icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

आषाढी वारी: दातली में संत निवृत्तीनाथ महाराज के पहले रिंगण में भक्तों का उत्साह

Yeola, Maharashtra:संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढ़ी वारी पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ज्ञानोबा-तुकाराम जय जय राम कृष्ण हरी आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या अखंड नामगजरात हजारो वारकरी और भाविकांनी पहिल्या रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. पहिल्या रिंगण सोहळ्यासाठी दातली परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. टाळ-मृदंगाच्या निनादात, भगव्या पताका और वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक वेशभूषेमुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. रिंगण सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत भक्तीभाव व्यक्त केला.
0
0
Report
Advertisement

पेण शहर में भीषण बारिश से जल भराव, लोग परेशान

Chendhare, Maharashtra:मुसळधार पावसामुळे यंदाही पेण शहराच्या अनेक भागात पाणी साचले. संध्याकाळच्या sुमारास झालेल्या पावसानं पेणच्या प्रवेशद्वारासह रामवाडी एसटी वर्कशॉप, विक्रम स्टेडियम, उर्दू शाळा, म्हाडा कॉलनी, गोविंदबाग, महावीर मार्ग परिसर जलमय झाला. गटारांच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक ठिकाणी पाणी दुकाने आणि रस्त्यांवर साचल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. काही दुचाकी व रिक्षाही पाण्यात बंद पडल्या. काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. दरवर्षी याच ठिकाणी पाणी तुंबत असूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
0
0
Report
Advertisement

रायगढ़ के पालकमंत्री पद को लेकर विवाद, भरत गोगावले को मिलने की चर्चा तेज

Karjat, Maharashtra:रायगडच्या पालकमंत्रीपदावरून झालेल्या वादावर आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महायुतीचं सरकार स्थापन करण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सर्वात मोठं योगदान असल्याचं सांगत, रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांनाच मिळावं, यासाठी आम्ही तिन्ही आमदार आग्रही होतो, असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे महायुतीचं सरकार सत्तेत आलं. या प्रक्रियेत भरत गोगावले, मी आणि महेंद्र दळवी इतर सहकाऱ्यांचंही मोठं योगदान होतं. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांनाच मिळावं, ही आमची ठाम भूमिका होती. मात्र हे पद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला काही काळ स्थगिती दिली. पुढे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर हा वाद संपुष्टात आला.
0
0
Report

रायगड के करजत में श्रीराम पुल का उद्घाटन, मंत्री भरत गोगावले की मौजूदगी में

Karjat, Maharashtra:रायगड ब्रेकिंग रायगड के करजत के उल्हास नदी पर नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम पुलाचे उद्घाटन राज्याच्या रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि स्थानिक आमदार महेंद्र थोरवे देखील उपस्थित होते. मात्र कार्यक्रमाला अजित दादांच्या राष्ट्रवादीला डावळल्याचा प्रकार समोर आला यानंतर मंत्री भरत गोगावले यांना याबત विचारला असता भात चुलीवरून उतरलेले आहे. ते थोड थंड होईउदया पुढच्या वेळेस सगळ्यांचे फोटो आणि बॅनर लागतील असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. रायगड मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत तू तू मैं मैं अद्यापही सुरूच आहे त्यामुळे पुलाच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादीला डावल्याचा प्रकार समोर आलाय.
0
0
Report
Advertisement

मंत्रिमंडळ विस्तार पर बारणे का दावा: निर्णय शिंदे के हाथ में

Karjat, Maharashtra:केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. मंत्रिमंडळात आपल्या नावाची चर्चा असल्याच्या प्रश्नावर त्यांनी निर्णयाचा अधिकार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील सत्तासमीकरण, सहा खासदारांचा शिवसेनेत प्रवेश आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळात आपल्या नावाची चर्चा असल्याबाबत बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे हे एकनाथ शिंदे ठरवतील आणि ते कार्यकर्त्याला न्याय देणारे नेते आहेत. राज्याची सूत्रे शिंदे यांच्या हाती येण्याच्या चर्चेवर त्यांनी हा निर्णय भाजपचा असल्याचे सांगत त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. शिवसेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांबाबत बोलताना बारणे म्हणाले, हे खासदार मुळात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे असून त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे होत नसल्याने त्यांनी प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी उमेदवार उतरवायला हवेत होते, मात्र तसे झाले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
0
0
Report

ठाणे के बारवी डैम क्षेत्र में 9 घंटे में 100 मिमी बारिश, पानी 4 फुट बढ़ा

Ambernath, Maharashtra:Anchor ठाणे जिल्हा आणि आसपासच्या शहरांची तहान भागवणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात अखेर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. आज सकाळपासूनच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, अवघ्या ९ तासांत तब्बल १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत ४ फुटांची लक्षणीय वाढ झाली आहे.​ सकाळपासून धरण क्षेत्रात संततधार आणि मुसळधार पाऊस सुरूच आहे. प्रशासन आणि नागरिकांना मोठा दिलासा गेल्या काही दिवसांत पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा खालावला होता, ज्यामुळे पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आज झालेल्या दमदार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे
0
0
Report
Advertisement

राम रक्षा महाआरती पर उद्धव ठाकरे पर तंज, आठवलें बोले शिवसेना रक्षा आंदोलन जरूरी

Sangli, Maharashtra:स्लग - उद्धव ठाकरें राम रक्षा नव्हे,शिवसेना रक्षा आंदोलन करावे,रामदास आठवलें, उडवली खिल्ली.. अँकर - उद्धव ठाकरेंनी,राम रक्षा महाआरती आंदोलन करण्यापेक्षा,शिवसेना रक्षा आंदोलन केले पाहिजे,अशी खिल्ली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.तसेच उध्दव ठाकरे,यांनी अयोध्याला जावं, आणि रामाकडे एक ही आमदार फुटी येऊ नये,असे साकडे घालावे असा खोचक सल्ला देखील मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे, अयोध्यातील राम मंदिर चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंकडून उद्या रामरक्षा महाआरती राज्यभर करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे,यावरून मंत्री रामदास आठवलेांनी हा टोला लगावला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. बाईट - रामदास आठवले -केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री.
0
0
Report

अंबरनाथ की वालधुनी नदी में बच्चों के खतरनाक स्टंट, तेज बहाव में जान जोखिम में

Ambernath, Maharashtra:चिमुकल्यांचा जीवाशी खेळ प्रशासनाचे दुर्लक्ष स मुसळधार पावसामुळे अंबरनाथमधील वालधुनी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली असून प्रवाह अत्यंत वेगवान आहे. मात्र, अशा अत्यंत धोकादायक परिस्थितीतही चिमुकल्यांचा नदीच्या पुरात जीवाची पर्वा न करता स्टंट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वालधुनी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात लहान मुले उंच कठड्यांवरून आणि पुलावरून थेट उड्या मारत आहेत. वेगवान प्रवाहाचा आणि पाण्याचा अंदाज नसतानाही मुलांचा हा जीवघेणा खेळ आणि धोकादायक अंघोळ सुरू आहे. एखादा जरी पाय घसरला किंवा पाण्याचा वेग वाढला, तर मोठी दुर्घटना घडू शकते,
0
0
Report

मधुबन में जलसंकट के बीच बचाव टीम ने 20-25 नागरिकों को सुरक्षित निकाला

Vasai-Virar, Maharashtra:वसई पूर्वेतील मधुबन परिसरात बचावकार्य; २० ते २५ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले ही दृश्ये वसई पूर्वेतील मधुबन परिसरातील आहेत. मुसळधार पावसामुळे या भागात गंभीर जलसंकट निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पाण्याची पातळी नागरिकांच्या गळ्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अनेक नागरिक पाण्यात अडकून पडले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. जवानांनी दोरीच्या सहाय्याने जलमय भागात प्रवेश करून सुमारे २० ते २५ नागरिकांची सुखरूप सुटका केली. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. प्रशासनाने नागरिकांना पाणी साचलेल्या भागात जाणे टाळण्याचे तसेच सुरक्षेसंदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिसरात मदत आणि बचावकार्य सुरू असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top