडघटनाला गैरहजर यावर मी काय बोलणार? माझ्या माहितीप्रमाणे ते दिल्लीला गेले आहे.त्यांच रूसने नेहेमीच आहे. ऑन गडकरी.... गडकरी नेहेमी अस बोलत असता चांगले काम करणारे ओळखे जातात,त्यांच्याच पक्षातील लोकांना ते बोलले असणार आहे. - ऑन वाळू वाहतूक... सत्ताधारी पक्षाचे लोक वाहनांवर फोटो लावून रात्री बे रात्री वाळू वाहतूक होते.पोलिस हप्ते वसुलीत व्यस्त आहे. - ऑन मोदी सरकार १२ वर्ष.... १२ वर्ष चांगले गेले आहे.अब नाही महेंगाइ की मार,पेट्रोल डिझेल १०० पार गेले आहे.खत २५०० पर्यंत गेले आहे.यामुळे मोदींचे १२ वर्ष बेमिसल आहे. - ऑन कांदा.... महाविकास आघाडीची चांदवड येथे कांद्यासाठी आंदोलन होणार आहे त्यासाठी मी जाणार आहे.या नंतर मंत्रालयात आंदोलन करू..0
0
Report
Advertisement
यवतमाल में पुसद-मैहूर मार्ग पर ट्रक टकराकर दो शव, एक होमगार्ड घायल
Yavatmal, Maharashtra:यवतमालच्या पुसद ते माहूर मार्गावर भरधाव टिप्परने दोन दुचाकींना धडक दिली यात दोघांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी आहे. अरविंद आणि अनिता राठोड हे पती-पत्नी दुचाकी ने जात असताना टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी आहे. भरधाव टिप्परने काही अंतरावरच आणखी एका दुचाकीला उडविले यात होमगार्ड असलेले गणेश जाधव जागीच ठार झाले. पुसदच्या डम्पिंग ग्राउंडजवळ हा भीषण अपघात झाला आहे. पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतले आहे.0
0
Report
प्याज के दाम गिरते किसान संकट में, किसान सभा ने 1500 रु/क्विंटल अनुदान मांगा
Shirdi, Maharashtra:क pyाज के दाम गिरते किसान संकट में, किसान सभा ने प्रतिक्विंटल 1500 रुपये अनुदान माँगा0
0
Report
नाशिक केंद्रीय जेल में आरोपी संग अधिकारियों की पार्टी का वीडियो वायरल, जांच शुरू
Nashik, Maharashtra:नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांचा एका संशयित आरोपीसोबत पार्टी करतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारागृह प्रशासन खडबडून जागं झालंय... या प्रकरणाची आता अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली असून व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तीन तुरुंग अधिकाऱ्यांना सात दिवसांत या संदर्भात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत... नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगून बाहेर आलेला गौरव मिश्रा या संशयित आरोपी सोबत या अधिकारी यांनी पार्टी करतानाचे व्हिडिओ viral झाले आहेत.. मिश्रा एका फसवणूक गुन्ह्यात तुरुंगात होता... जामिनावर बाहेर आल्यानंतर गौरव मिश्रा याच्यासोबत काही कारागृह अधिकाऱ्यांनी कथित दारू पार्टी केल्याचा वीडियो सध्या viral होत आहेत.. आता कारागृह प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे... व्हायरल व्हिडिओमध्ये हिरालाल भामरे, जगदीश ढुमने आणि अशोक मलवाड हे तीन अधिकारी दिसत असल्याची माहिती समोर आली आहे... विशेष म्हणजे ही पार्टी कारागृहाच्या अधिकारी निवासस्थानाबाहेर झाल्याचंही सांगितलं जात आहे... दरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पुढील निर्णय वरिष्ठ अधिकारी घेणार असल्याची माहिती नाशिक कारागृह प्रशासनाचे मुख्य अधीक्षक यांनी दिली आहे.0
0
Report
Advertisement
घंटानाद आंदोलन: 2026 का पिक विमा तुरंत मंजूर और जल संकट पर किसान दबाव
Washim, Maharashtra:क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संघटनेने तहसीलदारांना निवेदन दिले. 2026 चा पिक विमा तात्काळ मंजूर करणे व खताचा कृत्रिम तुटवडा रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासह जलजीवन मिशनअंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.0
0
Report
सोलापुर में आंधी-बारिश से 3000 पपीते के पेड़ उजाड़, किसानों में गहरा रोष
Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे 3 हजार पपईची झाडे उध्वस्त - सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतीपीकांचे मोठे नुकसान - दक्षिण सोलापूर तालुक्यातील साडेतीन एकरावरील 3 हजार पपईची झाडे उध्वस्त - पपईसह द्राक्षे, डाळिंब, शेवगा पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल - नुकसान होऊन 48 तास उलटले तरी अद्यापपर्यंत कोणत्याच पद्धतीचे पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांमधून व्यक्त होतेय तीव्र नाराजी0
0
Report
जालना के वडिगोड्री किसान महावितरण के 11 केवी उपकेंद्र पर टाले, आपूर्ति बाधित
Jalna, Maharashtra:जालन्यातील वडीगोद्रीत शेतकरी आक्रमक, महावितरणच्या 11 केव्ही उपकेंद्राला ठोकले टाळे जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील 11 केव्ही उपकेंद्राअंतर्गत नालेवाडी,रेणापूरी, गोंदी,शहागड,टाका या गावातील शेतीपंपाला होणारा वीज पुरवठा गेल्या 15 दिवसापासून खंडित करण्यात आलाय. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वडीगोद्री येथील महावितरणच्या 11 केव्ही उपकेंद्राच्या कार्यालयाला टाळे ठोकले.. महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून आक्रमक शेतकरी कार्यालयाच्या पायऱ्यावर बसलेले आहेत.दरम्यान जो पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यंत आम्ही कार्यालय सुरू होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.0
0
Report
Advertisement
