445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गंगापुर में 1100 शिक्षक सड़क पर, भाजपा विधायक प्रशांत बंब के खिलाफ मोर्चा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या गंगापूर तालुक्यत आज तब्बल 1100 शिक्षक रस्त्यावर उतरले , हा मोर्चा होता भाजप आमदार प्रशांत बंब आणि जिल्हा परिषद प्रशासन विरोधात, प्रशांत बंब यांनी या 1100 शिक्षकांची तालुक्यत राहत नसल्याबाबत पुराव्यासह तक्रार केली होती प्रशासनाने त्यावर कारवाई करत या शिक्षकांवर कारवाईला सुरुवात केलीय.. त्यामुळं शिक्षक विरुद्ध भाजप आमदार प्रशांत बंब हा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे... भाजप आमदार प्रशांत बंब विरोधात शिक्षक रस्त्यावर मोर्चा काढून प्रशांत बंब आणि प्रशासनाचा निषेध बंब यांच्या तक्रारीनंतर शिक्षकांवर कारवाईला सुरुवात शाळेत शिकवणारे हे सगळे शिक्षक आज प्रशासन आणि स्थानिक आमदार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत, मोर्चा काढून त्यांनी आमदारासह प्रशासनाचा निषेध केलाय.. आणि याच कारण म्हणजे आमदारांनी शिक्षकांची केलेली तक्रार... ग्रामीण भागात राहणाऱ्या शिक्षकांनी खरंतर मुख्यालय म्हणजे ज्या गावात शिकवतात त्या गावी राहावे असा नियम आहे मात्र शहराजवळ असलेले शिक्षक गावात राहत नाही आणि शहरातून अपडाऊन करतात याच बाबत गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला तक्रार दिली, त्यांच्या तालुक्यातील अकराशे शिक्षक मुख्यालय राहत नाही असं त्यांच्या तक्रारीत होतं, मुख्यालयी न राहता गृह भत्ता सुद्धा उचलत असल्याची तक्रार त्यांनी पुराव्यानिशी सादर केली त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनानं कारवाईचा बडगा उभारला आहे, प्रथमदर्शनी चौकशी करत या शिक्षकांची वेतन वाढ रोखली आहे आणि पुढील चौकशी करून या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे मात्र ही कारवाई अन्यायकारक असल्याचं शिक्षकांचे म्हणणं आहे आणि त्या विरोधात आज हे सगळे 1100 शिक्षक गंगापूर मध्ये रस्त्यावर उतरले आणि मोर्चा काढून त्यांनी प्रशांत बंब आणि जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध केला इतकच नाही तर कारवाई मागे न घेतल्यास यापेक्षा सुद्धा मोठा आंदोलन करू असा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.. Byte शिक्षक संघटना Vo 2.. दुसरीकडे आमदार प्रशांत बंब यांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष केले, या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पिढ्या उध्वस्त kele आहेत शिक्षणाला दर्जा नाही, नियम पाळत नाही त्यामुळे यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी असे प्रशांत बंब यांचा म्हणने आहे.. यापुढेही तक्रार करत राहणार अशी आक्रमक भूमिका आमदार प्रशांत बंब यांनी घेतली आहे.. Byte प्रशांत बंब भाजप आमदार Vo 3.. खरंतर शिक्षकांचा आणि आमदार प्रशांत बंब यांचा हा वाद गेल्या काही काळापासून सुरू आहे मुख्यालयी राहण्याचा नियम शिक्षकांना मान्य नाही तर शिक्षक मुख्यालयी राहिले तर विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळेल असा आमदारांचा दावा आहे फक्त शिक्षकच नाही तर तलाठी ग्रामविकास अधिकारी आणि डॉक्टर यांनी सुद्धा मुख्यालयी राहावे अशी त्यांचा मागणी आहे आणि त्या विरोधात त्यांनी तक्रार मोहीम सुरू केली आहे मात्र दुसरीकडे आता शिक्षकच रस्त्यावर उतरले आहे त्यामुळे हा वाद यापुढेही पेटणार असं चित्र दिसतंय.. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...0
0
Report
केंद्र के फैसले से ऊस किसान गुस्से में, 25वीं ऊस परिषद और बड़े प्रदर्शन की तैयारी
Kolhapur, Maharashtra:केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने चालू वर्षी 15 ऑक्टोबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शासनाचा हा निर्णय एकतर्फी असून यामुळे साखर उद्योग, कारखानदार आणि प्रामुख्याने ऊस उत्पादन शेतकरी यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आगामी १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर २५वी ऊस परिषद घेण्याची अधिकृत घोषणा केली. तसेच, साखरेचा हमीभाव आणि इथेनॉलच्या दराबाबत केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी 29 सप्टेबर रोजी कर्नाटक राज्यातील हुबळी येथे देशाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या घरासमोर लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भव्य धरणे आंदोलन करण्याचा मोठा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.0
0
Report
धुळे: महाराणा प्रताप चौक के सरकारी स्कूल में शिक्षकों की मारपीट का वीडियो वायरल
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरातील एका शासकीय शाळा व वसतिगृह परिसरात शिक्षकांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित शिक्षकांनी दारूच्या नशेत शाळा व वसतिगृह परिसरात धिंगाणा घालल्याचा तसेच विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमুখ मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संबंधित शिक्षकांमधील हाणामारीचा व्हिडिओ सीईओंना दाखवत या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली. महाराणा प्रताप परिसरातील शासकीय शाळा व वसतिगृहात दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर दोन शिक्षकांमध्ये दारूच्या नशेत धिंगाणा होत एकमेकांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने शाळा व संस्थेची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी शाळा व व वसतिगृह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. संबंधित प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न झाल्यास सीसीटीव्ही फुटेज डिलीट होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने विलंब न करता फुटेज सुरक्षित करावे, अशी मागणी युवासेनेने केली. झी 24 तास या व्हायरल सीसीटीव्ही फुटेज ची पुष्टी करत नाही.0
0
Report
Advertisement
मनोज जरांगे का मुंबई दौरा स्थगित, शंभूराज देसाई ने किया स्पष्ट रोकथाम का आह्वान
Sangli, Maharashtra:मुंबईतील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबई दौरा स्थगित करावा - मंत्री शंभूराजे देसाई. मुंबईतील गणेशोत्सव जागतिक स्वरूपाचा मानला जातो, त्यामुळे मुंबईतील शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मनोज जरांगे-पाटलांनी त्यांचा मुंबई दौरा स्थगित करावा, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे, मनोज-जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत, त्या बऱ्यापैकी सरकारने मान्य केले आहेत. जी मागण्या राहिल्या आहेत, त्याबद्दल सरकारकडून योग्य ती पावलं उचलण्यात आली आहेत, असे देखील परड्यांमध्ये शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केला आहे, ते सांगलीच्या तासगाव मध्ये रथोत्सव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. दिशा सालीयन मृत्यूप्रकरणी सीबीआयकडुन तपास सुरू झाला आहे, त्यामध्ये ज्या बाबी आढळतील, त्या सीबीआय कडून तपासण्यात येतील, पण केंद्रीय यंत्रणा असणाऱ्या सीबीआय सारख्या यंत्रणेवर राज्यातल्या आमच्यासारख्या लोकांनी बोलणं योग्य होणार नाही, असं मत पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला आहे. दिशа सालीयन यांच्या वडिलांकडून जे नाव समोर आली आहेत, त्याबद्दल देखील योग्य तो तपास करेल, आणि सीबीआयकडून या प्रकरणात योग्य न्याय होईल, असा विश्वासही पर्यटन मंत्री शंभराज देसाई यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. आमची बाजू कायदेशीर आणि संविधानिक असून न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, असं मत शिवसेना सुनावणीवरून शिवसेना शिंदे पक्षाचे नेते पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असणाऱ्या सुनावणी बाबत आपल्या पक्षाच्या वकिलांकडून बाजू मांडण्यात येत आहे, आणखी गरज पडल्यास युक्तिवाद आपल्या पक्षाच्या वकिलांकडून केला जाईल, असा विश्वास देखील मंत्री शंभूराजे यांनी व्यक्त केला आहे.0
0
Report
चांदवड में ऋषिपंचमी पर सप्तर्षी पूजा और चंद्रेश्वर का जलाभिषेक
Chandvad, Maharashtra:पवित्र भाद्रपद महिन्यातील ऋषिपंचमीचा सण चांदवडमध्ये मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात भल्याअपहाटेपासूनच सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी महिला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींची विधिवत पूजा करण्यात आली. शिस्तबद्ध रांगेत महिलांनी सप्तर्षींचे दर्शन घेतल्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करत कुटुंबाच्या आरोग्य आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिमय वातावरणात चांदवडकरांनी ऋषिपंचमी उत्साहात साजरी केली.0
0
Report
गणेशोत्सव के समय महाड के पांच गांव जल संकट में
Chendhare, Maharashtra:पाच गावं, १२ वाड्या पाण्याविना....... १० दिवसांपासून नळ कोरडे; ग्रामस्थांचा संताप धरणात पाणी, गावकऱ्यांच्या नळाला मात्र पाणी नाही ...... रोहन, जुई, कुंबळे, वामने आणि लोअर तुडील या गावांचा पाणीपुरवठा गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. खैरे धरणातून या भागाला पाणीपुरवठा केला जतो. मात्र जुनी आणि नवीन पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे. ठेकेदारामार्फत दुरुस्ती सुरू असली तरी काम पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. घरगुती वापरासाठी पावसाचं पाणी, तर पिण्यासाठी बाटलीबंद पाणी वापरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी आले असतानाच हे संकट आणल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.0
0
Report
Advertisement
श्रीरामपुर में विधायक के सुरक्षा गार्ड ने महावितरण कर्मी के कान छुए, हंगामा
Shirdi, Maharashtra:श्रीरामपुरात आमदाराच्या पोलिस अंगरक्षकाची दादागिरी..? थेट महावितरण कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली... श्रीरामपूर विधानसभेचे काँग्रेसचे आ.हेमंत ओगले यांच्या पोलीस अंगरक्षकाने महावितरण कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर... श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आवारात घडली घटना... तालुक्यात खंडित होणारा वीजपुरवठा आणि कमी दाबाने वीजेसंदर्भात बोलावली होती बैठक.... महावितरणच्या समस्यांवरील बैठकीत झाला होता शाब्दिक वाद.. हरेगाव येथील मतमाऊली यात्रेदरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत सुरू होती चर्चा.... चर्चा सुरू असताना आ.हेमंत ओगले यांचा पोलिस अंगरक्षक गणेश ठोकळ याने वायरमनच्या कानशिलेत... पंकज अशोक खरात असे महावितरण कर्मचाऱ्याचे नाव... आमदाराच्या पोलीस अंगरक्षकाने महावितरण कर्मचाऱ्यांच्या कानशिलेत लगावल्याने महावितरण कर्मचारी आक्रमक... घडलेल्या घटनेबाबत महावितरण कर्मचारी पंकज खरात याने दिली प्रतिक्रिया...0
0
Report
च Chipळुण में कोकण के राजा के साथ हिरकणी का जीवंत प्रदर्शन, शिवकालीन इतिहास उजागर
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या 'कोकणचा राजा' गणेशोत्सवात अवतरली हिरकणी; बहादूर शेख नाक्यावर जिवंत झाला शिवकालीन इतिहास.. अँकर चिपळूण: येथील बहादूर शेख नाका परिसरातील कोकणचा राजा सार्वजनिक मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनासोबतच शिवकालीन इतिहासाला उजाळा देणारा 'हिरकणी'चा जिवंत देखावा साकारला आहे.. आपल्या बाळाच्या ओढीने रायगडाचा अतिशय बिकट आणि उभा कडा काळोख्या रात्री उतरणाऱ्या हिरकणीच्या athang मातृत्वाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हे चित्तथरारक चलचित्र उभारण्यात आले आहे.. शिवछत्रपतींनी हिरकणीच्या या साहसाचा गौरव करत त्या कड्यावर बुरुज बांधून त्याचे नामकरण 'हिरकणी बुरुज' केले होते,हाच प्रेरणादायक प्रसंग या देखाव्यातून हुबेहूब मांडण्यात आल्या ने भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे..0
0
Report
कम बारिश के कारण नांदेड में गणेश विसर्जन संकट, बड़ी मूर्तियाँ कहाँ विसर्जित हों?
Nanded-Waghala, Maharashtra:कमी पावसामुळे यंदा नांदेडमध्ये गणेश विसर्जनावर विघ्न ओढवलय. नांदेड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या गणेश मूर्ती ज्या खदाणीत विसर्जित केल्या जातात त्या दोन्ही खदानित यंदा अत्यल्प पाणी आहे. त्यामुळे विसर्जनापूर्वी मोठा पाऊस झाला नाही तर मोठ्या मूर्तिचे विसर्जन कुठे करायचे असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झालाय. पिकं करपून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असतानाच आता गणेश विसर्जनासमोर विघ्न निर्माण झालंय. नांदेड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन हे दोन खदानितील पाण्यात केले जाते. नांदेड दक्षिणचे विसर्जन झरी येथील खदानित तर नांदेड उत्तरचे विसर्जन पुयनी येथील खदानित केले जाते. पण यंदा कमी पावसामुळे या दोन्ही खदानित पाणी नाहीये. महापालिकेने छोट्या मूर्तिसाठी आसना, पासदगांव, गोवर्धन घाट येथे कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. या तलावात आठ ते दहा फुटाच्या मूर्तीचे विसर्जन होऊ शकते. मात्र दहा फुटापेक्षा मोठ्या मूर्तीचे विसर्जन कुठे करावे हा प्रश्न महापालिकेसमोर निर्माण झालाय. याबाबत महापालिका चाचपनी करत आहे. पाऊस कमी झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. येत्या दहा दिवसात पाऊस झालाच नाही तर मोठ्या मूर्तिचे विसर्जन करू नये अशा सूचनाही करण्यात आल्यात. मात्र पाऊस झाला नाहीतर गणेश मंडळाशी याबत चर्चा केली जाईल आणि पुढील निर्णय घेण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त कदम यांनी सांगितले. याबाबत अलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी मराठवड्यात कमी पाऊस झालाय. गणेश विसर्जनासाठी आणखी काही दिवस आहेत. आता विघ्नहर्ता हे पावसाचे संकट दुर करो अशी प्रार्थना.0
0
Report
Advertisement
अकोला के मूर्तिजापूर के पास ट्रक में भीषण आग, जान बची
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर चालत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. मलकापूर-माना परिसरात घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. देहस येथून कलकत्त्याकडे प्लास्टिकचे दाणे घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून अचानक धूर निघू लागला. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला; मात्र काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले. माहिती मिळताच मूर्तिजापूर अग्निशामक दल आणि माना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. ट्रक महामार्गाच्या कडेला जळत असल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास माना पोलीस करत आहेत.0
0
Report
रामदास कदम के विवाद पर CID जांच की मांग, महाराष्ट्र राजनीति गरम
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी शिवसेना नेते रामदास कदम on रामदास कदम on संजय राऊत राऊत साहेब ज्याला कावीळ होते त्याला सर्व जग पिवळं दिसतं तुमचे नेते आदित्य ठाकरे राजकिय नेते आहेत, म्हणून हा विषय राजकिय प्रेरित आहे, यामध्ये राजकारण आम्ही आणलं नाही, न्यायालयाने ऑर्डर दिलेली आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे 20 पानं होती की 50 पानं होती हे तुम्हाला माहिती, तुम्ही पत्रकार आहात, संपादक आहात, तो विषय तुमचा आहे आदित्य ठाकरे दोषी आहेत की नाही, का त्यांच्यावर fir दाखल करण्याच्या सुचना दिल्या याचं आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी केलं पाहिजे त्या मुलीला न्याय देण्याचं काम सुरू आहे, अब्रूचे धिंडवडे नाहीत ती आमची मुलगी आहे, महाराष्ट्राची मुलगी आहे, त्यामुळे तिला न्याय देण्याचं काम झालं पाहिजे तिच्या अब्रूचे धिंडवडे नाहीत हे राजकीय पुढाऱ्यांच्या अब्रूचे धिंडवडे आहेत, त्यामुळे संजय राऊत यांची अडचण झालीय असं माझं ठाम मत आहे या प्रकरणाची CID कडून वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली पाहिजे बाळासाहेबनी काय केलं आणि त्यांची मागची पिढी काय करतेय हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना ठाकरे कुटुंबीयांचं नाव खूप मोठं होतं dिल्लीतला प्रत्येक पुढारी मातोश्रीवर यायचा, आता वेगळं झालंय आता उद्धव ठाकरे यांना केजरीवालांना भेटायला जायला दिल्लीत जायला लागतं, राहुल गांधी दिल्लीत त्यांना भेटत नाहीत, त्यामुळे नाव आता मोठं आहे की छोटं झालं आहे याचं आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी केलं पाहिजे शिवसेनाप्रमुखांचं नाव मोठं होतं, त्यांनी मोठं केलं होतं.. आता सर्व संपलंय 60 आमदार होते ते 20 झाले जनतेच्या न्यायालयात जाऊनही झालं काय हे गणित राऊत साहेबांना कळत नाही असं मला वाटतं.. की त्यांनी सोंग घेतलंय कुणाच्या ताटातलं काढून कोणाला द्यायचं नाही, ही भूमिका शासनाची आहे, एकनाथ शिंदे आणि आमची देखील तीच भूमिका आहे 16 पैकी 14 मागण्या मान्य झालेल्या आहेत, अजूनही त्यावर काम चालू आहे जरांगे पाटलांनी शासनावर थोडा विश्वास ठेवला पाहिजे मी म्हणेन तेच सर्व झालं पाहिजे असं होतं नाही त्यांनी थोडं समजून घ्यावं ही माझी त्यांना विनंती आहे पण ओबीसिंवर अन्याय करून काहीही दिलं जाणार नाही काँगेस आकाश एवढं फाटलंय तर ठिगळ कसं लावणार तुम्ही लोकांना फसवलंत, काय शिल्लक राहणार तुमच्याकडे ऑपरेशन टायगर सर्व गोष्टी आधी बोलायच्या , मग ऑपरेशन कसलं तुम्ही विचाराल आणि आम्ही सर्व सांगू, असं होतं नाही आगे आगे देखो होता है क्या योग्य वेळेला सर्व होईल, तुम्ही चिंता करू नका.. तुम्हाला चांगल्या बातम्या मिळतील सुनिल तटकरे - शिवसेना वाद तटकरे हा स्वार्थी माणूस आहे, वैयक्तिक स्वार्थासाठी सर्वांना वापरून घेतो आणि स्वतःचं हित संपलं की समोरच्याच मुळावर उठतो अंतुलेंना संपवायचं काम तटकरेनीच केलं हा कोणाचाही होऊ शकत नाही आपण जे पेरतो ते उगवतं पुढच्या निवडणुकीच्या वेळी लक्षात येईल याचं काय होईल ते दापोली- मंडणगड नगरपंचायत जसं खेड नगर पालिकेत झालं तसंच या दोन्ही ठिकाणी होईल लोकांचा विकासावर विश्वास आहे0
0
Report
पटवर्धन घराने में आरती को लेकर वारसदारिता का विवाद, भाग्यश्री बनाम अभ्यंकर
Sangli, Maharashtra:स्लग : अभिनेत्री भाग्यश्रीची आरती अन् पटवर्धन घराण्यात विघ्न! अँकर - गणरायाच्या आराध्य नगरीत यंदा गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच... सांगलीच्या पटवर्धन घराण्यात कौटुंबिक विघ्न निर्माण झाला आहे.! अभिनेत्री भाग्यश्री दासानी-पटवर्धन यांच्या आरतीवरून ही वादाची ठिणगी पडली आहे.. मात्र या वादातून पटवर्धन घराण्याच्या उत्तराधिकारीपदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. नेमकं काय घडलं ? आणि या वादामागचं कारण काय? पाहूया,हा स्पेशल रिपोर्ट.. व्हीओ - सांगलीच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे.आणि या परंपरेच्या केंद्रस्थानी आहे,पटवर्धन घराणं !शेकडो वर्षांची परंपरा,गणपती पंचायतन संस्थान आणि दरबार हॉलमधला गणेशोत्सव...मात्र यंदा याच ऐतिहासिक घराण्यात आता वादाची नवी किनार निर्माण झालीय. व्हीओ - पटवर्धन घराण्याचे वारसदार म्हणून सध्या विजयसिंह राजे पटवर्धन गादी चालवत आहेत. त्यांना तीन कन्या आहेत.अभिनेत्री भाग्यश्री, मधुवंती राजे आणि पूर्णिमा राजे. मात्र दीड वर्षांपूर्वी विजयसिंह राजेंनी आदित्य अभ्यंकर यांना दत्तक घेत,त्यांना पटवर्धन घराण्याचा आणि गणपती पंचायतन संस्थानचा उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं. आणि इथूनच सुरू झाली..वारसदाराच्या हक्काची नवी चर्चा! व्हीओ - यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेदरम्यान अभिनेत्री भाग्यश्रीने दरबार हॉल येथे गणेश आरती केली... आरतीनंतर गाभाऱ्यात प्रवेश केल्याने वादाची ठिणगी उडाली. गणपती पंचायत संस्थांचे मॅनेजर ज्ञानदीप अभ्यंकर यांनी भाग्यश्रीच्या आरतीला अक्षय घेतला आणि यामुळे भाग्यश्री आणि मॅनेजर अभ्यंकर यांच्यात खटके उडाले,यावेळी युवराज आदित्यराजे पटवर्धन उपस्थित असतानाही हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आलाय.. [भाग्यश्री – मॅनेजर वादाचा व्हिडिओ] व्हीओ - या प्रकारानंतर विजयसिंह राजे पटवर्धन आणि राणी राजलक्ष्मी यांनी नाराजी व्यक्त केली.‘मुलगी आहे म्हणून सर्व काही चालणार नाही’,अशी भूमिका घेत विजयसिंह राजेंनी आदित्यराजे हेच पटवर्धन घराण्याचे वारसदार असल्याचं पुन्हा स्पष्ट केलं. बाईट – विजयसिंहराजे पटवर्धन - प्रमुख पटवर्धन घराणे -सांगली व्हीओ - मात्र भाग्यश्री यांची भूमिका वेगळी आहे...वडिलांची प्रकृती खालावत असल्याने पटवर्धन घराण्याची आणि गणपती पंचायतन संस्थानची परंपरा पुढे नेण्यासाठी आम्हा तिघी मुलींमधून कुणीतरी पुढे येणं गरजेचं होतं,असं भाग्यश्री यांनी स्पष्ट केलं. बाईट – भाग्यश्री दासानी-पटवर्धन - कन्या व्हीओ - दरम्यान,गणपती पंचायतन संस्थानच्या कारभारावरून यापूर्वीही मतभेद झाल्याचं सांगितलं जातं.भाग्यश्री आणि त्यांच्या पती हिमालय दासानी यांच्याकडे संस्थानच्या कारभाराची जबाबदारी होती... मात्र पुढे मतभेद झाले आणि त्यांनी कारभारातून माघार घेतली. बाईट – राणी राजलक्ष्मी पटवर्धन - व्हीओ - यानंतर राजे विजयसिंह पटवर्धन यांनी राणी राजे लक्ष्मी यांच्या माहेरच्या नात्यातील असणारया ज्ञानदीप अभ्यंकर यांची गणपती पंचायतन संस्थानच्या व्यवस्थापनात नियुक्ती झाली...आणि पुढे त्यांच्याच मुलगा आदित्यला दत्तक घेऊन उत्तराधिकारी जाहीर केलं. एन्ड व्हीओ - गेल्या काही वर्षांपासून सांगलीपासून दूर असलेल्या अभिनेत्री भाग्यश्री यांची गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा सांगलीत एंट्री झाली...आणि त्याचवेळी आरतीवरून वादाची ठिणगी पडली! आरतीचा वाद की वारसदाराच्या हक्काची लढाई?गणेशोत्सवाच्या मंगल वातावरणात पटवर्धन घराण्यातील हा वाद आता चांगलाच रंगला आहे.0
0
Report
Advertisement
अळणगांव के 1 किमी मार्ग पर गड्ढे, नागरिकों ने तात्कालिक मरम्मत की मांग
Amravati, Maharashtra:रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? अळणगाव पुनर्वसनचा रस्ता धोकादायक; तीन ते चार वर्षांतच झाली रस्त्याची चाळण शाळकरी विद्यार्थ्यांसह वाहनचालकांचा जीव धोक्यात अळणगाव पुनर्वसन गावाला जोडणाऱ्या अवघ्या एक किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तीन चार वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या या रस्त्यावर आज ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. याच मार्गावरून शाळकरी विद्यार्थी ऑटोने प्रवास करतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी झुडपे आणि बाभळीमुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे. समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून झाडी झुडपे साफ करावीत अशी मागणी अळणगाव पुनर्वसनच्या नागरिकांनी केली आहे.0
0
Report
वाशिम के किसानों का आक्रोश मोर्चा: 45 दिन बारिश नहीं, फसल बर्बाद, राहत की मांग
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात तब्बल ४५ दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिके करपून गेली आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणी साठी जिल्ह्यात कारंजा तालुक्यात शेतकऱ्याच्या बांधवार जाऊन शेतकऱ्यांशी संवाद करीत शेतकऱ्याचा व्यथा जाणून घेतल्या आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा कारंजा शहरातील ज्ञायक पाटणी यांच्या कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा बैलगाडी घेऊनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले.हेक्टरी ५० हजार रुपये मदत,पीक विम्याची रक्कम, शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत आणि शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करावी,अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत प्रशासनाकडे दुष्काळी मदतीची मागणी करण्यात अली.0
0
Report
रत्नागिरी के राज्यमंत्री योगेश कदम की माँगें पूरी, FIR के मुद्दे पर ताजा कदम
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी राज्यमंत्री योगेश कदम जरांगे यांच्या मागण्या आम्ही जवळपास पूर्ण केलेल्या आहेत शिंदे साहेब आणि फडणवीस यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले असे निर्णय आजपर्यंत महाराष्ट्रात कधी कोणी घेतलेले नाहीत आम्ही राजकारण न करता देऊ करतोय मनोजजी जरांगे यांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकारणार नाही त्यांच्या मागण्या मान्य करण्याकरता आजही आम्ही सकारात्मक आहोत संजय राऊत- दिशा FIR पब्लिक होतं ते कोणीही कुठनही काढू शकतं FIR मध्ये त्यांचं नाव का घ्यावं लागलं हा प्रश्न विचारला पाहिजे संशय आहे म्हणून FIR आहे खेड शासकीय विश्रामगृह शासकीय विश्रामगृहांच्या कामांची क्वालिटी मेन्टेन्ट होत नाही ही वस्तुस्थिती आहे ठेकेदाराने 6 वर्ष लावली त्या कामाला त्यामुळे ते काम रुकडलं ol उर्वरीत कामासाठी ठेकेदार बदललेला आहे0
0
Report
Advertisement
