icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशिम में SIR अभियान तेज, 12 दिनों में 5.12 लाख मतदाताओं की सूची तैयार

Washim, Maharashtra:अगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष गहन पुनरावलोकन SIR मोहिमेला वेग आला आहे. अवघ्या १२ दिवसांत ५ लाख १२ हजारांहून अधिक मतदारांची माहिती संकलित करण्यात आली असून,डिजिटल नोंदणीची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. बूथस्तर अधिकारी घराघरात जाऊन मतदारांची माहिती व कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. अद्याप माहिती सादर न केलेल्या पात्र मतदारांनी वेळेत सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे. आगामी निवडणुकांसाठी अचूक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.
0
0
Report

पंढरपुर में 4 हजार साइकिलस्वारों की पर्यावरण संदेश दिंडि शुरू

Pandharpur, Maharashtra:पंढरपूर मध्ये विविध पद्धतीच्या सायकल दिंड्या दाखल झाल्या आहेत. नागपूर ,नाशिक, जळगाव , कोल्हापूर , सांगली , पुणे , ठाणे अशा 17 जिल्ह्यातून आलेल्या सायकल स्वरांची एकत्रित आज पंढरपूर शहरातून सकाळी दिंडी निघाली आहे. पर्यावरणाचा संदेश देणारे तब्बल 4 हजार सायकल स्वार असणारे वारकरी पंढरपुरातील अनोख्या सायकल दिंडीत सहभागी होऊन आषाढीचा भक्तिपूर्ण माहोल आतापासूनच तयार करत आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षापासून पंढरपुरात सायकल दिंडी आणि सायकल वारीचा आयोजन होतंय. वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे विठ्ठल मंदिराचे आणि पंढरपूरची नगरप्रदक्षिणा करत आज सकाळी सायकल दिंडी निघाली होती. त्यामुळे महाराष्ट्रातून पंढरपूरकडे दिंड्या येत असताना सायकल स्वार वारकऱ्यांची अनोखी दिंडी पंढरपूरात अनुभवायला मिळाली. पंढरपूर सायकलर्स क्लब यांच्या वतीने या सायकल वारीचा आयोजन करण्यात आले आहे.
0
0
Report

मैथेरन में जुलाई के पहले सप्ताह में रिकॉर्ड बारिश, चार्लोट झील उफान पर

Neral, Maharashtra:माथेरान मध्ये मागील ८ दिवसांत १,७९४ मिमी विक्रमी पाऊस; माथेरान मधील प्रसिद्ध शार्लोट लेक ओव्हरफ्लो पर्यटकांची शार्लोट तलावाला पसंती माथेरानमध्ये यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून, कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल आठ दिवसात १,७९४.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दररोज सरासरी २२४ मिमी पाऊस कोसळल्याने संपूर्ण माथेरान परिसर जलमय झाला असून, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेला शार्लोट लेक आता ओसंडून वाहू लागला आहे. शिवाय दरवर्षी पावसाळी सुट्टीत पावसाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी सुद्धा आता शार्लोट तलावाला पसंती दिलीय त्यामुळे शनिवार आणि रविवार आता या भागात पर्यटक हळहळू यायला सुरुवात झालीय. येथील पाण्याचा मनमुराद आनंद हे आलेले पर्यटक लुटत आहेत.
0
0
Report
Advertisement

वसई के सनसिटी में गैस सिलिंडर वाहन की टक्कर, चार जख्मी; ड्राइवर फरार

Vasai-Virar, Maharashtra:वसईच्या सनसिटी परिसरात गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसून चार जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर गॅस वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसईच्या सनसिटी परिसरात गॅस सिलिंडर वाहतूक करणारे वाहन आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात एकूण चार जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर गॅस वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. वाहनात चालकासोबत बसलेला एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, दुचाकीस्वार निरव चामासा हाही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यासोबत असलेल्या एका लहान मुलाच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. सर्व जखमींना तातडीने वसईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातानंतर गॅस वाहनाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, वाहनावर धोकादायक पदार्थ वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आवश्यक असलेले सावधान करणारे स्टिकर्स नव्हते. तसेच वाहनात अग्निशामक यंत्र (फायर एक्स्टिंग्विशर) देखील आढळून आले नसल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, संबंधित गॅस वाहनाकडे आवश्यक परवाने आणि नियमांनुसार कागदपत्रे होती की नाही, याचाही तपास पोलीस करत आहेत. फरार चालकाचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

वाशीम के कांदा किसान खुश, बाजार भाव में भारी उछाल

Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या वारा जहागीर परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावातील वाढीमुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात वाढ होऊन सध्या प्रति क्विंटल २ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. परिसरातील शेतकऱ्यांकडे अजूनही हजारो क्विंटल कांद्याचा साठा शिल्लक असल्याने वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी ते टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री करत आहेत. बाजारातील मागणी कायम राहिल्यास दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, आता जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष पुढील बाजारभावाकडे लागले आहे.
0
0
Report

सूखे के बीच रायपुर के किसान शंकर कोल्हे ने 40 दिनों में 75 हजार रुपये कमाए

Chandvad, Maharashtra:आधीच टंचाईग्रस्त नाशिक जिल्ह्याचा पूर्व भागात यंदा पावसाळा तब्बल दीड उशिराने सुरू झाला. अश्या प्रतिकूल परिस्थितीतही चांददवडच्या रायपूर येथील प्रयोगशील शेतकरी शंकर कोल्हे यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून टप्याटप्याने सुमारे साडेतीन एकर क्षेत्रावर कोथिंबीरिची लागवड केली. प्रसंगी स्प्रिंगलर व ठिंबक सिंचनाने पाणी देऊन कोथिंबीर जागविली. त्यांनी लागवड केलेल्या क्षेत्रापैकी 20 गुंठे क्षेत्रावरील काढणीला आलेल्या कोथिंबीर पिकाला अवघा दहा हजार रुपये खर्च करून केवळ 40 दिवसात 75 हजार रुपयांचा भरघोस नफा कमविला. कमी पाण्यातही योग्य नियोजन केले तरी शेतीतून चांगला नफा कमविता हे कोल्हे यांनी दाखवून दिले आहे. यंदा पावसाळा लांबला आहे. पुढेही पावसाची काय करेल याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी कमी पाण्यात व अल्प कालावधीचे पिके घेण्यावर भर देण्याचा सल्लाही कोल्हे यांनी दिला.
0
0
Report
Advertisement

वाशिम के नावली-धोडप खेत मार्ग पर बरसात के बाद भी मरम्मत नहीं, किसान नाराज

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील नावली ते धोडप शेतरस्त्याची अलीकडील पावसानंतर दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेरणीसाठी गेलेले ट्रॅक्टर चिखलात अडकत असल्याने ते बाहेर काढण्यासाठी दुसरे ट्रॅक्टर बोलवावे लागत असून शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, प्रशासनाने तातडीने शेतरस्ता दुरुस्त करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
0
0
Report

यवतमाल वणी में डब्ल्यूसीएल के रवैये से कोयला खदानों में हड़कंप, ट्रक रोके गए

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी क्षेत्रात डब्ल्यू.सी.एल. च्या मनमानी कारभारामुळे कोळसा खान परिसरातील अनेक ग्रामस्थांचे जीव धोक्यात असल्याचा आरोप भाजपाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे. भाजप नेते विजय पिदुरकर यांनी मुंगोली, कोलगाव आणि पैनगंगा कोळसा खाणीची कोळसा वाहतूक एक दिवसासाठी रोखून आंदोलन सुरू केले, शंभरहून अधिक कोळसा वाहतूक करणारे ट्रक थांबल्याने कोळसा खाणीतील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प पडले. या कोळसा वाहतुकीमुळे कोलगांव चेकपोस्ट ते कोलगांव फाट्यापर्यंत प्रमुख जिल्हा मार्ग पूर्णतः उखडलेला आहे. त्यामुळे नागरिकांना येथून जीव धक्यात घालून ये जा करावी लागते, शाळेच्या बस इथून येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोलगांव फाटा ते भिमनगर मुंगोली रस्ता वेकोली ने नियमबाह्य परावर्तीत केला आहे. डब्लू सी एल चे अधिकारी मुजोरपणे वागत असल्याने तीन दिवसात रस्ता न बनविल्यास कोळसा वाहतूक पुन्हा रोखू असा इशारा भाजपचे विजय पिदुरकर यांनी दिला.
0
0
Report

यवला तालुक़े में पानी आपूर्ति योजना का स्टॉक घट, 38 गांव संकट में

Yeola, Maharashtra:दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून संजीवनी ठरलेल्या येवला तालुक्यातील 38 गाव पाणीपुरवठा योजनेच्या तलावातील पाण्याच्या पातळी मोठी घट झाली असून सध्या केवळ 11 एमसीएफटी पाणी शिल्लक राहिले आहे उपलब्ध साठा पाहता हा पाणीसाठा 15 ऑगस्टपर्यंतच पुरेल अशी माहिती देण्यात आली असून या पाणीपुरवठा योजनेद्वारे 54 गावे आणि 13 विविध संस्थांना पाणीपुरवठा केला जात असून सुमारे 1 लाख 25 हजार ग्रामस्थांची तहान या योजनेवर अवलंबून असल्याने उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने पालखेड डाव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी येत्या काही दिवसांत जोरदार केली जाऊ शकते
0
0
Report
Advertisement

नाशिक के यहवला में मोर ने फसलों पर हमला कर किसानों को आर्थिक नुकसान पहुंचाया

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. राजापूर, ममदापूर, कोळम और भारम परिसरात चांगल्या पावसानंतर म्का, सोयाबीन और मूगाची पेरणी करण्यात आली. पिके चांगली उगवली असतानाच राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांनी शेतांवर धाड टाकली आहे. मोरांकडून कोवळे कोंब खाल्ले जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे, बियाण्यांवर केलेल्या रासायनिक प्रक्रियेेमुळे हे कोंब खाल्ल्यानंतर मोरांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि वन्यजीव संरक्षण या दोन्हींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या संदर्भात शेतकरीांच्या बांधावरून आढावा घेतला आहे
0
0
Report

अकोला में नीलगाय की बढ़ते आक्रमण से किसान परेशान, मुआवजे की मांग तेज

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात आधीच बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे अनेक ठिकाणी पिकांची उगवण न झाल्याने शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करत आहेत. त्यातच आता नीलगाईंच्या वाढत्या वावरामुळे उगवलेल्या पिकांवरही मोठा धोका निर्माण झाला आहे. तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव परिसरासह अकोट तालुक्यात नीलगाईंचे कळप शेतात घुसून सोयाबीनसह इतर पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्रभर शेतात पहारा द्यावा लागत असून शेतकऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे. वनविभागाने तातडीने पाहणी करून नीलगाईंचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अन्यथा उरलेली पिकेही नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणीच्या संकटानंतर नीलगाईंच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे राहिल्याचे चित्र आहे.
0
0
Report
Advertisement

जालना: दो बायोटेक कंपनियों पर किसानों को धोखा देकर बोगस बीज बेचने का मामला

Akola, Maharashtra:शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करून बोगस व निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या कंपन्यांवर अकोल्यातील एमआयडीसी आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये जालन्यातील बूस्टर प्लॅंट जेनेटिक्स प्रा. लि. आणि मध्यप्रदेशातील रवी सिड्स या कंपन्यांचा समावेश आहे.संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांची उगवण क्षमता अत्यंत कमी असल्याच्या तक्रारी शेतकऱ्‍यांनी कृषी विभागाकडे केल्या होत्या , अकोला कृषी विभागाकडे 1 हजारावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 11 बियाणे कंपन्यांवर कारवाईची सभागृहात मागणी केली होती.जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार प्रभाकर दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकाऱ्यांनी बियाण्यांचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. या तपासणीत बियाण्यांची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार नसल्याचे स्पष्ट झाले. बियाण्यांच्या पाकिटांवर केलेले दावे खोटे आणि बियाणे नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची दिशाभূল करणारे असल्याचे अहवालात सिद्ध झाले आहे. याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
0
0
Report

वाशीम में नकली बीजों से किसान परेशान, मदद की तात्कालिक मांग

Washim, Maharashtra:वाशीम: खरिप हंगामातील 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्यानंतर आता बोगस बियाण्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत असून बियाणे, खत, मशागत आणि मजुरीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. या प्रकरणी आतापर्यंत 35 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या असून विभागाकडून पडताळणी व बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. बोगस बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top