icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक में गणवेश घोटाले की तेज़ छानबीन, 16 स्कूलों के गणवेश खराब, कार्रवाई शुरू

Nashik, Maharashtra:नाशिक - - शिक्षणमंत्र्यांच्याच जिल्ह्यात गणवेश घोटाळा उघड - नाशिक ZP च्या मोफत गणवेश योजनेत मोठा झोल - प्रयोगशाळा अहवालात १६ शाळांचे गणवेश निकृष्ट - १६ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा - सीईओ ओमकार पवार यांची मोठी कारवाई - दोषींवर कायदेशीर कारवाईचे आदेश - गणवेश पुरवठ्यातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी सुरू - निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवरही कारवाईची शक्यता - नाशिक जिल्हा परिषदेत गणवेश घोटाळ्याने खळबळ (ग्लान्स: add shots of uniform and school) नाशिक - - शिक्षणमंत्र्यांच्याच जिल्ह्यात गणवेश घोटाळा उघड - नाशिक ZP च्या मोफत गणवेश योजनेत मोठा झोल - प्रयोगशाळा अहवालात १६ शाळांचे गणवेश निकृष्ट - १६ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा - सीईओ ओमकार पवार यांची मोठी कारवाई - दोषींवर कायदेशीर कारवाईचे आदेश - गणवेश पुरवठ्यातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी सुरू - निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवरही कारवाईची शक्यता - नाशिक जिल्हा परिषदेत गणवेश घोटाळ्याने खळबळ
0
0
Report

मुंबई क्राइम ब्रांच ने मिलावटी दूध बेचने के आरोप में दो को किया गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने मोठी कारवाई करत भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई १५ जुलै रोजी गोरेगाव पश्चिम परिसरात करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांसह छापा टाकला असता आरोपी नामांकित दूध कंपन्यांच्या पिशव्या उघडून त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळत असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्या पिशव्या पुन्हा सील करून नागरिकांना विकल्या जात होत्या. कारवाईदरम्यान सुमारे ५५८ लिटर भेसळयुक्त दूध, रिकाम्या दूध पिशव्या, भेसळीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि मोबाईल फोन असा एकूण ५० हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात अन्न सुरक्षा कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना पॅकबंद अन्नपदार्थ खरेदी करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
0
0
Report
Advertisement

कळवण में आदिवासी बनाम पुलिस: सोलर प्लांट विरोध तेज

Nashik, Maharashtra:कळवण (नाशिक) विशाल मोरे - नाशिकच्या कळवण तालुक्यात सोलर पॅनल प्रकल्पाला आदिवासी बांधवांकडून विरोध - पोलिसांकडून बळाचा वापर... - आदिवासी बांधव व पोलिसांमध्ये बाचाबाची.. Anc: कळवण तालुक्यातील भैताने दिगर या गावात सोलर पॅनल प्रकल्प होत आहे तर या प्रकल्पाला स्थानिक आदिवासी बांधवांकडून विरोध केला जात आहे याबाबत त्यांनी वेळोवेळी शासन स्तरावर निवेदन देऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी देखील केली होती. मात्र त्या प्रकल्पाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने ग्रामस्थ आदिवासी बांधव यांनी घटनास्थळी जाऊन तो प्रकल्पाला विरोध दर्शवला त्यावेळेस पोलीस आणि आदिवासी बांधवांमध्ये बाचाबाची होऊन पोलिसांनी बाळाचा वापर केला तसेच तहसीलदारांनी महिला सरपंच यांना यात तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही असे बोलले असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला. Pesa कायद्या अंतर्गत आदिवासी बांधवाना ही जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आणि त्याच जमिनीवर हा प्रकल्प उभा करण्यात येत असल्याने हा विरोध असल्याचे बोलले जाते. बाईट : महिला सरपंच
0
0
Report

अकोला में नकली गुटखा बनाने वाले कारखाने पर FDA ने छापा, 50 लाख रुपये का माल जप्त

Akola, Maharashtra:राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अवैध खाद्यपदार्थ आणि तंबाखूजन्य उत्पादनांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. अकोला शहरातील एमआयडीसी औद्योगिक परिसरात बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकत सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत गुटख्याचा साठा करणाऱ्या गोदामांवर कारवाई होत होती, मात्र अकोल्यात थेट बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावरच धाड टाकण्यात आल्याने ही कारवाई विशेष ठरली आहे.या कारखान्यात अनेक नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट गुटख्याची पाकिटे तयार केली जात होती. छाप्यात मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधी तंबाखू, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन मजुरांना ताब्यात घेण्यात आले असून कारखान्याचा मालक फरार असल्याची माहिती आहे. त्याचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असले, तरी शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट गुटखा उत्पादन सुरू असताना त्याची माहिती संबंधित यंत्रणांना, विशेषतः पोलिसांना कशी मिळाली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
0
0
Report

वर्धा में 12 वर्षीय लड़की की हत्या: तीन संदिग्ध गिरफ्तार, 14 स्पेशल टीम तैनात

Wardha, Maharashtra:वर्ध्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या. हत्येमुळे परिसरात खळबळ; मुलीवर अत्याचार झाल्याचा पोलिसांचा संशय. उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 14 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सावंगी पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व फॉरेन्सिक पथके घटनास्थळी दाखल झाली. मुलीची आई फिर्यादीदार आहे. तपासासाठी तांत्रिक आणि सायबर पथकेही तपासात सहभागी आहेत. पुढील कारवाई वैद्यकीय अहवाल व तपासातील निष्कर्षांनुसार केली जाईल. आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याचे सांगितले.
0
0
Report
Advertisement

विज बिल माफी की घोषणा रैली में, मंत्रिमंडल से पहले मुख्यमंत्री की बात

Mumbai, Maharashtra:आदरणीय संपादक और माझ्या पत्रकार बंधूंनो आपल्यासाठी बाईट आणि पॉइंटर. शिवसेना राज्य प्रवक्ते अरुण सावंत विषय: मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याअगोदरच जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांकडून विज बिल माफी जाहीर. साडेसात हॉर्स पावर पर्यंतचे जुने विज बिल मी माफ करणार. आम्ही 48 हजार कोटी रुपये माफ करणार. विज बिल माफ करणार ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आम्ही स्वागत करतो परंतु निर्णय अगोदर मंत्रिमंडळात घेतले जातात अशी माझी माहिती आहे इथे तर अगोदर रस्त्यावर निर्णय घेतला जात आहे आणि नंतर तो मंत्रिमंडळात चर्चिला जाणार आहे हे थोडंसं मनाला पटत नाही. मुख्यमंत्रीच जर असं करायला लागले तर मग इतर मंत्र्यांनी आमदारांनी काय धडा घ्यायचा ? मी स्वतः आणि या राज्यातील लाखो युवक आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून शिकण्याचा प्रयत्न करीत असतो.
0
0
Report

वर्धा में 12 वर्षीय लड़की की हत्या: 3 आरोपी हिरासत में

Wardha, Maharashtra:वर्ध्यात 12 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या - तीन संशयित आरोपीना घेतले ताब्यात. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून सावंगी पोलीस गुन्हा दाखल केलेला आहे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. रोठा गावापासून मुलीचा शेतामध्ये त्याचाच घरामध्ये मृतदेह मिळाला. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ घटनास्थळात पोहोचून तपास सुरू केला. मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून सावंगी पोलीस गुन्हा दाखल केलेला आहे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा गांभीर्य लक्षात घेता गुन्ह्याचा तपास एचडीपीओ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे. फॉरेन टीम आणि सायबर पथकांकडून काही उपविभागीय ते 14 पथक तयार करण्यात आलेल्या तांत्रिक विभागातील दोन पथक तयार करण्यात आलेले आहे तपासामध्ये काही महत्त्वाची माहिती मिळाली असून त्यावर काम सुरू आहे. त्या माहितीवरून काही लोकांची चौकशी सुरू असून लवकरात लवकर आरोपी पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी स्वतः पोलीस अधीक्षक. या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला एफआरमध्ये लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे. ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे मेडिकल ओपिनियन घेणार आहे. तीन लोकांकडून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
0
0
Report

सिंधुदुर्ग में बारिश से फसलें टूटीं, मंत्री ने तुरंत नुकसान की जाँच और सहायता योजना की दी जानकारी

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, Impact बातमी --- अँकर — तळकोकणात पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या शेताला तडे जाऊन रोप देखील सुकून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान झाले होते. त्याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्याच नुकसानग्रस्त भागात जात नुकसानीची पाहणी केली. व तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देत ही परिस्थिती कोकणात प्रथमच उद्भवलेली असून कोणत्या निकषांच्या अंतर्गत मदत करता येईल त्याची माहिती घेऊन उपाय योजना करू अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे, पालकमंत्री, सिंधुदुर्ग
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में बारिश के लंबे अंतराल से धान की फसल संकट, दुबारा बुवाई की संभावना

Chandrapur, Maharashtra:राज्यातील पूर्व विदर्भातील चंद्रपूर- गडचिरोली -भंडारा -गोंदिया -नागपूर हे जिल्हे भाताचे कोठार समजले जातात. या पिकासाठी भरपूर पावसाची गरज असते. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या १६ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील धान आणि सोयाबीन पिके संकटात सापडली आहेत. सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून केलेली पेरणी आता पावसाअभावी करपू लागली असून, शेतातील ओलावा पूर्णपणे कमी झाला आहे. धानाची रोपे पिवळी पडत असून अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच बियाणे, खत आणि मजुरीवर मोठा खर्च झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, पावसाकडेच त्याच्या आशा लागल्या आहेत.
0
0
Report

पंकजा मुंडे ने गेवराई के विकास के लिए पालकत्व स्वीकारने की घोषणा की

Beed, Maharashtra:बीड : "पालकमंत्री" सुनेत्रा वहिनी आहेत, पण मी जिल्ह्याची पालक आहे – मंत्री पंकजा मुंडे ANC - गेवराई नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांचा शुभारंभ मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी गेवराईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, गेवराईचे पालकत्व मी स्वीकारते, अशी घोषणा केली. मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा वहिनी आहेत. मात्र मी जिल्ह्याची पालक आहे. संपर्कमंत्री म्हणून जिल्ह्यातील विकासकामांवर माझे लक्ष राहणार आहे. असही पंकजा म्हणाल्या.. सुनेत्राताईंशी माझी बैठक झाली असून जिल्ह्यातील विविध विकासकामाबाबत आम्ही चर्चा केली. आपण मिळून विकासकामे करूया, असे मी त्यांना सांगितले. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. गेवराईच्या विकासाबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "गेवराईचा संपूर्ण विकास करण्यासाठी मी गेवराईचे पालकत्व स्वीकारत असल्याची आज घोषणा करते. यापूर्वीही ही जबाबदारी मी पार पाडत होतेच, मात्र नव्या नगरपरिषदेच्या निमित्ताने ती अधिकृतपणे स्वीकारत आहे. गेवराईच्या विकासातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहीन. असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला माजी मंत्री बदामराव पंडित, नगराध्यक्षा गीता पवार, भाजप नेते बाळराजे पवार यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. साऊंड बाईट : पंकजा मुंडे, मंत्री.
0
0
Report

जेजुरी दिंडी हादसे में घायल महिला वारकरी की मृत्यु

Sangli, Maharashtra:जेजुरी दिंडी अपघातातील जखमी महिला वारकरीचा मृत्यू,मृतांची संख्या ४ शैलजा जगताप वय 57 असे महिला वारकऱ्याचे नाव आहे,दोन दिवसांपूर्वी दिंडीत ट्रकच्या अपघातात सांगली जिल्ह्यातल्या तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता आणि चार jण गंभीर जखमी होते,त्यापैकी पुण्यातील रुग्णालयामध्ये कोल्हापूर येथील शैलाच्या जगताप यांच्यावर उपचार सुरू होते दरम्यान आज सकाळी त्यांचं निधन झालं आहे.मृत्यूची बातमी कळताच कवलापूर गावावर शोककळा पसरली आहे,कवलापूर मधील एका महिला वारकरीचा आधीच मृत्यू झाला आहे.त्यामुळे कवलापूर मधील वारकरी मृत्युची संख्या दोन झाली आहे,तथापि दिंडी सोहळ्यातल्या अपघाताच्या वारकरी मृत्यूंची संख्या चार झाली है।
0
0
Report
Advertisement

विठुराय के 24 घंटे दर्शन शुरू, अब रोज 50 से 70 हजार भक्तों को दर्शन

Pandharpur, Maharashtra:विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना पंढरी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहे . आषाढी साठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाच्या दर्शन घेता यावे यासाठी आज देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले करण्यात आले आहे . विठुरायाचे नवरात्र सुरू होत असल्याने देवाच्या विश्रांतीचा चांदीचा पलंग या नवरात्री काळात काढण्याची परंपरा असल्याने विधिवत पूजा करून हे नवरात्र बसविण्यात आले . आज सकाळी देवाच्या पूजे नंतर देवाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला असून आता २४ तास दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाला थकवा जाणवू नये यासाठि ही व्यवस्था करायची परंपरा आहे . अणे... सकाळी देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला . यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या गिरद्या देखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या . देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले . आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे . असे असतील विठुरायाचे नित्योपचार -- पहाटे साडेचार वाजता देवाचे स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल या काळात फक्त १ तास दर्शन बंद असेल . यानंतर दुपारी महानैवेद्याला १५ मिनिटे आणि रात्री नऊ वाजता लिंबू पाणी देण्यासाठी १५ मिनिटे दर्शन थांबविण्यात येणार आहे . याशिवाय संपूर्ण दिवस रात्र विठुराया आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देत उभा असणार आहे . देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता रोज पायावर ५० हजार तर मुखदर्शनातून ७० हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे . सध्या गर्दी वाढू लागत असल्याने मिनिटाला ४० भाविकांच्या दर्शनाचा वेग आता मंदिर समितीला वाढवावा लागणार असून मुखदर्शन रांगेत देखील जास्तीतजास्त भाविकांना दर्शन देता यावे यासाठी वेग वाढवावा लागणार आहे . आषाढी यात्रा काळात देवाचे दर्शन घेण्यास १८ ते २० तास अवधी लागत असल्याने सध्या रोज लाखभर भाविक दर्शनासाठी येथे येत असून सध्या ८ ते १० तासात देवाचे दर्शन मिळत आहे . आता आजपासून २४ तास दर्शन व्यवस्था सुरू झाल्याने हाच अवधी कमी होऊ शकणार आहे.
0
0
Report

यवतमाळ: ढाणकी में स्मार्ट मीटर के विरोध में जनआंदोलन तेज, व्यापारी बंद का साथ

Yavatmal, Maharashtra:स्मार्ट मीटर सक्ती, वाढीव वीजबिले तसेच महावितरणच्या कार्यपद्धतीविरोधात यवतमाळच्या ढाणकी येथे जनआंदोलन उभे झाले असून, आज व्यापारी महासंघाकडून ढाणकी शहर कडकडीत बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. स्मार्ट मीटर बसविण्याच्या सक्तीविरोधात आणि वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ ढाणकी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी वेळोवेळी महावितरण कार्यालयात लेखी व तोंडी निवेदने दिली होती. मात्र, या निवेदनांची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. महावितरणकडून वीज ग्राहकांचे जुने मीटर जबरदस्तीने काढून नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या विरोधात ३५ गावांतील नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि सर्वपक्षीय आज जन आक्रोश मोर्चा देखील काढला .
0
0
Report

अहमदनगर के श्रीरामपूर में अपराध चरम पर, नागरिकों ने उग्र प्रदर्शन शुरू किए

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीने उच्छाद मांडला आहे.. दिवसाढवळ्या व्यावसायिकाची हत्या होतेय, गुन्हेगार कुणाला जुमानायला तयार नाही, अवैध व्यवसाय फोफावले आहेत या विरोधात आता नागरीकही आक्रमक झाले आहेत.. तीन दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून हाॅटेल चालक आकाश दुबय्या या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली त्याला न्याय मिळावा आणी श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारीचे उच्चाटन व्हावे असा विडा सर्वपक्षीयांनी उचलला आहे.. भाजपचे विधानपरिषदचे आमदार विवेक कोल्हे यांनी आज हत्या झालेल्या तरूणाच्या कुटूंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.. मुंबई नंतर सर्वात जास्त गुन्हे घडणारा अहिल्यानगर जिल्हा झाला असून श्रीरामपूरात वाढत चाललेली गुन्हेगारी चिंताजनक आहे याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आमदार विवेक कोल्हे यांनी म्हणटलंय...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top