445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
भांडुप में बाइक दुर्घटना: 71 वर्षीय महिला की मौत, चालक ओम राणे गिरफ्तार
Mumbai, Maharashtra:भांडुपध्ये दुचाकीच्या धडकेत ७१ वर्षीय महिलेचा मृत्यू; अपघातानंतर दुचाकीस्वार ताब्यात मंगतराम पेट्रोल पंप परिसरातील भांडुपच्या काजू टेकडी परिसरात धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. ओम राणे, वय २१ वर्षे, हा आपल्या दुचाकीवरून जात असताना रस्ता ओलांडणाऱ्या ७१ वर्षीय जयवंती पांचाल यांना दुचाकीची जोरदार धडक बसली. धडकेनंतर जयवंती पांचाल या रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.मात्र, अपघातानंतर ओम राणे याने पोलिसांना कोणतीही माहिती न देता किंवा जखमी महिलेला मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे.घटनेनंतर भांडुप पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दुचाकीसह ओम राणे याला ताब्यात घेतले.या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास भांडुप पोलीस करत आहेत.0
0
Report
एनसीएमसी कार्ड बंधन से एसटी यात्रा में 50% छूट के कारण महिलाओं में नाराज़गी, 64% कमी observed
Solapur, Maharashtra:एसटी प्रवासामध्ये 50% सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केल्याने लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर - एसटी प्रवासासाठी 50% सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केल्याने लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर - एनसीएमसी कार्डच्या सक्तीने एकाच दिवसात महिलांच्या प्रवासात 64 टक्क्यांची घट - दोन महिन्यांपर्यंत एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी मुदत वाढवून द्यावी आणि तोपर्यंत महिलांना 50 टक्के सवलतीचा लाभ सुरूच ठेवण्याची मागणी - एनसीएमसी कार्ड बंधनकारक केल्याने अनेक लाडक्या बहिणींना मोजावे लागतात पूर्ण तिकिटाचे पैसे0
0
Report
अकोला कांग्रेस ने राहुल गांधी के FIR विरोध पर प्रदर्शन किया, उत्तराखंड बीजेपी के FIR की मांग
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जाहीर निषेध करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात करण्यात आलेल्या एफआयआरचा निषेध यावेळी काँग्रेसच्यावतीने करण्यात आलं.. उत्तराखंडमधील भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधातही एफआयआर दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.या आंदोलनादरम्यान “लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, देश वाचवा” अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.0
0
Report
Advertisement
मंगरुळपीर में सूखे के कारण आंदोलन, किसान मांगते हैं एक लाख रुपए प्रति हेक्टेयर मदद
Washim, Maharashtra:पावसाने दडी मारल्याने सोयाबीनसह खरीपाची पिके धोक्यात अली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून मंगरुळपीर येथे डफळे बजाव आंदोलन करण्यात आले. तालुक्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ऑगस्टमध्ये केवळ १५.१० टक्के पाऊस झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
आमदार रवि राणा के नेतृत्व में राजापेठ थाने के बाहर प्रदर्शन, फांसी की मांग
Amravati, Maharashtra:अमरावती में एक अल्पवयस्क कॉलेज छात्री की हत्या के मामले में आमदार रवि राणा आक्रामक प्रदर्शन के साथ आगे आए हैं। आज राजापेठ पुलिस स्टेशन के बाहर नागरिकों ने जमा होकर हत्या के आरोपी को फांसी की सजा दिलाने की मांग की। अटक अपराधी आनंद भड के लिए तात्कालिक फांसी की मांग के साथ कथित तौर पर उनकी सार्वजनिक धिंड काढने की भी मांग उठी, जिसके बाद पुलिस आयुक्त राकेश ओला ने भीड़ को समझाने की कोशिश की। इस प्रकरण में आमदार रवि राणा और माजी सांसद नवनीत राणा ने आरोपी को फांसी की सजा दिए जाने के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखा है।0
0
Report
कांग्रेस विधायक सतेज पाटील ने कानून-व्यवस्था पर सवाल उठाए, स्वतंत्र गृह मंत्री की मांग
Kolhapur, Maharashtra:कांग्रेस आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे आमदार सतेज पाटील ऑन कायदा सुव्यवस्था कायदा व सुव्यवस्था राज्यातील बिघडलेली आहे हे मी सातत्याने सांगतोय या राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही, मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे पुण्यात बापट यांना जी मारहाण झाली ती राज्याच्या दृष्टीने निषेध करण्यासारखी आहे, अशा गोष्टी होत गेल्या तर उद्या कोण कुणाला काहीही करेल अशी अवस्था आहे राज्यातल्या जनतेला वाटले पाहिजे की आम्ही सुरक्षित आहोत त्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नेमावा अशी मागणी आहे आमदार सतेज पाटील ऑन मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना हरताल फासण्याचं काम सरकारने केलं आहे, फसवायचं काम सरकारने केलं नवी मुंबईत मराठा समाज मोठ्या संख्येने आला तेव्हा मागण्या मान्य झाल्या, गुलाल उधळून त्यांना फसवण्यात आलं की भावना मराठा समाजाची आहे मराठा समाजाने शांततेत 58 मोर्चे काढण्याचे काम केलं, परंतु सरकार या विषयाचा खेळ खंडोबा करत आहे, शिष्टमंडळात माणसे बदलली जातात दरवेळी वेगळे शिष्ट मंडळ चर्चेला जातं हा प्रश्न सोडवण्याची मानसिकता सरकारची नाही, यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीला काय झालं तर त्याला शासन जबाबदार असेल आमदार सतेज पाटील ऑन धनंजय महाडिक महापालिकेचा निकाल ही त्यांनी सांगितला होता, चार-पाच नगरसेवक आमचे येतील असेही ते म्हणाले होते आमदार सतेज पाटील ऑन गोकुळ महायुतीच्या भांडणामुळे गोकुळ अडचणीत आल आहे, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे महायुतीतील गोकुळ, जिल्हा परिषदेची आणि इचलकरंजी महापालिकेतील भांडण बघता गोकुळचा उत्पादक शहाणा आहे एक मुखी दूध उत्पादक आमच्या बाजूने राहतील अशी मला खात्री आहे...0
0
Report
Advertisement
नागपूर में राहुल गांधी के कार्यक्रम से बीजेपी को फायदा? Pravin Datke के साफ संकेत
Nagpur, Maharashtra:नागपूर PRavin Datke on rahul Gandhi ------------ भाजपा आमदार प्रवीण दटके ( ऑन राहुल गांधी नागपूर कार्यक्रम चर्चा ) Rahul gandhi यांचा नागपुरात कार्यक्रम होत असेल तर त्याचा फायदा भाजपालाच होईल... पुण्याच्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमापेक्षा नागपूर आतील कार्यक्रम चांगला झाला अनेक विक्रम झाले राहुल गांधी यांचा कार्यक्रम नागपुरात होत असेल तर त्याचा फायदा भाजपालाच होणार असल्याने राहुल गांधी यांना शुभेच्छा0
0
Report
धामणगाव में बस ने दुचाकी सवार बचाते समय नाली में गया, छात्रों को चोट नहीं
Yeola, Maharashtra:अँकर : येवला तालुक्यातील धामणगाव येथे दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात स्कूल बस रस्त्यालगतच्या नाल्यात गेल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात बसमधील विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धामणगाव परिसरातून स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अचानक समोर दुचाकीस्वार आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने वाहनाचा ताबा वळवला. यावेळी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात गेली. घटनेच्या वेळी स्कूल बसमध्ये दोन ते तीन विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा बसमधील व्यक्तीला दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.0
0
Report
चंद्रपुर में गणेश उत्सव: हर मंडळ के पीछे एक कॉन्स्टेबल, सुरक्षा और संवाद की नई पहल
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर पोलीस उपविभागात पोलीस प्रशासन अनोखा उपक्रम राबवत आहे: गणेश मंडळ कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यात संवादासाठी प्रत्येक मंडळामागे एक कॉन्स्टेबल नियुक्त केला जाला. या उपविभागात सुमारे 400 मंडळे आहेत. प्रत्येक मंडळामागे नियुक्त कॉन्स्टेबल गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात विसर्जन मिरवणुकीसह नियमानुसार साजरा करण्यासाठी जबाबदार राहील. या कॉन्स्टेबलकडे या गणेश मंडळाचे पूर्ण पालकत्व राहणार आहे. याशिवाय मोठ्या मंडळांची जबाबदारी थेट अधिकारी वर्गाकडे राहणार आहे. गणेशोत्सव परंपरेला धरून कोणताही गालबोट न लागता पार पडावा haey yachi धुरा देखील या पालकत्व दिल्या गेलेल्या कॉन्स्टेबल कडे असणार आहे. मंडप नियोजन, डीजे अथवा रोषणाई यासह विसर्जन मार्गाच्या नियोजनाची धुरा देखील पालकत्व घेतलेल्या कॉन्स्टेबलकडे राहील. त्यामुळे नियम उल्लंघनाला चाप बसेल आणि प्रशासकीय सूचना उत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत नियमितपणे पोहोचतील.0
0
Report
Advertisement
वर्धा जिले में त्योहारों के दौरान लेज़र लाइट और हाई-पावर लेज़र शो पर पूर्ण प्रतिबंध
Wardha, Maharashtra:वर्धा सण-उत्सवांत लेझर लाईट्सवर वर्धा जिल्ह्यात पूर्ण बंदी! दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा अन् गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर शोला सक्त मनाई; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई अँकर - आगामी दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सण-उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईट, हाय-पॉवर लेझर बीम तसेच कोणत्याही प्रकारच्या लेझर शोच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), 2023 मधील कलम 163 अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हा आदेश 4 सप्टेंबर 2026 ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत संपूर्ण वर्धा जिल्ह्यात लागू राहणार आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा निर्णय सण-उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या क्षमतेच्या लेझर लाईट्स आणि तीव्र लेझर बीमचा वापर केला जातो. या प्रकाशाच्या थेट संपर्कामुळे मानवी डोळ्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते. विशेषतः रेटिना आणि कॉर्नियाला इजा होण्याचा धोका लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी सण-उत्सवांच्या काळात लेझर लाईट्सच्या वापरावर निर्बंध घालण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यासाठी हे आदेश लागू केले आहेत. मिरवणुकांमध्ये लेझर वापरल्यास कारवाई आदेशाच्या कालावधीत दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकांतर तसेच संबंधित कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट किंवा हाय-पॉवर लेझर बीमचा वापर करता येणार नाही. कोणत्याही प्रकारचा लेझर शो आयोजित करण्यासही निर्बंध असतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर लागू कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. सण उत्साहात साजरे करा; मात्र डोळ्यांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लेझर लाईट्सचा वापर टाळा, असा स्पष्ट संदेश या आदेशातून प्रशासनाने दिला आहे.0
0
Report
पैनगंगा बैरेज के गेट तुरंत बंद कराने की मांग, जलसंकट की आशंका
Washim, Maharashtra:पावसाने दडी मारल्याने प्रकल्पांमध्ये केवळ ४१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजचे गेट बंद करून पाणी अडवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या बॅरेजमधून सुमारे ५४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून,गेट बंद केल्यास ३३२६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होऊ शकतो.आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता बॅरेजचे गेट तातडीने बंद करावेत,अशी मागणी होत आहे.0
0
Report
नागपुर के पुलिस आयुक्त के निर्देश: मल्टी-लेयर डीजे साउंड सिस्टम पर पाबंदी
Nagpur, Maharashtra:---पोलीस आयुक्त या नात्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत कलम 163 अन्वये ही अधिसूचना काढण्यात आली आहे... *पोलीस आयुक्तांना जास्तीत जास्त 60 दिवसापर्यंत ची अधिसूचना काढण्याचा अधिकार आहे...* या काळातील सण उत्सवांचा त्यात उल्लेख आहे.. *त्यामध्ये Multi लेअर डीजे सह लेझर लाईट, बीम लाईट चा उल्लेख आहे*... *अधिसूचनेच्या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये जी साऊंड सिस्टिम कायदेशीर मर्यादेच्या आत आवाज निर्माण करेल, त्याला बंदी घालण्यात आलेली नाही*... *मल्टी लेयर साऊंड सिस्टिम बद्दल अधिसूचनेत उल्लेख आहे... त्यामध्ये बेस, मिडीयम आणि टॉप असे तीन लेअर असतात... त्यामधील बेस जो आहे, तो कंपन निर्माण करतो, त्यामुळे शारीरिक नुकसान होते*.. साठ दिवसांपर्यंत अशा मल्टीलेयर साऊंड सिस्टिम, प्लाझ्मा aani प्रेशर मिड श्रेणीतील साउंड सिस्टम विरोधात कारवाई होईल आणि त्यानंतरही अधिसूचनेचे शंभर टक्के नूतनीकरण केलं जाईल.. उत्सव साजरा करताना पारंपरिक वाद्यांना बंदी नाही, संगीताला बंदी नाही, फक्त मर्यादेच्या पलीकडे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मल्टीलेयर साऊंड सिस्टिम ला, प्लाजमा आणि प्रेशर मिड वर बंदी लावली आहे..0
0
Report
Advertisement
कल्याण स्टेशन रोड पर गड्ढों से ट्रैफिक जाम, केडीएमसी की गुणवत्ता पर सवाल
Kalyan, Maharashtra:कल्याण स्टेशन रोड मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या मधोमध भलाभोथा खड्डा.. keडीएमसीच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न चिन्ह.. 24 तासात पुन्हा खड्डा.. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी. कल्याणच्या स्टेशन रोडच्या मुख्य रस्त्यावरती भला मोठा खड्डा पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे दोन दिवसापूर्वीच याच ठिकाणी भला मोठा खड्डा पडला होता तो काल रात्री केडीएमसी कडून खड्डा बुजवण्यात आला मात्र 24 तासाच्या आत पुन्हा खड्डा पडल्याने महापालिकेच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या खड्यामुले स्टेशनला जाणारया आणि येणाऱ्या रस्त्यावर ट्राफिक जाममुले नागरिकांना मनस्ताप करावा लागतं है. याचा आढावा घेतला आहे0
0
Report
सातारा में मोर शिकार: सागर गौतम पवार गिरफ्तार, साजो-सामग्री जप्त
Satara, Maharashtra:सातारा तालुक्यातील वर्ये येथे राष्ट्रीय पक्षी मोराची सापळा लावून शिकार केल्याप्रकरणी सागर गौतम पवार यास सातारा वन विभागाने ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून मोराचे शिजविलेले मांस, पिसे, सापळा, हत्यारे आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौन्धळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली.0
0
Report
गडचिरोली के 30 साल के विकास का क्षेत्रीय नक्शा एक साल में पूरा करें: अधिकारी
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्याच्या पुढील ३० वर्षांच्या नियोजनबद्ध विकासाची दिशा निश्चित करणारा नवीन प्रादेशिक आराखडा तयार करण्याची प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबवून कोणत्याही परिस्थितीत एका वर्षाच्या आत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक नियोजन मंडळाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी दिले. गडचिरोली स्वतंत्र प्रादेशिक नियोजन मंडळाच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत जिल्ह्याच्या पुढील तीन दशकांच्या विकासाची दिशा निश्चित करण्यावर भर देण्यात आला. नवीन प्रादेशिक आराखड्याची कार्यपद्धती व कालमर्यादा, अद्ययावत बेस मॅप, विद्यमान व प्रस्तावित जमीन वापर, भौगोलिक माहितीचे संकलन, नियोजन तज्ज्ञांची नियुक्ती, तांत्रिक संस्थेची निवड तसेच संभाव्य ‘ग्रोथ सेंटर’ आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्षा प्रणोती निंभोरकर यांनीही जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाच्या अनुषंगाने विविध सूचना मांडल्या. गडचिरोली जिल्ह्यासाठी १९९१ मध्ये तयार करण्यात आलेला प्रादेशिक आराखडा तीन दशकांहून अधिक जुना आहे. या कालावधीत जिल्ह्यातील रस्ते व दळणवळण, पायाभूत सुविधा, उद्योग आणि विकासाच्या गरजांमध्ये मोठे बदल झाले आहेत. या बदलांसह पुढील ३० वर्षांतील संभाव्य विकास लक्षात घेऊन नवीन प्रादेशिक आराखडा अद्ययावत, वस्तुस्थितीदर्शक आणि भविष्यवेधी असावा, यावर बैठकीत भर देण्यात आला. जिल्ह्याचे वनबहुल व आदिवासी स्वरूप, उपलब्ध जमीन, जलस्रोत, रस्ते व दळणवळण व्यवस्था, विद्यमान वसाहती, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाची संभाव्य केंद्रे यांचा समन्वय साधून आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.0
0
Report
Advertisement
