icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सोलापुर में रमेश कदम के बयान पर रिपब्लिकन सेना ने किया आक्रामक प्रदर्शन

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या विरोधात सोलापुरातील रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आक्रमक मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या विरोधात सोलापुरातील रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आक्रमक माजी आमदार रमेश कदम यानी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या विरोधात केली होती टीका अनुसूचित जाती आरक्षणामधील उपवर्गीकरणसंदर्भात बोलताना रमेश कदम यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यावर टीका केली होती त्यानंतर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी रमेश कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी रमेश कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा देखील प्रयत्न केला दरम्यान रमेश कदम यांनी तात्काळ आनंदराज आंबेडकर यांची माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली
0
0
Report

किसानों की नाराज़गी के बीच विधानसभा बजट समिति का ग्रामीण दौरा, पोळा खर्च पर हंगामा

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात दाखल झालेल्या विधानमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यावर शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पोळा हा महत्त्वाचा सण असताना, त्यातच पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला असताना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली 27 आमदारांची विधानमंडळ अंदाज समिती जिल्ह्यातील ग्रामीण भागात भेटी देऊन विविध विभागांचा बैठकांमधून आढावा घेणार आहे. गेल्या पाच वर्षातील विविध विभागांना प्राप्त निधी व प्रत्यक्ष खर्चाची माहिती ही समिती जाणून घेणार आहे. मात्र पोळा सणाच्या कालावधीत 27 आमदारांची समिती, दहा वरिष्ठ अधिकारी, आमदारांचे स्वीय सहाय्यक यांच्यावर पाहुणचाराची उधळपट्टी कशासाठी, पोळा सणाला दौरा म्हणजे शेतकरी भावनांचा अवमान आहे असा आरोप सत्ताधारी भाजपाचे शेतकरी नेते देवानंद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव आदींनी केला आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम से किन्हीराजा सड़क के काम धीमे, नागरिकों ने गुणवत्ता की तत्काल जाँच की मांग

Washim, Maharashtra:वाशीम : अँकर:वाशिम ते किन्हीराजा रस्त्याचं सुरू असलेले काम अत्यंत संथगतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.कामाची तातडीने स्थळ पाहणी करून तांत्रिक आणि गुणवत्ता तपासणी करावी, अशी मागणी काटा व परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.रस्त्याच्या कामाची किंमत,अंदाजपत्रक, लांबी-रुंदी आणि कामाचा कालावधी दर्शविणारा अधिकृत माहिती फलकही लावण्यात आलेला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.याचं रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,पोलीस अधीक्षक कार्यालय,न्यायालय तसेच कॉलेज आहेत.त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक असताना काम संथगतीने सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच कामात मोठ्या प्रमाणात काळी माती वापरली जात असल्याने, कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी अशी मागणी झाली आहे. अवजड वाहनांची वाहतूक आणि सुरक्षा याबद्दलचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.कामात अनियमितता किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
0
0
Report

मनसे ने कुर्ला एल.बी.एस. रोड स्पीड ब्रेकर से गणेश मूर्ति गिरने पर कार्रवाई की मांग

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या कुर्ला एल.बी.एस. रोड परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनावेळी घडलेल्या दुर्घटनेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर दखल घेतली आहे. एल. वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १६६ मध्ये खराब आणि धोकादायक अवस्थेतील स्पीड ब्रेकरमुळे गणेशमूर्ती खाली कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि गणेशभक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कालिना विधानसभा यांच्या वतीने एल. वॉर्ड कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. धोकादायक अवस्थेतील स्पीड ब्रेकरची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. यावेळी विभाग अध्यक्ष संजय लक्ष्मण अडारकर, उपविभाग अध्यक्ष भरत धाकतोडे, उपविभाग सचिव प्रकाश कर्वे, शाखा सचिव आदर्श जाधव आणि उपशाखा अध्यक्ष रितेश पोन्नल यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते. गणेशभक्तांची श्रद्धा आणि नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

मराठा आरक्षण के समर्थक Shirur में जोरदार प्रदर्शन, मार्ग जाम

Shirur, Maharashtra:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर येथे मराठा समाज आणि सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आक्रमक रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील دوन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी शिरूरमधील मराठा बांधव रस्त्यावर उतरले. मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही आणि मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी उपस्थित आंदोलकांनी दिला आहे.
0
0
Report

जल संकट से खेती पर मंडरा रहा खतरा; महाराष्ट्र में पानी वितरण के निर्देश

Shirdi, Maharashtra:जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर - ऑन दुष्काळ उपाययोजना - एल निनोचा परिणाम दिसून येतोय... महिनाभर पाऊस नसल्याचा मोठा परिणाम दिसतोय... खरीप पिक जवळ जवळ संपलीत... परिस्थिती गंभीर... परिस्थितीची माहिती मागवतोय... सर्व भागाचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करू... ऑन पंचनामे आणि नुकसान भरपाई - ऑगस्ट 2027 पर्यंतचे पिण्याचे पाणी राखीव ठेवून, उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याचा निर्णय केलाय... पिण्याच्या पाण्याला प्राधान्य... ज्या भागातील धरणांमध्ये पाणी उपलब्ध आहे, तिथे शेतीला पाणी देण्याच्या सूचना दिल्यात... राज्यभरातून अहवाल आल्यानंतर पंचांम्यांबाबत मंत्रिमंडळात चर्चा होईल... ऑन एस इ बी सी आरक्षण - एस इ बी सी आरक्षणाचा मराठा मुलांना मोठा फायदा होतोय... कोणत्याही न्यायालयात स्थगिती मिळू नये, यासाठी आम्ही विशेष लक्ष घातले आहे... जरांगे मुंबई आंदोलन इशारा - आमचे सहकारी त्यात लक्ष घालताय... अंतिम अहवाल आल्यानंतर बघू ... मराठा नेते पक्षाचे, जरांगे आरोप - त्या वादात पडण्याचे कारण नाही... ज्या मागण्या समोर आल्या त्याची परिपूर्ती करण्याचं काम सरकार करतय... अनेक काही असेल तर आपण त्याचाही निश्चितपणे विचार करू... जरांगेंच्या प्रश्नांवर विखे पाटलांची सावध भूमिका... Byte - राधाकृष्ण विखे पाटील
0
0
Report
Advertisement

शिवराज मोरे मुंबई के लिए रवाना, चिकित्सा के लिए आगे के उपचार शुरू

Nagpur, Maharashtra:युवक कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष के विधायक रोहित पवार के साथ मुंबई रवाना हो गए। जख्मी शिवराज मोरे पर आगे के उपचार मुंबई में होंगे। महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस के अध्यक्ष शिवराज मोरे नागपुर में कल शाम के समय हुए प्रदर्शन में घायल हो गए थे। कांग्रेस की संविधान सम्मान यात्रा के दौरान कल पुलिस ने रेशीमबाग क्षेत्र में युवक कांग्रेस का मोर्चा रोक दिया था। उस समय शिवराज मोरे बसते समय भीड़ के साथ पुलिस के साथ धक्काबुक्की में घायल हो गए थे, उनकी गर्दन पर चोट आई थी। इसके बाद उनके साथियों ने कल शाम को शिवराज मोरे को नागपुर के एक निजी अस्पताल में दाखिल कराया था। आज सुबह शिवराज मोरे रोहित पवार के साथ उनकी विमान से मुंबई रवाना हो गए हैं, आगे के उपचार मुंबई में होंगे।
0
0
Report
Advertisement

चांडोल में अशोककालीन बुद्धमूर्ती के अवशेष मिलने से प्राचीन बौद्ध इतिहास उजागर

Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक चांडोळ गावात सम्राट अशोककालीन बुद्धमूर्तीचे अवशेष आढळल्याची माहिती समोर आली आहे. या अवशेषांमुळे प्राचीन काळात चांडोळ परिसरात बौद्ध भिक्खूंचे वास्तव्य आणि बौद्ध धम्माचा प्रसार असल्याचे संकेत मिळत आहेत. चांडोळ हे प्राचीन अजिंठा-भोगवर्धन व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. पैठण, भोकरदन, चांडोळ आणि अजिंठा घाटाला जोडणाऱ्या या मार्गावर व्यापारी तांडे तसेच भिक्खू संघांची ये-जा होत असल्याचे सांगितले जाते. परिसरात जुन्या विटा, दगडी अवशेष आणि मातीची भांडी आढळत असल्याने चांडोळच्या पुरातात्त्विक महत्त्वात आणखी भर पडली आहे. बुद्धमूर्तीच्या अवशेषांची अधिकृत पुरातत्त्वीय तपासणी झाल्यास चांडोळच्या प्राचीन इतिहासाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
0
0
Report

रोहित पवार मामला: पार्थ पवार को प्रेसकॉन्फ्रंस की जरूरत, भाजपा-गृह विभाग रणनीति सामने

Nagpur, Maharashtra:नागपूर: रोहित पवार पर चर्चा चल रही है. कोर्टबद्दल आम्ही काय बोलणार... न्यायप्रविष्ट है. पार्थ पवार यांना एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी म्हणावे लागेल. अजितदादा असताना स्वतः मीडियासमोर जाऊन वस्तुस्थिती सांगावी लागते. त्यामुळे पार्थ पवार यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागेल असे मला वाटते. कोर्टाने पोलिसांना विचारले आहे कि गृह विभाग कोणाचा आहे; पार्थ पवारांना भाजपाचे राजकारण कसे चालते हे कळेल. आगामी काळात भाजप काय आणि कसे करेल, मित्र पक्षाच्या नेत्याला कसे अडचणीत आणेल ते समजेल. गृह विभागाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत; वित्त मंत्रालय अजितदादांच्या पक्षाकडे होता, परंतु अजित दाद गेलेल्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी ते डिपार्टमेंट स्वतःकडे घेतले. या प्रकरणांमध्ये होणार्या वाटाघाटींत वित्त विभाग भाजपकडे कायमस्वरूपी जाणार आहे. येत्या काळात अजितदादांच्या पक्षाला भाजपाकडे राजकारण काय आहे हे कळेल.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top