445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कुडाळ कार्यक्रम में विनायक राऊत ने निलेश राणे पर बिना नाम लिए टीका
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग ज्यांनी आयुष्यभर राणेचा तिरस्कार केला.. त्यांची नियतीनेच विकेट काढली राणेना काहीच कराव लागलं नाही त्यांच्या घरच्या माणसानेच विकेट काढलीं विनायक राऊत यांना आमदार निलेश राणे यांचा नाव न घेता टोला कुडाळ येथील एका कार्यक्रमात बोलताना निलेश राणेनी केली टीका0
0
Report
कर्ज माफ़ी से किसानों को बड़ा तोहफा, गोकुळ दूध की मांग ने खींचा ध्यान
Kolhapur, Maharashtra:वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रेस मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला कोल्हापूर जिल्हा बँकेत 2 लाखावरील 436 कोटी, दोन लाख आतील 175 कोटी अनुदान मिळणार आहे त्याप्रमाणे जिल्ह्यातील 2 लाखांच्या आतील 26874 तर 2 लाखावरील 2182 शेतकरी आहेत प्रोत्साहन अनुदानात जिल्ह्यातील 2 लाख 78 हजार 810 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे ऑगष्टपासून अंमलबजावणी सुरु होईल On आमदार शिवाजी पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपसात हे टाळा पण ते ऐकत नाहीत त्यांनी बँकेची माहिती घ्यावी, त्यांच्या ज्ञानात भर पडेल हेरे सरंजाम हे प्रकरण नर्सिंहराव पाटलांनी मार्गी लावला होता जिल्हाधिकारी दौलत देसाई हे चंदगडचे असल्याने त्यांनी यामध्ये कामं केले आह आमदार पाटील यांनी केवळ वर्ग दोन ची एक व 55 लाख फी माफ केली On गोकुळ दूध वाढ तुकाराम मुंडे यांचे आभार एकदा प्रामाणिक अधिकारी आला तर काय बदल होतात हे लोकांनी पाहिले आहे 25 टक्के दूध भेसळ येत होते हे सिद्ध झाले याचा परिणाम गोकुळचे दूध विक्री वाढले आहे पण संकलन कमी झाले आहे. संचालक मंडळ येईल राज्यभरात गोकुळ दूध मागणी आणखी वाढणार आहे0
0
Report
जामखेड के राजेवाड़ी विवाह समारोह में नाम न बताने पर तलाठी ने माइक मारकर घायल किया
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथे एका विवाह सोहळ्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. सूत्रसंचालन करणाऱ्या तरुणाने आपले नाव पुकारले नाही या रागातून तलाठी असलेल्या व्यक्तीने डोक्यात माइक मारत जोरदार मारहाण केली आहे. या प्रकरणाची तक्रार जामखेड पोलिसात दाखल करण्यात आली आहे. राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात अशोक पठाडे हे पाहुण्यांचे स्वागत करत होते. यावेळी तलाठी शिवाजी हजारे यांनी आपले नाव माईकवर का घेतले नाही, असा जाब विचारला आणि हजारे यांनी वाद वाढल्यानंतर शिवीगाळ करत हाणामारी सुरू केली आणि हातातील लोखंडी रॉड असलेला माईक डोक्यात मारल्याने पठाडे जखमी झाले. उपस्थितांनी मध्यस्थी करून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में नवविवाहित महिला की मौत: दहेज के कारण हत्या का आरोप
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात एका महिन्याच्या चिमुकलीचे बारसे होण्यापूर्वीच एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विवाहितेच्या आईच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या प्रकरणी पोलिसांनी आईच्या तक्रारी वरून pती, सासू, सासरे आणि नंदे विरोधात तक्रार दाखल केली आहे. कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय अस्मिता प्रतीकसिंह काटकर यांचा रविवारी राहत्या घरी मृतदेह छताच्या पंख्याला ओढणीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता आणि महिनाभरापूर्वी त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता. घरात मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच ही घटना घडल्याने कुटुंबीयांसह परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. घटनेच्या वेळी पती, सासू आणि सासरे बारशासाठी हॉल पाहण्यासाठी बाहेर गेले होते. घरात परतल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडण्यात आला. त्यावेळी अस्मिता यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. पण अस्मिता प्रतीकसिंह काटकर हिने आत्महत्या केली नसून हुंडा आणि मुलगा पाहिजे या हव्यासापोटी तिची हत्या केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता यांचा पती प्रतीकसिंह काटकर, सासरे वीरेंद्र काटकर, सासू मनीषा काटकर आणि नणंद ऋतुजा काटकर यांच्याविरुद्ध हुंडाबळीसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, सासू आणि सासरे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. तक्रारीनुसार, विवाहानंतर काटकर कुटुंबीयांकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. तसेच मुलगा झाल्याच्या कारणावरून अस्मिता यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. एका महिन्याच्या चिमुकलीला आईचा आधार गमवावा लागलेल्या या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे..0
0
Report
भावकी के विवाद में तलवार से हमला, रोहिदास दांडगे के हाथ टूटे; आरोपी गिरफ्तार
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात भावकीका वाद उफाळून आला असून या वादात एकावर तलवारीने हल्ला करत त्याचे हाताचे पंजे तोडल्याचे गंभीर घटना घडली आहे...श्रीगोंदा येथील सुपेकर वस्तीवर हा धक्कादायक प्रकार घडला असून घुगल वडगाव येथील रोहिदास दांगडे हे गंभीर जखमी झालेत... रोहिदास दांडगे आणि त्यांच्या भावकीतील विक्रम दांडगे सागर दांडगे संग्राम दांडगे यांच्याशी गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू आहेत या वादातून यापूर्वी एकमेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत मात्र याच वादाच रूपांतर गंभीर हाणामारीत झाला असून यात रोहिदास दांडगे यांचे दोन्ही पंजे आहेत रोहिदास यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर रोहिदास यांची मुलगी राधिका दांगडे हिने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद आहे या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...त्यानुसार परशुराम दांगडे, अभयराज दांगडे , सागर उर्फ प्रदीप दांगडे दत्तात्रय दांगडे, विक्रम दांगडे , संग्राम उर्फ तात्याराम पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...विक्रम दांगडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे , तर इतर आरोपी फरार झाले आहेत...मागील भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची माहिती आहे...पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या भागातील भावकीचे वाद सर्रास पाहायला मिळतात, अगदी शुल्लक कारणावरून सुरू झालेले वाद पिढ्याlivingपिढ्या सुरू असतात यात वादाच मोठं कारण नसलं तरी परिणाम मात्र गंभीर स्वरूपाचे असतात त्यामुळे गावातील भांडण आणि भावकीच्या भांडणाबाबत वाद घालणारांचं समुपदेशन होणे गरजेचा आहे0
0
Report
वसतिगृहों की सचाई: रियलिटी चेक में खामियाँ उजागर
Nashik, Maharashtra:मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाचा रियालिटी चेक अँकर मागासवर्गीय आणि दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा याकरिता निवास, अन्न आणि निर्वाह सुविधा देणाऱ्या सरकारी आणि अनुदानित वसतिगृहाची दैना उडाल्याचे चित्र कॅगने गेल्या दोन वर्षात राज्यभर केलेल्या वसतिगृहांच्या प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे. काही अनुदानित वसतिगृहांमध्ये विद्यार्थीच आढळले नसल्याने ती बनावट असल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.... नाशिकच्या वसतिगृहाचा देखील झी 24 तास कडून रियालिटी चेक करण्यात आला... या रियालिटी चेक करून विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी वसतिगृहाबद्दल केल्यात...शहरातील आडगाव परिसरात असलेल्या वस्तीगृहात बांधकाम अत्यंत निष्कृष्ट असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली, तर संपूर्ण वस्तीगृहाच्या इमारतीचे खिडकीच्या काचा देखील फुटल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितले.... यामुळे अनेक किडे मच्छर हे रूममध्ये घुसून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानीकारक ठरत आहेत... पावसाळ्यात थेट पोर्चमध्ये पाणी शीरत असल्याचे देखील विद्यार्थ्यांनी सांगितला , तर वस्तीगृहात संगणक कक्ष, जिम त्याचबरोबर ती लायब्ररी देखील असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितल.. वस्तीगृहाच्या इमारतीमध्ये फक्त ग्राउंड फ्लोअरवरच सीसीटीव्ही लावलेले आहेत मात्र संपूर्ण इमारतीत सीसीटीव्ही नसल्याचीदेखील तक्रार विद्यार्थ्यांनी केली.... या संदर्भात झी 24 तास ने केलेलं रियालिटी चेक पाहुयात....0
0
Report
Advertisement
दुध में SNF बढ़ाने के लिए पशukhoadyों में घातक रसायन, मिल्क सेफ्टी खतरे में
Kolhapur, Maharashtra:राज्यात भेसळयुक्त दुधाविरोधात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई सुरू असताना, दुधाच्या गुणवत्तेशी संबंधित आणखी एक गंभीर प्रश्न समोर येत आहे. दुधातील SNF वाढविण्यासाठी बाजारात विविध प्रकारची पशुखाद्ये विकली जात आहेत. यातील अनेक पशुखाद्यामध्ये घातक रसायन असल्याचा संशय आहे. त्यामुळे केवळ भेसळयुक्त दुधावर कारवाई करून चालणार नाही, तर पशुखाद्याच्या गुणवत्तेवरही प्रभावी नियंत्रण असणे आवश्यक असल्याच समोर येत आहे. राज्यात भेसळयुक्त दुधावर अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. दूध पावडर, रसायने आणि इतर पदार्थांचा वापर करून दुधातील SNF कृत्रिमरीत्या वाढविण्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. मात्र आता आणखी एक धोक्याची बाब चर्चेत आली आहे. काही तपासण्यांमध्ये जनावरांच्या पशुखाद्यामध्ये घातक औद्योगिक रसायन आढळल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे मेलामाइन सारखे रसायनाचे अंश दुधात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. डॉ. पी एम काळे, पशु वैद्यक व पशुखाद्य अभ्यासक राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना तज्ज्ञांच्या मते, राज्यातील प्रत्येक पशुखाद्य उत्पादकाची नियमित नमुना तपासणी, प्रयोगशाळा चाचण्या, दोषी उत्पादकांवर कठोर कारवाई आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. सुरक्षित पशुखाद्य मिळाल्यासच सुरक्षित दूध ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे शेतकरी देखील जनावरांसाठी सुरक्षित खाद्यच बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावे अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. भेसळयुक्त दुधाविरोधातील कारवाई जितकी महत्त्वाची आहे, तितकेच महत्त्वाचे म्हणजे दुधाच्या स्रोताची तपासणी. जर पशुखाद्यामधूनच घातक रसायनांचा प्रवेश होत असल्यास, त्यावरही तितक्याच कठोरपणे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, पशुखाद्याची नियमित तपासणी आणि दोषींवर कठोर कारवाई ही काळाची गरज बनली आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.0
0
Report
Love jihad को ब्रांड एम्बेसडर बनाकर चर्चा, हिंदू समाज से सतर्क रहने की मांग
Shirdi, Maharashtra:समाजामध्ये या प्रकारच्या गोष्टी घडत आहे त्यामुळे यांच्याकडे लव्ह जिहादचे ब्रँड अंब्यासीटर म्हणून पाहायचे का अशी चर्चा सुरू.. मी माझ्या समाज बांधवांना सांगेल की हिंदू समाजाने सावध या गोष्टीपासून राहा... पुढील कालावधीत अशा लोकांचे चित्रपट पाहायचे का याचा विचार हिंदू धर्मातील लोकांनी करावा.... अमीर खान यांच्या तिसऱ्या लग्नानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया0
0
Report
परीक्षा पारदर्शिता के लिए समिति बनी, गिरफ्तारियां और SIT कार्रवाई तेज
Nashik, Maharashtra:सम्यक विद्यार्थी संघटनेमार्फत एक निवेदन देण्यात आलं होतं.. त्यांच्या मागण्यांचे प्रत्येक प्रश्नाचे लेखी उत्तर दिले आहे.. आजच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले आहे.. परीक्षा पारदर्शक पद्धतीने कशा होतील यासाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.. आतापर्यंत सात ते आठ लोकांना अटक करण्यात आली आहे.. SIT मार्फत अनेक ठिकाणी चौकशी व कारवाया सुरू आहेत.. या प्रकरणाच्या खोलात जाऊन शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून कोठारात कठोर शिक्षा होईल अशा प्रकारच्या आदेश दिले आहेत.. प्रशांत बोराडे,वंचित प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सम्यक विद्यार्थी संघटना पेपर फुटी नंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून आंदोलन झाली होती.. शिक्षण मंत्र्यांच्या घरावर आंदोलन केल्यानंतर बैठक घेतली होती.. मागील बैठकीत काही तोडगा निघाला नाही.. त्यानंतर आम्ही आठ दिवसाचा त्यांना अल्टीमेटम दिला होता.. आज त्यांनी भेटीसाठी बोलावल्याने आंदोलन थांबवलं.. थेट राज्याचे शिक्षण मंत्री बैठकीला उपस्थित असल्याने अनेक प्रश्न सुटले आणि काही प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार आहोत त्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले..0
0
Report
Advertisement
पंढरपुर के तुळशीमाळा में चीन माळा घुसपैठ, वारकऱ्य से फर्जी माळा सावधान
Pandharpur, Maharashtra:विठ्ठलाच्या भक्तांच्या तुळशी माळेतही चायना माळांचा शिरकाव, पंढरपूर मधील तुळशी कारागिरांची संख्या घटली आषाढी वारीला आलेला विठ्ठलाचा भावीक आवर्जून तुळशीमाळ खरेदी करत असतो. मात्र सध्या चायना तुळशीमाळा विक्री होत असल्याने वारकऱ्यांची फसवणूक सुद्धा होत असते. त्यामुळे वारकऱ्यांनी असे माळा खरेदी करताना तपासून या खरेदी करण्याची गरज आहे. सध्या पंढरपूर मधील काशी कापडी समाज मोठ्या प्रमाणात तुळशी माळा बनवत आहे. गोल मनी, चक्री मणी, गुरु मणी, एक पदर , दोन पदर अशा पद्धतीने रचना असलेल्या माळा फक्त तुळशी लाकड वापरून तयार होतात. मात्र आता. चायना पद्धतीच्या सुद्धा तुळशी माळा बाजारात विक्री होत आहेत. त्यामुळे काशी कापडी समाजाच्या निम्मे कारागीर कमी झाले आहेत. तुळशीच्या लाकडा पासून तयार केलेली माळ छिद्र लहान असते, मण्यावर साल असते. तर चायना माळ चमक असते, त्याचे छिद्र मोठे असते. मणी मऊ असतात. या गोष्टींची काळजी घेऊन वारकऱ्यांनी माळा खरेदी कराव्या.0
0
Report
नाशिक में बारिश से भाजीपाला महँगा, कोथिंबीर के दाम रिकॉर्ड ऊँचे
Nashik, Maharashtra:गेल्या आठवड्यात संपूर्ण नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतातील उभे पीक काही प्रमाणत नाशवंत झाल्याने कोथिंबीर मालाची आवक वाढली आहे. त्यातच परराज्यांतील बाजारपेठेत कोथिंबीर शेतमाल कमी पडला आणि परिणामी बाजारभाव तेजीत आले आहेत. काल नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर मालाला शेकडा २१ हजार रुपये (२१०) रुपये प्रति जुडी असा यंदा हंगामातील उच्चांकी दर मिळालाय. नाशिक मध्ये पावसामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचा दिसून येत आहे जून महिन्यात पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या कसरतीने आपला भाजीपाला हा त्या ठिकाणी वाचवला. मात्र मागील आठवड्यात झालेल्या दोन दिवसांच्या पावसात शेतांमध्ये पाणी साचलेला उभं पीक ही खराब झाली आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला. कोथिंबीरच्या जुडीला दोनशे रुपये भाव मिळत असून मेथी, पालक आणि वांगी, ढोबळी, फ्लावर, कोबी, शेवगा या पिकांच्या दरात देखील दुपटीने भाव वाढत झाले असून पुढील पंधरा दिवस त्याचा परिणाम बाजारपेठांवर कायम राहणार आहे मात्र नाशिकहून मुंबई गुजरात मधील सुरत अहमदाबाद या भागांमध्ये भाजीपाला जात असल्याने त्याचा परिणाम देखील इतर बाजारपेठांवर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाजवी बजेटासाठी भाजीपाला भाव वाढल्याने घरातील बजेट कोलमडल असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिलीये. कोथिंबीर मी ती नाही तर सगळ्याच भाजीपाल्यांचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भाव वाढल्यामुळे घरात खायचं काय हाच मोठा प्रश्न उरला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केलीये. भाव कमी झाले पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केलीये. पुढील पंधरा दिवस त्याचा परिणाम बाजारपेठांवर कायम राहणार आहे मात्र नाशिकहून मुंबई गुजरात मधील सुरत अहमदाबाद या भागांमध्ये भाजीपाला जात असल्याने त्याचा परिणाम देखील इतर बाजारपेठांवर होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते.0
0
Report
बीड के ऊसतोड़ मजदूरों के विद्यार्थियों के छात्रावास में गंदगी और सुविधाओं की कमी
Beed, Maharashtra:बीड: ऊसतोड मजुरांच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात गैरसोयींचा डोंगर; अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा उघड ANC - सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या विद्यार्थ्यांच्या निवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळाले. वसतिगृहात सर्वत्र अस्वच्छता असून, एका खोलीत चार ते पाच विद्यार्थ्यांना एकत्र राहावे लागत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी पलंगांची व्यवस्था नसल्याने त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच भोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या अन्नाच्या भांड्यांवर माशा बसलेल्या दिसून आल्या, ज्यामुळे स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी टेबल तसेच वैयक्तिक सामान ठेवण्यासाठी कपाटांचीही व्यवस्था नसल्याने त्यांना कपडे दोरीवर टांगून ठेवावे लागत आहेत. याचाच आढावा घेत विद्यार्थ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी...0
0
Report
Advertisement
अशोक चवान के मंत्रीपद के लिए उज्वल निकम के बयान पर राजनीतिक हलचल
Nanded-Waghala, Maharashtra:माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांना मंत्रिपद मिळवं यासाठी मी दिल्लीत त्यांची वकीली करेल असे वक्तव्य ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी काल नांदेडमध्ये एका कार्यक्रमात केले. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिलीये. नांदेडला मंत्रिपद मिळत असेल तर स्वागत आहे. उज्वल निकम यांच्या सांगण्यावरून जर मंत्रिपद मिळत असेल तर मी पण त्यांच्याकडे लग्गा लावेल असे आमदार चिखलीकर म्हणाले.0
0
Report
AC लोकल की कमी से यात्रियों में रोष, रेलवे पर सवाल
Mumbai, Maharashtra:मुलुंड मध्ये सकाळी एसी लोकलमध्ये एसी सुरू नसल्यामुळे महिलांना श्वास घेण्यासाठी त्रास झाला या घटनेनंतर प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय मध्य रेल्वेवर एसी लोकल फ्रिक्वेन्सी आधीच कमी आहे त्यात या लोकल वेळेत येत नाहीत ज्यामुळे एसी लोकलचे तिकीट काढून देखील कधी कधी गर्दीमुळे जनरल डब्यातून प्रवास करावा लागतोय त्यात अशा प्रकारांमुळे एसी लोकल ने आता प्रवास नेमका करायचा तरी कसा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे0
0
Report
सुझय विक्हे के निरीक्षण से नगर-मनमाड महामार्ग पर ट्रैफिक सुधार की उम्मीद
Shirdi, Maharashtra:झी 24 तासाच्या बातमीचा इम्पॅक्ट , नगर मनमाडच्या सुरू असलेल्या कामाच्या पाहणीला सुजय विखे महामार्गावर... नगर–मनमाड महामार्गाच्या कामाची माजी खा.सुजय विखे कडून यांची पाहणी... खड्डेमय नगर मनमाड महामार्ग या झी 24 तासच्या बातमीनंतर सुजय विखेंकडून ठेकेदारांची कानउघाडणी... सावळीविहीर येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम... कामात ठेकेदारांकडून त्रुटी झाल्याची सुजय विखेंनी स्पष्ट कबुली... अधिकारी आणि ठेकेदारांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश... पुढील तीन दिवसांत वाहतुकीची समस्या कमी होणार असल्याचा सुजय विखेंचा दावा... गुरु पौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन... महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्याबत प्रशासनाला सुजय विखेंच्या सूचना...0
0
Report
Advertisement
