icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बारिश से सिन्नर के समृद्धि महामार्ग किनारे प्राकृतिक झरने लोगों को आकर्षित कर रहे हैं

Sinnar, Maharashtra:अँकर : नाशिक जिल्ह्यात सुरूलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र धबधबे प्रवाहित झाले असून सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गालगत अनेक ठिकाणी नैसर्गिक धबधबे वाहू लागले आहेत. रस्त्याच्या कडेला कोसळणारे हे मनमोहक धबधबे वाहनधारक आणि प्रवाशांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना निसर्गाचे हे मोहक रूप अनुभवता येत असल्यून प्रवासात नयनरम्य दृश्यांचा आनंद घेत आहेत. सततच्या पावसामुळे सिन्नर परिसरातील हा निसर्गरम्य नजारा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
0
0
Report
Advertisement

बारिश से बदला चिखलदार घाट: पर्यटक जान जोखिम में डालकर फोटोग्राफी

Amravati, Maharashtra:धक्कादायक, चिखलदऱ्यात पर्‍यटकांची जीवघेणी फोटोग्राफी; नुसतं धाडस कशाला गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चिखलदर्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे पर्यटक चिखदऱ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सध्या चिखलदरा पर्यटकांनी हाऊसफुल झालं असल्याच पाहायला मिळत आहे तर काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याच पाहायला मिळत आहे तर काही अतीउत्साही पर्यटक चिखलदऱ्यातील गावीलगड शेजारी असलेल्या पॉईंटवर बॅरिकेट नसलेल्या ठिकाणी टेकडीच्या काठावर जाऊन आपला जीव धोक्यात टाकून जीवघेणी फोटोग्राफी करत आहे. तर काही पर्यटक किल्ल्याच्या भिंतीवर अगदी काठावर जाऊन फोटो काढत आहे त्यामुळे हे नुसतं धाडस कशाला असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला
0
0
Report
Advertisement

अहिल्यानगर जिले में यलो अलर्ट, भारी बारिश जारी

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्हयास यलो अलर्ट ; जिल्हयात सर्वदूर पावसाची हजेरी... दोन दिवसांपासून पावसाची संततधार , मुसळधार पाऊस सुरू.. शिर्डी , अकोले , संगमनेर ,कोपरगाव , नेवासा, राहुरी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी... तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची हजेरी... भंडारदरा ‌, मुळा आणि निळवंडे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ... भंडारदरा 50% , मुळा 40 तर निळवंडेत 26 टक्के पाणीसाठा.. खरिप पेरणीला मिळणार मुहूर्त... गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके रखडली... अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report
Advertisement

यवतमाल में सोयाबीन की बुवाई के बाद उग नहीं, किसान चिंतित, जांच की मांग

Yavatmal, Maharashtra:चालू खरीप हंगामात पिकांची पेरणी किंवा लागवड केल्यानंतर बियाण्यांची उगवण होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढे येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी लागवड केलेली सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, त्यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता व त्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. बाभुळगाव तालुक्यातील मिटणापूर येथील शेतकरी रणजीत दांडगे यांनी आपल्या शेतात सोयाबीन ची लागवड केली होती. मात्र त्यांनी लागवड केलेल्या 11 एकर शेत जमिनीवरील सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे त्यांना शेतात पुन्हा नांगर फिरवून दुबार पेरणी करावी लागत आहे. याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. दांडगे यांच्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांच्या अशाच प्रकारच्या तक्रारी असून त्यांच्या माथी कृषी केंद्रांमधून बोगस बियाणे मारल्या गेले असावे अशी शक्यता आहे. अशा प्रकारच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे कराव्या असे आवाहन जिल्हा कृषी अधीककांनी केले आहे.
0
0
Report

नाशिक में भारी बारिश, जलाशयों में पानी का स्तर तेज़ी से बढ़ा

Nashik, Maharashtra:ब्रेकिंग नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी; धरणसाठ्यात वाढ • नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासांत अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद. • सर्वाधिक पाऊस अंबोली 224 मिमी, इगतपुरी 205 मिमी, त्र्यंबक 148 मिमी, गौतमी-गोदावरी परिसर 121 मिमी, नाशिक शहर 88 मिमी. • पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सुरू. • दारणा धरण 36 टक्के , गंगापूर 53.34%, कश्यपी 40.93%, कडवा 49.64%, करंजवण 23.07%, चणकापूर 60.20% वर • नाशिक पाटबंधारे विभागातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 37.96%, गेल्या वर्षीपेक्षा अद्याप कमी, मागील वर्षी याच दिवशी तो 71.91% होता. • गौतमी-गोदावरी धरणातून 1,280 क्युसेक, तर चणकापूर धरणातून 4,732 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. • धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे येत्या काही दिवसांत धरणसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
0
0
Report

रत्नागिरी के दहिवली में पहाड़ टूटने से पिता-पुत्र की मौत, शव बरामद

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दहिवलीत डोंगरकडा कोसळून बाप लेकाचा मृत्यू.. तब्बल २१ तासानंतर मृतदेह हाती..७५ वर्षीय वृद्देला ढिगाऱ्याखालून सुखरूप काढले बाहेर.. पाच घरे जमीन दोस्त.. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवली येथे मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या sुमारास डोंगरकड्याचा मोठा भाग कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाले घरासह गाडले गेलेले शांताराम बाळा शेलार आणि सतीश शांताराम शेलार या बाप लेकांचे मृतदेह २१ तासानंतर हाती लागले तर दुर्घटनेनंतर चार तासांनी कल्पना शांताराम शेलार या वृद्धेला ढिकाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव यंत्रणेला यश आले.. दरम्यान येथील १५ कुटुंबियांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनातर्फे तातडीने चार लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले..
0
0
Report
Advertisement

नागपुर के फुकेश्वर में कार लूट: चाकू दिखाकर डराने-धमकाने आरोपी फरार

Nagpur, Maharashtra:कार ने यात्रियों को रास्ते में चाकू दिखाकर लूट ली... नागपूर जिल्ह्यातील फुकेश्वर शिवारातील 5 जुलै रोजीची घटना... कृषी विभागाचे कर्मचारी सुहास चंद्रकांत हजारे हे पाच जुलै रोजी आपल्या कार ने नातेवाईकांसोबत जात असताना फुकेश्वर भागात निर्जन ठिकाणी दोघांनी चाकूचा धाक दाखवत त्यांची कार थांबवली आणि त्यांना लूटल्याची घटना घडली आहे... कार मध्ये पाठीमागे बसलेल्या सहकार्याने व्हिडिओ शूट केला.. - या घटनेत सोनं आणि काही रोकड लुटल्याची माहिती - सुहास हजारे परिवारासह आपल्या अल्टो कारने बुटीबोरीकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केली लुटमार - चार तोळे सोनं आणि काही रोकड लुटली - पाच जुलै सायंकाळी पाच वाजताची घटना, आरोपी अजून हि फरार आहेत..
0
0
Report

रत्नागिरी में 181 गांवों के लिए भूस्खलन खतरा, खेड में अलर्ट जारी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील 181 गावांना दरडीचा धोका. दहिवलीतील भूस्खलनानंतर प्रशासन सतर्क; खेड तालुक्यात सर्वाधिक गावे. खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडीमध्ये भूस्खलन होऊन तीघे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यातील एका महिलेला वाचविण्यात आले आहे. मात्र या घटनेने खेड तालुक्यात काही वर्षांपूर्वी घडलेल्या पोसरे दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या प्रकारानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्व शहरात जिल्ह्यात 181 गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यात अतिसंवेदनशील 13 गावांचा समावेश आहे. सर्वाधिक धोका असलेली 50 गावे खेड तालुक्यात आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top