Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम के चार नगरपरिषदों में महाविकास आघाडी और महायुती के बीच कड़ा मुकाबला

GMGANESH MOHALE
Nov 18, 2025 04:51:17
Washim, Maharashtra
वाशिम चार नगरपरिषद आणि एक नगरपंचायत अशा पाचही ठिकाणच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी विविध पक्षांकडून उमेदवारांनी मोठ्या संख्येने नामांकन अर्ज दाखल केले. यामुळे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे.जिल्ह्यात महायुतीची सांगड चारही ठिकाणी जुळू शकली नाही, केवळ रिसोडमध्ये महायुती झाली आहे.मात्र महाविकास आघाडीने एकत्र राहण्यात यश मिळवले आहे.तरीदेखील,कोण कुठून लढणार याचे वास्तविक चित्र उद्या १९ नोव्हेंबर रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशी स्पष्ट होणार आहे.विविध राजकीय पक्षांनी काही ठिकाणी युती,काही ठिकाणी मैत्रीपूर्ण स्पर्धा, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे.स्थानिक पातळीवरील गटबाजी,स्वतंत्र उमेदवारांची संख्या,तसेच विविध आघाड्यांची व्यूहरचना यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे राजकीय समीकरण दिसत आहे.विशेषकरुन वाशिम जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून मतदारांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवसांत स्थानिक राजकारणात आणखी हालचाली वेग घेतील,अशी चिन्हे आहेत. वाशिम जिल्ह्यातील चार नगरपरिषद व एक नगरपंचायत करिता मुख्य पक्षाचे अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज वाशिम नगर परिषद अध्यक्ष पदासाठी १)अनिल केंदळे- भाजप. २)रेखा सुरेश मापारी - शिवसेना UBT ३)वैभव नितीन उलेमाले- वंचित बहुजन आघाडी. ४)रवी भांदुर्गे -(अपक्ष )शिंदेची शिवसेना ५) मो. काझीम AIMIM ६)नागोराव ठेंगडे शिवसेना,UBT कारंजा नगर परिषद अध्यक्ष पदासाठी १)फरीदा बानो पूंजानी (MIM) २)निशा विनीत गोलेच्छा (भाजपा) ३)फिरदौस सैय्यद नसीरुद्दीन खतीब (वंचित) ४)नाजिया खानम जुनैद खान (अजित पवार) ५)शाहिना परवीन अब्दुल राजिक (कांग्रेस) ६)अलका हरीश हेडा (राठौर) मनसे पुरस्कृत ७) वैशाली येळने-शिवसेना शिंदे गट मालेगाव नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी १)गणेश रामप्रसाद अहिर, काँग्रेस (मविआ ) २) ओमप्रकाश खुरसडे- शिवसेना शिंदे गट. ३) नागेश बळी -भाजप ४) रहमान शाह -वंचित बहुजन आघाडी मंगरूळपिर- नगर परिषद अध्यक्ष पदासाठी १)अशोक परळीकर -राष्ट्रवादी अजित पवार. २)शादाब अहमद रियाज अहमद कुरेशी-वंचित बहुजन आघाडी. ३) डॉ. दिलीप रत्नपारखी-भाजप. रिसोड नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी
136
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Nov 18, 2025 06:04:38
Virar, Maharashtra:झाडू मारताच निघतेय डांबर, खडीपालिकेचे पॅच वर्कचे काम निकृष्ट दर्जाचे नागरिकांमध्ये संतापाची लाट उशिरा काम सुरू केले तरी कामाचा दर्जा नाही अँकर - वसई विरार महानगर पालिकेने यंदाच्या पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे उशिरा सुरू केली असली, तरी या कामांच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विरार पूर्व येथील जीवदानी रोडवर रात्री उशिरा पॅच वर्क करण्यात आले. मात्र रात्रीच्या अंधारात केले जाणारे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. पॅच वर्कसाठी टाकलेले डांबर झाडू मारताच निघत असून, अशा कामाचा टिकाव किती राहील, याबाबत शंका व्यक्त होत आहे. जनतेच्या पैशातून होणाऱ्या या दुरुस्ती कामांमध्ये गुणवत्ता नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पावसाळ्यात खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती तातडीची असली, तरी पालिकाेच्या अशा निकृष्ट कामपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.पालिका प्रशासनाकडून या तक्रारींवर कोणती कारवाई केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 18, 2025 06:02:01
Dhule, Maharashtra:ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती उद्या निकाल येणार आहे. या प्रकरणात काही अनपेक्षित निकाल येऊ शकतो अशी शक्यता या प्रकरणातील मुख्य तक्रारदार एडवोकेट राहुल वाघ यांनी व्यक्त केलेली आहेत. राज्य शासनाने योग्य आकडेवारी उपलब्ध करून न दिल्यास न्यायालय ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका घेण्याचे आदेश देऊ शकते, अशी एक शक्यता राहुल वाघ यांनी व्यक्त केलेली आहे. राहुल वाघ हे सुरुवातीपासून 50% आरक्षणाच्या मर्यादा ओलांडली जात असल्याच्या विरोधात सातत्याने भूमिका मांडत आहेत. त्यांची ही भूमिका थेट आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेले आहे. ओबीसी आरक्षणास शिवाय निवडणुका पार पाडल्या जाऊ शकतात या शक्यतेने आता नव्या चर्चेला तोंड फुटल आहे. बांठिया आयोगाच्या आधीची स्थिती देखील आरक्षणाची मर्यादा ओलांडणारी होती असं वाघ यांनी स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे न्यायालयाने निकाल देत असताना स्पष्ट दिला होता का? याबातही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकत. आरक्षणातील मुख्य तक्रारदार राहुल वाघ यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 18, 2025 05:50:58
Akola, Maharashtra:अकोला जिले में पांच नगर परिषद और एक नगर पंचायत चुनाव के नामांकन अंतिम दिन धामधूम में पार पडला. 2 दिसंबर को होने वाली इस चुनाव के लिए उम्मीदवारों ने अंतिम दिन ही बड़े पैमाने पर आवेदन दाखिल किए जिससे नगर परिषद परिसर अक्षरशः यात्रे के स्वरूप आ गया. अकोट, हिवरखेड, तेल्हारा, मुर्तिजापुर, बाळापूर और बरषीटाकळी नगराध्यक्ष पद के लिए कुल 56 और नगरसेवक पदों के लिए तब तक 675 उम्मीदवारों ने नामांकन दाखिल किया है. शुरूआती दिनों में नामांकन प्रक्रिया धीमी गति से चली, परंतु आखिरी दिन विभिन्न राजनीतिक पार्टियों के उम्मीदवार, समर्थक और कार्यकर्ताओं की भीड़ के कारण परिसर दणाणू बन गया. राजनीतिक दल नगराध्यक्ष पद की उम्मेदवारी के बारे में आखिरी वक्त तक慎 भाव बनाए रखने में लगे थे. कई पार्टियों ने अधिकृत घोषणा न करके अंतिम क्षण में आवेदन दाखिल करने की रणनीति अपनाई जिससे कई इच्छुक उम्मीदवार पार्टिया के ‘होकार’ मिलते ही प्रतीक्षा में थे. परिणामस्वरूप, आखिरी दिन ही नामांकन का तुफान आया.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 18, 2025 05:50:43
Pandharpur, Maharashtra:ANCHOR - सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपालिका के नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे सून डॉक्टर प्रणिता भालके यांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यांचे पती भगीरथ भालके यांनी 2 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. त्या पहिल्यांदाच एखाद्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. करमाळ्यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप यांना शिवसेना शिंदे गट यांच्याकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. मंगळवेढा नगरपालिकाेत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या चुलती सुनंदा आवताडे यांनी विरोधी समविचारी आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 18, 2025 05:35:18
Pandharpur, Maharashtra:Anchor - सोलापूरच्या सांगोल्यात नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक 31 उमेदवारी अर्ज दाखल, तर पंढरपूर मध्ये नगरसेवक पदासाठी 366 एवढे अर्ज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगरसेवक पदासाठी 366 उमेदवारी अर्ज दाखल, मंगळवेढा नगरपालिकेसाठी 17 अर्ज नगराध्यक्ष पदासाठी तर 160 अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झाले आहेत. अकलूज नगरपरिषद साठी 7 अर्ज नगराध्यक्ष पदासाठी 7 तर नगरसेवक साठी 151 अर्ज आले आहेत. सांगोला साठी 31नगरध्यक्ष पद उमुदवारी अर्ज तर नगरसेवक साठी 338 अर्ज आले आहेत. कुर्डूवाडी साठी 10 नगराध्यक्ष तर 164 नगरसेवक साठी अर्ज दाखल झाले. करमाळ्यात 15 अर्ज नगराध्यक्ष तर 254 उमेदवारी अर्ज नगरसेवक साठी आले आहेत.
42
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 18, 2025 05:34:45
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- राजन साळवी यांचा मुलाचे पत्र सोशल मिडयावर व्हायरल फेसबुक वरून अर्थव साळवी यांनी रत्नागिरीकरांना लिहले भावनिक पत्र  रत्नागिरीकर आणि प्रभाग क्रमांक १५ मधल्या जनतेला स्टेटस् द्वारे लिहले पत्र पक्ष निष्ठा या आशयाखाली मनातील भावना व्यक्क़ महायुतीच्या निर्णयाने निवडणुकीतून बाजूला व्हावं लागत आहे नेतृत्व सोडत आहे पण लोकांची सेवा तुमच्यासाठी धडपड आणि तुमच्या कामासाठी धावपळ कधीच सोडणार नाही राजकारण बदलू शकतं... पदं येतात-जातात... पण नातं ? ते मात्र कायम राहतं - तुमचं आणि माझं. अशी भावनिक स्टेटस ठेवून अर्थव साळवी प्रभागातील नागरिकांसमोर काल राजन साळवी यांच्या मुलाला शिवसेनेने रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली  राजन साळवी यांचा मुलगा अथर्व राजन साळवी प्रभाग क्रमांक 15 मधून होता इच्छुक
78
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 18, 2025 05:13:11
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यात ४ नगर परिषदा आणि एका पंचायतीसाठी निवडणूका.... नगराध्यक्षासाठी १०३ तर नगरसेवकपदांसाठी १२५७ अर्ज दाखल.... AC ::- लातूर जिल्ह्यात ४ नगर परिषदा आणि एका पंचायतीसाठी निवडणूक होत आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या काल शेवटचा दिवस होता. नगराध्यक्षपदासाठी १०३ जणांनी अर्ज दाखल केला आहे.तर नगरसेवकपदांसाठी एकूण १ हजार २५७ जणांनी उमेदवारी अर्ज केले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने राजकीय रंग चढला आहे. निलंगा, उदगीर व रेणापुरात महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाली असून, औशात महायुतीत मोठी फाटाफूट झाली आहे. उदगिरात मात्र आघाडी आणि महायुतीत हे कोणी एकसंघ राहिले नसून, कोणचेच कोणाशी जमताना दिसत नाही. नेमकी बंडाळी कुठे आणि किती होईल, हे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी कळणार असले तरी सध्याचे चित्र मात्र कोणत्याही राजकीय पक्षासाठी स्पष्ट दिसत नाही.
105
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 18, 2025 05:13:01
Kalyan, Maharashtra:मध्ये रेल्वेचा वेळापत्र कोलंडले. कल्याणच्या रेल्वे स्थानकात प्रवश्याची प्रचंड गर्दी. रेल्वे प्रशासनाकडून सूचना मिळत नसल्याने प्रवश्यान मध्ये संताप. मध्य रेल्वेच्या भीम्या मार्गावरील विक्रोळी और भांडुपाच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने कल्याणच्या रेल्वे स्थानकावर ती प्रवाशांची प्रचंड गर्दीमुले प्रवश्याचे हाल मुंबई कडून कल्याण लोकल लेट असल्याने कल्याण रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी सकाळीच लोकल उशिराने धावत असल्याने नागरिकांना कामावर जाण्यासाठी उशीर होतं असल्याने प्रवासी मध्ये संताप.लोकल उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासना कडून कोणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने नागरिकांन मध्ये संताप वेक्त केला जात आहे
83
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 18, 2025 05:05:50
Washim, Maharashtra:वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यात नाफेडच्या हमीभाव योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीला कालपासून सुरुवात झाली असून खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसत आहे.यंदा मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याने कारंजा रोड शेलूबाजार येथील खरेदी केंद्रावर विशेषतः उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल५,३२८ रुपये असा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.या दरामुळे शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून नुकसान सहन केलेल्या उत्पादकांना काहीसा दिलासा मिळत आहे. यंदा अनियमित पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे हमीभाव खरेदी ही शेतकऱ्यांसाठी आश्वासक ठरत आहे.शासकीय योजनेमुळे बाजारात स्थैर्य येत असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास याचा हातभार लागेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
125
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 18, 2025 05:05:27
188
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 18, 2025 05:05:10
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर |रब्बीच्या आतापर्यंत २५ टक्केच पेरण्या. अँकर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा मुबलक पाऊस पडल्याने नदी, नाले वाहत आहेत. शिवाय लहान, मोठी धरणे पाण्याने भरली. परिणामी, यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र दीडपट अधिक क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. असे असले तरी जिल्ह्यात आतापर्यंत प्रस्तावित एकूण क्षेत्राच्या २५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.दरवर्षी जिल्ह्यात सरासरी २ लाख ३८ हजार ८८० हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होते. यंदा मात्र सर्वच मंडळांत ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. शिवाय दिवाळीतही पाऊस पडल्याने जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांत ९८ टक्क्यांवर जलसाठा आहे. यामुळे रब्बीचे क्षेत्र यंदा दीड पटीने वाढण्याचा अंदाज आहे.
186
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 18, 2025 04:52:25
118
comment0
Report
Advertisement
Back to top