Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

शिवसेना बनाम भाजपा: डोंबिवली महापौर पद के लिए चली सियासी धार

ABATISH BHOIR
Jan 21, 2026 12:49:23
Kalyan, Maharashtra
शिवसेनेने केला भाजपचा गेम शिवसेनेकडून भाजपाला दे धक्का भाजप मात्र शांततेच्या भूमिकेत शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये युतीमध्ये लढले होते. असं असतांना देखील सेनेने भाजपाला एकट पाडलंलं पाहायला मिळत आहे . बहुमत और महापौर पदासाठी ६२ नगरसेवकांची मॅजिक फिगर ही लागणार आहे. शिवसेनेकडे ५३ नगरसेवक होते, मात्र बहुमतासाठी आणखी काही नगरसेवकांची गरज भासणार असल्याने शिवसेनेकडून जुळवाजुळवीचे राजकारण सुरू होते. आज शिवसेना शिंदे पक्षाने गट स्थापना केल्यानंतर मनसेचे पाच नगरसेवकांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला तर काँग्रेसचे दोन नगरसेवक यांनी देखील जाहीर पाठिंबा दिला तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एक नगरसेवक यांनी देखील त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याने शिवसेना शिंदे पक्षाकडे नगरसेवकांची संख्या ही ६१ झाली. मॅजिक फिगर गाठण्यासाठी सेनेला अजूनही एक नगरसेवकची आवशकता आहे ,तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार नगरसेवक यांचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. शिवाय ठाकरे पक्षाचे दोन नगरसेवक हे पहिल्या दिवसापासून नॉट रिचेबल आहेत. तसेच ठाकरे पक्षाचे आणखी दोन नगरसेवक हे कालपासून नोटेऱीचेबल आहेत, त्यामुळे हे चार नगरसेवक हे कोणाला पाठिंबा देतात ,की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत राहतात का हे पाहावं लागणार आहे. मात्र या सत्ता संघर्षामध्ये भाजपा पक्ष शांततेत सगळ्या घडामोडी पहात आहे.त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया यावर दिलेली नाही ? त्यामुले भाजपाची ही वादळापूर्वची शांतता आहे का अशी चर्चा शहरात सुरू आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Jan 21, 2026 13:23:45
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेतील सत्ता स्थापनेवरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.उबाठा गट आणि भाजप यांच्यात सत्ता स्थापनेसाठी चर्चा झाल्याची जोरदार चर्चा सुरू असताना, या चर्चांवरून आता परस्परविरोधी दावे समोर येत आहेत. उबाठा गटाकडून करण्यात आलेल्या प्रस्तावाला भाजपने अद्याप दुजोरा दिलेला नाही. अकोला महापालिका ची निवडणूक पार पडल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे.याच पार्श्वभूमीवर उबाठा गटाला भाजपकडून फोन आल्याची चर्चा शहरात रंगली होती. या चर्चांना भाजपने काही अंशी दुजोरा दिला असला, तरी सत्ता स्थापनेसंदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.उबाठा गटाने सत्ता स्थापनेसाठी भाजपसमोर काही नागरी सुविधांचे प्रस्ताव मांडले होते.मात्र या प्रस्तावांवर भाजपकडून अद्याप कोणतंही उत्तर मिळालं नसल्याचं उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.प्रस्ताव मान्य झाल्यास भाजपसोबत जाण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं, त्याचप्रमाणे जो कोणी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असेल त्याच्यासोबत आम्ही जाऊ असही ते म्हणाले. तर उबाठाचे सर्व नगरसेवक सोबत असून कोणीही भाजपच्या संपर्कात नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नितीन देशमुख, आमदार, उबाठा. दरम्यान, उबाठा गटाच्या जिल्हा प्रमुखांसोबत चर्चा झाल्याचं भाजपचे अकोला महानगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक विजय अग्रवाल यांनी मान्य केलं आहे. मात्र या चर्चांमध्ये फक्त पदांबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.नागरी सुविधांबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगत, उबाठा गटाने उपमहापौर पदाची मागणी केल्याचं आणि ती मागणी भाजपने फेटाळल्याचंही विजय अग्रवाल यांनी सांगितलं. नागरी सुविधांचा मुद्दा हा विकासाचा असून, संबंधित कामे भाजपचे खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातून आधीच सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजप. Final Vo : आता दोन्ही पक्षातर्फे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र सत्यता काय हे काहीच दिवसात स्पष्ट होणार आहे. जयेश जगड, झी मिडिया, अकोला
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 21, 2026 13:21:16
Dhule, Maharashtra:अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आज मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील बोराड़ी गावाला भेट दिली. आदीवासी बहुल गाव असलेल्या बोराड़ी गावकऱ्यांच्या वतीने अभिनेत्री कुलकर्णी यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आदीवासी पारंपरिक नृत्यातून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे स्वागत करण्यात आले. गावातील मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करत लहानग्यांशी संवाद साधला. शासकीय योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची बोराड़ी गावाला भेट दिली असून, बोराड़ी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन देखील सोनाली यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना बघण्यासाठी परिसरातील मोठ्या प्रमाणात गर्दी एकत्र झाली होती.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 21, 2026 12:50:55
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Jan 21, 2026 12:36:34
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये माजी मंत्री tanaji सावंत यांना मोठा झटका, घरातून बंडखोरी. तानाजी सावंत यांच्याविरोधात पुतण्या धनंजय सावंत यांच्या बंड. परांडा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी स्वतंत्र उमेदवार रिंगणात. राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या धनंजय सावंत यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. धनंजय सावंत यांनी बंड पुकारून परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समितीच्या दहा जागेवर आपल्या समर्थकासह आज बुधवारी दुपारी १:४५ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. धनंजय सावंत यांनी बंड पुकारल्याने परंडा तालुका शिवसेनेला खिंडार पडले असून, आमदार तानाजी सावंत यांच्या साम्राज्याला मोठा धक्का पोहोचला आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Jan 21, 2026 11:39:27
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जोरदार शक्ती प्रदर्शन करत जिल्हा परिषदेत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल अँकर - सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटासाठी आणि पंचायत समितीच्या 122 गणासाठी निवडणूक पार पडत असून अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तालुक्याच्या ठिकानी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी पदयात्रा, मोटरसायकल रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मिरज तालुक्यातल्या समडोळी जिल्हा परिषद गटातून भाजपाचे नेते अरविंद तांबेकर यांनी भव्य मोटरसायकल रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 21, 2026 11:21:01
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना शिंदे आणि भाजप या दोघांमध्ये युती झाल्याची घोषणा झाली. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी युती धर्माचे पालन केले गेले नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. जी जागा शिवसेना सोडण्यात आली होती त्यात जागेवर भाजपाचे उमेदवार निवdणुकीत उभे टाकले आहेत. भाजपने त्यांना बी फॉर्म दिल्याचेही सांगितलं जात आहे. युतीचे नेमकं स्टेटस काय आहे हे मात्र दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते सांगायला तयार नाहीत. पैठण मध्ये सर्वच ठिकाणी भाजपने आपले उमेदवार उभे केल्याची चर्चा आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे दोन्हीकडच्या इच्छुकांनी अर्ज भरले असावेत असा एक अंदाज आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 27 जानेवारी पर्यंत मुदत आहे. त्यामुळे या काळात युती धर्माचे पालन म्हणून त्या त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले जातात का हे पहावं लागेल.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 21, 2026 11:01:31
0
comment0
Report
Advertisement
Back to top