445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी के फत्तेगड़ में 60 परिवारों को खतरा, प्रशासन ने स्थानांतरण के निर्देश दिए
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक फत्तेगडावरील ६० कुटुंबांवर पुन्हा एकदा संकटाचे काळे ढग दाटले आहेत. गडाची तटबंदी ठिकठिकाणी ढासळत असून दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने तातडीच्या स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, जीव वाचवण्यासाठी घर सोडायचे, पण जायचे कुठे? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. अनेक वर्षांपासून संरक्षण भिंत उभारण्याची मागणी होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. दरवर्षी पावसाळा आला की नोटिसा येतात, भीती वाढते आणि नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. फत्तेगडावरील नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.0
0
Report
बीड के गेवराई में गोदावरी नदी घाट पर अवैध रेती खनन पर 19 गिरफ्तार
Beed, Maharashtra:बीड: गोदावरी नदी पात्रात असणाऱ्या राक्षसभुवन रेती घाटातील कथित अवैध रेती उत्खनन, वाहतूक आणि घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलीय. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह 19 जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात दोन तलाठी, एक महसूल सेवक आणि एका पोलिसासह इतर खाजगी व्यक्ती अशा 19 जणांवर गुन्हा नोंदवला गेलाय. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गोदावरी नदीपात्रातून घरकुलाच्या नावाखाली शंभर कोटींच्या वाळूचे उत्खनन झाल्याचा आरोप केला होता. याची वरिष्ठ पातळीवर तक्रार देखील करण्यात आली होती. त्यानंतर गेवराईचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी फिर्याद दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गठीत चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला. ऑगस्ट 2025पासून राक्षसभुवन घाटातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या नावाचा वापर करून शासकीय खनिज संपत्तीची चोरी, डिजिटल डेटामध्ये छेडछाड करून फसवणूक, गोदावरी नदीपात्राचे पर्यावरणीय नुकसान आणि विद्रुपीकरण, तसेच शासकीय यंत्रणेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गेवराई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 199/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS), IT अॅक्ट, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि लोकसंपत्ती नुकसान निवारण कायदा 1984 अंतर्गत विविध गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवल्या गेल्याने खळबळ उडाली आहे. तसेच तहसीलदारांवर देखील आमदार पंडित यांच्याकडून आरोप केल्या गेल्याने त्यांच्यावर काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल.0
0
Report
नितीन तिवारी ने शिवसेना शिंदे गुट में प्रवेश किया, धनुष-बाण हाथ में लेकर समर्थकों के सामने
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख नितीन तिवारी यांनी शिवसेना शिंदे गुटात प्रवेश. - खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी समर्थकांसह त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. - तिवारी यांनी यापूर्वी युवासेना उपजिल्हाप्रमुख, शहर समन्वयक आणि शहरप्रमुख म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. - महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.0
0
Report
Advertisement
बीड: सरपंच हत्या केस में आज सुनवाई; जमानत और लैपटॉप क्लोन पर अदालत निर्णय
Beed, Maharashtra:बीड: सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी; 17 महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच दोन दिवसांच्या कालावधीत सुनावणी. आरोपी विष्णू चाटे आणि जयराम चाटे यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. दोन दिवसांपूर्वीच नवनियुक्त न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्या समोर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान आरोपी विष्णू चाटेला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा त्याच्या वकिलाच्या माध्यमातून करण्यात आला. आणि यालाच उज्वल निकम यांनी विरोध केला. आज विष्णू चाटे आणि जयराम चाटे या दोघांच्या जामीन अर्जावर न्यायालय निर्णय देणार आहे. तसेच आरोपीच्या वकिलांना डिजिटल पुरावा म्हणून वापरण्यात आलेल्या लॅपटॉप मधील क्लोन कॉपी बाबत निर्णय होईल. 17 महिने उलटले असताना देखील हा खटला मंद गतीने सुरू असून खटल्याची सुनावणी त्वरित केली जावी असं म्हणणं उज्वल निकम यांनी मांडले होते. तर आरोपींकडून या प्रकरणात डी टू ऑपरेशन राबविले जात असल्याची प्रतिक्रिया उज्वल निकम यांची होती. दरम्यान 17 महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच या प्रकरणाची सुनावणी दोन दिवसांमध्ये होत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष आहे.0
0
Report
रत्नागिरी में मानसून देरी से फसल संकट, किसान पंप से कृत्रिम पानी दे रहे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत पावसाची दडी..फवारणी पंपाने पाणी देऊन भातरोपे जगवण्याचा केविलवाणा प्रयत्न!.. जून महिना अर्धा संपत आला तरी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे.. सुरुवातीच्या किरकोळ पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरण्या तर केल्या,मात्र आता पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे उगवलेली कोवळी भात रोपे जळू लागली आहेत.. डोळ्यांदेखत हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून कोकणातील बळीराजा सध्या जीवाची धडपड करतोय.. उपलब्ध पाण्याचे स्त्रोत शोधून,तर कुठे कृषी फवारणी पंपाच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या पाणी देऊन रोपे जगवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे भागातील शेतकऱ्यांचीही सध्या अशीच बिकट अवस्था पाहायला मिळत आहे.. आता संपूर्ण कोकणचे डोळे वरुणराजाच्या आगमनाकडे लागले आहेत..0
0
Report
येवला के पैठणी विणकरों के लिए गणेशोत्सव भत्ता और मुफ्त बिजली योजना: प्रस्ताव आमंत्रित
Yeola, Maharashtra:अँकर :महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणांतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील हजारो नवीन पैठणी विणकर बांधवांना गणेश चतुर्थी उत्सव भत्ता तसेच दरमहा २०० युनिट मोफत वीज मिळावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हजारो पैठणी विणकर आपले प्रस्ताव येवल्यातील विणकर प्रकोष्ठ कार्यालयात सादर करत आहेत.मागील महिन्यात शासनाच्या विविध योजनांअंतर्गत येवला तालुक्यातील विणकरांच्या खात्यात सुमारे २ कोटी ७० लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली होती. या मदतीमुळे अनेक विणकरांना दिलासा मिळाला असून आता नव्याने नोंदणी झालेल्या व लाभापासून वंचित राहिलेल्या विणकरांनाही गणेशोत्सव भत्ता व मोफत वीज योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी पुढे आली आहे.यासाठी विणकर प्रकोष्ठ कार्यालयामार्फत आवश्यक कागदपत्रे व प्रस्ताव संकलित करून ते शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनस्तरावर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नव्या विणकर बांधवांनाही या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती विणकर प्रकाशचे प्रदेशाध्यक्ष मनोज दिवटे यांनी दिली आहे.0
0
Report
Advertisement
कोकण में मानसून के आगमन की उम्मीद, रत्नागिरी-रायगढ़ में यलो अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..कोकणात उकाडा वाढला..पुढील ३-४ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट!.. अँकर Jun महिना अर्धा संपला तरी कोकणात मान्सूनने अद्याप म्हणावा तसा जोर पकडलेला नाही. मान्सूनची वाटचाल दापोलीतील हर्णे परिसरामध्येच रेंगाळल्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या तीव्र उकाडा आणि दमट वातावरण निर्माण झाले आहे.. त्यामुळे कोकणातल्या बळीराजावरती संकट उडवला आहे.. अजून काही दिवस मानसून लांबविला तर पेरणी केल्यानंतर शेतात वर आलेले रोप करपण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.. अशा परिस्थितीत हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिलेय.. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल होत असून,कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.. हवामान विभागाने आज रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.. या वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर,मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच समुद्रात उतरावे,असे आवाहन प्रशासनाने केले आहे。0
0
Report
नांदूर मधमेश्वर बांध पर जलपर्णी फैलाव से पानी आपूर्ति खतरे में
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यात गोदावरी, दारणा आणि कादवा या three नद्यांच्या संगमावर बांधण्यात आलेलेल्या नांदूर मधमेश्वर धरणामध्ये सध्या जलपर्णीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झाले आहे. धरणाच्या पृष्ठभागावर जलपर्णीचा घट्ट विळखा तयार झाल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी घेणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच सध्या अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील तालुक्यांसाठी बिगर सिंचनाचे आवर्तन सुरू असल्याने धरण १०० टक्के भरलेले आहे. अशातच मान्सूनचे आगमन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागू शकतो; मात्र विसर्गावेळी मोठ्या प्रमाणातील जलपर्णी धरणाच्या वक्राकार गेटमध्ये अडकल्यास पाण्याचा प्रवाह बाधित होऊन बॅक वॉटरला असलेले निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, शिंगवे आणि करंजगाव या गावांना पाण्याच्या फुगवट्याचा आणि पूरस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने नांदूर मधमेश्वर धरणातील जलपर्णी हटवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे0
0
Report
पांदण सड़क नहीं मिली तो किसान उग्र प्रदर्शन की चेतावनी देंगे, खेती के लिए रास्ता मांगा गया
Bhandara, Maharashtra:पांदण रस्ता खोदल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर जमीन पाडीत ठेवण्याची वेळ.....पांदण रस्ता बनवून न दिल्यास उपोषणाचा इशारा. पांदण रस्ता न मिळाल्यास उपोषणाचा इशाराही निवेदनातून केला आहे. Byte१ खुशाल लांबकाने शेतकरी Byte२ महिला शेतकरी.0
0
Report
Advertisement
अल निनो के प्रभाव से भविष्य में कम बारिश, पानी बचाकर इस्तेमाल अपील
Ahilyanagar, Maharashtra:अल निनोच्या प्रभावामुळे भविष्यात कमी पाऊस पडू शकतो आणि पाणी टंचाई होऊ शकते त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध पाणी हे जपून वापरावे असे आवाहन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी केले आहे...जिल्ह्यातील धरणातून सुरू असलेले अवैध पाणी उपसा बंद करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी भरारी पथक देखील स्थापन करण्यात आल्याचे म्हंटले आहे...सध्या धरणात आवश्यक पाणीसाठा आहे मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत 5 ते 6 टक्के पाणी कमी आहे...भविष्यात पाणी टंचाई येऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.0
0
Report
पुलिस ने अवैध रेत वाहतूक करते ट्रैक्टर जप्त, कागजात नहीं मिले
Bhandara, Maharashtra:लाखनी पोलीस विभागाच्या फिरत्या पथकाने अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून जप्त केला. ही कारवाई सालेभाटा गावाकडून खेडेपार गावाजवळील टी-पॉईट परिसरात करण्यात आली. लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा Young टेक्नो प्लस तसेच विनाक्रमांकाची लाल रंगाची ट्रॉली वाळूने भरीलेली आढळून आली. वाळू वाहतुकीची रॉयल्टी मागितली असता चालकाकडे कोणतेही वैध दस्तऐवज आढळून आले नाहीत. तपासणीदरम्यान वाळूची वाहतूक विनारॉयल्टी होत असचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केला...0
0
Report
वेऱुळ के शिक्षक की मौत के मामले में पुलिसकर्मियों का निलंबन, गिरफ्तारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यभर गाजत असलेल्या वेरूळ येथील जि.प. शिक्षकाच्या मृत्यू प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार बनगे या دوघांना अखेर निलंबित करण्यात आले. त्यानंतर उपनिरीक्षक नागरगोजे यास आरोपी बनवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. शिक्षक बोरसे याना या पोलिसांनी मारहाण केली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असा आरोप सुरुय त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली... मृत शिक्षकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता; मात्र आरोपी 'अज्ञात' दाखविल्याने संताप व्यक्त होत होता. शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधिनी सखोल चौकशीची मागणी केली होती, प्राथमिक चौकशीत नागरगोजे आणि बनगे दोषी आढळल्यामुळे पोलीस अधीक्षक जाधव यांनी दोघांना निलंबित केले. त्यानंतर नागरगोजे यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यामुळं शिक्षक बोरसे यांच्या मृत्यूत पोलिसांचीही HANDबला स्पष्ट झाले आहे...0
0
Report
Advertisement
पंढरपूर के भादुले चौक की सात दुकानों में Midnight आग, राख हुईं सभी
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरातील भादुले चौक येथे असणाऱ्या सात दुकानांना मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये हे सर्व दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये चप्पल विक्री दुकाने होती, तसेच हातगाडी आणि एक कार्यालय होते. आगीचे कारण कळू शकले नाही; मात्र अग्निशामक येईपर्यंत या आगीने जोरदार पेट घेतल्यामुळे दुकानांची राख झाली. शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या भागात ही आग भडकली होती. आग इतर ठिकाणी पसरली नाही, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.0
0
Report
सेनगांव में चार दिन से बिजली आपूर्ति ठप, लोग महावितरण कार्यालय जागरण कर रहे
Hingoli, Maharashtra:slug-hng_msebsengaon अँकर - हिंगोलीच्या सेनगाव शहरातील क्रमांक 17 मध्ये मागील चार दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी महावितरण कार्यालयात जागरण आंदोलन केला आहे सेनगाव शहरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत महावितरणच्या दुर्लक्षामुळे मागील चार दिवसापासून नागरिकांना अंधारात राहावे लागत है0
0
Report
गोकुळ दूध संघ: 441 इकाइयाँ अपात्र, 235 के निर्णय बाकी, मतदान अधिकार समाप्त
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अवसानातील 644 संस्था पात्र तर 441 संस्था अपात्र करण्यात आले आहेत. उर्वरित 235 संस्थांचा निर्णय प्रलंबित आहेत. अपात्र ठरलेल्या संस्थांमध्ये सर्वाधिक फटका हया राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाशी संबंधित आहेत. तर तालुका निहाय विचार केल्यास भुदरगड मधील अपात्र ठरलेल्या सर्वाधिक संस्था आहेत. अपात्र ठरलेल्या या संस्थांना गोकुळच्या निवडणुकीत आता मतदानाचा अधिकार नसणार आहे, दूध संघाला दूध कमी आल्याने या संस्था अवसानात निघाल्या आहेत.0
0
Report
Advertisement
