442001
आर्वी में अवैध कुत्तों से 8 वर्षीय धवल की मौत, नगर परिषद पर आक्रोश
Wardha, Maharashtra:वर्ध्यात 8 वर्षीय चिमुकल्याचा बेवारस कुत्र्यांने चावा घेतल्याने मृत्यू? वर्ध्याच्या आर्वी शहरातील धक्कादायक घटना धवल गुल्हाने असं मृत बालकांचे नाव 25 जानेवारीला आर्वीच्या भाकरे ले-आऊट मध्ये चावला होता बेवारस कुत्रा 8 वर्षीय धवल याच्या गालावर आणि हाताचे तोडले होते बेवारस कुत्र्याने लचके आर्वी येथून अमरावती,आणि नागपूर येथे उपचारासाठी आले होते हलविण्यात 16 तारखेला नागपूर मेडिकल मध्ये धवल गुल्हाने याचा मृत्यू झाला. आर्वी शहरात महिन्याभरापासून बेवारस कुत्र्यांची दहशत शहरातील विविध प्रभागमध्ये आतापर्यंत 12 जणांचे बेवारस कुत्र्यांनी तोडले लचके नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांकनडून आहे ओरड0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
देवरी जंगल में बाघ का हमला, चार लोग सुरक्षित बच गए
Bhandara, Maharashtra:देवरीच्या जंगलात थरार! वाघाचा हल्ला... म्हशीचा पंचनामा स्ववीच्छेदन करायला गेलेल्या डॉक्टरानवर वाघाचा हल्ला चार जण थोडक्यात बचावले! भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील अड्याळ येथील जंगल परिसरात सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत पट्टेदार वाघाने चार जणांवर अचानक धाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली. सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे सर्वजण थोडक्यात बचावले. लाखनी तालुक्यातील देवरी परिसरात वाघाने एका म्हशीचा बळी घेतला होता, तर दुसरी म्हैस जखमी झाली होती. याबाबत गणेश मारवाडे देवरी यांनी वन विभागाच्या सूचनेनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले. त्यानुसार सायंकाळी सुमारे ६.३० वाजता पशुधन विकास अधिकारी, हे स्पॉटवर पोहोचले. शेतशिवारालगत मृत म्हशीचे छायाचित्रण सुरू असतानाच अचानक पट्टेदार वाघ समोर आला आणि चारही जणांवर धावून येण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र उपस्थितांनी मोठ्याने आरडाओरडा करत कुऱ्हाड दाखवत धैर्याने परिस्थितीचा सामना केला. त्यामुळे वाघ काही अंतरावर थांबला आणि सर्वजण तिथून पळून जाऊन जीव वाचवण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
वाशीम में रक्तदान की जरूरत बढ़ी: लोग स्वेच्छा से रक्तदान करें
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात एकीकडे उन्हाळ्याचे तीव्र चटके वाढत असतानाच रक्तटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रक्तदानाचे प्रमाण घटल्यामुळे शासकीय रक्तपेढीतील सध्या केवळ आठवडाभर पुरेल इतकंच रक्त उपलब्ध आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी ३० ते ३५ रक्तपिशव्यांची गरज भासते. मात्र सध्यााच साठा अवघ्या ८० बॅगपर्यंत घसरल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. विशेष म्हणजे ए, बी, एबी आणि ओ या सर्व रक्तगटांतील निगेट व्हटिव्ह गटांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे.वाशीम जिल्ह्यात बॅलेसेमिया, सिकलसेलसह विविध आजारांनी ग्रस्त सुमारे १७० रुग्णांचे जीवन नियमित रक्तपुरवठ्यावर अवलंबून आहे. मात्र, रक्तदाते कमी होत असल्याने आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन मर्यादित प्रमाणात होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना पुढे येत स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि युवकांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून या संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.0
0
Report
डोंबिवली पश्चिम के नवापाडा में गड्ढे में मोटरसाइकिल चालक गिरा; लोगों ने गाड़ी बाहर निकाली
Kalyan, Maharashtra:तोल जाऊन नागरिक खड्ड्यात पडला. सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये आहेत डोंबिवली पश्चिमेत नवापाडा आगरी सभागृह समोरील रोडवर रस्त्याचे काम सुरू असताना दुचाकी तेथून घेऊन जात असताना चालकाचा तोल जाऊन चालक गाडीसह गटारासाठी खोदलेला खड्ड्यात पडल्याने रस्त्यावरील नागरिक आणि समोरील जिमच्या कर्मचाऱ्यांनी खड्ड्यात पडलेल्या गाडीला गाडीला बाहेर काढण्यात मदत केली.0
0
Report
Advertisement
मालेगांव में अंतरराज्यीय चैन स्नैचिंग गिरोह का पर्दाफाश, मुख्य आरोपी बीदर से गिरफ्तार
Malegaon, Maharashtra:आंतरराज्यीय चैन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई कर्नाटकातील बिदरयेथून मुख्य आरोपी अटक मुस्तफा अली इसा अली (वय २०, मूळ भुसावळ) ताब्यात घेतले आहे. मालेगावसह जिल्ह्यातील १० चैन स्नॅचिंग गुन्हे उघड झाले असुन त्यांनी मोटारसायकलवरून महिलांचे सोन्याचे दागिने हिसकावत असल्याची कबुली दिली आहे. टोळीतील सादिक अली, भोला सज्जाद अली, अब्बास अली व अन्य साथीदार फरार असून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातही गुन्ह्यांची शक्यता आहे.0
0
Report
Hindi headline
Chandvad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या निमोण गावाने यंदा पाणीटंचाईवर यशस्वी मात केली आहे डिसेंबर महिन्याच्या शेवटी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या या गावाने आता टँकरमुक्त गावांच्या यादीत स्थान मिळवले आहे गावच्या सरपंच डॉ. स्वाती देवरे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी योग्य नियोजन करत विविध स्वयंभू उपक्रम राबवले ग्रामपंचायत आणि ‘राहा फाउंडेशन, मुंबई’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून एक एकर क्षेत्रावर साठवण तळे उभारण्यात आले या तळ्यात सुमारे सव्वा कोटी लिटर पाण्याची साठवण करण्यात आली असून हा साठा चार महिन्यांसाठी पुरणार असून तसेच गावातील दोन विहिरींच्या माध्यमातून दर चार दिवसांनी नळावाटे पाणीपुरवठा केला जात आहे ज्यामुळे ग्रामस्थांची पाण्याची गरज भागवली जात आहे निमोण गाव टँकरमुक्त झाल्याने शासनाचा देखील मोठा आर्थिक फायदा झाला असून दरमहा सुमारे दीड लाख रुपये खर्च वाचत आहे चार महिन्यांत एकूण सहा लाख रुपयांची शासनाची बचत झाली आहे.0
0
Report
शिर्डी पुलिस के समक्ष दीपक लोंढे और अशोक खरात पर जांच शुरू
Shirdi, Maharashtra:दिपक लोंढे शिर्डी पोलिस ठाण्यात हजर. भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी हजर. एक तासांपासून दीपक लोंढे याची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू. अशोक खरातसह दिपक केसरकर यांचे निकटवर्तीय असल्याचा लोंढे यांच्यावर आरोप. अशोक खरात नॉमिनी असणारी समता पतसंस्थेत दिपक लोंढे आणि पत्नीच्या नावे चार खाती. खात्यांवरून कोट्यवधींच्या व्यवहार. तर खरात पती पत्नीच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यांवर लोंढे यांची देवाणघेवाण झाल्याचा पोलिसांना संशय. शिर्डी पोलिसांकडून दिपक लोंढेंची चौकशी सुरू. लोंढे यांच्या जबाबातून काय खुलासे होणार याकडे लक्ष...0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में तीन बस स्टेशनों का उद्घाटन, परिवहन मंत्री सरनाईक ने स्थिति का गहरा आकलन
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर के तीन ठिकाणी हमने बस स्थानक के उद्घाटन करने वाले हैं। प्रमुख द्वारा प्रत्येक निगरानी में प्रत्येक स्थान पर क्या-क्या कमी हैं.. बसों की संख्या कितनी है.. बसों की कितनी जरूरत है इसकी जानकारी परिवहन मंत्री के रूप में हम ले रहे हैं.. कोल्हापुर की प्रगति बढ़त चालली आहे. यहाँ बस सेवा अधिक होनी आवश्यक है. उपलब्ध डिपो उच्च गुणवत्ता का बनाने को हमारा कर्तव्य समझते हैं. एसटी महामंडळ नुकसान में ही आता रहा है. नुकसान कैसे भरना है इसका प्रयास है... एसटी ना फायदा.. न असर... इस सिद्धान्त पर चलने की भूमिका राज्य सरकार की. देश के किसी भी ST महामंडळ लाभ में नहीं हैं क्योंकि उन्हें जनता को सेवा देनी होती है. लेकिन नुकसान ना बढ़े और ST ना फायदा.. न तत्त्व पर चलते रहें यह हमारा प्रयास. ज्या बालासाहेबांच्या नामावर त्यांना महापौर पद मिळाले. अब वे विपक्ष नेता के रूप में काम कर रहे हैं.. ऐसी पद्धति से सभागृह में चर्चा करते समय वे ऐसे बोलेंगे तो हर शिवसैनिक को उनका विरोध करना चाहिए. महापौर और सभी सदस्योंने उन्हें जवाब दिया है. अंत में जिसका खाने चाहिये वो मीठा अगर गलत वक्तव्य के लिए है तो उसका विरोध जरूरी है. रिक्षा परमिट भाषिक विवाद यह भाषिक विवाद आदि कुछ उत्पन्न नहीं हुआ है.. महाराष्ट्र में जिसे व्यापार करना है. महाराष्ट्र का रिक्षा चलाना है तो उसे मराठी आना ही चाहिए. महाराष्ट्र का परिवहन मंत्री होने के नाते नहीं बल्कि राज्य के नागरिक के रूप में जो अधिकार सरकार ने दिए हैं, उसके अनुसार यह उचित है. रिक्षा के बैच देते समय उस ड्राइवर से फॉर्म भरवाया जाता है, जिसमें स्पष्ट रूप से मराठी बोलना आवश्यक है ऐसा स्पष्ट लिखा है.0
0
Report
पंढरपूर तालुका पुलिस ने अवैध शराब की बड़ी खेप जप्त की, 22,700 रुपये मूल्य
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध दारू विक्री प्रकरणी मोठी कारवाई केली आहे 22 हजार 700 रुपयांचा दारू साठा पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी जप्त केला आहे पंढरपूर तालुक्यातील रोपळे तुंगत गोपाळपूर देगाव कासेगाव या ठिकाणी कारवाई करून देशी-विदेशी कंपन्यांच्या दारू बाटल्या वेगवेगळ्या कंपनीच्या अवैध दारू साठा जप्त केला आहे पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे0
0
Report
रत्नागिरी में भीषण गर्मी से जल भंडार घटे, जलसाठे संकट में
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. उन्हाचा 'ताप',पाण्याची 'वाफ'.. जिल्ह्याची चिंता वाढली! संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून त्याचा थेट परिणाम आता जलसाठ्यांवर होऊ लागला आहे.. वाढत्या उष्णतेमुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन अत्यंत वेगाने होत आहे.. यापुढे तापमानात वाढ अधिकच होणार असल्याने जलसाठे अधिक वेगाने आटू लागण्याची शक्यता वाढली आहे.. जिल्ह्यात एकूण 46 लघु प्रकल्प आहेत..गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत या लघु प्रकल्पांमध्ये 41.52 टक्के इतका उपयुक्त पाण्याच्या साठा होता,मात्र यंदा तापमान वाढले असल्याने या सर्व लघु प्रकल्पांमध्ये यंदा 36.94 टक्के पाणीसाठा आहे.. वाढते तापमान पाहता यंदा अधिक घट होण्याची शक्यता आहे तर मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या 58 टक्के पाणीसाठा आहे.. वाढते तापमान पाहता यंदा अधिक घट होण्याची शक्यता आहे..0
0
Report
Advertisement
परंडा तहसील में अवैध बालू माफियाओं पर बड़ा राडा, तहसीलदार को धमकी
Dharashiv, Maharashtra:परंडा तहसील कार्यालयात वाळू माफियांवरून राडा, तहसीलदारांना थेट जीवे मारण्याची धमकी. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात अवैध वाळू प्रकरणावरून मोठा राडा झाला आहे. तक्रारदाराने थेट तहसीलदार निलेश काकडे यांची गाडी अडवून “आत्ताच कारवाई करा, नाहीतर जीवे मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. यावेळी तक्रारदार आणि तहसीलदार यांच्यात जोरदार बाचाबाची झाली असून, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.दरम्यान, या प्रकारानंतर महसूल विभाग आक्रमक झाला असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत तात्काळ अटक न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशाराही महसूल संघटनेने दिला आहे. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
अलीबाग: नाबालिग छात्रा के साथ स्कूल वैन चालक पर विनयभंग, पॉक्सो तहत मामला दर्ज
Chendhare, Maharashtra:अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाविरोधात ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी रोजप्रमाणे व्हॅनने शाळेत जात असताना चालकाने तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. मांडवा सागरी पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.0
0
Report
राष्ट्रवादी के विद्यार्थी नेता संकेत कदम ने भाजपा में किया प्रवेश
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संकेत कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश.. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संकेत कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश एक्झिक्यूटिव येथे हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या हस्ते संकेत कदम यांचा पक्ष प्रवेश झाला. त्यानंतर संकेत कदम यांच्या सहकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचं यादव यांनी स्वागत केलं.. आगामी काळात काही मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचं यादव यांनी यावेळी सांगितलं..0
0
Report
Advertisement
भिवंडी के इंदिरा गांधी अस्पताल में सुरक्षा कर्मी ने मरीज को मारहाण, आंदोलन तेज
Thane, Maharashtra:भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात रुग्णांना सुरक्षा रक्षकाची मारहाण...आदिवासी संघटनेचे ठिय्या आंदोलन...अँकर...भिवंडी शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, कुत्रा चावल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णाला सुरक्षा रक्षकाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्ण कुत्रा चावल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी आला होता. यावेळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली. तिथे उभ्या असलेल्या दुसऱ्या डॉक्टरांना रुग्ण मोबाईलवर व्हिडिओ शूट करत असल्याचा संशय झाला, ज्यामुळे वाद अधिक चिघळला. या वादानंतर रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाने हस्तक्षेप करत रुग्णाला मारहाण केली. तसेच त्याला एका खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे उपस्थित नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या प्रकरणाच्या निषेद्र्थार्थ आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. शांती नगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून, संबंधित सुरक्षा रक्षक आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती मिळत आहे. बाईट :- संदीप वाघे ( रुग्ण ) बाईट :- किशोर हुमणे ( श्रमजीवी संघटना कार्यकर्ता )0
0
Report
पंढरपुर में जन्मदिन पर रिलस्टार महिला हत्या, प्रेमी ने गला घोंटकर दी मौत
Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात वाढदिवसादिवशीच रिलस्टार महिलेची हत्या, अनैतिक संबंधातून प्रियकराने घेतला जीव पंढरपूर तालुक्यातील सुगाव भोसे येथील रिल स्टार महिलेचा मृतदेह पोलिसांना कालव्यात आढळून आला होता. सोशल मिडिया वर मोठ्या संख्येने फॅन्स आहेत. त्यामुळे खळबळ उडाली होती. विवाहित सोनाली नेताजी जाधव या महिलेचे तुकाराम गावंधरे सोबत प्रेम जुळले होते. यामुळे सोनाली आणि तुकाराम दोनघांचा पूर्वीचा संसार मोडला. यानंतर सोनालीची सोशल मिडीयात क्रेझ वाढली. त्यामुळे तिने तुकारामला वेळ कमी देऊ लागली. त्यात तिला नवीन मित्र भेटले. ती त्यांच्या सोबत फिरू लागली. यामुळे तुकाराम दुखावला त्याने सोनालीला संपवण्याचा कट केला. 6 एप्रिल रोजी सोनालीचा वाढदिवस होता. त्या दिवशी तुकारामने वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने सोनालीला बाहेर नेले. यानंतर दोन दिवस सोनाली घरी आलीच नाही. 9 एप्रिल रोजी सोनालीचा मृतदेह रोपळे गावाजवळील कालव्यात सडलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तपास केला असता तुकाराम गावंधरे याने सोनाली हिचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. सोनाली साठी तुकारामचा संसार उध्वस्त झाल्याने सोनालीची हत्या केली.0
0
Report
एनएमएमटी के कर्मचारियों के वेतन में 7000 रुपये की बढ़ोतरी; समिति का बड़ा निर्णय
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात (एनएमएमटी) ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदरात अखेर वेतनवाढीचे दान पडले आहे. परिवहन समितीच्या बैठकीत चर्चेअंती, १३९८ कर्मचाऱ्यांच्या मानधनात ७ हजार रुपयांची सरसकट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महागाईने होरपळणाऱ्या चालक आणि वाहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने या निर्णयाचे कर्मचारी संघटनांकडून स्वागत होत आहे. या वेतनवाढीमुळे एनएमएमटी च्या व पर्यायाने महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाक्ठी कोट्यवधींचा अतिरिक्त बोजा पडणार आहेत.0
0
Report
Advertisement
