445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
उल्टी दिशा से आ रही कार ने तीन-चार गाड़ियां टक्कर दी, सड़क पर जाम
Kalyan, Maharashtra:विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने तीन ते चार वाहनांना धडक दिली. डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेज जवळील मुख्य रस्त्यावर हा अपघात झालाय. अपघातात ज्या वाहनांना धडक देण्यात आली त्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अपघात झाल्यानंतर या ठिकाणी मुख्य रस्त्यावर एका मागोमाग एक वाहनं उभी राहिल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय. रात्रीच्या वेळेस ही वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागला. दरम्यान सध्या पोलिस, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक कोंडी सोडण्यासाठी प्रयत्न केला जातोय.0
0
Report
अंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस पर चंद्रपुर में लोको पायलट ने बाघ बचाया, ट्रेन धीमी कर दी
Chandrapur, Maharashtra:आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या निमित्ताने व्याघ्र जिल्हा असलेल्या चंद्रपूरात ट्रेन लोको पायलटचे प्रसंगावधान आले. बल्लारशा-गोंदिया घनदाट अरण्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर रेल्वे गाडी पुढे अचानक वाघ आया. वाघाला वाचवण्यासाठी लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक का वापरून वेग कमी केला. वाघाने रेल्वेची गती आणि आवाज ऐकत रेल्वे रूळ पार केला. या रेल्वेर्गावर गेली अनेक वर्षे रेल्वेची गती नियंत्रित करण्यासाठी वन्यजीव अभ्यासक आणि आंदोलक सततचा पाठपुरावा करत आहेत. हॅबिटॅट कंजर्वेशन सोसायटी चंद्रपूरचे दिनेश खाटे यांनी हा व्हिडीओ उपलब्ध करून दिला है.0
0
Report
गुरुपौर्णिमा पर अकोला में शिंदे गट ने गुरु-शिष्य परंपरा का उल्लास मनाया
Akola, Maharashtra:आज गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभर विविध ठिकाणी गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान करण्यात आला. अकोल्यात शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने गुरुपौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष दर्शन घेणे किंवा त्यांना गुरुस्थानी मानून अभिवादन करणे सर्व कार्यकर्त्यांना शक्य नसल्याने, अकोल्यात त्यांच्या प्रतिकृतीचे पोस्टर उभारण्यात आले. या पोस्टरला पुष्पहार आणि शाल अर्पण करून कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना गुरुस्थानी मानत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, एकनाथ शिंदे हे आपल्यासाठी प्रेरणास्थान असल्याची भावना व्यक्त केली.0
0
Report
Advertisement
विदर्भ के लिए अगले 48 घंटे खतरे के संकेत; रेड-ऑरेंज अलर्ट जारी
Nagpur, Maharashtra:नागपूर पुढील ४८ तास विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे. तर नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस विदर्भासाठी सतर्कतेचे असणार आहेत. याबाबत माहिती जाणून घेतली आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागचे तज्ज्ञाकडून0
0
Report
चंद्रपुर के स्थानीय अपराध शाखा की दबिश, जलनगर से MD ड्रग तस्कर गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई ,जलनगर भागातून एमडी ड्रग तस्कर अटकेत, सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी धडक कारवाई करत शहराच्या जलनगर भागातून एमडी ड्रग तस्कराला अटक केली आहे. गुन्हे शाखा पथक गस्तीवर असताना त्यांना कंजर मोहल्ला भागातील एका जुन्या घरात एमडी ड्रगसाठा लपवून ठेवला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या घरावर धाड टाकण्यात आली. धाडीत 18.95 ग्राम एमडी यासह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांची एकत्रित किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. याप्रकरणी ललित उर्फ आर्यन बादल कंजर या 38 वर्षीय ड्रग तस्कराला अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई रामनगर पोलीस ठाणे पथक करत आहे.0
0
Report
मराठा आरक्षण आंदोलन: 29 अगस्त से अनिश्चित उपवास, दिल्ली में मराठा अधिवेशन की घोषणा
Jalna, Maharashtra:जालना : जरांगेंचा पुन्हा आमरण आंदोलनाचा ईशारा,अंतरवालीत ,29 ऑगस्ट पासून उपोषण करण्याबरोबरच दिल्लीतही मराठ्यांच अधिवेशन घेण्याची घोषणा(पॅकेज) अँकर :मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला 29 ऑगस्ट रोजी 3 वर्ष पूर्ण होतायत.या निमित्ताने जरांगे यांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक घेतली.28 ऑगस्ट पर्यत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा 29 ऑगस्ट पासून अंतर वाली सराटी येथे शेवटचं आणि अंतिम आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे.शिवाय दिल्लीत देखील मराठ्यांचं अधिवेशन घेण्याची घोषणा जरांगे यांनी केली. व्हिओ:०१: मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण होणार आहेत.मात्र 3 वर्ष सतत आंदोलनं करूनही मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीय.त्यामुळे जरांगे आक्रमक झालेत.29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण होणार असल्यानं जरांगे यांनी 29 ऑगस्ट पासून अंतर वाली सराटीत आमरण उपोषण करण्याचा ईशारा राज्य सरकारला दिलाय.हे आमरण उपोषण थांबवायचं असेल तर 28 ऑगस्ट पर्यत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा तरच अंतर वालीत होणारं निर्णायक आणि शेवटचं आमरण उपोषण थांबवलं जाईल असं जरांगे यांनी म्हटलंय.जरांगे यांच्या मागण्या कोणत्या आहेत हे ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. *ग्राफिक्स : मनोज जरांगे यांच्या मागण्या* 1) राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या 2)हैदाबाद गॅजेटिअरनुसार मराठवाड्याले सगळे प्रमाणपत्र घ्यायचे 3)सातारा, कोल्हापूर, पुणे औंध आणि बाॅम्बे या पाचही संस्थानच्या गॅजेटिअरची अमंलबजावणी जीआरसहीत पाहीजे 4)मराठा आंदोलकांवरील दाखल केलेेले गुन्हे मागे घ्यावे 5)ओबीसीच्या सर्व सोई- सुविधा मराठा समाजाला लागू करा 6) अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील व्याज परतावे देण्यात यावेत 7)सारथीच्या योजना पुन्हा सुरु करण्यात याव्यात 8)मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं 9) एसईबीसीचे, ईएसबीसी आणि एसडब्लू एस मधून निवड झालेलेल्यांना नियुक्त्या द्या 10)ईसीबीसी आरक्षणातून निवड झालेल्या परिक्षार्थी,विद्यार्थ्यांना सेवेत रुजू करून घ्या 11-कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेल्या मराठ्यांना व्हॅलिडीटी प्रमाणपत्र द्या बाईट : मनोज जरांगे पाटील व्हिओ :०२: दरम्यान आज अंतरवालीत झालेल्या बैठकीत मनोज जरांगे यांनी दुसरी आणखी एक महत्वाची घोषणा केलीय.देशातील सर्व राज्यातील मराठ्यांचं दिल्लीत अधिवेशन घेणार असल्याचं जरांगे यांनी जाहीर केलं मात्र हे अधिवेशन कधी घेतलं जाणार याबाबत अधिकची माहिती देणं जरांगे यांनी टाळलं. बाईट : मनोज जरांगे पाटील व्हिओ :०३: जरांगे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आत्तापर्यंत अंतरवाली सराटीत 09 आंदोलनं केलीयत.आता 29 ऑगस्ट रोजी अंतरवालीत जरांगे यांचं होणार उपोषण हे 10 वं आंदोलन असेल.त्यामुळे राज्य सरकार जरांगे यांचं होणारं उपोषण थांबवण्यासाठी काय प्लान आखतं हे पाहावे लागेल0
0
Report
Advertisement
सीईटी-एमपीएससी पेपरफुटी के विरोध में युवक कांग्रेस ने पानी टंकी पर शोले-स्टाइल प्रदर्शन
Akola, Maharashtra:महाराष्ट्रातील सीईटी आणि एमपीएससी परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप उचलला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चाललेल्या या खेळाचा निषेध करण्यासाठी अकोळ्यातील युवक काँग्रेसने आज एक अनोखे आंदोलन केले. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि शिक्षण विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परीक्षांमधील गैरव्यवहार रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली होती. पाण्याच्या टाकीवरील या हायड्रामुळे घटना आंदोलनस्थळी मोठी गर्दी उसळली होती. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा केली. शेवटी पोलिसांच्या विनंतीला मान देऊन युवक काँग्रेसने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आणि कार्यकर्ते खाली उतरले. मात्र, आंदोलन संपताच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये म्हणून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले.0
0
Report
महाराष्ट्र में मराठा आरक्षण पर सरकार की चालबाज़ियाँ उजागर, आंदोलन तेज
Navi Mumbai, Maharashtra:शशिकांत शिंदे byte पॉईंटर On अण्णाभाऊ साठे स्मारक 31 तारखेला मुख्यमंत्री घाटकोपर येथील त्यांच्या वास्तू मध्ये भूमिपूजन करणार आहे. 2002 साली पवार साहेबांच्या माध्यमातून आणि तिथे असलेल्या स्मारक कृती समिती जी स्थापन केली त्यांनी ती वास्तू खरेदी केली. तीच जतन केलं. मातंग समाजाचा मोठा नेता त्यांच्या स्मारकच जतन आणि उभारणी होत असेल तर आम्ही स्वागतच करतो फक्त ज्यांनी आतापर्यंत त्या वास्तूचे जतन केलं त्यांना सोबत घ्यावं. मातंग समाजाच्या नेत्यांना देखिल सोबत घ्यावं. On माथाडी कामगार अन्याय आता पर्यंत माथाडी चळवळीला राज्यकर्ते म्हणून जे बसले त्यांनी पाठिंबा दिलाय. मी पक्षीय राजकारण करत नाही मात्र काँग्रेसच्या राजवटी मध्ये सुद्धा जी संघटना, जी चळवळ जे व्यापारी आहेत यांना प्राधान्य दिलं जायचं मंडळावर माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य दिलं जायचं. सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये भरतीची जाहिरात दिलेय. त्या जाहिराती मध्ये कुठेही माथाडी कामगारांचा उल्लेख नाही आहे. आम्ही आंदोलन केप्ट तेव्हा आश्वासन दिलं मात्र आता जाहिराती मध्ये माथाडी कामगारांचा उल्लेख नाही हे दुर्दैवाचे. सरकारने फेरवीचार केला नाही तर आंदोलन तीव्र कराव लागेल. On राष्ट्रवादी विलीनिकरण पवार साहेबांनीच सांगितलं विलिनिकरणाबाबत चर्चा नाही. आता समोर भेटले तर लगेच राजकीय चर्चा होते. काही निर्णय घ्यायचा झाला तर आमच्याशी चर्चा करून पवार साहेब निर्णय घेतील. करायचं असेल तर खुलेआम करू. On पेपरफुटी केंद्र सरकार राज्य सरकारने कायदे केले नाहीत का तर केलेत. तरी सुद्धा या शिक्षणाचा बाजरीकरण झालेले आहे गरीब शिकू शकत नाही श्रीमंत डिगऱ्या घेतील अशी परिस्थिती म्हणून तरुण वर्ग नाराज. दादाभुसे म्हणाले खाजगी कोचिंग वर बंदी आणावी लागेल सरकार उशिरा जागे झाले असे माझे मत. करियर उभ करायचं असेल तर माझं करियर पैश्यानेच उभं राहील हि ओळख चुकीची. पूर्वी शासकीय विद्यापीठ होती आता खाजगी विद्यापीठ जास्त झालीत त्या माध्यमातून डिग्री दिली जातेय. कुठलीही परीक्षा सरळन्हवत नाही. कायद्याची भीती राहील का याची शक्यता नाही. विद्यार्थ्यांचे करियर उध्वस्त करण्याची जबाबदारी सध्याच्या सिस्टिम आणि रॅकेट मध्ये आहे हे रॅकेट उध्वस्त केलं पाहिजे तोपर्यंत विद्यार्थ्यांची डिग्री विकली जाईल असा प्रकार देशात राज्यात सुरु आहे. On मराठा आरक्षण ही राज्य सरकारची कसोटी आहे. धर्मावर राजकारण करायला गेलं कि सरकार आश्वासन देत आश्वासन दिलं कि पुरतता झाली नाही तर समाज नाराज होतात. जे आश्वासन दिले त्या आश्व्सनांची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकारची. सरकार चालढकल करतेय कि काय याचा खुलासा करणे गरजेचे. On तुकाराम मुंडे कारवाई आता त्यांची उचल बांगडी झाली तर परत एकदा कॉकरोच उभे राहतील. आता समाज उभा राहील. लोकांना विष तुम्ही घालता आणि त्यााची कारवाई करण्याचा प्रयत्न एखादा अधिकारी करत असेल त्याचे परिणाम काय हे दिवून येत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांची बादली करण्याचा प्रयत्न झाला तर जनतेची कॉकरोच पार्टी उभी राहिली पाहिजे.0
0
Report
नागपूर में तेज बारिश से बाढ़ जैसे हालात; एक घंटे में 110 मिलीमीटर पानी
Nagpur, Maharashtra:नागपुरात मंगळवारी दुपारी झालेल्या पावसामुळे शहरात अक्षरशः दाणादाण उडाली. दिवसभरात 186 मिलिमीटर पाऊस झाला असला तरी अवघ्या एक ते सव्वा तासात 110 मिलिमिटर ढगफुटी सदृश्य अशा प्रकारचा पाऊस काही भागातच झाला. या पावसामुळे महापालिकेच्या नालेसफाई आणि पावसाच्या पूर्वतयारीच्या दाव्यांची पार पोलखोल झाली. बेसा, बेलतरोडी, मनीष नगर, नरेंद्रनगर, सोनेगाव, प्रतापननगर स्वावलंबी नगर या परिसरात तर काही ठिकाणी तलाव आणि नदीचे स्वरूप आले होते. तर काही ठिकाणी महापालिकेच्या कंत्राटदारानी ठेवलेल्या अर्धवट कामांमुळे प्रचंड मनस्ताप अनेकांना सहन करावा. अगदी शालेय विद्यार्थी ही अगदी जीव मुठीत घेऊन पाण्यातच वाटकाढावी लागली. दरम्यान या पावसामुळे अनेकांच्या संसार साठी जमा केलेल्या साहित्य पाण्यात वाहून गेले. नागपूरात अवघ्या एक ते सव्वा तासात 110 मिलीमीटर असा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. कमी वेळात कोसळलेल्या एवढ्या मोठ्या पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा प्रकारच्या वेदर इव्हेंट ही चिंतेचा विषय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूरच्या स्नेहा नगरातील निलेश चिंचोळकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रात्रभर शेडमध्ये आश्रय घेत त्यांनी जीव वाचवला. आता डोळ्यांसमोर उभं आहे ते फक्त उद्ध्वस्त झालेलं घर, पाण्यात बुडालेली स्वप्नं आणि उद्याच्या उदरनिर्वाहाची चिंता. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी आणि या परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आर्त मागणी त्यांनी केली.0
0
Report
Advertisement
जालना में नकली बारिश घोटाला: लॉबी ने पर्जन्यमापक सेंसर से खेला
Jalna, Maharashtra:जालना: विमा लॉबीने पर्जन्यमापकात बर्फाच्या बाटल्या ठेवून पाडला बनावट पाऊस (पॅकेज). हवामान केंद्रात सेन्सर छेडले, सॅटेलाइटने उघडकीस आणली चोरी. जालना जिल्ह्यातील 49 पैकी 40 हवामान केंद्राच्या उपकरणात छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणानंतर स्कायमेटकडून जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या. पण या प्रकारामागे फळपीक विमा योजनेंचा लाभ मिळण्यासाठी लॉबीने हा प्रकार घडवून आणल्याचं समोर आलं आहे. पर्जन्यमापकात सुद्धा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाल्याचं आढळलं, परंतु त्या ठिकाणी तापमान, दाब आर्द्रता या हवामान घटकांत कोणताही नैसर्गिक बदल दिसून आला नाही. सर्व सेन्सर उपग्रहाद्वारे एकत्रित माहिती पाठवत असल्याने विसंगती तांत्रिक तपासणीत निदर्शनास आली. त्यामुळे पावसाची नोंद वाढवण्याचा प्रयत्न झाल्याचं प्रकार समोर आलं. या प्रकारामागे फळपीक विमा योजनेच्या लाभासाठी कार्यरत लॉबीचे असल्याचं समोर आलं आहे. पर्जन्यमापकात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली होती. या वेळी तेथील हवामान घटकांमध्ये नैसर्गिक बदल दिसून आला नाही. जिल्ह्यातील 49 पैकी 40 स्वयंचलित हवामान केंद्रांच्या उपकरणात छेडछाड झाल्याच्या प्रकाराची नोंद झाली असून, स्कायमेटकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. परंतु अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला नाही; पोलीस तपास प्रगतीत आहेत.0
0
Report
KDMC के कर्मचारी SIR के काम में व्यस्त, नागरिक सुविधा केंद्र में भीड़ और परेशानी
Kalyan, Maharashtra:KDMC चे कर्मचारी SIR च्या कामात व्यस्त , कार्यालयात रिकाम्या खुर्च्या , नागरिक सुविधा केंद्रात आलेले नागरिक ताटकळले Anchor- कल्याण डोंबिवली महापालिकेतील नागरी सुरक्षा केंद्रात आलेल्या नागरिकांना सध्या ताटकळत उभं राहावं लागतंय.त्यांची काम होत नाहीयेत. Vo- त्याचं कारण म्हणजे sadhya या नागरिक सुविधा केंद्रामध्ये अधिकारी ,कर्मचारी नसल्याने खुर्च्या रिकाम्या आहेत .SIR(एसआयआर)च्या कामामध्ये अनेक कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या ड्युट्या लावण्यात आल्याने त्या कामात ते व्यस्त आहेत. त्यामुळे महापालिकेतील कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.0
0
Report
नागपुर में भारी बारिश: 450 बच्चों को सुरक्षित बाहर निकाला गया, ऑरेंज अलर्ट जारी
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री - On नागपूर पाऊस - मुळात काल जवळपास 186 मिलिमीटर पाऊस हा एका दिवसात नागपुरात पडला, पण त्यातलाही जवळपास 110 मिलिमीटर पाऊस हा एक ते सव्वा तासाच्या अंतराने पडला, त्यामुळे अनप्रेसिडेंट अशा पद्धतीचा हा पाऊस होता आणि तोही ढगफुटी होते तशा काही भागातच झाला. त्यामुळे त्या भागातील जे सखल एरिया होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं..विशेषतः तीन शाळांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालवावं लागलं आणि सर्व मुलांना बाहेर काढावा लागला..सुमारे 450 मुलांना बाहेर काढलं. प्रशासनाने अतिशय चांगलं काम केलं, ज्या काही ठिकाणी झालेले नाही पण निश्चितपणे लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे किंवा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने काही काळा साठी जनजीवन विस्कळीत होत. अजूनही काही भागात पाणी आहे. त्यावर कारवाई सुरू आहे. आजही ऑरेंज अलर्ट नागपूरला दिला आहे, संध्याकाळ नंतर पाऊस येण्याची शक्यता आहे पाचनंतर..प्रशासनाशी माझी चर्चा झाली आहे मात्र वेदर इव्हेंट हे सगळे चिंताजनक आहेत. पालघर, नागपूर, नाशिकला आपण बघितलं की 15 किंवा एका दिवसात पाऊस येऊन राहिलाय त्यामुळे त्याचे इंटेन्ससिटी इतकी आहे की आपल्या त्याला ड्रेन करण्याच्या नॅचरल सिस्टम देखील इतक्या प्रभावी नाही की महिन्याभराचा पाऊस एक-दोन दिवसात आला तर त्यातून अनेक फ्लॅश फ्लॅट तयार होत आहेत त्यामुळे याचाही थोडा विचार भविष्याच्या दृष्टीने करावा लागेल. अर्धवट विकास कामांचा फटका - काही ठिकाणी काम चाललेली आहेत, अर्धवट आहे, त्यामुळे पाणी थांबलं, पण असं सरसकट असं नाही तर एक सोबत 110 मिलिमीटर पाऊस पडेल तर कुठलीच सिस्टम एवढ्या पावसाकरिता डिझाइन नसते, सिस्टम डिझाइन करताना गेल्या 20- 25 वर्षातील जो डेटा आहे त्याच्या दहा टक्के जास्त असं सिस्टम डिझाइन होते. अशा प्रकारचे हे सातत्याने राज्यभरात होत आहेत त्यामुळे याचा विचार अभ्यास करावा लागेल. जरांगे पाटील आंदोलन अल्टीमेटम - जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळत आणि ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत, माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे कोणी मागतोय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरिता जे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले तेवढे कुठल्याही सरकारने केले नाही, अद्यापही कोणाचा रोष असेल कोणाला वाटत असेल की योग्य होत नाही तर त्यातून मार्ग काढता येईल. पिकी विमा संख्या घटली - नवीन अटी शर्ती त्याचा कारण नाहीय मुळात असं कारण आहे की एक रुपयात पिक विमा अशा पद्धतीने पिक विमा केला त्यावेळी सर्वांनीच तो पिक विमा काढला आणि त्यानंतर असं लक्षात आलं की त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने बोगसगिरी झाले, बीड सारख्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या म्हणून मग त्यामध्ये आपण काही सुधारणा केल्या आहेत. पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना आता त्यांचा हिस्सा भरावा लागतो म्हणून त्यांनी संख्या आता थोडी कमी झाली आहे. राहुल गांधी - RSS - अमित शहा - मला असं वाटतं राहुल गांधींचा भाषण ऐकलं नाही, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही की मी त्यांचा भाषण ऐकू, कारण त्यांच्या भाषणात तर काही रहात नाही, कोणताही विपक्षचा नेता जेव्हा बोलतो आरोप जरूर करावा, चुकीच असेल तर त्यावर बोलावं, टिप्पण्या करावा पण देशाच्या तरुणांसाठी कोणते सकारात्मक सूचना दिल्यात कां काय बोलले? केवळ खोटे आरोप करणे यातून काही मिळणार नाही, माझा विश्वास आहे हा बिल पास होईल तर या नव्या पद्धतीमुळे खूप सिक्युअर अशा प्रकारची परीक्षा पद्धती येणार आणि आपल्या तरुणांचं कल्याण होईल. महाराष्ट्रात आंदोलन गुन्हे मागे - महाराष्ट्रात पोलीस विभागाला आणि गृह विभागाला आणि ऑलरेडी सांगितलेला आहे की या आंदोलनाच्या दरम्यान ज्या काही केसेस झाल्या आहेत त्या केसेस परत घेतल्या पाहिजे, महाराष्ट्रात पोलिसांनी फार संयमाची भूमिका घेतली आहे साधारणपणे केसेस आपण बघितल्या तर जमावबंदीच्या केसेस लागल्या आहेत पण ज्या काही केसेस आहेत त्या परत घेण्याच्या आदेश मी दिले आहे. गडचिरोली नक्षल - पत्रक - मध्यंतरीच्या काळात नक्षलवाद्यांचे काही पत्रक लागलेले दिसले पण ज्यावेळी त्याची चौकशी करण्यात आली त्यावेळी असं लक्षात आलं की काही लोकांनी स्वतःच्या हिताकरिता आणि स्वतःच्या स्वार्थाकरिता काही गोष्टी मिळाव्या म्हणून स्वतःसाठी पत्रक लावली त्यांना जेरबंद करण्यात आली आहे. राहुल गांधी प्रल्हाद जोशी टीका - राहुल गांधी काही बोलू शकतात पण राहुल गांधी काय आहेत...हे देखील भारत ओळखतो... मोदी सरकार काय आहेत. M प्रल्हाद जोशी काय हे देखील भारताचे लोक ओळखतात.. राहुल गांधी एकच अजेंडा घेऊन निघालेले आहेत आणि तो अजेंडा आहे अराजकता जगताचा. वन विभाग एआय सिस्टम - मला अतिशय आनंद आहे की मारवल जे आपल्या महाराष्ट्राची एआय कंपनी आहेांनी एक अतिशय चांगलं मॉडेल आपल्या नागपूरचे एसपी हर्ष पोद्दार यांनी तयार केला आहे, ज्यामध्ये वाघाचा विचरण होता त्याची पूर्व मॉर्निंग देण्याची सिस्टम तयार केली आहे. वाघ जेव्हा विचरण करतो तेव्हा काही प्राणी आवाज काढून जंगलाला सांगत असतात की वाघ कुठे आहे, आदिवासी बांधव वर्षानुवर्षी वनवासात राहतात त्यांना याची नीट माहिती असल्याने ते पूर्वीच्या काळात अशा परिस्थितीत राहत असताना बरोबर त्या ठिकाणी स्वतःला वाचवायचे. तेच ज्ञान आता आपण या मध्ये आणलेले आहे त्यामुळे वाघाचा फोटो जरी नाही मिळाला तरी हे प्राणी जेव्हा आवाज करतात त्या आवाजाचा सेन्स करून वाघ कुठे आहे त्याची अर्ली मॉर्निंग देण्याचा सिस्टम तयार झाला आहे. पुढच्या काळात पूर्ण देशातील लागू करण्यात येईल. कर्जमाफी यादी... ई kYC - यासंदर्भात अगोदर स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की अकाउंट एनपी होते..यां NPA अकाउंट असतानाही बँकांनी व्याज लावलं होतं.... याबद्दल बँकांशी जत्यावेळी आमची चर्चा झाली... त्यावेळी त्यांनी दोन गोष्टी कबूल केल्या.. NPA वर व्याज ते कमी करतील.. आणि कर्जमाफीच्या दरम्यान अकाउंट आणि अकाउंट मध्ये पैसे येणे या दरम्यानच कालावधीचा व्याज ते काढून टाकतील.. त्यामुळे अकाउंट मध्ये जरी व्याज दिसत असलं तरी बँकांनी त्या व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य केली आहे... म्हणून आम्ही कर्जाची जी रक्कम आहे ती बँकेत भरतो आहे.... व्याजाची रक्कम बँक स्वतः त्याच्यातून काढून घेणार आहे.... त्यामुळे अनेकांना कन्फ्युजन असं होत आहे की .... आमचे जास्त पैसे अकाउंटला दिसत आहे.... त्या मनाने आम्हाला अकाउंटला पैसे मात्र कमी आले आहे... काळजी करू नका दोन लाखापर्यंत ज्यांचं अकाउंट आहे त्या अकाउंटला आम्ही पूर्ण पैसे देणारो.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर विकास निधि पर आमदार बनाम जिला परिषद सदस्यों में घमासान
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विकासनिधीवरून सध्या जिल्ह्याच्या राजकारणात नवा संघर्ष सुरू झाला आहे. जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्काचा निधी आमदारांच्या माध्यमातून खर्च केला जात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या विरोधात आता सर्वपक्षीय सदस्य एकत्र आले मुक जिल्हा परिषदेमध्ये सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे.. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च स्थान असलेल्या जिल्हा परिषदेकडे ग्रामीण विकासाची जबाबदारी असते. जिल्ह्यातील रस्ते, शाळा, पाणीपुरवठा, आरोग्य आणि इतर विकासकामांसाठी जिल्हा परिषदेला निधी दिला जातो. मात्र, हा निधी सदस्यांच्या शिफारशीनुसार न खर्च होता आमदारांच्या माध्यमातून वळवला जाणा-या आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यातही सदस्यांच्या अधिकारी-यांवर गदा येण्याची भीती व्यक्त करत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी एकत्र येऊन सह्यांची मोहीम सुरू केली आहे. एकूण 68 पैकी 51 सदस्यांनी या मोहिमेच्या अंतर्गत सह्या केल्या आहेत.. संग्राम पाटील जिल्हा परिषद सदस्य, काँग्रेस राजू सूर्यवंशी जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस. यंदा जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे 265 कोटी रुपयांचा विकासनिधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च केला जाणार आहे. या निधीला मंजुरीही मिळाली आहे. मात्र, या निधीपैकी 70 टक्के निधी आमदारांच्या शिफारशीने आणि 30 टक्के निधी जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशीने खर्च करण्याचा फॉर्म्युला चर्चेत असल्याने सदस्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासक कार्यकाळात बहुतांश निधी आमदारांच्या माध्यमातून खर्च झाला, यापुढे देखील अशाच पद्धतीने हा निधी खर्च करायला मिळावा अशी अपेक्षा आमदारांची आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्र येत आमचा निधी आम्हालाच मिळायला पाहिजे अशी भूमिका मांडली.. मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र जिल्ह्यातील आमदार हे महायुतीचे आहेत, जिल्हा परिषद देखील महायुतीच्या ताब्यात आहे.. त्यामुळे घरातलं भांडण आम्ही घरातच मिटवू अस सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद सत्ताधारी नेते. जिल्हा परिषदेला मंजूर होणारा निधी हा जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्काचा असून तो त्यांच्या शिफारशीनुसारच खर्च झाला पाहिजे, अशी सदस्यांची ठाम भूमिका आहे. पण आता पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील चर्चेनंतर निधी वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरणार आहे. त्यामुळे 265 कोटींच्या विकासनिधीवर अखेर कोणाचा प्रभाव राहणार—आमदारांचा की जिल्हा परिषद सदस्यांचा, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे..0
0
Report
गुरुपौर्णिमा पर गुरु ने शिष्यों को वृक्ष भेंट कर पर्यावरण संदेश दिया
Sangli, Maharashtra:स्लग - गुरुपौर्णिमेनिमित्ताने गुरुकडून शिष्यांना वृक्ष भेट देत, वृक्ष संवर्धनाचा संदेश। अँकर - सांगलीच्या जत तालुक्यातील संख येथे अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी झाली आहे. गुरुकडून शिष्यांना वृक्ष भेट देत, गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. संख येथील श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तुकाराम बाबा यांनी गुरुपौर्णिमेनिमित्ताने आपल्या शिष्यांना पिंपळ आणि चिंचाचे वृक्ष भेट देत वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला आहे, वृक्षतोड रोखावी आणि वृक्ष लागवड करावी, अशी साद तूकाराम बाबा महाराज यांनी आपल्या शिष्यांना घातली आहे, सुमारे शंभरहून अधिक शिष्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्ष भेट म्हणून दिले।0
0
Report
जल जीवन मिशन के खड्डे में तीन वर्षीय बच्ची की मौत, इलाके में भारी हड़कम्प
Amravati, Maharashtra:जल जीवन मिशनच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; जलजीवन मिशनचे अपूर काम उठलं चिमुकल्याच्या जीवावर मेळघाटात जल जीवन मिशनच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावातील घटना असून कु. नायरा संजू बुसुम असं गड्ड्यात पडून मृत्यू झालेलेल्या चिमुकलीचे नाव आहे. कोरडा गावात जल जीवन मिशन अंतर्गत नळाची पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डे करण्यात आले होते मात्र काम झाल्यानंतरही ते खड्डे व्यवस्थित न बुजवल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या खड्ड्यात पाणी साचलं या दरम्यान चिमुकली खेळत असताना याच गड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे त्यामुळे मेळघाटातील जल जीवन मिशनचे खड्डे चिमुकल्यांच्या जीवावर उठल्याचे पाहायला मिळत आहे. आता या जलजीवन मिशनच्या कंत्राट दरावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.0
0
Report
Advertisement
