icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

संजय राऊत पर तक्रार: स्थानीय स्तर पर बहस तेज, नेताओं का निशाना बढ़ा

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - नरेंद्र भोंडेकर, आमदार शिवसेना On संजय राऊत तक्रार - - मी अद्याप तक्रार बघितली नाही. स्थानिक लेवलवर काही लोकांनी तक्रार दिल्याचं आमच्या लक्षात आलंय.. संजय राऊत यांना काहीं काम नाही म्हणून हे काम सुरू झाल्याचं दिसत.. - *व्यक्तिगत संस्थेविरुद्ध तक्रार करणे संजय राऊत यांना शोभत नाही. संजय राऊत यांनी तक्रार केल्यावरून ते आता दिल्लीचे राष्ट्रीय नेते राहिले नाही असे दिसते..* - संजय राऊत हे राष्ट्रीय मुद्दे घेऊन मोठ्या नेत्यांवर टीका करतात.असं म्हणत होते..मात्र आता ते गल्लीवर येऊ लागले आहे. यावरून त्यांचा स्वतःचा स्तर किती खाली उतरत चालला आहे दिसत आहे. - सत्ताधारी विरोधात विरोधक तक्रार करत असतात..आणि तक्रार करून रडत बसणे हे संजय राऊत यांन शोभतं.. - संजय राऊत यांनी तक्रारच योग्य केली नाही. आम्ही उभारलेली जागा ही खाजगी आहे..तिथे एका गुंठा सरकारी जागा नाही. त्यामुळे तपासणी केली तरी अडचण नाही.
0
0
Report

मराठी-हिंदी भाषाई संघर्ष: मनसे-कन्नड वेदिका ने नया मंच बना दिया

Kolhapur, Maharashtra:हिंदी भाषेच्या वाढत्या प्रभावाला विरोध करून भारतीय प्रादेशिक भाषांच्या हक्कांसाठी लढा उभारण्याचा निर्णय नवनिर्माण सेना आणि कन्नड रक्षण वेदिके एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळतंय. कर्नाटकात मनसे नेते संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस योगेश परुळेकर आणि कन्नड रक्षण वेदिकेचे प्रदेशाध्यक्ष टी. ए. नारायण गौडा यांच्यात बैठक झाली. या बैठकीत भारतीय भाषांच्या हक्कांसाठी ‘इंडियन लँग्वेजेस फोरम’ स्थापन करण्याचा निर्णय झाला. भारतीय भाषांच्या संरक्षणासाठी 10 कलमी ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ तयार करण्याचाही निर्णय झालाय. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिल्लीत या फोरमचं महाअधिवेशन घेण्यात येणार असून, महाराष्ट्र, कर्नाटकासह दक्षिण भारत आणि देशातील विविध राज्यांतील भाषिक प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याची तयारी आहे. म्हणजेच हिंदीच्या विरोधात प्रादेशिक भाषांना एकत्र आणण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. पण याच मनसेने सीमा भागात असणाऱ्या मराठी भाषिकांच्या जखमेवर नेहमी मीठ चोळणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेच्या नेत्यांना भेटण्याचे टाळायला हवं होत अशी भूमिका सीमा बांधवांनी व्यक्त केली आहे. इतकाच नव्हे तर कन्नड रक्षण वेदिकेाच्या गौडाला मनसे नेते भेटल्यामुळे सीमाभागात संताप व्यक्त होतोय. कारण बेळगावसह सीमाभाग मराठी भाषिकांना साहाय्याने मराठी भाषिकांनीच लढा दिला आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषिकांच्या विरोधात सतत भूमिका घेणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेच्या नेत्यासोबत मनसेने बैठक घेतली असल्याचा सवाल आता महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उपस्थित केला जातोय. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी मनसेवर जोरदार टीका केलीय. सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती संपवण्याच्या प्रयत्नांमध्ये कन्नड रक्षण वेदिकेची भूमिका राहिली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अशा संघटनेच्या प्रमुखाची भेट घेऊन मनसेने सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यं केलंय असा आरोप त्यांनी केलाय. एकीकडे हिंदी भाषेच्या कथित आक्रमणाविरोधात कन्नड रक्षण वेदिकेसोबत संयुक्त लढ्याचा रोडमॅप आखला जातोय. तर दुसरीकडे सीमाभाग महाराष्ट्रात यावा, यासाठी 70 वर्षांपासून सुरू असलेल्या मराठी भाषिकांच्या संघर्षाकडे मनसेने दुर्लक्ष केलंय. यामुळे सीमाभागात मनसेविरोधात आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आलाय. हिंदी भाषेच्या विरोधात प्रादेशिक भाषांना एकत्र आणण्याचा मनसेचा प्रयत्न, पण त्याचवेळी गेल्या सात दशकांपासून सीमा भागात महाराष्ट्रात यावा यासाठी लढणाऱ्या मराठी भाषिकांच्या भावनांचा विचार का केला गेला नाही? असा सवाल आता सीमाभागातून उपस्थित होतोय.
0
0
Report
Advertisement

मराठा समाज को न्याय दिलाने के सरकार के प्रयास पर महायुती मंत्री का बयान

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - आशिष जयस्वाल, राज्यमंत्री *ऑन मनोज जरांगे टीका महायुती नेते* - महाराष्ट्राची संस्कृती आहे. राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आंदोलन करणं आणि सरकारने त्याला नियमित प्रतिसाद देणं, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मराठा समाजाला प्रत्येक विषयावर न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकार करीत आहे. - सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. मात्र, आरोप करणे हे जनसामान्यांमध्यील प्रतिमा खराब करणारे आहे. मराठा समाजाला न्याय देण्याचा सरकारने प्रयत्न केला. सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. स्वतःची प्रतिमा मनोज जरांगे आता स्वतःच खराब करीत आहेत. *ऑन डॉक्टर आत्महत्या* - या संदर्भात कायदा आपले काम करेल. याप्रकरणी मी काहीही वक्तव्य करणार नाही. *ऑन मनोज जरांगे* - दुःख एकाच बाबीचे वाटते. महायुतीच्या शासनाने यापूर्वी कधी न मिळालेला न्याय मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच सरकारच्या विरोधात वक्तव्य करणे आणि सातत्याने मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या लोकांच्या सोबत राहून वक्तव्य करणे, हे चुकीचे आहे.
0
0
Report

मनसे ने नारायण गौड़ा से मुलाकात से सीमांत क्षेत्र में मराठी-कन्नड़ तनाव बढ़ा

Kolhapur, Maharashtra:मनसे नेत्यांनी कन्नड रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा यांची भेट घेतल्याने सीमाभागातील मराठी भाषिक संतप्त झालेत. मराठी भाषिकांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेचे प्रमुख नारायण गौडा यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी भेट घेतल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठी बांधवांच्या विरोधात नेहमी गरळ ओकणाऱ्या नारायण गौड़ा यांची मनसे नेत्यांनी भेट घेतलीच कशी?, असा सवाल महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी उपस्थित केला आहे. नारायण गौडा यांची भेट घेऊन मनसे नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रथम रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान केला असल्याचा आरोपही शेळके यांनी केला. मनसेने सीमाभागातील मराठी बांधवांच्या ७० वर्षांच्या संघर्षाचा अपमान केला, अशी टीका देखील शुभम शेळके यांनी केली आहे. सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती संपवण्याच्या प्रयत्नांमध्ये कन्नड रक्षण वेदिकेची प्रमुख भूमिका असल्याचा आरोप करत, अशा संघटनेच्या नेत्याची मनसेने घेतलीली भेट सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याचे शेळके म्हणाले. यापूर्वी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सीमाप्रश्नाबाबत सीमावासीयांच्या भावनांच्या विरोधात भूमिका मांडल्याचा दावा शेळके यांनी केला आहे, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात सीमावासीय लढा उभारतील, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिला आहे.
0
0
Report
Advertisement

सिंधुदुर्ग किल्ले के पास मछुआरे नाव डूबने से मालिक समेत दो की मौत

Oras Bk., Maharashtra:अकरे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करत असताना ‘सागरिका’ ही मासेमारी नौका बुडाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मालवणच्या दांडी येथील नौका मालक सन्मेश सुरेश परब, त्यांचा मुलगा सुयोग सन्मेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे हे तिघे ‘सागरिका’ या नौकेतून मासेमारीसाठी गेले होते. मात्र सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करत असताना अचानक नौका बुडाली. या दुर्घटनेत सुयोग परब यांना स्थानिक मच्छीमारांनी सुखरूप बाहेर काढलं. मात्र नौका मालक सन्मेश सुरेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दोन मृतदेह सापडले असून, या दुर्घटनेमुळे मालवणच्या दांडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report

नागपुर में ओबीसी महासंघ के आंदोलन पर बहस, गणेश उत्सव के समय सरकार की भूमिका पर सवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर - बाइट - डॉ बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ On मनोज जरांगे आंदोलन - सरकारने जे काही ठरवले आहे त्याचे पालन करायचे की नाही हा मनोज जरांगे पाटील यांचा संघटनेचा प्रश्न आहे - इकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे आंदोलन करणे,आजपासून ते मुंबईला जात आहेत पण त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत - आंदोलकांनी कोणती भाषा वापरावी,कोनाविषयी काय बोलायचे हा त्यांचा प्रश्न आहे,सरकारने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे - पण या राज्यात एक सभ्यता आणि संस्कृती आहे,त्या संस्कृती आणि सभ्यतेचे पालन करूनच सर्वांनी वागावं अस अपेक्षित आहे - गोपनीय आता राहील नाही,त्यांनी जाहीर केलं आहे, 14 पासून गणपती उत्सवाला सुरवात होत आहे,मुंबई आणि कोकणात सर्व धर्मीय गणपती उत्सव साजरा करतात,लाखो लोक गणपती उत्सवात सहभागी होतात - अशा वेळी आंदोलक आणि लाखो लोक सर्व रस्त्यावर आल्यास मुंबईतील वातावरण सलोख्याचे राहील का याविषयी चिंता व्यक्त होत आहे - सामान्य माणसाच्या जीवनावर काही परिणाम होणार नाही याची काळजी घेणे हे आंदोलकाचे कर्तव्य असतं - आंदोलकांच्या मागे जनसमुदाय मागे राहतो तेंव्हा भावनांचा विचार करावा लागतो म्हणून सरकार त्यांच्याकडे जात असतो,त्यावर टीका करणे योग्य नाही - मुळात हे आंदोलन कशाकरता आहे हे संलर येत नाहीय,म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्याविषयी कुठलीही भूमिका घेतली नाही
0
0
Report

महाराष्ट्र में 2.7 करोड़ मतदाताओं के नाम सूचियों से गायब, पुनः नामांकन संभव

Ratnagiri, Maharashtra:राज्यातील तब्बल २ कोटी ७ लाख मतदारांची नावे यादीतून वागळली.. प्रारूप मतदार यादी जाहीर.. वगळल्यांमध्ये १७ लाख दुबार तर ३४ लाख मृत्यू झालेले मतदान.. पात्र मतदारांना पुन्हा नोंदवण्याची मिळणार संधी.. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व २८८ मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.. ही यादी निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टल सह state मुख्य निवडणूक अधिकारी तसेच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.. जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची नावे यादीत समाविष्ट झालेले नाहीत,मात्र या त्यापैकी सुमारे १७ लाख मतदार दुबार असल्याने त्यांची नावे एकाच ठिकाणी नोंद झाली असून त्यांचा समावेश यादीत आहे.. त्यामुळे प्रत्यक्षात वगळलेल्या गेलेल्या मतदारांची संख्या १ कोटी ९० लाख याशिवाय सुमारे ३४ लाख मतदारांचे मृत्यू झाल्याने त्यांची नावे वगळली आहेत..
0
0
Report
Advertisement

नाशिक-धुले में सीएनजी की कीमतें बढ़ीं, प्रति किलोग्राम 98.50 रुपये

Nashik, Maharashtra:नाशिक और धुळे जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी… सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीएनजीसाठी वाहनधारकांना ९८ रुपये ५० पैसे प्रतिकिलो मोजावे लागणार आहेत. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझमार्गे एलएनजी वाहतुकीत निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे जागतिक आढावा जारात स्पॉट एलएनजीच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम आता सीएनजीच्या दरावर झाला आहे. नाशिकमध्ये सुमारे एक लाख सीएनजी वाहनधारक असून, आधीपासूनच पुरेसा सीएनजी पुरवठा होत नसल्याने अनेक पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत
0
0
Report

बालभारती की गणित पुस्तिका में 15 त्रुटियाँ: शिक्षा व्यवस्था पर सवाल

Kolhapur, Maharashtra:इयत्ता सहावीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील त्रुटींवरून आता बालभारतीच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पायथागोरसच्या सिद्धांतापासून ते त्रिकोणाच्या चुकीच्या प्रश्नापर्यंत. आकृत्यांपासून ते भाषिक चुका आणि अवास्तव उदाहरणांपर्यंत तब्बल 15 त्रुटी माजी गणित तज्ज्ञ समिती सदस्यांनी बालभारतीच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत…विशेष म्हणजे या त्रुटींची दखल घेत बालभारतीने संबंधित चुका दुरुस्त करण्याचं लेखी आश्वासन दिलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्या आणि चौथीच्या गणित पुस्तकात देखकर अशाच चुका असल्याचं दिसून आला आहे. या पाठातील काही उदाहरणंही सहावीच्या विद्यार्थ्यांच्या पातळीपेक्षा अवघड असल्याचं दावा करण्यात आलाय. दुसरीकडे, गणितासाठी महत्त्वाचा सममिती हा संपूर्ण पाठच पुस्तकातून वगळण्यात आल्याची हरकत घेण्यात आली आहे. तर शेकडेवारीच्या पाठात शेकडेवारीपेक्षा सूट आणि अनुदानाशी संबंधित उदाहरणांवर अधिक भर असल्याचं निदर्शनास आणण्यात आलंय. महागाई दराची तुलना करण्यासारखी उदाहरणंही सहावीच्या विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या दृष्टीने योग्य आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. गणिताच्या पुस्तकातील सर्वाधिक ठळक त्रुटींपैकी एक म्हणजे पृष्ठ क्रमांक 119 वरील प्रश्न. 12 मीटर, 7 मीटर आणि 5 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाची परिमिती काढण्यास सांगितलं आहे. पण 7 आणि 5 ची बेरीज 12 इतकीच होते. त्यामुळे या तीन बाजूंनी त्रिकोण तयारच होत नाही. गणिताच्या मूलभूत नियमानुसार कोणत्याही त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असणं आवश्यक आहे. प्रश्न तयार करताना ही प्राथमिक गणिती पडताळणी झाली होती का, असा सवाल यामुळे उपस्थित होतो. या पाठातील काही भागांमध्ये अचूकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. VO 2 :- याशिवाय पुस्तकातील दिनदर्शिकेच्या आकृतीत महिना आणि वर्ष नसल्याची हरकत घेण्यात आली आहे. पृष्ठ क्रमांक 47 वरील भिन्नछेद अपूर्णांकाच्या लेखनात दोष असल्याचं सांगण्यात आलं आहे. गुणोत्तर आणि प्रमाणाच्या पाठात काही ठिकाणी प्रमाण ऐवजी गुणोत्तर शब्द अपेक्षित असल्याची सूचना करण्यात आली आहे. तर पृष्ठ क्रमांक 105 वरील कोन दुभाजकाची आकृती सदोष असल्याचा दावा करण्यात आला आहे. गणितातील उदाहरणं ही वास्तवाशी संबंधित असणंही तितकंच महत्त्वाचं. पृष्ठ क्रमांक 142 वरील प्राण्यांच्या आयुर्मानाच्या उदाहरणात मांजराचं 25 वर्षे आणि कुत्र्याचं 22 वर्षे आयुर्मान दिलं आहे. ही माहिती वास्तवाशी सुसंगत आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. VO 3 :- पाठ्यपुस्तक हे विद्यार्थ्यांसाठी प्रमाण मानलं जातं. त्यामुळे त्यातील प्रत्येक गणिती प्रश्न, आकृती आणि माहिती अचूक असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सरडे यांनी बालभारतीकडे 15 बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. बालभारतीने त्याची दखल घेऊन संबंधित चुका दुरुस्त करण्याचं लेखी आश्वासन दिलं आहे. आता या त्रुटी प्रत्यक्षात दुरुस्त करून विद्यार्थ्यांना निर्दोष आणि गुणवत्तापूर्ण पुस्तक मिळणं हीच अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या चुका फक्त सहावीच्या गणित पुस्तकात आहेत असं नाही. तर तिसरी आणि चौथीच्या गणित पुस्तकात देखील अनेक चुका आढळून आल्या आहेत. पाठ्यपुस्तकातील चूक ही केवळ पुस्तकापुरती मर्यादित राहत नाही. तीच चूक विद्यार्थी शिकतो. आणि पुढे त्याच ज्ञानाचा आधार घेतो. आणि भविष्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया घडवणाऱ्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक शब्द, प्रत्येक आकृति आणि प्रत्येक गणिती उदाहरण निर्दोष असणं गरजेचं आहे.. त्यामुळे शिक्षण मंत्री दादा भुसे या पुस्तका संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0
0
Report

बीड: मराठा आरक्षण मामले में मनोज जरांगे पाटील के अनशन का समाधान मांगा गया

Beed, Maharashtra:बीड: मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, खासदार बजरंग सोनवणे يांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी..! ANC - मराठा आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या प्रकृतीची गंभीरता आणि मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी तातडीने संवाद साधावा आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेऊन त्यांचे उपोषण सोडवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आली आहे. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्याला आपला ठाम पाठिंबा असून, समाजाच्या न्याय्य मागणीसाठी सकारात्मक विचार करून आपण उपोषण सोडवण्यासाठी कारवाही करावी अशा विनंतीचे पत्र सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top