Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!

Oct 12, 2024 17:36:35
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Dec 08, 2025 09:23:12
Pune, Maharashtra:अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर अहिल्यानगरच्या किन्ही गावातील नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर तालुक्यातील किन्ही गावातील नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात भागूबाई खोडदे या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेला आठवडा उलटूनही वनविभागाकडून कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. गावात बिबट्याचा वावर असल्याचे वारंवार सांगूनही वनविभाग करावाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान वनविभागाकडून बिबट्या असल्याबाबत ग्रामस्थांनाच पुरावे मागितले जातात, याबाबत अहिल्यानागरचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांना विचारले असता सध्या AI च्या माध्यमातून फेक व्हिडीओ बनवले जातात त्यामुळे आम्हाला बिबट्या आहे की नाही याची खात्री करूनच कारवाई करता येते असं म्हंटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान भागूबाई खोडदे यांच्या दशक्रियाच्या पूर्वी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली याबाबत उपवनसंरक्षक यांनी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं.
0
comment0
Report
SKShubham Koli
Dec 08, 2025 09:20:18
Thane, Maharashtra:ठाण्यात 100 वर्ष जुन्या झाडांवर कुऱ्हाड बसण्याची शक्यता? r राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी मनोरुग्नालयाला दिली भेट.. नाशिक मधील तपोवन येथील वृक्षतोडीचा मुद्दा ताजा असतानाच आता ठाण्यातील 125 वर्षे जुन्या असणाऱ्या मनोरुग्र्णालयाच्या आवारातील तब्बल 100 वर्ष जुनी वृक्ष कत्तल करण्यात येणार असल्याचं समजलं जातंय बंगलोरच्या धरतीवर सुसज्ज असं मनोरुग्र्णालय ठाण्यात उभारण्यात येणार असल्याने व नवीन रेल्वे स्थानकाच्या निर्मिती करिता महानगरपालिका व एमएमआरडीए च्या माध्यमातून ही वृक्षतोडी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी आज मनोरुगृनालयातील आवारास भेट दिली व पाहणी देखील केली आहे.. या ठिकाणी अनेक असे हेरिटेज झाड आहेत त्याची कत्तल व्हायला नको ठाण्यातला हे एकमेव भाग आहे.. हिवाळी अधिवेशनात जितेंद्र आव्हाड हा मुद्दा अधिवेशनामध्ये देखील उचलून धरणार आहेत सामान्य नागरिकांनी देखील पुढे यायला हवं असे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रधान म्हणाले आहेत तसेच वृक्षांची कत्तल करू नये याकरिता रुग्णालय प्रशासनाला त्यांनी निवेदन देखील दिले आहे.. मनोरुग्णालयातील आवारातील कोणती झाडे नेमकी कत्तल केली जाणार आहेत व कोणती झाडे वाचवली जाणार आहेत याबाबत सर्व माहिती ही महापालिका व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे..
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 08, 2025 09:19:03
Pune, Maharashtra:अहिल्यानगर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील तब्बल ४३८१ नावे समाविष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे... तसेच या संदर्भात लेखी हरकतही नोंदवली आहे...ही सर्व नावे श्रीगोंदाच्या मांडवगण जिल्हा परिषद गटातील असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे... मात्र महापालिका प्रशासन सत्ताधारी नेत्यांच्या दबावाखाली काम करत असून जर या नावांबाबत अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, तर भविष्यात न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सांगितले आहे.
75
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 08, 2025 09:15:29
Shirur, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपूर अधिवेशनात माध्यमांशी बोलताना बिबट्याच्या किंवा वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसाला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत असं म्हटलंय तर शासनाच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो परंतू हा निर्णय लवकरात लवकर व्हावा असं मृत शिवन्या बोंबे आणि रोहन बोंबे च्या वडीलांनी म्हटलंय आमच्या पोटचा गोळा गेलाय सरकारी नोकरी ने ही पोकळीक भरून येणार नाही असं म्हणत यापूर्वी हि अनेक घटनांमध्ये शासनाने सरकारी नोकरीची आश्वासने दिली पण अनेक आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाही या ठिकाणी हि तसं व्हायला नको असं म्हणत तातडीने हा निर्णय घेऊन याची अंमलबजावणी करावी पिंपरखेड येथील पिडीत नातेवाईकांनी म्हटलंय...
82
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 08, 2025 09:03:07
Jalna, Maharashtra:जालना : अतिवृष्टी अनुदान घोटळयातील 6 तालुक्यांचा अहवाल 11 महिन्यांपासून रखडला जिल्हा प्रशासनाचे अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या तपासाकडे दुर्लक्ष अतिवृष्टी अनुदान घोटाळा 100 कोटींचा,दोषींवर कारवाई करा-भाजप आमदार बबनराव लोणीकरांची मागणी जिल्हाधिकारी दोषींवर कारवाई करत नसल्याचा लोणीकरांचा आरोप जालन्यातील बहुचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील 6 तालुक्यांचा अहवाल 11 महिन्यांपासून रखडला आहे.गेल्यावर्षी जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा समोर आला होता.जून ते ऑक्टोबर 2024 मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती.या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं होतं.हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग न करता तलाठी, मंडळाधिकारी,कृषी सहाय्यक यांनी बोगस बँक खात्यात वळवून कोट्यवधी रुपयांची अफरा तफर केली होती.नायब तहसीलदार आणि तहसीलदार देखील या प्रकरणात दोषी आढळून आले होते.दरम्यान या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळांनी चौकशी समिती नेमली होती.या चौकशी समितीने केवळ अंबड आणि घनसावंगी या दोनच तालुक्यांचा अहवाल सादर केलाय.मात्र जिल्ह्यातील ईतर 6 तालुक्याचा अहवाल अजूनही चौकशी समितीने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेला नाही.त्यामुळे प्रशासन या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांसह भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे.
82
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 08, 2025 07:54:09
Dhule, Maharashtra:सारंगखेडा यां अश्वंच्या पंढरीमध्ये सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे तो, १५ वेळेस विजेता असलेला वाईट कोब्रा घोडा. पंजाबचे जगतारा सिंग यांच्या वाईट कोब्रा घोड्यांच्या स्पर्धेसाठी आला असल्याने, सारंखेडाच्या स्पर्धा हाच कोब्रा जिंकणार का? याची चर्चा सध्या यात्रेत रंगली आहे. नुकरा जातीच्या पांढराशुभ्र रुबाबदार उंची आणि अनेक स्पर्धा विजेता असलेला वाईट कोब्रा घोड्याची सध्या कसारंगखेड्यात क्रेझ पाहायला मिळतेय. देशातील कानाकोपऱ्यांमध्ये होणाऱ्या घोड्यांच्या स्पर्धांमध्ये विजेता पटकावलेल्या जगतारा सिंगच्या वाईट कोब्रा घोडा सारंखेडाच्या अश्व बाजारात दाखल झाला आहे. सरंगखेड्याच्या घोडेबाजार मध्ये होणाऱ्या घोड्यांच्या स्पर्धा दाखल झाला असून, विशेष या वाईट कोब्राऱ्याने जिंदाल लुधियाना स्पर्धेत प्रथम पारितोषिक, भटिंडा प्रथम पारितोषिक, हनुमान गड, प्रथम पारितोषिक अशा असंख्य ठिकाणी प्रथम पारितोषिक पटकावले आहेत, नुकरा जातीच्या वाईट कोब्रा सात वर्षाच्या असून, पंजाब यातून आलेला आहे. या वाईट कोबऱ्याला सांभाळण्यासाठी सहा ते सात लोकांची टीम नेहमी तैनात असते, तर या वाईट कोबऱ्याला खाण्यामध्ये हरभरे, घी, दूध, बाजरी, मका असे पोषक आहार दिले जात असतात, या वाईट कोब्राची उंची ६५ इंच आहे. सारंगखेडा च्या अश्व बाजारात एक से बढकर एक घोडे दाखल होत आहेत. मात्र वाईट कोब्रा सारंगखेड्याच्या यात्रेत पहिल्यांदाच आला असल्याने सारंगखेड्याच्या स्पर्धेत जिंकणार का हेच पाहणं आता महत्त्वाच्या ठरणार आहे.
164
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 08, 2025 07:52:29
Chakan, Maharashtra:पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहत परिसरात वृक्षांची कत्तल करून उत्पादन प्रक्रिया करण्यासाठी हजारो टन वृक्ष जाळले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राहुल बुट्टे पाटील यांनी केलाय, या संदर्भात त्यांनी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री महोदयांना पत्राद्वारे कारवाई करण्याची विनंती केलीय, एकीकडे बिबट्याचा हल्ल्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय तर दुसरीकडे वनांचा अशा पद्धतीने र्हास होत चालल्याची गंभीर बाब बुट्टे पाटील यांनी निदर्शनास आणून दिली असून या साठी त्यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना हि या विषयात लक्ष्य घालण्याची विनंती केलीय त्यामुळे या पुढच्या काळात वन विभागाचे अधिकारी आणि प्रशासन याबाबत काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
157
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 08, 2025 07:51:39
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. On आदित्य विरोधी नेते.. - विधिमंडळाच्या कार्यालयाला भास्कर जाधव यांचे नाव कळविले आहे. नाव देऊन ११ महिने होत आहे. मात्र अध्यक्ष यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.महाविकास आघाडीतील सगळ्यांनी मिळून एकमताने भास्कर जाधव यांचे नाव दिलेलं आहे... ऑन उदय सामंत भास्कर जाधव ऑफर. - या और जा याला काही अर्थ नाही. भास्कर जाधव हे पदासाठी इकडे - तिकडे जाणारे नेते नाहीत. त्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे. ते उदय सामंत सारखे खुर्ची पाहून पाळलेले नेते नाहीत. ऑन फ्लाईट ने अधिवेशन... - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री समृध्दीने महामार्गाचे का गेले नाहीत, सरकारी विमानाने का गेले ? उद्धव ठाकरे हे 11 आणि 12 तारखेला अधिवेशनात येणार आहेत,तुम्हाला दोन चार दिवसाचा अधिवेशन घ्यायचा आहे. अधिवेशन गुंडाळयच आहे. नागपूरच्या प्रश्नासाठी, विकासासाठी नागपूर अधिवेशन घेतले जात आहे. - पाच दिवसाच्या अधिवेशनात काय होणार? जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नये,याचे प्रयत्न तुम्ही करतात... ऑन निलेश राणे माफी.. - यांच काय काय माफ करावे,यांनी कोकणात काय काय केले आहे सर्वांना माहिती आहे. अब जो बूँद से गये, वो हौद से वापस नहीं आती. ऑन कबुतर रक्षक. - सर्वात अगोदर लोढा बिल्डरच्या सर्व साइडवर सुरू करा म्हणव... कारण त्यांची मुंबईत ठिकठिकाणी मोठ मोठे टॉवर आहेत. ऑन मदतीपासून 30 टक्के शेतकरी वंचित. - अतिशय तुटपुंजी मदत आहे. सरकारने पुरेशी जाहीर केलेली मदत मिळालेली नाही. ५० टक्के शेतकरी अजून वंचित आहे. ऑन अजित पवार रोहित नृत्य व्हिडिओ. - काका- पुतण्या यांनी आनंद साजरा केला असेल त्यात वाईट काय? विधानसभेचे सभापती होणे ही मोठी जबाबदारी आहे. त्यांचे हाल झाले असे मानून घेणे योग्य नाही. रामदास आठवले वक्तव्य - आठवले यांचा पक्ष भाजपमधे जाऊन लई मोठा झाला का, स्वतःचा पक्ष दावणीला बांधलेल्यानी शिवसेनेला शिकवू नये. On सोयाबीन आयात. - सोयाबीन, कापूस, ऊस यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. आयात झाला तर सोयाबीनचा भाव अजून पडेल. - शेतकऱ्यांच्या या भूमिकेला समर्थन राहील, येणाऱ्या काळात बंदरावर शिवसेना उतरेल आणि आयात रोखेल.
150
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 08, 2025 07:38:09
Akola, Maharashtra:अकोला शहरात काही दिवसांपूर्वी ७ वीत शिकणाऱ्या १३ वर्षीय शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक प्रकरणाला नवे वळण मिळले आहे. या घटनेनंतर आज हिंदू संघटनांच्या वतीने संबंधित शाळेविरोधात मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आलेल्या एका विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, यासाठी निवेदन देण्यात आले. मोर्चात मोठ्या संख्येने पालक, नागरिक तसेच विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी संघटनांकडून शाळेवर गंभीर आरोप करण्यात आले.
171
comment0
Report
Advertisement
Back to top