icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

देवळाणे में बारिश से किसानों के घर नुकसान, मंत्री भुजबळ ने मदद का आश्वासन दिया

Yeola, Maharashtra:येवल्ला तालुक्यातील देवळाणे येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पाऊस व वाऱ्यामुळे बबन जाधव प्रल्हाद खामकर व उमेश जाधव या शेतकऱ्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते या घटनेची माहिती राज्याची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन जखमींची विचारपूस करत घराचा संपूर्ण खर्च राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येईल असे आश्वासन दिले होते या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी वैद्यकीय मदत कक्षाचे संतोष खैरनार यांच्या माध्यमातून जाधव कुटुंबियांचा निवारा पुन्हा उभा करत मदतीचा हात दिला याप्रसंगी जाधव कुटुंबीयांच्या वतीने मंत्री छगन भुजबळ, व माजी खासदार समीर भुजबळ यांचे आभार मानण्यात आले.
0
0
Report

बीड़-लातूर-धाराशिव निर्वाचन क्षेत्र के महाविकास आघाडी के उम्मीदवार महेश देशमुख का दावा: भाजपा आंतरिक कलह से फायदा?

Beed, Maharashtra:बीड़ : भाजपमधील कौटुंबिक कलहाचा महाविकास आघाडीला फायदा होईल; महाविकास आघाडीचे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार महेश देशमुख यांचा दावा.... - मला भाजप मधल्या अनेक नेत्यांचे शुभेच्छांसाठी फोन आले. - काहींनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून फोन केले फोनवरून दबाव टाकला Anc : वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता म्हणून नेते म्हणून काम करणाऱ्या नेत्यांना डावलून भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षात आलेल्या आयात उमेदवारांला संधी दिली.. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये कौटुंबिक कलह वाढला आहे.. याचा फायदा आम्हाला होणार आहे.. एवढेच नव्हे तर मला भाजप मधल्या मोठ्या नेत्यांनी फोन करून शुभेच्छा ही दिल्या...उमेदवारी मिळाल्यानंतर फॉर्म मागे घ्या म्हणून काहींचे प्रत्यक्ष भेटून तर काहींचा फोनवरून दबाव होता.. तर काहींनी विनंती केली.. मात्र ही वेळ ती सांगत बसायची नसून निवडणुकीला सामोरे जाण्याची आहे.. मतांची संख्या आमच्या बाजूने आहे..आमचा विजय निश्चित असल्याचा दावा बीड लातूर धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी बीडमध्ये प्रचाराचा शुभारंभ करताना केला.. बाईट : महेश देशमुख, महाविकास आघाडी उमेदवार
0
0
Report

लातूर मिनी मार्केट: दुचाकीस्वार को अड़ाने की कार्रवाई पर पुलिस अधिकारी शरद कांदे निलंबित

Latur, Maharashtra:मिनी मार्केटमधील दुचाकीस्वार अपघात प्रकरणात वाहतूक पोलिसावर कारवाई... चुकीच्या पद्धतीने दुचाकीस्वाराला अडवण्याचा प्रयत्न. पोलीस अंमलदार शरद कांदे निलंबित... चुकीच्या पद्धतीने दुचाकीस्वाराला अडवण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसाला चांगलाच महागात पडला आहे. लातूरच्या मिनी मार्केट परिसरातील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशित वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस अंमलदार शरद कांदे यांची चूक निष्पन्न झाल्याने अखेर त्यांनी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

विदर्भ की शालाओं में 22–30 जून तक सुबह का सत्र, 1 जुलाई से सामान्य समय

Nagpur, Maharashtra:नागपूर - विदर्भातील शाळा 15 जून ऐवजी 22 जूनपासून सुरू होणार - शिक्षण विभागाचे अधिकृत परिपत्रक काढले,उर्वरित राज्यात 15 जूनपासून शाळा - विदर्भातील वाढते तापमान आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून निर्णय - राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना लागू - विदर्भातील शाळा 22 ते 30 जूनदरम्यान सकाळच्या सत्रातच भरतील - उष्णतेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विशेष नियोजन करण्याचे पत्र - 1 जुलै 2026 पासून शाळा नियमित वेळेनुसार सुरू होणार - उर्वरित महाराष्ट्रात 15 जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू राहतील
0
0
Report

कोल्हापुर दूध उत्पादक संघ के प्रशासक नियुक्ति पर याचिका, आज सुनवाई

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्याच्या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर ही सुनावणी होणार असून याकडे जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे. गोकुळच्या माजी संचालकानी दाखल केलेल्या याचिकेमध्ये प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया कायदेशीर चौकट न राबविल्याचा आरोप करण्यात आला आहे. संचालक मंडळाला कोणतीही पूर्वकल्पना न देता प्रशासकीय मंडळ नेमण्यात आल्याचे याचिकेत नमूद केले आहे. त्याचबरोबर प्रशासकीय मंडळाला स्थगिती देण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

नाफेड-एनसीसीएफ की घोषणा के बावजूद प्याज खरीद दूसरी दिन भी ठप, किसान नाराज़

Nashik, Maharashtra:* नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असूनही 'नाफेड' आणि 'एनसीसीएफ'कडून सलग दुसऱ्या दिवशीही कांदा खरेदी ठप्प. * प्रशासनाच्या शासकीय कांदा खरेदीच्या घोषणा फोल ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष. * नाफेड आणि एनसीसीएफने घातलेल्या विविध जाचक अटी आणि निकषांमुळे खरेदी प्रक्रियेत मोठे अडथळे. * ९ जून दुपारपर्यंत लासलगाव बाजार समितीत किमान दर ७०० रुपये तर सरासरी दर १,५६० रुपये नोंदवला गेला. * शासकीय खरेदीची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात मोठी तफावत असल्याचे चित्र बाजारात स्पष्ट. * लासलगावच्या निफाड उपबाजार आवारात केवळ एका शेतकऱ्याचा ३० क्विंटल कांदा १,५६० रुपये दराने खरेदी. * प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर शासकीय खरेदी कधी सुरू होणार, याबाबत नाफेड किंवा वखार महामंडळाचे स्पष्टीकरण नाही.
0
0
Report

इंडिगो ने Navi Mumbai–Chhatrapati Sambhajinagar और Bengaluru–Chhatrapati Sambhajinagar मार्गों पर उड़ानें हफ्ते में 4 दिन तक सीमित; Bengaluru के लिए 3 दिन और शनिवार को उड़ान रद्द

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:विमान इंधनाच्या किमतीत वाढ होत असल्याने 'इंडिगो'ने १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत 'नवी मुंबई - छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई' या मार्गावरील दैनंदिन हवाई सेवा आठवड्यातून ४ दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विमाने मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी चालवली जातील. याशिवाय, याच कालावधीत 'बेंगळुरू - छत्रपती संभाजीनगर बेंगळुरू' या मार्गावरील सेवा आठवड्यातून ४ दिवसांऐवजी ३ दिवसांपर्यंत असेल. बेंगळुरूसाठी विमाने सोमवार, मंगळवार आणि गुरुवार या दिवशी उड्डाण करतील. शनिवारचे विमान रद्द केले आहे. यापूर्वी कंपनीने हैदराबाद आणि गोव्याची विमानसेवा बंद केली. एअर इंडियाने दिल्लीचे एक विमान बंद केले आहे त्यामुळं संभाजीनगरची विमान कनेक्टिव्हिटी पूर्णतः विस्कळीत झाली आहे
0
0
Report
Advertisement

पंढरपूर में शराबी ने ट्रैफिक पुलिस से हाथापाई, सरकारी काम में बाधा मामला दर्ज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मद्यपीची वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की; सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ANCHOR: वाळूज भागातील पंढरपूर येथे मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाऱ्या एका व्यक्तीने वाहतूक पोलिशांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. तिरंगा चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असताना संबंधित बुलेटस्वाराने दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. पोलिसांनी चौकशी केली असता तो मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे समोर आले. त्यानंतर वाहन ताब्यात घेऊन चावी काढून घेतल्याने संतप्त झालेल्या व्यक्तीने पोलिसांशी वाद घालत धक्काबुक्की केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याने धक्काबुक्की केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि शासकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

अधिक मास के अवसर पर मोहटा देवी गढ़ में भक्तों की भारी भीड़, महाप्रसाद की तैयारी

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवी गडावर अधिक मास आणि उन्हाळी सुट्टीतील मंगळवारच्या मुहूर्तावर भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली आहे... दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकांचे दर्शन होईल अशा पद्धतीने नियोजन देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे... पार्किंग व्यवस्था, दर्शन रांग, जागोजागी पिण्याचे पाणी व्यवस्था नियोजन करण्यात आलीये...देवीच्या दर्शनासाठी गडावर पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. "आई राजा उदो उदो" च्या जयघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला होता... दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे नियोजन करण्यात आलय.
0
0
Report
Advertisement

हेमंत पाटील ने चुनाव से दूरी बनाई; अशोक चव्हाण के खिलाफ गठबंधन चर्चा तेज

Nanded-Waghala, Maharashtra:Satish Mohite Anchor - विधान परिषदेसारख्या निवडणूका मराठी माणसाच्या एपतीच्या आणि औकातीच्या बाहेर गेलेल्या आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणात बाजार चालू झालेला आहे आणि या बाजारात कोळश्याच्या दलालीत हात काळे करायचे नाहीत, या सगळ्या निवडणूकात महाराष्ट्राच्या राजकारनाचा चुथोडा झालाय म्हणून या निवडणुकीपासुन अलिप्त आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली. नांदेड जिल्ह्याच्या राजकारनात ज्या प्रमाणे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील कट्टर विरोधक आहेत त्याचप्रमाणे हेमंत पाटील हे देखील अशोक चव्हाण यांचे नेहमीच विरोधक राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत आमदार प्रताप पाटील आणि आमदार हेमंत पाटील यांनी एकत्र येत अशोक चव्हाण यांना आव्हान दिले होते. विधान परिषेदची उमेदवारी मागे घेण्याच्या एक दिवस आगोदर चिखलीकर आणि हेमंत पाटील यांची भेट होऊन चर्चा झाली होती. पण उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अशोक चव्हाण आणि चिखलीकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतल्याने सर्वाना धक्का बसला होता. चव्हाण आणि चिखलीकर यांच्या एकत्र येण्यावरही हेमंत पाटील यांनी थेट प्रतीक्रिया दिली. नांदेड जिल्ह्यातील कुठल्याच राजकारण्यांचा विश्वास आपण देऊ शकत नाही, कालपर्यंत जे बरोबर होते ते कुठल्या तंबूत जाऊन बसतील याची शाश्वती नाही, म्हणून या निवडणुकीपासून मी दुरु आहे असे पाटील म्हणाले. महाराष्ट्राच्या बदलेल्या राजकारणाचे अनेक अनुभव आहेत, कश्या पद्धतीचे राजकारण चाललेले आहे याचा वरिष्ठ नेत्यांनी विचार केला पाहिजे असेही पाटील म्हणाले. उमेदवार आणि मतदार यामध्ये थेट सगळे ठरलेले आहे म्हणून मध्यस्थ म्हणून माझी राहण्याची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. त्यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top