445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
हिंगोली-परभणी सीट पर राष्ट्रवादी काँग्रेस ने दावेदारी जताई
Hingoli, Maharashtra:अँकर - येणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार होणार... असा दावा राष्ट्रवादीचे वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी केला आहे. दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त सदस्य असल्यामुळे राष्ट्रवादीचाच आमदार होणार असल्याचा दावा चंद्रकांत नवघरे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर या वेळेस हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ही संधी असावी असे देखील आमदार नवघरे म्हणाले आहेत. आज हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आमदार नवघरे बोलत होते. त्यामुळे महायुतीतून पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर दावा केला आहे.0
0
Report
नागपुर कोठीरोड महाल में गोलीबारी: तीन बाइक से आये छह ने गोली चलाई
Nagpur, Maharashtra:नागपूर कोठीरोड महाल येथे गोलीबारी के घटनेने खळबळ उडाली. रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारासची घटना; तीन बाईकवर आलेल्या सहा जणांनी केली दोनदा फायरिंग. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ नावाच्या फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे रवी मोहतो, गंगा काकडे यांनी फायरिंग केली. वर्चस्व, दहशत पसरविण्यासाठी केली फायरिंग. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; अमली पदार्थ विक्री व बाळगण्याचे गुन्हे. त्यांच्यातील अंतर्गत वादातून ही फायरिंग झाली. कोतवाली पोलीस स्टेशन घटनेचा पुढचा तपास करीत आहे. राहुल मदने, पोलीस उपायुक्त0
0
Report
सदाभाऊ खोत ने कांग्रेस और मित्र पक्ष को घुबड़ की औलादी कहा
Sangli, Maharashtra:स्लग - काँग्रेस व मित्र पक्ष म्हणजे घुबडाची औलादी - आमदार सदाभाऊ खोत. अँकर - काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्ष म्हणजे घुबडाची औलादी आहेत,या घुबड्यांनी कधी गावगाड्यातल्या आणि शेतकरयांच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही,अशी घणाघाती टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचत आणि सोने खरेदी करू नका,असा सल्ला दिल्यानंतर आयत खाऊना चिंता लागली आहे,ज्यांना सत्ता मिळत नाही,सत्तेची डोहाळे ज्यांना लागलेत,त्यांना चिंता लागली आहे, अशी बोचारी टीका देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे सांगली मध्ये पार पडलेल्या आत्मनिर्भर परिषदेमध्ये ते बोलत होते. साऊंड बाईट - सदाभाऊ खोत - आमदार0
0
Report
Advertisement
महेंद्र गायकवाड हिंदकेसरी खिताब फतह, पृथ्वीराज मोहोळ चोट से बाहर
Satara, Maharashtra:सातारा: महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. पैलवान महेंद्र गायकवाड आणि पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम लढत सुरू असतानाच पृथ्वीराज मोहोळ यांना दुखापत झाल्याने त्यांना सामना अर्धवट सोडावा लागला. त्यामुळे महेंद्र गायकवाड यांनी ५२ व्या हिंदकेसरी स्पर्धेचा किताब पटकावला.अंतिम सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही पैलवानांकडून आक्रमक खेळी पाहायला मिळाली. यावेळी महेंद्र गायकवाड यांनी पृथ्वीराज मोहोळ यांचा हात पकडून जोरदार डाव टाकला. या झटापटीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर काही काळासाठी कुस्ती थांबवण्यात आली.वैद्यकीय तपासणीनंतर पृथ्वीराज मोहोळ यांनी सामना पुढे खेळणे शक्य नसल्याचे सांगत माघार घेतली. त्यामुळे पंचांनी महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित केले. विजयाची घोषणा होताच मैदानात उपस्थित प्रेक्षकांकडून जल्लोष करण्यात आला. महेंद्र गायकवाड यांच्या या विजयामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, हिंदकेसरी किताब त्यांच्या नावावर जमा झाला आहे. तर दुसरीकडे पृथ्वीराज मोहोळ यांच्या दुखापतीमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.0
0
Report
पवार को लेकर मोदी पत्र पर खोत- पडळकर की चोट, राजनीतिक घमासान पैदा
Sangli, Maharashtra:पंतप्रधान मोदींना शरद पवारांनी लिहिलेल्या पत्रावरून आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे.काही थोर अर्थतज्ञ देशात आहेत,त्यांनी लांबलचक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलंय,पण पत्र लिहून देश सुरक्षित ठेवता येत नाही,असा खोचक टोला आमदार सदाभाऊ खोत यांनी पवारांना लगावला.तर बारामतीच्या पट्ट्याने मोदीला लांबलचक पत्र लिहित सल्ला दिला आहे, ठीक आहे ,पण त्यावर मी जास्त बोललो तर रान तिसरीकडे जाईल,असा टोला पडळकरांनी लगावला,ते सांगलीच्या आत्मनिर्भर परिषदेमध्ये बोलत होते. साऊंड बाईट - सदाभाऊ खोत - आमदार साऊंड बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार.0
0
Report
गोपीचंद पडळकर ने जयंत पाटिल पर तीखी टिप्पणी, लॉकडाउन की आशंका पर हमला
Sangli, Maharashtra:भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांवर केली आहे. आमदार जयंत पाटलांनी देशातील परिस्थितीवर भाष्य करताना लॉकडाऊन होईल, अशा भीती निर्माण झाल्याचं विधान केलं आहे,यावरून गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर ही टीका केली आहे, ते सांगलीच्या आत्मनिर्भर परिषदेमध्ये बोलत होते.0
0
Report
Advertisement
सोलापुर: मंद्रूप क्षेत्र में खेत तालाब में डूब कर दो नाबालिगों की मौत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप मध्ये शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू - दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप मध्ये शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू - 12 व 13 वर्षीय दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यु झाल्याने सर्वत्र शोककळा - मंद्रूप मधील नाईक नगर तांडा परिसरात घडली दुर्दैवी घटना - समर्थ चव्हाण व ओंकार चव्हाण असे दुर्दैवी मृत्यू पडले चिमुकल्यांची नावे - पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे0
0
Report
पनवेल महापालिका ने साल लिए टैंकर से 29 गावों को पानी पुरवठा मंजूर किया
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल महानगरपालिका ने पनवेल शहर और महापालिका में शामिल 29 गावों को अगले 3 वर्षों के लिए टैंकर से पानी पुरवठा करने का निर्णय लिया है. अपर्याप्त पानी के कारण नागरिकों में रोष था. पानी की पर्याप्त आपूर्ति के लिए पनवेल महापालिका के प्रयास चल रहे हैं, पर उसे कुछ वर्षों का समय लगेगा. तब तक नागरिकों को असुविधा से बचाने के लिए पनवेल शहर और 29 गावों को 10 करोड़ रुपये खर्च कर टैंकर से पानी पुरवठा किया जाएगा और इस निर्णय को स्थायी समिति सभापति के माध्यम से मंजूरी दी गई है.0
0
Report
पिंपरी चिंचवड़ में वायरल वीडियो: मंगला कदम ने विलास लांडे के काम को नकारा
Pimpri-Chinchwad, Maharashtra:विलास लांडे यांचे काम केले नाही...महेश लांडगे तुमचे काम केले - राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल...! पण पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका.निवडणुकीत भाजप वासी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मंगला कदम यांनी तशी जाहीर कबुली दिलीय. त्यांच्या कबुलीच हा व्हिडिओ सध्या पिंपरी चिंचवड मध्ये प्रचंड व्हायरल होत आहे..,वास्तविक पाहता मंगला कदम या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक ताकतवाण नेत्या... त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा उमेदवार विलास लांडे यांचे काम केले नसल्याची जाहीर कबुली दिलीय. 2014 मध्ये विलास लांडे राष्ट्रवादी चे उमेदवार होते. तेव्हा महेश लांडगे अपक्ष उमेदवार होते तर 2019 मध्ये विलास लांडे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते...! या दोन्ही वेळी सांगून तुमचे काम केले विलास लांडे यांचे नाही हे मंगला कदम यांनी महेश.लांडगे यांना तोंडावर सुनावले. संभाजी नगर मध्ये सुरू असलेल्या कामावरून भाजप आमदार महेश लांडगे आणि मंगल कदम यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्या वेळी मंगला कदम यांनी महेश.लांडगे यांना त्यांचे काम केल्याची आठवण करून दिली. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून त्याची जोरदार राजकीय चर्चा सुरू झालीय...0
0
Report
Advertisement
रोहित पवार के एजेंडे पर शरद पवार का पलटवार, बारामती में बड़ा खेल तेज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : शरद पवारांना विचारून आमचा पक्ष चालत नाही - उमेशा पाटील *- ऑन रोहित पवार कर्जत जामखेड :* - रोहित पवारांच्या विधानातून त्यांचा अजेंडा स्पष्ट होत आहे. - रोहित पवारांचा छुपा अजेंडा आहे की, अजितदादांची लिगसी स्वतःभोवती केंद्रित करण्यासाठी त्यांनी हा सगळा उद्योग मांडलेला आहे. - वडील, पती गेल्यानंतर त्याचे दुःख त्यांना माहिती, मात्र यांनी अजितदादांचा किती छळ केला हे आम्हाला माहिती है. - सुनेत्रा ताई लोकसभेला उभारल्यावर रोहित पवारांनी काय भाषणे केली होती ते सर्वांना माहिती. तेव्हा ते काका काकी नव्हते का? - अजित दादांचा पुतण्या असून, दादा हयात असताना ते तुम्हाला कळले नाहीत, त्यावेळी दादांना साथ द्यायची होती. - दादा गेल्यानंतर बारामती मतदारसंघ मोकळा झाल्यासारखं त्यांना वाटतंय. - बारामतीचा किल्ला आणि त्याची तटबंदी अभेद्य आहे. - बारामती या राजधानीवर रोहित पवारांसारख्या बांडगुळांना वर्चस्व गाजवता येणार नाही. - त्यांचा डोळा बारामतीवर आहे त्यामुळे अजितदादांबद्दल कळवा दाखवतात. *- ऑन राष्ट्रवादी विलीनीकरण :* - राष्ट्रवादीचे विलीनीकरण कधीही होणार नाही. - आमच्या पक्षातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना विलीनीकरण मान्य नाही. हे कधीही होणार नाही हे लॉक करून ठेवा. - तुतारीचे आमदार, खासदार फुटून घड्याळाकडे येऊ नये म्हणून विलीनीकरणाचे गाजर सातत्याने समोर ठेवले जाते. - विलीनीकरणाची चर्चा त्यांच्या पक्षातील आजी-माजी प्रदेशाध्यक्ष रोहित पवार करतात आमच्यातले कोणीही करत नाही. - सुनेत्रा पवार यांची बिनविरोध होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध होई नये यासाठी या लोकांनी प्रयत्न केले. - जे उमेदवार अर्ज काढून घेत होते त्यांना काढू नका म्हणून त्यांनी (पवार गटाने) सांगितले. - रोहित पवारांना दादांबद्दल एवढा कळवळा होता तर मग बारामती ॲग्रोला मतदानादिवशी सुट्टी का दिली नाही? - मतदानासाठी शासकीय सुट्टी असताना रोहित पवारांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली नाही, कारण रेकॉर्डब्रेक मतदान होऊ नये म्हणून. - त्यामुळे यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे यांच्या पोटात आणि ओठात वेगळं आहे. *- ऑन भाजपसोबत गेल्यास वेगळा निर्णय :* - रोहित पवार हे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यापेक्षा वरिष्ठ नेते झालेले आहेत. *- 2016 पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान रोहित पवारांनी जर मला तिकीट नाही दिलं तर मी आणि आमचा परिवार भाजपमध्ये जाऊ अशी धमकी शरद पवारांना दिली होती.* - त्यावेळी शरद पवारांनी अजित दादांना विचारायला सांगितलं. 2016 मध्ये रोहित पवार भाजप मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. - विलीनीकरण होणार होतं म्हणजे काय? आमचे आमदार तुतारीकडे जाणार होते का? - रोहित पवारांना मंत्री होण्याची अपेक्षा होती परंतु त्यांना अडथळा निर्माण झाला म्हणून ते आमच्या नेत्यांमागे लागले होते. - उद्या रोहित पवारांना कुठूनही ऑफर मिळाली तर ते तिकडे जाऊ शकतात *- ऑन राष्ट्रवादी फेरबदल :* - रोहित पवारांना कर्जत जामखेडच्या प्रश्नांपेक्षा इतर सर्व प्रश्नांमध्ये इंटरेस्ट आहे. - ते विरोधी पक्षात आहेत मात्र भाजपाच्या संदर्भात त्यांना बोलताना केव्हा पाहिला आहे का? - शिवसेना एकनाथ शिंदे संदर्भात बोलतात ka? - मतदार संघामध्ये एमआयडीसी आणण्याचं गाजर दाखवलं त्यावर ते बोलतात ka? - ते फक्त आमच्या पक्ष.. घडामोडींवर बोलतात - कोणाला मंत्री करायचं कोणाला काढायचं हा अधिकार सर्वस्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. - रोहित पवार स्वतःला मुख्यमंत्र्यांच्या वरचे सुपर पॉवर समजतात का? *- ऑन शरद पवारांकडे साकडे :* - घड्याळ चिन्हाच्या पक्षाच्या लोकांनी जाऊन शरद पवारांकडे आमचं गाऱ्हाणं मांडण्याचा विषयच कुठे येतो? - शरद पवारांना विचारून आमचा पक्ष चालत नाही.. आमचा पक्ष हा सुनेत्रा पवारांच्या विचारांनी चालतो - हे रोहित पवार बोलतात शरद पवार स्वतः असं म्हणतात ka? ( भेटायला आलेल्या घडायचे लोकांनी मला असं असं म्हटलं ) - पार्थ पवारांना समज द्यावी असं सांगायला आमचे नेते गेले होते असं सुपीक बुद्धीतून कुठे जन्माला आल? - यामध्ये रोहित पवार अशा पद्धतीचे फेक स्टेटमेंट करतात.. काला कसलाही आधार नसतो. - माध्यमांमध्ये आमच्या पक्षाबद्दल उलट सुलट चर्चा व्हावी.. आमदार,नेते, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा याच्याकरता ते प्रयत्न करत असतात. *- ऑन शरद पवार :* - कोणत्या आमदारांनी शरद पवार साहेबांना फोन केला ते सांगा. - आमच्या पक्षातील आमदार सत्तेत नसणाऱ्या पक्षाकडे जाऊन काय साध्य करणार. - आमच्या सर्व आमदारांचा सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. - अजितदादां मूळे ते आमदार म्हणून निवडून आले. दादांमुळेच त्यांच्या मतदारसंघात निधी मंजूर झाला. विकास कामे झाली आणि ते निवडून आले. - दादांनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याचा निर्णय सर्व आमदारांनी घेतला. - आमच्या आमदारांच्या मनात काही शंका असतील तर ते सुनेत्रा वहिनी यांच्याकडे जातील. - या सर्व बातम्या खोट्या आहेत ते रोहित पवार पेरत आहेत. *- ऑन मुख्यमंत्री पार्थ पवार भेट :* - संसदेतील सदस्य म्हणून पार्थ पवार हे सरकार मधल्या कामामुळे फडवणीस यांना भेटले. - मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांना भेटायला जाताना मुख्य नेते सोबत असावं असं काही नसतं. - मुख्यमंत्री यांची वेळ तातडीने मिळाली असेल त्यामुळे ते भेटायला गेले असतील *- ऑन रोहित पवार आमदार कॉल :* - अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या दोन तासात रोहित पवार यांनी आमदारांना कॉल लावला हे सत्य आहे. - त्यावेळेस आपल्याला एकत्र यावे लागणार आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करू. - अशा प्रकारचे फोन तुतारींच्या नेत्याकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना सुरू झाले होते. - अजितदादांच्या कुटुंबीयांना बाजूला करून हा पक्ष गिळंकृत करायचा प्रयत्न होता. - तुतारीच्या नेत्यांना विलीनीकरणाच्या नावाखाली हा पक्ष ताब्यात घेण्याची घाई झाली होती. *- हे षडयंत्र लक्षात आल्याने तातडीने सुनेत्रा वहिनींची उपमुख्यमंत्रीपदी शपथ झाली. या अस्वस्थतेतून रोहित पवार आमच्या पक्षाला टार्गेट करत असतात.* *- ऑन जिशान सिद्धकी आमदारकी :* - सुनील तटकरे यांना बदलून दुसऱ्या कोणाला नेमले असं पत्र पक्षाकडून काढला आहे का? - त्यामुळे सुनील तटकरे हे सध्यातरी आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. *- निवडणूक आयोगाच्या पत्र व्यवहारांमध्ये सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष लिहिलं नाही म्हणून त्यांना पदावरून कमी केलं असा अर्थ काढण्याची गरज नाही.* *- ऑन राष्ट्रवादी पक्ष फुटी :* - पक्षफुटी संदर्भात आमदारांच्या मनात तीळमात्र शंका नाही. - हे जाणीवपूर्वक बातम्या पेरण्याचं काम मीडियाला हाताशी धरून केलं जात आहे. सध्याचे आमदार जाणार कुठे, फुटून काय तुतारीत जाऊन बसणार का.? *- उमेश पाटील ऑन रोहित पवार :* - लहान्या भावाला दिलेला सल्ला आम्ही पार्थ पवारांपर्यंत पोहोचवू. *- रोहित पवारांचा स्वभाव कसला आहे ते संबंध बारामती कराना माहिती आहे* - आम्ही पार्थ पवार यांच्यासोबत काम करतोय, कुणीही हलक्या कानाच नाही. स्वभावाचा विचार केला असता, रोहित पवार यांचा स्वभाव कसला आहे, याबाबत सगळ्या बारामतीकराना आणि त्यांच्या मतदार संघाला माहिती आहे. - रोहित पवार यांना कार्यकर्ता जवळ आलेला सहन होत नाही, त्यांच्या जवळ शंभर दीडशे पी ए आहेत, पी ए च्या फिल्टर मधून जाऊन कार्यकर्त्याची भेट होते. अशी बाब पार्थ पवारांच्या बाबतीत नाही. - कुठलाही कार्यकर्ता थेट पार्थ पवारांना कॉल करू शकतो, तसं रोहित पवारांना थेट कॉल केला तर शिव्या पडतात. त्यामुळे स्वभाव बदलण्याची आवश्यकता रोहित पवाराना आहे . *- ऑन कृषी कर्ज माफी :* - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 30 जून पर्यंत कर्ज माफी करू असे सांगीतल आहे. - हा त्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे, अतिवृष्टी मुळे शेतकरी अडचणीत आला आहे. - मी हिरोगिरी करत असेल तर ठीक आहे, तुम्ही मात्र महाराष्ट्र राज्याचे व्हीलन होऊ नका. - तुमचं पितळ उघडे पाडायला साध्या कार्यकर्त्याची गरज आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे, हिरोगिरीची आवश्यकता नसते. *- ऑन संजय शिरसाठ :* - एक आनंद परांजपे यांचा प्रवेश झाल्याने हुरळून जाऊ नका. तुमचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. - माईक समोर आला म्हणून काहीही बोलू नका. *- ऑन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश :* - फुले,शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने कार्यरत आणि सत्तेत असणारा एकमेव पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. - विरोधात असणारे सेक्युलर पक्ष आहेत आणि त्यांच्या पक्षाचे आमदार आणि खासदार यांना त्यांच्या विचारांशी कॉम्प्रमायज करायचं नाही. आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांना विकास काम देखील करायचे आहेत. - त्यामुळे विरोधात असलेल्या पार्टीचे जे आमदार, खासदार आहेत. त्यांना जर पक्षांतर करायचं असेल तर प्राधान्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ आहे. - सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात विरोधातील आमदार, खासदार असतील किंवा इतर पक्षातील असतील ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्कात आहेत. - याबाबतीत लवकरच तुम्हाला घडामोडी झालेल्या दिसतील. *- ऑन दादा घातपात रोहित पवार वक्तव्य :* - रोहित पवार जे बोलले आहेत ते कुठल्या संदर्भाने बोलले आहेत. - ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि तुतारी पक्ष हा एकत्रित लढला त्यामुळे आमचा विरोधकच भाजप होता त्यावेळेसची ती परिस्थिती होती. - मग अजित दादांकडे कोणती फाईल होती ती रोहित पवारांनी सांगावे. आणि त्या फायली कोणाकडे असतात गृहविभागाकडे, सीआयडी, सीबीआय आणि ईडीकडे असतील आमच्याकडे कसे असणार फाईल आमच्याकडे कुठे असलं खातं आहे. - रोहित पवार हे मनाने काहीतरी गप्पा मारतात त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. - अजित दादा पवार यांचा अपघात की घातपात हे त्यांच्याच पक्षातील राष्ट्रीय आणि सर्वोच्च नेत्यांनी अजितदादांच्या अंत्यविधी अगोदरच हा घातपात नसून अपघात आहे असे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. - ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांच्या अनुभवाच्या जोरावरच पत्रकार परिषद घेऊन हे कारण सांगितलं असेल मात्र रोहित पवार हे विपरीत बोलत आहेत. - रोहित पवार यांनी जे अजित पवारांच्या अपघाताबद्दल जे मुद्दे घेतले आहे ते योग्य आहेत आमचं त्याला समर्थन ही आहे.आम्ही ते नाकारत नाही. - याबाबत सीबीआयकडे आम्ही त्यांचे मुद्दे घेऊन पत्र दिलं आहे. - रोहित पवारांचा उद्देश हा अजित पवार यांच्या अपघात आणि शोध लागावा यासाठी नसून अजित पवार यांची सहानभूती आपल्याकडे केंद्रित करण्याचा आहे. - आणि भविष्यकाळात बारामती मतदार संघावर आपला दावा करणं ही धडपड आहे. अजित पवारांच्या प्रेमापोटी नाही. BYTE : उमेश पाटील (नेते, राष्ट्रवादी अजितदादा गट)0
0
Report
कल्याण के चक्की नाका क्षेत्र में तबेले की माला गिरने से दो कर्मचारी घायल
Kalyan, Maharashtra:कल्याणपूर्वेच्या चक्की नाका परिसरातील तबेलाचा काही माळा कोसळला. या दुर्घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला होता. चक्की नाका परिसरात गाई आणि म्हशींचा तबेला आहे. या तबेलामध्ये चारा ठेवण्यासाठी जो माळा बनवण्यात आला होता तो सायंकाळी आठच्या सुमारास अचानक कोसळला. यात तबेलातील दोन कर्मचारी किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर तब्येतीला साहित्य त्याचबरोबर गाई आणि म्हशी दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदतकार्य केलं.0
0
Report
ATM से गलत निकासी: 100 के बदले 500, 400 के बदले 2000, वीडियो वायरल
Vasai-Virar, Maharashtra:वसईच्या गोलानी नाका परिसरात एका एटीएम मशिनने ग्राहकांना अक्षरशः ‘लॉटरी’ लावल्याचा प्रकार समोर आला आहे. हिताची एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 100 रुपयांऐवजी 500 रुपये, तर 400 रुपयांऐवजी थेट 2000 रुपये बाहेर येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ एका ग्राहकाने मोबाईलमध्ये कैद केला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, माहिती मिळताच बँक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, एटीएम सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
जुन्नर बेल्हे में ST बस पलटी, एक की मौत, कई घायल
Shirur, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील गुळुंचवाडी फाट्यावर आज सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची लालपरी एसटी बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. यात चालकासह 1 प्रवासी मृत झाले आहेत. बस क्रमांक MH14-BT 4023 ही बस भिवंडी डेपोची असून शेगावहून कल्याणकडे जात होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये प्रवाशांची संख्या 30 ते 35 होती. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य करण्यात आले. सर्व जखमींना उपचारासाठी अळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.0
0
Report
जालना में अवैध खाद स्टॉक गिरफ्तार, किसान धोखाधड़ी रैकेट का पर्दाफाश
Jalna, Maharashtra:जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात ही घटना समोर आली आहे.शेतकऱ्यांची फसवणूक करून अनधिकृतरीत्या खतांचा साठा करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा कृषी विभागाच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १ हजार ७६२ खताच्या गोण्या आणि जवळपास १८ लाख ७ हजार १८४ रुपयांचा संशयित खतसाठा जप्त करण्यात आला आहे.विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेलं खत नांदेडमधील इफको फर्टिलायझर्सकडे विक्री झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं.मात्र प्रत्यक्षात हे खत जालन्यातील जय भारत अँग्रो ट्रेडर्सच्या गोदामात आढळून आल्यानं चंदनझिरा पोलीस ठाणीयात जय भारत अँग्रो ट्रेडर्सचे मालक आकाश बायस यांच्यासह नांदेडचे इफको फर्टिलायझर्सचे मालक अनिल बाळा प्रसाद मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.0
0
Report
घोड़ागाड़ी से इंधन बचत का संदेश, सांसदों की अनोखी पहल सुर्खियों में
Sangli, Maharashtra:संगलीमध्ये आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी थेट घोडा गाडीतून प्रवास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या वतीने सांगलीत आत्मनिर्भर भारत नागरिक शेतकरी कष्टकरी परिषदेचा आयोजन करण्यात आलं. या परिषदेला आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी शरदला सर्किट हाऊस येथून मारुती चौकापर्यंत घोडा गाडी चालवत प्रवास केला आहे. आमदार महोदय घोडा गाडीतून जात असल्याने यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.0
0
Report
Advertisement
