icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

टेंडर रद्द होने के बाद भाजपा-शिवसेना में श्रेयवाद तेज, विरोधी नेता ने निशाना साधा

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील एमआयडीसी मधील झोपडपट्टी वासियांना 300 चौरस फुटाची घरे देण्याचे काढलेले टेंडर रद्द करण्यात आल्या नंतर श्रेयवादावरून राजकीय वातावरण तापलेले दिसते. भाजपा नगरसेवक सुधाकर सोनावणे यांनी हे टेंडर रद्द केल्याचे श्रेय गणेश नाईकांना देत त्यांचे आभार व्यक्त केलेत. तसेच लोकांची दिशाभूल करण्याऐवजी अभ्यास करून बोलाव अशी टीका विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांच्यावर केली होती. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंडर रद्द केलं असल्याची भूमिका दर्शवली असून टीका करणाऱ्यांनी अडीच वर्षं महापौर असताना काय उखाडल अशी जहरी टीका केलीय. या घडामोडींवर विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी त्यांच्या शाळेतच ट्यूशन घेत असल्याची प्रतिक्रिया दिली.
0
0
Report

नागपुर में पाकिस्तानी कॉस्मेटिक्स की अवैध बिक्री का खुलासा

Nagpur, Maharashtra:नागपूर.... नागपुरात पाकिस्तानी कॉसमॅंटिक अवैध विक्री होतं असल्याच उघडकीस आलीय. याप्रकरणी अन्न व औषधी प्रशासनने कारवाई करत हे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधन जप्त केलेय. ते शरीरास अपायकारक असल्याच्याची चर्चा आहे.... हे आरोग्य व शरीरासाठी कसे घातक ठरू शकता याबाबत प्लास्टिक सर्जन पवन शहाणे यांनी सांगितले -==------------------------- कुठलीही कॉस्मेटिक जे आहे जे चांगल्या कंपन्यांमध्ये बनलेल नाही ... ज्याच्यावर एफडीएच्या कंट्रोल नाही आहे त्यामध्ये असं असू शकतो की त्यामध्ये काही पॉइजनस कंटेंट असू शकतो... जे त्वचेच्या माध्यमातून मिक्स होऊन एलर्जी होऊ शकतो किंवा रिएक्शन होऊ शकतो... किडनी असो किंवा लिव्हर असो यामध्ये रिएक्शन होण्याची सुद्धा संभावना असते ... कुठलीही सौंदर्यप्रसाधन वस्तू वापरायचे असेल तर चांगल्या कंपनी आणि एफडीए मान्यता असलेले वापरायला पाहिजे... ते टेस्टिंग केलेले असतात नॉन टेस्टिंग असलेले शरीराकरिता हानिकारक असतो.... गोरा होण्याकरिता कुठलाही झटपट क्रीम नाही आहे इंडियन स्किन कलर जे आहे ते काही कारणामुळे आहे याला काही प्रमाणात सुधारता येतो मात्र डॉक्टरला भेटून एफडीए मान्यता औषधी वापरायला पाहिजे...
0
0
Report
Advertisement

मनसे का आरोप: जिजामाता उद्यान का नवीनीकरण बेहद घटिया, बच्चों की सुरक्षा खतरे में

Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरातील लहान मुलांना खेळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात जिजामाता उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून या उद्यानाच्या नूतनीकरणाचे करण्याचे काम सुरू होतं. हे काम पूर्ण होऊन वर्ष झाले आहे. मात्र मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आरोप केले आहेत. सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाच झाले आहे. या ठिकाणी जुन्याच खेळण्यांना रंगरंगोटी करून नव्याने बसवलेला आहे. त्यामुळे येथील खेळायला येणाऱ्या लहान मुलांना जर दुखापत झाली त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला याला जबाबदार कोण ? अशा पद्धतीच्या निकृष्ट उद्यानाच उद्घाटन करायला मनसे आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या काही नगरसेवक आणि विरोध केलेला आहे。
0
0
Report
Advertisement

सोलापुर महापालिका में हंगामा: महापौर एक दिन के लिए निलंबित; 892–1400 करोड़ टेंडर

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रекिंग - सोलापूर महापालिका के सभेदरम्यान सत्ताधारी, विरोधकांमध्ये मोठा गोंधळ - सोलापूर महापालिकेच्या सभेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गोंधळ - शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे आणि काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांना महापौरांनी एक दिवसासाठी केले निलंबित - सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध योजनांच्या वरून भाजपाच्या विरोधात शिवसेना आणि काँग्रेस आक्रमक - महापालिका सभागृहाबाहेर एका बाजूला भाजपचे आंदोलन तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शिवसेनेचे आंदोलन - सोलापूर शहरासाठी ची 892 कोटींच टेंडर वाढवून 1400 कोटी केल्याने विरोधक आक्रमक
0
0
Report

Kolhapur Police Department in Clash: Local Crime Branch Dispute Raises Questions from Shiv Sena Thackeray Camp

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या निरीक्षक पदावरून सध्या दोन अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे.. हा वाद मॅट तसेच मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे.. पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे घटना अनोख्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केला... स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या खुर्चीच प्राथमिक स्वरूपात उद्घाटन करत या खुर्ची खाली दडलय काय ? असा सवाल केला आहे. काही दिवसापासून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात अनेक गैरप्रकार घडत आहेत.. तक्रारदार कडून पैसे उकळण्यापासून ते कर्मचाऱ्यांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिल्यापर्यंत हे प्रकरण गेल आहे.. त्यामुळे कोल्हापूरचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रक्षक आहे की भक्षक असा प्रश्न सुद्धा ठाकरेंच्या सेनेने केला आहे. उद्या राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या सगळ्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी दाते यांनी शिवसेना ठाकरे गटाला वेळ द्यावा अन्यथा शाहूपुरी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाचा इशारा ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी दिला आहे.
0
0
Report
Advertisement

हिंगोली मार्केट में हल्दी लिलाव बंद, किसानों ने दाम घटाने के आरोप लगाए

Hingoli, Maharashtra:हिंगोलीची बाजारपेठ ही हळदीसाठी राज्यभरात ओळखली जाते. आज हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत हजारों क्विंटल हळदीची आवक झाली होती. मात्र व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी केली जात असल्याच्या आरोपामुळे शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी हळदीचा लिलाव बंद पाडला. शेतकऱ्यांचा आरोप है की, व्यापारी जाणीवपूर्वक कमी भाव देत आहेत. तसेच खरेदी केलेली हळद अनेक दिवस मार्केट यार्डमध्येच पडून राहत असल्याने नवीन हळदीचा लिलाव वेळेत होत नाही. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत लिलाव प्रक्रिया थांबवली. जोपर्यंत हळदीला योग्य और समाधानकारक दर मिळत नाही, तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
0
0
Report

राजगुरुनगर में भटकते कुत्तों ने फिर बच्ची पर हमला, इलाके में दहशत फैल गई

Khed, Maharashtra:राजगुरुनगर/पुणे: पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा धोका समोर आला आहे. राजगुरुनगर शहरात एका चिमुकल्या मुलीवर कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने, पालकांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ धाव घेतल्याने या चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झालाय. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच चाकण परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. इतकंच नव्हे तर याच ठिकाणी कुत्र्यांच्या टोळीने दुसऱ्या कुत्र्यालाही ठार केल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय… आणि प्रशासनाने यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे
0
0
Report

यवतमाळ में लड़कियों की बिक्री-धर्मांतरण के आरोप पर हिंदुत्व संगठनों की आक्रामक प्रतिक्रिया

Yavatmal, Maharashtra:Anchor : यवतमाळ जिल्ह्यातील हिंदू मुलींची विक्री करून त्यांचे धर्मांतरण केल्याच्या भाजप जिल्हाध्यक्षाच्या आरोपांनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत, तर दुसरीकडे अशा प्रकारच्या गुन्ह्याची पूर्णतः उकल व्हायची आहे असे पोलيسांनी स्पष्ट केले आहे. मुलींच्या विक्रीचे रॅकेट सक्रिय असले तरी त्यात धर्मांतरण, लव्ह जिहाद ची प्रकरणे पुढे आली नाहीत असेही पोलिसांनी सांगितले. VO 1 : आदिवासी दुर्गम भागातील मुलींची राज्यात व परराज्यात विक्री करून त्यांची लग्न लावून देणे, त्यानंतर या मुलींचे धर्मांतरण करणे अशा प्रकारातून राळेगावातील 34 मुली बेपत्ता असल्याचा दावा भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहान यांनी केल्याने एकच खळबळ उडाली. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालून सखोल तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. मुलींची विक्री होत असल्याबाबतची एक व्हिडिओ क्लिप देखील पुढे आली. त्यामुळे आदिवासी मुलींचा सौदा होत असल्याच्या दाव्याने नागरिक संतप्त झाले. बाईट : प्रफुल चौहान : जिल्हाध्यक्ष भाजप VO 2 : या प्रकरणातील संशयित आरोपी मजहर कुरेशी च्या अतिक्रमित घरावर नगरपंचायतीने जेसीबी फिरविला. संतप्त जमावाने त्याच्या निवासी घरावर तुफान दगडफेक देखील केली. रस्त्यावर टायर पेटवले, मझहर कडून एक तलवार जप्त करण्यात आली. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे पुढे आले. अनेक अवैध व्यवसायात तो लिप्त असल्याचाही आरोप झाला. मात्र मजहरने हिंदू मुलीशी दुसरा विवाह केला हे माहीत नसल्याचे आणि त्याच्यावरील आरोप अमान्य असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. बाईट : शरिफ कुरेशी : वडील VO 3 : पोलिसांनी मात्र त्यांच्या नोंदीनुसार एक हून अधिक मुली बेपत्ता नसल्याचे स्पष्ट केलं. बालविवाहाचे एक प्रकरण असून मुलींची लग्नासाठी विक्री करणे आणि त्यात वधू पक्षांची फसवणूक करणे असे एक रॅकेट असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही मुली बेपत्ता असूनही त्याची तक्रार झाली नसू शकते. त्या दृष्टीने तपास करू तसेच संशयित व्यक्तींचे आर्थिक व्यवहार त्यांचा सी डी आर तपासून गुन्ह्याची उकल करण्याचा प्रयत्न करू असेही पोलिसांनी आश्वस्त केले. तर "संवेदनशील मनाला त्रास व्हावा अशा घटना घडत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातही महिला सुरक्षित नाहीत, हे वेदनादायी आहे. धर्मांतराचे विषय आणि त्यातील वेगळी रूपं समोर येत आहेत, यावर गांभीर्याने विचार करून ॲक्शन घेण्याची गरज असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. बाईट : कुमार चिंता : पोलीस अधीक्षक अशोक उईके : मंत्री, आदिवासी विकास बाईंट -चंद्रकांत पाटील VO 4 : मागासलेल्या यवतमाळ जिल्ह्यात गरीब मुलींच्या विक्रीची अनेक प्रकरणे याआधीही उघडकीस आली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील मुलींच्या गरिबीचा त्यांच्या असाहायतेचा गैरफायदा घेतल्या जाऊ नये याकरिता पालकांनी जागरूक राहणे शिवाय शासन प्रशासनाने त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न केले तरच या प्रकरणांना काळा बसेल.
0
0
Report
Advertisement

CBI कार्रवाई से महाराष्ट्र में राजनीतिक हंगामा तेज

Kolhapur, Maharashtra:आमदार रोहित पवार ON Dr. जयसिंगराव पवार खरा इतिहास लोकांच्या समोर यावा म्हणून जयसिंगराव पवार सर यांचे कार्य मोठे. हे आपल्यातून निघून गेल्यामुळे सर्वांचेच मोठे नुकसान झाले छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी यांच्यावर अनेक ग्रंथ लिहिले. काही लोकांना खरा इतिहास समोर आणायचा नव्हता, पण पवार सरांनी खरा इतिहास लोकांच्या समोर आणला. ON DGCI अधिकारी कारवाई विमान उडू शकतो की नाही हे सांगण्याचं काम असणारा अधिकारी होता. CBI ने ज्या अधिकाऱ्याला पकडला, तो छोटा मासा, अजूनही मोठे मासे मोकाटच. VK सिंग हा पोहोचलेला माणूस, पण या चिरकुट माणसाला अनेक जण घाबरतात.. त्याला का घाबरतात ? हा VK सिंग पुढे जाऊन अनेकांची नावे घेईल का ? अशी भीती आहे का. हीच अधिकारी VK सिंग यांच्या सांगण्यावरून दादांच्या अपघाताचे पुरावे संपण्याचा प्रयत्न करतोय.. आम्ही वारंवार सांगत आहोत, पण दुर्दैवाने असा आमचं कुणी ऐकत नाही. साठ दिवस झालं आम्ही बोलतोय या संदर्भात कोणी दखल घेत नाही.. पण आता सीबीआयने स्वतः कारवाई करते.. सीबीआयने ही कारवाई आत्ताच का केली.. या पाठीमागे ते बीलिमिटेशन बिल कारण असू शकते. डिलिमीटेंशन कायद्याला चंद्रबाबू नायडू यांनी पाठिंबा घेण्यासाठी ही कारवाई केली आहे का असा संशय त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांना घाबरवण्यासाठी ही कारवाई होती का ? या संदर्भात आणखी महत्वाची माहिती आमच्याकडे आली आहे, येत्या काही दिवसात आम्ही समोर आणू ON FIR महाराष्ट्रात तीनदा प्रयत्न केल्यानंतर देखील आमचा FIR घेतला नाही, पण कर्नाटक मध्ये साध्या पोलीस स्टेशनमध्ये आमचा गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर आम्हाला इन्वेस्टीगेशन आणि इन्क्वायरी वेगवेगळ्या बाबी आहेत असा आम्हाला सांगण्यात आलं, आम्ही इन्वेस्टिगेशन करणार नाही पण इन्क्वायरी करू असं सांगितलं. शब्दाचा खेळ करून हा FIR अध्याप स्वीकारलेला नाही. ON अजित पवार अपघात नवीन माहिती कधी उघड करणार तुम्ही मांडलेले मुद्दे देशाचे गृहमंत्री यांच्या पर्यंत घेऊन जाऊ असं मला सांगण्यात आलं. आता निवडणुका सुरू आहेत, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे अडकून बसले आहेत. हा आमचा भावनिक मुद्दा आहे , त्यामुळे सरकारला 10 मे पर्यंत आम्ही वेळ देऊ. त्याबद्दरीस सरकारने काहीच केले नाही तर हा विषय सरकारला महागात पडेल. ON मुख्यमंत्री बारामती सभा उद्या बारामतीला सांगता सभेला येणार आहेत दादांचंजे ठिकाण होतं बदलल असं ऐकायला मिळतंय आम्ही जे मुद्दे मांडले त्या बाबत उद्या बारामतीत बोलतील अशी अपेक्षा FIR न करता आम्ही फक्त चौकशी करू असं का सांगितलं जातं? व्ही के सिंगचे 100 कोटी सहज दिले जातात पण राज्यातील कंत्राटदरांचे पैसे दिले जात नाही, उद्या आम्ही सगळ्याबाबत विचारू ON भाजप नाराशक्ती आंदोलन भाजपने जो डिलीमीटेंशनचं बिलं केलं ते नामंजूर झाल्याने ते तोंडावर पडले त्यांच्या डाव हणून पाडला, त्यांची हार सुरु झाली आहे महिलांचं कवच घेऊन राजकारण करण्याचं काम भाजप कडून सुरु वरून जे सांगितलं जातं ते इथं राबवलं जातं ही वेळ महाराष्ट्रावर आहे ON महिला आयोग सुप्रिया सुळे मागणी भाजपची बी टीम म्हणून पोलीस काम करतायत का हा प्रश्न 2023 ला जेव्हा संसदेत जे सेशन घेतलं ते महिला आरक्षणच होत. तेव्हा जर लागू झालं असेल तर आता कुठून आलं आरक्षण आता जी भूमिका मांडली ती डीलिमिटेशनची आहे बिहारमध्ये 66 टक्के जागा वाढतं होत्या आणि महाराष्ट्रात कमी त्यामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान यामुळे झालं असतं. उद्या 10 वाजता पुणे येथे एक पत्रकार परिषद घेऊन सगळ्याबबत माहिती देणार ON मुलई महानगरपालिका भाजप निधी हिम्मत असेल तर बंड करा सुरुवात झाली आहे जे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले त्यांनी बंड करायला हवं, जे मूळ भाजपचे आहेत त्यांनी देखील करावं ON ड्रग्स गेल्या वर्षभरात 1कोटी लाख ड्रग्स आलेले आहेत फक्त मुंबईतच नाही तर कोल्हापूर सांगली मध्ये देखील ड्रग्स सापडतात, अजुन कारवाई होण गरजेचं आहे ON लेन्सकार्ट ड्रेस कोड कोणते कपडे घालावे, टिळा लावायचा का नाही हे सगळे प्रत्येक व्यक्तीचे अधिकार आहेत अशा गोष्टीमध्ये लक्ष घालण्यापेक्षा व्यवसायावर लक्ष द्यावं ON सातारा महेश शिंदे नाव गायब ऑपरेशन टायगरजी चर्चा ऐकत होतो , कुठला टायगर. एकनाथ शिंदे यांना समजलं आहे भाजप त्यांना फसवत आहे डिलीमिटेशन पास करून मतदार वळवण्याचं काम सुरु होतं जे लोकं प्रवेश करण्याच्या नादात होते त्यांच्यामध्ये परिवर्तन होईल आजच्या सातारा मधील सभेत एकनाथ शिंदे भाषणातून काय बोलतील हे पाहावं लागणारे आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top