445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
हुंडा प्रताड़ना से विवाहित महिला ने दी आत्महत्या, 3 साल के बेटे के सामने त्रासदी
Buldhana, Maharashtra:धक्कादायक....हुंडाबळी हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; तीन वर्षांच्या बाळाला सोडून आईची गळफास घेऊन आत्महत्या. बुलढाण्यातील मेहकरमधून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून बालाजी नगर येथील २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी या माऊलीने हे टोकाचे पाऊल उचलले, तेव्हा तिचा अवघ्या तीन वर्षांचा मुलगा घरातच होता. मृत वैष्णवी मेरत हिच्याकडे सासरच्या मंडळींकडून सतत १० लाखांची मागणी केली जात होती. या त्रासाला कंटाळून तिने वडिलांशी फोनवर संवाद साधला आणि काही वेळातच आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पतीला अटक केली आहे. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून एका मातेला आपल्या तीन वर्षांच्या मुलाला वारंवार सोडून जावे लागल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे. मेहकर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.0
0
Report
वाशिम में बंद दुकानों की चोरी: खेत्राजी माणिक पवार नामक आरोपी गिरफ्तार
Washim, Maharashtra:वाशिम शहरातील बंद दुकानांचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराला शहर पोलिसांनी अटक केली आहे.खेत्राजी माणिक पवार (वय ५२, रा. खरबी, जि. हिंगोली) असे अटक आरोपीचे नाव आहे.आरोपी दिवसा बंद दुकानांची रेकी करून रात्री अंगावर चादर घेऊन ओळख लपवत दुकानफोडी करत असल्याचे तपासात समोर आले.पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील रोकड, लोखंडी रॉड, पेचकस,कुलूप तोडण्याची हत्यारे, बॅटरी, टोपी, स्कार्फ आणि चोरीसाठी वापरलेले कंबल जप्त केले आहे.तपासादरम्यान आरोपीने गेल्या तीन वर्षांतील वाशिम शहरातील पाटणी चौक, अकोला रोड, रिसोड नाका, हिंगोली रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लव्हाळा परिसरातील सात दुकानफोडींची कबुली दिली आहे.डी.बी.पथकाने तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
शाहू महाराज ने किसानों की समस्याओं के समाधान के लिए सरकार पर निशाना साधा
Kolhapur, Maharashtra:खासदार शाहू छत्रपती यांनी शाहू जयंतीनिमित्त शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसल्या बद्दल खंत व्यक्त केली.. अनेक प्रश्न सुटतात पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत.. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केलीय. कोल्हापुरातील दसरा चौक या ठिकाणी शाहू महाराज याच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.0
0
Report
Advertisement
अनसिंग बस स्टॉप पर दिनदहाड़े चोरी की कोशिश: नागरिकों ने महिलाओं को पकड़ लिया
Washim, Maharashtra:अनसिंग बस स्टॉप पर दिनदहाड़े चोरी की कोशिश: नागरिकों ने महिलाओं को पकड़ लिया0
0
Report
बीड़ में प्रीतम मुंडे का हमला: प्रकाश सोळंके पर निशाना साधा
Beed, Maharashtra:बीड : पंकजा मुंडेंच्या जीवावर आमदारकी, अब गरळ ओकता ; प्रीतम मुंडेंचा नाव न घेता प्रकाश सोळंकेंवर निशाणा माजलगावात प्रीतम मुंडे आक्रमक; ‘शतप्रतिशत भाजप’चा नारा बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा माजी खासदार प्रीतम मुंडे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. माजलगावमधील कार्यक्रमात त्यांनी नाव न घेता विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर निशाणा साधला. पंकजा मुंडेंच्या जीवावर आमदारकी मिळवून, ती पचवून आता त्यांच्याविरोधात गरळ ओकणारे आमदार या मतदारसंघाला नकोत, असा टोला लगावत, माजलगावमध्ये शतप्रतिशत भाजपाच हवा आणि त्यासाठी जमिनीची मशागत सुरू आहे,असंही त्या म्हणाल्या... आठ दिवसापूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वरती आमदार प्रकाश सोळुंके यांनी टीका केली होती या टीकेला आता प्रीतम मुंडे यांनी चांगलंच उत्तर दिले. प्रीतम मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर बीडच्या राजकारणात नव्या राजकीय संघर्षाची ठिणगी पडल्याची चर्चा रंगली आहे.. बाईट : प्रीतम मुंडे, माजी खासदार0
0
Report
राधानगरी में शाहू जयंती: जलपूजन और पुतला अभिषेक से उत्सव की धूम
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी इथ देखील राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने शाहू जयंती साजरी करण्यात आली. राधानगरी धरणाच्या पाण्याची पूजा करून तसेच शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. भाजप नेते तथा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला.0
0
Report
Advertisement
मनमाड में आवारा सांड ने महिला की टू-व्हीलर पर हमला, CCTV में कैद
Nashik, Maharashtra:मनमाड, नासिक, महाराष्ट्र: आवारा जानवरों के खतरे की फिर पुष्टि। दत्त मंदिर रोड पर एक बेकाबू सांड ने अचानक टू-व्हीलर पर जा रही महिला पर हमला कर दिया, जिससे वह सड़क पर गिर पड़ी। घटना CCTV में कैद हो गई। महिला को निजी अस्पताल में भर्ती कराया गया है।0
0
Report
नाशिक रोड स्टेशन पर 6 लाख के चोरी का पर्दाफाश; डमी प्रवासी बनाकर आरोपी गिरफ्तार
Nashik, Maharashtra:नाशिकरोड स्थानकावरील ६ लाखांची बॅग चोरीचा गुन्हा उघड. - रिक्षाचालकासह दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. - ४ लाखांची रोकड व रिक्षासह ६.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त. - काठे गल्लीतील रहिवासी सौरभ आहेर यांनी पत्नीच्या उपचारासाठी सहा लाख रुपये घेऊन रेल्वे स्थानक परिसरात आले असता रिक्षा चालकाने शिताफीने केली होती चोरी - गुन्हे शोध पथकाने 'डमी प्रवासी' बनून आरोपींचा शोध लावला. - सीसीटीव्हीत धागादोरा न लागल्याने पोलिसांची अनोखी रणनीती. - मुख्य आरोपी मोईन कुरेशी व साथीदार शहबाज सय्यद अटकेत. - चोरीची रक्कम वाटून घेतल्याची आरोपींची कबुली. - उर्वरित २ लाखांसह तिसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.0
0
Report
राधानगरी तालुक्यात मुसळधार पाऊस नाही; धरण परिसरातील स्थिती चिंताजनक
Kolhapur, Maharashtra:Radhanagari Dam - Location: Radhanagari Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणानी तळ गाठला आहे.. 26 जून उजाडला तरी देखील ज्या राधानगरी तालुक्यात मुसळधार आणि अतिवृष्टि सदृश्य पाऊस पडतो तिथ पावसाचा एक टिपूस देखील पडताना दिसत नाहीये.. राधानगरी धरण परिसरातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
विदर्भ दौरे के साथ शिवसेना में प्रवेश और ऑपरेशन टायगर पर मतभेद जगजाहिर
Nagpur, Maharashtra:नागपूर - उदय सामंत, मंत्री - शिवसेना नेते विदर्भ दौरा - अमरावती मध्ये आज दुपारी बच्चू कडू आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडते आहे, संध्याकाळी नागपुरात काही पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे संजय दिना पाटील - संजय दिना पाटलांची वागण्याची पद्धतच तशी आहे, बॉडी लँग्वेज तशीच आहे, मात्र ते जे काही बोलले त्याचं पक्षाने कुठेही समर्थन केलं नाही, त्यांनी माफी मागितली आहे, संजय पाटील जीवाला जीव देणारा मित्र आहे, भले आम्ही वेगवेगळ्या पार्टीत असलो तरी पूर्वीपासूनचे मित्र आहोत मी स्वतः साहेबांनी त्यावर बोलले आहेत, चर्चा केली,खुलासा केला आहे भविष्यात राजकारण करत असताना त्यांच्याकडून अशी भूमिका परत घेतली जाणार नाही अशी देखील चर्चा साहेबांनी त्यांच्याबरोबर केली आहे आम्ही चार साडेचार वर्षांपूर्वी या फेज मधून गेलो, आम्ही शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारले,त्याला आई बहिणी वरून शिव्या घालायच्या,मर्डर करतो म्हणून सांगायचे, त्याला तुडवतो म्हणून सांगायचं, आम्ही पक्षांतर करणं आम्ही आमचा विचार बदलणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला अधिकार आहे, त्यामुळे सुरुवात कुठून होते हे देखील विचार करण्याची गरज आहे या सगळ्यांचा राग त्यांच्या वक्तव्यातून निघाला असेल, त्यांच्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांची मन दुखावल्या असतील, त्यांचा बोलण्याने दुखावले असतील तर मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो ऑपरेशन टायगर - ऑपरेशन नंबर एक, दोन, तीन यापेक्षा रोजच पक्षप्रवेश शिंदे साहेबांचे नेतृत्वात मुंबईत होत आहेत, त्यामुळे ऑपरेशनला नंबर द्यायचे गेले तर 365 पर्यंत तुम्हाला नंबर द्यावा लागेल पण महाविकास आघाडीच्या आमदारांची इच्छा असेल की आम्हाला एकनाथ शिंदे यांचा नेतृत्व स्वीकारावं तर मग आम्ही का नाकारावं?पण ही परिस्थिती महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधीमध्ये तयार झालेली आहे हे नाकारता येत नाही विजय वडेट्टीवार प्रवेश - विजय वडेट्टीवार हे आमचे चांगले मित्र आहेत, एकनाथ शिंदे यांचेही चांगले मित्र आहेत, त्यांनी पक्षप्रवेशा बाबत आमच्याशी कधीही चर्चा केली नाही, पण विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या विदर्भातील नाळ जोडलेला नेता,लोकांमधील व्यक्ती एकनाथ शिंदे साहेबनसोबत आले तर सगळ्यात आनंदी मी असेल, कारण मी देखील त्यांच्यासोबत काम केलं आहे चर्चा नाही पण तुम्ही जो प्रश्न विचारला की वडेट्टीवार जर तुमच्या सोबत आले तर चांगला नेता ते आले तर आमची अशी भूमिका आहे लोकांशी नाळ जुळलेली नेता आमचे सोबत येत असेल तर साहेबांसोबत चर्चा करून नेतृत्व स्वीकारत असेल तर कुणाला नकोय यासंदर्भात घडामोडी सुरू याबद्दल मला माहिती नाही, मुंबईत घडामोडी सुरू असताना मी विदर्भात आहे ऑपरेशन म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीतील नेतेमंडळी जर शिवसेनेत येणार असतील तर आम्ही त्याचे स्वागतच करू पण ते कोणतेही ऑपरेशन सुरू नाही आशिष देशमुख वक्तव्य - यासंदर्भात भाजपचे नेते मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री हे तीनही नेते बसून निर्णय घेतील, त्यामुळे कोणाला पक्षात घेयचा आणि कोणाला घेयचं नाही हा शिवसेनेत पूर्णपणे अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे राममंदिर संजय राऊत - कोणी कोणाच्या खिशातून दिले की दुसऱ्याच खिशातून दिले याबरोबर मला माहिती नाही, पण या संदर्भात एसआयटी नेमलेली आहे, उत्तर प्रदेशात एसआयटी नेमल्याने त्याचा महाराष्ट्रातले उत्तर देणे योग्य नाही, पण काही भ्रष्टाचार गैरप्रकार झाला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे संजय राऊत सत्ता नसेल वक्तव्य - सत्ता नसेल तेव्हा बघू संजय दीना पाटील - अतिरेक होतोय की नाही आता मी यावर काही बोललो तर मीही अडचणीत येऊ शकतो, पण एक सांगतो की ते अत्यंत दिलदार व्यक्तिमत्व आहेत, काही अडचणीमुळे चुकीचे वक्तव्य झालं असेल त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, तुम्ही देखील समजून घेतलं पाहिजे संजय राऊत संत-महात्मा वक्तव्य - संत महात्मा कोणीच नाही, त्यामुळे संत महात्म्याचे उपमा देण्याची गरज नाही पण 50 कोटींचा आकडा साडेचार वर्षांपूर्वीचा होता, आता व्याजासह तो आकडा वाढला असेल असा आम्हाला वाटल होत पण ते सगळं फेक आहे,असं कोणीही केलेला नाही, एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून खासदारांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे डेटा सेंटर मुनगंटीवार - 2023 च्या कायद्यानुसार आम्ही डेटा सेंटर तयार करायला गेलो तर सुधीर भाऊंच्या मनातील शंका ही योग्य आहे,पण 2026 ला जी ग्रीन डेटा सेंटर पॉलिसी आली त्यात या सगळ्या गोष्टी इन्कल्युड केल्या आहेत, एम एम आर रिजन मध्ये होणाऱ्या डेटा सेंटर चे जो काही आहे त्यात सांड पाण्याचा प्रकल्प लावून डेटा सेंटर साठी वापरावं,अमेझन सारखी कंपनी असेल,ब्लॅक स्टोन सारखी कंपनी दोन-दोन हजार कोटी खर्च करायला तयार आहेत यासाठी अनिल काकोडर यांच्या अध्यक्षतेत एक समिती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे,अनिल काकोडकर यांनी अध्यक्ष पद स्वीकारावं अशी विनंती उद्धव ठाकरे दौरा - त्यांना शुभेच्छा काँग्रेस नेते प्रवेश - जे कोणी नेते येण्यास इच्छुक आहेत,तर ते स्वतःहून येत आहेत,त्यांचा शिंदे यांच्यावर विश्वास असेल,त्यामुळे ऑपरेशन टायगर राबवण्याची गरज नाही0
0
Report
जunnar Belhe सड़क विवाद: मृत शव घर तक न पहुँच सका, ग्रामवासियों में आक्रोश
Shirur, Maharashtra:मृत्यू नंतरही माणसाला सन्मान मिळू नये? यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते! अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील दत्तनगरमध्ये घडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या वादामुळे, सोमवारी मृत सागर घोडे यांचा पार्थिव घरी आणण्यासाठी रस्ताच उपलब्ध नव्हता. शेवटी नातेवाईक आणि ग्रामस्थांना हा मृतदेह चिखलातून आणि शेतातून उचलून न्यावा लागला. मृतदेहाची झालेली ही विटंबना पाहून आता संपूर्ण गावात प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक पातळीवर दोन वर्षांपासून हा रस्ता बंद असून, हे प्रकरण तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने रस्ता अडवणाऱ्यांची दादागिरी वाढल्याचा थेट आरोप ग्रामस्थ करत आहेत.0
0
Report
चंद्रपुर की सड़क पर खड्डे ने नगरसेवक नाराज़ होकर सड़क पर ही किया विरोध
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील महाऔष्णिक विद्युत केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने तुलसी नगर, वृंदावन नगर आणि परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आज तुकूम प्रभागाचे नगरसेवक राहुल विरुटकर हे याच मार्गावरील खड्ड्यात दुचाकीसह घसरून पडले. या घटनेनंतर त्यांनी संतप्त होत आपली दुचाकी रस्त्यातच ठेऊन आंदोलन सुरू केले. महाऔष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी घटनास्थळी येऊन रस्ता दुरुस्तीबाबत ठोस निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत वाहन हटवणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.0
0
Report
Advertisement
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने गड़चिरोली के आदिवासी छात्रों को प्रेरित किया; राजभवन में भावपूर्ण स्वागत
Gadchiroli, Maharashtra:टायटल:---मोठी स्वप्ने पाहा... राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश, राष्ट्रपती भवनात विद्यार्थ्यांचे आत्मीय स्वागत, भविष्यातील ध्येय जाणून घेत साधला मनमोकळा संवाद अँकर:-- मोठी स्वप्ने पाहा, शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा, असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात अत्यंत आत्मीयतेने स्वागत केले. विद्यार्थ्यांना चॉकलेट देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत नाव, गाव, शिक्षण आणि भविष्यातील ध्येयाविषयी विचारपूस केली. देशाच्या प्रथम नागरिकांशी झालेला हा संवाद विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा प्रेरणादायी क्षण ठरला. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या दिल्ली शैक्षणिक सहलीत गडचिरोली, अहेरी आणि भामरागड येथील शासकीय आश्रमशाळांमधील ९६ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. काल राष्ट्रपती भवनात पोहोचताच विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधत त्यांचे नाव, ते कोणत्या गावातून आले आहेत, कोणत्या वर्गात शिक्षण घेत आहेत आणि भविष्यात काय बनण्याची इच्छा आहे, याची उत्सुकतेने विचारपूस केली. दिल्ली शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थी संसद भवन, पंतप्रधान संग्रहालय, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली, जंतरमंतर, राजघाट, लाल किल्ला, कुतुबमिनार तसेच राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांनाही भेट देत आहेत. या भेटींमधून विद्यार्थ्यांना देशाची लोकशाही व्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती, सांस्कृतिक वारसा आणि उच्च शिक्षणाच्या संधींची व्यापक माहिती मिळत आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
चंद्रपुर के मित्रनगर में पत्थर से युवक की हत्या, इलाके में हड़कंप
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर शहरातील मित्रनगरात दगडाने ठेचून युवकाची हत्या,परिसरात खळबळ ॲंकर :---- चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मित्रनगर परिसरात एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष अरुण भेंडे रा. पाला, जि. अमरावती असे मृताचे नाव असून, अज्ञात हल्लेखोराने बाईकवर येत त्यांच्या डोक्यावर दगडाने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतदेहाचा पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता पाठविण्यात आले असून पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे.0
0
Report
पुणे ग्रामीण पुलिस ने इंटरराज्य केबल चोर गिरोह का पर्दाफाश किया; 12 मामले उजागर
Shirur, Maharashtra:पुण्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्य केबल चोरट्यांच्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे, मध्य प्रदेशातील या टोळीला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. मागील काही दिवसांपासून नदीपात्र परिसरातून शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल वायर चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. उन्हाळ्याच्या दिवसांत सिंचनाचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. अखेर पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे सापळा रचून या आंतरराज्य टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
