icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सिंधुदुर्ग में पुरुषों ने भी वटपौर्णिमा मनाई: पति की दीर्घायु हेतु अनोखी परंपरा

Oras Bk., Maharashtra:वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात गवळदेव मंदिर येथे गेल्या १७ वर्षांपासून पुरुष मंडळी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी करीत असून यावर्षीचे १८ वे वर्ष आहे. गाऱ्हाणे घालून विधीवत पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडाला फेऱ्याही मारल्या जातात. पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून पूजा करता तसेच हे पुरुष आपल्या पत्नीला दीर्घायुष्य, तसेच जन्मोजन्मी हाच पती मिळू दे यासाठी पूजा करतात. पुरूषांच्या या अनोख्या वटपोर्णिमेचे सर्वांनाच कौतूहल वाटत आहे. सर्वत्रच अशा पद्धतीने पुरुषांनी वटपोर्णिमा साजरी करण्याची प्रथा अंमलात आणण्याची मागणी होत आहे.
0
0
Report

गडचिरोली- छत्तीसगढ़ सीमा पर नक्सली हथियार निर्माण कारखाना उद्ध्वस्त, 5 टन लेथ मशीन बरामद

Chandrapur, Maharashtra:टायटल:---गडचिरोली- छत्तीसगड सिमेवर नक्षल्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त , पुरुन ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ कडून नष्ट, सामुग्रीत 5 टन वजनी लेथ मशीनचा समावेश, जवानांकडून विविध नक्षली साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट अँकर:-- नक्षल्यानी महाराष्ट्र - छत्तीसगड सिमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील बालबेडा जंगल परिसरात शस्त्रनिर्मिती व इतर साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाली होती. जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता उपमुख्यालय यांच्या संयुक्त 6 तुकड्या, बिडीडीएसचे 01 पथक व सिआरपीएफचे पथक शोध अभियान राबविण्यासाठी रवाना करण्यात आले. बिडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता, 5 ते 6 टन वजन असलेली एक लेथ मशीन, 150 नग क्लेमोर आणि बिजीएल पाईप्स, 220 नग 12 बोअर पाईप, 20 नग रायफल रॉड मेटल पट्टी आदी नक्षल साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे. पथकातील जवानांच्या सहाय्याने काही साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. सक्रीय नक्षलवाद काळात विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी हा साठा नक्षल्यानी लपवून ठेवला होता.
0
0
Report

सोलापुर के माढा अस्पताल में प्रसूता की सफाई जबरदस्ती; 14 माह बाद 9 कर्मी निलंबित

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात एप्रिल 2025 मध्ये नुकत्याच प्रसूती झालेल्या महिलेला तिच्या खोलीची स्वच्छता करायला लावण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी आता 14 महिन्यानंतर माढा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांसह 9 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे या घटनेने सार्वजनिक आरोग्य विभागाचा अमानवी कारभार समोर आला होता त्यामुळे या प्रकरणात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास मेमाणे व इतर आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केला आहे.यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
0
0
Report
Advertisement

राजू शेट्टी: कोकण किसानों को राहत नहीं मिली—अणुऊर्जा प्रकल्प के विरोध की चेतावनी

Oras Bk., Maharashtra:कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान होऊनही राज्य आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. याचबरोबर देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत, हा प्रकल्प कोकणच्या पर्यावरणासह आंबा, काजू आणि कोकम उत्पादनासाठी घातक ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. कोकण वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता देवगड येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. जल समाधी आंदोलनाचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले पहा...
0
0
Report

राजगुरुनगर में मुसलाधार वळवाने व्यापारी संकुल डुबो दिया; लाखों का नुकसान

Shirur, Maharashtra:राजगुरुनगर में वळवाच्या पावसाचा कहर; व्यापारी संकुल पाण्यात बुडाले, लाखोंचे नुकसान खेड तालुक्यातील राजगुरुनगरमध्ये झालेल्या मुसळधार वळवाच्या पावसाने व्यापारी संकुले पाण्याखाली गेली. सुमारे ३० दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अवघ्या दीड ते दोन तासांच्या मुसळधार पावसामुळे राजगुरुनगर शहरातील व्यापारी संकुलांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. जलनिस्सारण व्यवस्था कोलमडल्याने तळमजल्यावरील सुमारे ३० दुकानांमध्ये कंबरेएवढे पाणी साचले. त्यामुळे माल, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रे भिजून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
0
0
Report

त्रंबकेश्वर से पंढरी: 230 किलो चांदी से सज्ज पालखी, 24 घंटे सुरक्षा

Nashik, Maharashtra:संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नाशिकच्या त्रंबकेश्वर वरून पंढरीचे दिशेने प्रस्थान करणार आहे .. यानिमित्ताने निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात येत आहे... या पालखीला 230 किलो चांदीचा मुलामा लावून रथ 2016 तयार करण्यात आलाय... 24 तास सुरक्षा राहावी यासाठी रथावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.. त्याचबरोबर रथाला 24 तास सुरक्षा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आला आहे... त्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाडांनी...
0
0
Report
Advertisement

सुप्रिया सुळे ने साई दरबारी दर्शन किया; महाविकास आघाडी के साथ आंदोलन की तैयारी

Shirdi, Maharashtra:Anc - राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज साई दरबारी हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. संभाजीनगर येथे आयोजित आंदोलनाला जाण्यापूर्वी सुप्रिया सुळे साईचरणी.natamastak झाल्या..यावेळी त्यांच्या हस्ते साईबाबांच्या पादुका पूजन करण्यात आले.. राज्यात आणि देशात चांगला पाऊस पडावा असे साकडे यावेळी सुप्रिया सुळे यांनी साईबाबांना घातले..दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी खासदार फूटी सोबत विविध विषयांवर भाष्य केले.. सुप्रिया सुळे बाईट पॉइंटर ऑन महाविकास आघाडी एकत्रित आंदोलन महाविकास आघाडी एकत्र आहेच.. राज्याची परिस्थिती अडचणीची आहे.. गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे..शिक्षणाचे माहेरघर ओळख असलेल्या माझ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलीय.. हे मला जड Endःअंतःकरणाने सांगावे लागते.. आणि मी लोकप्रतिनिधी असणाऱ्या जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असेल तर त्याची अधिक चिंता वाटते.. ऑन TET पेपर फुटी आणि खासदार फूटी प्रकरण कालच एक व्हिडिओ पाहिला.. एक महिला अंडे विकत घेते..त्यावर महिला दुकानदाराला म्हणते ही अंडी घरी जाईपर्यंत फुटणार नाही ना ? त्यावर दुकानदार म्हणतो हे खासदार आमदार नाही फुटायला.. हे दुर्दैव आहे की एवढी चेष्टा लोकप्रतिनिधींची होते.. प्रत्येकाला त्याच मत किंवा पक्ष बदलायचा अधिकार घटनेने दिलाय.. मात्र ज्या पद्धतीने सत्तेचा वापर करून ही केले जाते ते दुर्दैव.. ऑन उबाठा गट खासदार फुट आम्ही उद्धवजी यांच्या सोबत व संपर्कात.. संजय राऊत यांच्या बरोबर देखील रोजच बोलण होत.. आम्ही देखील त्यांचा दौरा पाहतोय.. ज्यांना मोठे केले ते असे वागत असतील तर ते दुःখ देणारे.. महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरतेय का असे आता वाटते.. शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यात ही परिस्थिती आली ती खूप अवघड.. ऑन राजकारण भाषा दर्जा.. ज्यावेळी भाषेच्या दर्जावरून प्रश्न समोर येतात तेव्हा अरुण जेटली यांचं वक्तव्य आजही आठवत.. तुम्ही दाखवणं बंद करा..हे बोलण बंद करतील असे ते म्हणायचे.. भाषा आणि मराठी भाषेचा आम्हाला सार्थ अभिमान.. मात्र जेटलींनी त्यावेळी सांगितलेल्या गोष्टी आज खऱ्या ठरल्या.. ऑन राष्ट्रवादी आमदार फुटी चर्चा.. आमदार कश्याला खासदार फुटणार ही देखील चर्चा आहे.. त्यामुळे आम्हाला काय ते नवीन वाटत नाही.. ऑन म्यानमार सीमा भारतीय ओलीस प्रकरण.. मी विरोधात असले तरी चांगल्याला चांगलं म्हणते.. परराष्ट्र मंत्रालय चांगले काम करत आहे... ज्यावेळी देशात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा प्रश्न येतो तेव्हा देशाचे ऐक्य महत्त्वाचे.. अशा प्रसंगी देशाबद्दल एका स्वरात बोलले पाहिजे.. ऑन पिक हमीभाव फेरआढावा.. काळया मातीशी ईमान राखणाऱ्या शेतकऱ्याच कंबरडे मोडण्याचे पाप या सरकारने केले आहे.. सत्ता आहे मात्र मदतीला कोणी धावून जात नाही.. लाडकी बहीण योजनेत एक कोटी महिलांची नावे कमी झाली.. निवडणुका संपल्या की बजेटची सावरसावर केली गेली.. आज अनेक राज्यांसह देशाची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे..
0
0
Report

रायगढ़ में बारिश फिर शुरू, किसानों को मिली संजीवनी; नदी-नाले बढ़े जलस्तर

Chendhare, Maharashtra:दोन दिवसांच्या विश्रांती नंतर बरसला पाऊस. रायगडच्या काही भागात पावसाच्या सरी. पावसामुळे भातरोपांना मिली संजीवनी. नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाचे आगमन झालं आहे. अलिबागसह जिल्ह्याच्या काही भागात अधून मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. रात्री उशिरा ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र या पावसाने नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेय. पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होते मात्र आता झालेल्या पावसाने उगवून वर आलेल्या रोपांना संजीवनी मिळाली आहे.
0
0
Report
Advertisement

KDMC की लापरवाही: वाया जा रहा पानी, कल्याण में पाइपलाइन लीकेज

Kalyan, Maharashtra:एकीकडे पाणी बचतीचे आवाहन तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय . पाणी गळतीकडे KDMCचे दुर्लक्ष , कल्याण बेतुरकर पाडा परिसरात पाईपलाईन लिकेज, हजारो लिटर पाणी वाया यंदा पावसाळा उशिरा आल्याने नद्यांनी धरणांनी तळ गाठला त्यामुळे नागरिकांवर पाणी कपातीचे संकट आहे . कल्याण डोंबिवली महापालिकाेने 20 टक्के पाणी कपात लागू केली आहे . पाणी बचत करण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेकडून नागरिकांना केले जाते तर दुसरीकडे पाणी गळतीकडे मात्र महापालिका कानाडोळा करत असल्याचे दिसून आले आहे . कल्याण बेतुरकरपाडा परिसरात आज रस्त्याच्या कडेला गटाराचे काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन लिकेज झाली आहे हजारो लिटर पाणी वाया जात होते तक्रारी करून देखील केडीएमसी चा कोणताही कर्मचारी त्या ठिकाणी फिरकला नाही . त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता
0
0
Report

पीएम किसान योजना के लाभार्थी खाते में एक पैसा, सिस्टम चूक पर किसानों का रोष

Bhandara, Maharashtra:पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर आला चक्क एक पैसा.....शेतकाऱ्यांची थट्टा की सिस्टिमचा घोळ?... केंद्र सरकार कडून पात्र शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य करण्यासाठी पीएम किसान योजना राबविली जाते यात शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्ते प्रति दोन हजार प्रमाणे अर्थ सहाय्य दिले जाते मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात चक्क एक पैसा आल्याचा संदेश मोबाईल वर प्राप्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडून संताप व्यक्त होत आहे. ही आर्थिक मदत आहे का आमची थट्टा असा सवाल आता शेतकरी करत आहे.
0
0
Report
Advertisement

उद्धव ठाकरे का दो दिन में छह जिलों का दौरा, शिंदे गुट के लिए संकेत

Shirdi, Maharashtra:गेल्या दो दिवसांपासून उद्धव ठाकरे सहा मतदारसंघाचा दौरा करताय.. उबाठाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात हा दौरा असून आज साईंच्या शिर्डीत या दौऱ्याची सांगता होईल... साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्याला संबोधित करतील.. राहता शहराजवळील सिद्ध संकल्प लॉन्स या ठिकाणी मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे.. दोनदा बंडखोरी केलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार असून आजच्या दौऱ्याविषयी संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी अधिक माहिती दिली... विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला काल शिर्डी लोकसभा मतदारसंघातील माजी पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केलाय...
0
0
Report

बीड़ में दुबार बोआई के डर के बीच किसान बोआई शुरू, बारिश पर निर्भर फसल

Beed, Maharashtra:Beed: दुबार पेरणीचा धोका; तरीही लिंबागणेश परिसरात शेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरुवात..! ANC - दुबार पेरणीचा धोका डोळ्यासमोर असतानाही लिंबागणेश परिसरातील शेतकरी जिवावर उदार होऊन खरीप पेरणीला सुरुवात करत आहेत. मका, उडीद आणि मूग या पिकांची पेरणी सध्या सुरू असून, जमिनीत ओलावा कमी असल्याने पेरणी करताना "खरखर" होत आहे. तरीही लवकरच चांगला पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी पेरणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अपेक्षित पाऊस वेळेत न आल्यास दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता असून त्याचा थेट उत्पादनावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. सर्व अडचणींचा सामना करत शेतकरी पावसाच्या आशेवर शेतीची कामे सुरू ठेवत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top