icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लातूर बंद: व्यापारियों का समर्थन, गृहमंत्री–शिक्षा मंत्री से इस्तीफे की मांग तेज

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद... बाजारपेठा बंद, व्यापाऱ्यांचा पाठिंबा..... लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तिरंगा मार्च काढण्यात आला. शहरातील मुख्य बाजारपेठ और जिल्ह्यातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. व्यापाऱ्यांनीही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. गृहमंत्री और शिक्षण मंत्री ने राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी आंदोलनकर्ते आक्रमक झाले'red?.
0
0
Report

MIDC पुलिस ने चार साल बाद अनिस खान को खोज कर परिवार से मिलवाया

Mumbai, Maharashtra:मुंबईतील एमआयडीसी पोलिसांनी चार वर्षांपासून बेपत्ता असलेल्या आठ वर्षीय अनिस खानचा शोध लावून एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी अंधेरी पूर्व येथील स्नेहसदन बाल अनाथालयातून अनिस कोणालाही न सांगता बाहेर पडला होता. त्याआधी तो जुहू चौपाटी परिसरात बेवारस अवस्थेत आढळून आला होता. जुहू पोलिसांनी त्याच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही माहिती न मिळाल्याने २१ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याला स्नेहसदन अनाथालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी तो तेथून बेपत्ता झाला. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिसांनी सातत्याने सुरू ठेवला. पोलिसांनी विविध बालसुधारगृहे, अनाथालये आणि संबंधित संस्थांकडे चौकशी केली. तपासादरम्यान एका बालसुधारगृहात वेगळ्या नावाने राहणारा मुलगा हा अनिसच असल्याचा संशय आला. त्यानंतर उपलब्ध कागदपत्रे, ओळख पडताळणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे त्याची खात्री करण्यात आली. अखेर पोलिसांनी अनिसला सुखरूप ताब्यात घेत त्याची कुटुंबीयांशी भेट घडवून आणली. तब्बल चार वर्षांनंतर आपल्या मुलाला पाहताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. एमआयडीसी पोलिसांच्या चिकाटी, संयम आणि अथक तपासामुळे या प्रकरणाचा यशस्वी उलगडा झाला असून, या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
0
0
Report

बारामती में दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार के पूर्णाकृती पुतले का लोकार्पण

Rui, Maharashtra:बारामती दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण. दर्शण्यासाठी बारामतीकर करतायेत गर्दी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडले लोकार्पण... मान्यवरांसह उपस्थितांना अश्रू अनावर. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पूर्णाकृती पुतळ्यांचे आज लोकार्पण पार पडले. उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार जय पवार यांच्यासह बारामती करांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. यावेळी विविध धर्माच्या वतीने मानवंदना देण्यात आली. बारामतीकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गर्दी करत आहेत शाळकरी विद्यार्थ्यांच्या अजित पवारांच्या गीतावर सर्वांचा अश्रू अनावर झाले. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी याने
0
0
Report
Advertisement

पवना बांध 92.55% भरला; नदी किनारे सतर्कता की अपील

Varsoli, Maharashtra:पिंपरी चिंचवड शहरासह मावळ तालुक्याच्या काही भागाची तहान भागवणारे पवन मावळातील पवना धरण आज 92.55 टक्के भरले आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ही जास्त आहे. याकरिता धरणातील पाणी हे नदीपात्रात सोडावे लागणार आहे. याकरिता पावना नदीच्या काठावर असलेल्या गावांनी व तेथील नागरिकांनी सतर्क रहावे. पाटबंधारे विभागाकडून याबाबतच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील. पवना नदीची पाणी पातळी देखील वाढलेली असल्यामुळे नागरिकांनी आपली कृषी अवजारे, पशुधन नदी पात्राच्या जवळ घेऊन जाऊ नये ते सुरक्षित ठिकाणी हलवावे अशा सूचना पुणे पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
0
0
Report

बुलढाणा में महाराष्ट्र बंद के विरोध में प्रदर्शन, मलकापुर- सोलापुर मार्ग पर यातायात बाधित

Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेक मलकापूर सोलापूर महामार्गावर वंचितचा रास्तारोको बुलढाणात महाराष्ट्र बंदचे पडसाद Anchor - राज्यभरात पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद'चे तीव्र पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटले आहेत. मलकापूर-सोलापूर महामार्गावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल पंधरा मिनिटे पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे काही वेळातच महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली असून सध्या तणावमुक्त शांतता आहे.
0
0
Report

छगन भुजबल के मोदी ट्वीट पर विपक्षी मोर्चे और विरोध प्रदर्शन तेज

Yeola, Maharashtra:मंत्री छगन भुजबळ ऑन पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट फास्टट्रॅक कोर्टामध्ये जे जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना शिक्षा होईल हा चांगला निर्णय..... त्यामुळे यापुढे पेपर फुटीची प्रकरण होणार नाहीत..... कोर्टातील प्रकरण वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात त्यानंतर लोक विसरून देखील जातात.... मंत्री छगन भुजबळ ऑन ठाकरे बंधू मोर्चा एखादा विषय सरकारच्या विरोधात मिळाला तर विरोधक त्या विषयाचा फायदा घेतात.... चळवळ उभी करणे चूक आहे मी असं म्हणणार नाही विरोधी पक्षांचे ते कामच आहे. मंत्री छगन भुजबळ ऑन अण्णा हजारे पाठिंबा पाठिंबा देत आहे तर चांगली गोष्ट आहे ... मंत्री छगन भुजबळ ऑन वंचित बहुजन आघाडी बंद विरोधी पक्ष आपापल्या पद्धतीने आंदोलन करत आहेत कोन उपोषण करणार कोण महाराष्ट्र बंद करणार कोण मुंबई बंद करणार हे चालूच राहणार आहे.... मंत्री छगन भुजबळ विद्यार्थी आंदोलनात राजकीय पक्ष कोणत्याही विरोधी पक्षाला एखादा विषय मिळाला सरकारची विरोधात ते त्याच्यावर आवाज उठवतात... आम्ही देखील विरोधी पक्षात असताना एखादा विषय मिळाला की आवाज उठवण्याचं काम करतच होतो.. काँग्रेस असो बीजेपी असो शिवसेना असो कुठलाही विषय एखादा सरकारच्या विरोधात मिळाला की त्या विषयाला धरून आवाज उठवणे हे त्यांचं कामच आहे
0
0
Report
Advertisement

पंढरपूर में आषाढ़ी एकादशी से पहले भक्तों की भीड़; 15 लाख पहुंचे, एसपी कुलकर्णी

Pandharpur, Maharashtra:आषाढी एकादशीच्या सोहळ्याला अद्याप दोन दिवस बाकी असताना पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 15 लाख भाविक पंढरपूरमध्ये आज दाखल झाल्याचं सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितला आहे. राज्याच्या विविध भागातून आलेल्या दिंड्या आणि त्यामधून आलेले वारकरी पंढरपूर मध्ये दाखल होत आहेत प्रमुख मानाच्या पालख्यान सोबतचेही वारकरी पंढरपूर मध्ये आता दाखल होत आहे आषाढी एकादशीच्या पूर्वीच पंढरपूरमध्ये हाउसफुल गर्दी झाल्याचे चित्र प्रत्येक भागात दिसत आहे विठोबाची पदस्पर्श दर्शन रांग चंद्रभागा वाळवंट प्रदर्शना मार्ग मंदिर परिसर वारकऱ्यांनी हाउसफुल झाला आहे
0
0
Report
Advertisement

जंतर-मंतर पेपरफुटी पर तहकीकात की मांग, महासभा में राजनीति गरमाती दिखी

Kalyan, Maharashtra:जंतर-मंतर लाठीचार्ज पडसाद केडीएमसीत ! शिवसेना उभाठाचे गटनेते उमेश बोरगावकर यांचे महासभा तहकूबीसाठी महापौरांना पत्र विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कल्याण दिल्लीतील जंतर-मंतर येथे कथित पेपर फुटी आणि विविध गैर प्रकरण विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्या आंदोलनावर झालेल्या लाठी चर्च पडसाद आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत देखील उमटण्याची शक्यता आहे . शिवसेना उभाठाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी आज होणाऱ्या  सर्वसाधारण सभेसाठी तहकुबी सूचना दाखल करणार आहेत .. महासभा तहकुबीसाठी बोरगावकर यांनी महापौरांना पत्र पाठवले आहे .तहकुबी सूचनेत म्हटले आहे की, जंतर-मंतर येथे समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. मात्र, आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधूर आणि बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कारवाई लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर गंभीर आघात असल्याचेही सूचनेत नमूद करण्यात आले आहे. यासोबतच, या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जंतरमंतर येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी २३ जुलै रोजीच्या केडीएमसीच्या सर्वसाधारण सभेत तहकुबी सूचना मंजूर करून या विषयावर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी उमेश  बोरगांवकर यांनी केली आहे.
0
0
Report

सोलापुर कृषि उपज बाजार में बंद के कारण प्याज लिलामी ठप, किसानों में हाहाकार

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सोलापुरातून प्रतिसाद. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचा बंदमध्ये सहभाग. माथाडी कामगारांनी कांदा उतरवण्यास नकार दिल्याने कांदा लिलाव ठप्प. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेकडो शेतकरी रात्रीपासून ताटकळत उभे. जंतर मंतर वर सुरू असलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा मात्र मार्केट कमिटीने बंदची कल्पना आम्हाला द्यायला हवी होती शेतकऱ्यांची भावना. याविषयीचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
0
0
Report
Advertisement

शिरूर हवेली में स्वास्थ्य सप्ताह: आम जनता के लिए मुफ्त स्वास्थ्य जांच अभियान

Shirur, Maharashtra:सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळावी आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर हवेली मध्ये विशेष आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आलंय, या पार्श्वभूमीवर शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी स्वतः सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपली आरोग्य तपासणी करून घेतली. सरकारी आरोग्य यंत्रणेवर सर्वसामान्य जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश असून, त्यांनी या माध्यमातून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय, या आरोग्य तपासणी शिबिराला सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, तपासणीसाठी केंद्रांवर नागरिकांनी मोठी गर्दी केलीय.
0
0
Report

नागपूर में छात्र आंदोलन पर सरकार की दादागिरी, विपक्षी ने किया सरकार पर हमला

Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते *विद्यार्थी आंदोलन* - उनके भविष्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या देशात परिवर्तनाला सुरुवात होईल. सत्तेत कोण आहे, हा प्रश्न नाही; तर तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे. सरकार संवेदनाहीन झाले आहे. - त्या मुलांवर बळाचा वापर करून त्यांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही लोकशाही आहे की नाही? त्या मुलांच्या हातात कोणतेही शस्त्र नव्हते. ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते, तरी सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. *ऑन राहुल गांधी* - राहुल गांधी पत्रकार परिषद घेतली. त्यांनीही आंदोलन केले. महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन केले. तालुका स्तरावरही पालक रस्त्यावर उतरले आहेत. मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्या भावनांशी खेळू नका. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढा. सरकारची ही भूमिका असली पाहिजे. दुर्दैवाने सरकार कोणतीही चर्चा करण्यास किंवा बोलण्यास तयार नाही. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. - सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले. मुलींच्या खासगी अवयवांवर पोलिसांनी मारहाण केली. तरुणांशी अभद्र वर्तन करण्यात आले. काल आम्ही आंदोलन केले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील. अमित शहा यांनीही राजीनामा द्यावा. आम्ही सरकारसमोर पाच मागण्या ठेवल्या आहेत; मात्र सरकार त्या मान्य करण्याऐजी दडपशाही करत आहे. *ऑन नरेंद्र मोदी ट्वीट* - गेल्या दहा वर्षांत अनेक पेपरफुटी झाल्या आहेत. हजारो पुरावे आहेत. सरकार हुशार विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. *ऑन अण्णा हजारे* - उशिरा सुचलेला शहाणपणा आहे. आता त्यांचे वय झाले आहे. *ऑन सरन्यायाधीश* - न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होता कामा नये. सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. तरुणांवर अमानुषपणे मारहाण होत आहे. पोलिसांनी कायदा हातात घेणे चुकीचे आहे. *ऑन नड्डा प्रेस* - नीट परीक्षा घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यांच्या काळात पेपरफुटी झाली म्हणून आम्ही करायची का? हजारो लीक कसे होतात? अनेक पेपरफुटी होतात, त्याची जबाबदारी कोणाची? दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःच्या चुका सुधारल्या पाहिजेत. - काँग्रेसच्या आंदोलनावर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावे. चोर सोबत पोलिस आहे सामान्य विद्यार्थ्यांच्या मागे धावत आहे. दुसऱ्यांच्या आंदोलनावर टीका करून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनता हे कधीच माफ करणार नाही. - सत्तेसाठी ते हतबल झाले आहेत. काल शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत होतो. अशा प्रकारे आंदोलन हाताळणे म्हणजे पोलिसांची दादागिरी आणि गुंडगिरी आहे. मला गाडीत ढकलण्यात आले. माझ्या खांद्याला दुखापत झाली. छातीतही वेदना होत होत्या. पोलिसांनी अमानुषपणे मला उचलले. या सरकारला लोकशाही मान्य नाही. सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. *ऑन कराळे* - कराळे यांची भाषा चुकीची आहे. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन कोणीही करत नाही. सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधी यांच्या मागे संपूर्ण देश आहे. पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार आम्ही भूमिका घेऊ. *ऑन शरद पवार* - सर्वांना भेटता येते. ती राजकीय भेट नव्हती. काही दिवसांनी सत्य समोर येईल. अशा भेटींवर चर्चा होत असते. त्यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही. *ऑन ठाकरे बंधू* - त्यांनी रामरक्षा आंदोलन केले. आम्ही गांधीवादी विचारांचे लोक आहोत. प्रत्येक जण आपल्या विचारधारेनुसार आंदोलन करत असतो. *ऑन वंचित आंदोलन* - आजच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष घेतील. *ऑन दिल्ली पोलीस* - जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायर होता. आजही विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे कारवाई झाली, ती अत्यंत निषेधार्ह आहे. तरुणांना मारहाण करण्यासाठी गुंडांचा वापर करण्यात आला. त्यांची ओळख पटत आहे. *ऑन शेतकरी कर्जमाफी* - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नांबाबत सरकार उदासीन आहे. सरकार आकडे फुगवून सांगत आहे. काल तांत्रिक बिघाडाचे कारण देत यादी प्रसिद्ध केली. ही बनवाबनवी असून शेतकऱ्यांची फसवणूक आहे. कर्जमाफीच्या यादीतून हे स्पष्ट झाले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top