445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Solapur MLA Sachin Kalyanashettey's driver offered money to kill; FIR filed against two men
Solapur, Maharashtra:सोलापुर आ. सचिन कल्याणशेट्टी यांना मारण्यासाठी त्यांच्या वाहन चालकाला पैशाचे आमिष दिल्याचा आरोप, दोघा व्यक्तींच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो.. असे म्हणत आमदारांच्या वाहन चालकाला पैशाचे आमिष दाखवणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल. सोलापुरातल्या महावीर चौक परिसरातील घटना, आरोपी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी विरोधात गुन्हा नोंद. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मारण्यासाठी त्यांच्या वाहन चालकाला पैशाचे आमिष दिल्याचा आरोप. वाहन चालक आनंद सुरवसे यांच्या फिर्यादीवरून सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय सोलापुरात खरेदीसाठी आले होते. त्यावेळी गाडीजवळ थांबलेले चालक आनंद सुरवसे यांच्याजवळ आरोपी श्रीशैल हुळळी आणि फुलारी हे दोघे आले. ‘तुला आम्ही पैसे देतो, तुझ्या आमदार दादाला गोळ्या घाल, पुढचं आम्ही बघून घेतो, यात तुझा फायदा आहे,’ असे म्हणत आमदारांच्या हत्येसाठी चालकाला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आरोपीवर आहे. वाहन चालक आनंद सुरवसे यांनी नकार देत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी तिथून पळ काढला. मात्र या घटनेनंतर वाहन चालक आनंद सुरवसे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघांविरोधात गुन्हा नोंद झालाय.0
0
Report
पालघर के बहाड में बिबट्या का खुलेआम विचरण, किसानों में दहशत
Palghar, Maharashtra:पालघर – डहाणू तालुक्यातील बहाड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा सर्रास वावर असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, बिबट्याचा मुक्त संचार एका तरुणाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. बहाड गावातील शेतकरी जनार्दन कडू यांच्या शेतात चरायला सोडलेल्या बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात काही बकऱ्या फस्त झाल्याची माहिती है. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
जयंत पाटील के प्रवास से राजनीतिक हलचल, विमानतळ नामकरण और स्वास्थ्य व्यवस्था पर बहस
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:On जयंत पाटील प्रवास प्रवास एकत्र केला म्हणून काही गोष्टी होतात अशातला भाग नाही पण काही चालू असेल त्यांच्या तर त्याची माहिती मला नाही काँग्रेस काय म्हणत असलं तरी मला असं वाटत नाही.. काही गोष्टींसाठी एकमेकांना भेटावं लागतं मीही आज महापौरांना भेटायला आलो त्यामुळे असाच काही उनकेांचा विषय असावा दी बा पाटील विमानतळ : विमानतळाला त्यांचं नाव असावं अशी त्यांच्या तिकडच्या लोकांची जनभावना आहे त्या भागात त्यांचं काम आहे त्या भागातील विकासासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं होतं ..त्या भागातील जनतेने दि बा पाटलांच्या नावाचा आग्रह धरला आहे केंद्र सरकार अशा बाबतीत दुजाभाव करता एका दिवसात नरेंद्र मोदींचे नाव स्टेडियमला देता येतं मात्र दिबा पाटील सारख्या लोकांचे नाव त्या विमानतळायला देता येत नाही हे दुर्दैव आहे परभणी आरोग्य व्यवस्था गुन्हे दाखल करणे हा उपाय नाही तीन तास आरोग्य व्यवस्था का मिळाले नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मलाही असाच एक फोन आला होता डॉक्टर नाही आरोग्य व्यवस्था नाही आता आरोग्य मंत्री ज्या जिल्ह्यात राहतात तिथे असा प्रकार घडतो हे दुर्दैवी आहे झारखंड आंदोलन तरुणांचा आंदोलन न्याय मागण्यासाठी आहे अशा पद्धतीने त्यांच्या आंदोलनावर पाण्याचा मारा करणं दडपशाही करणे हे चुकीचं आहे ते विधानसभेवर का गेले हे पाहावं लागेल ना सरकार चर्चाच करत नाही शरद पवार खासदार मोदी भेट कुठल्याही गोष्टीवर घाईने मत व्यक्त करणं चुकीचं आहे असं मला वाटतं खासदार पंतप्रधानांना राज्यात आमदार मुख्यमंत्र्यांना भेटत असतात आमचे काही गद्दार भेटले त्याबद्दार उद्धवजींनी मत व्यक्त केलाच आहे0
0
Report
Advertisement
मराठा आरक्षण की मांग पर विभागीय आयुक्त कार्यालय के सामने उग्र प्रदर्शन
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावं या मागणीसाठी छत्रपती संभाजी नगर मध्ये विभाग आयुक्त कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा उपोषण सुरू आहे , रविवारी ही सर्व मंडळी क्रांती चौकात उपोषणाला बसली होती मात्र पोलिसांनी तिथे परवानगी नसल्याने त्यांना ताब्यात घेतलं होतं मात्र आता रविवारपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केले ..शाश्वत आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे सोबतच मराठा आंदोलकांवरील गुन्हे परत घ्यावे अशीही त्यांची मागणी आहे.. जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही मात्र शाश्वत आरक्षण हीच आमची मागणी असल्याचे आंदोलकांचे म्हणणं आहे0
0
Report
कोल्हापुर के रंकाळा तालाब पर म्यूज़िकल फाउंटेन का उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस ने किया उद्घाटन
Kolhapur, Maharashtra:Kop Rankala Fountan कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा तलावत म्यूज़िकल फाउंटन उभे करण्यात आले आहे. या फाउंटनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रात्री रंकाळा तलावाच्या काठावर हे फाउंटन सुरु करण्यात आले. आकर्षक विद्युत रोषणाईने सज्जा असणारे हे फाउंटन पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.0
0
Report
नाशिक में शिवसेना पदाधिकारी की बैठक शुरू, दादा भुसे की मौजूदगी में अहम समीक्षा
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात... शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे पार पडते आहे बैठक शिवसेना उपनेता अजय बोरस्ते व उपमहापौर विलास शिंदे देखील उपस्थित दादा भुसे यांच्याकडून संघनात्मक आढावा घेतला जाणार0
0
Report
Advertisement
गडचिरौली में नागपुर से दुखद खबर: सर्पदंश से 3 छात्राओं की मौत; जांच शुरू
Nagpur, Maharashtra:गडचिरोली विद्यार्थी मृत्यू - काल रात्री दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर आली. पाच ते सहा मुलींना सर्पदंश झाला त्यापैकी तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. इतरांवर उपचार सुरू. सदरली शाळा ही खाजगी अनुदानित आहे. चौकशी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. याबद्दल उच्चस्तरीय चौकशी करून कोणाचा दुर्लक्ष होता हे समोर येईल.. आणि मृतकाच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत करण्यात येईल. रोहित पवार - रोहित पवार हे सध्या कोणतरी वक्तव्य करून माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ही स्पर्धा लागली आहे. महाविकास आघाडीत मी श्रेष्ठ असल्याच्या दाखवण्याच्या प्रयत्नात असे सलग वक्तव्य करून समाजात खोटा भ्रम पसरत असतात.. मी स्वतः 14 तारखेला तिथे भेट देणार आणि गडचिरोली जाऊन आढावा घेणार. हे नैसर्गिक आपत्ती आहे की यामध्ये कोणाची चूक हे पाहणार. या प्रकरणातील चौकशी अहवाल आल्यानंतरच भाष्य करणे योग्य राहील . जयंत पाटील cm एकत्र प्रवास देवेंद्र फडणवीस हे सध्या सामन्य विमानाने प्रवास करत आहेत. विमानात अनेक प्रवासी असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे योग्य नाही. झालेली प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत झाल्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं लोकसभा अध्यक्ष यावर निर्णय घेतील. पक्ष कोणत्याही वारशाने चालत नाही. वडिलांच्या मालमत्तेवर मुलांचा హక్క असतो मात्र पक्षावर कार्यकर्त्यांचा హक्क असतो. एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षात मुख्यमंत्री पद कशा सांभाळायचं आणि राज्यातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसं उभं राहायचं हे दाखवलं. त्यांच्या यशातून स्ट्राईक रेट चांगला झाला. त्याचा फायदा शिवसेना आणि महायुतीला झाला याचा विचार उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला असावा.. लोकं महाराष्ट्रातून टप्प्याटप्प्याने शिवसेनेत येत आहे. त्यामुळे भविष्यात एकच शिवसेना राहील ही काळ्या दगडावरची रेघ आहे..0
0
Report
नागपुर में आयचीत मंदिर बस स्टॉप के पास चाकू हमला, एक घायल
Nagpur, Maharashtra:नागपुरात आयचित मंदिर बस स्टॉप मागे एका गल्लीत एका व्यक्तीवर चाकू हल्ला झाल्याने खळबळ माजली होती.. आयचीत मंदिर बस स्टॉप मागे अंबिका देवी मंदिराजवळ हल्ल्याची ही घटना घडली.. दरम्यान हल्ल्यात जखमी झालेला माणूस बडकस चौकाच्या दिशेने गेला. दरम्यान बडकस चौकातून सरसंघचालकांचा ताफा थोड्यावेळ आधीच तिथून निघून गेला होता . आकाश ढोमणे असे जखमीचे नाव असून हल्लेखोर गणेश वानखेडे आहे... एका महिलेशी संबंधित विषयावर दोघांमध्ये वाद होऊन हा चाकू हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे…0
0
Report
सुजात आंबेडकर ने राष्ट्रवादी की भूमिका पर सवाल उठाए, राजनीति में घुमाव बढ़ा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : राष्ट्रवादीची भूमिका ही कायम बेडगी होती आणि आहे - सुजात आंबेडकर - महाराष्ट्रात राजकीय अस्वस्थता आहे. evm बाबت शंका, SIR ची भिती मनात आहे - भाजप नको म्हणून लोकांनी विरोधी पक्षातील लोकांना निवडून दिले. - मात्र तेच लोकं भाजपत जात आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे. - सुप्रिया सुळे आणि त्यांचे खासदार पंतप्रधानाना भेटले - ते सांगत आहेत की, महिला विधेयकासाठी आम्ही भेटतोय पण ते खोटे आहे. - डिलिमीटेशन बिल कसं लागू होऊ शकत त्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट पंतप्रधानाना भेटले - एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या मुलीचे लग्न एका कट्टर RSS विचारसरणी असलेल्या व्यक्तीच्या मुलासोबत झाले. - त्यामुळे जो भाजपला विरोध करतोय तेच त्यांच्याशी हातमिळवणी करत आहेत. - वंचित बहुजन आघाडीने मराठा वि. ओबीसी यावर भूमिका घेतली. - जें भाजप सोबत हातमिळवणी करतात त्यांच्या विरोधात भूमिका घेतोय. - शरद पवार गट त्यांची काय भूमिका घेतो ते पाहणे महत्वाचे आहे. - भाजप सत्तेत आल्यापासून डिवाईड आणि रुल ही नीती वापरत आहे. - भाजपने हिंदू मुस्लिम नंतर मराठा विरुद्ध ओबीसी, मातंग विरुद्ध बौद्ध असा वाद निर्माण केला. - अभिजीत दिपके हे स्वतः एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहेत त्याना मी काय सल्ला देणार. - भाजपने राज्यातील विरोधी पक्षाचे खासदार फोडले. - भाजप हे अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांना शेल कंपनीप्रमाणे वापरते. - सुप्रिया sुळे या पंतप्रधानांना भेटायला गेले आहेत. डिलिव्हिटेशन बिल झाल्यानंतर कळेल राष्ट्रवादी SP गट कोणाच्या बाजूने आहे. - ऑन शरद पवार टीका : - राष्ट्रवादीची भूमिका ही कायम बेडगी होती आणि आहे. - अजित पवारांनी दोन-तीन वेळा सांगितले की पहाटेच्या शपथविधी शरद पवारांना माहिती होता. - शरद पवारांची भूमिका नेहमी नाटकी आणि खोटी होती. - महाराष्टाच्या पुरोगामी चळवळीत धूळफेक करणारी होती. - ऑन जयंत पाटील : जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा बुकिंग एजंट एक असेल. मला त्यामध्ये फार माहिती नाही. - ऑन जरांगे पाटील टीका : कोणाच्याही व्यंगावरून टीका केली नाही पाहिजे अशी माझी नेहमी भूमिका आहे. - BYTE : सुजात आंबेडकर ( नेते, वंचित बहुजन आघाडी)0
0
Report
Advertisement
गोकुळ दूध संघ के चुनाव के लिए सुप्रीम कोर्ट ने 60 दिन की मुदतवाढ दी
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 60 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज गोकुळच्या निवडणुकीसाठी 60 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. विभागीय उपनिबंधक दुग्ध यांनी मुदतवाढ मिळावी म्हणून सुप्रीम कोर्टात गेले होते. या आधी सुप्रीम कोर्टाने 90 दिवसांमध्ये निवडणूक घेण्याबाबत आदेश दिले होते. दूध संस्थेच्या 1300 हून अधिक संस्थांच्या पात्र आपात्रतेचा मुद्दा निकाली निघाल्याने आणि मतदार याद्या तयार न झाल्याने विभागीय उपनिबंधक सुप्रीम कोर्टात गेले होते.0
0
Report
नागपुर: नाबालिग अपहरण-यौन अत्याचार-हत्या की कोशिश के आरोपी आकाश पाखरे जेल भेजे जाएंगे
Nagpur, Maharashtra:नागपूर - अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार व हत्येचा प्रयत्न प्रकरणातील आरोपी निर्मय उर्फ आकाश पाखरे कारागृहात रवानगी . - रुग्णालयातून सुटी मिळताच आरोपीची कारागृहात रवानगी. - नागपूर पोलिसांकडून ठाण्यातील आरोपीच्या घराची झडती. - झडतीत मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त. - सोशल मीडियावरील बनावट ओळख, चॅट, कॉल रेकॉर्ड आणि अन्य डिजिटल पुराव्यांची तपासणी होणार. - घटनेच्या वेळी आरोपीचे दोन मोबाईल पोलिसांनी आधीच जप्त केले होते. - आरोपी नागपुरात कोणत्या विमानाने आणि नेमका कधी आला, याचा तपास सुरू. - विमान तिकीट कोणी बुक केले, कोणता मोबाईल क्रमांक अथवा ई-मेल वापरला आणि पैसे कसे भरले, याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. - इलेक्ट्रॉनिक उपकरणांतून आरोपीच्या हालचाली आणि संपर्कांबाबत महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळण्याची शक्यता.0
0
Report
सांताक्रुझ पुलिस ने घरफोड़ी आरोपी को बिहार से पकड़ा, 76.39 लाख संपत्ति बरामद
Mumbai, Maharashtra:सांताक्रुझ पोलिसांनी लाखो रुपयांच्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत सराईत आरोपीला बिहारमधून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७६ लाख ३९ हजार रुपयांची मालमत्ता हस्तगत आणि गोठवण्यात यश मिळवलं आहे. सांताक्रुझ पश्चिम येथील जुहू तारा रोड परिसरात २० जून ते २७ जुलैदरम्यान ही घरफोडी झाली होती. घरमालक गैरहजर असल्याचा फायदा घेत आरोपीने खिडकी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमचा दरवाजा आणि कपाटाचा लॉकर फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि رولॅक्स घड्याळ असा सुमारे ५४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चंदन कमलेश मुखिया या २६ वर्षीय आरोपीचा शोध घेतला. आरोपी दरभंगा, बिहार येथे असल्याची माहिती मिळताच सांताक्रुझ पोलिसांचे पथक बिहारमध्ये रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करून न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला आहे. तपासादरम्यान २०० ग्रॅम सोन्याची लगड आणि सुमारे ५ लाख रुपयांचे रोलॅक्स घड्याळ, अशी ३० लाखांची मालमत्ता पोलिसांनी ताब्यात घेतली. तर चोरीच्या पैशांपैकी ४६ लाख ३९ हजार रुपये बँक खात्यांमध्ये गोठवण्यात आले आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.0
0
Report
Advertisement
मराठवाडा में भाजपा ने युवाओं के लिए तिरंगा यात्रा की योजना घोषित की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात राजकीय तापमान तापलेले असताना आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन-झींच्या देशभक्तीचे कौतुक केलेले असतानाच, भारतीय जनता पार्टीन तरुणांना सोबत घेण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे. छत्रपती संभाजीनगरात १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. मागील दोन आठवड्यांपासून कॉक्रोच जनता पार्टीच्या बैठकीमुळे शहर राजकीय घडामोडींचे केंद्र बनले होते. त्यामुळं मराठवाड्यातील आपला राजकीय दबदबा कायम ठेवण्यासाठी आणि तरुणाईला साद घातण्यासाठी भाजपने या तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे...0
0
Report
जायकवाडी बैकवॉटर में डूबने से दो चचेरे भाई मृत, अमलेनेर में मातम
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील अमळनेरवस्ती येथे जायकवाडी धरणाच्या बॅकवाटरमध्ये बुडून दोन लहान चुलत भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविंद्र मिसाळ व अविनाश मिसाळ या सख्ख्या भावांची शेती जायकवाडी बैंकवाटरलगत आहे. त्यामुळे कुटुंब शेतवस्तीवरच वास्तव्यास आहे. रविवारी दुपारी तन्वी व आयुष ही दोन्ही मुले घराच्या अंगणात खेळत होती. खेळता खेळता कुटुंबीयांची नजर चुकवून ती शेजारी बॅकवाटरच्या पाण्याच्या दिशेने गेली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा अचानक तोल गेला आणि ती खोल पाण्यात पडली. मुले सुरक्षित ठिकाणी खेळत असतील असा समज झाल्याने काही वेळ कुटुंबीयांचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. मात्र, मुले न दिसल्याने शोधाशोध सुरू केली. बँकवाटरच्या पाण्याजवळ मुले पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले. आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बालकांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले0
0
Report
Koina Dam: All gates closed, discharge controlled; 1050 cusecs released from Paitha Powerhouse
Satara, Maharashtra:सातारा : कोयना धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले असून, सांडव्यावरून होणाऱ्या विसर्ग थांबवण्यात आला आहे. मात्र पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून, त्यातून कोयना नदीपात्रात १,०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने विसर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.0
0
Report
Advertisement
