Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशीम में चौपदरीकरण के दौरान अज्ञात व्यक्ति का शव बरामद, जाँच जारी

GMGANESH MOHALE
Mar 18, 2026 03:20:51
Washim, Maharashtra
वाशिम: अकोला-नांदेड महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान वाशीम शहरातील हिंगोली नाका परिसरात अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे अवशेष आढळल्याने खळबळ उडाली आहे. रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू असताना रात्री साडेदहा वाजता जेसीबी चालकाला मुरूमाच्या ढिगाऱ्याखाली हे अवशेष दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीसच्या 112 आपत्कालीन क्रमांकावरून कळविण्यात आले आणि वाशिम शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. हे प्रकरण अपघात आहे की घातपात,याबत अद्याप स्पष्टता नाही. मृतदेहाचे अवशेष मुरूमासोबत आले की कोणीतरी खून करून ते लपवले, याचा तपास वाशिम शहर पोलीस, ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 18, 2026 04:18:48
Washim, Maharashtra:अँकर: वाशिमच्या मालेगाव तहसील कार्यालयातील चेकबुक चोरी प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. पाच दिवसांपूर्वी चोरी गेलेले चेकबुक अचानक नायब नाझर कार्यालयात सापडल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चोरी केलेल्या चेकद्वारे पाच जणांच्या खात्यात तब Dell 5 लाख 58 हजार रुपये जमा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल असून तपास सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी कार्यालय उघडताना खिडकीखाली पिशवीत चेकबुकचा बंडल आढळून आला. यातील 12 चेकवर सही व शिक्के असून उर्वरित चेक कोरे असल्याचे आढळले. पोलिसांनी पंचनामा करून चेकबुक जप्त केले आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आले नसून, तहसील कार्यालयाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 18, 2026 04:16:50
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यातील लोहारा, उमरगा, तुळजापूरला गारपिटीचा तडाखा. वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. नळदुर्ग परिसरात महामार्गावर बर्फासारखी गारांची चादर. द्राक्ष, कांदा, केळी, ज्वारी, मका पिकांचे अतोनात नुकसान धाराशिव जिल्ह्यात सोमवारी रात्री निसर्गाचा कहर पाहायला मिळाला. लोहारा, उमरगा आणि तुळजापूर तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान गारपिटीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल सायंकाळी अचानक वातावरणात बदल होत विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला. उमरगा-नळदुर्ग परिसरात गारपीट इतकी तीव्र होती की महामार्गावर अक्षरशः बर्फ पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. द्राक्ष, केळी, आंबा, कलिंगड आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामान विभागाने १७ आणि १८ मार्चदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता, त्यानुसारच ही गारपीट झाली. मात्र या अवकाळी पावसाने काढणीस आलेल्या शेती पिकाचा अतोनात नुकसान केलं.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 18, 2026 04:05:45
Washim, Maharashtra:अकंर:राज्यातील हवामानात सध्या मोठे चढउतार पाहायला मिळत असून,हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी अवकाळी इशारा दिला आहे.एकीकडे तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असताना, हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.वाशिम जिल्ह्यासह परिसरात 20 मार्चदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यां मध्ये चिंतेचे वातावरण आहे.रब्बी हंगामातील हरभरा,गहू पालन पिके काढणीच्या टप्प्यात असून,तर हळद काढणीला सुरुवात झाली आहे.अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे शेतकरी सध्या पिकांची कापणी व काढणी करण्याची धावपळ सुरु आहे.या बदलत्या वातावरणा मुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
771
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 18, 2026 04:04:50
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. ANC- राज्यात दोन दिवस वादळी वा-यासह पावसाचे असणार आहेत... कोकण, मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात 20 मार्चपर्यंत वादळी वा-यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे... तर मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये तुरळकठिकाणी हलक्या सरीचंचा अंदाज वर्तवण्यात आलाय... पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे... त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालाय.. मात्र दुसरीकडे पावसाच्या शक्यतेने बळीराजाची चिंता मात्र वाढलीये... वादळी पावसाच्या शक्यतेने काढणीला आलेलं पीक अडचणीत सापडलंय...
717
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 18, 2026 03:51:09
Yavatmal, Maharashtra:पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने माकडावर मारलेला डार्ट निशाणा चुकल्याने ग्रामस्थाला लागला. त्यामुळे माकडा ऐवजी ग्रामस्थ बेशुद्ध पडले. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील भवानी या गावात ही घटना घडली. गावात एक माकड काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे, ग्रामस्थांवर हल्ले करीत आहे त्यामुळे या पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे पथक गावात पोहोचले. त्यांनी माकडाला बेशुद्ध करण्यासाठी ट्रॅन्क्विलायझर गन मधून डार्ट सोडला, मात्र निशाणा चुकल्याने तो डार्ट थेट गर्दीत उभे असलेल्या सदानंद खराटे यांना लागला. माकडा ऐवजी ग्रामस्थच बेशुद्ध झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमी सदानंद खराटे यांना तातडीने कोरटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. पिसाळलेल्या माकडाला जेरबंद करण्यासाठी आता वन विभागाने पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत.
906
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 18, 2026 03:47:12
Nagpur, Maharashtra:नागपुर - नागपुरात दुर्दैवी घटना, सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शारदा नगर परिसरातील दुर्दैवी घटना. मृत बालकाचे नाव दानिश अयाज अन्सारी अस सहा वर्षीय चिमुकल्याच नाव. घराजवळील मोकळ्या मैदानात खेळताना तोल जाऊन खड्ड्यात पडल्याच बोललं जातं आहे. घाणेरडे पाणी नाक-तोंडात गेल्याने गुदमरून जागीच मृत्यू. बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांकडून शोध सुरू, सुमारे दोन तासांनी खड्ड्यातून मृतदेह आढळला. घटनेमुळे परिसरात हळहळ, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर. पोलिसांकडून पंचनामा, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शहरात उघडे खड्डे आणि सांडपाणी व्यवस्थेचा अभाव गंभीर समस्या. यापूर्वीही उघड्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना झाल्या आहेय.. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी केली जात आहे...
1005
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 18, 2026 03:17:50
Satara, Maharashtra:साताऱ्यातील खासदार उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये एका आगळ्यावेगळ्या पाहुण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खाकी वर्दी अंगात दरारा आणि हातात पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या एका पोलीस इन्स्पेक्टर ने थेट खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. मात्र हा कोणी खरा पोलीस अधिकारी नसून आपल्या कलेच्या जोपासनेसाठी आलेला एक बहुरूपी कलाकार होता. त्याच्या या संवादशैलीमुळे जलमंदिरचा परिसर हास्याने फुलून गेला. त्याने महाराजांसमोर उभे राहून जेव्हा आपल्या खास शैलीत विनोद सादरीकरण सुरू केले. तेव्हा उदयनराजेंनाही आपले हसू आवरता आले नाही... ग्रामीण भागात गावोगावी फिरून लोकांचे मनोरंजन करणारी बहुरूपी ही कला आता काळाच्या ओघात दुर्मिळ होत चालली आहे. हीच कला जिवंत ठेवण्यासाठी एका युवकाने पोलीस इन्स्पेक्टरचा वेश परिधान केला होता. या युवकाने सादर केलेल्या कलेचे उदयनराजेंनी कौतुक केले
958
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 18, 2026 03:16:35
959
comment0
Report
Advertisement
Back to top