445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
माडवी हिडमाची के गुणगान पर रोक, समिति ने बैन और आरोपी की गिरफ्तारी मांग
Nagpur, Maharashtra:माओवाद्यांचा सर्वात क्रूर आणि त्यांच्या मिलिटरी कमांडचा कमांडर असलेल्या माडवी हिडमाची एका गाण्याच्या माध्यमातून जोरदार उदात्तीकरण सुरू आहे.. पुणे आणि गडचिरोली मध्ये त्यासंदर्भात गुन्हे दाखल झालेयं. आता नक्षल पिडीतांसाठी काम करणाऱ्या "जनसंघर्ष समिती"ने हिडमाचा उदात्तीकरण करणाऱ्या त्या गाण्यावर बंदी लावण्याची तसेच गाण तयार करणाऱ्यांना शोधून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे...एका क्रूरकर्माचे उदात्तीकरण योग्य नाही.. हिडमाच्या उदात्तीकरणाच्या माध्यमातून शहरी भागातील तरुणांमध्ये नक्सलवादी विचारसरणी नव्याने पेरण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे...0
0
Report
सिंधुदुर्ग में ईंधन संकट: पेट्रोल डीजल की कमी से यात्राएं प्रभावित
Oras Bk., Maharashtra:अँकर ----- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात इंधन तुटवडा जाणवू लागलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळण बंद झालंय तर काही पेट्रोल पंपावर कमी प्रमाणात पेट्रोल उपलब्ध आहे. दुचाकींना केवळ 200 रुपये तीन चाकी 500 आणि four चाकींना केवळ 1 हजार रुपयांच पेट्रोल दिलं जात आहे. तशा पाट्या देखील लावण्यात आल्या आहेत. लांबचा प्रवास करणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येत्या दिवसात इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास सिंधुदुर्गात पेट्रोल व डिझेलचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही0
0
Report
विदर्भ में अगले तीन दिन गर्मी का अलर्ट, नागपुर सहित चार जिलों में येलो चेतावनी
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेचा अलर्ट अकोला,अमरावती आणि वर्धा येथे उष्णतेचा यलो अलर्ट अकोला आणि अमरावती पुन्हा एकदा पारा 45 अंशावर सकाळपासूनच उष्णतेच्या झळा... विदर्भातील उष्णतेचा प्रकोपाबाबत आढावा घेतलाय नागपुरातून आमचे प्रतिनिधीनी0
0
Report
Advertisement
गोंदिया-कोहमारा मार्ग पर ट्रक-ट्रावेल्स हादसा: एक की मौत, 10-12 घायल
Bhandara, Maharashtra:रस्त्यावर उलटलेल्या अपघातग्रस्त ट्रकला डॅश लागून ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर 10 ते 12 प्रवासी जखमी झालेची घटना आज पहाटे गोंदिया-कोहमारा महामार्गावरील जानाटोला परिसरात घडली. फुलेल खिरवार (30) रा. खैरागड (छत्तीसगढ) असे मृतकाच े नाव आहे. ट्रक चालकाचे स्टेऱिंगवरून नियंत्रण सुटल्याने गोरेगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या जानाटोला येथील पेट्रोल पंप समोरील भागात तो ट्रक उलटला. दरम्यान पोलिसांच्या वतीने त्या ठिकाणी कुठलीही बॅरिगेटिंग करण्यात न आल्याने अपघातग्रस्त ट्रकचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्सची त्या ट्रकला डॅश लागली त्यानंतर ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली यात एका प्रवाशाच्या मृत्यू झाला असून दहा ते बारा प्रवासी जखमी आहेत. जखमींवर गोंदिया येथे उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद गोरेगाव पोलिसांनी घेतली आहे.0
0
Report
करमाला में मुतखड़ा इलाज के नाम पर 41 हजार की धोखाधड़ी भोंदूबाबा भोसले समेत चार पर मामला
Pandharpur, Maharashtra:Anchor भोंदूबाबा मनोहर भोसले याच्या अडचणीत वाढ ; करमाळयात तिसरा गुन्हा दाखল, मुतखडा बरा करण्याच्या बहाण्याने 41 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी 'भोंदूबाबा मनोहर भोसलेसह चौघांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल मुतखडा पूर्णपणे बरा करण्याचा दावा करून एका शेतकऱ्याची 41 हजार रुपयांना फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार करमाळा तालुक्यातील घोटी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर मामा भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध जाडुटोणा विरोधी कायद्यासह विविध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार दिलीप अजिनाथ राऊत (वय 52, रा. घोटी) यांना मार्च 2025 मध्ये मुतखड्याचा त्रास सुरू झाला होता. सोलापूर येथील रुग्णालयात ऑपरेशन करूनही त्यांच्या त्रास कमी झाला नाही. दरम्यान, घोटी येथील मनोहर मामा भोसले हे मुतखड्यावर खात्रीशीर औषध देतात, अशी माहिती मिळाल्याने राऊत 20 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या मठात गेले. मठात गेल्यानंतर मनोहर मामांची भेट घेण्यासाठी तेथील सेवेकऱ्यांनी राऊत यांच्याकडून 11000 रुपये घेतले, ज्याची कोणतीही पावती देण्यात आली नाही. भेटीदरम्यान मनोहर मामांनी मी तुमचा आजार पूर्णपणे बरा करतो" असे आश्वासन देऊन त्यांना एक लाल रंगाची पावडर दिली. पंधरा दिवस औषध घेतल्यावर थोडा आराम वाटल्याने राऊत पुन्हा मठात गेले असता, त्यांच्याकडून पुन्हा 80000 रुपयांची मागणी करण्यात आली. आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी 30000 रुपये रोख दिले. काही दिवसांनी पुन्हा त्रास वाढल्याने राऊत यांनी मनोहर मामांना विचारणा केली. त्यावर "तुम्हाला कोणीतरी बाहेरवसा (करणी) केला आहे, म्हणून मी आता मंत्रोच्चार केलेली पावडर देतो" असे सांगून पुन्हा फसवणूक करण्यात आली. औषधाचा काहीही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यावर एप्रिल 2026 मध्ये राऊत यांनी आपले पैसे परत मागितले, मात्र मनोहर मामांनी पैसे देण्यास नकार देत त्यांना हाकलून दिले. दिनांक 6 मे 2026 रोजी शिवाजी शहाजी वाघमारे आणि अप्पा शिवाजी जाधव या दोघांनी राऊत यांच्या घरी जाऊन "पोलिसांत तक्रार करू नका, तुमचे पैसे परत देतो" असे म्हणून दमदाटी केली. अखेर दिलीप राऊत यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मनोहर भोसले,शिवाजी शहाजी वाघमारे,अप्पा शिवाजी जाधव व एक जण अज्ञात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 च्या कलम 3(2), 3(3) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(2), 318(4), 351(2) व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करमाळा पोलीस करत आहेत.0
0
Report
रत्नागिरी में मंत्रियों के काफिले का महंगा ईधन खर्च, मोदी निर्देश के बाद सवाल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात दोन मंत्र्यांच्या ताब्यावर दरमहा तब्बल दहा लाखांचा खर्च... पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्य सरकार ही प्रतिसाद देणार का.. अँकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनबचतीचे आवाहन केल्यानंतर आता राज्यातील मंत्र्यांचे दौरे आणि ताफ्यातील वाहनांसाठी होणारा इंधन खर्च आता चर्चेचा विषय झाला आहे.. रत्नागिरी जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या दौऱ्यात ताफ्यातील वाहनांचे इंधन आणि वाहन चालक यासाठी दरमहा रुपये दहा लाखांहून अधिक खर्च होत असल्याची बाब समोर येत आहे.. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या हाकेला राज्य सरकार ही प्रतिसाद देणार कां? असाच प्रश्न आता केला जात आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. तेच आवाहन लक्षात घेत राज्य सरकार ही मंत्र्यांच्या दौऱ्यातील ताफ्यामध्ये असलेल्या वाहनांची संख्या कमी करणार का असाच विषय आता चर्चा का झाला आहे..0
0
Report
Advertisement
नाशिक से मालेगाव की बस पलटी, चालक के हृदय विकार से नियंत्रण खोया, 4 घायल
Nashik, Maharashtra:मुंबई आग्रा महामार्गावर बसचा अपघात.. नाशिकहून मालेगावाकडे जाणारी बस झाली पलटी बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने वेगावर नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन झाडावर कोसळ्याची प्राथमिक माहिती सुदैवाने जीवितहानी नाही... 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्रथमोपचारासाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाला खाजगी रुग्णालयात दाखলात करण्यात आले अजून त्यावर उपचार सुरू आहे0
0
Report
सीएनजी-pet्रोल तुटो: रत्नागिरी-चिपळूणमध्ये वाहनांची लांब रांग आणखी काय?
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणात सीएनजीसह पेट्रोलची टंचाई.. मोटारींच्या रांगा.. सीएनजीसाठी दोन तास प्रतीक्षा.. अँकर सुट्टीचा हंगाम सुरू झाल्यापासून सातत्याने जिल्ह्यात सीएनजी गॅस चा तुटवडा भासत आहे.. तसेच गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी चार,चाकी गाड्यांच्या रांगाही पेट्रोल पंपावर लागल्या आहेत.. जिल्ह्यातील काही पप्पांवर पेट्रोल संपल्यानंतर पेट्रोल उपलब्ध असलेल्या चिपळूण येथील पंपात वाहनांची गर्दी झाली होती..0
0
Report
कल्याण में मामा ने भानजे की हत्या मोबाइल गेम विवाद के कारण की
Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिम उबार्डे कोळीवळी परिसरातील मामाने भाच्याची हत्या केलीय. मामा चित्रा बहादूर हा रॉयल ढाबा येथे काम करतो. भाचा गोखील बहादूर हा मोबाईल मध्ये गेम खेळत होता, मामाने त्याला गेम खेळू नको असं सांगितलं. यात वाद झाला, वाद विकोपाला जाऊन मामाने तीक्ष्ण हत्याराने भाच्याच्या गळ्यावर वार करीत त्याची हत्या केली. यात मामा हा 19 वर्षांचा तर भाचा 17 वर्षांचा आहे. पोलिसांनी मामा चित्रा बहादूर याला अटक केली आहे असून पुढील तपास खडकपाडा पोलीस करत आहेत.0
0
Report
Advertisement
वाशीम पुलिस ने अकोला-बुलढाणा चोरी गैंग दबोचा, चार मोटरसाइकिल समेत भारी माल बरामद
Washim, Maharashtra:अँकर:वाशीमच्या स्थानिक गुन्हे शाखेने अकोला व बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा अट्टल चोरट्यांच्या टोळीला जेरबंद केले. पोलिसांनी चार दुचाकी, टेम्पो, मोबाईल, रोख रक्कम व चोरीचे साहित्य असा ३ लाख ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, टोळीने राज्यात आणखी कुठे गुन्हे केले आहेत याचा तपास वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.0
0
Report
सोलापुर के पाटबंधारे विभाग की लापरवाही से किसानों को भारी नुकसान
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे कॅनॉलचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - सोलापूर पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे होतेय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथील जाधव वस्तीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरतेय कॅनॉलचे अतिरिक्त पाणी - शेतात पाणी शिरत असल्यामुळे आंबा, केळी, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान - जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी अडचणीत - जिल्ह्यात एकीकडे पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली असताना दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाणी वाया - शेतकऱ्याने इरिगेशन डिपार्टमेंटच्या विरोधात तक्रार केल्यानंतर उलट वारंवार तक्रार करतोय म्हणून शेतकऱ्याला 15 ते 16 हजाराचा प्रलंबित दंड असल्याचे सांगत पाठवली नोटीस0
0
Report
वाशीम में चेन स्नैचिंग: महिला से सोने के ज्वेलरी छीने, सीसीटीवी से लगी जांच
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात सायंकाळच्या सुमारास चैन स्नेचिंगची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.एक महिला दुचाकीवर बसत असताना अचानक एका चोरट्याने तिच्या गळ्यात हात घालून सोन्याचे दागिने हिसकावून घेतले.त्यानंतर संबंधित चोरटा दुसऱ्या दुचाकीवर बसून साथीदारासह घटनास्थळा वरून पसार झाला.ही घटना अत्यंत वर्दळीच्या परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान,संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून,तोंडाला कापड बांधलेल्या अवस्थेत चोरटा दिसून आला आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाशीम पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून,पुढील तपास करण्यात येत आहे。0
0
Report
Advertisement
युद्ध के कारण डीजल की कमी, कोकण में सूखी मछली के दाम आसमान छू रहे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आखाती युद्धाची झळ कोकणच्या ताटाला; डिझेल टंचाईमुळे सुकी मासळी महागली!.. अँकर कोकणात सध्या पावसाळ्यापूर्वीची सुकी मासळी साठवण्याची लगबग सुरू आहे,मात्र यंदा खवय्यांच्या खिशाला मोठा चटका बसणार आहे. आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा थेट फटका मासेमारीला बसला असून,पुरवठा घटल्याने सुक्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत.. पुरेशा इंधनाअभावी मासेमारी नौकांच्या फेऱ्या कमी झाल्या आणि परिणामी बाजारात मासळीची आवक घटली आहे.रत्नागिरी,खेडसह कोकणच्या बाजारपेठांमध्ये विक्रेते आणि ग्राहक दोघेही हवालदिल झाले असून,सोड्यांसारख्या मासळीने तर हजाराचा टप्पा ओलांडला आहे.. बाजारातील सध्याचे दर (प्रत्यिलो).. बाजारातील दर आगामी दिवसांत प्रचंड वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.. यंदा ढोमा ₹२००, चेवनी ₹३००, कोलिम ₹२००, आंबड काड ₹४००, बोंबील ₹४००, बगी ₹६००, आणि सोडे तब्बल ₹१००० प्रति किलोने विकले जात आहेत.0
0
Report
गोकुळ मामले में कोल्हापुर कोर्ट ने सरकार से 18 मई तक प्रतिज्ञापत्र मांगा
Kolhapur, Maharashtra:गोकुळ प्रशासक नेमणुकी संदर्भात राज्य सरकारने 18 मे पर्यंत आपले प्रतिज्ञापत्र सादर करावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने राज्य सरकारला दिले आहेत. यासंदर्भातील सुनावणी 19 मे रोजी ठेवण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या प्रशासकीय मंडळाला आव्हान देणाऱ्या माजी संचालकांच्या सुनावणीत हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. माजी संचालकांच्याकडून न्यायालयात बाजू मांडत असताना प्रशासकीय मंडळाची नियुक्ती चुकीची आहे त्याचबरोबर कोणतीही नोटीस दिली नाही, त्यामुळे ही एकतर्फी कारवा झाली आहे असं माजी संचालकांच्या वकिलान मार्फत कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले, तर महाराष्ट्र शासनाची बाजू मांडताना एडवोकेट सतीश रेळेकर यांनी वेळ कमी असल्यामुळे कोणतीही नोटीस न देता प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली अशी बाजू मांडली. इतकेच नाही तर पुढे निवडणुका असल्यामुळे या निवडणुका पारदर्शी होण्यासाठी संचालकांना मुदतवाढ दिलेली नाही ते देखील कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.0
0
Report
अतिक्रमण नियमितीकरण में देरी: नागरिकों की लंबी प्रतीक्षा से गंभीर नाराजगी
Amravati, Maharashtra:जिल्हा परिषदेत नागरिक अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत; वृद्धांसह नागरिकांनी काढल्या केबिन समोरील पोर्च मध्ये झोपा अँकर :- अमरावती जिल्हा परिषदेत अतिक्रमण नियमित करणाच्या मागणीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचे समोर आले आहे. अचलपूर तालुक्यातील पथ्रोड गावातून सकाळपासून उपाशीपोटी आलेले नागरिक अधिकाऱ्यांची वाट पाहत तासंतास जिल्हा परिषद कार्यालयात बसून असल्याचे दिसून आले आहे. काही वृद्ध व्यक्ती तसेच लहान लेकरांसह आलेल्या महिलांना थकवा आल्याने त्यांनी जिल्हा परिषद परिसरातच झोपा काढल्याचे पाहायला मिळाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अतिक्रमण नियमित करून मिळावे यासाठी अनेक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत पायपीट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाचे आदेश तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश असूनही अद्याप अनेक अतिक्रमणधारकांना नियमितीकरणाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.0
0
Report
Advertisement
