icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सातारा में भीषण हादसा: स्कॉर्पियो खाई में गिरा, 8 युवक मरे

Satara, Maharashtra:सातारा : आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळून आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांची साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांत्वनपर भेट घेत त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला.यावेळी बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, “मी त्यांच्या मुलाची किंवा भावाची जागा कधीच भरून काढू शकत नाही. मात्र मुलगा आणि भाऊ या नात्याने मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.”या दुःखद प्रसंगी त्यांनी दिवंगत तरुणांना श्रद्धांजली अर्पण करत, “ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” अशी प्रार्थना केली.दरम्यान, या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.
0
0
Report

डिजिटल अरेस्ट दिखाकर 59 लाख की ठगी: सांगली में गैंग गिरफ्तार

Sangli, Maharashtra:डिजिटल अरेस्ट दिखाकर गंडा घातून तासगाव येथील निवृत्त शिक्षकाला 59 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती सांगलीच्या सायबर क्राईम ब्रांचने दिली आहे. पश्चिम बंगालच्या दोघांना पुण्यातून अटक करत त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे क्रेडिट व एटीएम कार्ड सह पासबुक आणि चेकबुक जप्त करण्यात आले आहेत. या दोघांच्या कडून तासगाव येथील एका निवृत्त शिक्षकाला व्हिडिओ कॉलिंगच्याद्वारे संपर्क करून डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 59 लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणीस चांदीच्या सायबर क्राईम ब्रांचने तांत्रिक दृष्ट्या यशस्वी तपास करत मोर्चा पश्चिम बंगालच्या असणाऱ्या दोघांना पुण्याच्या हडपसर मधून अटक केली आहे.
0
0
Report

सोळांकूर गांव में आक्रामक माकड़ से 4 दिन में 63 घायल, ऑपरेशन मंकी जारी

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोळांकूर गावात एका आक्रमक माकडाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल 63 जणांना चावा घेतल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या माकडाला पकडण्यासाठी वनविभाग, रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. एका अर्थाने सोळांकूर गावात ऑपरेशन मंकी शोध मोहीम राबवली जात आहे, पण हे माकड काही रेस्क्यू टीमच्या हाती लागताना दिसत नाहीये. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील सोळांकूर गावात सध्या एका माकडाचीच चर्चा सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून हे माकड गावात मुक्तपणे फिरत असून, मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करत आहे. इतकेच नव्हे तर दुचाकीवरून जाणाऱ्या लोकांना देखील लक्ष करत आहे. या माकडाच्या चाव्यामुळे आतापर्यंत 63 जण जखमी झाले असून, दोन जणांना गंभीर दुखापत झाल्याने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून अनेकांनी घराबाहेर पडणेही कमी केले आहे. माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग, रेस्क्यू पथक आणि गावातील तरुणांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. हातात काठ्या घेऊन गावातील विविध भागांमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे. वनविभागाने माकडाला भूल देण्यासाठी ट्रॅंक्विलायझर डार्टचा वापरही केला. मात्र, डार्ट लागल्यानंतरही माकडाने तो काढून फेकल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे माकडाला पकडण्याचे आव्हान आणखी कठीण बनले आहे. वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या माकडाला यापूर्वी काही प्रकारची दुखापत झाली असावी. त्यामुळे ते आक्रमक बनल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामसभेत “ऑपरेशन मंकी” अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अतिरिक्त मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्रीची मागणी करण्यात आली, त्यानुसार गावात हल्लेखोर माकडाला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. पण माकड काही रेस्क्यू टीमच्या हाताला अजून तरी लागलेलं नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये या माकडाची दहशत पसरली आहे.
0
0
Report
Advertisement

डोंबिवली के खंबाळपाडा में किरकोळ विवाद के चलते पड़ोसी ने पड़ोसी की हत्या

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत किरकोळ वादातून शेजाऱ्याने केली शेजाऱ्याची हत्या डोंबिवलीच्या खंबाळपाडा भागात किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आलीय. शेजाऱ्याने शेजाऱ्याची चाकूनं भोसकून हत्या केलीय. रोहित शेलार याने प्रताप चौधरी याची हत्या केलीय. रोहित आणि प्रताप एकमेकांचे शेजारी आहेत. रोहित याच्या बांधकामामुळे प्रताप याच्या घराच्या भिंती या सामाईक होणार होत्या, मात्र प्रतापचा त्याला विरोध होता आणि याच वादातून रोहितने प्रतापची चाकूने भोसकून हत्या केली. याप्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलिस घटना स्थळी पोचली आहे आणि घटना स्थळी पंचनामा सुरु आहे या घटनेतील आरोपी चा टिळक नगर शोध सुरु केला आहे.
0
0
Report

देवठाणा में पिकअप दुर्घटना: पति और दो बेटियाँ मौत, पत्नी घायल

Washim, Maharashtra:वाशीम–कनेरगाव रोडवरील देवठाणा फाट्याजवळ आज भीषण अपघात घडला. पिकअप वाहनाच्या चुकीमुळे मोटारसायकल ला जोरदार धडक बसून एका कुटुंबावर काळाचा घाला आला. इस हृदयद्रावक अपघातात पती आणि दोन्हीं मुलींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली है. मृतांमध्ये ज्ञानेश्वर निवृत्ती खडसे, किर्ती खडसे और केतकी खडसे यांचा समावेश है. प्रामुख माहितीनुसार, मृत मुलींमध्ये एक 3 वर्षांची तर दुसरी 7 वर्षांची होती. हे कुटुंब देवठाणा येथील असल्याची माहिती समोर आली है. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. गंभीर जखमी पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देवठाणा परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

पाथर्डी थाने के सामने विवाद से मौत, पीड़िता पर अत्याचार का नया मामला

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी पोलीस ठाण्या समोर तक्रार देणाऱ्या महिलेसोबत आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पीडित महिलेची तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली...तणावपूर्ण वातावरणात पीडित महिला आणि तिच्या मुलाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून प्रयत्न केला...दरम्यान पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले विठ्ठल खर्चन हे अचानक जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले , त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषीत केले...संबंधित व्यक्ती पीडित महिलेसोबत पोलीस ठाण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे...संबंधित पीडित महिलेवर एक महिन्यापूर्वी गावातीलच काही जणांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे...दरम्यान पीडित महिलेची तक्रार नोंदवून घ्यावी यासाठी सोबत आलेल्या खर्चन यांचा मृत्यू झालाय या सर्व घटनेला पोलीस जबाबदार असल्याचे नातेवाईकांनी घेतले आहे
0
0
Report
Advertisement

बारामती पुलिस ने नकली नियुक्ति पत्र देकर करोड़ों की ठगी करने वाले गैंग पर चोट, तीन आरोपी गिरफ्तार

Rui, Maharashtra:शासकीय नोकरीचं आमिष दाखवून कोट्यावधींना गंडा घालणारा गजाआड.... बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई.... बनावट नियुक्त पत्र देत एक कोटी छत्तीस लाखांना गंडा घालणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड. Anchor _ शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींसह अनेकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टोळीवर बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बनावट नियुक्तीपत्रे देऊन तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या या टोळीतील आणखी एका आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी गजाआड केल आहे. सुरज तिमयया असदकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात बारामती तालुका पोलिसांनी आतापर्यंत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वीच दौंड येथील अजिंक्य पाठक आणि येरवडा येथील सुधाकर सोळंकी यांना अटक केली असून या दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
0
0
Report

वाशिम के रिसोड में आंधी-बारिश से पेड़ गिरने और बिजली आपूर्ति बाधित, नुकसान

Washim, Maharashtra:अँकर:वाशीमच्या रिसोड शहरासह परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. सायंकाळी दरम्यान वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी वादळी वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी नुकसान झाले. जोरदार वाऱ्यामुळे शहरातील काही भागांत झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. शहरातील विश्वा लॉन येथे उभारण्यात आलेले लोखंडी व सजावटीचे डिजाईन कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटना घडली त्यावेळी परिसरात काही नागरिक उपस्थित होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
0
0
Report

सोलापुर में गन्ना किसान आक्रमक, दो साल से बिल बकाया के कारण उपवास-रास्ता रोको

Solapur, Maharashtra:सोलापुरात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक - सोलापुरात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक - बेमुदत सुरू असलेल्या उपोषणाचे रास्ता रोकोत रूपांतर - गोकुळ साखर कारखान्याने मागील दोन वर्षापासून ऊस बिले न दिल्याने शेतकऱ्यांचे उपोषण सुरु आहे - मात्र पोलिसांनी आंदोलकांना मंडप उखडून फेकू अशी भाषा केल्याने शेतकरी आक्रमक - संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा आम्ही रस्ता रोको सुरूच ठेवणार असल्याचा शेतकऱ्यांचा इशारा - मागील वर्षीचे 2 कोटी तर यंदाच्या वर्षीचे 130 कोटी थकवल्याने शेतकऱ्यांचे उपोषण सुरु आहे - जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शांततेत सुरू असलेल्या उपोषणातील शेतकरी आक्रमक - जिल्हा परिषदे बाहेरील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली - दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे आंदोलकांच्या भेटीसाठी दाखल - तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडून शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली - मात्र शेतकरी आक्रमक असून माफी मागितल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका
0
0
Report
Advertisement

रायगढ़-उरण कांग्रेस में नाराजगी, 50 पदाधिकारियों ने राजीनामे दे दिए

Navi Mumbai, Maharashtra:रायगड उरण च्या काँग्रेसमध्ये नाराजी; ५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे रायगड उरण च्या काँग्रेसमध्ये नाराजी; ५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे कॉग्रेस च्या अध्यक्षपदावरून महेंद्र घरत यांना दूर करून जिल्ह्याची उत्तर आणि दक्षिण अशी विभागणी केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचा भडका उडाला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारी ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन सामूहिक राजीनामे सुपूर्द केल्याची माहिती उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी दिली. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी रायगड जिल्ह्याची पुनर्रचना करून उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनीष पाटील, तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र ठाकूर यांची नियुक्ती केली आहे. दीड ते दोन महिन्यांपासून काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षक रागिणी नायर यांच्या रायगड दौऱ्यानंतर जिल्ह्यातील संघटनात्मक बदलावांच्या चर्चाना वेग आला होता. मात्र, महेंद्र घरत यांना पदावरून दूर करून जिल्ह्याची विभागणी केल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
0
0
Report

राज्य सरकार फिश वेन्डिंग ई-रिक्शा योजना शुरू करेगी; 90% अनुदान संभव

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मत्स्यविक्रीला आधुनिकतेची जोड..राज्य सरकार आणणार 'फिश वेंडींग ई-रिख्शा' योजना!.. अँकर राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ,आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी राज्य सरकार ‘फिश वेंडींग ई-रашылықा’ हे नवे मॉडेल राबविणार आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असून प्रति लाभार्थी अंदाजे ४ लाख रुपयांचा प्रकल्प खर्च प्रस्तावित आहे.या ई-रिक्षा मॉडेलमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील मत्स्यविक्री साखळी अधिक सक्षम होईल,ग्राहकांना दर्जेदार मासळी मिळेल आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे,अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली..
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी समुद्र में अवैध ईंधन भंडारण के संकेत, 5 मछुआरों को हिरासत में लिया गया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- इंधन टंचाई असताना समुद्रात आढळला बोटीवर इंधनाचासाठा.. रत्नागिरीच्या कस्टम विभागाची मोठी कारवाई, कस्टम विभागाने पकडलेल्या बोटीचे नाव शहाना.. जयगडच्या समुद्रात इंधन साठा आढळणाऱ्या मच्छिमारी बोटीची झाडाझडती.. मच्छिमारी बोटी वर अवैधरित्या इंधनाचा साठा करून ठेवला जात असल्याचा संशय.. मच्छिमारी हंगाम संपत आला असताना बोटीवर एवढा साठा कशासाठी.. कस्टम विभागाकडून इंधनाचा साठा सापडलेली बोट चौकशीसाठी घेतली ताब्यात.. सापडलेली बोटीवर इंधनाचे 30 हून अधिक बॅरल, मच्छिमारी बोट गुहागर पडवे इथली असल्याचा संशय.. बोटीवरील 5 जणांना घेतले चौकशीसाठी ताब्यात, सर्व जणांना चौकशीसाठी रत्नागिरीत आणल्याची माहिती- सुत्रांची माहिती
0
0
Report

गडचिरोली में हाथियों का क़तार नदीपात्र से गाँव की ओर, भय का माहौल

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात हत्तींच्या कळपाची नदीपात्रातून गावाकडे कूच, गडचिरोली तालुक्यातील साखरा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अँकर:  गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा रानटी हत्तींच्या कळपाने नागरिकांची झोप उडवलीये. गडचिरोली तालुक्यातील साखरा गावाजवळ तब्बल 15 ते 20 हत्तींचा कळप थेट गावाच्या दिशेनं येत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शेतातून आणि नदीपात्रातून मार्ग काढत हा कळप गावाजवळ पोहोचल्याची माहिती समोर आलीये. रात्रीच्या वेळी हत्ती गावाजवळ दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली. सध्या शेतीपूर्व मशागतीची कामं सुरू असताना शेतकरी पहाटेपासून शेतात जातात. मात्र हत्तींच्या सततच्या वावरामुळे आता शेतात जाणंसुद्धा धोकादायक बनलंय. वन विभागाकडून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यापलीकडे कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
0
0
Report

अकोला में गर्मी की लहर: प्रशासन ने जारी किए मार्गदर्शक निर्देश

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात २६ ते २८ मे दरम्यान उष्णतेची लाट राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यानुसार नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दु. १२ ते ४ दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. ज्वलनशील पदार्थापासून दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना दरवाजा बंद असलेल्या वाहनात किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. तहान असो किंवा नसो, भरपूर पाणी प्यावे. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे, आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top