icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शेलूबाजार के नाले में गाद-गंदगी, बरसात में दुकानें प्रभावित; तात्कालिक सफाई की मांग

Washim, Maharashtra:शेलूबाजार येथील मुख्य चौकातून अडाण नदीकडे जाणारा नाला गाळ व केरकचऱ्याने तुंबला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसून, दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचे पाणी रस्त्यावर तसेच दुकाने, बँका आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये शिरण्याची भीती व्यापारी व नागरिकांनी व्यक्त केली आहे. शेलूबाजार मुख्य चौकातील नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचते. यामुळे परिसरातील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांचे नुकसान होत असून नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नाल्यांची सफाई करून पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी,अशी जोरदार मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे.
0
0
Report

बावधन के बारका सोन्या बैल की दिल का दौरा, मिरवणुके के दौरान निधन

Satara, Maharashtra:सातारा -बावधन ये गाव ज्या पद्धतीने बगडासाठी प्रसिद्ध आहे तसेच या गावातील बैल हे देशात प्रसिद्ध आहेत.बावधन मध्ये बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दिवसभर बैलांना सजवून संध्याकाळी त्यांची गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाच्या मंदिरापर्यंतचा सोहळाही उत्साहात पार पडला मात्र मिरवणुकीनंतर घरी परतताना सूरज उर्फ काका कदम यांच्या ‘बारका सोन्या’ या खिलार जातीच्या बैलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक मृत्यू झाला.चार वेळा बावधनचे ऐतिहासिक बगाड ओढणाऱ्या या बैलाने ऐन बेंदऱ्यादिवशीच अखेरचा श्वास घेतल्याने कदम कुटुंबासह संपूर्ण बावधनमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बैलपोळ्या दिवशीच झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0
0
Report

उल्हासनगर की 5 मंजिला इमारत का हिस्सा गिरा; दुकानदारों ने प्रशासन पर सवाल उठाए

Ambernath, Maharashtra:उल्हासनगरमध्ये मोठा अनर्थ टळला रिकाम्या असलेल्या ५ मजली 'साई सृष्टी' इमारतीचा मागील भाग कोसळला दुकानदारांचा पालिकेवर संतप्त सवाल छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने अतिधोकादायक 'साई सृष्टी' ही ५ मंजिली इमारत ५ वर्षांपूर्वीच महापालिकेने रिकामी केली होती. मात्र ही इमारत वेळेत पाडण्यात न आल्यामुळे रात्रीच्या सुमारास या इमारतीचा मागील भाग अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु यामुळे परिसरातील नागरिक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. ​छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहरातील मुख्य आणि अत्यंत गजबजलेला भाग आहे. ५ वर्षांपूर्वी पालिकेने ही इमारत धोकादायक घोषित करून खाली करून घेतली होती. परंतु पालिकेने केवळ इमारत रिकामी करून केली अशी टीका आता होत आहे. आजूबाजूच्या दुकानदारांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढत विचारले आहे. या इमारतीचा उर्वरित ढाचा अजूनही उभा असून तो कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेने तातडीने या इमारतीचा उरलेला भाग सुरक्षितपणे पाडून टाकावा, अशी मागणी परिसरातील व्यापाऱ्यांनी व स्थानिकांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

सेवानिवृत्त नेवी अधिकारी को OTP पर धोखा, 5.98 लाख की ठगी

Kalyan, Maharashtra:सेवानिवृत्त ओळखपत्र’च्या आमिषाने डोंबिवलीतील निवृत्त नौदल अधिकाऱ्याची फसवणूक; ओटीपी घेत ५.९८ लाखांवर डल्ला डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड परिसरात राहणाऱ्या स्मृती विलास घाग या नौदलातून मुख्य दूरसंचार पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. गेल्या महिन्यात त्यांच्या नावाला एखाद्या अज्ञात व्यक्तीचा फोन आला. आपण बँक ऑफ इंडियाच्या बांद्रे शाखेतून बोलत असल्याचे सांगत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विशेष ओळखपत्र देण्यासाठी नोंदणी करायची असल्याचे भामट्याने सांगितले. त्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी मागितला. घाग यांनी ओटीपी दिल्यानंतर त्यांच्या खात्यातून तीन व्यवहारांद्वारे 4 लाख, 1 लाख 50 हजार आणि 48 हजार रुपये असे एकूण 5 लाख 98 हजार रुपये वळते करण्यात आले. मोबाईलवर व्यवहारांचे संदेश आल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर रामनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर गुन्हे अन्वेषण शाखा आणि रामनगर पोलिस या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत.
0
0
Report

अंबरनाथ में बिल्ली को 12वें मंज़िले से फेंकने का मामला: आरोपी के विरुद्ध केस दर्ज

Ambernath, Maharashtra:अंबरनाथ में इमारत के 12वें मंजिले से एक बिल्ली को नीचे फेंककर उसकी हत्या किए जाने के मामले में आरोपी के विरुद्ध आखिरकार केस दर्ज किया गया. शिवाजीनगर पुलिस स्टेशन में संबंधित व्यक्ति के खिलाफ मामला दर्ज किया गया. अंबरनाथ के एक हाउसिंग कॉम्प्लेक्स के 12वें मंजिले से एक व्यक्ति ने बिल्ली को नीचे गिरा दिया जिससे उसकी गंभीर चोटें आईं और उसकी मौके पर ही मौत हो गई. इस अमानवीय कृत्य से स्थानीय नागरिक और पशुप्रेमियों में भारी आक्रोश है. पशुप्रेमी की शिकायत के बाद शिवाजीनगर पुलिस ने इस घटना की गम्भीर दखल ली. पुलिस ने आरोपी के विरुद्ध पशुओं के प्रति क्रूरता रोकथाम कानून के अनुसार मामला दर्ज किया है.
0
0
Report
Advertisement

Shalarth ID scam: BJP leader Sanjay Garud arrested, over 160 crore fraud

Nashik, Maharashtra:शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप नेता संजय गरुड याला अटक गुन्हा दाखल झाल्यापासून होता फरार, सोलापूर जिल्ह्यातून अटक जळगावातील शेंदुर्णी गावाचा रहिवासी , जळगावातील भाजपाचा बडा नेता * शिक्षण विभागातील 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात नाशिक विभागातील ८४१ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आयडी बनावट असल्याचे उघड. * या बनावट आयडींपैकी तब्बल ६३८ (७५.८६ टक्के) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकट्या जळगाव जिल्ह्यातील निष्पन्न. * घोटाळ्याप्रकरणी जळगावचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना 'एसआयटी' पथकाकडून अटक. * हिंगोणीकर यांनी २०११ ते २०१५ दरम्यान जळगाव जिल्ह्यातील २५९ शिक्षकांना स्वतःच्या सहीने बनावट वैयक्तिक मान्यता दिली. * शशिकांत हिंगोणीकर हे कवी असून त्यांचे तब्बल ६४ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. * आरोपी प्रशांत वाडिले याने १० ते १२ लाख स्वतःकडे ठेवून उर्वरित रक्कम शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिल्याचा संशय. * बनावट पुरावे वापरून शासनाची १६० कोटींपेक्षा अधिक आर्थिक फसवणूक केल्याने संघटित गुन्हेगारीचे कलम लागू.
0
0
Report
0
0
Report

गुरुपौर्णिमा पर शिर्डी में भक्तों की भीड़, तीन दिन का उत्सव आज से शुरू

Shirdi, Maharashtra:गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली आहे. तीन दिवसीय उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. यासाठी साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. तसेच शेकडो पालख्याही साईनगरीत पोहोचल्या असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय.पहाटेच्या काकड आरतीनंतर पोथीच्या मिरवणुकीने गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झालीय..गुरूपौर्णिमेचा हा उत्सव तीन दिवस असणार असून उद्या या उत्सवाचा मुख्य दिवस असणार आहे.उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं असणारं आहे..या निमित्ताने आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीने शिर्डी फुलून गेली आहे.sाईमंदिराच्या गुरुस्थान परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
0
0
Report
Advertisement
Advertisement

गंगापुर राजीव गांधी चौक के ज्वेलर्स से अज्ञात चोर ने दीड तोला सोने की अंगूठी चुरा ली

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गंगापूरच्या राजीव गांधी चौक परिसरातील ज्वेलर्स दुकानात एका अज्ञात भामट्याने चलाखीने दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. ग्राहक असल्याचे भासवत दुकानात आलेल्या संशयिताने अंगठी पाहण्याच्या बहाण्याने ती हातात घेतली आणि क्षणार्धात दुकानातून पळ काढला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपीचा कारागिराने पाठलाग केला. मात्र, जुने बसस्थानक परिसरातून पळत जाऊन तो पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात उभ्या असलेल्या मोटारसायकलवर बसून साथीदारासह पसार झाला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
0
0
Report

E20 के पक्ष में पाशा पटेल: इथेनॉल 20% आवश्यक

Ahilyanagar, Maharashtra:E20 इंधनाला विरोध करणे म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे असं म्हणत महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी इथून इथेनॉल 20% वापराच जोरदार समर्थन केले आहे...E20 ला विरोध करण्यामागे फरमोठे षडयंत्र आहे, या देशात मागच्या 70 वर्षात इथेनॉल येऊ दिले नाही कारण परदेशातून इंधन-कोळसा आणताना त्यात पैसे खायला मिळत होते म्हणून या विशिष्ट लॉबीने इथेनॉलला विरोध केला अस पाशा पटेल म्हणाले...ब्राझील सारख्या देशात 100 टक्के इथेनॉलवर वाहने चालतात याचा आपल्या देशातील नागरिकांनी विचार करायला हवा...इथेनॉलमुळे वाहनांचे मायलेज कमी होते ही खरी गोष्ट आहे मात्र गाडीचे इंजिन खराब होते हा दावा चुकीचा आहे असं पाशा पटेल यांनी म्हंटले आहे.
0
0
Report

आर्थिक अपराध शाखा ने सेवानिवृत्त फौजदार 50 हजार रिश्वत मांगने के आरोप में गिरफ्तार किया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आर्थिक गुन्हे शाखेचा फौजदार एसीबीच्या जाळ्यात; निवृत्त फौजदाराकडेच ५० हजारांच्या लाचेची मागणी छत्रपती संभाजीनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. जमिनीच्या व्यवहारात १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकारणी तक्रार केलेल्या ६० वर्षीय निवृत्त फौजदाराला, कारवाई करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तक्रारीनंतर एसीबीाने मार्च महिन्यापासून या प्रकरणावर लक्ष ठेवले होते. मात्र, संशय आल्याने कामठे यांनी तक्रारदाराला भेटणे टाळल्याची माहिती समोर आली. अखेर सोमवारी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसीबीने चंद्रकांत कामठे यांना अटक केली. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top